आधुनिक विज्ञानातल्या घडामोडी

आपण शाळा कॉलेजांमध्ये शिकतो ते विज्ञान कमीतकमी शंभरदीडशे वर्षांपूर्वीचे असते. प्रात्यक्षिक प्रयोगामधील निरीक्षणावरून काढलेले निष्कर्ष हे विज्ञानाचे स्वरूप त्या काळात होते. शंभर वर्षांपूर्वी आइनस्टाइनने सांगितलेली रिलेटिव्हिटी थिअरी, क्वांटम मेकॅनिक्स यासारखे शोधसुद्धा सर्वसामान्य लोकांच्या आकलनाच्या पलीकडले असतात कारण ते जवळ जवळ पूर्णपणे तात्विक विवेचन आणि क्लिष्ट गणित यामधून सिद्ध केले जातात. आजकाल मूलभूत विज्ञानात काय चालले आहे याचा सर्वसामान्य लोकांना पत्ताच नसतो. आपली पाचही ज्ञानेंद्रिये ज्यांचे आकलन करू शकत नाहीत अशा संकल्पनांवर हे संशोधन चाललेले असते. अशा विषयावरील तीन लेख मी या पानावर जमा करीत आहे . त्या त्या विषयामधील तज्ञांनी ते अवघड विषय सोपे करून सांगण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. त्यांचे मनापासून आभार.

१.हिग्ज बोसॉन कण

सफर विज्ञानविश्वाची ( Safar Vidnyanvishwachi )
Jayesh Chachad · ·
हिग्ग्स फील्ड ची कल्पना मांडून हिग्ग्स बोसॉन कणांच्या अस्तित्वा विषयी भाकीत करणारे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ पीटर हिग्ग्स यांचे ८ एप्रिल २०२४ रोजी निधन झाले. सफर विज्ञानविश्वाची समूहातर्फे पीटर हिग्ग्स यांना आदरांजली !!!
हिग्ग्स बोसॉन कणांविषयीचा हा माझा लेख पीटर हिग्ग्स यांना समर्पित –
हिग्ग्स बोसॉन
वैज्ञानिक इतिहासातील सर्वात महत्वाच्या शोधांपैकी एक म्हणजेच २०१२ साली लार्ज हायड्रॉन कोलायडर या जगातील सर्वात मोठ्या यंत्रात शोधला गेलेला आणि २०१३ साली त्यावर शिक्कामोर्तब झालेला हिग्ग्स बोसॉन कण.
मूलकणांना वस्तुमान का असते असा प्रश्न शास्त्रज्ञांना भेडसावत होता. किंबहुना निरनिराळ्या मूलकणांना निरनिराळे वस्तुमान का असते तसेच काही मूलकण वस्तुमानरहित का असतात या प्रशांची उत्तरे शास्त्रज्ञ शोधत होते. गेज थिअरीनुसार बलवाहक कण वस्तुमान विरहित असायला हवेत. विद्युतचुंबकीय बलाचे वाहक फोटॉन आणि सशक्त (strong force) बलाचे वाहक कण ग्लुऑन हा नियम पाळत होते पण अशक्त बलाचे कण (weak force) डब्ल्यू आणि झेड बोसॉन मात्र हा नियम पाळत नव्हते. मूलकणांच्या वर्गीकरणात बलवाहक कणांचे बोसॉन या गटात वर्गीकरण करतात. प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्या नावावरून बोसॉन हे नाव देण्यात आले आहे.
१९६४ साली शास्त्रज्ञांच्या तीन वेगवेगळ्या गटांनी याचे उत्तर देण्यासाठी पी.आर.एल सिमेट्री ब्रेकिंग या विषयावर तीन वेगवेगळे शोधनिबंध मांडले. यापैकी एका गटात होते रॉबर्ट ब्राउट आणि फ्रँकॉइस इंग्लर्ट, दुसऱ्या गटात होते पीटर हिग्ग्स, आणि तिसऱ्या गटात होते जेराल्ड ग्युराल्निक, सी. रिचर्ड हेगन आणि टॉम किब्बल. हे शोधनिबंध जरी भिन्न असले तरी ढोबळमानाने हे सर्व शोधनिबंध या प्रश्नाचे एक संभाव्य उत्तर सांगत होते. बिग बँग च्या सुमारास निर्माण होऊन सर्वत्र पसरलेले ऊर्जेचे क्षेत्र आणि या क्षेत्राचे वहन करणारे बोसॉन प्रकारातील मूलकण. या ऊर्जेच्या क्षेत्राला पीटर हिग्ग्स यांच्या नावावरुन हिग्ग्स फिल्ड असे नाव दिले गेले तर हे फिल्ड दर्शवणाऱ्या कणांना हिग्ग्स बोसॉन असे नाव दिले गेले. अर्थात त्यावेळी हे सैद्धांतिक कण होते. या सर्व शोधनिबंधांची संकल्पना अशी होती की ऊर्जेचे हे हिग्ग्स फिल्ड विश्वात सर्वत्र पसरले असून मेक्सिकन हॅट सारखे याचे स्वरूप आहे.मूलकण या फिल्ड मधून प्रवास करताना या फिल्डशी अर्थात हिग्ग्स बोसॉन कणांशी प्रतिक्रिया करतात आणि त्यांना वस्तुमान प्राप्त होते. या वस्तुमान प्राप्ती मुळे त्यांच्या प्रकाशाच्या वेगाने प्रवास करण्यावर मर्यादा येते. वेगवेगळे कण वेगवेगळ्या पद्धतीने या हिग्ग्स फिल्डशी प्रतिक्रिया करतात. काही कण या फिल्ड मधून काहीच प्रभाव न पडता सरळ निघून जातात, अर्थात असे कण वस्तुमान विरहित असतात उदा. – फोटॉन कण. पण इलेक्ट्रॉन सारखे कण हिग्ग्स फिल्ड शी प्रतिक्रिया करून वस्तुमान प्राप्त करतात. हिग्ग्स फिल्ड मधून या कणांना ऊर्जा मिळते आणि पुढे ऊर्जेचे रूपांतर वस्तुमानात होते. गंमत म्हणजे आकाराने सारखे असणारे कणांचे वस्तुमान मात्र भिन्न असते. उदा. इलेक्ट्रॉन आणि टॉप क्वार्क आकाराने सारखे असले तरी टॉप क्वार्कचे वस्तुमान इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त आहे. हिग्ग्स फिल्ड मधील हिग्ग्स बोसॉन बरोबर होणारी निरनिराळ्या कणांची निरनिराळी प्रतिक्रिया यामुळे असे होते.
या शोधनिबंधानंतर शास्त्रज्ञ हिग्ग्स बोसॉन हा सैद्धांतिक कण शोधण्याचा मागे लागले, पण जंग जंग पछाडून ही हा कण शास्त्रज्ञांना हुलकावणी देत होता. अखेर २०१२ साली जिनेव्हा स्थित लार्ज हायड्रॉन कोलायडर मध्ये दोन प्रोटॉन्स च्या टकरीतून त्यांचे डिके होताना सुपर कॉम्प्युटरने नोंदवलेल्या या टकरींच्या अवशेषांतून अखेर हिग्ग्स बोसॉन कण सापडला. पुढे यावर अधिक प्रयोग करून २०१३ साली हाच हिग्ग्स बोसॉन कण आहे यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या शोधाबद्दल पीटर हिग्ग्स आणि फ्रँकॉइस इंग्लर्ट यांना २०१३ चे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
हिग्ग्स बोसॉन कणांना प्रसारमाध्यमांनी देवकण किंवा गॉड पार्टीकल म्हणून प्रसिद्धी दिली. स्वतः पीटर हिग्ग्स आणि इतर शास्त्रज्ञ या गॉड पार्टीकल नावाबद्दल प्रसारमध्यमांवर नाराज आहेत. बोसॉन (फोर्स पार्टीकल) या प्रकारातील हिग्ग्स हे एनर्जी फिल्ड दर्शवणारा हा कण आहे. त्याचा परमेश्वराशी काहीच संबंध नाही, त्याला गॉड पार्टीकल हे नावही शास्त्रज्ञांनी दिलेले नाही तरीही या कणाबद्दल काडीचीही ज्ञान नसणारे काही महाभाग गॉड पार्टीकल मुळे विज्ञानानेही परमेश्वराचे अस्तित्व मान्य केले अशी चुकीची हाकाटी पिटत असतात. या कणांचे शास्त्रीय नाव हिग्ग्स बोसॉन आहे.
हिग्ग्स बोसॉनच्या शोधामुळे स्टॅण्डर्ड मॉडेल च्या जिगसॉ मधील एक तुकडा शास्त्रज्ञांच्या हाती गवसला आणि विश्वनिर्मितीचे रहस्य उलगडण्याचा मार्गावर मानवाने एक पाऊल पुढे टाकले.
©जयेश चाचड

२.कृष्ण विवर – ब्लॅक होल

Abhijit Juvekar · ·
ब्लॅक होल – अवकाशातील किचन सिंक ?
आकाशातील गमती जमती – Aakashatil Gamti Jamti


·
ब्लॅक होल – अवकाशातील किचन सिंक ?
Black hole – मराठीत ज्याला “कृष्ण विवर” असे नाव आहे त्या बद्दल अनेक लोकांना “इंटरस्टेलर” सिनेमा मुळे माहीती पडले आणि त्या संबंधी कुतूहल वाढले.
मुळातच ब्लॅक होल हा कॅन्स्पेट खगोलविज्ञान विषयात वादाचा आणि गूढ मानला जातो, याचे कारण या विषयी अनेक दशके संशोधन चालू असूनही त्याचे १००% आकलन अजूनही झालेले नाही.
जे काही ब्लॅक होल बद्दल माहिती आज विज्ञानात उपलब्ध आहे ती केवळ बाह्य निरीक्षण external observations आणि mathematical models कॉम्पुटर सिम्युलेशन मॉडेल्स यांनी मिळाली आहे.
ब्लॅक होल विषयाचा जन्म गहन किचकट गणितीय समीकरणे सोडवताना झाला, काही ताऱ्यांची निरीक्षणे करताना असे दिसले की ते तारे अवकाशात एका विशिष्ट बिंदू भोवती वेगाने भ्रमण / परिक्रमा करीत आहेत,
परंतु ज्या बिंदू भोवती ते तारे परिक्रमा करीत आहे तिथे अनेक दुर्बिणींनी निरीक्षणे करून सुद्धा काहीच सापडले नाही.
द्वैती तारे (Binary / multiple stars) हे एकमेकांच्या common gravitational center भोवती फिरतात हे प्रत्यक्ष निरीक्षणाने माहिती होते परंतु अवकाशात ठराविक बिंदू भोवती फिरणारे तारे पहिल्यांदाच दिसत होते.
या बद्दल अनेक गणितीय सूत्रे आणि समीकरणे वापरून त्या बिंदू रूप भागाला “ब्लॅक होल” असे नाव दिले गेले.
ब्लॅक होल म्हणजे ज्या भागातून सामान्य प्रकाश किरणे बाहेर पडू शकत नाहीत, त्या भागात अति गुरुत्वीय बल केंद्रित झालेले दिसते. ज्यात करोडो सूर्याच्या इतके वस्तुमान छोट्या नगण्य दिसणाऱ्या जागेत एकत्रित झाल्याने तिथले स्पेस-टाइम प्रतल इतके खोलगट होते की जवळपास आलेली सर्व वस्तू प्रकाश त्यात ओढले जातात.
ठरविक लिमिट पर्यंत या ब्लॅक होल चे क्षेत्र कार्यरत असते त्या पुढे आपल्याला सर्वसाधारण तारे/प्रकाश दिसणे सुरु होते, याच लिमिट / बाउंड्री ला “इव्हेंट होराइझन” असे म्हणतात.
“इव्हेंट होराइझन” च्या आत स्पेस-टाइम रिव्हर्स होतात असे काही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे, म्हणजे आपल्या सामान्य जगात ३ स्पेस डायमेन्शन आणि १ टाइम डायमेन्शन आहे, इव्हेंट होरायझन च्या आत पलीकडच्या बाजूस आपल्या जगाच्या विरुद्ध असे ३ टाइम डायमेन्शन आणि १ स्पेस डायमेन्शन ओपन झालेले असावेत असा अंदाज वैज्ञानिकांचा आहे त्यातून पुढे ब्लॅक होल ला टाइम ट्रॅव्हल , वर्म होल ला स्पेस ट्रॅव्हल साठी वापरले जाऊ शकते अशा थिअरी पुढे आल्या. त्या संबंधी वेगळी पोस्ट नंतर बघू.
“इव्हेंट होराइझन” च्या आत Singularity असते,
सिंग्युलॅरिटी नावाचा अजून एक कन्सेप्ट मध्ये ब्लॅक होल मध्ये स्पेस-टाइम शून्य होऊन जातो, आणि वस्तुमान इन्फिनाईट होते असे सुद्धा थिअरी आहेत.
चित्रात दाखविल्या प्रमाणे आकृती बघा.
सध्या किचन मध्ये असणाऱ्या सिंक च्या माध्यमाने आपण ब्लॅक होल समजून घेण्याचा प्रयत्न करू –
१] किचन सिंक ची साईड वाली खोलगट बाजू म्हणजे ब्लॅक होल च्या अति प्रचंड गुरुत्व बलाने आतल्याबाजूला झुकले गेलेले स्पेस-टाइम प्रतल असे समजा
ज्यात सर्व वस्तू, प्रकाश गुरुत्व बलाने आत ओढल्या जातात
२] सिंक ची जाळी म्हणजे “इव्हेंट होराइझन” समजा ज्याच्या आत सर्व काही गेले की नष्ट होते / वर सांगितल्या प्रमाणे त्याची डायमेन्शन रिव्हर्स होतात
३] सिंक जाळी च्या मध्यभाग म्हणजे प्रत्यक्ष ब्लॅक होल समजा ज्याचा सध्या कॉम्पुटर सिम्युलेशन मॉडेल ने एक फोटो काढला आहे, हे ब्लॅक होल आपल्या आकाशगंगेच्या मध्य भागी आहे असे मानतात. Sagittarius A* नावाने ते ओळखले जाते. याची वेगळी पोस्ट नंतर बघू.
४] ब्लॅक होल च्या मागे काय ? याची कल्पना करण्यासाठी उलटा चक्रीवादळाचा फोटो बघा, चक्री वादळ जमिनीवरील वस्तुंना आत खेचते आणि जोराने उंचावर उडवत नेते आणि नंतर त्या वस्तू कुठेतरी लांब जाऊन अस्ताव्यस्त पडतात, तसे ब्लॅक होल ने खेचला गेलेला प्रकाश, वस्तू, ताऱ्यांचे मटेरियल दुसऱ्या बाजूने कोणत्या तरी प्रकारे बाहेर पडत असावे जे आपण इथून बघू शकत नाही असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे.
५] ब्लॅक होल मधून बाहेर पडणारे अति विशेष प्रारण ज्याचे सिद्धांत स्टीफन हॉकिंग यांनी मांडले होते त्यावरून त्याला “हॉकिंग रेडिएशन”असे नाव दिले गेले.

तर असे ब्लॅक होल मधून हॉकिंग रेडिएशन बाहेर पडत असेल आणि अब्जावधी वर्षानंतर अशी ब्लॅक होल आपोआप विरून जात असावीत असा सुद्धा एक अंदाज आहे.

वर सांगितलेली माहिती ही केवळ एक उदाहरण म्हणून आहे मुळात ब्लॅक होल हे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात आणि अति घनता असलेल्या महाकाय ताऱ्यांच्या स्फोटाने, दोन न्यूट्रॉन ताऱ्यांच्या टाकरीने वेगवेगळ्या आकाराची, वस्तुमानाची ब्लॅक होल बनू शकतात.
या शिवाय फोटो ३ मध्ये दाखविल्या प्रमाणे बहुतेक सर्व मोठ्या आकाशगंगांच्या मध्य भागी एक अतिविशाल अति घनता असलेले ब्लॅक होल असते असे संशोधन आहे,
आता ते ब्लॅक होल सर्व गॅलॅक्सि ला एखाद्या इंजिन सारखे चालवते
का त्याचा उपयोग एलिएन लोक ऊर्जा जनरेटर सारखा करतात
किंवा एका आकाशगंगेतून दुसऱ्या आकाशगंगेत /
एका विश्वातून दुसऱ्या विश्वात जाण्याचा ब्लॅक होल हा एक शॉर्टकट आहे
हे सर्व मुद्धे Sci-fi विज्ञानकथा मध्ये येतात.

३.वायुमंडल

नरेंद्र गोळे
·

ज्या पृथ्वीवर आपण राहतो, त्या पृथ्वीवरच्या भूपृष्ठाचा एक तृतियांश भाग पाण्याने अनावृत्त असला तरी दोन तृतियांश भागावर पाण्याचे विशाल साठे विपुलतेने विखुरलेले आहेत. महासागर आहेत ते. अनावृत्त भागही वस्तुतः वायूंच्या सुमारे दहा किलोमीटर उंचीच्या थराने आवृत्तच आहे. ह्या वायूंचे वजन, म्हणजेच वातावरणीय हवेचा दाब. जो ७६ सेंटीमीटर उंचीच्या पार्‍याच्या स्तंभाच्या दाबाइतका किंवा सुमारे १० मीटर पाण्याच्या स्तंभाच्या दाबाइतका दाब असतो. खरे सांगायचे तर पाण्याने आवृत्त असो वा अनावृत्त, भूपृष्ठाच्या सर्वच भागांवर हवेचा हा महासागर विहरत असतो. किंवा असेही म्हणता येईल की, हवेच्या समुद्रतळाशी भूपृष्ठावर आपण संचार करत असतो.
पाण्याचे समुद्रही नांदत असतात. पाण्याच्या महासागराचा पृष्ठभाग, सरासरी समुद्रपातळीवर स्थिर असतो. उठणार्‍या लाटा आणि भरती-ओहोटीमुळे निर्माण होणारे उंचीतील बदलच काय ते, त्या पातळीस विचलित करत असतात. त्याप्रमाणेच वायूमंडलाचा पृष्ठभागही सरासरी पातळीवर सरसहा सपाटच असतो. त्यावर उठणार्‍या लाटा, भरती-ओहोटी आणि वारेच काय ते, त्या पातळीस विचलित करत असतात. पाणी आणि हवा ह्यांच्या घनता अदमासे १०००:१ ह्या प्रमाणात असतात. त्यामुळे अर्थात्‌च हवा ही पाण्याहून हजारपट हलकी असते आणि म्हणूनच हवेतील विचलनेही पाण्यांतील विचलनांच्या मानाने किमान हजार पट मोठी असतात. पाण्याच्या समुद्रात उसळणार्‍या ४ मीटर उंचीच्या लाटांना आपण महाकाय लाटा म्हणत असतो. मात्र हवेच्या समुद्रात उसळणार्‍या लाटा ४ किलोमीटर उंचीच्याही असू शकतात. आपणच काय पण सारे पक्षीगणही सरासरी १० किलोमीटर उंचीच्या हवेच्या समुद्रतळाशीच वावरत असल्याने, ह्या वायूलहरींचा आपल्या जीवनावर सामान्यतः कुठलाच प्रभाव पडत नाही.
ज्याप्रमाणे महासागरातही समुद्रपातळीखाली उंच पर्वत असतात, त्याप्रमाणेच भूपृष्ठावरील हिमालयासारखे खरेखुरे पर्वत, अवनीतलावरील वायूसागरातही डोके वर काढायचा प्रयत्न करत असतात. मात्र तरीही असफलच राहत असतात. त्याचा परिणाम असा होतो की हिमालयाच्या किंवा कुठल्याही इतर उंच हिमाच्छादित पर्वतशिखरांवर चढू पाहणार्‍या गिर्यारोहकांना, विरळ हवेचा सामना करावा लागतो. सागरमाथा, हे हिमालयाचे सर्वोच्च शिखर ८,८४८ मीटर उंच आहे. म्हणजे सरासरी समुद्रपातळीपासून सुमारे ९ किलोमीटर उंच. एवढ्या उंचीवर गेल्यावर, आपल्यावरती शिल्लक राहणारा हवेचा थर १,००० मीटर उंचीचाच काय तो असतो. त्याचा दाब, ७.६ सेंटीमीटर उंचीच्या पार्‍याच्या स्तंभाच्या दाबाइतका किंवा १ मीटर उंचीच्या पाण्याच्या स्तंभाच्या दाबाइतकाच राहतो. मानवी शरीरास कायमच आवश्यक असणारा प्राणवायू मग कमी पडू लागतो आणि गिर्यारोहण दुरापास्त होऊन जाते. तिथे हवा एवढी विरळ असते की, १९९६ मधील एव्हरेस्ट मोहिमेतील जॉन क्रॅकौर ह्या गिर्यारोहकाच्या पुस्तकाचे नावच “इन टू थिन एअर (विरळ हवेत)” असे आहे.
मुळात उंच पर्वतशिखरे हिमाच्छादितच का असतात? तर त्या उंचीवर तापमान कमी, म्हणजे अगदी शून्य अंश सेल्शसच्याही खाली असते म्हणून तिथे पडणारा पाऊस एकतर हवेतच गोठून मग तिथे पडतो, किंवा पडल्यावर मग गोठून जात असतो. त्यामुळे हिमनिर्मिती होत असते. तिथे का तापमान इतके खाली असते? हे जाणून घेण्याकरता भूपृष्ठावर तापमान नेहमीसारखे ऊबदार का असते हे जाणून घ्यावे लागेल. कल्पना करा की तुम्ही तिरुक्कलकुंडरम म्हणजे पक्षीतीर्थमला पर्यटनासाठी गेलेले आहात. हे स्थान एका उघड्या बोडक्या पत्थरी टेकडीवर वसलेले आहे. ऐन दुपारच्या उन्हात त्या टेकडीच्या पायथ्याशी आपण पोहोचतो. मग कुणीतरी सांगते की चपला, बूट इथेच काढून ठेवायचे आहेत. आपण तसे करतो. टेकडी चढू लागतो. हवा जाम तापलेली. ४५ अंश सेल्शसचा उन्हाळा. ऊन मी म्हणत असतं. शरीराची हवेनेच काहिली होत असते. मात्र तळाशी असलेले पत्थर जरा जास्तच तापलेले असल्याचे आपल्या लक्षात येऊ लागते. अगदी सहन होत नाही इतके. त्या दगडांवरही तेच सूर्याचे ऊन पडत असते. मात्र त्या दगडांचे तापमान ५५ अंश सेल्शस तापमानाहूनही अधिक होत जाते. पाय जळू लागतात. असे होण्याचे कारण हे असते की, दगड, माती ह्यांची उष्णता धारण करण्याची क्षमता हवेहून खूपच जास्त असते. सूर्याकडून प्राप्त झालेली ऊर्जा दगड साठवत राहतात. हवेहूनही तप्त होतात. ह्याच कारणामुळे वायूमंडलातील भूगोलाचा पृष्ठभाग सर्वात अधिक तापमानावर राहतो. त्याच्या साहचर्याने निकटची हवाही तापत राहते. मात्र भूपृष्ठावरून जसजसे उंच उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होऊ लागते. भूपृष्ठापासून १० किलोमीटर उंचीच्या वर तर हवाही नसतेच. असते ती केवळ अवकाशीय पोकळी. तिचे तापमान तर शून्य अंश सेल्शसहूनही कमीच असते. सूर्यप्रकाश त्याच पोकळीतून पार होऊन आपल्यापर्यंत पोहोचत असला तरी, पोकळी त्यातील ऊर्जा ठेवून घेत नाही. तिची तशी प्रवृत्तीच नसते.
वात म्हणजे वारा. आवरण म्हणजे वस्त्र. वात हेच जिथे आवरण असते, असे सृष्टीशेजारचे अवकाश म्हणजे वातावरण. वातावरण हे अनेक स्तरांत रचले गेले आहे. हे स्तरही सतत आपापली स्थिती बदलत असतात. हिमालयाचे सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट, हे समुद्रसपाटीपासून ८,८४८ मीटर उंच आहे. त्यावरही विस्तारणारा पृथ्वीला सगळ्यात लगटून असलेला थर म्हणजे तपांबर. सृष्टीच्या साहचर्याने तापणारे (तप) आकाश (अंबर) म्हणजे तपांबर. ह्या थराची उंची, पृथ्वीच्या धृवीय प्रदेशांवर ७ किलोमीटर पासून, तर विषुववृत्तीय प्रदेशांवर १६ किलोमीटरपर्यंत बदलती असते. ह्या थरात जसजसे उंचावर चढत जावे तसतसे तापमान कमी होत जाते. तापमान कमी होण्याचा सरासरी दर, सुमारे ६.५ अंश सेल्शस/किलोमीटर उंची, इतका असतो. ह्या थरातच वातावरणाचे ७५% वजन एकवटलेले असते. ह्या थरातच वातावरणातले ९९% पाणी आणि धूळ नांदत असतात. आपण सामान्यपणे ज्याला वातावरण म्हणतो, त्याची व्याप्ती ह्या थरातच सीमित असते. हवामानातील बहुतांशी बदल ह्या थरातच घडून येत असतात.
पृथ्वीवरील स्थानावर अवलंबून, पर्वताच्या ज्या उंचीवर तापमान शून्य अंश सेल्शसच्याही खाली जाते; अशा ठिकाणांवर हल्ली, आरोग्य-पर्यटन सुरू झालेले आहे. म्हणजे असे की, मानवी शरीर स्वतःला सामान्यतः ३७ अंश सेल्शस तापमानावर सांभाळत असते. त्याहून कमी तापमानावर राहायचे तर शरीरास वातानुकूलनाचा भार सोसावा लागतो. त्याकरता ऊर्जा लागते. ती ऊर्जा शरीरात साठवलेली चरबी जाळून मिळवली जाते. म्हणजे केवळ शून्याखाली तापमान असलेल्या ठिकाणांवर वर्षातून काही दिवस जरी जाऊन राहिले तरी, मनुष्याला स्वतःचे अतिरिक्त वजन सहजच घटवता येते. अशा ठिकाणी जाऊन राहणे अर्थातच खर्चिक असते. सुदैवाने वजन घटवण्याची आवश्यकताही बहुतांशी श्रीमंतांनाच पडत असल्याने, हे त्यांना सहज शक्य होते आहे. सागरमाथा तळ शिबिरात (एव्हरेस्ट बेस कँपवर) जाऊन परतणारे प्रगत देशातील पर्यटक; दिवसेंदिवस ह्याकरताच तर वाढत आहेत. वास्तविक भारतियांना हे सोयीचे असूनही, ह्या आरोग्य-पर्यटन क्षेत्रात भारतीय पिछाडीवर आहेत. पुण्यातील काही संस्था हल्ली ह्याकरता पुढाकार घेऊ लागलेल्या आहेत. त्या एवढ्या प्रमाणात गिर्यारोहकांना तिथवर नेऊ लागलेल्या आहेत की त्यांच्या खास आग्रहाखातर, त्यांनीच सागरमाथा तळ शिबिराच्या वाटेवर असलेल्या गोरक्षेप गावात शिवाजी महाराजांचा पुतळाही उभारला आहे [१].
तपांबराच्या वरचा थर म्हणजे स्थितांबर. स्थितांबराच्या सर्वोच्च थरात ओझोन वायू असतो. सूर्याची उच्चऊर्जा अतिनील किरणे शोषून, तो प्राणवायूच्या अपसामान्य आणि सामान्य अशा दोन प्रकारांत विघटित होतो. म्हणून इथे तापमान घटते असते. त्याखालच्या थरांत, हेच दोन्ही प्रकार मग अतिनील किरणे शोषून पुन्हा संघटित होतात. ओझोन निर्माण होतो. ह्या प्रयत्नात ऊर्जाविमोचन होऊन थराचे तापमान वाढते राहते. निसर्गतः आढळून येणारा बहुतांशी ओझोन इथेच निर्माण होत असतो. विविध तापमानांचे थर परस्परांत न मिसळून जाता ह्या भागांत स्थिरपद नांदत असल्यामुळेच ह्या थरास स्थितांबर म्हणतात. ह्या भागात हवेची घनता अत्यंत विरळ असते म्हणून, विमान-उड्डाणांना निम्नतम अवरोध होत असतो. म्हणून विमाने ह्याच थरातून उडवणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असते. त्यामुळेच ती जास्तीत जास्त काळ ह्याच थरात राहतील असे उड्डाणांचे नियोजन केले जात असते.
तपांबराच्या सर्वात वरच्या भागात तापमान घटत असते, आणि स्थितांबराच्या खालच्या भागांत ओझोन निर्मितीपायी ते वाढते असते. सीमेवरील दरम्यानच्या थरात तापमानाचा घटता कल बदलून वाढता होत जातो. ह्या सीमावर्ती थरास तपस्तब्धी म्हणतात. कारण इथले तापमान कमी अधिक प्रमाणात स्थिरपद राहत असते.
स्थितांबराच्या वरच्या भागात ओझोनचे प्रमाण घटत जाते आणि मध्यांबरात तर ते नगण्यच होते. स्थितांबर आणि मध्यांबराच्या सीमावर्ती भागात हे घडून येते, त्या भागास स्थितस्तब्धी म्हणतात. बहुतांशी अतिनील किरणे स्थितस्तब्धीपाशीच अडतात. ती ओलांडून पृथ्वीकडे येत नाहीत.
मध्यांबराच्या वरचा भाग मध्यस्तब्धी म्हणून ओळखला जातो. मध्यांबर संपून उष्मांबर सुरू होण्यादरम्यानचा हा सीमावर्ती भाग असतो.
उष्मांबरात अवकाशातून येऊन पोहोचणारी अतिनील किरणे एवढी शक्तीशाली असतात, की त्या भागात अत्यंत विरलत्वाने आढळून येणार्‍या अणुरेणूंना ती अतिप्रचंड (हजारो अंश केल्व्हिन) तापमानाप्रत घेऊन जातात. मात्र इथे हवा एवढी विरळ असते की, सामान्य तापमापक तिथे ठेवल्यास त्यातून प्रारणांद्वारे होणारा ऊर्जार्‍हास इतका जास्त असतो की, त्या अणुरेणूंकडून तापमापकास वहनाद्वारे मिळणारी ऊर्जा नगण्य ठरून, तापमापक प्रत्यक्षात शून्य अंश सेल्शसखालील तापमान दर्शवतो.
मध्यांबर आणि उष्मांबर मिळूनच्या संयुक्त थरास दलांबर असेही एक नाव आहे. अणूचे मूलकीकरण होते तेव्हा धन आणि ऋण दले (तुकडे) निर्माण होतात. अतिनील किरणांमुळे सर्वत्र होणार्‍या मूलकीकरणाचे पर्यवसान तेथील वातावरण धन आणि ऋण दलांनी भरून जाण्यात होते. म्हणून ह्या भागास दलांबर असेही म्हटले जाते.
उष्मांबर आणि दलांबर संपते त्याच्या वरच्या भागात पृथ्वीलगतचे सर्व पदार्थ (वायू) संपुष्टात येत जातात. ह्या संधीप्रदेशास उष्मास्तब्धी म्हणतात. अणुरेणूच न उरल्याने मग दलेही नाहीशी होतात. शिल्लक राहते ते निव्वळ अवकाश. अवकाशाची निर्वात पोकळी. ह्या भागाला बाह्य अवकाश किंवा बाह्यांबर असेही म्हटले जाते.
पृथ्वीपासून सुमारे १६० किलोमीटर उंचीनंतरच्या अधिक उंचीवर, वायूरूप पदार्थांचे अस्तित्वच एवढे विरळ होत जाते की, आवाजाचे वहन करू शकणार्‍या ध्वनीलहरी निर्माणच होऊ शकत नाहीत. अवकाश निःशब्द होत जाते. बाह्यांबर तर त्यामुळे, प्रायः नादविहीनच असते.
बाह्य अवकाशातून सरासरीने वर्षाला ४० टन उल्का पृथ्वीवर येऊन पडत असतात. जर वातावरणच अस्तित्वात नसते तर, दरसाल त्यांच्यापायी चिरडून मरणार्‍यांची संख्याही आपल्याला मोजावी लागली असती. मात्र वायुमंडलातील कमालीच्या उच्च तापमानातून त्यांना प्रवास करावा लागत असल्याने आणि पृथ्वीशी अधिकाधिक सलगी साधत असता वातावरणाशी होत जाणार्‍या वाढत्या घर्षणाने त्यांची वाफ होऊन जाते. अर्थातच वायुमंडल हे आपले सुरक्षा कवचच आहे. अतिनील किरणांपासूनचे, उल्कांपासूनचे, आणि विश्वकिरणांपासूनचेही. कारण विश्वकिरणांतील प्रचंड ऊर्जा वायुमंडलात शोषली जाऊन अवनीतलावर पोहोचता पोहोचता ती सुसह्य होऊन जात असतात.
असे आहे अवनीतलावरील सुरस वायुमंडल! आपले अद्भूत सुरक्षा कवच.
.
प्रथम प्रसिद्धीः
विद्याप्रसारक मंडळ ठाणे, ह्यांचे दिशा मासिक, अंकः जानेवारी-२०१६.
.
[१] सागरमाथा, डॉ.राम तपस्वी, मूल्य रु.५००/-, प्रकाशनकाल अदमासे २००५.

राष्ट्रीय विज्ञान दिवस

राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या निमित्याने फेसबुक व वॉट्सॅपवर मिळालेल्या लेखांचे संकलन. सर्व मूळ लेखकांचे मनःपूर्वक आभार

आज विज्ञान दिवस
२०१७०२२८
आज विज्ञान दिवस. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकट रमण ह्यांनी ’रमण प्रभावा’चा शोध लावला [१]. त्याकरता त्यांना १९२९ साली ’सर’ ही उपाधी मिळाली. १९३० साली त्याकरताच त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकही मिळाले आणि ह्याच कार्यासाठी १९५४ साली त्यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मानही प्रदान करण्यात आला [२]. त्या स्मृतीस उजागर करण्यासाठी, २८ फेब्रुवारी हा दिवस दरसाल ’विज्ञान दिवस’ म्हणून साजरा करावा अशी शिफारस राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान संचार परिषदेने १९८६ साली केली होती. तत्कालीन भारत सरकारने तिचा स्वीकार करून आपल्या देशात १९८७ सालापासून २८ फेब्रुवारी हा दिवस दरसाल ’विज्ञान दिवस’ म्हणून साजरा करावा अशी प्रथा सुरू केली आहे. पहिला राष्ट्रीय विज्ञान दिवस २८ फेब्रुवारी १९८७ रोजी साजरा करण्यात आला.
विज्ञान दिवस साजरा करण्याचा उद्देश
१. जनसामान्यांत विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करणे,
२. लोकांच्या दैनंदिन जीवनास समृद्ध करण्यातील विज्ञानाचा फार मोलाचा वाटा लोकांच्या नजरेस आणून देणे,
३. मनुष्यजातीच्या उन्नयनार्थ सुरू असलेल्या विज्ञान क्षेत्रातील कार्यांची, प्रयासांची आणि श्रेयांची जनसामान्यांना ओळख करून देणे,
४. शास्त्रविकासार्थ नवतंत्रांचा वापर करणे आणि त्यावर चर्चा घडवून आणणे,
५. नागरिकांना विज्ञान अंगिकारण्यासाठी प्रोत्साहन देऊन नवीन संधी उपलब्ध करून देणे.
शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थी ह्या दिवशी निरनिराळ्या प्रकल्पांची प्रात्यक्षिके सादर करतात. प्रश्नमंजूषांत भाग घेतात. निरनिराळ्या संकल्पनांवरील व्याख्याने, दूरदर्शनवरील परिसंवाद, वैज्ञानिक प्रदर्शने, प्रात्यक्षिके, वादविवाद, परिचर्चा आयोजित केल्या जातात.
’रमण प्रभाव’ हा वर्णपट-दर्शन-शास्त्रातील (म्हणजे स्पेक्ट्रोस्कोपीतील) एक आविष्कार आहे. रमण ह्यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी तो सर्वप्रथम शोधून काढला. म्हणून ह्या प्रभावास त्यांचेच नाव देण्यात आले आहे. त्यावेळी ते असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स, कोलकाता येथे संशोधन कार्य करत होते.
जेव्हा प्रकाश शलाका एखाद्या धूळविरहित, पारदर्शी संयुगाच्या नमुन्यातून पार होत असते, त्या वेळी त्या संयुगातील रेणूंमुळे तिच्यातील थोडासा प्रकाश आपाती प्रकाशाच्या दिशेव्यतिरिक्त इतर दिशांतून विखुरला जात असतो. त्या विखुरलेल्या बहुतांशी प्रकाशाची तरंगलांबी, मूळ आपाती प्रकाशाच्या तरंगलांबीएवढीच असते. मात्र त्यातील थोड्याशा प्रकाशाची तरंगलांबी, मूळ आपाती प्रकाशाच्या तरंगलांबीहून वेगळी असते. तरंगलांबीत घडून येणाऱ्या ह्या बदलालाच रमण प्रभाव असे संबोधले जात असते.
१९९९ सालापासून विज्ञान दिवस दरसाल एखाद्या संकल्पनेवर आधारित अशा रीतीने साजरा केला जाऊ लागला. त्यानंतरच्या वर्षांतील संकल्पना पुढीलप्रमाणे आहेत [३].
साल संकल्पना
१९९९ आपली बदलती वसुंधरा
२००० मूलभूत विज्ञानात पुन्हा स्वारस्य निर्माण करणे
२००१ विज्ञान शिक्षणाकरता माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग
२००२ कचऱ्यातून समृद्धी
२००३ अपान-शर्करा-गर्भकाम्लाची (डी-ऑक्सी-रायबो-न्युक्लिक-आम्लाची) पन्नास वर्षे आणि नलिकाबालक (आय.व्ही.एफ.) विज्ञानाची पंचवीस वर्षे – जीवनाचा आराखडा
२००४ समाजात वैज्ञानिक जागृती करणे
२००५ भौतिकशास्त्र समारोह
२००६ आपल्या भवितव्याकरता निसर्गसंगोपन
२००७ थेंबागणिक अधिक धान्य
२००८ पृथ्वी ग्रहाचे आकलन
२००९ विज्ञानाची क्षितिजे विस्तारणे
२०१० लिंगसमानता, शाश्वत विकासाकरता विज्ञान आणि तंत्रज्ञान
२०११ दैनंदिन आयुष्यातील रसायनशास्त्र
२०१२ स्वच्छ ऊर्जा पर्याय आणि अणुकेंद्रीय सुरक्षा
२०१३ जनुकीयरीत्या परिवर्तित पिके आणि अन्नसुरक्षा
२०१४ वैज्ञानिक प्रवृत्तीची जोपासना
२०१५ राष्ट्र उभारणीकरता विज्ञान
२०१६ राष्ट्राच्या विकासाकरताचे शास्त्रीय मुद्दे
२०१७ दिव्यांग व्यक्तींकरता विज्ञान आणि तंत्रज्ञान
सर्वच व्यक्ती काही सारखीच सामर्थ्ये घेऊन जन्माला येत नाहीत. कुणी हुशार असतात. कुणी शक्तीमान असतात. कुणाला संगीतात रुची आणि गती असते तर कुणी नृत्यविशारद होतात. कुणी उत्तम वक्ते होतात तर कुणाला साहसी खेळांत स्वारस्य असते. सगळ्याच व्यक्तींना जर आपापल्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करण्याची पूर्ण संधी मिळाली तर त्या त्या व्यक्ती अत्यंत मोलाची कामगिरी करू शकतील. राष्ट्राच्या उन्नतीकरता साऱ्यांचीच गरज असते. म्हणून सगळ्यांनाच बरोबर घेऊन चालले पाहिजे. आपले पंतप्रधान म्हणतात त्यानुसार ’सबका साथ, सबका विकास’ साध्य झाला पाहिजे.
काही व्यक्ती अपंग असतात. हल्ली आपण त्यांना दिव्यांग व्यक्ती म्हणतो. कारण काय माहीत आहे का? ज्या व्यक्तीची एक संवेदना नाहीशी झालेली असते, ती व्यक्ती आपल्या इतर संवेदना बळकट करून ती उणीव भरून काढत असते. त्यामुळे तिचा विकास आगळ्याच दिशेने होत राहतो. ती व्यक्ती कदाचित इतरांना साध्य नसलेले कामही लीलया साध्य करू शकते. म्हणून अशा दिव्यांग व्यक्तींचा कल आणि कौशल्य कुठल्या नव्या क्षेत्रात विकसित होते आहे ते समजून घेऊन, समाजाने त्यांना जमतील त्या संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असते. आजच्या विज्ञानदिनी आपण किमान सर्व व्यक्तींना समान लेखण्याचा निश्चय करू या. त्यांना उणे लेखणे सोडून देऊ या. सगळे मिळून सुखांत गाठू या.
अशीच एक कहाणी आहे अरुणिमा सिन्हाची. उत्तर प्रदेशची रहिवासी असलेली अरुणिमा, १२ एप्रिल २०११ रोजी, लखनऊ येथून दिल्लीला जात असताना, काही गुंडांनी पद्मावती एक्स्प्रेसमधून तिला बाहेर फेकले होते. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या अरुणिमाच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी डावा पाय गुडघ्यापासून काढून टाकला. उत्तरकाशी येथील शिबिरात, टाटा स्टील ऍडव्हेंचर फाऊंडेशनशी ती जोडली गेली. तिथे, एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला असलेल्या बचेंद्री पाल यांनी तिला प्रशिक्षण दिले. २०१२ साली, ६,६२२ मीटर उंचीचे लडाखमधील छामसेर कांग्री हे उंच शिखर तिने काबीज केले. २२ मे २०१३ रोजी मंगळवारी सकाळी १०.५५ ला ८,८४८ मीटर उंचीच्या हिमालयाच्या सर्वोच्च शिखरावर ती चढून गेली. टाटा समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या इको एव्हरेस्ट मोहिमेअंतर्गत अरुणिमा, जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी पहिली अपंग महिला ठरली आहे. मग, जगातील प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखर पादाक्रांत करण्याचा संकल्पही तिने सोडला. त्यांपैकी एकूण पाच शिखरेही तिने आजवर पादाक्रांत केलेली आहेत. आपले सगळ्यांचे तर दोन्ही पाय शाबूत आहेत. आपण तिच्याहूनही अधिक देदिप्यमान कर्तब करण्यास प्रवृत्त झाले पाहिजे.
पुण्याच्या जुन्नर तालुक्यात, खोडद येथे एक, भव्य मीटरतरंग प्रारण दूरदर्शक (भमीप्रादू – जी.एम.आर.टी.) बसविण्यात आलेला आहे. टाटा मूलभूत विज्ञान संस्थेच्या वतीने तेथे संशोधन होत असते. तेथील प्रयोगशाळेत [४], विज्ञान दिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो. अवकाशातून पृथ्वीतलावर नियमितपणे येत असलेल्या मीटरतरंगांचे वेध घेणाऱ्या जगभरातील मोजक्या दुर्बिणांतील ही एक दुर्बिण भारतात आणि तेही आपल्यापासून एवढ्या कमी अंतरावर आहे ह्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि वर्षभरात कधीतरी आपण तेथील संशोधन प्रयोगशाळेस भेटही देऊन तेथील उपस्कर समजून घेतले पाहिजेत.
संदर्भः
१. राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ http://ncsm.gov.in/?p=3430
२. टाईम्स ऑफ इंडिया दैनिकातील विज्ञान दिवसाबद्दलची माहिती http://www.indiatimes.com/…/on-national-science-day…
३. विकिपेडियावरील संबंधित मजकूर https://en.wikipedia.org/wiki/National_Science_Day

४. खोडद येथील प्रयोगशाळेचे संकेतस्थळ http://www.ncra.tifr.res.in/…/events/national-science-day


राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व; काय होता ‘रामन इफेक्ट’?

२८ फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. काय आहे या दिवसाचे औचित्य. याच दिवसाला विज्ञान दिन म्हणून का घोषित केले गेले… जाणून घेऊया…
National Science Day 2023: राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व; काय होता ‘रामन इफेक्ट’?

२८ फेब्रुवारी १९२८ रोजी नोबेल पारितोषिक विजेते – भारतरत्न सर सी. व्ही. रामन यांनी ‘रामन इफेक्ट’ हा वैशिष्ट्यपूर्ण शोधनिबंध जगासमोर सादर केला होता. त्या दिवसाचे औचित्य साधून हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. जगाला एक ‘नवा प्रकाश’ देणारा हा रामन इफेक्ट काय होता आणि या संशोधनासाठी डॉ. रामन यांनी काय मेहनत घेतली, किती खर्च आला होता… पाहू.

रामन यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला होता. अत्यंत तल्लख बुद्धीच्या – रामन यांनी वयाच्या ११व्या वषीर्च शालेय शिक्षण संपवले! १५व्या वर्षी ते इंग्रजी आणि विज्ञानामध्ये पदवीधर झाले तर १७व्या वर्षीच फिजिक्समध्ये पदव्युत्तर शिक्षणही उच्च श्रेणीमध्ये पूर्ण केले. कोलकाता येथे रामन डेप्युटी अकाउंटंट जनरल पदावर रुजू झाले, पण या रुक्ष नोकरीमध्ये त्यांचे मन रमेना, म्हणून कोलकाता येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून – कमी पगारात – नोकरीत रुजू झाले. ते अकाउंटंट म्हणूनच नोकरी करत राहिले असते तर भारतासह जग एका महान शास्त्रज्ञाला मुकलं असतं!!

१९२१मध्ये कलकत्ता विद्यापीठातर्फे त्यांना ब्रिटनला उच्च शिक्षणासाठी पाठवण्यात आले. यावेळी त्यांनी लंडनच्या रॉयल सोसायटीमध्ये ‘भारतीय तंतूवाद्ये’ हा शोधनिबंध सादर केला. पुढे १९३५मध्ये ‘भारतीय चर्मवाद्ये’ विशेष करून तबल्याच्या नादनिर्मिती, तबल्याची पुडी, शाई, तरंगलांबी इत्यादींवर संशोधन केले.
युरोपातून समुद्रमार्गे भारतात परत येत असताना आकाशातील निळ्या रंगाने त्यांचे कुतूहल जागृत झाले. आकाश निळ्या रंगाचे का दिसते? अशा प्रश्नामधून त्यांचे संशोधन सुरू झाले. व त्यामधूनच त्यांनी भारतात परत आल्यावर – पाणी, बर्फ यांमधून प्रकाशाचे विकिरण (स्कॅटरिंग) यावर संशोधन सुरू केले. व यातूनच त्यांना आकाशाच्या निळ्या रंगाची उत्तरे मिळाली! यासंदर्भातले पुढील संशोधन ‘रामन इफेक्ट’ म्हणून जगासमोर आले.

रामन इफेक्टचा खर्च
लेसर किरणांच्या क्रांतिकारी शोधानंतर रामन इफेक्ट – हे शास्त्रज्ञांच्या हातातील एक महत्त्वपूर्ण घटक ठरले. ‘रामन इफेक्ट’ संशोधनासाठी रामन यांनी केवळ २०० रु. (फक्त रु. दोनशे)ची साधनसामुग्री वापरली होती हे विशेष! तर आज रामन परिणामाचा प्रगत अभ्यास करण्यासाठी लक्षावधी डॉलर्सची साधने वापरली जातात!! त्यांना या संशोधनासाठी १९३० साली भौतिकमध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते केवळ पहिले भारतीय नव्हते तर आशियातील पहिले व्यक्ती होते. हा शोध लावल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ १९८६ पासून देशभरात या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.

१९५४ साली भारत सरकारने रामन यांचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान केला. भारतातील १७ विद्यापीठांनी, तर जगातील ८ विद्यापीठांनी रामन यांना सन्माननीय डॉक्टरेट- फेलोशिप सन्मानपूर्वक बहाल केली. १९४३मध्ये रामन यांनी बंगलोर येथे ‘रामन संशोधन संस्थे’ची स्थापना केली. आणि सुमारे ३५० शोधनिबंध सादर केले. २१ नोव्हेंबर १९७० रोजी निधन होईपर्यंत ते संशोधनात मग्न होते.

Edited By प्रविण दाभोळकर | महाराष्ट्र टाइम्स


रमण परिणाम –
प्रत्येक वस्तूचं वेगळं रूप

जगात प्रत्येक वस्तू आपलं वैशिष्ट्य बाळगून असते. आपल्याला ढोबळमानाने दोन वस्तूंमधला फरक जाणवतो. झाडाची पानं हिरवी आणि आकाश निळं आहे हे आपल्याला कळतं. आंबा पिवळा आणि कलिंगड लाल आहे हेही दिसतं. पण आपल्याला हे कळत नाही की पिवळा धमक दिसणार आंबा आत गोड आहे का आंबट? बाहेरून हिरवं दिसणार कलिंगड आत मध्ये लाल असेल आणि गोड असेल ना? विक्रेता म्हणतो – कापून बघितल्याशिवाय कसं कळणार? विक्रेता थापटून थोपटून बघतो आणि अंदाजपंचे सांगतो की कलिंगड गोड आहे. आपल्या अनुभवातून कलिंगड वाल्याने कलिंगडाच्या गोडी बद्दल चा अंदाज बांधलेला असतो. मात्र तो हमखास बरोबरच असतो असं नाही. अशी कुठली परीक्षा आहे का की कलिंगड कापल्याशिवाय ते गोड आहे का नाही ते आपल्याला कळेल?
आज-काल बऱ्याच भाज्या आणि बरीच फळे यांच्यावर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केलेली असते. हे कीटकनाशके क्वचितच कधीतरी डोळ्यांना दिसतात. विशेषतः द्राक्षांवरची, सफरचंदावरची वगैरे डोळ्यांना दिसतात. पण इतर शेतमालावर केलेल्या फवारण्या नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत.
कीटक नाशके भाजी फळांमधून पोटात गेल्यावरच माणसाला त्यांचा फटका बसतो. कारण अल्प पातळीवर फळांच्या पृष्ठभागावर राहिलेले ही विष आपल्याला दिसू शकत नाही. मात्र त्याचा रमण वर्णपट काढला तर भाज्यांमध्ये कोणते कीटकनाशक किती प्रमाणात आहे हे कळू शकते. कारण रमण वर्णपटातून प्रत्येक रसायनाची ओळख आपल्याला दिसते.

1930 आली एका भारतीयाला किंबहुना एका आशियाई व्यक्तीला जगात सर्वप्रथम नोबेल पुरस्कार मिळाला. त्या व्यक्तीचे नाव चंद्रशेखर वेंकटरमण किंवा सी व्ही रमण. त्यांनीच शोधून काढलेल्या रामन परिणाम याबद्दल सी व्ही रमण यांना नोबेल पुरस्कार मिळाला.

रमण इफेक्ट आहे तरी काय?
आपल्या घरात अनेक भांडी असतात. प्रत्येक भांड्याला त्याचा स्वतःचा नाद असतो. स्वत:चा आवाज असतो. आवाज येतो कारण त्या वस्तू कंप पावत असतात. घराबाहेर एखादा मोठा फटाका वाजला की घरातली अनेक भांडी कंप पावतात. त्यांचा आवाज येतो. अशाच प्रकारे एखाद्या पदार्थांमध्ये जे रेणू असतात त्यांनाही आपापला विशिष्ट कंप असतो. ते रेणू अतिशय छोटे असल्यामुळे त्यांचा कंपही अतिशय छोटा असतो. इतका छोटा की त्यांची कंपने प्रकाशामुळे सुद्धा होऊ शकतात. आपल्याला माहिती आहे की प्रकाश सुद्धा अनेक कंपनांचा मिळून बनला आहे. जांभळ्या प्रकाशाची कंपनं वेगळी आणि लाल प्रकाशाची कंपनं वेगळी. प्रत्येक पदार्थात असलेल्या अणूरेणूंच्या रचनेत कुठल्या ना कुठल्या कंपनांशी जुळवून घेण्याची क्षमता असते. मग ती कंपने तात्पुरत्या स्वरूपात वस्तुत अडकतात आणि क्षणभराने बाहेर पडतात. ही कंपने मोजता आली की वस्तूची रचना आपल्याला कळते आणि त्यामुळे पदार्थाची चिरफाड न करतासुद्धा आत मध्ये काय काय आहे हे आपल्याला समजून येते.

रमण यांनी ही कल्पना प्रथम जगासमोर मांडली. एखाद्या पदार्थावर प्रकाशाचा झोत सोडला तर तो झोत गेल्यानंतर पदार्थाने क्षणभरासाठी पकडून ठेवलेली कंपने पुन्हा बाहेर टाकली जातात. त्यांचा फोटो काढला तर तो पदार्थ कोणत्या कंपनांना प्रतिसाद देतो यावरून त्या पदार्थाला आपण ओळखू शकू.
यात अडचण अशी होती की प्रकाशाच्या झोताची तीव्र कंपने आणि पदार्थाच्या आतली हल्लक कंपने यांच्या उजेडात खूपच फरक होता. किती फरक तर काही लाख पट. त्या कंपनांचा पुरावा द्यायचा म्हणजे फोटो काढला पाहिजे. फोटो काढताना आधी प्रकाशाचा झोत निघून गेला पाहिजे तर वस्तूतून बाहेर येणारा प्रकाश दिसणार. तो तर अगदीच क्षणभर येतो. आणि इवलूसा असतो.
सी व्ही रमण यांनी त्यांच्या प्रकाशाचं अस्तित्व गणिताने सिद्ध केलं. पण प्रत्यक्ष पुरावा दिल्याशिवाय कोण मानणार? सी व्ही रमण यांच्या काळात म्हणजे 1928 साली म्हणजे नव्वद वर्षांपूर्वी काही भारी कॅमेरे नव्हते आजच्यासारखे. तरीही बरीच खटपट करून सी व्ही रमण यांनी या इवलुश्या प्रकाशाचे म्हणजे विकिरण झालेल्या प्रकाशाचे फोटो काढले. रमण यांचा शोध फार महत्त्वाचा होता पण भारतामध्ये त्या शोधाच्या खोलात जाण्याइतके तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. मात्र आता इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उपलब्धतेमुळे विकिरणांचे फोटो काढणे शक्य झाले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रकाशाचा स्रोतही आता प्रखर आणि अतिशय बारीक करता येतो. त्यालाच आपण लेझर प्रकाश म्हणतो.

कोणत्याही वस्तूवर क्षणभरासाठी लेझर प्रकाश पाडायचा आणि तो प्रकाश संपताच वस्तूमधील निर्माण झालेला विकिरणांच्या प्रकाशाची नोंद घ्यायची. याला रमण वर्णपट असे म्हणतात. आता संगणकाच्या सहाय्याने हा वर्णपट आपण आणखी मोठा ही करून बघू शकतो त्यामुळे त्यातले बारकावे आपल्याला समजून येऊ शकतात. रमण वर्णपटाचा अभ्यास जगामध्ये अनेक जणांनी केला. अनेक वस्तूंवर केला. त्यामुळे वस्तूंमध्ये असणाऱ्या नेमक्या रसायनाचा पत्ता लागू शकतो. ते रसायन अगदी अल्प मात्रेमध्ये असले तरी ओळखता येऊ शकते. आणि त्यासाठी आता तो पदार्थ कापायची, चिरायची किंवा रसायनांनी त्याचं विश्लेषण करण्याची गरज उरली नाही. लेझर किरण इलेक्ट्रॉनिक संवेदक आणि वेगाने गणिती तपासणी करणारे संगणक यांच्यामुळे रामन वर्ण पटाचे विश्लेषण अधिक सोपे चटकन आणि अचूक झाले आहे.

डॉक्टर छातीवर स्टेथोस्कोप ठेवून रुग्णाला तपासतात त्याप्रमाणे रामन वर्णपट काढणारे संशोधक एखाद्या वस्तूवर स्टेथोस्कोपच्या ऐवजी लेझर किरण ठेवून त्या वस्तूतील त्या जागेवरील रसायनाची तपासणी करू शकतात. मग अल्प प्रमाणात जरी कीटकनाशक फळावर असले तरी ते नेमके कुठे आहे आणि किती आहे हेही ओळखता येते.

झाडावर कीड लागली तर आपल्याला ती लागल्यावर दिसते. त्या विशिष्ट किडीमध्ये काही विशिष्ट रसायने असतात. त्यामुळे कीड मोठी होण्यापूर्वी रामन वर्णपट काढून आपण कीटशोधून काढू शकतो. म्हणजे कीड वाढण्याआधीच पिकांचा बचाव करण्यासाठी आपण उपाय योजना करू शकतो.

एकदा इतक्या बारकाव्याने तपासणी करण्याची क्षमता आपल्याला मिळाली की अल्प प्रमाणात असलेली भेसळसुद्धा सहज ओळखता येईल. किंवा एखाद्या खाद्यपदार्थात मीठ नेमके किती प्रमाणात पडले आहे हे फोटोच्या विश्लेषणावरून कळेल. दारूत किती पाणी आहे? पेट्रोल मध्ये किती अल्कोहोल आहे? हे ही झटक्यात कळू शकते.

अनेक रासायनिक क्रिया पूर्ण झाल्या आहेत की नाही? किंवा त्या रासायनिक क्रियेत कोणकोणते टप्पे आहेत? हे सुद्धा रामन वर्णपटाच्या अभ्यासामुळे आपल्याला समजू शकेल. लेझर किरण, इलेक्ट्रॉनिक डिटेक्टर आणि झटपट आकडेमोड करणारे संगणक यामध्ये आता भारतही वरच्या स्थानावर सरकला आहे त्यामुळे इतके दिवस जगामध्ये रमण वर्णपटाच्या वापर करून ज्या गोष्टी चटकन साध्य करता येत होत्या त्या आता भारतात सुद्धा करता येतील.

रमण वर्णपट हा अशाप्रकारे जगाचे चित्र बदलणारा एक मोठा शोध आहे त्या शोधाला सन्मान देण्यासाठी दर वर्षी 28 फेब्रुवारीला भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त – शंका घेऊ, प्रश्न विचारू, प्रयोग करू, नवनवे शोध लावू, तपासून पाहू, पुढे येऊ, प्रगती करू, तसे करू तर आपल्याला नवे काही सापडेल.
भारतात एकच सी व्ही रमण नकोत अनेक हवेत.

विनय र र

——————————

भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकट रमण
जन्मः ७ नोव्हेंबर १८८८, तिरुवनकोईल, मृत्यूः २१ नोव्हेंबर १९७०, बंगळुरू
http://www.nobelprize.org/…/laureates/1930/raman-bio.html
सर चंद्रशेखर व्यंकट रमण ह्यांचे अल्प चरीत्र (नोबेल परिचयातून)
भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक १९३०
जन्मः ७ नोव्हेंबर १८८८, तिरुचिरापल्ली,
मृत्यूः २१ नोव्हेंबर १९७०, बंगळुरू
चंद्रशेखर व्यंकट रमण ह्यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ रोजी, दक्षिण भारतातील तिरुचिरापल्ली येथे झाला. त्यांचे वडील गणित आणि भौतिकशास्त्राचे व्याख्याते होते. त्यामुळे ते सुरूवातीपासूनच शैक्षणिक वातावरणात बुडालेले होते. १९०२ साली त्यांनी मद्रास येथील प्रेसिडन्सी कॉलेजात प्रवेश घेतला. १९०४ साली ते बी.ए. प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पारितोषिक म्हणून त्यांना सोन्याचे पदक प्राप्त झाले. १९०७ साली त्यांना एम.ए. पदवी प्राप्त झाली. सर्वोच्च विशेष प्राविण्यांसह.
प्रकाशशास्त्र आणि ध्वनीवहनशास्त्रातील त्यांचे सुरूवातीचे प्रयोग तयांनी विद्यार्थीदशेतच केले होते. ह्याच शास्त्रशाखांच्या तपासात त्यांनी पुढे आपले सारे आयुष्य वाहून टाकले.
त्या काळी शास्त्रीय कारकीर्दीत सर्वोत्तम संभावना दिसून येत नसल्याने, रमण १९०७ साली इंडियन फायनान्स डिपार्टमेंटमध्ये रुजू झाले. कार्यालयातील त्यांचे कामच त्यांना बहुतांश वेळ पुरत होते, तरीही, इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स ऍट कोलकाता येथील प्रयोगशाळेत संशोधन करण्याची संधीही त्यांना मिळाली होती. ह्याच संस्थेचे ते १९१९ मध्ये सन्माननीय सचीव झाले.
१९१७ मध्ये त्यांना, कोलकाता विद्यापीठातील नव्यानेच प्रस्थापित ’पलित चेअर ऑफ फिजिक्स’ देऊ करण्यात आली आणि त्यांनी तिचा स्वीकार केला. कोलकात्यात १५ वर्षे राहिल्यानंतर ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू येथे प्राध्यापक झाले (१९३३-१९४८). १९४८ पासून ते, त्यांनीच स्थापन केलेल्या ’रमण इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च, बंगळुरू येथे ते संचालक राहिले. ह्याशिवाय १९२६ मध्ये त्यांनी इंडियन जर्नल ऑफ फिजिक्सचीही स्थापना केली होती. त्याचे सुरूवातीचे संपादकही तेच होते. इंडियन ऍकॅडेमी ऑफ सायन्सेसची स्थापनाही त्यांनीच प्रायोजित केली होती आणि सुरूवातीला त्यांनीच तिचे अध्यक्षपदही भूषविले होते. त्या ऍकॅडेमीच्या प्रोसिडिंग्जनाही त्यांनीच सुरूवात केली. त्यातच त्यांचे बहुतेक कामही प्रकाशित झाले. भारतातून करंट सायन्स प्रकाशित करणार्याू, ते करंट सायन्स असोसिएशन, बंगळुरूचेही अध्यक्ष आहेत.
रमण ह्यांच्या सुरूवातीच्या काही आठवणी इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स मध्ये बुलेटिन्सच्या स्वरूपात प्रकाशित झाल्या होत्या (बुले.६ व ११, ’स्पंदांचा सांभाळ’-मेंटेनन्स ऑफ व्हायब्रेशन्स, बुले.१५, १९१८, व्हायोलिन कुटुंबातील वाद्यांच्या सिद्धांतांबाबत). १९२८ मध्ये ’हँडबूक डर फिजिक’ च्या ८व्या खंडात त्यांनी वाद्यांचा सिद्धांत लिहिला होता. १९२२ मध्ये त्यांनी ’प्रकाशाचे रेण्वीय विवर्तन’ हे त्यांचे कार्य प्रकाशित केले. त्यांच्या सहकार्यां्सोबत केलेल्या तपासकामांच्या मालिकेतील हे पहिले होते. अंतिमतः ह्यातूनच पुढे त्यांचा २८ फेब्रुवारी १९२८ रोजी प्रकाशित झालेला प्रारण प्रभावाचा शोधही लागला होता, ज्याला पुढे त्यांच्याच नावाब्ने ओळखले जाऊ लागले (’एक नवीन प्रारण’-’A new radiation’, इंडियन जर्नल ऑफ फिजिक्स, २ (१९२८) ३८७). ह्या संशोधनाखातरच त्यांना पुढे १९३० सालचे भौतिकशास्त्राकरताचे नोबेल पारितोषिकही प्राप्त झाले होते.
रमण ह्यांनी केलेले इतर तपास पुढीलप्रमाणे आहेत. अधोश्राव्य (हायपरसॉनिक) आणि ऊर्ध्वश्राव्य (अल्ट्रासॉनिक) वारंवारितांच्या ध्वनीलहरींद्वारे घडवून आणलेल्या प्रकाश विवर्तनावरचे त्यांचे प्रायोगिक व सैद्धांतिक अभ्यास (प्रकाशनकाल-१९३४ ते १९४२) आणि सामान्य प्रकाशाच्या संसर्गात स्फटिकांतील अवरक्त स्पंदांवर क्ष-किरणांचे होणारे प्रभाव. १९४८ मध्ये, रमण ह्यांनी नव्या पद्धतीने स्फटिकांच्या वर्णपट वर्तनांचा अभ्यास करून स्फटिक गतीशास्त्राच्या समस्यांचा तपास केला. त्यांची प्रयोगशाळा, हिर्यांची संरचना आणि गुणधर्म ह्यांचा अभ्यास करत आहे. असंख्य प्रस्फुरक (इर्रिडिसेंट सब्स्टन्सेस- लॅब्राडोराईट, पिअर्ली फेल्स्पार, अगाटे, ओपल आणि पर्ल्स) पदार्थांची संरचना आणि प्रकाशशास्त्रीय वर्तन ह्यांबाबत कार्य करत असते.
साख्यांचे (कोलाईडस) प्रकाशशास्त्रीय वर्तन, विद्युत् आणि चुंबकीय सदीश वर्तन आणि मानवी दृष्टीचे शरीरशास्त्र ह्या विषयांतही त्यांना स्वारस्य होते.
रमण ह्यांना मोठ्या संख्येने सन्माननीय पदव्या आणि वैज्ञानिक समाजांची सदस्यत्वे प्राप्त झालेली होती त्यांच्या कारकीर्दीच्या सुरूवातीसच ते रॉयल सोसायटीचे सन्माननीय सदस्य निवडले गेले होते. १९२९ साली त्यांना ’सर’ ही पदवी प्राप्त झाली होती.
हा उतारा ’फिजिक्स-१९२२-१९४१’ ह्या, ऍम्स्टरडॅम येथील, एल्सेव्हिअर पब्लिशिंग कंपनीने १९६५ साली प्रकाशित केलेल्या, ग्रंथातील ’नोबेल लेक्चर्स’ ह्या पाठातून घेतलेला आहे.
हे चरीत्र पारितोषिकाचे प्रदानसमयी लिहिले गेले आहे आणि ह्याचे प्रथम प्रकाशन ’लेस प्रिक्स नोबेल’ मध्ये झालेले आहे. नंतर संपादित करून ’नोबेल लेक्चर्स’ ह्या पाठात ते पुनर्प्रकाशित करण्यात आले. ह्या दस्ताचा उल्लेख करतांना, नेहमीच, वरीलप्रमाणे स्त्रोतास नमूद करावे.




१५ ऑगस्ट १९४७ नंतरचे स्वातंत्र्यलढे

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले, इंग्रजांचा झेंडा असलेल्या युनियन जॅकला खाली उतरवून भारताचा तिरंगी झेंडा फडकवण्यात आला. पं.जवाहरलाल नेहरूंनी त्यांचे नियतीशी संकेत (A tryst with destiny) हे सुप्रसिद्ध भाषण भाषण केले वगैरेंच्या गोष्टी आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण खरे तर भारताच्या जेवढ्या भागावर इंग्रजांची थेट पूर्ण सत्ता होती तेवढाच भाग त्या दिवशी स्वतंत्र झालेल्या भारताचा भाग झाला होता. त्या वेळी देशाचा फार मोठा भाग निरनिराळ्या संस्थानिकांच्या अधिपत्याखाली होता. ते सगळे काही पिढ्यांपासून इंग्रजांचे मांडलीक होते आणि काही अपवाद वगळता बाकीचे संस्थानिक फारसे सक्षम आणि कार्यक्षम नव्हते. इंग्रजांनी भारतातून निर्गमन केले तेंव्हा हे संस्थानिक इंग्रजांपासून स्वतंत्र झाले होते, आपापल्या संस्थानाचे सार्वभौम राजे झाले होते. पण त्यांना स्वतंत्रपणे राज्यकारभार सांभाळण्याचा अनुभवही नव्हता आणि तेवढी कुवतही नव्हती. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी आधीपासूनच सगळ्या संस्थानिकांशी संपर्क साधून त्यांना आपापली संस्थाने भारतात विलीन करण्याचे आवाहन केले होते. काही राजे टाळाटाळ करत होते, तर काही मुजोर संस्थानिक प्रखर विरोध करत होते. विलीनीकरणाला मान्यता देणाऱ्या संस्थानिकांना भरघोस प्रीव्ही पर्स आणि इतर काही सवलती देण्याचे आमीष दाखवून आणि न देणाऱ्यांना धाक घालून सरदार पटेलांनी बहुतेक सगळ्या संस्थानिकांना विलीनीकरणाकडे वळवून घेतले.

पण ज्या संस्थानिकांनी विरोध केला तिथल्या जनतेने आपापले स्वातंत्र्यलढे पुढे चालवत ठेवले. हैद्राबादमध्ये रझाकार नावाची संघटना होती. तिने जनतेवर अत्याचार करायला सुरुवात केली. तिला त्रासामधून मुक्त करण्यासाठी भारत सरकारने आपली फौज पाठवली. तेंव्हा निजामाने शरणागती पत्करली आणि ते संस्थान भारतीय सैन्याच्या हवाली केले. हा वृत्तांत सांगणाऱ्या त्या काळातल्या इंग्लिश वर्तमानपत्रातल्या बातम्या खाली दिल्या आहेत.

कोकणकिनाऱ्यावरील मुरुड जंजिरा इथे शिवाजी महाराजांच्याही आधीच्या काळापासून आफ्रिकेमधून आलेल्या सिद्दींनी आपली सत्ता चालवली होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर तिथल्या जनतेनेच एकजुटीने प्रतिकार करून सिद्दीची राजवट संपुष्टात आणली आणि तो भाग भारतात सामील झाला. त्याची गाथा सांगणारा एक लेख खाली दिला आहे.
मूळ लेखकाचे मनःपूर्वक आभार.

जंजिरा संस्थानाचे स्वातंत्र्य

३१ जानेवारी १९४८ – छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ह्यांचे एक अपूर्ण स्वप्न साकार झाले!
भारत जरी १५ ऑगस्ट १९४७ ब्रिटीशांपासून स्वतंत्र झाला असला तरी ब्रिटिशांचे मांडलिक असलेल्या सिद्दी नवाबाच्या जंजिरा संस्थानाच्या पारतंत्र्यातून मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन हे तीन तालुके मुक्त व्हायला ३१ जानेवारी १९४८ चा दिवस उजाडावा लागला.
थोडासा इतिहास बघूया. १६१७ मध्ये सिद्दी अंबर याने मुघल बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जंजिऱ्याची जहागीर मिळवली आणि मुघलांचे मांडलिकत्व पत्करले. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रयत्न करुनही थोडक्यात जंजिरा हातातून निसटला. त्यांना जर या मोहिमेसाठी पुरेसे आयुष्य आणि पुरेसा वेळ मिळाला असता तर त्यांच्यासाठी जंजिरा जिंकणे अशक्य नव्हते. छत्रपती संभाजी महाराजांच्या हातात जंजिरा येत आहे हे पाहून औरंगजेबाने त्याची फौज कल्याण भिंवडीच्या मार्गे रायगडाच्या दिशेने पाठवली. त्यामुळे नाईलाजास्तव संभाजी महाराजांना रायगडावर परत यावे लागले. मराठ्यांच्या हाती जाऊ नये म्हणून मोगल, इंग्रज, आणि पोर्तुगिजांसारख्या शत्रूंनाही एकत्र आणणारा जंजिरा हा बहुतेक एकमात्र किल्ला!
१८१८ मध्ये पेशवाईचा अस्त झाल्यावर सिद्दी नवाबांनी इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करले. पुढे १९४८ पर्यंत तो नवाबांच्याच ताब्यात होता. १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर शेवटच्या नवाबाला – सिद्दी मोहम्मद खान त्याचे नाव – भारतात सामील होणे मान्य नव्हते. त्याला जंजिरा संस्थान पाकिस्तानात न्यायचे होते. विचार करून पहा – सध्याच्या महाराष्ट्राचा एक भाग जर पाकिस्तानचा भाग बनला असता तर कसे चित्र दिसले असते. आणि त्यात वर पेशव्यांची मूळ गावं श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर वगैरेंसकट!
आपल्याला हे माहीत असते की काश्मीर, जुनागढ, आणि हैदराबादच्या नवाबांनाही भारतात विलीन व्हायचे नव्हते पण मिलीटरी ॲक्शनने त्यांना भारतात सामील केले गेले. पण इथेही जंजिरा स्वातंत्र्यलढ्याचे वेगळेपण आहे. जनतेने एकत्र उठाव करुन विलिनीकरण झालेले जंजिरा हे भारतातील एकमेव संस्थान आहे. या संस्थानचा नवाब मुस्लीम तर प्रजा प्रामुख्याने हिंदू होती. पण तरीही हैदराबादप्रमाणे हा लढा मुसलमानांच्या विरुद्ध हिंदू असा नसून भारतात विलिन होण्यास इच्छुक नसलेला जंजिर्‍याचा नवाब विरुद्ध भारतात विलीन होण्यास इच्छुक असलेल्या अठरापगड जातींचा होता – ज्यात हिंदूही होते आणि मुसलमानही होते! क्रांतीवीर नाना पुरोहित यांनी प्रजा परिषद या संघटनेद्वारे समाजातील ह्या सर्व घटकांना जवळ करुन सैन्य उभे केले. २८ जानेवारी १९४८ रोजी म्हसळा तर ३० जानेवारी १९४८ रोजी श्रीवर्धन ताब्यात घेतले. लोकांच्या दबावामुळे घाबरलेल्या नवाबाने ३१ जानेवारी १९४८ रोजी सामीलनाम्यावर सही केली आणि जंजिऱ्यावर तिरंगा फडकला!
अधिकृतपणे जंजिरा संस्थान रक्ताचा एकही थेंब न सांडता स्वतंत्र भारतात विलिन करण्यात झाले. ३३१ वर्षांची परकीय सत्ता (१६१७ ते १९४८ ह्या ३३१ वर्षांत २० सिद्दी नवाब झाले!) संपली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे जंजिरा परकियांच्या ताब्यातून सोडवून स्वराज्यात परत आणण्याचे स्वप्न पूर्ण झाले. अजिंक्य जंजिरा लोकांच्या लढ्यापुढे नमला. पण दुर्दैव म्हणजे आज आपण ही गोष्ट विसरूनही गेलेलो आहोत. अजिंक्य समजल्या जाणार्‍या जंजिर्‍याची घमेंड जनतेच्या स्वातंत्र्याच्या ध्यासाने मोडली. तेथे लोकशाहीचे पर्व सुरु झाले. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे याच लोकशाहीत या लढ्याची उपेक्षा झाली. आज निदान हैदराबाद मुक्ती संग्रामाची आठवण तरी मराठवाड्यात शासकीय पातळीवर साजरी केली जाते मग जंजिरा मुक्ती संग्रामाची आठवण का नाही येत कोणाला? कारणं काहीही असोत आजच्या दिवसातला फक्त एक क्षण आपल्याला ‘आजच्या दिवशी जंजिरा मुक्त झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि छत्रपती संभाजी महाराजांचे एक अपूर्ण स्वप्न ह्या दिवशी पूर्ण झाले.’ – इतकी निदान आठवण जरी झाली तरी पुरे – नाही का?

संकेत कुलकर्णी (लंडन)
फोटो: (१) ३१ जानेवारी १९४८ च्या ‘टाईम्स ऑफ इंडीया’ च्या कोपऱ्यात पान १० वर आलेली जंजिरा विलिनीकरणाची छोटीशी बातमी. (२) जंजिरा संस्थानाचा नकाशा – ब्रिटिश लायब्ररीतल्या गॅझेटमधून. (३) जंजिरा संस्थानाचा झेंडा.

भारुडे

भारुड हा संतवाङमयातला एक महत्वाचा प्रकार आहे. संत एकनाथ महाराजांची भारुडे अतीशय लोकप्रिय आहेतच, पण इतर संतांनीसुद्धा भारुडे रचलेली आहेत. यातील काही निवडक भारुडे खाली दिली आहेत. भारुडांची भाषा आणि त्यातले तत्वज्ञान यावरील एक सुंदर लेख खाली दिला आहे. लेखिकेचे मनःपूर्वक आभार. . . . आनंद घारे

हे पान ही पहा : श्रेष्ठ संत आणि त्यांच्या रचना
https://anandghare.wordpress.com/2021/09/27/%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/

भारुड: कळणारी भाषा आणि पेलणारे तत्त्वज्ञान..

काट्याच्या अणीवर वसले तीन गाव ।
दोन ओसाड एक वसेचिना ॥

वसेचिना तिथे आले तीन कुंभार ।
दोन थोटे एका घडेचिना ॥

घडेचिना त्याने घडली तीन मडकी ।
दोन कच्ची एक भाजेचिना ॥

भाजेचिना त्यांत रांधले तीन मूग ।
दोन हिरवे एक शिजेचिना ||

शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे ।
दोन रुसले एक जेवेचिना ॥

ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।
सद्गुरूवाचुनि कळेचिना ||

एक बारीकसा बाभळीसारखा काटा.. त्याचं अणुकुचीदार टोक ते केवढंसं.. त्यावर तीन गावं वसली म्हणे..! त्या गावांची नावं सत्त्व,रज,तम.. किंवा त्रिगुणात्मक प्रकृती. खरं पाहिलं तर एका वेळी, एका ठिकाणी या तिघांपैकी एकच गुण राहू शकतो. तिघांचं असं गुण्यागोविंदाने एकत्र राहणं केवळ अशक्य. त्यामुळे खरं तर ही गावं वसणं केवळ अशक्य!

माउली म्हणतात.. या गावात पुढे तीन कुंभार आले, मडकी घडवायला! त्या कुंभारांची नावं… ब्रह्मा, विष्णू आणि महेश! हे तीन देव म्हणजे सृष्टी घडवणारे कुंभार! पण उत्पत्ती करणाऱ्याकडे पालनाचा विषय नाही आणि पालन, संहार करणाऱ्याला उत्पत्तीचं ज्ञान नाही. दोन थोटे आहेत आणि एक काही घडवत नाही म्हणून मातीला घटाचा आकार मिळण्याची शक्यताच नाही.

या न वसलेल्या गावात, न आलेल्या कुंभारांकडून न घडलेल्या मडक्यात तीन मूग रांधले….दोन कच्चे, एक शिजेचिना…स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह रूपी तीन मूग रांधले. त्यापैकी विषयसुख आणि काम क्रोधाने लिंपलेले रज-तम हे कायमच हिरवे, अपरिपक्व राहणार आणि सत्व मूळचा परिपक्व असल्याने शिजण्याचा प्रश्नच येत नाही.

काहीच शिजत नाही अशा गावात तीन पाहुणे आले… म्हणजे भूत, वर्तमान, भविष्य असे तीन काळ आले.
भूतकाळ हा नेहमीच असमाधानी, वर्तमान हव्यासात मग्न आणि भविष्य नेहमीच अनिश्चित.. म्हणून हे पाहुणे जेवलेच नाहीत.. त्यांचं समाधान कधी झालंच नाही.

थोडक्यात, न वसलेली गावं, थोटे कुंभार, न घडलेली मडकी, त्यात न शिजलेले मूग, आणि न जेवलेले पाहुणे या सगळ्या अशक्य वाटणाऱ्या अशा गोष्टी रंगवत रंगवत ही कथा पुढे जाते.

सुजनहो!
मग, प्रश्न असा येतो, की कशा कळाव्यात या गोष्टी? सर्वसामान्य बुद्धीला न पेलणाऱ्या, न झेपणाऱ्या गोष्टी अशक्य म्हणून सोडून देता येतीलही.
पण आत्मज्ञान ही अशीच अशक्य वाटणारी गोष्ट मात्र सद्गुरुकृपा असेल तर शक्य होऊ शकते असं माउलींना अखेरीस सांगायचंय.

ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।
सद्गुरूवाचुनि कळेचिना ||

‘आत्मज्ञान ही सहजसाध्य गोष्ट नव्हे; आणि म्हणून हे आत्मज्ञान गुरुकृपेशिवाय मिळणं केवळ अशक्य..’ अध्यात्मशास्त्रातील हा महत्वाचा सिद्धांत मांडण्यासाठी माउली हे भारुड रचतात; सर्वसामान्यांना ‘पेलणारे’ तत्त्वज्ञान ‘कळणाऱ्या’ भाषेत सांगतात…

भारुड शब्दाची व्युत्पत्ती:

भारूड या शब्दाच्या दोन व्युत्पत्ती सांगतात. भारुंड नावाचा दोन तोंडांचा पक्षी आहे. भारुड देखील असे ‘द्विमुखी’ असते. सध्या सोप्या लोकवाणीतून बोलणारे, पण वस्तुतः काही शाश्वत सत्य सांगणारे! त्याच्या या द्व्यर्थी स्वभावामुळे, त्याला या दुतोंडी भारुंड पक्षावरून ‘भारुड’ हे नाव मिळालं असावं असं म्हटलं जातं.
भारुड हा शब्द ‘बहु-रूढ’ या शब्दाचा अपभ्रंश असावा असंही म्हणतात. ’बहुजनांमध्ये रूढ’ असणाऱ्या विषयांवर आधारित रचना किंवा ‘जनसमुदायावर आरूढ असणारे लोकगीत’ म्हणजे भारुड अशीही या शब्दाची व्युत्पत्ती सांगितली जाते.

भारूडांचा उगम आणि लोकभूमिका:

गावगाड्यात रुजलेल्या परंपरागत सर्वमान्य व्यक्तिरेखा हे भारुडाचे उगमस्थान आहे. गावात पहाटेच्या प्रहरी ‘वासुदेव’ येतो. हा वासुदेव ‘जागे व्हा’ असे सांगताना नुसतेच डोळे उघडा असे सांगत नाही, तर ज्ञानदृष्टीने जगाकडे पाहण्यास शिकवतो. ‘बये दार उघड’ म्हणणारा ‘पोतराज’ देवीकडे प्रार्थना करतो, हातातल्या पट्ट्याने जणू विकारांवर फटके मारतो. ‘गोंधळी’ हातात संबळ घेऊन जगदंबेचा भक्तिमार्ग रुजवतो. ‘जागल्या’ रात्री गस्त घालतो तेंव्हा नेहमी जागृत राहा, सतर्क रहा याचीच आठवण करून देत असतो. ज्ञानाची दिवटी पेटवणारा आणि अज्ञानाचा अंध:कार नाहीसा करणारा ‘भुत्या’ लोकभाषेत काही सांगत असतो….

मध्ययुगीन काळात, यासारख्या असंख्य लोकभूमिका महाराष्ट्रात वावरत होत्या. जोशी, वाघ्या मुरळी, कोल्हाटी, पांगुळ, सरवदा, दरवेशी, मलंग, भालदार, चोपदार….अशा असंख्य…! महाराष्ट्रीय संतानी या लोकभूमिकांचा समाज प्रबोधनासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला. या प्रतीकात्मक भूमिकातून रूपकात्मक काव्याची पेरणी केली…यातूनच ‘भारुड’ ही फार मोठी लोकपरंपरा उभी राहिली.

भारूड म्हटल्यावर सर्वात प्रथम आठवतात नाथमहाराज आणि त्यांचं हे भारूड…

‘अग ग ग ग ग विंचू चावला…
विंचू चावला हो…
काम क्रोध विंचू चावला..
तेणे माझा प्राण चालला..’

माणसाला विंचू चावला, तर अत्यंतिक वेदना होतात, हा झाला या ओळीचा सरळ आणि समाजमान्य अर्थ.
पण, काम क्रोध आदी षड्रिपूंनी विंचवाप्रमाणे दंश केला, तर त्या वेळेपुरती वेदना तर होईलच, पण आयुष्यभर या विंचवाची नांगी यातना देत राहिल… असा मूळ अर्थाला बाधा न आणता अधिक अर्थ पुढे उलगडत जातो.
एकनाथ महाराज पुढे म्हणतात,
‘…या विंचवाला उतारा.. सत्वगुण लावा अंगारा…’
विंचू म्हणजे भौतिक लालसा! यात गुंतलेल्या जीवाला सत्त्वगुणाचा अंगारा लावा, म्हणजेच त्याला परमार्थाकडे न्या.. असे सूचित करणारी, मूळ शब्दाचा केवळ वाच्यार्थ नाही, तर त्यापलीकडील गूढार्थ सांगणारी.. अशी ही बहुअर्थ प्रसवणारी भारुडं!

भारुडात संतकवींची काव्यप्रतिभा खरोखरच बहरला येते. मुळातच, संतकाव्याला मराठी सारस्वतात अभिजात काव्याचा मान आहे. त्यात, संतांनी रचलेली भारुडे म्हणजे, या अभिजात काव्याला नृत्य, नाट्य, संवाद, विनोद, संगीत, निरुपण या सर्वांची कलात्मक आणि रसात्मक जोड! या सर्वामुळे भारुड हा काव्यप्रकार संतकाव्यात एखाद्या मानबिंदूप्रमाणे शोभून दिसला.

‘आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक..’
सेना महाराजांच्या भारूडातील न्हावी म्हणतोय…अशी हजामत करू, की अविवेकाची शेंडी खुडून टाकलीच समजा…!

‘त्रिगुणाची मूस केली, ज्ञानाग्नीने चेतविली..’
समर्थांच्या भारूडातील जातिवंत सोनाराने, चार पुरुषार्थांच्या विटा लावल्यात, त्रिगुणांची मूस केलीय. सोनार ज्याप्रमाणे अशुद्ध सोने मुशीत घालून तापवतो, त्याप्रमाणे, समर्थांच्या या सोनाराने सर्व कर्मे ब्रह्मार्पण करून मुशीत घातली… ती ज्ञानाग्नीने चेतविली.. लौकिक रुपकाला अलौकिकाचा स्पर्श झाला….

‘सासरा माझा गावी गेला, तिकडंच खपवी त्याला
भवानीआई रोडगा वाहीन तुला….’
एकनाथ महाराजांच्या भारुडात जीवरूप नारी साकडं घालते भवानीआईला.. तो अहंकाररूपी सासरा खपूदे तिकडेच.. त्या कल्पनारूपी सासूलाही मूठमाती दे. ममतारुपी नणंदेचं द्वेष नावाचं कार्टं किरकिर करतंय…खरुज होऊदे त्याला.. भवानीआई सोडव मला.. रोडगा वाहीन…

हे वाचतांना सहज मनात आलं, श्रीखंड पुरीचा श्रीमंती नैवेद्य नाही अर्पण केला आपल्या लोककवींनी… सर्वसामान्य जनांची जाडी भाकरी, रोडगा… तोच दिला आपल्या आईला…. खरंच … भारूड अभिजनांपेक्षा, बहुजनांच्या सोबत अधिक राहिलं…अधिक रमलं…

किती लिहावं भारुडाबद्दल..? एकट्या नाथांचेच भारुडाचे दीडशे विषय आणि भारुडांची संख्या साडेतीनशे! यावरून आपल्याला संतसाहित्यातील या अमोलिक काव्यप्रकाराची व्याप्ती समजून यावी!

पेलणारं तत्वज्ञान कळणाऱ्या भाषेत रुजवणाऱ्या सर्व संतकवींचे, विशेषतः एकनाथ महाराजांचे आणि त्यांच्या भारुडांचे स्मरण.. आजच्या नाथषष्ठीच्या पुण्यदिनी!

डॉ अपर्णा बेडेकर.

*******************

संत एकनाथ महाराजांची भारुडे

उपहास आणि विनोदामधून परमार्थाचा मार्ग दाखवता येतो यावर कदाचित विश्वास बसणार नाही, पण संत एकनाथ महाराजांनी पाचशे वर्षांपूर्वी रचलेल्या भारुडांमधून हे काम करून ठेवले आहे. शाहीर साबळे यांनी त्यांच्या काही भारुडांना आकर्षक चाली लावून आणि आपल्या बुलंद आवाजात गाऊन ‘भारुड’ या लोकगीताच्या प्रकारालाच एक महत्वाचे स्थान मिळवून दिले आहे. ‘विंचू चावला’ या सर्वात जास्त लोकप्रिय भारुडामध्ये त्यांनी ‘अगगगगग, देवा रे देवा, काय मी करू’ वगैरे बरीचशी पदरची भर घालून त्याला अधिक उठाव आणला आणि काँटेंपररी बनवले असले तरी एकनाथ महाराजांची मूळ शब्दरचना तशीच राखली आहे. मूळ भारुड खाली दिले आहे. काम, क्रोध इत्यादि तमोगुणांचा विंचू चावल्यामुळे शरीराची (खरे तर मनाची) आग आग झाली. तिला शांत करायचे असेल तर वाईट गुण सोडून सद्गुणांची कास धरावी, त्यातून मनःशांती मिळेल असे या भारुडात सांगितले आहे.
विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला । तम घाम अंगासी आला ॥धृ॥
पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला । सर्वांगाचा दाह झाला ॥१॥
मनुष्य इंगळी अति दारुण । मज नांगा मारिला तिने । सर्वांगी वेदना जाण । त्या इंगळीची ॥२॥
ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागे सारा । सत्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरा ॥३॥
सत्व उतारा देऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित् राहिली फुणफुण । शांत केली जनार्दने ॥४॥

माणसाच्या अंगातले (मनातले) काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू त्याचा ताबा घेतात, त्याच्यावर सत्ता गाजवतात, त्यांच्या तालावर नाचवतात हे संत एकनाथांनी सासरच्या घरात सुनेवर सत्ता गाजवणाऱ्या किंवा सासुरवास करणाऱ्या नातेवाईकांच्या रूपकामधून सुरेख मांडले आहे. यांच्या जाचामध्ये माणूस इतका गुरफटून जातो की त्याला देवाचे स्मरण करायला भान आणि वेळच उरत नाही. त्यामुळे या सगळ्यांना बाजूला करून मला एकटेच राहू दे, म्हणजे मी तुझी भक्ती करू शकेन असे खाली दिलेल्या भारुडात भवानी आईला सांगून तिला साकडे घातले आहे. यातले सासरा, सासू, नणंद, जाऊ वगैरे सगळे मनातले विकार आहेत.

सत्वर पाव गे मला । भवानीआई रोडगा वाहिन तुला ॥१॥
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥
सासू माझी जाच करती । लवकर निर्दाळी तिला ॥३॥
जाऊ माझी फडफड बोलती । बोडकी कर ग तिला ॥४॥
नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे त्याला ॥५॥
दादला मारुन आहुती देईन । मोकळी कर गे मला ॥६॥
एकाजनार्दनी सगळेचि जाऊं दे । एकटीच राहू दे मला ॥७॥

अशाच प्रकारच्या भावना वेगळ्या रूपकामधून खाली दिलेल्या भारुडात व्यक्त केल्या आहेत. आपल्याला हतबल करणाऱ्या, परमेश्वरापासून दूर ठेवणाऱ्या परिस्थितीला यात दादला म्हणजे नवरा असे संबोधून तो नको असे म्हंटले आहे. ईश्वरासी समरस होण्यासाठी या दादल्याच्या तावडीमधून सुटायला पाहिजे असे ते सांगतात.
मोडकेंसे घर तुटकेसे छप्पर । देवाला देवघर नाही ॥१॥
मला दादला नलगे बाई ॥धृ॥
फाटकेच लुगडे तुटकीसी चोळी । शिवाया दोरा नाही ॥२॥
जोंधळ्याची भाकर आंबाडयाची भाजी । वर तेलाची धार नाही ॥३॥
मोडका पलंग तुटकी नवार । नरम बिछाना नाही ॥४॥
सुरतीचे मोती गुळधाव सोने । रांज्यात लेणे नाही ॥५॥
एकाजनार्दनी समरस झाले । तो रस येथे नाही ॥६॥

खाली दिलेल्या भारुडात संत एकनाथांनी तत्कालिन समाजामधील लुच्चेपणावर सणसणीत कोरडे ओढले आहेत, पण हे आजच्या सामाजिक परिस्थितीलाच उद्देशून लिहिले असावे असे वाचतांना आपल्याला वाटते. याचा अर्थ असा की पाचशे वर्षांपूर्वीची माणसेसुध्दा आतापेक्षा फारशी वेगळी नसावीत. त्यांनी कोणता अविचार किंवा हावरेपणा करू नये हे संत एकनाथ सांगतात, याचाच अर्थ त्यांच्या अवती भंवती वावरणारी माणसे तशी स्वार्थबुध्दीने नेहमी वागत असावीत असा होतो. विवेक आणि संयम बाळगण्याबद्दल सगळे सांगून झाल्यावर अखेरीस ते पुन्हा अध्यात्माच्या मुख्य मुद्द्यावर येतात आणि ‘असा कोणाला दाखवण्यातून देव दिसत नसतो, त्याला ज्याने त्याने अंतरात (गुप्तपणे) ओळखायचे असते’ हे सांगतात. यातल्या अनेक ओळी आतापर्यंत म्हणी किंवा वाक्प्रचार झाल्या आहेत.

अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे ?
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे?
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे?
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे?
चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे?
भगवी वस्‍त्रे केली म्हणून काय जगच नाडावे?
आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे ?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।
परस्‍त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी?
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी?
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना।।
सद्‌गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा?
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा?
घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा ?
एका जनार्दनी म्हणे हरी हा गुप्तची ओळखावा ?
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना ।।

एकाद्या माणसाला भुताने पछाडले की तो भान हरपलेल्या वेड्यासारखे वागायला लागतो. परमेश्वराचा ध्यास लागल्यानेसुध्दा कोणाकोणाची अशीच अवस्था कशी झाली हे त्यांनी ‘भूत’ या भारुडामध्ये मनोरंजक पध्दतीने दाखवले आहे. त्यातसुध्दा अखेरच्या ओळीमध्ये हे भूत (परमेश्वर) जगात सर्वत्र भरलेले आहे अशी त्याची खूण सांगितली आहे.
भूत जबर मोठे ग बाई । झाली झडपड करु गत काई ॥१॥
सूप चाटूचे केले देवऋषी । या भूताने धरिली केशी ॥२॥
लिंबू नारळ कोंबडा उतारा । त्या भूताने धरिला थारा ॥३॥
भूत लागले नारदाला । साठ पोरे झाली त्याला ॥४॥
भूत लागले ध्रूवबाळाला । उभा अरण्यात ठेला ॥५॥
एकाजनार्दनी भूत । सर्वांठायी सदोदित ॥६॥

एकनाथ महाराजांना या अजब भुताने भारलेले होतेच, त्यांनी स्वतःच ते कबूल केले आहे. त्यामुळे त्यांची दशासुध्दा इतरेजनांपेक्षा वेगळी झाली होती. ते सामान्य राहिले नव्हते. त्यांच्या असामान्यत्वाची ‘उलटी खूण’ ते या भारुडामध्ये दाखवतात. यातला गूढ अर्थ समजून घेणे मात्र तितके सोपे नाही.
नाथाच्या घरची उलटी खूण । पाण्याला मोठी लागली तहान ॥१॥
आंत घागर बाहेरी पाणी । पाण्याला पाणी आले मिळोनी ॥२॥
आजी म्या एक नवल देखिले । वळचणीचे पाणी आढ्या लागले ॥३॥
शेतकऱ्याने शेत पेरिले । राखणदाराला तेणे गिळिले ॥४॥
हांडी खादली भात टाकिला । बकऱ्यापुढे देव कापिला ॥५॥
एकाजनार्दनी मार्ग उलटा । जो तो गुरुचा बेटा ॥६॥

*****************************

मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती…’ या भारुडाचा भावार्थ काय आहे?

सानिका काळे साठी प्रोफाइल फोटो

सानिका काळे , B.E. Mechanical Engineer Government College of Engineering Aurangabad कडून (2017 ह्या वर्षी पदवीधर झाले)

सर्वप्रथम @विजय आपटे. (Vijay Apte) सरांच्या सुचनेनुसार हे भारूड नसून ‘रुपक’ आहे; ज्याची रचना संत नामदेवांनी केली आहे. (सुचनेसाठी धन्यवाद सर 🙏😊)

बरेच दिवस फॉलो केल्यानंतर कोणीच उत्तर देत नाहिये म्हटल्यावर मीच जरा माहिती काढून उत्तर द्यावं ह्या विचाराने हा प्रश्न हातात घेतला आहे. मला ह्या रुपकाचा शब्दशः अर्थ तर नाही सांगता येणार पण ह्याचा भावार्थ मात्र मला समजला आहे. तो मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते.

संत नामदेव रचित हे रुपक पुढीलप्रमाणे :

मुंगी व्याली शिंगी झाली दूध तिचे किती |

सतरा रांजण भरुन गेले प्याले बारा हत्ती || १ ||

आम्ही लटिके न बोलु वर्तमान खोटे || धृ ||

लटिकें गेले कटके तेथे गाडग्या एवढे राळे |

उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी येवढे डोळे || २ ||

शेळी करी घुसळण तेथे मांजर काढी लोणी |

उंदीर गेले देशांतरा ताके भरल्या गोणी || ३ ||

पाण्यात कासव गीत गाय वनात कोल्हा नाचे |

सावज मनी संतोषला खोकड पुस्तक वाचे || ४ ||

कांतणी घरी लग्न लागले सरडा कणीक कांडी |

बागुल वंध्या कण्या परणी घुबड मांडे रांधी || ५ ||

बाभुळीचे खोडी माशाने केले कोटे |

सशाने सिंह ग्रासिला बेडूक आले लोटे || ६ ||

विष्णु दास नामा म्हणे ऐसी त्यांची ख्याती |

लटिकें म्हणतील त्यांचे पूर्वज नरका जाती || ७ ||

हे रुपक पूर्ण वाचल्यावर लक्षात येतं की यात अशक्यप्राय घटना लिहिल्या आहेत.

  • म्हणजे मुंगी हा सस्तन प्राणीच नाही मुळी.. मग तिचं दूध कुठून येणार??!
  • चिमणीचे वाटी एवढे डोळे??
  • मांजर लोणी काढते??

अशी बरीच उदाहरणं दिली आहेत. पण शेवटी कहर म्हणजे ही जी “लटिके” आहेत ती विष्णुचे पूर्वज नरकात गेलेली असणार असंही म्हणु शकतील असं नामदेव महाराज म्हणता आहेत.

लटिके म्हणजे कोण?

लटिके म्हणजे शुद्ध खोटं बोलणारे..! मोठाल्या थापा मारणारे किंवा कुणाची तरी (म्हणजे मोठ्या माणसांची) खोटी स्तुती करणारे लोकं. मला वाटतं की ‘लटका राग’ असा आपण जो शब्दप्रयोग करतो तो ह्यावरूनच आला असणार.

तर ह्या रुपकाचा भावार्थ इतकाच की कोणी खोटं बोलायला लागलं की त्याला कसलाच ताळतंत्र राहत नाही. कसली मर्यादा असण्याचं कारणच नाही..! खोटी स्तुती करायची म्हटल्यावर कितीही करु शकतो ना.. किंवा थापा मारताना समोरच्याला काय कळणार? तो थोडीच होता बघायला?

ही ‘लटिके’ राजाच्या कौतुकासमोर अगदी भगवान विष्णुच्या पूर्वजांना नावं ठेवायला कमी करणार नाहीत.

पूर्वी बर्‍याचदा कोणी मोठमोठाल्या थापा मारु लागला की गोतावळ्यातली लोकं त्याला हे भारूड ऐकवत. तेव्हा कुठे तो माणूस खजील होऊन गप्प बसत. 😁

तर आता ह्याचा वापर आपणही करुया. कारण आपल्या आजुबाजूला अशी ‘लटिके’ काही कमी नाहीत. 😂

तळटीप : यात काही चुकलं असेल तर माफ करा आणि अजुन माहिती सुचवू शकत असाल किंवा चुकीची दुरुस्ती सांगू शकत असाल तर नक्की टिप्पणी करा 🙏😊 🍁

******************

संत मुक्ताबाईंची रचना

मुंगी उडाली आकाशी। तिने गिळीले सूर्यासी।
थोर नवलाव झाला। वांझे पुत्र प्रसवला।
विंचू पाताळाशी जाय। शेष माथा वंदी पाय।
माशी व्याली घार झाली। देखोनि मुक्ताई हसली।

परमात्म्याने विश्वाची निर्मिती करण्यासाठी मायेची निर्मिती केली आणि मायेने आपल्या लीलेने जे जे काही नवल घडविले ते ते ‘कोडे’, ‘कूट’ या प्रकारांत मांडून मायेचे रूपक संतांनी उभे केले आहे. मुक्ताबाईच्या अभंगातील ही मुंगी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात माया आहे. या मुंगीने म्हणजे मायेने आकाशात उड्डाण केले म्हणजे ज्या परमात्म्यापासून आपण निर्माण झालो आहोत, त्याला विसरून आपली मर्यादा ओलांडली. ‘निजबोधरूप – तोचि ज्ञानदीप’ असे सूर्याचे वर्णन केले आहे. अहंकाराचा समूळ नाश करणारा तो सूर्य होय; तर अज्ञानाचा, अविद्येचा नाश करणारा ज्ञानप्रकाश म्हणजे परब्रह्म. त्याच्या मूळ स्वरूपाला मायेने आवरण घातले. ज्ञानप्रकाशाला स्वत:च्या आवरणाने अर्थात अविद्येने ग्रासले म्हणजे सूर्याला गिळीले आणि अविद्येचा प्रवास सुरू झाला. शुद्ध स्वरूप झाकले गेले, हाच मोठा नवलाव झाला. अविद्येला कधीही ब्रह्मरूप प्राप्त होणार नाही म्हणून ती वांझोटी आहे. ती वांझोटी अविद्या प्रसवली आणि तिने ‘अहंकार’ पुत्राला जन्म दिला. त्यातून विकारांचा षड्रिपू म्हणजे विंचू उदयास आला आणि मोहरूपी सर्पाने त्याला पाताळात नेले म्हणजे विकारांनी जीव पाताळात गाडला गेला. या अविद्येतून निर्माण झालेले संकल्प, विकल्प आणि त्यात सापडलेली जी जीवरूप माशी ती व्याली आणि त्यातून फार मोठी घार म्हणजे ‘वासना’ निर्माण झाली. मूळची शुद्ध स्वरूपातील उत्पत्ती असतानाही शेवटी विकारांच्या अत्युच्च पातळीला गेलेली जीवदशेची अवनत अवस्था पाहून मुक्ताबाई एकीकडे अत्यंत हळहळली, तर दुसरीकडे ढालगज मायेची ही चमत्कृती पाहून हसली. हेच रूप ‘योगाच्या’ अंगानेही सोडविता येते. या रूपाकत योगिनी आणि तत्त्वज्ञ या दोनही भूमिकेतून मुक्ताई अभिव्यक्त होते हे निश्चित.

पानिपतच्या लढाया

दरवर्षी मकरसंक्रांतीला कुणीतरी पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची आठवण करून देतो. ती लढाई १४ जानेवारी १७६१ला झाली होती. गेली सुमारे सत्तर वर्षे १४ जानेवारीला संक्रांत येत होती म्हणून ही लढाई संक्रांतीच्या दिवशी झाली असे समजले जात होते. आता संक्रांत १५ जानेवारीला यायला लागली आहे. सन १७६१ मध्ये की कदाचित १०-११ तारखेलाच होऊन गेली असेल. पण संक्रांत आणि ही लढाई यांचे असे नाते जमले आहे की कशाच्या बाबतीत काही वाईट घडले तर त्याच्यावर संक्रांत आली असे म्हंटले जाते. कशाचाही सत्यानाश झाला तर त्याचे पानिपत झाले असे म्हणतात. या लढाईने मराठी भाषेत असे वाक्प्रचार तयार झाले आहेत.

पानिपतला तीन लढाया झाल्या असे मी शाळेत असतांना इतिहासात शिकलो होतो. भारताच्या इतिहासात शेकडो किंवा कदाचित हजारोंनी निरनिराळी युद्धे होऊन गेली असतील, पण रामरावणयुद्ध, कौरवपांडव युद्ध, अशोकाचे कलिंगयुद्ध आणि या पानिपतच्या लढाया यांना स्मरणात ठळक स्थान मिळाले आहे. बाकीच्या लढाया कुठकुठल्या गावांमध्ये होऊन गेल्या ती कुठलीच नावे आता माझ्या तरी लक्षात राहिलेली नाहीत.
पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबरने इब्राहिम लोधीला हरवले आणि तो दिल्लीचा बादशहा झाला. दुसऱ्या लढाईत अकबराने हेमू नावाच्या राजाला हरवले आणि हातातून गेलेली दिल्लीची सत्ता पुन्हा मिळवली. त्यानंतर अनेक वर्षे मोगलांची सत्ता टिकून राहिली. पानिपतची तिसरी लढाईसुद्धा त्या काळातल्या मोगल बादशहासाठी लढली गेली, पण तो इतका दुबळा होता की आपल्या बचावासाठी त्याने मराठ्यांना बोलावून घेतले आणि तो स्वतः दिल्ली सोडून परागंदा झाला. मग परकीय आक्रमक अहमदशहा अबदाली आणि मराठे सैन्य यांच्यात भयानक युद्ध झाले. या लढाईत मराठ्यांचा दारुण पराभव झाला, पण विजयी झालेल्या अबदालीनेही दिल्लीवर सत्ता स्थापित केली नाही. त्याचीही खूप हानीच झाली आणि तो फारशी लूट किंवा प्रदेश काबिज न करताच अफगाणिस्तानमध्ये परत गेला.

इतिहासकाळातल्या मराठ्यांच्या सगळ्या लढाया म्हणजे हातात ढाल तलवार घेऊन लढणाऱ्या सैनिकांमध्ये हातघाईच्या चकमकी झाल्या असतील अशी समजूत ऐतिहासिक कादंबऱ्या वाचून आणि नाटकसिनेमे पाहून होते. पण पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचे त्या काळातल्या कलाकाराने काढलेले एक चित्र पाहून मला थोडा धक्का बसला. यात अनेक सैनिक तोफा घेऊन लढतांना दाखवले आहेत.

१७६१ सालानंतर आणखी थोड्याच काळात माधवराव पेशवे यांच्या अधिपत्याखाली मराठ्यांनी अबदालीच्या इतर साथीदारांना हरवून पानिपतला लागलेला कलंक पुसून काढला, पण त्याची इतिहासात फारशी नोंद घेतली गेली नाही. त्यानंतर मात्र शिंदे होळकर यांच्यासारख्या प्रमुख मराठे सरदारांची एकजूट संपली, त्यांनी जिंकलेले भाग आपापसातच वाटून घेऊन निरनिराळी स्वतंत्र राज्ये तयार केली. पण धूर्त इंग्रजांनी त्या सगळ्यांशी वेगवेगळ्या लढाया करून त्यांना जिंकून घेतले आणि संपूर्ण हिंदुस्थानवर कब्जा मिळवला हे आपल्या देशाचे दुर्दैव.

पानिपतच्या या तीन लढायांची माहिती या पानावर संग्रहित केली आहे. सर्व मूळ लेखकांचे आभार.

. . . आनंद घारे

सदाशिवराव भाऊ आणि पेशवाईतील इतर वीरांची माहिती इथे. https://anandghare.wordpress.com/2020/12/20/%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0/

पानिपतची पहिली लढाई

(विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून)
पानिपतची पहिली लढाई उत्तर भारतात पानिपत शहराजवळ १५२६ साली अफगाण योद्धा बाबर व लोधीवंशीय इब्राहिम यांच्यामधे झालेली लढाई होती. या लढाईने भारतात मुघल साम्राज्याचा पाया रोवला गेला. या लढाईत इब्राहिम लोधी मारला गेला.

बाबराने प्रचंड तयारी करून भारतावर आक्रमण केले. बाबराने पंजाब प्रांतावर आक्रमण करून पंजाबचा सुभेदार दौलतखान लोदीचा पराभव केला व त्याला कैदेत टाकले. सुरुवातीला विजय प्राप्त झाल्याने बाबराचा उत्साह प्रचंड वाढ़ला. बाबराने दिल्ली जिंकून घेण्याचा निर्णय घेतला. बाबर आपल्या सैन्यासह दिल्लीजवळ आला व त्याने पानिपतच्या रणमैदानावर सैन्याचा तळ दिला. ‌‍‌ दिल्ली येथे इब्राहिम लोदीची सत्ता होती. बाबर दिल्लीवर आक्रमण करणार हे पाहुन त्याने युद्धाची तयारी केली व आपले सैन्य घेऊन त्यानेही पानिपतच्या मैदानावर लष्करी तळ दिला. इतिहासकार श्रीवास्तवांच्या मते बाबर जवळ २५ हजाराचे तर इब्राहिम लोदी जवळ ४० हजाराचे सैन्य होते. २१ एप्रिल १५२६ला प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध सकाळी ९ वाजता सुरू झाले व दुपारी तीन वाजता संपले. बाबरने स्वतःच सैन्य रचना केली. प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली तेव्हा एका विशिष्ट ठिकाणी उभे राहून बाबर सैन्याला मार्गदर्शन करीत होता. बाबरने राखीव फौज ठेवली होती.

इब्राहिम लोदी स्वतः आघाडीवर राहून आपल्या सैन्याचे नेतृत्व करीत होता. झालेल्या युद्धात बाबरने इब्राहिम लोदीचा पूर्ण पराभव करून त्याला युद्धात १५,००० सैन्यासह ठार मारले. जेव्हा इब्राहिम लोदीचा मृत्यू झाला तेव्हा त्याचे सैनिक पळू लागले. त्यांचा पाठलाग करत बाबराने दिल्ली गाठली. या युद्धात इब्राहिमला मदत करणारा ग्वाल्हेरचा राजा विक्रम जीतही मारला गेला.

पानिपतची दुसरी लढाई

पानिपतची दुसरी लढाई अकबर आणि सम्राट हेमू यांच्या सैन्यात नोव्हेंबर ५, इ.स. १५५६ रोजी झाली. बाबरचा मुलगा हुमायून याला शेरशहा सूरी याने इ.सन १५४० मध्ये हुसकून लावले आणि तो दिल्लीचा बादशहा झाला तर हुमायून परागंदा झाला. पुढे शेरशहा मरण पावला आणि त्याचे वारस राज्यकारभार सांभाळू शकले नाहीत. इ.सन १५५५ मध्ये हुमायूनने परत येऊन दिल्ली जिंकून घेतली. पण लवकरच हुमायून मरण पावला आणि सूरी वंशाचा सुभेदार असलेल्या हेमूने दिल्लीवर चाल करून ती जिंकली आणि स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. पण हे राज्य फक्त काही आठवडेच टिकले. हुमायूनचा १३ वर्षांचा मुलगा अकबर विश्वासू सरदार बैरामखान याच्या सहाय्याने दिल्लीवर चालून आला. त्यांची हेमूबरोबर पानिपत इथे लढाई झाली. त्यात अकबराचा विजय झाला.

पानिपतची तिसरी लढाई

(विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून)

पानिपतची तिसरी लढाई जानेवारी १४, १७६१ रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत जवळ झाली. याच गावाजवळ पहिली दोन युद्धे झाली होती, ज्यात मुघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील मराठ्यांत झाली. अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली. जरी महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले.

पार्श्वभूमी
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला खंबीर वारस मिळाला नाही त्यामुळे मराठ्यांनी उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. १७५० च्या दशकात मराठ्यांनी उत्तर भारतात बऱ्याच मोठ-मोठ्या मोहिमा काढल्या. पार पाकिस्तानातील अटकेपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले व ७ ते ८ शतके राज्य करण्याऱ्या एकछत्री इस्लामी सत्तेला आव्हान दिले. थोरल्या बाजीराव यांच्या कारकिर्दीपर्यंत उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. भारताच्या सीमा ओलांडून मराठे येऊ लागल्याने भारता बाहेरील इस्लामी सत्तांना मराठ्यांना अंकुश घालणे गरजेचे वाटले. इ.स. १७५८ मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला व मुघलांना नाममात्र राज्यकर्ते बनवले. याच वेळेस अहमदशाह अब्दालीचा मुलगा तिमूर शाह दुराणीला हाकलून लावले. मुस्लिम धर्मगुरूंनी याला आपल्या धर्मावरचे मोठे संकट मानले व मराठ्यांना प्रत्युतर देण्यासाठी आघाडी उघडण्याचे आव्हान केले. अफगाण सेनानी अब्दालीने याला होकार दिला. त्याने १७५९ मध्ये बलुच, पश्तुन व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील छोट्या छोट्या चौक्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली व मराठ्यांशी उघड उघड वैर पत्करले. या संघर्षामध्येच मराठ्यांचा मुख्य सेनापती दत्ताजी शिंदे यांची नजीबने अत्यंत क्रूर हत्या केली. साहजिकच मराठ्यांना याचे उत्तर देणे गरजेचे होते तसेच अब्दालीला हुसकावणे गरजेचे होते. नाहीतर उत्तर भारतात काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमावण्याची भीती होती. म्हणून मराठ्यांनी पण १ लाखाहून मोठी फौज उभारली व पानिपतकडे आगेकूच केले.

पानिपतच्या संग्रामावेळेसचे मराठा साम्राज्य

युद्धाआधीच्या घडामोडी

नानासाहेब पेशवे यांचा मोठा मुलगा विश्वासराव आणि चुलत भाऊ सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची मोहिम चालू झाली. अनेक अडचणींना तोंड देत सेना उत्तरेत पोहोचली. वाटेत होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले यांच्या तुकड्या येउन मिळाल्या सैन्याला बळकटी मिळाली .भरतपुरचे जाट शासक महाराजा सूरजमल देखिल मिळाले. या एकत्रित सैन्याने दिल्लीवर हल्ला केला व काबीज केली. विश्वासरावला दिल्लीच्या गादीवर बसवायचा भाउंचा मनसुबा होता. भाउंनी रसदेअभावी दिल्लीलुटायचा आदेश दिला. परंतु जाट शासक महाराजा सूरजमलनी त्याला विरोध केला व ते युतीच्या बाहेर पडले. ही घटना युद्धात निर्णायक ठरली असे बऱ्याच इतिहासकारांचे मत आहे.

पानिपतची तिसरी लढाई – १८ व्या शतकात फैजाबाद शैलीने काढलेले पानिपतच्या युद्धाचे वर्णन. यात दोन्ही सैन्याची व्यूहरचना दिसते आहे. तोफांचा धुरळा सर्वत्र उडलेला दिसतो. तपकीरी घोड्यावर अब्दाली आहे. खालच्या बाजूला नजीबची कमान दर्शावली आहे. मराठ्यांच्या गोटात जखमी भाऊला व विस्कळीत मराठ्यांची कमान दर्शावली आहे. व डाव्या बाजूच्या कोपऱ्यात बुणग्यांच्या शिबिरात घुसून महिलांवर अत्याचार करणारे अब्दालीचे सैनिक दाखवले आहेत.

अब्दाली व मराठे यांमध्ये नियमितपणे चकमकी घडू लागल्या कर्नाल व कुंजपुरा येथे दोन्ही फौजा भिडल्या. कुंजपुराच्या चकमकीत मराठ्यांनी अब्दालीची संपूर्ण तुकडी कापून काढली व कित्येकांना बंदी बनवले. नाजीब्चा गुरू कुतुबशहा ह्याला जनकोजी ने जमादाडा ने कापून काढले. ह्याच कुतुबशहा ने दत्ताजी शिंदेचा वध केला होता. सरहिंदचा सुभेदार अबुस समदखान, मोमीनखान आणि नजीबचा सख्खा चुलतभाऊ नाजाबतखान ह्यांना समाधी दिली. पाउस पडत असल्याने यमुना नदी पलीकडून अब्दालीला आपल्या सैन्याची काहीच मदत करता आली नाही. चिडून जाउन अब्दालीने आपल्या सैन्याला भर पुरात यमुना ओलांडायला सांगितले. गुलाबसिंग गुजर ह्याने अब्दालीला सांगितले की गौरीपूरला गचका उतार आहे. अब्दालीने दक्षिणेकडे आपल्या फौजेची वाटचाल केली व बाघपत येथे यमुना ओलांडली. अब्दालीला रोकण्यात सखरोजी पाटील सातशे स्वारांच्या पथका समवेत शहीद झाला. यमुना ओलांडल्याचे मराठ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पानिपत जवळ तळ टाकला व बचाव भक्कम करण्यावर जोर दिला. २६ ऑक्टोबर रोजी अब्दाली पानिपत व सोनपत मधील संबलका येथे पोहोचला. पुढे चालणाऱ्या अब्दालीच्या आघाडीच्या सेनेची मराठ्याशी येथे जोरदार चकमक झाली व मराठे पूर्ण चाल करणार इतक्यात अब्दालीची कुमक पोहोचली व मराठ्यांचे जोरदार आक्रमणाचे मनसुबे थंडावले. दोन्ही बाजुनी मोठ्या प्रमाणावर सैन्य मारले गेले. मराठ्यांना व अब्दालीलाही या चकमकीमुळे मागे हटावे लागले व एकमेकांच्या सामर्थ्याचा अंदाज आला. युद्ध झालेच तर ते भीषणच होइल व प्रचंड जिवीतहानी होइल हे निश्चित झाले. अजून एका चकमकीमध्ये गोविंदपंत बुंदेलेंच्या सैन्य-तुकडीवर अब्दालीच्या सेनेने तुफानी हल्ला चढवला. ही तुकडी मुख्य सेनेसाठी रसद व घोडदळीची कुमक आणत होते. मराठ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले पण त्याही पेक्षा मोठे नुकसान म्हणजे, रसदेचा पुरवठा अब्दालीने पूर्णपणे तोडून टाकला. मराठ्यांची उपासमार होऊ लागली.

पानिपतची कोंडी
पुढील दोन महिने दोन्ही सेनांमध्ये सातत्याने चकमकी होत राहिल्या व एकमेकांवर कुरघोडी करणे चालू राहिले. मराठ्यांचा नजीबवर अब्दालीपेक्षा जास्त राग होता. एका चकमकीत नजीब मरता मरता वाचला. त्याचेही ३००० पेक्षा जास्ती सैन्य नुसत्या चकमकींमध्ये मारले गेले होते. अब्दालीला मराठ्याच्या सामर्थ्याचा अंदाज आलेलाच होता व युद्ध फायद्यात नाही हे लक्षात आले होते. मराठ्यांच्या पोटातही उपासमार व बुणग्यांच्या ताणामुळे भाऊही संधीचाच मार्ग शोधत होता. मराठे पानिपतच्या उत्तरेकडे होते व त्यांचा मार्ग दक्षिणेकडे होता. त्यांचे मित्र पक्ष, त्यांचे रसद पुरवठादार, सैन्य कुमक हे सर्व दिल्लीच्या दक्षिणेकडे होते. तर अब्दाली पानिपतच्या दक्षिणेकडे होता. अशीच एकदम विरुद्ध स्थिती अब्दालीचीही होती. मराठ्यानी व अब्दालीने एकमेकांचा रस्ता आडवला होता एकमेकांचे वैर्य लक्षात घेता युद्ध किंवा संधी असे दोनच विकल्प होते.

अब्दाली ने संधी करायचा प्रय्त्‍न केला परंतु नजीबने तो होऊ दिला नाही, नजीबने इस्लामच्या नावावर युद्धाची शक्यता तेवत ठेवली. यामुळे मराठे अजून गोंधळात पडले. आजना उद्या संधी होईल या आशेवर थांबले. दरम्यान धान्यसाठा संपत आलेला होता, यामुळे मराठ्यांना आजूबाजूच्या गावांमधून अन्न धान्य उचलण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यामुळे स्थानिक नागरिकांचा मराठ्यांवरील रोष वाढला. याउलट अब्दालीला दक्षिणेकडील मित्र पक्षांकडून रसद पुरवठा होत राहिला. भाऊंनी सरतेशेवटी कोंडी मोडून काढण्याचा निर्णय घेतला. पहिल्या प्रथम तोफांनी अफगाण्यांना भाजून काढायचे व नंतर घोडदळाने आक्रमण करायचे व कोंडी मोडून जिथे रसद पुरवठा निश्चित होता त्या दिल्लीला पोहोचायचे, असे ठरले.

लढाई व्यूहरचना -काशीराज पंडितांच्या बखरीवर आधारित पानिपतच्या लढाईचा नकाशा

मराठे रणांगणाच्या उत्तरेस थांबले होते तर अफगाणी दक्षिणेकडे. अब्दालीने आपले सैन्य तिरक्या रेषेत लावले होते तर मराठ्यांचे एकाच ओळीत होते. मराठा सेनेच्या मध्यभागी भाऊ व विश्वासराव होते. डावीकडे इब्राहीमखान गारदीचे सैन्य तर उजवीकडे शिंदे व होळकरांचे सैन्य होते. मराठ्यांनी तोफखाना पुढे ठेवला. त्यांना संरक्षण करणारे भालदार व गारदी होते. तोफांच्या मागे अननुभवी तरुण सैनिक होते व जवळपास ३०,००० बुणग्यांनी स्वयंप्रेरणेने युद्धात भाग घेतला होता.

अफगाण्यांनी व्युहरचना यासारखीच केली होती. एका बाजूला नजीबचे रोहिले व दुसऱ्या बाजूला फारसी सैनिकांच्या तुकड्या होत्या. अब्दालीचे सेनापती शुजा उद दौला व शाह वली यांनी मधली कमान संभाळली.

युद्धाची सुरुवात
मराठ्यांकडील अन्नसाठा संपल्याचे लक्षात आल्यावर युद्धाशिवाय पर्याय नव्हता व १४ जानेवारी १७६१ रोजी मराठे युद्धासाठी तयार झाले. पारंपारिक युद्ध पोषाक घालून चेहऱ्यांवर हळद , गुलाल फासून युद्धास तयार झाले. मराठे आपल्या खंदकातून बाहेर पडलेले पाहून अब्दालीने लगेचच व्युहरचना युद्धास तयार केली व तोफखान्याने मराठ्यांचे युद्धास स्वागत केले. अब्दालीच्या तोफा छोट्या अंतरावरच्या असल्याने युद्धाच्या सुरुवातीला काहीच फरक पाडू शकल्या नाहीत.

मराठ्यांतर्फे पहिले आक्रमण इब्राहिम खान तर्फे झाले जो आपले सामर्थ्य दाखवण्यास आतूर झालेला होता. मराठ्यांच्या तोफांची ताकद जरा जास्तच होती. तोफेचे गोळे अफगाण सेनेच्या डोक्यावरून गेले व अब्दालीचे फारसे नुकसान झाले नाही पण इब्राहिम खानने आपल्या कमानी रोहिल्यांवर भिडवल्या. मराठे गारदी, तिरंदाज व भालदार यांनी अफगाण व रोहिल्यांना मोठ्या प्रमाणावर कापून काढले. रोहिले मागे हटले, लढाईची सुरुवात इब्राहिमखानने गाजवली.परंतु दुपारी मराठी सैन्यच तोफखाण्या समोर आल्यामुळे तोफखाना बंद करावा लागला.यामुळेच युद्धाचे परिणाम बदलले,म्हणजेच युद्धाने पक्ष पात केला असे म्हणायाला हरकत नाही. दरम्यान भाऊंनी मध्यातून हल्लबोल केला व अफगाण्यांची कत्तल आरंभली अफगाण्यांच्या तुकडया पळ काढण्याच्या बेतापर्यंत भाऊने यश मिळवले शाह वली ने नवाब उद दौलाला मदत करण्यास बोलवले परंत नवाब आपल्या जागेवरून हलला नाही. त्यामुळे काही काळ अफगाण्यांच्या गोटात गोंधळाचे वातावरण होते. अफगाणी कमानी पळ काढण्याच्या बेतात आहे हे पाहून मराठ्यांच्या घोडदळाला संयम आवरला नाही व आक्रमण केले परंतु उपाशी जनावरांनी ऐन युद्ध समयी हाय खाल्ली, कित्येक घोडे रस्त्यातच कोसळले व घोडदळाच्या घावाचा दणका अफगाण सेनेला देता आला नाही.

अंतिम सत्र

शेवटच्या सत्रात शिंद्यानी नजीब विरुद्ध आक्रमण केले, दत्ताजीच्या वधामुळे शिंद्याचे व नजीबचे वैर टोकाला पोहोचले होते. परंतु नजीबने शिंद्याच्या फौजेला यश मिळू दिले नाही. परंतु मराठ्यांचे रणांगणावर वर्चस्व अजूनही होते अफगाणी सेना वाकली होती परंतु अजून मोडली नव्हती.उजवी बाजू इब्राहिमखानने जवळपास कापून काढलीच होती. मध्य भागी भाऊंचा ताबा होता व अब्दालीच्या सेनेला दोन भागात विभागले होते व फक्त डाव्या बाजूला नजीबचा प्रतिकार अजूनही शाबूत होता. मराठ्यांनी आपल्या सेनेची वाताहत केलेली पाहून अब्दालीने आपली राखीव सेनेचा पत्ता काढला. त्याने १५००० कसलेले योद्धे त्यांच्या मागे बंदूकधारी घोडदळ व उंटावर लादलेल्या छोट्या तोफा बाहेर काढले व चाल केली. या उंटावर लादलेल्या छोट्या तोफा पानिपतच्या युद्धात निर्णायक ठरल्या, या तोफा घोडदळाविरुद्ध अतिशय परिणामकारक ठरल्या तसेच मराठ्यांचे घोडदळ अफगाणी बंदुकधाऱ्यांपुढे टिकाव धरू शकले नाहीत. राखीव फौज परिणाम कारक होत आहे हे पाहून त्याने अजून राखीव फौज पाठवली. जखमी सैनिकांनापण त्याने लढायला सांगितले. उरली सुरली १००००ची राखीव फौजही त्याने नजीबच्या मदतीस पाठवली. याच वेळेस दमलेल्या मराठे सैनिकांना ताज्या दमाच्या सैनिकांचा सामना करायला लागला व मराठे मागे हटू लागले. याच वेळेस मागून पण तोफांना आपल्या फौजांना संरक्षण देता आले नाही. समोरून येणाऱ्याअ उंटांवरील तोफांसारखा मराठी तोफखाना लवचीक नव्हता व युद्धाचे पारडे फिरले.

अंतर्गत उठाव
कुंजपुरामध्ये मराठ्यांनी काही अफगाण सैनिकांना बंदी बनवले होते व युद्धाच्या परमोच्च बिंदूवर त्यांनी अंतर्गत उठाव केला व मराठ्यांच्या कमानीतच युद्ध चालू झाले. यामुळे मराठ्यांच्या सेनेला वाटले की अफगाण्यानी पाठीमागूनही हल्ला चढवला आहे व मराठ्यांच्या गोटात गोंधळाचे वातावरण झाले.

भाऊंना आपली कमान विस्कळीत झाल्याचे लक्षात आले व याच वेळेस ताज्या दमाचे राखीव सैनिक पुढे न आणण्यात भाऊंची चूक झाली व हत्तीवरून उतरले व स्वता: पुढे राहून प्रेरीत करणार होते. परंतु मराठ्यांना भाऊ आपल्या हत्तीवर दिसले नाहीत व भाऊ पडले असे मरठयांना वाटले व संपूर्ण मराठे सैनिकांनी एकच हाय खाल्ली. विश्वासराव दरम्यान गोळी लागून ठार झाले होते व सर्वत्र गोंधळाचे वातवरण झाले आपला पराभव झाला असे समजून मराठ्यांनी पळ काढला. अब्दालीने रणभूमीवर ताबा मिळवला. मराठे युद्ध हरले. पानिपतच्या युद्धात मोठा नरसंहार झाला . अनेक मोठे सरदार या युद्धात मारले गेले. विश्वासरावांना गोळी लागल्यावर सदशिवभाऊ पेशवा धुमश्चक्रीमध्ये नाहीशे झाले . त्यांच्यासोबत पुढे काय झाले याचे कोणालाच काही माहित नाही. सदाशिवभाऊ पेशवा यांचा एक हमशकल अर्थात तोतया भाऊसाहेब पेशवा पानिपतनंतर पुण्यात आला , त्याने केलेले तोतयाचे बंड Archived 2020-12-15 at the Wayback Machine. प्रसिद्ध आहे .

कत्तल
मराठ्यांच्या मुख्य सेनेने जरी पळ काढायला सुरूवत केली तरी अनेक मराठ्यांच्या तुकड्यांनी अंधार पडेपर्यंत प्रतिकार करत आपल्या तुकड्या शाबूत ठेवल्या व अंधारामध्ये सावधपणे पलायन केले.

पळणाऱ्या मराठी सेनेवर व बुणग्यांवरती अफगाणी भालदार व घोडदळ अक्षरशः तुटून पडले. जो सैनिक, जो नागरिक दिसेल त्याला गाठून ठार मारले गेले. सर्वाधिक हाल स्त्रियांचे झाले. अनेकांनी पानिपतच्या विहिरीत जीव देऊन मानाचा मार्ग पत्करला. ज्या स्त्रिया पकडल्या गेल्या त्यांचे अफगाणी सेनेने अत्यंतिक हाल केले. नोंदीप्रमाणे अनेकांना दासी म्हणून घेउन जाण्यात आले. भाऊंनी पार्वतीबाईंच्या रक्षकांना आदेश दिले होते की जर काही विपरीत घडले तर त्यांच्या पत्‍नीला म्रुत्युदान देण्यात यावे, परंतु पार्वतीबाई आपल्या जानोजी भिंताडे बारवेकर या रक्षकासोबत पुण्याला सुखरूप पोहोचल्या.

अफगाण्यांनी दुसऱ्या दिवशीपण (जानेवारी १५ला) कत्तल चालू ठेवली. सैनिकांची व बुणग्यांची मुंडकी विजय महोत्सव म्हणून मिरवण्यात आली. अनेक मराठ्यांच्या तुकड्यांना युद्धबंदी बनवण्यात आले. ज्यांनी ज्यांनी प्रतिकार केला त्यांना अत्यंत हालहाल करून मारण्यात आले. इब्राहिमखान गारदीने प्रचंड प्रतिकार केला म्हणून त्याचे अतिशय खासप्रकारे हाल केले व क्रूरपणे मारण्यात आले. युद्धात मराठ्यांचे ३५००० जण मारले गेले होते. तर त्यानंतरच्या कत्तलीत साधारणपणे १०००० जण मारले गेले असण्याची शक्यता आहे.

युद्धाचे परिणाम
मराठ्यांची दुर्दशा: पानिपतचे तिसरे युद्ध हे भारताच्या इतिहासात निर्णायक व दूरगामी परिणाम करणारे ठरले. इंग्रज इतिहासकार एल्फीस्टनच्या मते पानिपतमध्ये मराठ्यांचा जसा सर्वांगीण व पूर्ण पराभव झाला असा क्वचितच कोणाचा झाला असेल, त्यामुळे मराठ्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. या पराभवाच्या धक्क्यातून पेशवा व त्याचे मराठा राज्य हे कधीच सावरले गेले नाही. १४ जानेवारी १७६१ हा दिवस मराठ्यांच्या दृष्टीने महाप्रलयच ठरला. दुसरे दिवशी अनुपगीर गोसावी व काशीराज यांनी रणक्षेत्राला भेट दिली. तेव्हा त्यांना प्रेतांचे ३२ ढीग दिसून आले. त्यात २८ हजार प्रेते होती, दूरपर्यंत प्रेतांचे खच पडले होते. या लढाईत ९० हजार स्त्रियांना व मुलांना गुलाम बनविण्यात आले. भाऊसाहेब, विश्वासराव, इब्राहीमखान, यशवंतराव पवार, तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे ही मातब्बर मंडळी मारली गेली. मराठ्यांची कर्ती पिढीच या लढाईत नष्ट झाली. पानिपतमधून वाचलेले मराठे १५ दिवसांनी ग्वाल्हेरला पोहोचले. सुरजमल जाटने २० हजार नग्न मराठ्यांना घोंगड्या व प्रत्येकी २ रुपये दिले. इतकी दुर्दशा मराठ्यांची झाली होती. पानिपतमधील पराभवामुळे उत्तरेत मराठ्यांच्या तलवारीचा धाकही नष्ट झाला.

अब्दालीचा शेवटचा विजयः या लढाईत अब्दालीला मोठा विजय प्राप्त झाला असला तरी त्याला फार मोठा लाभ झाला असे म्हणता येणार नाही. उपासमारीने मरणाऱ्या मराठ्यांच्या छावणीत द्रव्याची लूट कोठून मिळणार? दिल्लीतही संपत्ती आधीच लुटली गेल्यामुळे तेथे जाऊनही अब्दालीच्या हाती फारसे काही लागले नाही. उजाड झालेल्या व भयानक उदासीनता पसरलेल्या उत्तरेत अधिक काळ राहण्यास अब्दालीच्या सैन्याने नकार दिला. अब्दालीला मात्र सधन पंजाब कायमस्वरूपी आपल्या ताब्यात असावा असे वाटत होते. त्यामुळे मायदेशी जातांना तो पंजाबमध्ये गेला असता त्याला शीखांचा प्रचंड प्रतिकार सहन करावा लागला. शीखांनी अब्दालीशी १७६७ पर्यंत संघर्ष करून पंजाब मुक्त केला. अब्दालीचे सर्व परिश्रम वाया गेले. १४ एप्रिल १७७२ मध्ये त्याचा मृत्यु झाला.

नानासाहेबांचा मृत्यु : पानिपतमध्ये भाऊ संकटात असल्याची खबर पेशव्यांना उशिरा समजली तरीही त्यांनी उत्तरेत जाण्याची तयारी केली. मार्गक्रमण करीत असता उत्तरेतील बातम्या येणेच बंद झाल्याने नानासाहेब चिंतातुर झाले. भेलसा येथे मुक्कामी असताना २४ जानेवारीस पानिपतच्या पराभवाची बातमी मिळाली. त्यांना मिळालेल्या सांकेतिक पत्रात दोन मोती गळाले, २७ मोहोरा गमावल्या, चांदी व तांब्याची नाणी किती गेली याची गणतीच नाही, असा निरोप होता. भाऊ, मुलगा व अनेक नातेवाईकांच्या मृत्युचा नानासाहेबांना मोठा धक्का बसला, त्यांची मनःशांती नष्ट झाली. दिल्लीत न जाता त्यांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. पानिपतवर कुचराई केल्याबद्दल पेशव्यांनी शिंदे, होळकर, पवार यांच्या महालांची जप्ती केली पण ती काही काळापुरतीच! दिवसेंदिवस नानासाहेब भ्रमिष्ठ होऊन तब्येत खालावत गेली. त्यातच २३ जून १७६१ रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि मराठेशाहीला आणखी एक धक्का बसला.

मोगलांची दुर्दशा: पानिपतच्या विजयानंतर अब्दालीने दिल्लीचा ताबा घेतला. मोगल बादशहा शहाआलम हा दिल्लीतून पळून गेला होता व त्याने अलाहाबादमध्ये आश्रय घेतला होता. रक्षणकर्त्या मराठ्यांचा नाश झाल्याने मोगल सत्तेला जबरदस्त धक्का बसला. अब्दाली मायदेशी निघून गेल्यानंतर दिल्लीची सत्ता नजीबखानाने मिळवली. मोगल साम्राज्य माधवरावाच्या काळात पुन्हा सत्तेवर आले असले तरी केवळ ते नाममात्रच होते.

इंग्रजांचा वाढता प्रभाव: नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत मराठे संपूर्ण हिंदूस्थानात अंमल बसवीत असतांना मोगल साम्राज्याती सधन अशा बंगाल सुभ्यात इंग्रज आपल्या बुद्धीने व हिंमतीने राज्यसाधना करीत होते. पानिपतच्या लढाईमुळे मोगली राज्यासाठी भांडणाऱ्या मराठे व मुसलमान सत्ता दुर्बळ झाल्या व त्याचा फायदा नवी उदय पावणाऱ्य इंग्रजी सत्तेला मिळाला. मराठ्यांच्या पराभवामुळे उत्तर हिंदूस्थानात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्याचे कार्य इंग्रजी सत्तेने केले.

शीखांची सत्ता स्थापना: पानिपतच्या लढाईपूर्वी पंजाबमध्ये मोगल, मराठे, अब्दाली व शीख यांच्यात प्रखर सत्तास्पर्धा सुरू होती. पंजाबचे मूळ मालक शीख असूनही पंजाब त्यांच्या मालकीचा होऊ शकत नव्हता. कधी मोगलांच्या, कधी अब्दालीच्या तर कधी मराठ्यांच्या ताब्यात जात होता. सरहद्दीवरील प्रदेश असल्यामुळे सतत परक्या आक्रमणाचा धोका असल्याने शीखांना त्यांच्या अत्याचारांना कायम तोंड द्यावे लागत होते. पानिपत युद्धामुळे ही परिस्थिती बदलली. मराठ्यांचा पराभव झाला व अब्दालीही अफगाणमध्ये निघून गेला त्यामुळे पंजाबमध्ये शीखांची सत्ता स्थापन होऊ शकली.

हैदरअलीचा उदयः पानिपतच्या पराभवामूळे कर्नाटकातून मराठ्यांचा पाया उखडला गेला. मराठ्यांनी कर्नाटकचा प्रदेश पूर्णपणे जिंकला होता. पानिपतच्या पराभवामुळे पुढे काही काळ त्यांना कर्नाटककडे लक्ष देण्यास सवड मिळाली नाही. याचा फायदा घेऊन म्हैसुरच्या हिंदू राजाची सत्ता नष्ट करून महत्त्वाकांक्षी व धाडसी हैदरअलीने आपली सत्ता स्थापन केली. हैदरअलीच्या उदयामुळे मराठ्यांच्या शत्रूंमध्ये आणखी एका शत्रूची वाढ झाली कारण पुढील काळात हैदरअलीने हयातभर व त्याच्यानंतर त्याच्या मुलाने टिपू सुलतानने मराठ्यांना कायम त्रास दिला. पानिपतचे युद्ध झाले नसते किंवा या युद्धात मराठ्यांचा विजय झाला असता तर मराठ्यांनी हैदरला डोके वर काढून दिले नसते हे सुद्धा तितकेच खरे आहे.

माधवराव पेशव्यांचा उदयः नानासाहेबांना विश्वासराव, माधवराव व नारायणराव ही तीन मुले होती. परंपरेनुसार नानासाहेबांनंतर पेशवेपदावर त्यांचा मोठा मुलगा विश्वासरावचा अधिकार होता. पानिपतच्या संग्रामात लढताना विश्वासराव ठार झाला व लवकरच नानासाहेबांचाही मृत्यु झाला. त्यामुळे दरबारात नानासाहेबांच्या दुसऱ्या मुलाला म्हणजे माधवरावला पेशवेपद देण्याचा निर्णय घेतला गेला आणि माधवरावाने आपल्या कर्तबगारीच्या जोरावर अत्यंत कमी काळात पानिपतच्या पराभवाचा कलंक पुसून टाकला.

उभयपक्षी चुका
मराठ्यांच्या चुका
युद्धव्यवस्थापन
अनेक इतिहासकारांनी केलेल्या अभ्यासानुसार मराठ्यांनी केलेली युद्धाची तयारी फारच तोकडी होती. बखरीतील वर्णनानुसार महाराष्ट्रातून ते उत्तर भारतात पोहचेपर्यंत अनंत अडचणींना तोंड देत सेना पोहोचली. पेशव्यांना सुरुवातीपासून रसदेचा तुटवडा जाणवत होता. रसद पुरवठ्याचे काहीच नियोजन नव्हते.

धार्मिक कारण
पेशव्यांची धार्मिक वृती या युद्धात अतिमारक ठरली. पुण्यातील राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून यात्रेकरूंना फौजेबरोबर मोहिमेत सामील करण्यात आले. एकास एक असे होत त्यांची संख्या लाखापेक्षाही जास्त झाली. सैन्याच्या मोहिमेच्या संरक्षणात आपल्याला उत्तर भारतातील देवस्थाने (तीर्थस्थाने) पहायला मिळतील या भाबड्या कल्पनेमुळे सर्वजण आले होते. तसेच गेली ५० वर्षे मराठे जवळपास अपराजितच होते. पहिल्या मोहिमांमध्ये अनेकांनी विनासायास उत्तर भारत यात्रा पूर्ण केली होती व यावेळेस तसेच घडेल असे वाटले. कदाचित कुणालाच मोहिमेचे गांभीर्य कळाले नाही. या यात्रेकरूंमध्ये वृद्ध-बायका मुले यांचीच संख्या जास्त होती ज्यांचा प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेस काहीच उपयोग झाला नाही. उलट दोन गोष्टी अत्यंत नुकसानकारक ठरल्या – पहिली म्हणजे मिळालेल्या रसदेमधील मोठा हिस्सा या बुणग्यांना जात होता, त्याचा अतिप्रचंड ताण सेनेवर पडला. युद्धाअगोदर काही आठवडे नोंदीनुसार माणसांना खायला नाही म्हणून घोडे हत्ती यांचा चारा बंद करण्यात आला त्याचा परिणाम प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेस दिसला. दुसरी गोष्ट म्हणजे बुणग्यांच्या मोठ्या संख्येमुळे मराठ्यांच्या आक्रमणाच्या अनेक योजना कागदावरच राहिल्या. मराठ्यांना लढाईच्या वेळेस बुगण्यांच्या संरक्षणासाठी कित्येक सैनिकांच्या तुकड्या खर्ची पडल्या तसेच बुणग्यांना घेऊन लढाईचा हा मार्ग शक्य नाही म्हणून अनेक उपायकारक आक्रमणाच्या in a new tab) योजना[permanent dead link] बारगळल्या. थोरल्या बाजीरावाच्या काळापासून मराठ्यांची सेना तुफानी वेगासाठी प्रसिद्ध होती तो वेग, चपळता व धडाडी कुठेच दिसली नाही.

राजकारणात
मराठ्यांचे पराभवाचे सर्वात महत्त्वाचे कारण खरेतर त्यांना इतर राज्यकर्त्यांकडून मदत मिळवण्यात आलेले अपयश हे होय. यात खरेतर त्याआगोदरचा ५० – ६० वर्षाचा इतिहास कारणीभूत होता. मराठ्यांनी भारतात सर्वत्र सद्दी चालवली होती. यामुळे सर्वत्र मराठ्यांबद्दल बरीचशी दहशत उत्तर भारतातील राजकर्त्यामध्ये होती. मराठ्यांनी मांडलिक राज्याकडून मोठ्या प्रमाणावर कर वसूल केल्यामुळे अनेक राज्यामध्ये नाराजी होती तसेच अनेकांना दुखावले होते. त्यामुळे ऐनवेळेस कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. परकीय सत्तेविरुद्ध पुन्हा एकदा एकत्र विरोध करण्याचे त्यांचे आवाहन वाया गेले. बहुतेकांच्या मते मराठ्यांनीच अब्दालीला चुचकारले आहे तेच त्याचे काय ते बघतील असा त्या वेळेसच्या राजकारण्यांचा सुर होता. याउलट अब्दालीने मराठ्यांना राजकारणातही in a new tab) मराठ्यांना[permanent dead link] कुठेही मदत मिळणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली. त्याने व त्याच्या मित्र पक्षांनी याबाबतीत मराठ्यांची पूर्णपणे नाकेबंदी केली होती. मराठ्यांना एकटेच लढावे लागले व त्याचा प्रचंड तोटा त्यांना झाला[३].

दुराण्यांच्या चुका
मराठ्यांप्रमाणे अब्दालीनेही अनेक चुका केल्या. अब्दालीचा मराठी सेनेच्या सामर्थ्याचा अंदाज चुकला होता. त्याचा तोफखाना मराठ्यांच्या तोफखान्यापुढे अगदीच कुचकामी ठरला. त्याची त्याला मोठी किंमत मोजावी लागली. त्याचीदेखील ३५-४० हजार इतकी सेना मारली गेली. युद्धानंतर अब्दालीकडे अजून प्रतिकार करू शकेल असे सैन्यच उरले नाही. म्हणूनच अब्दालीने मराठे अजून फौज एकत्र करून हल्ला करणार आहेत या बातमीवर आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला.

पानिपत युद्धस्मारक

साहित्यात व दैनदिन जीवनात
पानिपत याच नावाची विश्वास पाटील यांची कादंबरी प्रसिद्ध आहे. यात अब्दालीच्या सुरुवातीच्या आक्रमणांपासून ते युद्धाच्या शेवटापर्यंत मराठ्यांच्या मोहिमेचे वर्णन आहे. ह्या कादंबरीत अनेक घडामोडींचे नाट्यमय वर्णन आहे.
या युद्धाचा प्रभाव दैनंदिन जीवनात पण दिसून येतो. हे युद्ध म्हणजे महाराष्ट्रातील जनमानसात अपयशाचे प्रतीक आहे, अनेक म्हणी यामुळे मराठीत रूढ झाल्या आहेत. उदा: ´पानिपत झाले´(खूप नुकसान झाले),हे युद्ध संक्रातीच्या दिवशी झाल्यामुळे' संक्रांत कोसळली´ (खूप मोठे संकट आले) , ´विश्वास गेला पानिपतात अश्या अनेक म्हणी तयार झाल्या.[४].

जानेवारी २००८ मध्ये पुणे येथे पानिपतच्या रणसंग्रामात मराठे योद्ध्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही राजकीय पक्षांनी संक्रातीच्या दिवशी कार्यक्रम आयोजित केले होते. काहींच्या मते युद्धात मराठे हरले तरी त्यांनी दिलेल्या बलिदानाचे मोल कमी होत नाही त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे.

पानिपत : १७६१ (ग्रंथ, लेखक : त्र्यंबक शंकर शेजवलकर). आशुतोष गोवारीकर याचा ‘पानिपत हा चित्रपट याच पुस्तकावर आधारलेला होता.

. . . . . . . .

पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव या कारणांमुळे झाला होता

रोहन टिल्लू
‘मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम’, असं पानिपतच्या युद्धाचं वर्णन केलं जातं. दोन मोती, सत्तावीस मोहरा आणि असंख्य चिल्लरखुर्दा गमावलेल्या या युद्धाने मराठा साम्राज्याचा कणा खिळखिळा केला. पण हे युद्ध मराठा सैन्य नेमकं का हरलं?
याची कारणं शोधणं महत्त्वाचं आहे. आजही या प्रदेशात गेलं, की पानिपतमधले स्थानिकही या युद्धाबद्दल माहिती देतात.
या युद्धात मराठा सैन्य शौर्यानं लढलं, पण अखेर त्यांचा पराभव झाला. या पराभवामागची नेमकी कारणं काय, पाहू या!

निसर्ग शत्रू ठरला!
कुंजपुऱ्यावरून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या मराठा सैन्याने नोव्हेंबर 1760मध्ये पानिपतमध्ये तळ ठोकला. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे तीन महिने उत्तरेत कडाक्याच्या थंडीचे असतात.

इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे सांगतात, “मराठा सैन्य दक्षिणेतून मोहिमेला निघालं, तेव्हा 1760चा जानेवारी महिना संपत आला असल्याने गरम कपडे वगैरे काहीच घेण्यात आले नव्हते. त्यामुळे मराठे उत्तरेच्या थंडीत गारठून गेले होते.”
मोहिमेच्या शेवटच्या दिवसांपर्यंत पानिपतच्या आसपासच्या गावांमधली झाडंही शिल्लक राहिली नव्हती. त्यामुळे सरपणाला लाकडं मिळणं मराठा फौजेला कठीण झालं होतं. परिणामी मराठा सैन्याचे हाल होत होते, असं अनेक ऐतिहासिक संदर्भ ग्रंथांमध्ये नमूद केलं आहे.

“त्या उलट अफगाण सैनिकांचा पेहराव मात्र थंडीचा सामना करण्यासाठी योग्य होता. अफगाण सैनिक अंगावर चामड्याच्या कोटासारखा पोशाख करायचे. थंडीपासून रक्षण करण्यासाठी हा पोशाख योग्य होता,” असं बलकवडे यांनी नमूद केलं.

सूर्य माथ्यावर आला आणि…
या युद्धात सूर्याची दिशा निर्णायक होती, असं अनेक इतिहासकार मानतात. अयोद्धेचा नवाब शुजा उद्दौला याच्या छावणीत असलेल्या काशीराज पंडितानंही याबाबत लिहून ठेवलं आहे.

मराठे पानिपतावरून दिल्लीकडे म्हणजेच दक्षिण दिशेला चालले होते. सकाळी नऊपासून सुरू झालेल्या या युद्धात दुपारनंतर सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला आणि मराठा सैन्याच्या डोळ्यांवर, डोक्यावर तिरीप येऊ लागली. त्यामुळे मराठे हवालदिल झाले.
“मराठा सैन्याला पाण्याची भ्रांत होती, त्यातच सूर्य माथ्यावर आल्यानं ते आणखीनच हैराण झाले,” बलकवडे यांनी या युद्धातली सूर्याची निर्णायक भूमिका स्पष्ट केली.

बखरकारांनी याचं वर्णन ‘भानामती’ असं केलं आहे. मराठा सैनिक भानामती झाल्यासारखे पाण्यासाठी कासावीस झाले. त्यांच्या डोळ्यांसमोर अंधारी आली, असं वर्णन भाऊसाहेबांच्या बखरीतही केलं आहे.

व्यूहरचना आणि प्रत्यक्ष युद्ध
पानिपत आणि आसपासचा मैदानी, सपाट मुलूख लक्षात घेता इथे मराठ्यांचा गनिमी कावा चालणार नाही, हे ओळखून मराठ्यांनी गोलाची लढाई करण्याचं धोरण अवलंबलं होतं.
गोलाची लढाई म्हणजे तोफखाना पुढे ठेवून त्याच्या मागे घोडदळ आणि पायदळ यांचा गोल करून पुढे सरकत जाणं. पांडुरंग बलकवडे यांच्यानुसार, अशा प्रकारच्या लढाईची सवय मराठा फौजेला नव्हती.

युद्धाला तोंड फुटल्यावर इब्राहिमखान गारदी याच्या तोफखान्याने अब्दालीच्या मधल्या फळीचं कंबरडं मोडलं होतं. मात्र त्याच वेळी विठ्ठलपंत विंचुरकरांच्या तुकडीने गोल मोडला आणि रोहिल्यांच्या दिशेने धाव घेतली.

“तोफखान्यासमोर आपलंच सैन्य आलेलं बघून इब्राहिमखानाने तोफखान्याचा मारा बंद केला. याचा फायदा अब्दालीने घेतला आणि उंटांवरच्या आपल्या हलक्या तोफा पुढे करत मराठ्यांना भाजून काढलं,” बलकवडे यांनी सांगितलं.
अंबारी रिकामी दिसली आणि…
भारतातल्या राजांची युद्धादरम्यानची सवय म्हणजे, सगळ्यांत उंच हत्तीवरच्या अंबारीत बसून सैन्याचं नेतृत्त्व करायचं! या सवयीबद्दल नादिरशहा यानंही टीका केली होती.

‘The Army of Indian Mughals’ या पुस्तकात W. आयर्विन यांनी नादिरशहाच्या पत्राचा दाखला देत म्हटलं आहे, “हिंदुस्तानच्या राजांचा हा अजब परिपाठ आहे. युद्धात ते हत्तीवरून येतात आणि शत्रूचं निशाण बनतात.”

“विश्वासरावांना गोळी लागली आणि ते धारातीर्थी पडल्यावर सदाशिवराव भाऊ अंबारीतून उतरले आणि त्यांनी घोड्यावर मांड ठोकली. अंबारी रिकामी दिसल्याने भाऊही पडल्याची बातमी मराठा सैन्यात पसरली आणि सैन्याने कच खाल्ली,” असं बलकवडे यांनी सांगितलं.

राखीव सैन्य आणि भाडोत्री सैनिक
याबाबत रूईया महाविद्यालयातल्या इतिहासाच्या प्राध्यापक मोहसीना मुकादम यांनी अब्दालीच्या राखीव सैन्यावर प्रकाश टाकला. त्या सांगतात, “मराठ्यांना दख्खनकडे जायचं असल्यानं त्यांचं सगळं सैन्य एकत्र निघालं होतं. अब्दालीने मात्र 10 हजारांचं राखीव दल ठेवलं होतं. मराठ्यांचं पारडं जड झाल्यावर त्याने अचानक हे दहा हजार सैनिक रणात उतरवले. दमलेल्या मराठ्यांना या ताज्या दमाच्या सैनिकांचा मुकाबला करणं कठीण झालं.”

“तसंच अब्दालीच्या फौजेतले भाडोत्री सैनिक पळून जायला लागल्यावर त्यांना मारून पुन्हा युद्धभूमीकडे वळवण्याचं काम केलं जात होतं. ते भाडोत्री सैनिक असल्याने त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं सोपं होतं.”

याउलट मराठा सैन्यात काही सरदारांनीच युद्धातून काढता पाय घेतला आणि त्यांच्याबरोबर अनेक सैनिक पळायला लागल्याचं निरीक्षण मुकादम नोंदवतात.
राजपूत, जाट आणि इतरांची बघ्याची भूमिका
हिंदुपदपातशाहीच्या रक्षणासाठी पेशव्यांनी ही मोहीम आखल्याचं ऐतिहासिक दाखल्यांमधून स्पष्ट होतं. पण त्यांना इतर राजपूत राजे, सुरजमल जाट, अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला यांची साथ लाभली नाही, हादेखील इतिहास आहे.

याबाबत बलकवडे म्हणतात की, “मराठ्यांच्या उदयाआधी मुघल साम्राज्याच्या रक्षणाची जबाबदारी राजपूत राजांवर होती. 1734च्या अहमदिया करारानंतर ती मराठ्यांकडे आली. त्यानुसार पेशव्यांना मुघल साम्राज्यात चौथाई आणि सरदेशमुखीचा हक्क मिळाला.”

“हीच बाब राजपूतांना डाचत होती. अब्दालीकडून मराठ्यांच्या वर्चस्वाला शह बसला, तर त्यांनाही ते हवंच होतं. त्यामुळेच जोधपूरचा बीजेसिंग आणि जयपूरचा माधोसिंग हे दोघंही तटस्थ राहिले,” बलकवडे यांनी पुष्टी जोडली.

“सुरजमल जाटाने आग्रा आणि अजमेर यांचा ताबा मागितला. अब्दालीच्या पाडावानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असं मराठ्यांनी सांगितल्यावर जाटही मराठ्यांची साथ सोडून गेला,” बलकवडे म्हणाले.

शुजा उद्दौलाला दिल्लीची वजिरी हवी होती. त्याबाबतही काहीच निर्णय झाला नाही, म्हणून तोदेखील आपल्या सैन्यासह अब्दालीला सामील झाला. शुजा अब्दालीकडे जाणं, हे युद्धात निर्णायक ठरलं, असं मोहसिना मुकादम सांगतात.

बाजारबुणगे आणि यात्रेकरू
अब्दालीच्या फौजा सड्या फौजा होत्या. त्याउलट मराठा फौजेबरोबर यात्रेच्या निमित्ताने हजारो यात्रेकरू, व्यापारी आणि कुटुंबकबिला असे सुमारे 30-40 हजार बिनलढाऊ लोक होते.
या लोकांच्या खाण्यापिण्याची सोय करताना मराठा सैन्याचं कंबरडं मोडलं होतं. तसंच खजिन्याची कमतरताही भेडसावत होती, यावर मोहसिना मुकादम प्रकाश टाकतात.
मराठी फौजेचा वेग आणि या बाजारबुणग्यांचा वेग यांच्यात प्रचंड तफावत असल्याने फौजेला या लोकांच्या वेगाशी बरोबरी करत आगेकूच करावी लागत होती. तसंच प्रत्यक्ष युद्धाच्या आधीही तीर्थयात्रेसारख्या गोष्टींमुळे फौजेला वेगवान हालचाली करणं अशक्य झालं, असं बलकवडे यांनी स्पष्ट केलं.
कारणं काहीही असली, तरी पानिपतच्या युद्धातल्या पराभवामुळे मराठा साम्राज्याचं कंबरडं मोडलं. मराठ्यांचा उत्तरेकडचा दबदबा अचानक नाहीसा झाला. मोठ्या संख्येने मराठा सैनिक पानिपतावर मारले गेल्यानं पेशव्यांची सामरी ताकद कमकुवत झाली.

पानिपतच्या पराभवानंतर उत्तरेच्या राजकारणात मराठ्यांना दबदबा निर्माण करण्यासाठी 12 वर्षं वाट बघावी लागली. महादजी शिंदे यांनी 1773-74 मध्ये उत्तरेत पुन्हा मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं. पण पानिपतच्या या युद्धाने मराठा साम्राज्याचीच नाही, तर भारताच्या इतिहासाचीही दिशा बदलली.



टाहो – मराठी भाषेवर आक्रमण

पद्मभूषण सई परांजपे या कलाक्षेत्रामध्ये राष्ट्रीय पातळीवर वावरणाऱ्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत. रँगलर परांजपे यांची नात म्हणून त्या प्रसिद्ध आहेत आणि रँगलर परांजपे हे ऑस्ट्रेलियात भारताचे राजदूत असतांना सई परांजपे यांचे बालपण त्या देशातल्या परकीय वातावरणात गेले. त्यांनी एकापेक्षा एक वरचढ असे उत्कृष्ट हिंदी चित्रपट दिले आहेत, पण त्यांना आपल्या मराठी भाषेविषयी किती प्रेम, जिव्हाळा आणि काळजी आहे हे त्यांच्या या लेखात दिसून येते.

मी हा लेख फेसबुक, वॉट्सॅपसारख्या सामाजिक माध्यमामधून घेतला आहे. श्रीमती सई परांजपे यांचे मनःपूर्वक आभार. हा लेख या स्थळावर संग्रहित करण्यासाठी त्यांनी अनुमति द्यावी अशी नम्र विनंति. दि.१०-०१-२०२४

टाहो

  • सई परांजपे

मराठी भाषेवर चालून आलेली कमअस्सल लाट समाजाच्या सर्व स्तरांवर एकाच आवेगाने कोसळली आहे, हे मान्य केलं पाहिजे. खरं तर मराठी माणूस त्याच्या लढाऊ वृत्तीसाठी ओळखला जातो. मग या भाषा आक्रमणाच्या बाबतीत तो नांगी टाकून स्वस्थ का बसून राहतो? या गोष्टीचा बोध होत नाही. इंग्रजीची झिलई चढली की आपली भाषा आणि पर्यायाने आपण अधिक टेचदार होतो का? कुण्या समाजशास्त्रज्ञाने अथवा भाषातज्ज्ञाने या गौडबंगालाचा छडा लावावा आणि आपल्या न्यूनगंडावर काही इलाज करता येतो का, हे अवश्य पाहावं..

‘आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी’ कवी यशवंत यांची केवढी हृदयस्पर्शी ही कविता. पण आता ही गोड हाक कानी येत नाही. कारण सुमारे दहा-पंधरा वर्षांपूर्वी पाहता पाहता सगळ्या आया गायब झाल्या. रातोरात घराघरांमधून ‘मम्या’ अवतरल्या. त्यांनी अवघी भूमी व्यापली. ‘का गं?’ मी आमच्या गंगूबाईंना विचारलं, ‘मम्मी कशी काय झालीस? आई म्हणवून घ्यायला लाज वाटते?’ गंगूबाईंनी चोख उत्तर दिलं, ‘अवो साळंतल्या, शेजारपाजारच्या समद्या पोरी ‘मम्मी’ म्हणूनच हाक मारतात की. प्रियांकाबी हटून बसली बगा. काय करणार!’ खरं तर या मम्मीपदामुळे गुदगुल्या होत असणार या तमाम माऊली वर्गाला.

गोरा साहेब गेल्यानंतर, आज इतक्या वर्षांनी त्याच्या भाषेनं मराठी भाषेवर घाला घातला आहे. चोरपावलांनी इंग्रजी शब्द आपल्या भाषेत घुसले. या आक्रमणामुळे भल्या भल्या मराठी शब्दांचं उच्चाटण झालं. साहेबाची भाषा धड न का बोलता येईना, पण त्याच्या शब्दांची उधळण करीत मराठीतून तारे तोडीत राहिलं, की आपला भाव वधारतो अशी समजूत असावी. अशा किती शब्दांनी आपल्या बोलीमध्ये चंचूप्रवेश करून मूळ मराठी शब्द कालबाह्य करून टाकले आहेत. वानगीदाखल सांगायचं म्हटलं तर रंग, खोली, स्वयंपाकघर, मोरी, दिवा, पंखा, रस्ता, रहदारी, गाडी, आगगाडी, इमारत, रजा, सण, इ. इ. आपले रोजचे चलनी शब्द आता वळचणीत दडून बसले आहेत. कलर, रूम, किचन, बाथरूम, लाइट, फॅन, रोड, ट्रॅफिक, कार, ट्रेन, बिल्डिंग, लीव्ह, फेस्टिव्हल या इंग्रजी प्रतिशब्दांनी त्यांचं उच्चाटण केलं आहे. हे घुसखोर शब्द लवकरच टेबल, स्टेशन, मशीन, फ्लॅट या मराठीत सामावून गेलेल्या शब्दांच्या पंगतीला जाऊन बसतील, यात शंका नाही. पण आपल्या साध्या सुटसुटीत शब्दांना का म्हणून रजा द्यावी? ‘लेफ्ट-राइट’च्या कवायतीत बिचारे डावे-उजवे दिशा हरवून बसले आहेत. रिक्षावाल्याला ‘डावीकडे वळा’ सांगितलं, की तो लगेच ‘म्हणजे लेफ्ट ना?’ अशी खात्री करून घेतो. मायबोलीला ही जी लागण झाली आहे, तिचा प्रत्यय रोजच्या जीवनात पदोपदी येतो. पावलोपावली साक्ष पटते. रस्त्यावरून जाताना दुतर्फा दुकानं न्याहाळली तर औषधाला एकही पाटी शुद्ध मराठीमध्ये दिसणार नाही. पैजेवर सांगते. अमुक टेलर, तमुक शू मार्ट, हे फ्रुट स्टोर, ते टॉय शॉप, व्हरायटी आर्केड, स्टेशनरी, ट्रॅव्हल कंपनी, मिनी मार्केट अशीच साहेबी बिरुदं मिरवणारी दुकानं आढळतात. चविष्ट फराळ म्हणायला ओशाळवाणं वाटतं. टेस्टी डिशेश (डिशेसचा अपभ्रंश) घ्यायला रिफ्रेशमेंट हाऊसमध्ये गेलं की कसं फुल सॅटिसफॅक्शन वाटतं. दादरला पूर्वी एक दुकान होतं. लाडूसम्राट. किती गोजिरं नाव! धेडगुजरी बिरुदांच्या दाटीमध्ये ही साधी पाटी कशी शोभून दिसे. अलीकडे नाही दिसली. इंग्रजी नावाच्या सोसाचा एक अतिरेकी नमुना सांगते. ‘२ँस्र्’ या शब्दावरून ‘२ँस्र्स्र्ी’ म्हणजे छोटेखानी गोदाम हा शब्द प्रचलित आहे. त्याचं स्पेलिंग वेगळं असलं तरी उच्चार ‘शॉप’ असाच आहे, ‘शॉप्पी’ नव्हे. पण बिचाऱ्या हौशी दुकानदारांना हे नाही ठाऊक. त्यांनी जर शब्दकोशात डोकावण्याची तसदी घेतली असती, तर ‘शॉप्पी’चे हास्यास्पद फलक झळकले नसते.

मराठी भाषेवर चालून आलेली ही कमअस्सल लाट समाजाच्या सर्व स्तरांवर एकाच आवेगाने कोसळली आहे, हे मान्य केलं पाहिजे. ही लाट वर्ण, वर्ग, वय, सामाजिक वा आर्थिक दर्जा वा शिक्षण- कोणत्याच बाबतीत भेदभाव करीत नाही. ती खरी लोकशाही पाळते. जरा सुस्थितीमधल्या मंडळींना सगळं काही ‘कूल’ हवं असतं. त्यांना घडीघडी ‘चिल्’ व्हायचं असतं. ती मंडळी ‘जस्ट’ येतात आणि जातात. अशिक्षित वर्गदेखील हौसेहौसेने इंग्रजी शब्दसंपत्ती उधळतो. ‘काल शीक होतो, मिशेश म्हटल्या की काय मोटा प्राब्लेम नाही. टेन्सन घेऊ नका’ अशी भाषा सर्रास ऐकू येते. आमच्याकडे सरूबाई कामाला होत्या. त्यांना मधुमेह असल्यामुळे सतत त्या ‘युवरीन’ (यूरीन) तपासायच्या गोष्टी करायच्या. हल्लीची तरुण मंडळी एकमेकांना ‘डय़ूड’ किंवा ‘ब्रो’ म्हणण्यात धन्यता मानतात. दोन-चार जण असतील तर ‘गाइज्’. गोऱ्यांच्या संभाषणशैलीचं अनुकरण करायला हरकत नाही, पण त्यांच्या शिस्तीचं काय? सुसंस्कृत पाश्चिमात्य पिढी आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याबद्दल दक्ष असते. गळ्यात गळे घालून तिघा-चौघांनी रस्ता अडवून चालणं, मोबाइलवर बोलत गाडी हाकणं, ऐन कोपऱ्यावर टोळक्याने ‘शाइनिंग करीत’ उभं राहणं, असले प्रकार सहसा प्रगत देशांमध्ये आढळून येणार नाहीत.

बहुसंख्य जाहिराती या तरुणांना उद्देशूनच योजलेल्या असतात. तेव्हा त्या तरुणाईच्या भाषेतून बोलल्या तर नवल नाही. पण मराठी (वा हिंदी) शब्द न वापरण्याची या जाहिरातवाल्यांनी शपथ घेतली आहे की काय, असा कधीकधी प्रश्न पडतो. ‘राहू यंग’ हे त्यांचं घोषवाक्य; अमुक क्रीम फेस क्लिअर करते; तमुक साबणाने स्किन सॉफ्ट आणि स्मूथ होते; या शांपूने केस सिल्की होतात, तर त्या ऑइंटमेंटने डोळ्याखालच्या ब्लॅक सर्कल्सना गुडबाय करता येते.. तर मंडळी, आता स्पीक!

करमणुकीच्या क्षेत्रात देखील आपल्या मातृभाषेबद्दल विलक्षण उदासीनता आहे. नाटकांची नावे पाहिली की, मराठी शब्द सगळे झिजून गेले की काय अशी शंका वाटते. ऑल द बेस्ट, फायनल ड्राफ्ट, लूज कंट्रोल, बॅलन्सिंग अ‍ॅक्ट, गेट वेल सून, प्लेझंट सरप्राइझ, ऑल लाइन क्लियर आणि अशी किती तरी. चित्रपटांची तीच गत आहे. पोस्टर बॉयज, शुगर, सॉल्ट आणि प्रेम, पोस्टर गर्ल, फॅमिली कट्टा, हंटर, चीटर, लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड, सुपर स्टार, बाइकर्स अड्डा, हे झाले काही नमुने. आकाशवाणी आणि प्रकाशवाणीवर तर सर्व मंडळी आपली खास गंगाजमनी भेसळ भाषाच बोलतात. निवेदक, वक्ते, नट, बातमीदार, तज्ज्ञ, स्पर्धक आणि पंच, झाडून सगळे जण. उदाहरणं देत बसत नाही (किती देणार?) पण आपल्या टी.व्ही. सेटचं बटण दाबलं तर प्रचीती येईल. मी चुकूनही मराठी कार्यक्रम पहात नाही. आपल्या भाषेच्या चिंधडय़ा उडताना नाही बघवत. मुलं म्हणतात, ‘‘काही तरीच तुझं. जमाना बदलतो आहे. भाषा बदलणारच.’’ कबूल, पण दुर्दैव असं की, मी नाही बदलले. माझ्या या आग्रही वृत्तीमुळे घरात मराठी वृत्तपत्रदेखील मी घेत नाही. ‘आजची यंग जनरेशन फ्रस्ट्रेटेड का?’, ‘दबावांच्या टेरर टॅक्टिक्स’, ‘तरुण जोडप्याचा सुइसाइड पॅक्ट’ असे मथळे; आणि लाइफ स्टाइल, हेल्थ इज वेल्थ, स्टार गॉसिप, हार्ट टु हार्ट, अशी सदरं पाहिली की वाटतं, सरळ इंग्रजी वृत्तपत्रच का घेऊ नये? ‘तुम्हाला आपल्या भाषेचं प्रेम नाही?’ मला विचारतात. प्रेम आहे म्हणून तर हा कठोर नियम मी लागू केला आहे. माझा स्वत:चा असा खासगी निषेध म्हणून मी इंग्रजी बिरुदं मिरवणारी नाटकं आणि सिनेमे पहात नाही. दृष्टीआड भ्रष्टी.

इतका वेळ मी इंग्रजी शब्दांच्या आगंतुकीवर आग पाखडून, आपले शब्द नाहीसे होत आहेत याबद्दल खेद व्यक्त केला; पण शब्दच काय- अवघी भाषाच लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आज आपल्या असंख्य लहान मुलांना मराठी नीट लिहिता- वाचता- बोलता येत नाही. ‘मम्मी, व्हॉट इज प्रतिबिंब?’ असं आमचा मिहिर विचारीत होता, अशी लाडाची तक्रार अलीकडेच कानी आली; पण त्याबद्दल खेद वाटण्याऐवजी मम्मीला खोल कुठे तरी अभिमानच वाटत होता. इंग्रजी येणं, हे आजच्या काळाची नितांत गरज आहे, याबद्दल दुमत नाही. सद्य:युगामधली ती प्रगतीची भाषा आहे, हे कुणीही मान्य करील; पण इंग्रजी अथवा मराठी, या दोन भाषांमधून एकीची निवड करा, असा प्रश्नच नाही आहे. इथे निवड नव्हे तर सांगड घालण्याबद्दलची ही किफायत आहे. आजच्या जमान्यात मुलांना तीन भाषा यायला हव्यात- मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि आंतरराष्ट्रीय भाषा- इंग्रजी. दुर्दैव असं की, या तिन्हीपैकी एकही भाषा उत्तम येते असं कुणी क्वचितच आठवतं. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनी विशेष दक्ष राहिलं पाहिजे. हे अशक्य नाही, हे मी स्वानुभवाने सांगते. सात ते अकरा वर्षांमधल्या माझ्या बालपणीचा काळ ऑस्ट्रेलियात गेला, कॅनबेरा शहरात. साहजिकच शाळा इंग्रजी होती आणि झाडून सगळ्या मित्रमैत्रिणी इंग्रजी बोलणाऱ्या, पण घरात मात्र कटाक्षाने शुद्ध मराठी बोलले जाई.

मी मराठी पुस्तकं वाचीत असे आणि दिवसाकाठी दोन-तीन पानं काहीबाही मराठीतून लिहिण्याची मला सक्ती असे. दुर्दैवाने मला मिळालेला हा वसा पुढे चालू ठेवण्यात मी अपयशी ठरले. माझ्या मुलीची मुलं मराठीमधून विचारलेल्या प्रश्नांना इंग्रजीतून उत्तरं देतात. सुरुवातीला मी अन्शुनीला माझ्याबरोबर मराठीतून बोलायची सक्ती करीत असे; पण मग पुढे मी येणार आहे हे कळताच, आता मराठी बोलावं लागणार म्हणून ती धास्तावते, असं विनीने मला सांगितलं. तेव्हा मी तो नाद सोडून दिला. एका व्यक्तिगत पराभवाची नोंद झाली.

उद्याच्या मराठी भाषादिनी, या भाषेवर मनापासून प्रेम करणाऱ्या दोन व्यक्तींची आवर्जून आठवण करावीशी वाटते.

सुमारे चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी मॅक्सीन (आडनाव आठवत नाही) नावाची तरुण अमेरिकन विद्यार्थिनी मराठी भाषा शिकण्यासाठी महाराष्ट्रात येऊन राहिली होती. पाहता पाहता ती उत्तम मराठी बोलू लागली. एवढंच नव्हे तर पुढे तिने फलटणला चक्क मराठी शाळा काढली. फलटणला एका पार्टीत ती मला भेटली. ती काठापदराचं लुगडं नेसली होती. ‘छान साडी आहे तुमची,’ मी तिला म्हटलं. मॅक्सीन हसून म्हणाली, ‘मळखाऊ आहे.’ तिचा हा शब्द मी आजतागायत विसरले नाही. दुसरा उल्लेख आहे माजी तुरुंगाधिकारी उद्धव कांबळे यांचा. बिकट परिस्थितीला तोंड देऊन, उत्तम प्रकारे आपलं शिक्षण पूर्ण करत कांबळे यांनी पुढे यूपीएससीची परीक्षा दिली. ही परीक्षा मराठीमधून देणारे ते पहिले विद्यार्थी. पुढे त्यांच्या क्षेत्रात एक अतिशय सक्षम अधिकारी म्हणून त्यांनी नाव कमावलं. मराठी भाषेवर त्यांचं निस्सीम प्रेम असून समर्पक सुंदर प्रतिशब्दांची त्यांनी एक सुंदर यादी बनवली आहे. माझ्या ‘आलबेल’ नाटकाच्या आणि पुढे ‘सुई’ या एड्सवरच्या लघुपटाच्या तुरुंगाबाबतच्या प्रवेशांसाठी त्यांची बहुमोल मदत झाली.

काही वर्षांपूर्वी मराठी भाषा तारण्यासाठी शिवसेनेनं झेंडा फडकावला होता. कुरकुरत का होईना, पण जनतेनं- आणि विशेष करून दुकानदारांनी तिची दखल घेतली; पण पुढे हा संग्राम मंदावला आणि परकीय पाहुणीचं- इंग्रजीचं फावलं. खरं तर, मराठी माणूस त्याच्या लढाऊ वृत्तीसाठी ओळखला जातो. मग या भाषा आक्रमणाच्या बाबतीत तो नांगी टाकून स्वस्थ का बसून राहतो? या गोष्टीचा बोध होत नाही. इंग्रजीची झिलई चढली की आपली भाषा आणि पर्यायाने आपण अधिक टेचदार होतो का? इमारतीला सदन, हवेली किंवा महाल म्हणण्याऐवजी ‘हाइट्स’ किंवा ‘टॉवर्स’ म्हटलं की तिची उंची वाढते का? कुण्या समाजशास्त्रज्ञाने अथवा भाषातज्ज्ञाने या गौडबंगालाचा छडा लावावा आणि आपल्या न्यूनगंडावर काही इलाज करता येतो का, हे अवश्य पाहावं. त्यासाठी जागतिक मराठी परिषदेचं अधिवेशन भरण्याची वाट पाहू नये.

लहानपणी केलेले एक अवलोकन मला छान आठवतं. सभोवतालची वडीलधारी मंडळी बदलत्या चालीरीती, पुसट होत चाललेले रीतिरिवाज आणि तरुण पिढीचे एकूण रंगढंग, यावर सतत तोंडसुख घेत असत. त्याचं मला फार वैषम्य वाटायचं. आपण मोठं झाल्यावर चुकूनसुद्धा असं काही करायचं नाही, असा मी ठाम निश्चय केला होता; पण काळ लोटला तसा तो निर्धार शिथिल झाला असावा. मीही आता जनरूढीच्या बदलत्या आलेखाबद्दल तक्रारीचा सूर आळवू लागले आहे, याची मला कल्पना आहे. तसंच तळमळीचे हे माझे चार शब्द म्हणजे निव्वळ अरण्यरुदन ठरणार आहे याचीही मला पूर्ण जाणीव आहे. पण काय करू? मामलाच तसा गंभीर आहे. प्रसंग बाका आहे. आपली मायबोली काळाच्या पडद्यामागे खेचली जात आहे आणि ‘कुणी मला वाचवा होऽ’ असा टाहो फोडते आहे; पण ही हाक कुणाला ऐकूच जात नाही, कारण तिची लेकरं बहिरी झाली आहेत. डेफ स्टोन डेफ!

सई परांजपे

(जुनी ढकलगाडी)

बोगद्यातून कामगारांची सुटका

उत्तराखंडामध्ये ऐन दिवाळीत एक मोठा अपघात झाला होता. तिथल्या एका डोंगराच्या पोटातून खोदल्या जात असलेल्या बोगद्यात हा अपघात झाला असल्यामुळे बाहेरून काहीच समजायला मार्ग नव्हता, या बोगद्याचा काही भाग आतल्या आत कोसळून तो दगडमातीने भरून गेला होता एवढेच बाहेरून समजत होते. पण आत गेलेले ४१ मजूर बाहेर येऊ शकत नव्हते. आतले ते कामगार सुरक्षित तरी आहेत की नाहीत, त्यांना काही दुखापत झाली आहे का यातले काहीच बाहेरच्या जगाला समजू शकत नव्हते.
पण या काळात सरकारी आणि खाजगी यंत्रणांनी या आपत्ती निवारणाच्या कामाला लगेच सुरुवात केली आणि जिथून जे साधन मिळेल ते आणून आधी त्या ढिगाऱ्याच्या आरपार एक भोक पाडले आणि त्यात एक लांबलडक पाइप आरपार बसवला. शरीराचे एंडोस्कोपिक परीक्षण करतात तशा प्रकारच्या कॅमेराने आत डोकावून पाहिले तेंव्हा समजले की आतले लोक जीव मुठीत धरून पण अजूनपर्यंत तग धरून बसले आहेत. हे समजल्यावर त्यांना धीर आला. मग त्याच पाइपामधून त्या कामगारांसाठी अन्न, पाणी आत ढकलले, टेलिफोनवरून बोलण्याची सोय करून आणि त्यांच्याशी बोलून त्यांना धीर दिला. ते बिचारे कामगार आतून बाहेर येण्यासाठी काहीच करू शकत नव्हते, पण बाहेर खूप लोक आपल्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत हे समजल्यावर त्यांना धीर आला.
त्या कामगारांपर्यंत पोचून त्यांना बाहेर काढण्यासाठी तीन प्रकारच्या उपायांचा विचार करण्यात आला. १.बोगद्यात आत शिरून त्या ढिगाऱ्यामधूनच मार्ग काढणे, २.डोंगराला बाहेरच्या बाजूने नवीन आडवे भोक पाडणे आणि ३. वरच्या बाजूने खणून उभे भोक पाडणे आणि त्यांच्यापर्यंत कसेही पोचणे. तीन्ही कामे कठीणच होती, त्यातले एक तरी यशस्वी होईल म्हणून तीन्हींसाठी आवश्यक अशा यंत्रसामुग्रीची जमवाजमव करण्यात आली. त्यात अनेक अडचणी येत होत्या, त्यांच्यावर मात करून पहिला उपाय यशस्वीपणे अंमलात आणला गेला. माझ्या आठवणीत तरी अशा प्रकारचा इतक्या मोठ्या प्रमाणावर केला गेलेला पहिलाच सुसंघटित प्रयत्न होता. तो यशस्वी करणाऱ्या सर्व लोकांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
हा अपघात आणि या उपाययोजना यासंबंधी मला मिळालेले काही लेख या पानावर संग्रहित केले आहेत. सर्व मूळ लेखकांचे मनःपूर्वक आभार

आनंद घारे

शेवटचे 14 मीटर ! बाहेरचे लोक

©️ कपिल काळे

उत्तराखंडमधील बारकोट ते सिलक्यारा ह्या बोगद्यात अडकलेले 41 कामगारांची सुटका होण्याकरिता आता फक्त 14 मीटर अंतर खोदायचे राहिले आहे !
12 नोव्हेंबर रोजी हे कामगार बोगदा कोसळल्याने अडकले त्यांना 10 दिवसात आता बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागला आहे. शेवटचे 14 मीटर अंतर पार झाले की उद्यापर्यंत हे सगळे सुखरूप बाहेर पडलेले असतील.
हा आहे नवा भारत! तांत्रिक प्रगती आणि आत्मविश्वास ह्या बळावर हे साध्य झाले आहे.
चार धाम रस्ते प्रकल्पाअंतर्गत हा सिलक्यारा बारकोट बोगदा राष्ट्रीय महामार्ग 134 वरती यमुनोत्रीच्या बाजूला बनवला जात आहे.
काम सुरू असताना 12 नोव्हेंबर रोजी अचानक बोगद्यावरील जमीन माती कोसळून 41 कामगार आत अडकले. त्यानंतर सुरू झाला त्यांना सोडवण्याचा प्रयत्न !

1.नॅशनल हायवे इन्फ्रा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, 2.टीहरी हायड्रोइलेक्ट्रिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, 3.सतलज जल विद्युत निगम, 4.ओएनजीसी आणि
5.रेल विद्युत निगम लिमिटेड ह्या पाच सरकारी कंपन्या ह्याच परिसरात काही ना काही काम करत आहेत. त्यांना ह्या सुटकेच्या कामासाठी पाचारण केले गेले.
याकरिता एक पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतला गेला. ह्यातील प्रत्येक कंपनीला त्यातील एकेक जबाबदारी दिली गेली.

  1. ह्यात बोगद्याच्या सिलक्यारा बाजूकडून साधारण 80 मीटर लांबीचा आडवा, 900 मिमी व्यासाचा बोगदा तयार करून त्यातून 800 मिमी व्यासाचे लोखंडी पाईप टेलिस्कोपिक पद्धतीने घालणे. ह्या 800 मिमी व्यासाच्या पाइपलाइनमधून ह्या कामगारांना सोडवणे.
    2 बोगद्याच्या बारकोट बाजूने 480 मीटर लांबीचा आडवा बोगदा खोदणे.
  2. हा बोगदा ज्या टेकडी खालून जातो, तिच्या माथ्यावरून सुरुवात करून साधारण 90 मीटर खोलीचे विवर खोदून त्यातून कामगरापर्यंत पोचणे .
  3. बारकोट बाजूने एक खोल विवर खोदणे.
  4. कामगारापर्यंत अन्न पाणी तसेच व्हिडिओ कॅमेरा पोचवण्याकरिता चार इंच पाईप लाईन बनवणे.
    ह्या प्रत्येक कामगिरी वरील कंपन्यांना अनुक्रमे देण्यात आल्या.
    ह्या कामाकरीता लागणारी अजस्त्र यंत्र सामुग्री, खोदाई यंत्रे युद्ध पातळीवर प्रयत्न करून परदेशातून मागवण्यात आली.
    भारतात वेगवान माल वाहतुकीकरिता समर्पित रेल्वे परिवहन मार्ग बनवला गेला आहे. त्यावरून एक खास मालगाडी चालवून गुजरात मधील करंबेली ते ऋषिकेशपर्यंत सामग्री पोचवली गेली. ह्या मालगाडीने 1075 किमी अंतर 18 तासात पार केले.
    सर्व पाचही कंपन्यांनी त्यांना नेमून दिलेले काम एकाच वेळी सुरू केले. जो पहिल्यांदा पोचेल तिथून कामगारांना बाहेर काढायचे ठरवले. ह्यासाठी अजस्त्र मालवाहू ट्रक ट्रेलर जातील असे रस्ते बनवण्यात आले.

अडकून 6 दिवस झाल्याने आणि कोणताही संपर्क न झाल्याने, आतील कामगारांचे मनोधैर्य खचत चालले होते. बोगद्याच्या ज्या भागात कामगार अडकले होते त्याची लांबी 2 किमीआहे आणि त्या भागात सिमेंट काँक्रिटचे छत सुद्धा पूर्ण झाले आहे. त्यामुळे कामगार सुरक्षित असण्याबाबत खात्री होती. फक्त त्यांना बाहेर काढण्याकरिता नवा भारत कामाला लागला. नवीन भारताची इच्छाशक्ती आणि तांत्रिक प्रगती कामाला लागली.

18 नोव्हेंबर रोजी रेल विद्युत निगमला चार इंची पाईप कामगारांपर्यंत पोचवण्यात यश आले. त्यातून व्हिडिओ कॅमेरा टाकून त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यात आला. कामगारांच्या नातेवाइकांना त्यांच्याशी बोलायला दिले गेले. कामगारांना सहा दिवसानंतर काही पहिल्यांदाच काहीतरी खायला मिळाले. ह्यात सुकामेवा चॉकलेट पॉपकॉर्न असा आहार होता. एका मानसोपचार तज्ञ , योगा प्रशिक्षक ह्यांची नियुक्ती करून कामगारांचे मनोधैर्य खचणार नाही ह्याची काळजी घेतली गेली.
त्यानंतर ह्या चार इंची पाईप लाईन च्या जागी सहा इंची पाईपलाईन टाकण्यात आली. त्यातून खिचडी दलिया असे गरम अन्न कामगारांना देण्यात आले अडकल्यानंतर 7 दिवसांनी असे गरम अन्न त्यांनी खाल्ले. तसेच कामगारांना टूथ ब्रश, पेस्ट, टॉवेल, कपडे, अंडरगारमेंट, साबण असे अत्यावश्यक सामान सुद्धा ह्या नवीन पाइपलाइन द्वारे पोचवण्यात आले.
ह्यातील बरेच कामगार तंबाखू खाणारे आहेत , त्यांनी गेले दहा दिवस तंबाखू खाल्ला नाही, त्यामुळे त्यांना withdrawl symptom येऊ नयेत त्यातून मानसिक विकार होऊ नयेत म्हणून त्यांना तंबाखू सुद्धा पोचवण्यात आला.
त्यांच्या कुटुंब तसेच इतर बाहेरील कामगारांनी त्यांना सतत बोलत ठेवले जेणेकरून त्यांचे मनोधैर्य कायम राहील.

तारीख 19 नोव्हेंबर भारतीय वायू दलाने झारखंड येथील खाणीमधून काही महत्वाची यंत्रसामुग्री मालवाहू विमानाने आणली. तसेच अमेरिकेहून खास खोदाई मशीन आणण्यात आली. त्याने बचाव कार्याला अजून जोर प्राप्त झाला.
हे सगळे बचाव कार्य National Disaster Management Authority चे प्रमुख निवृत्त जनरल अता हसनैन ह्यांच्या नेतृत्वाखाली सुरू होते.
त्यांनी एक गोष्ट फार उत्तम केली, की कोणत्याही चॅनलवाल्यांना बोगद्याजवळ येऊन बातम्या चालविण्यास आणि बचाव कार्याचे व्हिडिओ काढून ब्रेकिंग न्युज चालविण्यास मज्जाव केला. भारताच्या पंतप्रधान कार्यालयाकडून रोज आढावा घेतला जात होता.

तारीख 20 नोव्हेंबर रोजी जिनिव्हा येथील International Tunneling and Undergound Space Association चे प्रमुख अरनॉल्ड डिक्स ह्यांना सुद्धा बचाव कार्यासाठी आणण्यात आले. त्यांनी पंचसूत्री कार्यक्रमाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे बचावपथकाला काही इजा झाल्यास किंवा तिथे जमीन खचल्यास, स्वतःच्या सुटकेचा कोणताही मार्ग नसल्याने काँक्रिट बॉक्स कल्वर्ट टाकून बचाव पथकाच्या सुटकेचा मार्ग प्रशस्त करण्यात आला. अरनॉल्ड डिक्स ह्यांनी बारकोट टेकडीच्या माथ्यावर जाऊन तेथील विवर खोदणारे पथक( पंचसूत्री पैकी तिसरा पर्याय) पहिल्यांदा कामगारांपर्यंत पोचेल असा अंदाज बांधला.

तारीख 21 नोव्हेंबर, आज बोगद्याबाहेर 41 अँब्युलन्स 2 हेलिकॉप्टर तयार ठेवण्यात आली. कोविड करिता बनवलेले एक छोटे हॉस्पिटल पुन्हा धुवून पुसून स्वच्छ करण्यात आले. तिथे 15 डॉक्टर ची एक टीम तयार ठेवली गेली.
काल परवा पासून पंचसूत्री पैकी पर्याय क्रमांक 1 म्हणजे सिल्क्यारा बाजूने आडवा बोगदा खोदणाऱ्या टीमला भलतेच यश मिळाले त्यांनी अमेरिकन ऑगर ड्रिलचा वापर करत दोन दिवसात जबरदस्त प्रगती केली आणि कामगारांपासून फक्त 14 मीटर अंतरापर्यंत येऊन त्यांचे ड्रिल एका कठीण वस्तूला आदळले.
हे ड्रिल मशीन पुन्हा बाहेर काढून त्याची दुरुस्ती करण्यात आली. आणि दुप्पट जोराने खोदाईचे काम सुरू केले गेले.

चिली देशात असेच एका खाणीत अडकून पडलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात 69 दिवस लागले होते. तेव्हा देखील आंतरराष्ट्रीय समुदायाने प्रचंड मदत कार्य केले होते. थायलंड आणि म्यानमार सीमेवर एका गुहेत अडकून पडलेल्या मुलांना असेच दहा दिवसानंतर बाहेर काढण्यात आले होते.

हा लेख तुम्ही वाचेपर्यंत नॅशनल हायवे इन्फ्रा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या चमूला 900 मिमी व्यासाची पाइपलाइन आडव्या स्थितीत ड्रिल मारून कामगारांपर्यंत पोचण्यात यश आले असेल आणि शेवटचे 14 मीटर अंतर पार करून कामगार यशस्वी रित्या बाहेर देखील आले असतील. ह्यामागे सर्वांची मेहनत फळाला येईलच !
हा आहे नवीन भारत, तांत्रिक प्रगती आणि इच्छाशक्तीच्या बळावर हा भारत कोणत्याही आव्हानाला सामोरा जाण्यास सक्षम आहे. ह्या बदलेल्या भारताचा मला अभिमान आहे !

कपिल काळे

**************

हा लेख लिहिला गेल्यानंतर एक नवे विघ्न उपस्थित झाले. ते म्हणजे ते ड्रिल ज्या कठीण वस्तूला आदळले होते त्याने त्याची पार वाट लावली. आधी तयार केलेल्या बोगद्याच्या भिंती आणि छत यांना सिमेंटकाँक्रीटचे जे लाइनिंग दिले होते त्याला मजबूत करण्यासाठी त्यात बसवलेले रिइन्फोन्समेंट बार नावाच्या लोखंडी सळ्याच या ड्रिलला आडवत होत्या आणि ते ड्रिल त्यांच्या जंजाळात अडकून बसले. त्याला सोडवून बाहेर काढण्यासाठी प्लाज्मा कटिंग नावाचे खास तंत्र वापरून त्या मशीनचे भाग आणि लोखंडी सळ्या कापल्या गेल्या. यापुढील उरलेले काम करण्यासाठी यंत्र उपलब्ध नव्हते. रॅट माइनिंग नावाचे तंत्र वापरून काही कुशल कामगारांनी उरलेला डोंगर हाताने पोखरून त्यातून पाइप आतपर्यंत घुसवला आणि त्यामधून एक एक करून सर्व कामगारांना बाहेर आणले.
आनंद घारे


या जगात कोणाला आणि कशालाही निषिद्ध म्हणू नये, मानू नये. कारण कोण आणि काय कसे कामाला येतील व प्रयत्नांना बळ देतील, यश देतील सांगता येत नाही!

हे सिद्ध केले उत्तर काशी मधील सिल्काराच्या बोगद्यात अडकलेल्या श्रमिकांच्या सुटकेतून. ‘उंदराच्या कुरतडणाऱ्या’ खोदकामाला Rat-Hole Drilling म्हणतात. या प्रकारावरून, प्रक्रियेतू निर्माण झालेल्या खोदकामास २०१४ साली Rat-Hole Drilling तंत्रज्ञानाला कायदेशीर बंदी घालणारा नियम अमलात आणला गेला होता. पण आज शेवटी हेच तंत्रज्ञान कामी आले. या प्रक्रियेचा व प्रकाराचा किती मोठा फायदा झाला पहा! उंदराकडूनही काही शिकायला हवं असं तर गणपती बाप्पांनी सांगितले नसेल ना?

😅 जय उंदीर मामा !! 🐀

***********************

Sanatkumar, Nov 28

What is rat-hole mining?

Context: Efforts to rescue 41 workers trapped in the collapsed Silkyara-Barkot tunnel have faced setbacks. Now having tried several methods, the rescue team is now planning to drill through the remaining few meters using the practice of rat-hole mining.

Rat Hole Mining

· The term “rat hole” refers to the narrow pits dug into the ground, typically just large enough for one person to descend and extract coal.

· A rat-hole mine involves digging of very small tunnels, usually only 3-4 feet deep, in which workers, more often children, enter and extract coal. Rat-hole mining is broadly of two types – side-cutting and box-cutting.

{Above image shows a rat Hole Mining scheme for coal mining. I am unable to clearly relate exactly how this was applied to the present accident.}

· Rat hole mining is prevalent in the Northeastern States, especially in Meghalaya.

Why Prevalent in Northeastern India?

Despite the presence of coal reserves, commercial mining is not practiced in the North-Eastern regions because of terrain’s unsuitability and nature of coal deposits.

· The coal seam is extremely thin, and methods like open-cast mining are economically unviable.

· The coal found in the North-East contains lots of sulfur and this type of coal is categorized as bad quality of coal. Thus discourages big ticket private investments.

· Being a tribal state where the 6th Schedule applies, all land is privately owned, and hence coal mining (like limestone mining) is done by private parties which do not have capacity of big investment.

· Further, these mines are considered as gold chest by the locals which provides employment and prospect of money for the population of these backward area without much investment.

Demerits

· Ecology – Piling of coals along roadside have caused severe issues of air and water pollution. Off road movements in and around mining area has resulted into damaged ecology. A petition to NGT by Assam’s All Dimasa Students’ Union has claimed that rat-hole mining in Meghalaya had caused the water in the Kopili river (it flows through Meghalaya and Assam) to turn acidic.

· Risk to lives – Flooding of mines during rainy season, and sudden collapse due to unscientific digging has caused loss of life to individuals.

Present Status

· The National Green Tribunal (NGT) has banned rat-hole mining in 2014, and retained the ban in 2015.

· The ban was on grounds of the practice being unscientific and unsafe for workers.

· The Meghalaya High Court appointed Justice (Retired) BP Katakey committee to recommend the measures to be taken by the state in compliance with the directions issued by the Supreme Court and National Green Tribunal (NGT). This committee noted that despite the ban, illegal mining continues with large cache of coals reaching to the markets unhindered.


I have also not seen a neat sketch or drawing showing exact details but could get a reasonable idea from whatever I could guess from the reports in different media.
This tunnel was part of a highway under construction. It means it was wide enough for at least a four lane road and high enough to allow big trucks to pass through. I understand that it was already constructed for a length of more than a kilometer. A portion of about 70-80 meters long, about 200 meters inside from the entrance caved in and was filled with stones and mud, completely blocking the path of the workers to come out. They still had a space of several meters long and of the size of the tunnel. Initially Auger machines were employed to drill through the debris and gradually insert a large pipe of 900 mm dia through it horizontally to create a passage. The machines broke down, their blades got stuck when they tried to cut iron rod ( perhaps Reinforcing bars) after making much progress. Then men went in with plasma cutting machines to cut the bars and stuck blades etc. Finally the Rat Miners finished the job using their skill of digging last few meters using manual tools and fully inserted the 900 mm dia pipe. One NDRF Jawan at a time crawled inside pushing a stretcher kept on a trolley, asked one trapped worker at a time to lie on the trolley and it was pulled through a wire rope by workers from out side. This way, all the workers were taken out. Ambulances and Medical staff were kept ready inside the tunnel to examine the workers, give them first aid and move to a hospital.
Great work of organising the rescue with coordination of several agencies.
Anand Ghare , Nov 29

****************

H Bhambra
Wed, Nov 29

12-member rat-hole mining team did the tunnel rescue for free

Feroze Qureshi and Monu Kumar, experts in the rat-hole mining technique, were the first to meet the 41 labourers rescued from the Silkyara tunnel in Uttarakhand after they cleared the last bit of the rubble inside the structure.

All the 41 workers were rescued on Tuesday evening after 17 days of a multi-agency operation conducted by the central and state governments.

Qureshi from Delhi and Kumar from Uttar Pradesh were part of a 12-member team of rat-hole mining technique experts who were called on Sunday to do the drilling after an American auger machine came across hurdles while clearing the rubble.

They (the labourers) could hear us when we reached the last portion of the rubble. Soon after removing the rubble, we got down to the other side,” Qureshi, a resident of Delhi’s Khajoori Khas, told PTI.

“The labourers thanked and hugged me. They also lifted me on their shoulders,” he said, adding that he was happier than the rescued workers.

Qureshi is an employee of the Delhi-based Rockwell Enterprises and an expert in tunnelling work.

“They (the labourers) gave me almonds and asked my name. Soon, our other colleagues joined us and we were there for about half an hour,” Kumar, a resident of Bulandshahr in Uttar Pradesh, said.

He said the National Disaster Response Force (NDRF) personnel went inside the tunnel after them. “We came back only after the NDRF personnel arrived,” Kumar said.

“We are very happy that we were part of this historic operation,” he added.

The leader of the 12-member team from Rockwell Enterprises, Wakeel Hassan, said he was approached for help by a company involved in the rescue operation four days ago.

“The work got delayed while removing the portion of the auger from the rubble. We started at 3 pm on Monday and finished the work at 6 pm on Tuesday,” Hassan said, adding, “We had said the work would be finished in 24 to 36 hours and that is what we did.”

He also said they did not charge any money for taking part in the rescue operation.

https://www.rediff.com/news/report/12-member-rat-hole-mining-team-did-the-tunnel-rescue-for-free/20231129.htm

Thu, Nov 30

The tunnel caved in portion was built in 2018. The lining of this portion was not ok and hence caved in.
Auger machine had made a hole for 46 m till its blades got stuck and broke due to steel reinforcements.
The portion through which people came out in wheeled stretchers was of 1 m welded pipe structure and 10 m long.

This opening was created by rat hole miners using manual drilling equipment and removing debris manually. People had to climb over temporary stairs to reach up to the pipe for rescue of trapped miners.

HS Bhambra

It is a mandatory requirement that every tunnel under construction and later on has to have a smaller emergency exit.
The company did not provide the emergency exit and that is why there was a big catastrophe for 41 workers.

Uttarkashi Tunnel Collapse: Serious Lapse? Escape Route Planned But Not Executed
Story by editor@news18.com (News18 English)

The 41 workers trapped inside the collapsed part of the under-construction Silkyara tunnel in Uttarakhand’s Uttarkashi could have been rescued much earlier had the company built an escape route as per standard operating procedure. But, the escape route was not included in the 4.5-km tunnel once construction began despite it being part of the original design, pointing to an alleged serious lapse.
According to a report published by NDTV, a map of the tunnel has emerged pointing towards an alleged serious lapse by the company involved in its construction. Standard operating procedure requires that an escape route be built inside every tunnel more than 3 km in length, so as to rescue people in case of an accident or natural calamity.

The map, displayed when union minister VK Singh visited the site of the tunnel collapse on November 16, shows that an escape route was part of the original design of the 4.5-km Silkyara tunnel, but it was never executed. Such routes can be used even after tunnels are built and can aid in the rescue of those passing through in vehicles if there is any collapse-like situation or natural disasters like landslides.

Now, rescue and relief teams are having to come up with alternate plans to extract the labourers trapped inside. Machines are drilling into rubble to insert pipes through which the workers will be rescued.

The rescue and relief operations entered the seventh day on Saturday while the number of workers trapped inside the tunnel has been revised to 41. A team from the prime minister’s office (PMO) is also at the site to review the rescue operation. MoRTH additional secretary Mahmood Ahmed, PMO deputy secretary Mangesh Ghildiyal, geologist Varun Adhikari and engineering expert Armando Capellan are conducting an on-the-spot review.

The operation was put on hold due to a machine snag. Around 2.45 pm on Friday, during the positioning of the fifth pipe, a loud cracking sound was heard in the tunnel after which the rescue operation was suspended. The sound created panic in the rescue team. The pipe-pushing activity was stopped after an expert involved with the project warned about the possibility of further collapse in the vicinity.

Chief minister Pushkar Singh Dhami held a meeting with officials at his official residence in Dehradun to take an update on the rescue operations at the tunnel in Silkyara. Dhami said he hopes the state-of-the-art machines manufactured in the country and abroad will be successful in the rescue operations.

“Under the guidance of the PMO, the state government is busy making all efforts to evacuate labourers trapped inside the tunnel ares. We hope we will soon succeed in the mission,” he said. “The government stands with the families of workers who are trapped. Their safe and timely evacuation is our priority,” he added.

So far, rescue workers have managed to drill through up to 24 metres of rubble. It may require up to 60 meters (195 feet) to enable the escape of workers.

All trapped labourers are also physically and mentally fit so far, with authorities making sure essential supplies like oxygen, medicines, food and water reached the trapped labourers through air-compressed pipes. “The morale of the people needs to be maintained… The food and water supply and the psychological state of the stuck workers are well… They are being talked to by psychological experts… All of them are fit physically and mentally,” NHIDCL director Anshu Manish Khalkho said.

(With PTI inputs)

Henceforth in no tunnel under construction or later, workers be allowed to enter if emergency exit does not exist.

The company which was constructing the Uttarkashi tunnel should be banned.

HS Bhambra

**************************

Silkyara Tunnel Rescue Operation

“🙏..Whether you are a Modi-supporter or otherwise, one has to accept that this kind of rescue operation is unprecedented.
Five people from the PMO’s Office were at the spot… day and night for 15 days and lived there in a container.
CM of Uttarakhand was present for three-four hours every day, Gen VK Singh, Nitin Gadkari and many other ministers used to visit there frequently and review the rescue work.
A special aircraft of the Air Force was sent from Hyd and the augur M/C was brought from Slovenia. The world’s biggest rescue expert was called by a special plane.
To order a special kind of plasma cutter, first the team was sent to Hyderabad, then the plane was sent to America and a special kind of Plasma Cutter was brought from there.
Four machines, robots and ground penetrating radar were brought from Switzerland by a special aircraft.
A helipad and a working runway were also built at the accident site, a vertical oxygen generator plant was installed at the accident site.
Put your hand on your heart and think whether you have ever heard of such a rescue operation being conducted in such a quick manner ever before in our history.

Simply Kudos..👏👏🙏😊🙏

****************

Fri, Dec 1 at 7:01 PM

Uttarakhand’s Silkyara-Barkot tunnel, site of miracle rescue, collapsed 19 to 20 times in last 5 years: Report

Uttarakhand, India Edited By: Heena SharmaUpdated: Dec 01, 2023, 05:45 PM IST

The whole of India watched with bated breath the rescue of 41 trapped workers in the Uttarakhand Silkyara-Barkot tunnel. The collapse of the tunnel in Uttarkashi on November 12 culminated in the successful rescue of the entrapped workers after 17 long days.

Reports quoting officials are now suggesting that the tunnel collapse was not an isolated incident.

Though what happened on November 12 became a sensitive issue given the lives of dozens at stake, the tunnel collapse is a recurring challenge.

During its construction over the past five years, the tunnel on the Char Dham all-weather road project has grappled with a series of collapses, labeled as ‘cavities’.

Speaking about the 4.5 km-long bidirectional tunnel with a local media outlet, the director of administration and finance at the National Highways Infrastructure Development Corporation Ltd (NHIDCL) Anshu Manish Khalkho said that approximately “19-20 minor to medium-level collapses” occurred during the tunnel’s construction.

Khalkho said, “Such incidents happen during every tunnel construction project, but we were unlucky this time that workers got trapped.”

Khalkho also revealed that more collapses took place on the Barkot side compared to the Silkyara side.

Notably, a specific area within 160 to 260 meters from the Silkyara end, known as the ‘red zone’ or ‘shear zone,’ was identified as prone to collapses due to brittle rocks.

Khalkho, while speaking to media, said additional protective measures would be implemented to reinforce this vulnerable area.

Another official speaks in same vein

An anonymous official connected to the tunnel construction reportedly spoke on the same vein. He stated, “the tunnel had faced numerous cavity collapses due to the challenging geology of the region and significant rock deformation.”

It is worth noting that Bernard Gruppe, a European company providing design services to Navayuga Engineering, the construction firm undertaking the tunnel project, had previously acknowledged that the “geological conditions (at the tunnel site) proved to be more challenging than predicted in the tender documents.”

The Silkyara-Barkot tunnel’s recent incident and the subsequent rescue of trapped workers are now bringing our attention to the ongoing challenges in constructing this vital infrastructure project.

HS Bhambra

**********

Poachers turned heroes!

It is an irony of fate that poachers are turned to heroes in the tunnel episode, underlining the intrinsic humane spirit even in the midst of poverty.

Hunger and poverty have turned some to poachers of coal in some of the poverty ridden, but rich coal fields in some northern states. There were lengthy articles of how this beats the system and cause damage to our economy by a few dare devils who found and perfected a system of excavating coal by manual methods without any great machinery to dig rat- like holes , and sell the stolen coal in small markets , as a means of livelihood, by the side of ultra modern coal fields with ultra modern machinery and technology.

While the machines have done the major share in the tunnel rescue operation, with just a few feet left to reach the trapped victims, the mighty State- Centre organizations ultimately have to find and organize these poachers to do the last crucial phase of recovery!

Our System being what it is, after the job being done, the contributions of the ‘rats’ will soon be forgotten and the rat- hole heroes will return to their poaching again!

K.Natarajan

*********

उत्तराखंडमधील बोगद्यातील भाग का कोसळला? बोगद्यातील दुर्घटना कशा टाळता येतील?


उत्तराखंड राज्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बोगद्याचे बांधकाम चालू असताना रविवारी आतला भाग कोसळला; ज्यामुळे ४० कामगार आत अडकले. या दुर्घटनेनंतर बोगद्याच्या सुरक्षित बांधकामाबाबत पुन्हा चर्चा होत आहे.

लोकसत्ता: November 16, 2023

उत्तराखंडमधील बोगद्यात ४० कामगार अडकले असून त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
उत्तराखंडमधील उत्तर काशी जिल्ह्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील निर्माणाधीन असेलल्या बोगद्यामध्ये बांधकामाचा काही भाग रविवारी (१२ नोव्हेंबर) कोसळून ४० कामगार आतमध्ये अडकले. या बोगद्यातून या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी उत्तराखंड सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. तसेच ही दुर्घटना कशी घडली याचाही अहवाल येणे बाकी आहे. तत्पूर्वी एल अॅण्ड टी या बांधकाम कंपनीचे माजी प्रकल्प संचालक व जमिनीखालील बांधकामाचे तज्ज्ञ मनोज गर्नायक यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देत असताना ही दुर्घटना कशी घडली असावी आणि भविष्यात अशा घटना कशा टाळता येऊ शकतात? याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्याबद्दल घेतलेला हा आढावा…

बोगद्याच्या आतला भाग कोसळण्याचे कारण काय?
बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून २०० ते ३०० मीटर आतमध्ये काही भाग कोसळला. भुसभुशीत झालेल्या वरच्या भागातून दगडाचा भाग कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली. बांधकामाच्या वेळेस बोगद्यात वरच्या बाजूला ठिसूळ झालेला भाग कदाचित दिसून आला नसेल. नाजूक किंवा भग्न खडकांचा या भागात समावेश असू शकतो. भेगा पडलेल्या या खडकांमुळे हा भाग खाली कोसळला, अशी शक्यता मनोज गर्नायक यांनी व्यक्त केली.

दुर्घटनेचे आणखी एक कारण म्हणजे भेगा पडलेल्या खडकांमधून पाण्याची गळती होत असण्याची शक्यता आहे. सैल झालेल्या खडकांमधून पाणी आपला रस्ता तयार करते; ज्यामुळे बोगद्याच्या वरच्या बाजूला एक प्रकारची पोकळी निर्माण होते, जी खालून दिसत नाही. बोगद्यातील दुर्घटनेबाबतचे हे सामान्य अंदाज आहेत; ज्यावेळी सर्वसमावेशक तपासणी पूर्ण होईल, त्यावेळी याबाबत अधिक खुलासा करता येईल, असेही ते म्हणाले.

खडकामध्ये बोगदे कसे खणले जातात?
बोगदा खणण्याचे काम दोन पद्धतींनी करण्यात येते. एक म्हणजे ड्रिल आणि स्फोट पद्धत (DBM) आणि दुसरी टनेल बोअरिंग मशीन (TBMs) वापरून बोगद्याचे उत्खनन करता येते. डीबीएम पद्धतीमध्ये ड्रिल मशीनने खडकामध्ये छिद्र पाडले जाते आणि नंतर त्यात स्फोट घडवून आणले जातात. स्फोटामुळे खडक फुटतो आणि मग तो खणून काढणे सोपे होते. टीबीएम पद्धत ही स्फोटकाच्या पद्धतीपेक्षा बरीच खर्चीक असली तरी ती सुरक्षित असल्याचेही म्हटले जाते. बोगद्याच्या प्रवेशदारापासून यंत्राच्या साह्याने आतमध्ये भोक पाडले जाते. जसजसे खडकाच्या आत यंत्र सरकत जाते, तसतसे मागून बोगद्याला काँक्रीटच्या आच्छादनाचा आधार दिला जातो.

भारतात अनेक ठिकाणी टीबीएम यंत्र वापरून बोगदे खणले गेले आहेत. या यंत्राची किंमत २०० कोटी रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जाते.

बोगदा उत्खननाची पद्धत कशी ठरते?
उंच पर्वत असतील, तर त्या ठिकाणी टीबीएम पद्धत वापरली जात नाही. एक हजार ते दोन हजार मीटर उंच असलेल्या पर्वतामध्ये जर टीबीएम पद्धतीने छिद्र पाडले गेले, तर निर्माण झालेल्या पोकळीतील खडक फुटण्याची भीती असते. या पोकळीत ताण निर्माण होऊन खडकाचा भाग कोसळण्याची भीती असते. पर्वत ४०० मीटरपर्यंत उंच असेल, तर टीबीएम पद्धत वापरणे योग्य ठरते. दिल्ली मेट्रोचे काम करताना टीबीएम पद्धत वापरूनच जमिनीखालील बोगदे खणण्यात आले आहेत. हिमालय किंवा जम्मू व काश्मीर आणि उत्तराखंड येथील पर्वतामध्ये बोगद्याचे उत्खनन करण्यासाठी सहसा डीबीएम पद्धतीचा वापर करण्यात येतो.

बोगद्याच्या उत्खननासाठी हिमालय धोकादायक आहे का?
भूवैज्ञानिकदृष्ट्या हिमालय तरुण पर्वत समजला जातो (४० दशलक्ष ते ५० दशलक्ष वर्षांपूर्वी तो तयार झाला असल्याचे मानले जाते). भारतीय टेक्टॉनिक प्लेट (पृथ्वीचा पृष्ठभाग) आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेटच्या धडकेमुळे हिमालयाची उंची अजूनही वाढत आहे, असेही भूवैज्ञानिक सांगतात. हिमालय पर्वतातील असे काही भाग आहेत; जिथे खडक अजूनही ठिसूळ आहेत. तर काही भागांमध्ये अतिशय टणक खडकही आहेत. मनोज गर्नायक म्हणाले की, मी हिमालयात बोगद्याचे उत्खनन करण्याचे काम केले आहे. हे करताना मला फार अडचणींचा सामना करावा लागला नाही. फक्त एकदाच बोगद्याचे काम करताना एक छोटीशी अडचण आली होती; पण आम्ही लगेचच बोगद्याच्या वरच्या भागाला आधार दिला आणि दुर्घटना टाळली. त्यामुळे बोगद्याचे उत्खनन करताना काही ठिकाणी ठिसूळ किंवा भेगा पडलेला भाग आढळू शकतो; पण तांत्रिक समाधान शोधून, त्यावर मात करता येऊ शकते.

तसेच बोगद्यामुळे पर्वत किंवा डोंगराच्या पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचत नाही. सुमारे २०० वर्षांपूर्वी बोगदा खणण्याचे तंत्र अस्तित्वात आले. हे तंत्र योग्य रीतीने अमलात आणल्यास बोगदे धोकादायक ठरत नाहीत, असेही ते म्हणाले.

बोगद्याचे उत्खनन करताना कोणत्या बाबी तपासायला हव्यात?
ज्या ठिकाणी बोगदा पाडायचा आहे, त्या ठिकाणच्या खडकाची, पर्वताची इत्थंभूत माहिती गोळा करणे आवश्यक असल्याचे मनोज गर्नायक सांगतात. भूकंपीय अपवर्तन लहरीद्वारे (Seismic refraction waves) बोगद्याच्या मार्गातील कोणता भाग नाजूक आणि घन आहे, याची माहिती मिळवता येते. भारतात बोगद्याचे काम सुरू करण्यापूर्वी अभियंते खडकात छिद्र पाडून खडकाचे नमुने गोळा करतात आणि ते पेट्रोग्राफिक विश्लेषणासाठी (खडकामधील खनिजे, त्याची वैशिष्ट्ये आणि इतर महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी सूक्ष्मदर्शकाद्वारे केलेली चाचणी) पाठवितात.

या माहितीच्या आधारे बोगद्याचे काम करताना वरच्या भागातील खडक हा ताण सहन करू शकतो की नाही, याचा अंदाज घेतला जातो.

बोगदा सुरक्षित राखण्यासाठी काय केले जाते?
मनोज गर्नायक यांनी सांगितले की, सर्वांत आधी बोगद्याचे उत्खनन पूर्ण झाल्यानंतर काही काळ बोगद्यातील खडकाचे निरीक्षण करावे लागते. संपूर्ण बोगद्यात खडकाच्या स्थितीत काही बदल होत आहेत का? हे तपासले जाते. स्ट्रेस मीटर आणि डिफॉर्मेशन मीटर यासांरख्या उपकरणाद्वारे सतत निरीक्षण केले जाते. त्यानंतर बोगद्यातील आतल्या बाजूला आधार देण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला जातो. बोगद्याच्या आत काँक्रीट स्प्रे मारणे (ज्यामुळे खडकावर एक प्रकारे काँक्रीटचे आच्छादन केले जाते आणि खडकाला आधार मिळतो), खडकावर लोखंडी जाळी पसरविणे, लोखंडी रिब्स किंवा बीम्स वापरून बोगद्याचा आतला भाग सुरक्षित करणे, बोगद्याचा वरचा भाग कोसळू नये यासाठी पाइपप्रमाणे लोखंडी छत्री बोगद्याच्या आत निर्माण करता येते. अशा काही उपायांचा अवलंब करून बोगदा आतून सुरक्षित करता येतो.

भूवैज्ञानिकाकडून बोगद्याच्या आतील खडकाची तपासणी करणे अतिशय महत्त्वाचे आहे; जेणेकरून संभाव्य धोक्याचा अंदाज घेता येतो. भूवैज्ञानिक बोगद्याच्या आतील खडक कोणत्याही आधाराशिवाय किती काळ तग धरू शकतो, याचाही कालावधी निश्चित करू शकतो. या तग धरण्याच्या कालावधीत आतल्या खडकाला आधार प्रदान करावा लागतो, असेही गर्नायक यांनी सांगितले.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारतात बोगद्याचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी अभ्यासावर अधिक वेळ दिला जातो. सध्या बोगद्याचे बांधकाम आणि डिझाईन एकाच वेळेस केले जाते.

गावाकडले पूर्वीचे तंत्रज्ञ

माझे लहानपण १९५०च्या दशकात एका लहान गावात गेले. तोपर्यंत प्लॅस्टिक हा शब्द माझ्या कानावरही पडला नव्हता, अलूमिन (अॅल्यूमिनियम) आणि स्टेन्लेस्टील या धातूंचा वापर मोठ्या शहरांमध्ये नुकताच सुरू होत होता. प्लॅस्टिक किंवा या धातूंच्या वस्तू अजून आमच्या घरी आल्या नव्हत्या. आमच्या स्वयंपाकघरातली सगळी भांडी तांब्यापितळेची होती. त्यातली जेवणाची ताटे , वाट्या आणि काही पातेली यांना वरचेवर कल्हई लावून चमकवले जात असे. ती कल्हई घासण्यामध्ये झिजून गेली आणि आतले पितळ उघडे पडायला लागले की पुन्हा कल्हईचा नवा थर लावून घेतला जात असे. कोठारात धान्यांची आणि पिठांची साठवण करण्याचे पत्र्याचे मोठे चौकोनी डबे होते आणि स्वयंपाकघरात अनेक लहान लहान डबे होते. चौकोनी रॉकेलचे डबे किंवा गोल आकाराचे डालडाचे डबे यांना कापून त्यावर पत्र्याची झाकणे बसवून ते घरासमोरच तयार केले जात होते. घरातल्या गाद्या आणि उशांमधल्या कापसात गोळे व्हायला लागले की तो कापूस बाहेर काढून पिंजून नव्या खोळींमध्ये भरायचा कार्यक्रम होत असे. ते काम करणारे कारागीरही घरासमोर किंवा घरात बसूनच आपले काम करत असत. या सगळ्यांची आठवण करून देणारा एक लेख खाली दिला आहे. मुंबईपुण्यातल्या ज्या भागांमध्ये मी राहिलो आहे तिथे असे दारावरून फिरणारे तंत्रज्ञ कधी पाहिले नाहीत, शहरातल्या बदललेल्या जीवनपद्धतीत मला त्यातल्या काही लोकांची कधी गरजही पडली नाही. छत्री दुरुस्त करणारे काही लोक मात्र अजूनही रस्त्याच्या कडेला बसून काम करतांना दिसतात, त्यांच्याकडे माझे जाणे होते.
आनंद घारे

पूर्वीचे तंत्रज्ञ (Technicians) – Shashank Dande
पूर्वी एखाद्या वस्तू मध्ये थोडासा बिघाड झाला तर ती वस्तू दुरुस्ती करून घेऊन वापरण्याकडे लोकांचा कल होता. त्याचे कारण म्हणजे घरबसल्या लोकांना या वस्तू दुरुस्त करून मिळायच्या.
पूर्वी तांबे-पितळेची भांडी लोक वापरत असत. कधी कधी जास्त वापर झाला की भांडी गळायला लागत. मला आठवतंय माझी आजी माझ्या आईला सांगायची, “जा ग, जरा पातेल्याला ‘चाती’ बसवून आण.” लहानपणी ते काही कळायचे नाही. पण मला आठवतेय पूर्वी दारावर अशा दुरुस्त्या करणारी माणसे यायची. त्यांच्या ठराविक आरोळ्या असत. बहुतेक दुपारच्या वेळात हे लोक यायचे. ‘बंबाला, पिंपाला डाग देणार, फुटकी भांडी नीट करणार.’
ही माणसे घरी येऊन म्हणजे वाड्यातच गळणारे बंब, पिंप, गळणारी पातेली, तपेली सगळ्यांना डाग देऊन किंवा चाती बसवून दुरुस्त करायचे. त्यांच्या जवळ दुरुस्तीचे सगळे सामान असायचे.
अजून एक म्हणजे, ‘डबे बनवणार, झाकणे बनवणार, चाळणी बनवणार’ असे ओरडत काही लोक यायचे. पूर्वी ‘डालडा’चे डबे मिळायचे. त्याला खूप लोक झाकणे बनवून वापरायचे. किंवा तेलाचे मोठे डबे मिळत. त्याचेही गोल डबे किंवा त्यालाच पत्र्याची झाकणे बनवून घेत.
त्या माणसाच्या खांद्यावर एक लोखंडी पेटी असे, त्यात पत्रा कापण्याची मोठ्या दांड्याची कात्री व अन्य बरेच काय-काय सामान असे. आणि ते डबे, झाकणे बनवताना बघायला खूप मजा वाटायची. मग वाड्यातल्या सगळ्या लहान मुलांचा तेवढा वेळ तिथेच त्याच्या भोवती मुक्काम असायचा. अगदी थोड्या वेळात सफाईदारपणे डबे, डब्यांची झाकणे अंगणात बसून तयार व्हायची. त्याच्या जवळ पत्रा पण असायचा, जरुरी प्रमाणे त्याचाही वापर करायचा व हे सारे थोडक्या पैश्यातच व्हायचे.
‘छत्री दुरुस्ती’, छत्रीच्या काड्या बदलणे, छत्रीचे कापड नीट करणे इत्यादी दुरुस्त्या करणारे कारागीर यायचे. मोडक्या छत्र्या थोडक्या पैश्यात घरी दुरुस्त करून मिळायच्या. त्याच्या खांद्यावर एक पिशवी व त्यात एक चपटा चौकोनी लोखंडी डबा असायचा त्यात दुरुस्तीला लागणारे खूप सारे सामान असायचे. पिशवीत छत्रीच्या काड्याही असायच्या.
‘नांव घालायची, भांड्यावर नांव.’ अशी एक आरोळी देत धोतर, शर्ट व टोपी घातलेला माणूस यायचा. त्याच्या कानावर नांव घालण्याचे साधन-पंच ठेवलेले असे व एका कानावर हात ठेवून तो आरोळी द्यायचा. ते ‘नांव’ असं म्हणण्याच्या ऐवजी, ‘नामु घालायची नामू’, असेच काहीसे ऐकू यायचे.
घरी येऊन त्याच्या जवळच्या लहानशा हातोडी आणि High Carbon Steel पंचने ठोकून, तो भांड्यांवर सुबक नांवे घालून द्यायचा. हल्ली मशीनने नांव घालतात. अगदी डझनाच्या हिशोबाने भांडी असायची. दुपारी पाठीवर पोते घेऊन तांबे, पितळेची मोड घेणारा माणूससुध्दा दारावर यायचा. पूर्वी पितळी Stove वापरायचे खूप लोक. ते सुध्दा दुरुस्त करणारा माणूस दारावर यायचा.
तसेच, तांबे पितळेच्या भांड्यांना ‘कल्हई’ करणारी माणसे तर ‘कल्हईची भांडी कल्हई’ अशीही आरोळी असायची. पितळी ताटे, वाट्या, पातेली अशा सगळ्या भांड्यांना कल्हई करत, लगेच त्यांचे रुप एकदम पालटत असे. भांड्यांना कल्हई म्हणजे एक मोठा कार्यक्रमच असायचा घरी ! कल्हई करताना बघताना खूप मजा वाटायची. एक वेगळाच वास यायचा – नवसागराच्या धुराचा. नवीन कल्हई केलेल्या भांड्यात जेवताना खुप छान वाटायचे. हे सगळे करत असताना माझी आजी व आई त्यांच्याशी पैसे ठरवताना घासाघीस पण करायच्या.
फार पूर्वी पिंजारी देखील दारोदारी येत. त्यांच्या खांद्यावर भलेमोठे धनुष्य-सदृश्य – तुणतुणे वाटेल – असे अवजार असे. कापसाच्या जुन्या गाद्यांमध्ये वापराने गोळे पुंजके होत. पिंजारी तो जुना कापूस पिंजून झकास reconditioned उशा-गाद्या बनवून देई.
तर असे होते हे दारावर येणारे तंत्रज्ञ ! अगदी घरीच थोड्या वेळात, थोड्या पैश्यात अगदी डोळ्यासमोर दुरुस्ती व्हायची. कुठे हेलपाटे नाहीत, धावपळ नाही, की काही नाही. लहानपणी हे घराच्या अंगणात बसून बघताना खूप मजा वाटायची. हळूहळू सगळे बदलले व या कसबी जमाती गायब झाल्या. नामशेष झाल्या.
‘कालाय तस्मै नम: असं म्हणून गप्प बसायचं…

मूळ लेखक शशांक दांडे . . वॉट्सॅपवरून साभार

गणेशोत्सव २०२३

या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या संकलनाची सुरुवात एका माहितीपूर्ण आणि उद्बोधक लेखाने करीत आहे. हा लेख माझे मित्र आणि बीएआरसीमधून सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.शरद काळे यांनी लिहिला आहे. त्यांचे मनःपूर्वक आभार. गणेशोत्सवात रोज मिळणारे नवे उल्लेखनीय लेख आणि चित्रे यांची भर घालत जाणार आहे.

पर्यावरणस्नेही गणेशोत्सव


शरद पांडुरंग काळे
निवृत्त वैज्ञानिक, भाभा अणुशक्तीकेंद्र

जून, जुलै आणि ऑगस्ट हे पावसाचे महिने संपायला आले की विविध सणांचे वेध लागू लागतात. प्रथम श्रावण येतो. श्रावण सुरू होतानाच बालकवींच्या कवितेची आठवण होत असते.
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते शिरशिरी शिरवे
क्षणात फिरुनी ऊन पडे
श्रावण जसजसा पुढे सरकतो, तसतशी धरती माता वरुणराजाच्या जलवर्षावाने तृप्त झालेली असते. विविध प्रकारच्या हिरव्या छटा तिचे सौन्दर्य अधिक खुलवीत असतात. श्रावणी सोमवार श्रावणी शुक्रवार, श्रावणी सोमवार, श्रावणी शनिवार, जन्माष्टमी, राखी (नारळी) पौर्णिमा आणि पोळा या सणांमुळे वातावरण निर्मिती होऊन भाद्रपदाची चाहूल लागते. नारळी पौर्णिमेला पावसाचा जोर ओसरतो. विद्येच्या देवतेच्या आगमनाची चाहूल लागते. गल्लोगल्ली मंडप सजू लागतात. सृजनशीलतेला आव्हान देणाऱ्या मंडप सजावटींची अहमहमिका सुरू होते. आपलीच कल्पना नवीन असे गृहीत धरून कमीत कमी लोकांना ती सांगत, त्यातून काहीतरी भव्यदिव्य निर्माण करण्याची स्वप्ने पाहिली जातात. लोकमान्यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेश उत्सवाला सव्वाशे वर्षांहून अधिक काळ लोटला, पण त्याच उत्साहात हा उत्सव अजूनही साजरा होतो. गणेशोत्सव हा समाजाला एकत्र बांधण्याचे मोलाचे कार्य बजावतो यात शंकाच नाही. दरवर्षी चौकाचौकात दिसणाऱ्या गणेश मंडळांच्या सजावटी पाहून आणि त्यात तरुणाईचा उत्साह पाहून आनंद होत असतो. कालमानाप्रमाणे उत्सव साजरा करतांना त्यात बदल होणे स्वाभाविकच आहे. विशेषतः गेल्या चार पाच दशकांमधील विज्ञानाची घोडदौड आश्चर्याने थक्क करणारी असल्यामुळे तिचे प्रतिबिंब ठिकठिकाणी दिसते. गणेशोत्सव त्याला अपवाद असण्याचे कारण नाही.
भारतीय मनातील श्रद्धा ही एक अजब चीज आहे. श्री गणेशांवर असलेली श्रद्धा समाजाच्या सर्व स्तरांमध्ये प्रकर्षाने दिसते. समाजात त्या निमित्ताने महिन्याहून अधिक काळ जो उत्साह सळसळत असतो, त्याचा विचार अर्थातच महत्वाचा आहे. मरगळ आलेल्या समाजाला नवसंजीवनी देण्याचे काम गणेशोत्सव करतो. निसर्गातील विविध शक्तींची ओळख करून देणाऱ्या ह्या सण आणि उत्सवांना सामान्यजनांचे प्रबोधन करण्यासाठी अनन्यसाधारण महत्व असते. निसर्गात परमेश्वर आहे की नाही, किंवा तो कोणत्या स्वरूपात आहे, यावर वाद होऊ शकतो. पण विश्वाची निर्मिती करणाऱ्या आणि विश्वाचा गाडा सुरळीत ठेवणाऱ्या विविध शक्ती आहेत, यावर दुमत होण्याचे काहीच कारण नसते. युरोप अंतराळ संस्थेने नुकतीच प्रारंभ केलेली युक्लीड मोहीम विश्वाचा पसारा कसा वाढतोय याचा नेमका वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहे. सूर्य शक्तीमुळे पृथ्वीवरील सजीवसृष्टीचक्र अव्याहतपणे सुरू आहे, हे सिद्ध करण्यासाठी वेगळ्या प्रयोगांची गरज नसते. पण लहान मुलांना प्रकाशसंश्लेषणाचे महत्व सांगितल्याशिवाय त्याच्या ते लक्षात येणार नसते. प्रत्येक व्यक्तीचे बौद्धिक आकलन एका विशिष्ट पद्धतीनेच होईल असे मानणे योग्य नाही. शिक्षणाचा व्यापक अर्थ प्रत्येकाच्या बौद्धिक आकलनशक्तीला चालना देणे असा अभिप्रेत असतो. पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. विविध निसर्गशक्तींचे आकलन होण्यासाठी किंवा करून देण्यासाठी म्हणूनच प्रतीके असणे गरजेचे असते. प्रतिकात्मक असलेल्या सणांकडे आणि उत्सवांकडे या नजरेतून पाहिले तर बरेचसे अनावश्यक वाद टाळता येतील. गणेशोत्सव हा तसाच प्रकार आहे. त्याकडे डोळसपणे पाहूनच लोकमान्यांनी तो सुरू केला होता.
गणेशोत्सवामध्ये श्री गणेश मूर्ती ही प्रमुख आकर्षण असते. त्यामुळे मूर्ती कशी असावी हा मुद्दा महत्वाचा ठरतो. मूर्ती कशाचीही बनविली तरी त्यात जी श्रद्धा असते, तिचा विसर शेवटपर्यंत गणेशोत्सव साजरा करणाऱ्या व्यक्तीला पडू नये अशी सर्वसामान्य अपेक्षा असते. त्यामुळे विसर्जनानंतर त्या मूर्तींचे नेमके काय होते, ह्याचाही विचार अतिशय महत्वाचा ठरतो. जर विसर्जनानंतर त्या मूर्ती भंगलेल्या स्वरूपात सभोवताली विखुरल्या जाणार असल्या तर ते सुसंस्कृत मनास कितपत पटेल? ज्या मूर्तीसमोर मनोभावे दहा दिवस पूजा केली, आरती करत राहिलो, विविध कलागुणांचे प्रदर्शन केले, विविध कलाकारांचे कौतुक केले, कीर्तने केली, अथर्वशीर्ष पठण केले, सत्यनारायण पूजा घडवून आणल्या त्याच मूर्ती फक्त दहा दिवसांच्या विदारक स्वरूपात पुढे आल्या, तर कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला मानसिक त्रास होईलच. संवेदनशील समाजात असे काही चुकूनसुद्धा घडू नये हीच वाजवी अपेक्षा त्यात असते. त्यासाठी मूर्ती नेमकी कशाची असावी हा विषय त्या दृष्टीने महत्वाचा असतो. समाजात सार्वजनिक गणेशोत्सव जितक्या उत्साहात साजरा होतो, तितक्याच उत्सवात महाराष्ट्रात आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये घरगुती स्तरावरदेखील हा उत्सव तसाच साजरा होत असतो. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, उत्सव साजरा करणाऱ्यांची संख्या मोठी असणारच आहे. त्या मोठ्या संख्येमुळेही मूर्ती कशाची असावी, म्हणजे विसर्जनानंतर पर्यावरणावर विदारक परिणाम होणार नाही, हा विचार महत्वाचा ठरतो.
शाडू ही एक प्रकारची माती असते. पाणी आणि हवा विरहित माती म्हणजे ९८ टक्के असेंद्रिय (inorganic) असते. ही असेंद्रिय माती विविध खनिजांनी बनलेली असते. भौतिक दृष्ट्या आकारावर मातीचे तीन घटक सांगता येतील. वाळू (२ ते ०.०५ मिलिमीटर), सिल्ट (०.०५ ते ०.००२ मिमी) आणि क्ले किंवा चिकणमाती (०.००२ मिमी पेक्षा लहान) असे हे तीन घटक आहेत. वाळू आणि सिल्ट हे घटक प्राथमिक खनिजे म्हणून ओळखली जातात तर चिकणमाती किंवा क्ले हे दुय्यम खनिज असते. अग्निजन्य खडकांची झीज होऊन माती बनते. ही माती नदीच्या प्रवाहाबरोबर सर्वदूर पसरते. जी प्रमुख खनिजे मातीत असतात ती सर्व सिलिकेटस म्हणजे सिलिका या मूलद्रव्यापासून बनलेली असतात. पोटॅशियम, एल्युमिनियम, लोह, सोडियम आणि मॅग्नेशियम या प्रमुख धातूंची विविध सिलिकेटस मातीत आढळतात. वाळूचा प्रमुख घटक क्वार्ट्झ म्हणजे सिलिका हाच असतो. पृथ्वीच्या बाह्य कवचात ५९टक्के सिलिकॉन असते. ते सिलिकॉन डाय ऑक्साईड या स्वरूपात असते.
पृथ्वीच्या बाह्यकवचात सिलिकॉनचे प्रमाण अधिक का असावे? पृथ्वी हा शुक्र, गुरू आणि मंगळाप्रमाणे एक खडकाळ ग्रह आहे. सिलिकॉन हा खडकाळ ग्रहांमधील सर्वात सामान्य घटक का आहे, याचे कारण म्हणजे मूळ तेजोमेघातील (ज्यापासून आपली सूर्यमाला बनली) हायड्रोजन नंतर सिलिकॉनचे प्रमाण सर्वात जास्त होते. कदाचित इतर ताऱ्यांभोवती असलेल्या इतर ग्रह प्रणालींमध्ये सिलिकॉनपेक्षा जास्त अ‍ॅल्युमिनियम किंवा लोह असू शकेल. आपली पृथ्वी त्यामुळे सिलिकॉन-प्रबळ झाली. त्यामुळे माती ही सिलिकॉनच्या संयुगांनी बनलेली आहे.
शाडूच्या मूर्ती करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. माती हा वसुंधरेच्या सजीवतेचा गाभा आहे. जे काही पोषण मिळायचे त्याची सुरुवात जल आणि सौर शक्तीच्या मदतीने मातीतूनच होते, आणि त्याचा शेवटही मातीतच होतो. पदार्थाच्या अविनाशित्वाचे चक्र मातीतून सुरू होते आणि तिथेच संपते. अर्थात हे चक्र सुरू होते आणि संपते हे म्हणणे वैज्ञानिक दृष्टीने योग्य नाही. कारण ते चक्र अव्याहतपणे सुरू असते. आपण व्यक्तीसापेक्ष दृष्टीने पाहिले तर ते सुरू होते आणि संपते हे म्हणणे योग्य ठरते. त्यामुळे एका मोठ्या शक्तीची पूजा करण्यासाठी या मातीची मूर्ती प्रतिकात्मक वापरासाठी अगदीच योग्य मार्ग ठरतो. निर्गुण स्वरूपात तिची पूजा करण्यासाठी मूर्तीची गरज नसते. पण सर्वानाच हा मार्ग मान्य असतो असा आग्रह धरण्याचे कारण नाही. शाडूची किंवा मृण्मय मूर्ती हीच अधिक पर्यावरणपूरक आहे. शाडू ही एक प्रकारची माती असून गुजरातमध्ये मातीच्या खाणी आहेत. वर्तमानपत्रांच्या बातमीवरून दिसते की साडेसहाशे टन शाडू मुंबईमध्ये आयात करण्यात आला असून लोकांनी या शाडूच्या मूर्ती बनवायला भरपूर प्रतिसाद दिला आहे. ही एक पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय चांगली बाब आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हे एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. त्यातील अडचणी समजावून घेऊन नजीकच्या भविष्यात आणखी मजल मारता येईल. २०₹ किलोची शाडू माती ५०₹ किलोपर्यंत पोहोचली आहे. मागणी अधिक तर किंमत अधिक हे बाजारी सूत्र असतेच. पण किंमतीवर नियंत्रण ठेवता येणेही शक्य आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणेचा सहभाग महत्वाचा ठरतो.
यातून आणखी एक गोष्ट अधोरेखित होते. आता आपण हे साडेसहाशे टन शाडू हेच उदाहरण घेऊ. खाणी मधून काढलेली साडेसहाशे टन शाडूची माती मुंबईमध्ये बाहेरून आली आहे. गणेशोत्सवानंतर या शाडूच्या मूर्तींचे विसर्जन होईल आणि साडेसहाशे टन माती मुंबईच्या विविध जलस्त्रोतांमध्ये मिसळली जाईल. जलस्त्रोत कितीही मोठा असला तरी साडेसहाशे टन हा आकडाही मोठा आहे. एवढ्या मातीचे नैसर्गिक जलस्त्रोतातून पुनर्रचक्रांकन करणे सोपे नाही. परंतु कृत्रिम तलावांचा जर वापर केला तर या साडेसहाशे टन पैकी बरीचशी माती परत मिळवता येईल आणि पुढच्या वर्षी साठी वापरता येईल. आणि एवढा शाडू वापरला नाही तर त्या ऐवजी साडेसहाशे टन प्लास्टर ऑफ पॅरिस वापरले जाईल आणि त्यामुळे होणारे जलस्त्रोतांचे नुकसान कितीतरी पट मोठे असेल! घरातील एका मूर्तीचे गणित म्हणूनच गणेशोत्सवाच्या अनेक मूर्तींच्या गणितापेक्षा वेगळे नसते, फक्त आवाका लक्षात घेता आला पाहिजे. त्याप्रमाणे कृती करणे अधिक महत्त्वाचे आहे. ज्यांना शक्य आणि मान्य असेल त्यांनी धातूच्या मूर्ती बनविल्या तर त्याचाही पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल. धातूच्या मूर्तींचे विसर्जन घरातच पाण्याच्या टब किंवा बादलीत करून ती पुन्हा ठेवून दिली की काम झाले.
मातीची मूर्ती करून त्यात प्राणप्रतिष्ठा केली आणि उत्सवाचा कालावधी पूर्ण झाल्यावर तिचे विसर्जन करून ती मातीलाच मिळाली तर त्यातून पर्यावरणास नक्कीच धोका निर्माण होणार नाही. मूर्ती आकर्षक बनविणे हा मानवी मनाचा स्थायीभाव असतो. शाडूची किंवा मातीची मूर्ती अधिक आकर्षक बनविण्यासाठी योग्य रंगसंगती वापरली तर ते अधिक परिणामकारक होईल. हे रंग वापरतांना ते पर्यावरणपूरक आहेत की नाही याची खातरजमा करून घेण्याची आवश्यकता आहे. वनस्पतीजन्य रंग हे पर्यावरणपूरक असतात. पण संश्लेषित केलेल्या रंगांमध्ये धातुमिश्रित तत्वे किंवा घातक रसायनांचा समावेश असेल त्याचा अनिष्ट परिणाम पर्यावरणावर होतो. मूर्तीचे विसर्जन पाण्यात होत असल्याने ह्या प्रदूषणाचा पहिला फटका जलचर सृष्टीला बसतो. जेंव्हा अशा अनेक रंगीत मूर्तींचे विसर्जन नदीत किंवा समुद्रात होते, तेंव्हा या प्रदूषित रसायनांचा आणि जड धातूंचा एकत्रितपणे अनिष्ट परिणाम त्या ठिकाणच्या जलचर सृष्टीलाच भोगावा लागतो.
सार्वजनिक गणेशोत्सव साजऱ्या करणाऱ्या मंडळींचा मोठमोठ्या मूर्ती बनविण्याकडे कल असतो. गेल्यावर्षी त्या मंडळाने २०’ उंच मूर्ती बनविली, आपण यावेळी २५’ उंच करू, या ईर्षेने मूर्तींची उंची वाढत चालली आहे. शाडूच्या मोठ्या मूर्ती भंगण्याची शक्यता अधिक असते, म्हणून प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणजे कॅल्शियम सल्फेटपासून मूर्ती बनविण्यास सुरुवात झाली. या मूर्ती दणकट असतात आणि सहसा भंगत नाहीत. त्यात डिंक किंवा त्यासदृश चिकट गोष्टीही वापरल्या जाऊ शकतात. मोठ्या मूर्ती रंगविण्यासाठी लागणाऱ्या रंगद्रव्याचे प्रमाण अधिक असणारच असते. तसेच अधिक आकर्षक दिसण्यासाठी तैलरंगांचाही वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो. या मोठ्या मूर्ती घडविण्यासाठी कलाकारांना त्या सोबत बराच वेळ राहावे लागते. जर पर्यावरणपूरक माती आणि रंग वापरले जात असतील तर त्या कलाकारांच्या आरोग्यासाठी ते महत्वपूर्ण ठरते. पण जर विषारी रसायनांचा समावेश त्यात असेल तर कलाकारांना त्याचे अनिष्ट परिणाम कदाचित आयुष्यभरासाठीदेखील भोगावे लागतात. पापी पेट का सवाल है, म्हणून ते काम त्यांना टाळता येत नाही, ते दृश्य परिणाम लगेच होणार असतातच असे नाही, त्यामुळे कारखानदार तिकडे काणाडोळा करतात. अंतिम परिणाम मात्र या कलाकारांवर होतात. मातीच्या मूर्तींचे विसर्जन केल्यावर त्यांचे विघटन पाण्यात जलदीने होऊ शकते. पण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर त्यांचे विघटन लगेच होत नाही. मूर्ती मोठ्या असतील तर पाण्यात टाकल्यावर त्यांचे तुकडे होतात, पण विघटन होत नाही. समुद्राच्या लाटांबरोबर हे तुकडे किनाऱ्यावर समुद्र परत फेकत राहतो. ते दृश्य अतिशय विदारक असते. संवेदनशील व्यक्तीचे काळीज त्यामुळे हलते. आपण पूजा केली तीच ही मूर्ती होती, असे मनात आल्याशिवाय राहात नाही. हे असे होत आहे, याची जाणीव त्यांना विविध माध्यमातून करून देण्याची गरज आहे. नाहीतर दृष्टी आड सृष्टी असे होऊन ते लक्षात येत नाही.छोट्या छोट्या मूर्ती करण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरण्याची गरज नाही. त्यासाठी फक्त शाडू मूर्ती करण्याची परवानगी द्यायला हवी. प्लॅस्टर ऑफ पॅरिस फक्त मोठ्या मूर्तींसाठी वापरावे. त्यांची कमाल उंची किती असावी ह्याची मर्यादा ठरवावी लागेल. साधारण बारा फूट ही उंचीची मर्यादा ठरवावी. अशा मूर्तींची वाहतूकही सुरळीतपणे होऊ शकते. सर्वच मूर्तींसाठी वनस्पतीजन्य रंग शक्तीचे करायला हवेत गणपती विसर्जनासाठी प्रत्येक ठिकाणी कृत्रिम तलाव आवश्यक बनले आहेत. विहिरींमध्ये किंवा नदीत किंवा समुद्रात गणपतीचे विसर्जन करू नये कृत्रिम तलावातील पाणी मूर्तींचा भाग वेगळा केल्यानंतर जिथे शक्य असेल तिथे एफ्ल्यूएंट ट्रीटमेंट प्लांट म्हणजे सांडपाण्यासाठी प्रक्रिया केंद्रामध्ये प्रक्रिया करूनच ते नदीत किंवा नाल्यांमध्ये सोडावे.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांवर म्हणजे नदी किंवा समुद्रात करणे टाळण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या मूर्तींचे विघटन सहजपणे होत नसल्याने
१. विखंडीत झालेले मूर्तीचे भाग इतस्ततः विखुरले जाऊन विदारक दृश्य दिसते
२. या विघटन न होणाऱ्या पण विखंडीत होणाऱ्या मूर्तींमुळे नैसर्गिक जलस्रोतांच्या तळाशी गाळ घट्ट होत राहतो.
३. संश्लेषित रंग जर या मूर्तींच्या रंगरंगोटीसाठी वापरलेले असतील तर ती घातक रसायने पाण्याचे प्रदूषण घडवितात. विशेषतः त्यातील जड धातू अन्नासाखळीत येऊन त्यांचा अनिष्ट परिणाम सजीवसृष्टीवर होतो. संश्लेषित रंग हे पारा, शिसे, क्रोमियम, तांबे, सोडियम क्लोराईड, टोल्युइन किंवा बेंझिन या रासायनिक संयुगांपासून बनवले जातात. हे मानवांसाठी हानिकारक असल्याचे विविध संशोधनांमधून सिद्ध झाले आहे. त्यांचा पर्यावरणावरही घातक परिणाम होऊ शकतो. प्रक्रिया न केलेला रंग थेट जलस्रोतांमध्ये प्रदूषण करतात. शिवाय, रंगीकरण प्रक्रियेदरम्यान, वापरलेले रंग मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडले जाते. आजूबाजूच्या जलप्रणालीमध्ये या विषारी रसायनांमुळे आरोग्य समस्या उद्भवू शकतात, जलचर जीव नष्ट होतात आणि आसपासच्या शेतांचे प्रदूषण होऊ शकते.
४. पाण्यात मिसळलेले संश्लेषित रंग त्याची पारदर्शकता कमी करतात, त्यामुळे पाण्यात पडणारा प्रकाश शोषला जातो, त्यामुळे पाण्यातील वनस्पतींच्या प्रकाशसंश्लेषणावर परिणाम होतो. त्याचा परिणाम होऊन पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन कमी होतो. त्याचे अनिष्ट परिणाम जलचर वनस्पती आणि प्राणी या दोघांसाठीही घातक असतो.
५. या प्रदूषणामुळे तसेच निर्माल्याचे विसर्जन मूर्तीबरोबर केले तर त्यामुळेही जलचर सृष्टीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो.
या विविध कारणांसाठी गणेशोत्सवामध्ये विसर्जनासाठी कृत्रिम तलाव आणि निर्माल्याचे जैविक विघटन घडवून आणण्यासाठी निर्माल्य कलश या दोन्हींची व्यवस्था करणे अतिशय गरजेचे आहे. त्या व्यवस्था आहेत ह्याची खात्री करूनच मंडळांना गणेशोत्सवासाठी परवानगी द्यावी. त्यामुळे जलप्रदूषण आपल्याला शत प्रतिशत शून्य करता येईल. कृत्रिम तलावांमध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन झाल्यावर ठराविक मुदतीनंतर (तीन ते चार दिवस) त्या तलावातून विसर्जित मूर्तींचे भाग गोळा करून त्यातील प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर करण्यासाठी प्रक्रिया केंद्रे उभी करावीत. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत मूर्तिकारांच्या मदतीने हे केंद्र चालविण्यासाठी काय धोरण राबविता येईल हे पाहणे अतिशय गरजेचे आहे. तांत्रिक दृष्ट्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या विखंडीत मूर्ती २०० अंश सेल्सियस पर्यंत तापविल्या तर त्यातील पाणी निघून जाते व कोरड्या मूर्तींमधून पुन्हा प्लॅस्टर ऑफ पॅरिसची भुकटी (पावडर) मिळू शकते. ह्याचा पुनर्वापर भविष्यात मूर्ती बनविण्यासाठी करता येऊ शकतो. शाडूच्या मूर्तींसाठी वेगळा तलाव करण्याची गरज नसते. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे भाग वेगळे केले की उरलेला गाळ वाळवून त्यातील माती पुन्हा एकदा वापरता येते. तलावातील पाणी वेगळे करून सांडपाणी प्रक्रिया केंद्रात पाठवायचे आहे. या सम्पूर्ण योजनेचे नियंत्रण महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाच्या अखत्यारीत राहील. त्यासाठी निधीची तरतूद करावी लागेल. प्रत्येक गावात स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना मार्गदर्शक तत्वे घालून देऊन त्यासाठी राज्यसरकारतर्फे काही निधी उपलब्ध करून दिला जावा. मूर्तींच्या पुनर्वापर करण्यासाठी मूर्तिकारांना विश्वासात घेऊन EPR (extended producers responsibility) प्रणाली लागू करता येईल का, याचाही विचार होणे गरजेचे आहे.
निर्माल्याचे जैविक विघटन घडवून आणण्यासाठी प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने कलश उपलब्ध करून देऊन गावातील कचरावेचक संघटनेतर्फे ह्या निर्माल्याचे जैविक खत करावे. त्यासाठी जमा होणाऱ्या निर्माल्यातील प्लॅस्टिक, धागेदोरे, कलाबतू इत्यादी विघटन न होणाऱ्या गोष्टी वेगळ्या करून मिक्सरमध्ये ते बारीक करून त्याचे खत बनविण्याची व्यवस्था केली पाहिजे. निर्माल्य कलश तयार करतांना तो मातीचा बनवावा, किंवा मोठे प्लॅस्टिकचे ड्रमस त्यासाठी वापरता येतील. बनवितांनाच ह्या कलशाचा किंवा ड्रमसचा तळ सच्छिद्र करावा. त्यामध्ये १/३ भाग सेंद्रिय खत आणि कोकोपीट मिसळून हा कलश बारीक केलेले निर्माल्य टाकण्यासाठी वापरले तर खत बनण्याची प्रक्रिया जलद घडून येईल. या कचरावेचक संघटनेच्या कामगारांना गणेशोत्सव मंडळांनी योग्य तो मोबदला देण्याची सोय करावी. तसेच खताचा वापर योग्य पद्धतीने होईल अशी उपाययोजना करण्याची जबाबदारी गणेशोत्सव मंडळाने घ्यावी.
गणेशोत्सवात मूर्ती आणि निर्माल्य यांच्याबाबतीत योग्य काळजी घेऊन त्यामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी ज्या उपाययोजना करायच्या त्या सारांशाने अशा असतील
१. घरगुती वापरासाठी ज्या छोट्या मूर्ती (१ ते ३’ उंची) बनवायच्या आहेत, त्या फक्त शाडूच्याच बनविण्याची परवानगी असावी. समाजप्रबोधन करून घरगुती वापरासाठी धातूच्या मूर्तींचा वापर वाढविण्याचा प्रयत्न करावा.
२. मोठ्या मूर्ती (३फुटांहून अधिक आणि १२’ कमाल उंची) प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या बनविता येतील. गणेशोत्सव मंडळांनाच अशा मूर्तींसाठी परवानगी देण्यात येईल. विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावाची सोय असणे ही त्यासाठी पूर्व अट राहील. कृत्रिम तलावाच्या उपलब्धीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची असेल. कृत्रिम तलावांची निर्मिती करतांना नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांपासून हे तलाव सुरक्षित अंतरावर असतील ही खात्री करून घ्यावी. कृत्रिम तलाव २०’ x २०’ x ८’ यापेक्षा मोठे नसावेत.
३. मूर्ती रंगविण्यासाठी फक्त वनस्पतीजन्य रंगांचाच वापर करण्यात यावा.
४. कृत्रिम तलावातून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या पुनर्वापरासाठी मूर्तिकारांच्या सहकार्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यंत्रणा उभी करावी.
५. गणेशोत्सवाला परवानगी देतांना निर्माल्य कलश बसविणे सक्तीचे करावे, आणि त्यावर योग्य अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवून त्याचा नीट वापर सुनिश्चित करावा.
६. निर्माल्य खताचा वापर योग्य प्रकारे करावा.
याशिवाय गणेशोत्सवात आणखी जे प्रदूषण होते ते म्हणजे ध्वनी प्रदूषण आणि आरास व सजावटीसाठी ज्या गोष्टी वापरल्या जातात, त्यांच्या वापरानंतर होणारे प्रदूषण. आजपर्यंतच्या अनुभवातून ध्वनी प्रदूषणावर मोठ्या शहरांमधून योग्य उपाययोजना होत असल्या तरी मध्यम आणि लहान शहरांमध्ये किंवा तालुका किंवा गावपातळीवर या समस्येची तीव्रता अधिक असते. कायदा धाब्यावर बसविणार मंडळी गणेशोत्सवात भूमिका बजावत असतील, तर समस्येचे समाधान तर सोडाच, समस्येविषयी बोलणेदेखील अवघड होऊन बसते. त्याविरुद्ध आवाज उठविलाच, तर त्याची शिक्षा सुद्धा मिळू शकते! ह्यावर मात करण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम झाली पाहिजे आणि गावपातळीवर उत्सव समित्यांकडूनच हे प्रयत्न झाले पाहिजेत. सजावटीच्या सामानात, तसेच प्रसादासाठी डिस्पोजेबल म्हणजे ” वापरा आणि फेका” अशा गोष्टींवर बंदी घालणे श्रेयस्कर राहील. विशेषतः थर्मोकोल, पातळ प्लॅस्टिकच्या पिशव्या, थर्मोकोल कप्स, डिशेस, प्लॅस्टिक डिशेस यांच्या वापरावर पूर्ण बंदी घालावी. तशी पूर्व अट प्रत्येक मंडळाला पूर्वपरवानगी देण्यासाठी घालण्यात यावी. या अटींचे पालन कसोशीने करावे. यासाठी उत्सव समितींच्या मार्फत प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
(विज्ञानधारा सप्टेंबर २०२३)

********

🙏 आज गणेश चतुर्थी 🙏

श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना श्री गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा!!! 🎉

श्रीगणेशाच्या आगमनाने सारे काही मंगलमय व्हावे आणि बाप्पा तुझे वास्तव्य कायमच आमच्या घरात तसेच आमच्या मनात, देहात कायम आहे याची जाणीव आम्हाला सदैव राहावी.

आम्हाला जे जे काही मिळेल ते ते सारे तुझा कृपा प्रसाद व्हावे.

आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना…

🙏 वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।।
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा।।🙏

💐।। ॐ गं गणपतये नमः।।💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

श्रीरंग घारे, पुणे

श्रीरंग घारे

Shrirang Ghare:

त्रिशुंडि गणेश हा शोभिवंत
देखिला नयनि आम्ही
पुण्यवंत
कृष्ण पटलि रेखियलि
ही मूर्ती
आगळी वेगळी दिसतसे
ही शामल मूर्ती
जागृति सुषुप्ति तुझेचि
बा ध्यान
सकलांचा त्राता तूच
गजानन
आळवू तुजला नित
रात्रंदिन
नांदतसु इथे सुखे
तव कृपेनं.
विठू सावळा
शाम सावळा
आज आमचा
गजानन सांवळा

. . . .

लंबोदरा एकदंता
शुर्पकर्ण वरदहस्ता
नाना विध शस्त्रास्त्रा
देवा तू धारण करिसि
भक्तांचे अरिष्ट हरिसि
सुख संपदा उन्नतीची
पुरवि आस भक्तांची
ऐसा कृपाळू देवा तू
सकलांचा त्राता तू
तुज नमू तुज नमू
गजवदना गजानना

. . .

Shrirang Ghare:

आज कावेच्या रंगी रंगला गणनायक

क्षेपित वलयरेषा
अंगप्रत्यंगातुन

झळाळे तेजप्रभेने
विलोभनीय गजवदन

नयनातुन वर्षे प्रेम बंध
सकलामिळो हा स्नेहबंध

भक्ति ने हीच विनवणी
करितसु तव चरणी

मयुरेशा श्री गजानना
पुरवा आमुचि कामना
Shrirang Ghare: आज आमच्या घरच्या श्री.गणेशाचे विसर्जन होणार.
गणेश स्तवन पुष्प रोज अर्पण करावे ही इच्छा श्री.गणेशाने पूर्ण करवून घेतली.
ओं गंगणपतये नम:

श्रीरंग घारे

तू सुखकर्ता
तू दुःखहर्ता..
हे गणेशा गौरीनंदना वंदन तुज करितो
दे आम्हाला अभय उद्याचे हेच एक मागतो
आज भुवरी सकल दिशांनी तांडव ते सारे
काय करावे कुठे पहावे आम्हा नच ठावे..
हे गणेशा गौरीनंदना वंदन तुज करितो
तूच विधात्या सांग ईश्वरा शरण कुणाशी जावे
त्याच राऊळा उभा राहूनी नतमस्तक व्हावे ..
हे गणेशा गौरीनंदना वंदन तुज करितो
आजपासूनी तुझी प्रार्थना मनात मी करतो
जनात आहे तुझीच मूर्ती मनात ती स्मरतो..
हे गणेशा गौरीनंदना वंदन तुज करितो
दे आम्हाला अभय उद्याचे हेच एक मागतो

– सुभाष इनामदार, पुणे

. . . . . . .. . . .

या गणपतीमध्ये भारतातल्या निरनिराळ्या राज्यांची नावे गुंफलेली आहेत.

जय,जय,जय गणपति भगवान

विघ्न हरण,मंगल करण श्री गणेश भगवान
रिद्धि सिद्धि संग आइ ये तुमको करें प्रणाम।
जय, जय , जय गणपति भगवान।
जय, ज य, जय गणपति भगवान।।
आ ओ भोग लगाओ भगवन रखें हैं मेवा और मिष्ठान
धूप,दीप,नैवेद्य चढावें करें आरती सुबह और शाम।
जय, जय, जय गणपति भगवान।
जय, जय, जय गणपति भगवान।।
मात,पिता सर्वोपरि समझे उनमें देखा सारा जहान
प्रथम पूज्य हो इसीलिए तुम सब देवों ने दिया वरदान।
जय, जय, जय गणपति भगवान।
जय, जय, जय गणपति भगवान।।
पूर्ण करो इच्छाएं सबकी पूर्ण करो तुम सबके काम
शुभ लाभ के संग में आके कृपा करो हे कृपा निधान।
जय, जय, जय गणपति भगवान।
जय, जय, जय गणपति भगवान।।
गोपी साजन,,

पार्वतीचा गणपतीला उपदेश
ह्या बघ आजयेच्या घराकडे जातस..नीट जा हा आणि मुख्य म्हणजे थंय गेल्यावर अजिबात मस्ती करायची नाय. एका जाग्यावर बसान रवायचा. माका कोणी विचारल्यान तर मी चवथ्या दिवशी येतलय म्हणून सांग. आजवळाक गेल्यावर नवीन वस्तू मागू नको हा, मागच्या वर्षीचा चलात म्हणून सांग हा. फक्त उगाच जास्त नको म्हणून सांग हा, ते लाड लाड करीत रवतले

निवेदाक येळ लागलो तर शांत बस हा बाबू.. आणि हा निवेदाचा ताट इल्यावर संपवून टाक हा, तू जेवच पण उंदीरमामा जेवलो काय त्यावर तूच लक्ष दि हा. परत सांगतय आजवाळचे लोक कामात असतले, तू हट्ट नको हा करु कसलो !

आरतीवाले आणि भजनावाले येतले त्या प्रत्येकाक प्रसाद आणि खावक गावला काय ता तू स्वतः बघ, घरातले गडबडीत असतले तू जरा मदत कर हा. आणि हा घरात कोण नसताना तुका बघुक पावणे इले तर त्यांच्यावर लक्ष ठेव ! तोरणाच्या ब्लपच्या जवळ जावं नको हा, आणि एकाच काडयेवर धा बारा तोरणा असतली तेव्हा जरा जपान.. आजवळाक लहान लहान बाबू असतले. त्यांच्यावर बारीक लक्ष ठेव. तुका पाया पडाक म्हणान येतले आणि फटाकरे लावक अगरबत्ती पळवन घेवन जातले.

दिवस कमी आसतले, जो जो समोर येयत त्या प्रत्येकाचा म्हणना आयकायचा आणि ती घरात बसलेली आजी असतली तिका काम संपली की तुझ्यासमोर दोन मिनिटांसाठी वायच बस गे म्हणून बोलवन आणायचा. कशी आसस गे, दमलस काय गे, मी येव काय मदतीक असा ईचारायचा, तिका मदत लागणा नाय, पण कोणी ईचारल्यावर तिका बरा वाटता ना !

आणि हा, सगळ्यांका सांग मनापासून कायता करा, उगाच म्हागायच्या नादात पयशे सरव नको, त्यापेक्षा सगळे बोला माझ्याशी, ताच खूप हा.. तू पण प्रत्येकाशी बोल, समोरच्याक बोलतो कर..

नीट जा, येताना मी आसान पण तू येताना शिदोरी घेवन ये आठवणीन.. बाकी आमचो सगळ्यांचो लक्ष हा तुझ्यावर..फक्त दिवस उगाच लवकर सरव नको, पूरवन वापरुक सांग सगळ्यांका.. आणि हा खबरदार, जाताना बारक्यांका रडवलस तर !

जा सगळा घर तुझा हा. मठीचा देऊळ करून ये”

लेखन – ऋषी श्रीकांत देसाई

अथर्वशीर्ष म्हणजे काय…?

अथर्वशीर्ष

थर्व म्हणजे हलणारे आणि
अथर्व म्हणजे ‘ न हलणारे
शीर्षम् ‘ !!

सुलभ भाषेत सांगायचं म्हणजे
अथर्वशीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी
असलेलं मस्तक…!!

अथर्वशीर्षाचं पठण केलं, की
बुद्धी आणि मन स्थिर होतं.

स्थिर आणि निश्चयी बुद्धीने केलेलं कांम हे नेहमी यशस्वी होतं.
आत्मविश्वास वाढू लागतो, माणूस नम्र होतो.
अथर्वशीर्ष पठणामुळं मन एकाग्र होतं.
आपल्या मनाची ताकद वाढविणं,हे आपल्याच हातात असतं.
माणसाचं मन ही मोठी विलक्षण गोष्ट आहे.
शरीराबरोबरच मन कणखर असलं तर मग आपण
संकटांवर मात करू शकतो.

तुम्ही कधी अथर्वशीर्षाचा पाठ म्हटला आहे कां ? एकदा तरी अनुभव घेण्यास हरकत नाही.
तुम्ही श्रद्धाळू असाल, तर माझं हे म्हणणं तुम्हाला नक्कीच पटेल. जर तुम्ही श्रद्धाळू नसाल,आणि प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत असाल,तरीही अथर्वशीर्ष तुम्हाला नक्कीच आवडेल.
कारण अथर्वशीर्षामध्ये गणेश
म्हणजे या विश्वातील निसर्ग…!!
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि
आकाश या पंचमहाशक्तीच
आहे, असे म्हटले आहे.

हा निसर्ग म्हणजेच ईश्वर हे
म्हणणं तुमच्या वैज्ञानिक
दृष्टीकोनाला नक्कीच पटेल.
या निसर्गाला आपण जपलेच
पाहिजे.
तरच निसर्ग आपणांस जपेल असेही म्हणतां येईल.

अथर्वशीर्षाचा अर्थ

मूळ श्रीगणपती अथर्वशीर्ष
संस्कृतमध्ये आहे.
आपण आज त्याचा मराठी अनुवाद पाहू या.

‘हे देवहो, आम्हांला
कानांनी
शुभ ऐकायला मिळो. डोळ्यांनी
चांगलं पाहावयास मिळो.

सुदृढ अवयवांनी आणि शरीरांनी
देवानं (निसर्गानं) दिलेलं आयुष्य देवाच्या (निसर्गाच्या) स्तवनांत व्यतीत होवो.

सर्वश्रेष्ठ इंद्र आमचं रक्षण करतो.
ज्ञानवान सूर्य आमचं कल्याण
करतो.
संकटांचा नाश करणारा गरूड आमचं कल्याण करतो.
बृहस्पती आमचं कल्याण करतो.
सर्वत्र शांती नांदो…!!

ॐकाररूपी गणेशाला नमस्कार असो.
तूच ब्रह्मतत्त्व आहेस.
तूच सकलांचा कर्ता(निर्माता)
आहेस. तूच सृष्टीचे धारण करणारा, पोषण करणारा आहेस.
तूच सृष्टीचा संहार करणाराही
आहेस. हे सर्व ब्रह्मस्वरूप
खरोखर तूच आहेस.
तूच नित्य प्रत्यक्ष आत्मस्वरूप आहेस.

मी योग्य तेच बोलतो, मी खरं
तेच बोलतो. तू माझे रक्षण कर.
तुझ्याबद्दल बोलणाऱ्या माझं,
तू रक्षण कर. तुझे नांव श्रवण
करणाऱ्या माझं तू रक्षण कर.
दान देणाऱ्या अशा माझं तू
रक्षण कर. उत्पादक अशा,
माझं तू रक्षण कर.
तुझी उपासना करणाऱ्या शिष्याचं रक्षण कर.

माझं पश्चिमेकडून रक्षण कर.
माझं पूर्वेकडून रक्षण कर.
माझं उत्तरेकडून रक्षण कर.
माझं दक्षिणेकडून रक्षण कर.
माझं वरून रक्षण कर.
माझे खालून रक्षण कर.
सर्व बाजूनीं, सर्वप्रकारे तू
माझं रक्षण कर.

तू वेदादी वाड॒.मय आहेस.
तू चैतन्यस्वरूप आहेस.
तू ब्रह्ममय आहेस.
तू सत् , चित् , आनंदस्वरूप,
अद्वितीय आहेस.
तू साक्षात ब्रह्म आहेस.
तू ज्ञानविज्ञानमय आहेस.

हे सर्व जग तुझ्यापासूनच
निर्माण होतं. हे सर्व जग
तुझ्या आधारशक्तीनेच
स्थिर राहातं.
हे सर्व जग तुझ्यातच लय पावतं,
हे सर्व जग पुन्हा तुझ्यापासूनच उत्पन्न होतं.
पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश ही पंचतत्त्वे तूच आहेस.
तसेच परा, पश्यन्ती, मध्यमा
आणि वैखरी या चार वाणी तूच आहेस.

तू सत्त्व, रज आणि तम या
तीन गुणांपलीकडचा आहेस.
तू स्थूल, सूक्ष्म आणि आनंद
या तीन देहांपलीकडचा आहेस.

तू भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही काळांच्या पलीकडचाआहेस.
तू सृष्टीचा मूल आधार
म्हणून स्थिर आहेस.

तू उत्पत्ती, स्थिती आणि लय
या तीनही शक्तींच्या पलीकडचा आहेस.
योगी लोक नेहमी तुझं
ध्यान करतात.

तूच ब्रह्मा,तूच विष्णू, तूच रुद्र,
तूच इंद्र, तूच भूलोक,
तूच भुवर्लोक, तूच स्वर्लोक आणि
ॐ हे सर्व तूच आहेस.

गण शब्दातील आदि ‘ ग् ‘
प्रथम उच्चारून नंतर ‘अ ‘चा
उच्चार करावा.
त्यानंतर अनुस्वाराचा उच्चार करावा.
तो अर्ध चंद्राप्रमाणे असावा.
तो तारक मंत्रानं ॐ कारानं
युक्त असावा. हा संपूर्ण मंत्र
‘ॐगं ‘ असा होतो.

हे तुझ्या मंत्राचं स्वरूप आहे.
‘ग्’ हे मंत्राचे पूर्व रूप आहे.
‘ अ’ हा मंत्राचा मध्य आहे.
अनुस्वार हा मंत्राचा कळस आहे.
अर्धचंद्राकार बिंदू हे उत्तर रूप आहे.
या गकारादी चारांपासून एक नादतयार होतो. हा नादही एकरूप होतो.
ती ही गणेशविद्या होय.

या मंत्राचे ऋषी ‘ गणक ‘ हे होत.
‘निचृद् गायत्री ‘ हा या मंत्राचा छंद होय.
गणपती ही देवता आहे.

‘ॐ गंं ‘ ह्या मंत्ररूपानं दर्शविल्याजाणाऱ्या गणेशाला माझा नमस्कार असो.
आम्ही त्या एकदंताला जाणतो.
त्या वक्रतुण्डाचं ध्यान करतो.
म्हणून तो गणेश आम्हाला
स्फूर्ती देवो.
ज्याला एक दात असून पाश,
अंकुश व दात धारण केलेले तीन हात आणि वर देण्यासाठी चौथाहात आहे. ज्याचे उंदीर हे वाहन आहे. ज्याच्या शरीराचा रंग लाल
असून पोट मोठे आहे, कान
सुपासारखे आहेत, ज्याने लाल रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत,
अंगाला लाल चंदन लावले आहे,
ज्याची लाल रंगाच्या फुलांनी पूजा केली आहे, भक्तांविषयी पूर्ण दया असलेला, अविनाशी, सृष्टीच्या आधी निर्माण झालेला, प्रकृतिपुरुषाहून वेगळा असलेला,अशा गणेशाचे जो ध्यान करतो,तो सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ होय.

व्रतधारिणांच्या प्रमुखांना,
व्रातपतीस नमस्कार असो.
देवसमुदायांच्या अधिपतीला
नमस्कार असो,
शंकरगणसमुदायाच्या
अधिपतीला प्रमथपति
नमस्कार असो,
लंबोदर, एकदंत, विघ्ननाशी,
शिवपुत्र, वरदमूर्ती अशा
गणपतीला माझा नमस्कार
असो.

हजारो वर्षांपूर्वी रचलेल्या या
गणपती अथर्वशीर्षाचा हा मराठी अनुवाद जरी वाचला, तरी त्या रचनाकाराच्या बुद्धिमत्तेचं आश्चर्य वाटतं आणि बरोबरच त्यालाही
नमस्कार करण्यासाठी आपले हात सहजपणानं, आदरानं जोडले जातात…!!

🙏🌹🙏

श्रीमंत ऐश्वर्यवान गौड सारस्वत गणपती, माटुंगा, मुंबई

🔆ॐ गं गणपतये नमः🔆

⚜🌹⚜🌸🙏🌸⚜🌹⚜

प्रारंभी विनंती करू गणपति
विद्यादया सागरा ।
अज्ञानत्व हरोनी बुद्धी मती दे
आराध्य मोरेश्वरा ॥
चिंता क्लेश दरिद्र दु:ख
अवघे देशांतरा पाठवी ।
हेरंबा गणनायका गजमुखा
भक्तां बहु तोषवी ॥

सध्या घरोघरी मुलांकडून मनाचे श्लोक.. रामरक्षा.. गीता, अथर्वशीर्ष तसेच अनेक श्लोक पाठ करुन घेणे सुरू आहे. कारण.. कारण आता बाप्पा येणार. तेव्हा होणाऱ्या स्पर्धेत मुलांचा सहभाग हवाच.
देशातील सर्वात मोठ्या उत्सवाची.. गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सार्वजनिक गणेशोत्शोत्सव मंडळांचे मांडव बांधले जात आहेत, रोषणाई, सजावट, देखावे याची मंडळात लगबग सुरू आहे. मोठ्या गणेश मूर्तीवर रंग देत दागदागिने चढवले जात आहेत. घरी स्थापन करण्यासाठी श्रींच्या देखण्या, सुबक, सुंदर मूर्ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एकुण काय तर सर्वत्र उत्साही मंगलमय वातावरण आहे.
गणेश मंडळात नेतृत्व गुण विकसीत होतात. जगाचे व्यवहार लहान मुलांनाही कळतात. सामाजिक दायित्व कळते. सामाजिक एकता शिकली जाते. भारतीय संस्कृतीतील लोककलांचे दर्शन घडते.. जोपासना होते.

पण या उत्सवाची खरी ओळख आहे ती कलावंताना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी. श्री गणेश हे चौदा विद्या चौसष्ट कलांचे अधिपती. या कलागुणाचे दर्शन या उत्सवात होणार आहे
आजवरच्या बहुतांशी नामवंत गायक, नाट्यकलावंत.. अभिनेते म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांचा पहिला प्रवेश गणेशोत्सवातील कार्यक्रमातच झालाय. गणेशोत्सवात चित्रकला.. नाट्यकला.. गायन, वक्तृत्वकला, रांगोळी, श्लोक स्पर्धा, एकपात्री प्रयोग, नकला, कवी संमेलन, नृत्य, संगीतखुर्ची सारख्या विविध स्पर्धा.. पाककला अशा अनेक स्पर्धातून मुलांना व्यासपीठ मिळते.. संधी मिळते. नवनवे कलावंत निर्माण होतात. मराठी नाटकांना गणेशोत्सवाने नेहमीच मोठी साथ दिलीय. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.. असे म्हणतात, याचे प्रत्यंतर गणेशोत्सवात येते. नामवंत वक्त्यांची भाषणे ज्ञानात भर टाकतात.

एकूणच सर्वच सुप्त गुणांना जागृत करणारा.. भविष्यकाळातील मोठे कलावंत निर्माण करणारा हा उत्सव. आपणही आपल्या घरात लपलेल्या कलावंतांचा शोध या उत्सवातून घ्या.
या उत्सवावर पहिला हक्क आमच्या कोकणाचा. जणू दिवाळीच. कोकणात घरोघरचे पाट आधीच गणेशमूर्ती तयार करायला दिले आहेत. पावसाळी हवेने घरात निर्माण झालेला दमटपणा जावा म्हणून स्वच्छता झालीय. गावोगावची भजनी मंडळे सर्व वादन समुग्रीची डागडुजी करून जय्यत तयारीत आहेत. कोकणवासी येणाऱ्या चाकरमान्यांच्या स्वागतास सिद्ध झालेत. निर्विघ्नपणे गणेशोत्सव साजरा करण्यास सर्व प्रशासन सज्ज झालेय.
कलेमध्ये पाककला महत्त्वाची. याबाबतीत भारतीय गृहिणींची बरोबरी जगात कुणी करु शकत नाही. मग स्वहस्ते उकडीचे, पुरणाचे, नारळाचे, खव्याचे अशा विविध प्रकारच्या मोदकाची तयारी सुरू आहे.

विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तूंनी बाजार फुललेत. गणेशोत्सवाने बाजारात तेजी आलीय. सर्वांना श्री चे दर्शन हवे आहे. पण हे आव्हान गणेश मंडळे जास्त वेळ देखावे दाखवून गर्दीवर नियंत्रण मिळवतील ही आशा.
श्री च्या भक्तीने सर्व दैन्य.. दुःख.. दारिद्रय.. संकटे यांचा नाश होण्यासाठी, सौख्य.. समृद्धी.. समाधान.. आरोग्य प्राप्तीसाठी.. जीवन यशस्वी होण्यासाठी या पंचरत्न स्तोत्राचे पठन केले जाते. भक्त श्रीं च्या अंगभुत गुणवैशिष्टासह स्मरण करुन त्याला शरण जातात.
जो मुक्तीदाता आहे. ज्याच्या शिरी चंद्रमा आहे. ज्याने गजासुर दानवाचा वध केलाय.. जो पापाचा विनाश करतो.. ज्याचा राक्षसही सन्मान करतात.. सर्व अपराध पोटी घेत क्षमा करण्याचे औदार्य ज्याचे ठायी आहे.. जो आविनाशी आहे.. जो जीवनी सुख.. आनंद प्रदान करणारा बुद्धीदाता आहे.. अशा शिवाच्या पुत्राला नमन करतो. या विघ्नहर्त्याच्या आगमनाने जगातील सगळी उदासीनता.. नैराश्य.. अभद्रता दूर होते, आणि आता ऐकू येणार मन प्रफुल्लीत करणारे हे सुस्वर.. “जयगणेश.. जयगणेश..”

🌹🌿🔆🌸🛕🌸🔆🌿🌹

‼ श्री गणेश पंचरत्न स्तोत्र ‼

मुदाकरात्त मोदकं
सदा विमुक्तिसाधकम्
कलाधरावतंसकं विलासि
लोकरक्षकम् ।
नायकैक नायकं
विनाशितेभदैत्यकम् ।
नताशुभाशुनाशकं नमामि
तं विनायकम् ॥

नतेतरातिभीकरं
नवोदितार्कभास्वरम् ।
नमत्सुरारि निर्जरं
नताधिकापदुद्धरम् ।
सुरेश्वरं निधीश्वरं
गजेश्वरं गणेश्वरं ।
महेश्वरं तमाश्रये
परात्परं निरन्तरम् ॥

समस्त लोकसंकरं
निरस्तदैत्यकुंजरम् ।
दरेतरोदरं वरं
वरेभवक्त्रमक्षरम् ॥
कृपाकरं क्षमाकरं
मुदाकरं यशस्करम् ।
मनस्करं नमस्कृतां
नमस्करोमि भास्वरम् ॥

अकिंचनार्तिमार्जनं
चिरन्तनोक्ति भाजनम् ।
पुरारिपूर्व नन्दनं
सुरारि गर्वचर्वणम् ॥
प्रपंच नाशभीषणं
धनंजयादि भूषणम् ।
कपोलदानवारणं भजे
पुराणवारणम् ॥

नितान्तकान्तदन्तकान्ति
मन्तकान्तकात्मजम् ।
अचिन्त्य रुपमन्तहीन
मन्तरायकृन्तनम् ।
ह्रदन्तरे निरन्तरं
वसन्तमेव योगिनाम् ।
तमेकदन्तमेव तं
विचिन्तयामि सन्ततम् ॥

महागणेश पंचरत्नम्
आदरेण योन्वहम् ।
प्रजल्पति प्रभातके
ह्रदि स्मरन् गणेश्वरम् ॥
अरोगितामदोषतां
सुसाहितीं सुपुत्रताम् ।
समाहितायु रष्टभूतिमभ्युपैति
सोचिरात् ॥

🌹🌸🌺🔆🛕🔆🌺🌸🌹

गणपतीची मूळ संपूर्ण आरती

समर्थ रामदास स्वामींनी लिहलेली गणपतीची प्रचलित आरती आपण म्हणतो
ती फ़क्त 2 कड़वी म्हटली जातात
पण मूळ आरती ७ कडव्यांची आहे
ती खालिलप्रमाणे आहे

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुकुुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥

माथा मुकुट मणी कानी कुंडले ।
सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।।
नागबंद सोंड-दोंद मिराविले ।
विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥

चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।
खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।
सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।
अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥

छत्रे चामरे तुजला मिरविती ।
उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।
ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।
आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥

ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।
ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।
ताल मृदंग वीणा घोर उमटती ।
त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना
॥ जय ० ॥ ७ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥

!!गणपती बाप्पा मोरया!!

सौजन्य:- ‼श्रीशक्तीवेदम् ‼

माटी बांधल्यात काय रे?

सौ.शैलजा सहस्रबुद्धे

माटी (मंडपी )हे कोकणच्या समृद्ध नैसर्गिक व सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. गणपतीच्या आसनाच्या वर माटी बांधण्यात येते. यामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींची फळे, पाने, फुले बांधली जातात. हे बांधण्यासाठी लाकडाची माटी वापरली जाते. जी साधारण आयताकृती असते आणि त्यात उभ्या-आडव्या पट्ट्या असतात.
कोकण हे विविध वनस्पतींनी नटलेले आहे. आणि त्यात श्रावण-भाद्रपद महिन्यात येणार्‍या बहाराने ते अजून नटून जाते. माटी बांधण्याचा धार्मिक उद्देश म्हणजे, ही पृथ्वी म्हणजे साक्षात श्री देवी पार्वतीचे रुप आहे आणि ती गणेशाच्या आगमनासाठी विविध वनस्पतींच्या रुपांनी नटली आहे. त्यामुळे याच काळात बहरणाऱ्या वनस्पतींचा वापर माटीमध्ये केला जातो. माटीमधील सर्वात आवश्यक गोष्टी म्हणजे आंब्याचे टाळ, किवनीचे दोर, उतरलेला नारळ, शिप्टा आणि तवसा.

1) आंब्याचे टाळे :- आंबा
Mangifera indica (Anacardiaceae)
माटीमधील सर्वात महत्वाचे झाड म्हणजे आंबा. कोकणात बऱ्याच पवित्र कार्यात आंब्याचे टाळे म्हणजे फांद्यांची डहाळे वापरले जातात. हे टाळे फक्त आंबोलीचेच (रायवळ आंबा) असले पाहिजेत. गारपाच्या (कलमी) आंब्याच्या टाळ्यांचा वापर होत नाही.

2) केवणीचे दोर (किवनीचे दोर) :- केवण / मुरडशेंग
Helicteris isora (Malvaceae)
आंब्याचे टाळे किंवा इतर गोष्टी माटीला बांधण्यासाठी केवणीच्या झाडाच्या सालीचे दोर वापरतात. ही साल खुप मजबूत असते त्यामुळे तीचा वापर केला जातो. केवण हे एक झुडूप आहे. त्याला लाल फुले व पिळदार शेंगा येतात. केवणीच्या शेंगांना मुरडशेंग म्हटले जाते. मुरडशेंग ही लहान मुलांच्या औषधी #सानशी तील एक आहे.

3) उतरलेला नारळ :- नारळ / माड
Cocos nucifera (Arecaceae)
माटीमधील महत्वाचे फळ म्हणजे नारळ. खास माटीसाठी झाडावरून न पाडता तर उतरलेला नारळ वापरला जातो.

4) शिप्टा (कातरो) :- सुपारी / फोफळ
Areca catechu (Arecaceae)
शिप्टा म्हणजे सुपारीच्या फळांचे घोस. यांचाही वापर माटीत प्रामुख्याने होतो.

5) तवसा (काकडी) :- काकडी
Cucumis sativus (Cucurbitaceae)
काकडी ही पावसाळ्यात उगवणाऱ्या भाजांपैकी एक व त्यामुळे माटीत काकडी (तवसा) चा समावेश असतो. तसेच याशिवाय प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार व उपलब्धतेनुसार विविध इतर फळेही माटीला बांधतात. गणेश विसर्जनावेळी नारळ व काकडी कापून प्रसाद म्हणून वाटली जाते.

यांशिवाय माटी रंगीत व आकर्षक दिसावी म्हणून आजुबाजुला उपलब्ध असलेल्या इतर जंगली वनस्पतीही माटीत वापरल्या जातात. यात हरण, कवंडळ, कांगणे, सरवड, आयना, तेरडा, वाघनखी, नरमाची फळे व नागकुड्याची फळे यांचा समावेश होतो.

6) हरण (हराण) :- सोनकी
Senecio bombayensis (Asteraceae)
सोनकी हे एक लहान रोपट असते. त्याला आकर्षण पिवळी फुले येतात. पावसाळ्यात कोकणातील सडे हरणाने भरुन जातात. माटीमध्ये हरण प्रामुख्याने बांधले जाते.

7) कवंडळ (कौंडाळ) :- कवंडळ
Trichosanthes tricuspidata (Cucurbitaceae)
कवंडळ ही एक वेल असते. त्याला पावसाळ्यात पांढरी फुले व लाल गोलाकार फळे येतात. ही कवंडळ फळे माटीत वापरली जातात. त्यामुळे माटी अजून रंगीत बनते.

8) कांगणे (कांगले) :- कांगुणी
Celastrus paniculatus (Celastraceae)
कांगुणी ही एक वेल असते. त्याला गोलाकार पिवळी-केसरी फळे येतात. कांगणीच्या फळांचे घोस माटीत बांधले जातात.

9) सरवड (शेरवाड) :- सरवड
Mussaenda glabrata (Rubiaceae)
सरवड ही एक आधाराने वाढणारे झुडूप आहे. याला भगवी फुले येतात तर याची नवीन पाने पांढरी असतात. त्यामुळे ही पाने माटीत वापरतात.

10) आयना :- ऐन / असन
Terminalia elliptica (Combretaceae)
ऐन हे इमारती लाकडाचे झाड. ऐनाची फळे (आयना) पाच पदराची जरा विचित्रच आकाराची असतात. त्यांचे घोस माटीला बांधले जातात.

11) तेरडा (तिरडा) :- तेरडा
Impatiens balsamina (Balsaminaceae)
पावसाळ्यात बहरणाऱ्या फुलांपैकी एक लहान झाड तेरडा. याची गुलाबी फुले माटीला सुंदर दिसतात.

12) वाघनखी :- कळलावी / वाघनखी
Gloriosa superba (Colchicaceae)
वाघनखी ही वेलवर्गीय कंदमुळ वनस्पती. याची आगीसारखी दिसणारी लाल-भगवी-पिवळी फुले माटीत अजुन रंग भरतात.

13) नरमाची फळे :- नरम / बोंडारा
Lagerstroemia parviflora (Lythraceae)
नरम हे एक मध्यम आकाराचे झाड. याची फळे काही ठिकाणी माटीला वापरली जातात.

14) नागकुड्याची फळे :- नागकुडा
Tabernaemontana alternifolia (Apocynaceae)
नागकुडा हे एक मध्यम झाड. याला तगरीसारखी पांढरी फुले येतात. तर याची पिवळसर केसरी वाकडी फळे माटीत वेगळी दिसतात. काही ठिकाणी यांना वाघनख असे म्हटले जाते.

माटी ही कोकणची एक वेगळीच संस्कृती आहे. निसर्गातच आढळणाऱ्या वनस्पती वापरून माटी सुंदर सजवली जाते. यासंबंधात आळस न करता, आपण ही संस्कृती जपली पाहिजे. आता तर या वनस्पती बाजारात सहज उपलब्ध असतात.

🙏🙏
Dr.Shree Phatak: खूप छान माहिती. आपण गोकाकच्या घरी गणेशोत्सवात अशीच आरास करत असू.फळे फुले व पर्णराजी अर्थात आपल्या शेतातील व सहजपणे जवळपास उपलब्ध असलेली, सुशोभनासाठी वापरत असू. आता अक्षयही,तिथे उपलब्ध असलेली फळे, फुले पाने यानी सजावट करतो.

उकडीचा मोदक

तुम्हाला उत्तम प्रतीचा उकडीचा मोदक बनवायचा असेल तर तुमच्या आयुष्यातला मोठा काळ हा रत्नागिरी, गुहागर, केळशी अशा कुठल्या तरी ठिकाणी जावा लागतो. कारण हाताच्या चवीइतकाच मातीचा सुगंधही इथे महत्वाचा आहे. तसंच, हा पूर्णतः ‘तालमीचा राग’ आहे. यूट्यूब वर बघून हा येऊ शकत नाही. आई, आज्जी, आत्या अशा कुणाकडून तरी त्याची रीतसर तालीम घ्यावी लागते.

आपल्याकडे बाजारात उकडीचा मोदक बनवायचे ‘साचे’ मिळतात. ही ‘चीटिंग’ आहे. हे म्हणजे ऑटोट्युनर वापरून सुरेल होण्यासारखं झालं. जातिवंत खवैयाला असा ‘साचेबद्ध’पणा रुचत नाही.

मोदक हा व्हीआयपी पाहुणा आहे. त्याचं स्वागत टेबल-खुर्चीवर बसून नाही, तर पाटावर मांडा ठोकून करायचं असतं. सोबत आमटी-भात, बटाट्याची भाजी, चटणी वगैरे माननीय पाहिजेतच. मोदक स्वतः सुद्धा येताना कधी एकटा येत नाही, तर ‘निवग्री’ नावाच्या आपल्या धाकट्या बहिणीला घेऊन येतो. निखळ मधुर रसाच्या मोदकाबरोबर निवग्रीची ही चमचमीत जोड हवीच.

तर असा दिमाखात आलेला मोदकराज तुमच्या पानात पडतो, त्यावर साजूक तुपाची धार पडते, आणि त्याचा पहिला घास जेव्हा तुम्ही घेता, त्या वेळी होणाऱ्या भावनेलाच आपल्या संतसज्जनांनी ‘ब्रह्मानंदी टाळी लागणे’ असं म्हणलेलं आहे. यानंतर असते ती केवळ तृप्तीची भावना. खाल्लेले मोदक मोजणं म्हणजे रियाजाचे ‘घंटे’ मोजण्यासारखं आहे. त्याला फारसं महत्व नाही. ‘समाधान’ हेच खरं इप्सित.

बरं, भरपूर मोदक केवळ खाऊन झाले म्हणजे झालं, असं नाही. त्यानंतर संपूर्ण दुपार झोपण्यासाठी राखीव ठेवावी लागते. मुळात, मला ‘सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं ?’ असं कुणी विचारलं तर मी तत्क्षणी सांगीन, ‘दुपारची झोप’!

‘रात्रीची झोप’ हे धर्मकर्तव्य आहे, तर ‘दुपारची झोप’ हा रम्य सोहळा. डोअरबेल बंद, फोन सायलेंटवर, पूर्ण अंधार, डोक्यावर पंखा अशा स्थितीत जाड पांघरुणात शिरून तो साजरा करायचा असतो. आणि हा सोहळा जर मोदकाच्या आगमनाने सुफळ झाला तर अजून काय हवं ? सुमारे ३ तास निद्रादेवीच्या सान्निध्यात घालावल्यावर जड डोळ्यांनी चहाचा पहिला घोट घेतल्यावरच मोदकाची इतिकर्तव्यता पूर्ण होते.

अशा या उकडीच्या मोदकाचा आपण आस्वाद घेऊया.

सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !
💫🌹💫🌹💫🌹💫🌹💫🌹

मोदकायन !!!!

मोदक हा उकडीचा पण असतो, हे कळायला माझी आयुष्याची बरीच वर्षे गेली … लहानपणी आमच्या मराठवाड्यात मोदक म्हणजे फक्त तळणीचे …
२८ वर्षा पुर्वी पुण्यात आलो आणि मग या ‘अदभुत’ पदार्थाची म्हणजेच उकडीच्या मोदकाची ओळख झाली …

हे दोनही पदार्थ आपापल्या जागीच श्रेष्ठच. फरक असेल तर तो फक्त ग्लॅमरचा … उकडीच्या मोदकाचे ‘ग्लॅमर’ तळणी मोदकाला नाही …
आणि तळणीच्या मोदकांची सहजता उकडीच्या मोदकात नाही …

मनात आले आणि उकडीचे मोदक केलेत असं होत नाही. तो एक कौटुंबिक सोहळा असतो. खाणारे लोक मोजून मापून तो करण्याचा दिवस ठरवुन त्याची पूर्व तयारी केली जाते. बरं आता केलेत, तर घरात येणाऱ्या जाणाऱ्यांच्या हातावर ठेवले, शेजारी पाजारी दिले, असंही होत नसते. अतिशय जवळच्या जिव्हाळ्याच्या लोकांकरता केलेला हा पदार्थ असतो. या उलट तळणीचे मोदक ह्याला सार्वजनिक पदार्थ म्हणता येईल. मोजमाप न करता केलेला, शेकड्यानी करून वाटता येण्यासारखा…

एखादी गोष्ट उरकायची म्हणून करायची असेल, तर करुच नये, या प्रकारात मोडणारा पदार्थ म्हणजे उकडीचा मोदक …
हे करायला प्रचंड चिकाटी लागते. पण अंगी चिकाटी आहे, म्हणून मोदक जमेल असेही नसते.
ती एक कला आहे. कारण केलेला मोदक पानांत वाढण्यापुर्वी फुटला तर त्याचे निर्मितीमुल्य शुन्य होते. या मोदक प्रक्रियेमध्ये करणारा / करणारी कितीही वाकबगार असले/ असली तरी त्यांचा कधीही रोहित शर्मा होऊ शकतो …. तिथे द्रविडची खेळीच आवश्यक असते …

या उलट तळणीचा मोदक करणाऱ्याच्या पेशन्सची परीक्षा अजिबात घेत नाही …पण म्हणून कोणीही उठुन याच्या वाटेला गेलं तर त्याचा फरदीन खान होतो … म्हणजे काय तर त्यांची पाककला सुरु होण्या पुर्वीच अस्ताला जाण्याची शक्यता असते …

उकडीचा मोदक रंग, रूप, सादरीकरण या सगळ्याच बाबतीत श्रीमंत. त्याच्या अगदी विरूद्ध तळणीचा मोदक…
प्रसिद्धी आणि ग्लॅमर पासून तसा दूर. उकडीच्या मोदकात कुबेराची श्रीमंती असेल, तर तळणीच्या मोदकात टाटांचे औदार्य आहे.

उकडीच्या मोदकात लता दीदीच्या आवाजा सारखी तरलता असेल, तर तळणीच्या मोदकात आशा ताईच्या आवाजा सारखा खट्याळपणा आहे. उकडीच्या मोदकाचे आव्हान न पेलवणारे असते. पण तळणीच्या मोदकाचे आव्हान सहज पार करता येते.

उकडीच्या मोदकात सचिनच्या खेळीची नजाकतता आहे, तर तळणीच्या मोदकात गावस्कर ची सहजता आहे…

दोनही मोदक आपल्या जागी श्रेष्ठच !!!

मोदक मग कुठलाही असो. कंजूसपणा झळकेल इतकं कमीही नाही आणि मोदकाला मोडेल इतकं जास्तही नाही, असं ‘सारण’ भरून मोदक सहजपणे करता येणारी मुलीकडे पहा. तिच्या आईला तिच्या भविष्याची काळजी करायची गरज नसते …

आम्ही भारतीय लोक भावनिक असतो. प्रत्येक गोष्टींशी आमचे भावनिक नातं जडलेले असते. मोदकाशी आमचे भाववनिक नाते जोडलेले आहे. पानातला पदार्थ होण्याआधी तो आमच्या करता प्रसाद असतो. आम्ही वारसा जपणारे. त्यामुळे मोदक कितीही पोट फुटे पर्यन्त खाल्ले तरी, ते आमच्या करता dessert कधीच नाही होऊ शकत.

बिपीन कुलकर्णी

🌹💫🌹💫🌹💫🌹💫🌹

वैश्विक गणेश

चीन मधील ‘भगवान विनायक’

चीन म्हणजे पोलादी पडद्याआडचा देश. या अश्या चीन चे आणि भारताचे संबंध फार प्राचीन आहेत. प्राचीन म्हणजे किती जुने..? काही निश्चित सांगता येणं कठीण आहे. पहिल्या शतकात चीन मध्ये असलेल्या हिंदू मंदिरांचे पुरावे मिळाले आहेत. मात्र हिंदू धर्माचा प्रादुर्भाव चीनमध्ये या पेक्षा ही आधी झाला असावा.

आज सुध्दा चीन मध्ये अनेक हिंदू मंदिरं आहेत. आणि जिथे हिंदू मंदिरं आहेत, तिथे गणरायाची उपस्थिती ही असतेच असते. चीन च्या ह्या हिंदू मंदिरांमध्ये श्री गणेशाच्या अनेक प्राचीन मूर्ती आहेत. येथे गणेशाला बुध्दी आणि समृध्दी ची देवता मानलं जातं.

चीन च्या फुजियान प्रांतात, क्वांझाऊ शहरात, जवळपास वीस हिंदू मंदिरं आहेत. ही सारी मंदिरं साधारण दीड हजार वर्ष जूनी आहेत. त्या काळात चीन चा, भारताच्या तामिळ भाषिक क्षेत्राशी मोठा व्यापार चालायचा. आजच्या तामिळनाडू मधून अनेक वस्तु चीन ला जायच्या, आणि चीन हून साखर आणि इतर पदार्थ आयात केले जायचे. स्वाभाविकतः या क्वांझाऊ शहरात मोठ्या संख्येने तामिळ व्यापारी आणि त्यांची माणसं राहायची. त्यांनीच ही मंदिरं बांधली. (२०१९ च्या डिसेंबर मध्ये चीन चे राष्ट्रपती शी जिनपिंग भारतात आले असताना, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या बरोबर ची एक बैठक तामिळनाडू च्या ‘महाबलीपुरम’ येथे ठेवली होती. सातव्या आणि आठव्या शतकात, पल्लवांच्या काळात, भारत आणि चीन मधील व्यापार येथून होत होता, त्याला उजळणी देण्यासाठी महाबलीपुरम ची निवड केलेली होती). सन ६८५ च्या आसपास, तेग राजवंश्या च्या काळातली ही मंदिरं आहेत. या मंदिरांमध्ये नंतर स्थानिक चीनी लोक ही यायला लागले आणि पूजा करायला लागले. या मंदिरांवर मेंदारिन (चीनी), संस्कृत आणि तामिळ भाषेतील शिलालेख आहेत. या सर्व मंदिरांमध्ये भगवान गणेश विराजमान आहेत. चीन च्या गंसू प्रांतात तुन-हुयांग (की दुन-हुयांग) शहरातील बौध्द मंदिरांमध्ये श्री गणराय, कार्तिकेयांबरोबर दिसतात.

चीन च्या उत्तर भागात झालेल्या उत्खननात जी गणेश प्रतिमा मिळाली आहे, ती कार्बन डेटिंग च्या अनुसार सन ५३१ ची आहे. चीन च्या अगदी दक्षिण टोकावर असलेले गुआंगदोंग (Guangdong) हे बंदर (port) आहे तर क्वांझाऊ किंवा चिंचू ही सुध्दा बंदरांची शहरं आहेत. तामिळ व्यापारी, सागरी मार्गाने, याच बंदरांच्या रस्त्याने चीन मध्ये यायचे. स्वाभाविकतः या सर्व बंदरांच्या आसपास अनेक हिंदू मंदिरांचे अवशेष आजही मिळतात. या शहरातील पुरातत्व संग्रहालयांमध्ये भगवान शंकर, गणेश, दुर्गा देवी इत्यादींच्या अनेक प्रतिमा आहेत.

सागरी मार्गाशिवाय, भारतीयांचे चीन ला जायचे इतरही मार्ग होते. आसाम च्या कामरूप हून, ब्रम्हदेशाच्या रस्त्याने भारतीय व्यापारी चीन ला जायचे. काश्मीर च्या सुंग-लिंग हून चीन ला जाणारा अजून एक मार्ग होता. दुसर्‍या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत, दीडशे हून जास्त चीनी विद्वानांनी भारतातील संस्कृत ग्रंथांचा चीनी भाषेत अनुवाद करायला आपल्या जीवनाचे ध्येय बनवले होते. वेदांना चीनी भाषेत ‘मांग – लून’ (ज्ञान आणि बुध्दीचे विज्ञान) म्हटले जाते. अनेक ‘संहिता’ आणि ‘शास्त्रांचा’ अनुवाद चीनी भाषेत उपलब्ध आहे. गंमत म्हणजे यातील काही ग्रंथ असे आहेत, जे भारतात आलेल्या मुस्लिम आक्रांतांनी नष्ट केले होते, परंतु यांचा चीनी अनुवाद उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, ‘सांख्यकारिका’ हा ग्रंथ मूळ संस्कृत मध्ये कुठेही सापडत नाही. मात्र त्याचा चीनी अनुवाद – ‘जिन की शी लून’ (Jin Qi Shi Lun) उपलब्ध आहे. आता या चीनी ग्रंथाचा पुन्हा संस्कृत भाषेत अनुवाद केला गेला आहे. असे इतरही ग्रंथ आहेत.

आज सुध्दा चीन मध्ये, चीनी भाषा बोलणारे, परंतु हिंदू जीवन पध्दती आणि परंपरा मानणारे लोकं राहतात. यांची संख्या तुलनेने कमी आहे. म्हणून चीन च्या पाच प्रमुख पंथांमध्ये यांचा समावेश नाही. परंतु हा समुदाय आज सुध्दा भारतीय सण आणि उत्सव उत्साहाने साजरा करतो. ‘गणेश उत्सव’ हा चीनी पध्दती ने साजरा केला जातो.

तिबेट

कधी सार्वभौम राष्ट्र असलेलं तिबेट, आज चीन चा एक प्रांत झालेला आहे. चीन चा भाग नसताना तिबेट हा देश हिंदू आणि बौध्द परंपरांचा देश होता. म्हणूनच तिबेट मध्ये अनेक ठिकाणी गणेश मंदिरं आहेत तसेच गणेश प्रतिमा आणि गणेशाची चित्र बर्‍याच ठिकाणी दिसतात. बौध्द परंपरेच्या महायान आणि वज्रायान पंथात गणपतींचे एक विशिष्ट स्थान आहे. ते फक्त विघ्नहर्ता नाहीत, तर बुध्दीचे👌 देवता आहेत. तिबेटी भाषेत गणपतींना ‘महा-रक्त’ सुध्दा म्हटलं जातं. तिबेट मध्ये श्री गणेश, ‘विनायक गणेश’ नावाने प्रसिध्द आहेत. हे ‘आर्य महा गणपती’ परंपरेचे गणेश आहेत. तिबेट चे, या विषयाचे अभ्यासक, रॉबर्ट ब्राऊन (Robert L. BROWN) यांनी एक पुस्तक लिहिलंय, ‘Ganesh, studies of an Asian God’. यात त्यांनी लिहिलंय की तिबेट च्या काग्युर परंपरेत असं म्हटल्या गेले आहे की महात्मा बुध्द यांनी, आपला प्रिय शिष्य आनंद याला ‘गणपती हृदय मंत्रा’ (किवा ‘आर्य गणपती मंत्र’) ची दीक्षा दिली होती. म्हणूनच बौध्द प्रभाव असलेल्या देशांमध्ये, बौध्द मंदिर आणि स्तुपांच्या बाहेर गणेशाची मूर्ती असते.

(तिबेटी भाषेत ‘विनायक स्तुति’, जी रोमन लिपि मध्ये दिलेली आहे) –
oṃ namo ‘stu te mahāgaṇapataye svāhā |
oṃ gaḥ gaḥ gaḥ gaḥ gaḥ gaḥ gaḥ gaḥ |
oṃ namo gaṇapataye svāhā |
oṃ gaṇādhipataye svāhā |
oṃ gaṇeśvarāya svāhā |
oṃ gaṇapatipūjitāya svāhā |
oṃ kaṭa kaṭa maṭa maṭa dara dara vidara vidara hana hana gṛhṇa gṛhṇa dhāva dhāva bhañja bhañja jambha jambha tambha tambha stambha stambha moha moha deha deha dadāpaya dadāpaya dhanasiddhi me prayaccha |

मंगोलिया

फक्त ३२ लाख लोकसंख्या असलेल्या, चीन च्या ह्या शेजारील देशात, गणेशाची प्रभावी उपस्थिती आहे. दुर्दैवानं आपण मंगोलियाला ओळखतो ते छिगीज खान (ज्याला आपण ‘चंगेज खान’ म्हणतो) च्या नावाने. मात्र मंगोलिया हा देश एके काळी पूर्ण पणे हिंदू संस्कृतीत रमलेला आणि मुरलेला देश होता. हा देश आजही हिंदू संस्कृतीच्या प्रतिकांना अभिमानाने धारण करतो. त्यांच्या राष्ट्रध्वजाला ते सोयंबू (स्वयंभू च अपभ्रंश) म्हणतात. या देशातील अनेक मंगोल, आजही आपलं नाव संस्कृत शब्दांवरून ठेवतात. मंगोलियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची नावं आहेत – आंनंदिन अमर (१९३२ ते १९३६) आणि जम्सरांगिन शंभू (१९५४ ते १९७२). महिन्यांची आणि आठवड्यांची मंगोल नावं ही, भारताच्याच धर्तीवर आहेत. उदाहरणार्थ रविवार ला आदिया (आदित्यवार), सोमवार ल सोमिया, मंगळवार साठी संस्कृत शब्द ‘अंगारक’ आहे. बुधवार साठी बुध्द, गुरुवार किंवा बृहस्पतिवार साठी व्रिहस्पत, शुक्रवार ला सुकर आणि शनिवार साठी सांचिर हे नाव आहे.

अश्या मंगोलियात, श्रीगणेशाची पूजा होणं स्वाभाविकच आहे. येथे अनेक बौध्द मंदिरात गणेशाची प्रतिमा आहे.

आपले पूर्वज, आपल्या विश्वव्यापी प्रवासात, आपल्या आराध्य दैवतांनाही बरोबर घेऊन जात होते. ठिकठिकाणच्या स्थानिक लोकांमध्ये भारतीयांची चांगली स्वीकार्यता होती. आणि म्हणूनच आपल्या आराध्य दैवतांची स्थानिक लोकं ही पूजा करू लागायचे. विशेषतः गणपतींना विघ्नहर्ता म्हटलं गेलं आहे. ही शुभारंभाची देवता आहे. आणि म्हणूनच, जगाच्या कानाकोपर्‍यात श्री गणेशाची स्वीकार्यता आहे, आणि अस्तित्वही..!

  • प्रशांत पोळ
    Prashant Pole

वैश्विक_गणेश #GlobalGanesh

गणेश विद्या

अनिल गोरे
·
एका लेखाचे गणेश चतुर्थी निमित्त पुनःप्रसारण !
मराठीसाठी मुख्यत्वे वापरली जाते त्या देवनागरी लिपीला गणेशविद्या असेही म्हणतात
…………………….
गणपतीने ज्या वर्णसंचाचा वापर करून महाभारत लिहिले असे मानतात त्या वर्णसंचात स्वर, व्यंजनांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आहे.
त्या वर्णसंचासाठी वेळोवेळी नवी चिन्हे निर्माण केली गेली. ती चिन्हे अनेकदा बदललीही गेली. त्या चिन्हांच्या सध्याच्या प्रचलित संचाला देवनागरी लिपी म्हणतात.
ही लिपी सर्व जगासाठी, जगात अस्तित्वात असलेल्या बहुतेक सर्व भाषांचे उच्चार सुसंगत लेखन करण्यासाठी खूप सोयीची आहे.
या लिपीतील सध्या प्रचलित असलेली अ ते ज्ञ अक्षरे वळणदार, वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
० ते ९ अंक देखणे आहेत. कोणताही देवनागरी अंक लिहिताना सुरुवातीला टेकवलेली लेखणी अंक लिहून होईपर्यंत उचलावी लागत नाही.
या लिपीतील चिन्हे १६ स्वर, ३३ व्यंजने व संयुक्त व्यंजने यांचे प्रतिनिधित्व करतात.
५२ मुळाक्षरांच्या परस्पर संयोगाने जोडाक्षरे, बाराखड्यांच्या स्वरुपात लाखो स्वतंत्र अक्षरसमूह (जोडाक्षरासहित) चिन्हे लिहिता येतात. अशा काही लाख चिन्हांच्या अचूक व नेमक्या आकलनासाठी केवळ मूळ ५२ चिन्हांची अक्षर आकार ओळख आणि ती अक्षरे एकमेकांना जोडायची पद्धत यांची जाण पुरेशी ठरते !
भारतीय भाषांसाठी योजलेल्या गणेशविद्या आधारित लिप्या वगळता जगातील इतर अनेक लिप्यांमध्ये अशी अल्प परिचयातून उपलब्ध होणारी अफाट चिन्ह संपन्नता आढळत नाही.
गणपतीने म्हणजे देवाने ही वर्ण व्यवस्था नागरिकांसाठी बनविली या समजुतीने तिच्या आजच्या चिन्हित रूपाला देवनागरी (देव + नागरी) लिपी म्हणतात.
या वर्ण व्यवस्थेचा उगम गणपतीच्या हातूनच कसा झाला याबाबत पुढील एक आख्यायिका प्रचलित आहे !
महर्षी व्यासांना महाभारत महाकाव्य लिहायचे होते ! ते वेगाने लिहून होण्यासाठी त्यांनी श्रीगणेशाला लेखनिक होण्याचे आवाहन केले !
गणपतीने हे आवाहन मान्य करताना एक अट घातली. गणपतीने लिहायला प्रारंभ केला की, त्याचे लिखाण सतत सुरू राहील. त्याला कधी थांबावे लागले तर लेखन तिथेच बंद होईल.
ही अट पूर्ण करायला महर्षी व्यासांना सतत महाभारताची कथा सांगत रहावी लागणार होती. ही कथा सांगताना गणपतीने घातलेली अट पाळतानाही आपल्याला अधूनमधून थोडीशी उसंत मिळावी अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी व्यासांनीही एक युक्ती योजली.
त्यांनी गणपतीला सुचवले की, महाभारत लिहिण्यासाठी गणपतीने मानवी शरीराशी घनिष्ठ संबंध असेल अशी नवी वर्ण व्यवस्था निर्माण करावी आणि त्या वर्णांसाठी स्वतंत्र चिन्हेही निर्माण करावीत तसेच नवी लेखन पद्धती देखील विकसित करावी ! ही नव्याने विकसित केलेली वर्ण व्यवस्था ध्वनीवर आधारित असावी जेणेकरून उच्चार आणि लेखनात सुसंगती येईल.
श्रीगणेशाने व्यासांची ही सूचना मान्य केली. या सूचनेमुळे महाभारत सांगताना व्यासांना अधूनमधून थोडी उसंत मिळणार आहे हे गणपतीच्या लक्षात आले. असे असले तरी मानवाला मानवी शरीराशी जोडलेली नवीन वर्ण व्यवस्था मिळून सर्व पृथ्वीचे कल्याणच होणार असल्याच्या भावनेतून गणपतीने व्यासांची सूचना मनःपूर्वक स्वीकारली !
गणपतीने महाभारत लिहिताना व्यास कथा सांगत असताना त्यांच्या सर्व उच्चारांचे सूक्ष्म शरीरशास्त्रीय अवलोकन केले. व्यासांच्या कथनादरम्यान ज्या ध्वनींचा संबंध मानवी मुखाशी आढळला ते ध्वनी वेगळे करून त्यांना गणपतीने स्वर मानले. ज्या ध्वनींचा संबंध एकेका मानवी मणक्यांशी होता अशा ध्वनींना गणपतीने व्यंजने मानले. स्वर आणि व्यंजने तसेच व्यंजन आणि व्यंजने यांच्या चिन्ह संयोगाने प्रचंड संख्येने स्वतंत्र अक्षरचिन्हे निर्माण होऊ शकतात. अशा संयोगाने जोडाक्षर निर्माण होते. जोडाक्षर संकल्पनाही गणपतीनेच वेगवान लिखाणासाठी निर्माण केली असा समज पूर्वापार प्रचलित आहे ! मानवी उच्चारांशी सर्वाधिक सुसंगत लेखन करण्यासाठी ही लिपी उपयुक्त आहे !
कर्नाटकात जन्मलेल्या आणि काशीला मोठा आश्रम उभारलेल्या गणेश हेब्बार उपाख्य गणेशशास्त्री यांनी लिहून प्रसिद्ध केलेल्या ‘भारतीय लिप्यांची एकात्मता’ आणि ‘भारतीय लिप्यांची मौखिकता’ या दोन पुस्तकामधून पंजाबी, बंगाली, उडिया, असमी, मल्याळम, तमिळ, गुजराती तसेच आज वापरात नसलेल्या पण पूर्वी वापरात असलेल्या आणखी काही भारतीय लिप्यांशी देवनागरी लिपीचे साम्य दाखवून दिले आहे !
ही लिपी खरेच देवाधिदेव गणपतीने बनविली का ? यावर आस्तिक, नास्तिकांचा वाद सुरु आहे, पण ही जगातील अत्यंत उपयुक्त लिपी आहे, याबाबत मात्र आस्तिक आणि नास्तिक दोन्ही समूहांमध्ये बऱ्यापैकी एकमत आहे..
सध्या कोणीही केलेल्या संशोधनाची नोंद त्या संशोधकाच्या नावाने करण्याची पद्धत आहे. पूर्वी अशी पद्धत नव्हती.
कोणी संशोधन केले, कविता रचली तर त्यातच संशोधकाचे, कवीचे नाव गुंफण्याची अथवा त्यासंबंधी नामानिधान किंवा संज्ञांमध्येच संबंधिताचे नाव गुंफण्याची पद्धत होती.
शल्याने शरीर कापून त्यात दुरुस्तीची पद्धत सुरु केली, त्या पद्धतीला शल्यकर्म म्हणतात.
रुग्णांची नियोजनपूर्वक देखभाल पद्धत शुश्रुताने सुरु केली, त्या पद्धतीला शुश्रूषा म्हणतात.
डिझेल नावाच्या शास्त्रज्ञाने शोधलेल्या इंधनाला त्याचे नाव आहे.
सुखकर्ता दुखहर्ता …. या आरतीत ‘दास रामाचा वाट पाहे’ असे लिहून समर्थ रामदासांनी स्वतःची ओळख सूचित केली आहे.
एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, तुका म्हणे, येणे वरे ज्ञाना सुखिया झाला, केशवासी नामदेव भावे ओवाळिती, कहत कबीर सुन भाई साधू अशा ओळींतून जनार्दन स्वामी, तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, कबीर यांनी आपले नाव गुंफले आणि विशिष्ट कलाकृती त्यांनीच निर्माण केल्याचे सूचित केले.
देवनागरी वर्णाक्षरांच्या सध्याच्या स्वरुपात ग, ण, श ही अक्षरे इतरांपेक्षा वेगळी असून केवळ त्यांच्याच बाराखडीत डावीकडून पहिल्या स्थानी सुट्टा काना आहे!
ग, ण, श यांच्याच बाराखडीत डावीकडून पहिल्या स्थानी सुट्टा काना असणे ही बाब लक्षणीय असून ही वर्ण व्यवस्था गणपतीने निर्माण केल्याचा संकेत मानून देवनागरी लिपीला देवनागरीच्या धार्मिक प्रवृत्तीच्या कोण्या समर्थकाने या लिपीला गणेशविद्या म्हणले व ते नाव रूढ झाले आहे. गणपती अथर्वशीर्ष म्हणताना त्यात ‘ ए सा गणेशविद्या ‘ असे एक वाक्य येते त्याचा संदर्भ श्रीगणेशानेच देवनागरी लिपीची मूळ वर्ण व्यवस्था निर्माण करण्याशी जोडलेला आहे !
देवनागरी लिपीत स्वर, व्यंजने आणि संयुक्त व्यंजने आहेत. स्वरांचा मानवी मुखाशी तर व्यंजनांचा मानवी मणक्यांशी संबंध आहे.
कान या मराठी शब्दाची सुरूवात क अक्षराने होते. चेहरा व दोन कान दिसतात तसे क अक्षरचिन्ह दिसते.
ड, ळ अक्षरांनी डोळा शब्द बनतो. उघडा डोळा, भिवई, पापणी मिळून ड चा भास होतो.
दोन डोळे एकत्र पाहताना ळ चा भास होतो.
झोपलेल्या माणसाचे नाक पाहून न चा भास होतो.
घसा तपासताना वैद्यबुवांना घ दिसतो.
मानवाला प्राथमिक अवस्थेत ज्या वस्तूंना नावे देण्याची गरज भासली, ती नावे लिहिण्यासाठी देवनागरी अक्षरांना त्या वस्तूंचे आकार दिले असावेत.
मुखाशी संबंधावरून देवनागरी लिपीतील व्यंजने आणिसंयुक्त व्यंजने मिळून वर्णांचे मिळून दंतव्य, तालव्य, ओष्ठव्य, मूर्धन्य, अनुनासिक हे पाच प्रकार आहेत.
वेगवेगळी व्यंजने उच्चारताना वेगवेगळ्या मणक्याजवळ संवेदना जाणवतात.
कोणीतरी अभ्यासू व्याकरणकाराने आणि शरीरशास्त्राच्या जाणकाराने कधीतरी देवनागरी वर्ण आणि मानवी मणके यात आढळलेला एकास एक संबंध नोंदवून ठेवला आहे. हा एकास एक संबंध म्हणजे ३३ मणके आणि ३३ व्यंजने यांचा परस्पर संबध आहे. मानेच्या खाली पाठकणा सुरू होतो तिथपासून वरून खाली १ ते ३३ क्रमांक मणक्यांना दिल्यास कोणत्या क्रमांकाच्या मणक्याशी नेमके देवनागरी लिपीतील कोणते व्यंजन जोडलेले आहे हे या संबंधात सूचित केलेले आहे ! हा क्रम लिप्यांचे हौशी अभ्यासक असलेले माझे एक जेष्ठ सहकारी सुधिर नारखेडे यांनी मला उपलब्ध करून दिला. मी त्या क्रमानुसार एक चित्र निर्माण केले आहे. या क्रमाला पाणिनीची शिवसूत्रे असे म्हणतात.
मानवी शरीराशी, मानवी जीवनाशी देवनागरी लिपीचा घनिष्ठ संबंध असल्याने मानवी उच्चारांना अचूक लेखनाची जोड देण्यास आवश्यक सोयी देवनागरी लिपीत, जोडाक्षर पद्धतीत आहेत.
कोणत्याही मानवी भाषेतील ९९.९९ टक्के शब्द या लिपीतून हुबेहूब लिहिता येत असल्याने ही लिपी जगाची भाषिक एकात्मता साधू शकेल.
लेखन, उच्चारात सर्वाधिक सुसंगतीसाठी ही जगातील सर्वोत्तम लिप्यांपैकी एक आहे.
देवनागरी लिपीचिन्हांत आणि बंगाली, गुजराती, कन्नड, पंजाबी, तमिळ, उडिया, तेलुगू , मल्याळी लिपीचिन्हांत थोडा बदल जाणवतो पण सर्व भारतीय लिप्यांमध्ये लक्षणीय एकात्मता आहे !
लिपीचिन्हांतील या बदलांची कारणे भौगोलिक, राजकीय आहेत.
लिखाणासाठी भारताच्या उत्तरेत भूर्जपत्रे तर दक्षिणेत ताडपत्रे वापरत.
भूर्जपत्राला पुरेशी उंची असल्याने देवनागरी लिपीतील मात्रा, रफार, रुकार, उकार, अनुस्वार, चंद्र, हलन्त ही उपचिन्हे वगैरे गोष्टी वर्णाक्षरांच्या वर, खाली जोडता येतात.
ताडपत्रावर उंची कमी, रुंदी अधिक म्हणून दक्षिणी लिप्यांमध्ये ही उपचिन्हे वर्णाक्षरांच्या डावी, उजवीकडे लिहिणे सोयीचे होते.
अनेक देवनागरी अक्षरे आडवी केल्यास दक्षिणी लिपीतील अक्षरे मिळतात. शत्रूला संदेश समजू नये म्हणून काही भारतीय राजांनी स्वत:ला व त्याच्या अधिकार्‍याना, प्रजाजनांना समजणारी, पण इतरांना न समजणारी भाषा, लिपी तयार केली. काही राजांनी स्वतंत्र राज्याच्या स्वतंत्र झेंडा, स्वतंत्र राजचिन्ह याप्रमाणेच स्वतंत्र लिपीही हवी अशा विचाराने अस्मितेचे आणखी एक प्रतीक म्हणून नवी लिपी घडवून घेतली.
देवनागरी लिपीशी बरेच साम्य आणि किरकोळ बदलाने अशा विविध नव्या लिप्या विविध कारणांनी निर्माण झाल्या.
अनेक भारतीय लिप्यांतून लिहिताना जगातील इतर अनेक लिप्यांच्या तुलनेने कमी जागा, कमी कागद, कमी शाई वापरली जाते. कागद कमी लागल्यास जंगलतोड कमी होते. शाईत शिसे किंवा जड धातू वापरतात. शाई कमी लागल्यास शिशाचे व जड धातूंपासून होणारे प्रदूषण कमी होते.
१७७७ रु. धनादेशाने देताना रोमन लिपीसह इंग्रजीत one thousand seven hundred seventy seven only ही ३९ अक्षरे तर मराठीत सतराशे सत्त्याहत्तर फक्त ही ११ अक्षरे लागतात.
जगात रोज कोट्यवधी धनादेश देवाणघेवाण होते, त्यात अक्षरी रक्कम तीन वेळा लिहितात, १४ ते १९ वेळा वाचतात. धनादेश भारतीय भाषांत लिहिल्यास इंग्रजीच्या तुलनेत ७० % वेळ, ७० % शाई वाचते. व्यवहार वेगाने होतात. कार्यक्षमता वाढते.
थोडक्यात, देवनागरी लिपी पर्यावरणाचा विनाश कमी करण्यासाठी उपयुक्त आहे !
देवनागरी लिपीचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे. या लिपीत कोणताही मजकूर कमी जागेत, कमी श्रमात लिहिता येतो म्हणून केवळ आर्थिक व्यवहार नव्हे तर शिक्षण, संशोधन, व्यापार, सेवा उद्योग, प्रशासन अशा सर्व क्षेत्रात ही लिपी आणि मराठी भाषा यांचा दुहेरी वापर केल्यास आर्थिक बचत, पर्यावरण रक्षण आपोआपच होईल.
देवनागरी लिपी भारतीय/जागतिक एकात्मतेचे साधन ठरेल.
घरी, बाजारात, बँकेत, कचेरीत, व्यवसायात, पत्रकात, पावतीत, प्रत्येक व्यवहारात ही लिपी वापरल्यास आपण अधिक सुखी, समृद्ध, आनंदी होऊ !
ही लिपी सर्व जगाला उपयुक्त असल्याने ‘गणेशविद्या’ बाबतची माहिती देशी,परदेशी लोकांना सतत दिली पाहिजे. परदेशी व्यवहारात इतर लिपीसह ही लिपी वापरवी. परदेशातून येणाऱ्या मालावर विविध भाषा, लिपीतील मजकूर असतो तसा भारतीय व्यावसायिकांनी बाजारात, बँकेत, कचेरीत, व्यवसायात, पत्रकात, पावतीत, व्यवहारात, पत्रव्यवहारात, वस्तूंच्या वेष्टनावर, आवरणावर देवनागरी लिपी वापरून गणेशविद्येचा प्रसार जगभर करावा !
आणि अनेक क्षेत्रातील मूलभूत गोष्टी भारताने यापूर्वी जगाला दिल्या.
जागतिकीकरणात जगाकडून काही घेताना जगाला चांगले काही देणेही अपेक्षित आहे. जगातील एक उत्तम लिपी जगाला देण्यासाठी ‘गणेशविद्या’ चे जागतिकीकरण करू या !
बीजगणिताचे सिद्धांत, शून्याची कल्पना, खगोल, भूमिती, आयुर्वेदिक औषधी, मुलींच्या शाळा, कुटुंबनियोजनाचे तत्त्व, स्वातंत्र्याची इच्छा, बँकेची कल्पना, न्याय्य कररचना, शेतीसुधारणा, विधवा विवाह या सामाजिक सुधारणांपासून अवकाश तंत्रज्ञान, संगणकीय ज्ञान, माहिती तंत्रज्ञान या अनेक उत्तम गोष्टी आपण जगाला दिल्या, जगाने अशा बाबतीत आपले अनुकरण केले.
जगाला उत्तमोत्तम गोष्टी देणारे सर्व भारतीय ‘गणेशविद्या’ जगभर पोचविण्याचे कार्य करतील, असा मला विश्वास वाटतो! आपण सुरुवात तर करू, जग आपले अनुकरण करेल.
निवेदक :- प्रा. अनिल गोरे.
सदस्य : भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र शासन;
सदस्य आणि समन्वयक : कृषी परिभाषा उपसमिती, महाराष्ट्र शासन.
सदस्य : मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महापालिका;
आजीव सदस्य : महाराष्ट्र साहित्य परिषद;
आजीव सदस्य : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग;
आजीव सदस्य : महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा, पुणे.
आजीव सदस्य : पुणे जिल्हा गणित अध्यापक मंडळ
आजीव सदस्य : अक्षर मानव
सदस्य : कोथरूड गौरव समिती, पुणे.
निवेदन :- हे पत्रक ज्यांच्यापर्यंत पोचेल त्यांनी गणेश मंडळ अहवाल, संस्था अहवाल, मासिके, पाक्षिके, वार्षिके, त्रैमासिके, अनियतकालिके, भ्रमणध्वनी संदेश, संगणकीय विरोप, सूचना फलक, पाट्या, समाज माध्यमे याद्वारे कायदेशीर मार्गाने यातील मजकूर देशात, परदेशात कोट्यवधी लोकांपर्यंत पोचवावा, ही वैयक्तिक विनंती ! अशा प्रकारे हाच आशय जसाच्या माझ्या नावासह कोणालाही पुढे पाठविण्यास मी या इथेच मुक्त परवानगी देत आहे ! तसेच यातील आशय कोणीही विनामूल्य वापरण्यास माझी सहर्ष संमती आहे !!
हा मजकूर कोठे छापल्यास प्रत पाठवावी. इतर प्रकारे प्रसिद्ध केल्यास त्याची माहिती कळवावी, ही विनंती !
अनिल गोरे
कृपया अधिक अधिक प्रसार करा
जय महाराष्ट्र जय मराठी

सोंड नसलेला एकमेव गणपती !

जगभरातील गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शीर हे गजमुख असलेले पहायला मिळते.
गणपतीच्या अन्य रुपाची कुणी कल्पनाही करू शकत नाही.
मात्र, दक्षिण भारतात गणपतीला गजाचे शीर लावण्यापूर्वी म्हणजे, मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती असलेले मंदिर आहे. मनुष्याचे मस्तक असलेली ही जगातील एकमेव गणेश मूर्ती असल्याचे मानले जाते. तामिळनाडूमध्ये कुथनूरपासूनजवळ तिलतर्पणपुरी जवळ हे मंदिर आहे.
आदी विनायक असे या मंदिराचे नाव आहे.
गजमुखी अवतारापूर्वी मानवी रुपात असलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे याला आदी गणपती संबोधले जाते.

| गणपती बाप्पा मोरया ||

काल रात्री गणपती बाप्पा होता टिळकांशी भांडत !


(ज्या व्यक्तीने ही काव्य रचना केली त्याला शतश: दंडवत.)
*
काल रात्री गणपती बाप्पा
होता टिळकांशी भांडत,
आपल्या अडचणींची कैफियत
होता पोटतिडकीने मांडत ||
देवघरातून तू मला
बाहेर का आणलंस ?
तुमच्या लाडक्या देवाचं कौतुक
कशाला चार-चौघात मांडलंस ?
गायलास तू सुरुवातीला
ताल-सुरात आरत्या,
केलीस साधी फुलांची आरास
भोवती रंगीत बत्त्या.
खूप मस्त छान असायचं
आनंद वाटायचा येण्यात,
सुख-शांती-समाधान मिळे
चैतन्य तुला देण्यात.
दहा दिवस उत्सवाचे म्हणजे
असे, दिव्यत्वाची रंगत…
काल रात्री गणपती बाप्पा
होता, टिळकांशी भांडत ||
पूर्वी प्रवचन, कीर्तन, गायनाने
मंगलमयी वाटायचे,
प्रबोधक, उद्बोधक भाषणांनी
विचार उंची गाठायचे.
आत्ता सारखा हिडीसपणा
मुळीच नव्हता तेव्हा,
शांताबाईच्याच नावाचा
आता अखंड धावा.
पीतांबर, शेला, मुकुट
हे माझे खरे रुप,
शर्ट, पँट, टोपी, पागोटे
धिगाण्याला फक्त हुरूप.
शाडूची माती… नैसर्गिक रंग
गायब आता झाले कुठे ?
लायटिंग केलेल्या देखाव्याने
मला दरदरून घाम फुटे !
श्रध्दा, भक्तीभाव, आदर मनीचा
गेला ना रे सांडत…
काल रात्री गणपती बाप्पा
होता, टिळकांशी भांडत ||
माणसां-माणसांनी एकत्र यावे
एकमेकांना समजुन घ्यावे,
देव-घेव विचारांची करतांना
सारे कसे एक व्हावे.
जातीभेद नसावा…
बंधुभाव असावा,
सहिष्णुतेच्या विचारांनी
नवा गाव वसावा.
मनातला विचार तुझ्या
खरंच होता मोठा,
पण, आज मात्र खऱ्या विचारांनाच
बघ मिळालाय फाटा.
पूर्वी विचारांबरोबर असायची
खाण्यापिण्याचीही रेलचेल,
आता मात्र देखाव्यांमागे
दडलेला असतो काळा खेळ.
पूर्वी बदल म्हणून असायचे
पोहे-चिवडा-चहा-काॅफी…
साग्रसंगीत जेवणा सोबत
लाडू-मोदक-पेढे-बर्फी.
आता, रात्री भरले जातात
पडद्यामागे, मद्याचे पेले
डी. जे. वर नाचत असतात
माजलेले दादांचे चेले.
नको पडूस तू असल्या फंदात
तेव्हाच मी होतो सांगत…
काल रात्री गणपती बाप्पा
होते, टिळकांशी भांडत ||
कशासाठी उत्सव असा
सांग ना रे बांधलास ?
देवघरातून गल्लोगल्ली
डाव माझा मांडलास !
दहा दिवस कानठळ्यांनी
होतो मला आजार,
व्यवहारी दुनिया इथली,
इथे चालतो लाखोंचा बाजार.
रितीरिवाज, आदर-सत्कार,
मांगल्याचा नाही पत्ता,
देवघरा ऐवजी माझा
रस्त्यावरती सजतो कट्टा.
जुगार-दारु-सट्टा-मट्टा –
अनैतिकतेला येतो ऊत,
देवा ऐवजी दैत्याचेच मग
मानेवरती चढते भूत.
सामाजिक बाजू सोडून सुटतो
राजकारणालाच इथे पेव,
गौरी-गणपती सण म्हणजे –
गैरव्यवहाराची ठेव-रेव.
नको रे बाबा, नको मला हा
मोठेपणाचा तुझा उत्सव,
मला आपले तू माझ्या जागी
परत एकदा नेऊन बसव.
कर बाबा कर माझी सुटका
नको मला ह्यांची संगत…
काल रात्री गणपती बाप्पा
होता, टिळकांशी भांडत ||
आपल्या अडचणींची कैफियत
होता पोटतिडकीने मांडत,
काल रात्री गणपती बाप्पा
होता, टिळकांशी भांडत ||

**********************************

उसांमधून तयार केलेला गणपती

***********

देशातला सर्वात उंच गणपती

वृक्ष गणपती

**********

चंद्रयानानंतर आदित्य आणि गगनयान

इस्रो या संस्थेच्या स्थापनेबद्दल माहिती इथे . https://anandghare.wordpress.com/2019/08/12/%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%9c/

या वर्षात इस्रोने एकापाठोपाठ एक अनेक मोहिमा हाती घेतल्या आणि यशस्वी केल्या आहेत. चार वर्षांपूर्वी अयशस्वी झालेल्या चंद्रयान -२ ची भरपाई या वर्षी केलेल्या चंद्रयान -३ या मोहिमेने करून एक उच्चांक प्रस्थापित केला होता. ती बातमी अजून ताजी असतांनाच सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी आदित्ययान हा उपग्रह अवकाशात पाठवला. तो अजून आपल्या नियोजित स्थानी पोचेपर्यंत गगनयान हे तिसरे यान अवकाशात पाठवण्याचा प्रयोग करण्यात आला. या यशस्वी प्रयोगामुळे भविष्यकाळात अंतराळात मानवाला पाठवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे.

Press Release on Sep 02, 2023
Aditya L1 shall be the first space based Indian mission to study the Sun. The spacecraft shall be placed in a halo orbit around the Lagrange point 1 (L1) of the Sun-Earth system, which is about 1.5 million km from the Earth. A satellite placed in the halo orbit around the L1 point has the major advantage of continuously viewing the Sun without any occultation/eclipses. This will provide a greater advantage of observing the solar activities and its effect on space weather in real time. The spacecraft carries seven payloads to observe the photosphere, chromosphere and the outermost layers of the Sun (the corona) using electromagnetic and particle and magnetic field detectors. Using the special vantage point L1, four payloads directly view the Sun and the remaining three payloads carry out in-situ studies of particles and fields at the Lagrange point L1, thus providing important scientific studies of the propagatory effect of solar dynamics in the interplanetary medium

The suits of Aditya L1 payloads are expected to provide most crucial informations to understand the problem of coronal heating, coronal mass ejection, pre-flare and flare activities and their characteristics, dynamics of space weather, propagation of particle and fields etc.

Science Objectives:

The major science objectives of Aditya-L1 mission are:

Study of Solar upper atmospheric (chromosphere and corona) dynamics.
Study of chromospheric and coronal heating, physics of the partially ionized plasma, initiation of the coronal mass ejections, and flares
Observe the in-situ particle and plasma environment providing data for the study of particle dynamics from the Sun.
Physics of solar corona and its heating mechanism.
Diagnostics of the coronal and coronal loops plasma: Temperature, velocity and density.
Development, dynamics and origin of CMEs.
Identify the sequence of processes that occur at multiple layers (chromosphere, base and extended corona) which eventually leads to solar eruptive events.
Magnetic field topology and magnetic field measurements in the solar corona .
Drivers for space weather (origin, composition and dynamics of solar wind .

चंद्रानंतर सूर्याचे संशोधन

आकाशातला चंद्र हा उपग्रह पृथ्वीपासून सर्वात जवळ आहे आणि त्यानंतर सूर्य हा आपल्या सूर्यमालिकेचा राजा हा सर्वात जवळचा तारा आहे. बुध आणि शुक्र हे ग्रह याच सूर्याला जवळून प्रदक्षिणा घालत असतात. ते करत असतांना ते ग्रह कधी पृथ्वीच्या जवळ येतात तर कधी दूर जातात. त्यामुळे ते ग्रह कधी सूर्याच्या अलीकडे तर कधी पलीकडे असतात. या ग्रहांचे पृथ्वीपासून सरासरी अंतर जवळजवळ सूर्यापासूनच्या अंतराइतकेच म्हणजे सुमारे पंधरा कोटी किलोमीटर होईल. माणसाला चंद्राबद्दल खूप उत्सुकता वाटत आहेच. म्हणून त्याचे जवळून निरीक्षण करण्यासाठी अलीकडेच चांद्रयान -३ पाठवले गेले. ते तिथे सुरळीतपणे उतरले ही या वर्षातली सर्वात प्रसिद्ध घटना झाली होती. हे अवघड काम यशस्वीरीत्या करून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या इस्रो या संस्थेने त्यानंतर थोड्याच दिवसात आदित्य हा उपग्रह अवकाशात पाठवला आहे. या उपग्रहावरील उपकरणे सूर्याचे संशोधन करणार आहेत.

चंद्राकडे पाठवलेले चंद्रयान आकाशातून चंद्रापर्यंत जाऊन पोचले आणि त्याचा विक्रम लँडर प्रज्ञान रोव्हरला सोबत घेऊन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाऊन उतरला. त्याप्रमाणे आदित्यसुद्धा थेट सूर्यावर जाऊन उतरणार आहे की काय असा विचार मनात येणे शक्य आहे. पण सूर्याचे तापमान इतके जास्त आहे की त्याच्या जवळपास गेलेली कुठलीही वस्तू वितळून त्याची वाफ होऊन जाईल आणि ती वाफसुद्धा सूर्याच्या जबरदस्त गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्याकडे ओढली जाऊन सूर्यातच लुप्त होऊन जाईल. त्यामुळे कुठलाही शास्त्रज्ञ प्रत्यक्ष सूर्यावर कुठले उपकरण पाठवून अभ्यास करण्याचा विचारही करू शकत नाही. पार्कर सोलर प्रोब नावाचे एक सॅटेलाइट नासाने २०१८मध्ये अवकाशात पाठवले आहे. ते आधी शुक्राकडे गेले आणि शुक्राच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून घेऊन ते गोफणीसारखे दूर भरकावले जाऊन आता एका खूप मोठ्या आकाराच्या लंबगोलामध्ये सूर्याभोवती फिरत आहे. ते २०२५ मध्ये सूर्याच्या सर्वात जवळ म्हणजे सुमारे सत्तर लक्ष किलोमीटर्स इतक्या जवळ जाणार आहे.

आपले आदित्य अभियान इतके मोठे नाही. ते पृथ्वीपासून सुमारे पंधरा लक्ष किलोमीटर्स इतक्या अंतरावरील एल -१ नावाच्या बिंदूपर्यत जाऊन तिथे थांबणार आहे. हा एक असा बिंदू आहे जिथे त्याच्यावर पृथ्वीचे आणि सूर्याचे गुरुत्वाकर्षण समसमान राहील आणि एकमेकांना कँसल करेल. हे अंतर पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील अंतराच्या फक्त एक शतांश इतकेच आहे. पण ही जागा वातावरणाच्या सर्व थरांच्या पलीकडे असल्यामुळे सूर्यकिरणांना कुठलाही प्रतिबंध राहणार नाही आणि त्यांचे सतत चोवीस तास अधिक सखोल अध्ययन करता येणार आहे.

या आदित्य अभियानाची माहिती देणारे लेख आणि चित्रे या पानावर संकलित केली आहेत. सर्व मूळ लेखकांचे मनःपूर्वक आभार.

*******

इस्रोने प्रकाशित केलेली माहिती :

Aditya-L1 Payloads:

ADITYAL1

The instruments of Aditya-L1 are tuned to observe the solar atmosphere mainly the chromosphere and corona. In-situ instruments will observe the local environment at L1. There are total seven payloads on-board with four of them carrying out remote sensing of the Sun and three of them carrying in-situ observation.

Payloads along with their major capability of scientific investigation.

Type Sl. No. Payload Capability
Remote Sensing Payloads 1 Visible Emission Line Coronagraph(VELC) Corona/Imaging & Spectroscopy
2 Solar Ultraviolet Imaging Telescope (SUIT) Photosphere and Chromosphere Imaging- Narrow & Broadband
3 Solar Low Energy X-ray Spectrometer (SoLEXS) Soft X-ray spectrometer: Sun-as-a-star observation
4 High Energy L1 Orbiting X-ray Spectrometer(HEL1OS) Hard X-ray spectrometer: Sun-as-a-star observation
In-situ Payloads
5 Aditya Solar wind Particle Experiment(ASPEX) Solar wind/Particle Analyzer Protons & Heavier Ions with directions
6 Plasma Analyser Package For Aditya (PAPA) Solar wind/Particle Analyzer Electrons & Heavier Ions with directions
7 Advanced Tri-axial High Resolution Digital Magnetometers In-situ magnetic field (Bx, By and Bz).

PSLV-C57/Aditya-L1 Mission :

September 05, 2023 :
Second Earth-bound maneuvre (EBN#2) is performed successfully. The new orbit attained is 282 km x 40225 km.
September 03, 2023 :
The next maneuvre (EBN#2) is scheduled for September 5, 2023, around 03:00 Hrs. IST
The first Earth-bound maneuvre (EBN#1) is performed successfully from ISTRAC, Bengaluru. The new orbit attained is 245 km x 22459 km
The satellite is healthy and operating nominally
September 02, 2023:
India’s first solar observatory has begun its journey to the destination of Sun-Earth L1 point
The vehicle has placed the satellite precisely into its intended orbit
The launch of Aditya-L1 by PSLV-C57 is accomplished successfully

******************************

सफर विज्ञानविश्वाची ( Safar Vidnyanvishwachi )
डॉ. आनंद अर्जुन सराईकर ·

SUN की बात!! भारताचे सूर्ययान : आदित्य L1


सध्या भारतात चंद्रयानाचे दिवस चालू आहेत व त्यास तसे कारणही आहेच. भारताच्या चांद्रयान 3 ने चंद्राच्या दक्षिण गोलार्धात पाऊल ठेवल्यावर जणू काही दक्षिणदिग्विजय झाला!! बहुतांशी भारतीय हे मिशन personally follow करताना दिसतायत. पण अजून एक मिशन येऊ घातलं आहे, आदित्य L1 म्हणजेच सूर्ययान! येत्या शनिवारी, 2 सप्टेंबरला ह्या “सूर्ययानाचे” उड्डाण होईल.
सूर्य, आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य व महत्त्वाचा घटक! किंव्हा संपूर्ण जीवसृष्टीचा दाता! दिवस उजाडला की आपलं रुटीन चालू होत, जसजसा “दिवस” पुढे सरकतो तसतसे आपले रुटीनसुद्धा पुढे वाटचाल करीत राहते. एकदा का संध्याकाळ किंव्हा रात्र झाली की सूर्याप्रमाणे आपणही निजतो. कळत नकळत आपण त्या सूर्याप्रमाणे उगवतो, आपली नित्य कामे करतो व रात्री झोपतो. म्हणजेच सूर्य हा आपला एका अर्थाने करविता तर आपण सर्व कर्ते आहोत, असं म्हणणे वावगे ठरणार नाही. आपल्या दैनंदिन जीवनात सूर्याला बरेच महत्त्व आहे. सकाळी सूर्य नमस्कार व सूर्य नारायणाला अर्घ्य देऊन सुरुवात करतो. आपले संपूर्ण कॅलेंडर हे सूर्यावर अवलंबून असते, आपला वाढदिवस, ऍनिव्हर्सरी, ईतर घटना ह्या सूर्यामुळे दरवर्षी रिपीट होतात. आपले सणवार सुद्धा अवलंबून आहेत, मकरसंक्रांत, कुंभमेळा, पोंगल ई.
इतकेच नाही, तर भारतात प्राचीन काळापासून सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. तेव्हा घड्याळ नसल्याने सूर्याच्या आकाशातील स्थानावरून दिनचर्या ठरली जात असे. मृग नक्षतात सूर्य आल्यावर शेतीविषयक कामे पार पडीत असत. त्यानंतर संपुर्ण वर्षभराचे वेळापत्रक ठरत. अतीप्राचीन काळात रचलेल्या वेदांमध्ये सुद्धा सुर्याचा उल्लेख आढळतो. ऋग्वेदात त्याचा अंधाराचा विनाश करणारा, ज्ञानाचा व जीवनाचा प्रसार करणारा देव म्हणून संबोधले आहे. सृष्टीचा निर्माता म्हणूनही संबोधले जाते. ऋषी कश्यप व त्यांची भार्या अदिती, ह्यांचा सुपुत्र म्हणून सूर्याला मानले जाते. महाभारतातील कर्ण हा सूर्यपुत्र आहे. सूर्याला समान अशी १२ नावे त्याला आहेत, जी सूर्य नमस्कार करताना बोलली जातात. मित्र, रवि, सूर्य, भानु, खग, पूषन्, हिरण्यगर्भ, आदित्य, अर्क, मरीच, सवित्र, भास्कर. रामायणातही सूर्याचा उल्लेख केला आहे. सूर्याचे महत्व सांगणारी काही धार्मिक देवळेसुद्धा बांधली गेली, ओडिसा मधील कोणार्क, गुजरातमध्ये मोढेरा, आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम आणि रत्नागिरीत मधील कनकादित्य, अशी अनेक प्रसिद्ध सूर्य मंदिरांची उदाहरणे आहेत. अनेक गडकिल्ल्यांवर सुद्धा सूर्याचे नक्षीकाम केल्याचे दिसते. भारताबाहेर सुद्धा काही प्रसिद्ध सूर्य मंदिरे आहेत, कंबोडियामधील अंग-कोर वोट मंदिरात सुर्याला खूप महत्त्व दिले आहे.
आता वैज्ञानिक दृष्टीने पहायचे तर पृथ्वीवर सुर्याचा पहिला शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास हा भारतात केला गेला आणि तोही पाचव्या शतकात, आर्यभटाने. त्यांनी सुर्याचा सखोल अभ्यास करून सूर्याच्या नोंदी आर्यभटिय ह्या ग्रंथात केल्या. हा जगातील सर्वांत जुना खगोलशास्त्रीय ग्रंथ मनाला जातो. त्यानंतर मात्रपुढील शतकांत हा अभ्यास वराहमिहीर (सूर्य सिद्धांत), ब्रम्हगुप्त (खंडखाद्यका), लल्ला (शिष्याधीवृध्द) ह्या प्राचीन भारतीय खगोल शास्त्रज्ञांनी केला व त्याचे ग्रंथ लिहिले. इतकेच नव्हे तर अठराव्या शतकात राजा सवाई जयसिंग ह्यांनी जयपूर येथे चक्क एक Solar Observatory बांधली, ज्यात अनेक यंत्रे ज्यांस sun dials म्हणतात, जी फक्त सावलीवरून किती वाजले हे सांगतात!! दिल्लीत सुद्धा अशीच एक observatory आहे, त्यास आपण “जंतर मंतर” म्हणतो. ह्या सर्वांमुळे हे कळते की भारतात सुर्याचा सखोल अभ्यास हा पूर्वापार चालत आला आहे. म्हणूनच सध्याच्या (आपण मानत असलेल्या) मॉडर्न काळात आपण भारतात अनेक solar observatories बांधल्या. उदयपूर, कोडाइकॅनाल, वैनू बापू, गिरवली, हॅनले येथे आपल्या Solar Observatories आहेत. वातावरणाच्या अडथळ्यामुळे सुर्याचा अभ्यास करण्यासाठी थेट अंतराळात एक “अभ्यासू” वेधशाळा “स्थानापन्न” करणार आहेत, ज्याचं नावच आहे, आदित्य L1.
ISRO अर्थातच एकविसाव्या शतकात जन्माला आलेली भारतीय अंतराळ संशोधन संस्था! ह्याच संस्थेत अनेक बुद्धिवान शास्त्रज्ञ, अभियंते व इतर कर्मचारी सतत आपल्या “डोक्यावरील” विज्ञानाचा अभ्यास करीत असतात. खरंतर २००८ मध्येच आदित्य मोहिमेला हिरवा कंदील देण्यात आला होता. पण तेव्हा फक्त अगदी प्राथमिक व लिमिटेड स्वरूपात ही मोहीम होती. तसेच त्यासाठी मानधनसुद्धा फार नव्हते. अवघे ३ कोटी रुपये. पण २०१६ मध्ये ह्या मोहिमेचा हेतू व स्वरूप पुर्णतः बदलण्यात आले. एक पूर्णपणे सुर्याचा सखोल अभ्यास करणारी “वेधशाळा” बांधण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी लागणारा निधीसुद्धा देण्यात आला, जवळपास पावणे चारशे कोटी रुपये इतका!!!
नुकतेच आपण चंद्रयान मोहिमेत पाहिले असेल की त्यात एक orbiter आहे म्हणजेच एक उपग्रह जो चांद्रभोवती फिरत असतो आणि एक रोव्हर जे त्यावर उतरतले व सध्या फिरत आहे. अर्थातच आपण रोव्हर वगैरे सूर्यावर उतरवणार नाही आहोत किंव्हा orbiter त्याच्या भोवती फिरता ठेवणार नाही आहोत. कारण दोनही गोष्टींचा काहीही logic नाहीये. म्ह्णून आपण हे आदित्य L1 यान सूर्यासमोर एका “विशिष्ट जागी” “स्थिर” ठेवणार आहोत. अंतराळात अनेक चमत्कार पाहायला मिळतात. त्यातील एक म्हणजे, एखादा ग्रह व तारा ह्यांच्या गुरुत्वीयबलामुळे काही “ठिकाणी” गुरुत्वाकर्षण हे जवळपास निष्क्रिय होते किंव्हा नगण्य असते. अश्या ठिकाणी कोणती वस्तू असेल तर ती वस्तू कायम तिकडेच “स्थिरावस्तेत” राहते!! म्हणजेच त्या ठिकाणी तो तारा व ग्रह ह्यांच्या गुरुत्वाकर्षणाचा Equilibrium point ठरतो. अश्या ठिकाणास Lagrange Point म्हणतात. प्रत्येक ग्रहाला अशी ५ Lagrange Points असतात. त्यातील एका Lagrange Point वर आपण आपलं आदित्य हे यान प्रस्थापित करणार आहोत. हा Lagrange Point सूर्य – पृथ्वीच्या मध्ये येत असल्याने हे यान कायम सूर्याकडे बघत राहील. म्हणजेच त्याला बघण्यात कोणताही अडथळा येणार नाही. हा पहिला Lagrange Point असल्याने त्यास L1 म्हणतात. म्हणूनच ह्या संपुर्ण मोहिमेचे नाव आदित्य L1 आहे! पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर हे L1 स्थान आहे. एक गंमत सांगायची तर अश्या ह्या विशिष्ट चमत्कारामुळे गुरू ग्रहाच्या Lagrange Points मध्ये काही लाखभर अशनी अडकलेले आहेत!! खरंतर हा चमत्कार वगैरे काही नसून फक्त भौतिकशास्त्राचा एक नमुना आहे, हे येथे नमूद करण्यात आले आहे.
आता समजून घेऊया हे यान नक्की काय करणार आहे आणि सुर्याचे निरीक्षण व अभ्यास कसा करणार ते. त्याआधी हे सोपे करण्यासाठी दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत त्या म्हणजे…
१) सूर्य प्रकाश:- सूर्य हा तारा आहे. त्यामुळे तो सतत प्रकाशाचे उत्सर्जन करीत असतो. प्रकाश म्हणजे विद्युत-चुंबकीय लहरींचा प्रवाह! ज्याला Electro-Magnetic spectrum म्हणतात! Spectrum म्हणजेच वर्णपट! आपल्याला पावसाळ्यात इंद्रधनुष्य दिसते, ७ रंगांचे. हा सुद्धा एक spectrum आहे. नेहमीच्या सुर्य प्रकाशात आपल्याला हे रंग दिसत नाही पण spectrum मध्ये ते दिसल्याने आपल्याला त्यांची उपस्थिती असल्याचे कळते. तसेच Electro – Magnetic Spectrum मध्ये सुद्धा अशी काही घटके आहेत जी नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही पण सूर्याच्या प्रकाशाचा वर्णपट घेतला तर ती घटके कळतात. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला काही शारीरिक इजा झाली की आपण X-ray काढतो. म्हणजे ती इजा शरीरात कुठे व कितपत झाली आहे ते कळत. घरी जेवण गरम करायला आपण microwave ओव्हन वापरतो. पाणी शुद्ध करण्यासाठी UV water purifier वापरतो. सर्व प्रकारच्या रिमोट मध्ये IR सेन्सर असतो आणि सर्वांचा फेव्हरेट रेडिओ! ही सर्व उपकरणे सांगायचा हेतू एवढाच की Electro – Magnetic spectrum हा ह्या सर्व घटकांनी बनलेला आहे. रेडिओ, मायक्रो, इन्फ्रा रेड, Visible (दृश्य), अल्ट्रा व्होयलेट, X-rays आणि गॅमा rays. अश्या ह्या सर्व घटकांनी मिळून हे विद्युत चुंबकीय क्षेत्र बनले असते. आपल्या सुर्यावरून हे सतत उत्सर्जित होत असतात. आपल्या डोळ्यांना मात्र Visible (दृश्य) प्रकाश दिसतो.
२) सूर्याचे वातावरण:- जसे पृथ्वीवर वातावरण असते, तसेच सूर्यावर देखील आहे पण जरा वेगळे. उदाहरणार्थ आपण घरातील बल्ब बघितला तर लांबून त्याची झळाळी दिसते. जर आपण जवळ गेलो तर काचेमधील टांगस्टनची तार दिसते. सूर्याच्या वातावरणाचेही असेच आहे. १५ कोटी किलोमीटर अंतरावर असलेल्या सूर्याची झळाळणारी चकती दिसते. पांढरा पिवळा अशी गोल मोठी चकती दिसते. आपल्याला दिसतो तो सूर्याच्या वातावरणाचाच एक भाग आहे. अश्या ह्या तप्त सूर्याच्या वातावरणाचे काही भाग आहेत. त्यातील एका थराचे नाव आहे Photosphere. आपल्याला जो सूर्य दिसतो किंव्हा आपण सुर्याचा जो भाग पाहतो तो हाच! ह्याचे तापमान साधारणपणे ५ ते ६ हजार अंश सेल्सिअस असते. अर्थात सूर्याला आपल्या पृथ्वीसारखा खडकाळ जमीन किंव्हा पृष्ठभाग नाहीये पण तप्त अश्या लाव्हाप्रमाणे अग्नीचा एक थर आहे ज्यास Chromosphere म्हणतात. संत्रे सोलल्यावर जसे दिसते जवळपास तसाच हा पृष्ठभाग दिसतो, पण अगदी लालभडक! सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान हे सरासरी तापमान ७००० अंश सेल्सिअस इतके असते. सुर्याचा अजून एक सर्वांत बाहेरील वातावरणाचा थर जो Photosphere पासून अवघ्या २००० किलोमीटर अंतरावर असून पण त्याचे तापमान हे चक्क १० लाख अंश सेल्सिअस इतके प्रचंड आहे! अश्या ह्या अतितप्त वातावरणाचे नाव “Corona” आहे!! (ह्याचा कोरोना ह्या महामारीशी काहीही संबंध नाही.) मराठीत त्याला “सूर्य किरीट” असे म्हणतात. सूर्यापासून लांब असूनही त्याचे तापमान इतके प्रचंड कसे ह्यावर अजूनही संशोधन सुरू आहे. सुर्याचा हा भाग आपण फक्त खग्रास सूर्यग्रहणात पाहू शकतो.
ही झाली पार्श्वभूमी.
आता ह्या मिशनची उद्दिष्टे काय आहेत ते जाणून घेऊ.
१) सूर्याच्या वातावरणाचे सखोल निरीक्षण व अभ्यास करणे.
२) सूर्यावरील प्लाझ्मा (वस्तूची एक प्रकारची अवस्था), सुर्यावरून उफळणाऱ्या तप्त ज्वाळा, सुर्यावरून उत्सर्जित होणारे आगीचे लोण ह्या सर्वांचा अभ्यास करणे.
३) सूर्याच्या Corona चा विशेष अभ्यास करणे.
४) सूर्याच्या dynamics चा अभ्यास करून त्याचा अंतराळातील हवामानावर होणारा परिणाम जाणून घेणे.
५) सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करणे.
वरील उद्दिष्टे साध्य करायला अनेक यंत्रणांची किंव्हा यंत्रांची गरज असते. आतापर्यंत इसरोच्या अनेक मोहिमांबद्दल वाचून तुम्हाला एक गोष्ट नक्कीच कळली असेल की प्रत्येक यानामध्ये निरनिराळी उपकरणे (Payloads) असतात जी वेगवेगळी कामे करतात. आदित्य L1 ही तर एक वेधशाळाच आहे त्यामुळे त्यावर 7 Payloads आहेत. ही Payloads 2 प्रकारांत मोडतात, एक म्हणजे Remote Sensing व दुसरे म्हणजे In-Situ. थोडक्यात सांगायचे तर Remote Sensing म्हणजे दूरवरून एखाद्या गोष्टीचा अभ्यास करणे आणि In-Situ म्हणजे प्रत्यक्ष त्या जागेवर काही samples च्या आधारे केलेले analysis.
Remote Sensing Payloads:
ह्यामध्ये 4 उपकरणे आहेत. ह्यात प्रामुख्याने काही imaging cameras आणि spectrometers आहेत. जी मुख्यत्वे सूर्याच्या वतावरणाचा अभ्यास करेल. Visible Emission Line Spectrograph (VELS), Solar Ultra Voilet Imaging Telescope (SUIT), High Energy आणि Low Energy X ray Spectrometer (HEL1OS आणि SoLEXS ). मागे उल्लेख केल्याप्रमाणे, सूर्याच्या प्रकाशाचे पृथक्करण करून त्यातील विविध घटकांचे म्हणजेच Ultra violet, X ray, Visible किरणांचे विश्लेषण करेल. अजून एक महत्वाची बाब म्हणजे SUIT हे payload आपल्या पुण्यातील आयुका (IUCAA) संस्थेने बनविले आहे.
In-Situ Payloads:
ह्या प्रकारांत 3 payloads आहेत. जी प्रामुख्याने सौर किरणांचा, L1 पॉईंटवर असणाऱ्या विद्युतभारित कणांचा अभ्यास करेल. Aditya Solar Wind Particle Experiment (ASPEX), Plasma Analyser Package for Aditya (PAPA) आणि Advanced Tri axial High Resolution Digital Magnetometers. ह्यातील ASPEX व PAPA ही यंत्रे साधारणपणे सौर वातांचा (solar winds) चा अभ्यास करेल. तसेच Magnetometer हे L1 जवळील सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करेल.
खरंतर अजूनही आपण सूर्याला पूर्णपणे ओळखलं नाहीये. आपल्या ब्रह्मांडात असणाऱ्या असंख्य ताऱ्यांविषयी जाणून घेण्यासाठी सुर्याचा व मुख्यत्वे करून Space Weather चा अभ्यास करणे व तो पूर्णपणे जाणून घेणे आवश्यक आहे, त्याशिवाय इतर ताऱ्यांविषयी समजणे कठीण आहे. Space Weather हे मोठ्या प्रमाणात पृथ्वीला अफेक्ट करते. एखादा मोठा solar storm हे आपल्या पृथ्वीवरील power generators बंद पाडू शकते, अनेक उपग्रह निकामी करू शकतात, मोबाईल नेटवर्क बंद पडू शकते. Coronal Mass Ejection ही अश्याच प्रकारची एक घटना आहे. ज्यामुळे सूर्याचे चुंबकीय जाळे (क्षेत्र) मोठया प्रमाणात बदलू शकते. तसे झाले तर त्याचा परिणाम हा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावरसुद्धा होऊ शकतो. जर तसे झाले तर पृथ्वीची उपग्रहांमार्फत जोडली गेलेली संपर्क यंत्रणा कोलमडू शकते. पक्ष्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून सुर्याचा अभ्यास केला तर भविष्यात अश्या संभाव्य धोक्यांची कल्पना आधी येऊ शकते व आपण तातडीने precautions घेऊ शकतो. तसेच सूर्याच्या करोनाच्या अती उष्णपणाचे कारण शोधण्यास आदित्य यान मदत करेल.
आजवर सुर्याचा जाणून घेण्यासाठी जवळपास 60 मोहीमा आखल्या, काही सध्या कार्यरत सुद्धा आहेत. ह्यात नासाचा दबदबा आहे. त्यासोबत रशिया, जपान हे देशही आहेत. Solar Dynamic Observatory, SOHO, Helios, Parker Solar Probe ही त्यातील काही मोहिमांची नावे. एक मुद्दामहून उल्लेख करायचा झाला तर Parker Solar Probe ही नुकतीच सूर्याच्या अगदी जवळ गेली होती, थोडक्यात सांगायचे तर ह्या यानाने सूर्यस्पर्श केला असे म्हणायला हरकत नाही. सूर्याच्या अगदी जवळ गेलेले हे पाहिले व एकमेव यान!! अर्थातच काही विशिष्ट यंत्रणा असल्याने ते जळून खाक झाले नाही. आपले पहिले वहिले सूर्ययान म्हणजे आदित्य L1 हे सुध्दा आता संपूर्णपणे सज्ज झाले आहे. येत्या शनिवारी 2 सप्टेंबरला ह्याचे उड्डाण होईल व सूर्याच्या नवीन माहितीवर ”प्रकाश” टाकेल.
मंगळयान असो किंव्हा नुकतेच चंद्रभूमीवर अवतरलेले चंद्रयान 3 असो व तसेच अवकाशात गवसणी घालण्यासाठी तयार होत असलेले गगनयान आणि हे सूर्ययान अर्थात, आदित्य L1 . हे सर्व पाहता इसरो स्वतंत्र भारताच्या विज्ञानाच्या विकासाच्या कक्षा रुंदावून ग्रह, उपग्रह व तारे ह्या सर्वांपरी पोहोचत आहे. आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या आसपास होणाऱ्या (शब्दशः) चंद्रस्पर्श व (अतिशयोक्तीपर) सूर्यस्पर्श अश्या दोन ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार होण्याचा मान व अभिमान लाभल्याने गदिमांच्या काव्यातील एक सुंदर ओळ अगदी हुबेहूब जुळते…
…आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे!!!!
© अंबरीश पवार
२७ ऑगस्ट २०२३

***********

सफर विज्ञानविश्वाची ( Safar Vidnyanvishwachi )
Tushar B Kute ·

लॅग्रेंज पॉंइंट काय असतात?

‘आदित्य’साठी या पॉइंटवर पोहोचणं का गरजेचं आहे? जाणून घ्या
भारताची पहिली सौरमोहीम आता काही तासांमध्येच पार पडणार आहे. आदित्य एल-1 च्या लाँचिंगचं काउंटडाऊन सुरू झालं आहे. शनिवारी (2 सप्टेंबर) सकाळी 11:50 वाजता इस्रोचं पीएसएलव्ही रॉकेट ‘आदित्य’सोबत अंतराळात झेप घेईल.
यानंतर सुमारे चार महिने प्रवास करुन हा उपग्रह पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर जाईल. याठिकाणी असलेल्या एका लॅग्रेंज पॉइंटच्या हेलो कक्षेत हा उपग्रह प्रस्थापित करण्यात येईल. हे लॅग्रेंज पॉइंट काय असतात? आणि आदित्य उपग्रह याच ठिकाणी का ठेवण्यात येणार आहे? असे प्रश्न कित्येकांना पडत आहेत.
लॅग्रेंज पॉइंट काय असतात?
लॅग्रेंज पॉइंट हे अंतराळातील अशा जागा असतात, ज्याठिकाणी एखादी वस्तू ठेवल्यास; ती वस्तू तिथेच कायम राहते. किंवा, ती वस्तू स्थिर ठेवण्यासाठी अगदी कमी बल किंवा उर्जेची गरज भासते. याला कारण म्हणजे, याठिकाणी सूर्याचं गुरुत्वाकर्षण बल आणि त्या पॉइंटजवळ असणाऱ्या दुसऱ्या मोठ्या वस्तूचं गुरुत्वाकर्षण बल हे काही प्रमाणात बॅलन्स होतं.
इटॅलियन-फ्रेंच गणिततज्ज्ञ जोसेफी-लुईस लॅग्रेंज यांनी याचा शोध लावला होता. त्यांच्या स्मरणार्थ या पॉइंट्सना लॅग्रेंज असं नाव देण्यात आलं आहे. अंतराळात अशा प्रकारचे पाच पॉइंट आहेत. यातील तीन पॉइंट L1, L2 आणि L3 हे अस्थिर पॉइंट्स आहेत. तर, L4 आणि L5 हे पॉइंट्स स्थिर आहेत.
यातील एल-1 हा पॉइंट सूर्याच्या वाटेवर आहे. या ठिकाणाहून सूर्याचं विना-अडथळा निरीक्षण करता येतं. सध्या याठिकाणी सोलार अँड हेलिओस्फेरिक ऑब्जर्वेटरी सॅटेलाईट म्हणजेच SOHO प्रस्थापित आहे. L2 हा लॅग्रेंज पॉइंट पृथ्वीच्या मागच्या बाजूला आहे. याठिकाणाहून सूर्याचं सातत्याने निरीक्षण शक्य नाही. एल-3 हा लॅग्रेंज पॉइंट हा सूर्याच्याही मागच्या बाजूला आहे. तर L4 आणि L5 हे एका विशिष्ट कोनात असणारे स्थिर लॅग्रेंज पॉइंट्स आहेत.
L1 ची निवड का?
‘आदित्य’ उपग्रह ठेवण्यासाठी L1 पॉइंटची निवड करण्यामागे विविध कारणं आहेत. या ठिकाणाहून सूर्याचं सातत्याने निरीक्षण करणं शक्य आहे. कारण, इथून सूर्यापर्यंत मध्ये कोणतीच मोठी गोष्ट येत नाही. तसंच, पृथ्वीवर ज्याप्रमाणे 12 तास प्रकाश आणि 12 तास अंधार असतो, तसाही काही अडथळा इथे नाही. इथून 24×7 सूर्याचा अभ्यास करणं शक्य आहे.
या पॉइंटच्या भोवती असणाऱ्या थ्री-डायमेंशनल हेलो ऑर्बिटमध्ये ‘आदित्य’ला ठेवलं जाईल. इथून तो आपल्या विविध उपकरणांच्या माध्यमातून सूर्याचं निरीक्षण आणि अभ्यास करेल.
संदर्भ: दैनिक सकाळ

सफर विज्ञानविश्वाची ( Safar Vidnyanvishwachi )
Tushar B Kute ·

ISRO : 1,480 किलोचा उपग्रह, 15 लाख किलोमीटर अंतर, अवघ्या 20 सेकंदांमध्ये मिळणार डेटा! ‘आदित्य L1’ मोहिमेची खास वैशिष्ट्ये
चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर, इस्रो आता आपल्या पहिल्या सौर मोहिमेसाठी सज्ज झालं आहे. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11:50 वाजता भारताचं हे सूर्ययान लाँच होईल. या मोहिमेमध्ये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य’ उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
भारताचं हे पहिलंच ऑब्जर्वेटरी-क्लास स्पेस बेस सौर मिशन आहे. शनिवारी लाँच केल्यानंतर ‘आदित्य’ला ‘L1’ या लॅग्रेंज पॉइंटवर पोहोचण्यासाठी सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागेल. हा पॉइंट पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर आहे.
आदित्य उपग्रहामध्ये 590 किलोचं प्रॉपल्शन फ्लुएल असणार आहे. तर, यामध्ये असणाऱ्या विविध उपकरणांचं वजन हे एकूण 890 किलो आहे. बंगळुरूममध्ये असणाऱ्या इंडियन इन्सिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सने याचं डिझाईन केलं आहे. तर, यातील प्रमुख पेलोड VELC हा मुख्यत्वे अहमदाबादमध्ये तयार करण्यात आला आहे.
या उपग्रहाला आदित्य नाव देण्यामागे मोठं कारण आहे. आदित्य हे सूर्याच्या 12 नावांपैकी एक आहे. तसंच, भारताचा भास्कर नावाचा एक उपग्रह आधीपासूनच अवकाशात आहे. त्यामुळे, सौर मोहिमेसाठी असणाऱ्या उपग्रहासाठी ‘आदित्य’ हे नाव निश्चित करण्यात आलं.
L1 या लॅग्रेंज पॉइंटवर प्रस्थापित झाल्यानंतर आदित्य सूर्याचा अभ्यास सुरू करेल. पृथ्वीवरून या पॉइंटपर्यंत जाण्यासाठी आदित्यला चार महिन्यांचा वेळ लागेल. त्यानंतर पुढे पाच वर्षांपर्यंत आदित्य सूर्याचं निरीक्षण आणि अभ्यास करेल.
सूर्याच्या आतील पृष्ठभागाचं तापमान हे सुमारे 5,500 डिग्री सेल्सिअस एवढं असतं. त्यानंतर मधल्या स्तरांवरील तापमान हे कमी होत जातं. मात्र, सर्वात बाहेरील आवरणावर असणारं तापमान हे पुन्हा कमी होण्याऐवजी वाढून 15 लाख डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचतं. याच्या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न आदित्य करेल.
यासोबतच कोरोनल हीटिंग, सौर वादळे, कोरोनाल मास इंजेक्शन, फ्लेअर्स पृथ्वीच्या जवळील अंतराळ हवामान, सूर्यावरील वातावरण आणि इतर बऱ्याच गोष्टींचा अभ्यास आदित्य करणार आहे.
इस्रोच्या एका वैज्ञानिकाने दिलेल्या माहितीनुसार, आदित्य उपग्रह आपल्या उपकरणांच्या मदतीने सूर्याचे कित्येक फोटो घेईल. सोबतच, सौर वादळे आणि इतर गोष्टींबद्दल डेटा गोळा करेल. यासाठी आदित्यमधील SUIT (सोलार अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप) चा वापर करण्यात येईल. यानंतर VELC चे शटर उघडून सूर्याचा फोटो घेण्यात येईल. हा डेटा 20 सेकंदांमध्ये इस्रोला मिळणार आहे.
संदर्भ: दैनिक सकाळ

********

माझा मित्र श्री.अशोक मलहोत्रा याने दिलेली माहिती :

Fri, Sep 1 at 11:47 AM

Tomorrow, 2.9.2023 at 11:50 AM may script another red letter day for India and for ISRO. This is by far a bigger journey, and more complicated in controls and guidance, first of it’s kind by ISRO.
Summarily, it will place our observation satellite at L-1 Lagrangian location of the Sun-Earth rotational plane (Halo Orbit), that’s about 1.5 m kms from the Earth or 148.5 m kms from the Sun’s surface, after a journey time of ~4 months (125 days).
It’s costing us ~Rs 400 Cr ($ 50m). In comparison, NASA’s Parker probe cost it 1.5 b$, that was launched 5 years back in Aug 2018. It is yet to reach it’s final orbital destination of 3.8 m kms from the Sun and is presently done it’s 16th rotation around the Sun, at it’s nearest point of 4.5 m kms, that was to eventually reduce it’s velocity to 8.7 kms/sec by another gravity assist from the Venus (21.8.23) and by itself. (Sun has a dia of 0.691 m kms and the Sun-Earth distance is 147-152 m kms).
On 28.4.21, on its 8th round, Parker has already passed through the Carona-Solar wind zone.
Aditya by comparison is at a much safety distance of 148.5 m kms from the Sun (40 times father away the Sun than Parker. But Aditya will stay at a relatively one location as compared to the fly by type missions of the Parker.
It may also be noted that we already have the James Web and Gaia Telescopes at the L-2 location and the Deep Space Climate Observatory at the L-1 location.
So there will be some nearby company for our adolocent Aditya.

*****

नवी भर दि. ०९-०१-२०२४ : आदित्ययान आपल्या नियोजित स्थानी सुखरूप पोचले.

सफर विज्ञानविश्वाची…
ISRO ने कोरले अंतराळ संशोधनामध्ये सुवर्ण अक्षरात आपले नांव …


Aditya L1 Mission : ‘एल-1’ लॅग्रेंज पॉइंटवर पोहोचला ‘आदित्य’; इस्रोची ऐतिहासिक कामगिरी!
ISRO Sun Mission : आदित्य एल-1 ही भारताची पहिलीच सौर मोहीम इस्रोने यशस्वीपणे पार पाडली आहे. आज (6 जानेवारी) सायंकाळी चार वाजता आदित्य उपग्रहाला एल-1पॉइंटवर प्रस्थापित करण्यात आले.
भारताची पहिलीच सौरमोहीम, आदित्य एल-1 ही यशस्वीपणे पार पाडून इस्रोने नवा इतिहास रचला आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य’ हा उपग्रह
पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवर (Lagrange Point) प्रस्थापित करण्यात आला आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. सुमारे चार महिन्यांचा प्रवास करून हा उपग्रह याठिकाणी पोहोचला.
“मी सुरक्षितपणे पोहोचलो”
आदित्य यानाने देखील इस्रोला एक संदेश देत आपण सुरक्षितपणे एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवर पोहोचल्याचं सांगितलं आहे. हा पॉइंट पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर आहे. “एवढ्या दूर असूनही मी तुमच्या अगदी जवळ आहे. आपण सूर्याची गुपिते आता उघड करणार आहोत” अशा आशयाची पोस्ट इस्रोच्या आदित्य एल-1 या एक्स हँडलवरुन करण्यात आली आहे.
आज (6 जानेवारी) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास इस्रोच्या वैज्ञानिकांनी या उपग्रहाला एल-1 बिंदूवरील हेलो कक्षेत (L1 Halo Orbit) प्रस्थापित करण्यासाठी मॅन्यूव्हर राबवले. अगदी अलगदपणे आदित्य उपग्रह याठिकाणी ठेवण्यात आला. आता इथूनच पुढील पाच वर्षे तो सूर्याचं निरीक्षण करेल, आणि मिळालेली माहिती इस्रोला पाठवेल. (India first Solar Mission)
आदित्य उपग्रहासोबत सात पेलोड पाठवण्यात आले आहेत. यातील चार पेलोड हे थेट सूर्याचं निरीक्षण करून त्याचा अभ्यास करतील, तर इतर तीन पेलोड हे सोलार इमिशनचा अभ्यास करतील. पुढील पाच वर्षे आदित्य सूर्याचा अभ्यास करत राहणार आहे. यातून कोरोनल हीटिंग, कोरोनल मास इंजेक्शन, प्री-फ्लेअर आणि फ्लेअर क्रियांची माहिती मिळणार आहे. अंतराळातील हवामानाचा अभ्यासही यामुळे करता येणार आहे.
लॅग्रेंज पॉइंट काय असतात?
लॅग्रेंज पॉइंट (Lagrange Point) या अवकाशातील अशा जागा असतात, जिथे सूर्याचं गुरुत्वाकर्षण आणि जवळच्या एखाद्या ग्रहाचं गुरुत्वाकर्षण बल हे समान असतं. यामुळे या पॉइंटवर ठेवण्यात आलेली वस्तू एकाच ठिकाणी स्थिर ठेवण्यासाठी जास्त उर्जा खर्च करण्याची गरज भासत नाही. पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर L1 हा लॅग्रेंज पॉइंट आहे. येथे स्थिरावलेली कोणतीही वस्तू सूर्याभोवती पृथ्वीसारखेच भ्रमण करते.
एल-1 या लॅग्रेंज बिंदूवर WIND, ACE आणि डीप स्पेस क्लायमेट ऑब्जर्वेटरी हे नासाचे तीन उपग्रह आधीपासून आहेत. यासोबतच नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने संयुक्तपणे लाँच केलेला सोलार अँड हेलिओस्फेरिक ऑब्जर्वेटरी (SOHO) हा उपग्रह देखील याठिकाणी आहे.

आदित्य एल १ यान सूर्यावर जाणार नाही ?


आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा असा समज झाला आहे की इसरो ने जसे चंद्रयान ३ चंद्रावर उतरवले तसेच आता सूर्यावरही यान उतरणार आहे किंवा तिथे जाणार आहे, परंतु तसे अजिबात नाही.
आदित्य एल १ हे यान म्हणजे एक प्रकारचा सायन्स ओब्सेर्व्हेटोरी टेलिस्कोप आहे यात अनेक प्रकारची वैज्ञानिक उपकरणे बसवली गेली आहेत,
जी सूर्याच्या वातावरणाचा, सौर ज्वाळा, सौर वारे, सूर्याचे विदुत चुंबकीय क्षेत्र आणि एकूण सूर्याच्या संबंधी जितकी वैज्ञानिक माहिती आता उपलब्ध आहे त्याची अचूकता आणखी वाढवण्यासाठी काम करतील.
सूर्य ते पृथ्वी अंतर हे अंदाजे १५० दशलक्ष किलोमीटर इतके आहे आणि आदित्य एल १ यान हे पृथ्वीपासून केवळ १.५ दशलक्ष किलोमीटरवर जाऊन त्या कक्षेतच फिरत राहणार आहे. (See Diagram)
याचा अर्थ आदित्य एल १ यान हे सूर्य ते पृथ्वी अंतराच्या केवळ १ % अंतरावरच जाणार आहे, त्यामुळे ते सूर्यावर जाणार आहे किंवा सूर्याच्या जवळ जाणार आहे असे सर्व दावे / बातम्या चुकीच्या आहेत.
पृथ्वीचे आणि सूर्याचे गुरुत्वाकर्षण बल जिथे एकमेकांच्या विरोधात कॅन्सल आउट किंवा ऍव्हरेज केल्यासारखे होते त्या कक्षेला लाग्रांज पॉइंट्स असे नाव आहे.
जे एकूण ५ ठिकाणीआहेत.
त्यातील सूर्य आणि पृथ्वी च्या सरळ रेषेत असलेल्या L1 नावाच्या लाग्रांज पॉईंट च्या भोवती आदित्य एल १ यान जाऊन त्या बिंदू भोवतीच फिरत राहणार आहे.
यानाची पुढील बाजू सतत सूर्याच्या दिशेत असेल जी सूर्याचे अध्ययन करेल आणि मागील बाजू सतत पृथ्वीच्या दिशेत असेल जी संदेशवहन करेल.
L1 हा बिंदू सारखा जरी असला तरी तो पृथ्वी जसजशी सूर्याभोवती फिरताना कक्षेत पुढे सरकत राहील तसा L1 बिंदू आणि तेथील यान सुद्धा त्याच कक्षेत सूर्याभोवती फिरत राहील. (Black dashed line)
L1 बिंदूच का निवडला ?
L1 याच ठिकाणी यान का ठेवले तर तिथे सूर्याचे गुरुत्वाकर्षण बल आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल एकमेकांच्या विरोधात कॅन्सल आऊट किंवा ऍव्हरेज केल्यासारखे होते आणि परिणामी यानाला कमीत कमी इंधन वापरून कक्षेत फिरत ठेवता येते.
अवकाशात एखाद्या दीर्घकालीन ऑब्सर्व्हेशन मिशन साठी ह्या वेगवेगळ्या लाग्रांज पॉईंट कक्षांचा वापर करतात आणि तसे वैज्ञानिक उपकरण दुर्बिणी असलेले सॅटेलाईट त्या कक्षेत नेऊन स्थापित करतात.
आदित्य एल १ सारखेच सूर्याचे अध्ययन करणारे नासा चे Solar and Helio

*****

*******************

‘गगनयान’ क्रू मॉड्यूल

सफर _विज्ञानविश्वाची
भारताची आणखी एक गगनभरारी; ‘गगनयान’ क्रू मॉड्यूलची चाचणी यशस्वी
मोठ्या अडथळ्यांची शर्यत आणि आव्हानांचा सामना करुन अखेर भारताच्या ‘गगनयान’च्या क्रू मॉड्युलनं गगनभरारी घेतली. गगनयान अभियानाची पहिली चाचणी यशस्वी झाली. या यशस्वी चाचणीमुळे भारतानं अवकाश मोहिमेत आणखी एक इतिहास रचला आहे. शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास इस्रोच्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन गगनयानचं क्रू मॉडेल लाँच करण्यात आलं. यालाच टेस्ट व्हिकल अबॉर्ट मिशन-1 (Test Vehicle Abort Mission -1) आणि टेस्ट व्हिकल डेवलपमेंट फ्लाईट (TV-D1) असंही म्हणलं जात आहे.
इस्रोच्या गगनयान मोहिमेअंतर्गत श्रीहरीकोटा इथे काही क्षणात पहिलं चाचणी उड्डाण प्रक्षेपित करण्यात आलं. आधी ही चाचणी खराब हवामान आणि तांत्रिक कारणामुळे रद्द करण्याची घोषणा झाली होती. मात्र आता तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून उड्डाण चाचणी सकाळी दहा वाजता करण्यात आली. दरम्यान, गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे चाचणी उड्डाण करण्यात येणार आहे. या चाचणी दरम्यान मॉड्यूल अंतराळात नेलं जाईल. त्यानंतर ते ठराविक उंचीपर्यंत नेऊन पुन्हा पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवले जाईल. इस्रोकडून या उड्डाण चाचणीला अबॉर्ट टेस्ट असं नाव देण्यात आलं आहे.
इस्रोसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. गगनयान मोहिमेची पहिली मोठी चाचणी आज यशस्वीरित्या पार पडली. गगनयान मोहीम यशस्वी करण्यासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ पूर्ण तयारी करत आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था भारताच्या गगनयान मोहिमेच्या प्रक्षेपणाच्या दिशेनं क्रू एस्केप सिस्टम (CES) चे पहिलं चाचणी उड्डाण करण्यात आलं. शनिवारी गगनयान मोहिमेदरम्यान, रॉकेटमध्ये बिघाड झाल्यास अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणारी क्रू एस्केप सिस्टम चाचणी करण्यात आली. अशा मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी ही चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे.

गगनयान TV-D1 चाचणी

Sharad Kelkar

🚀 गगनयान TV-D1 चाचणी आज सकाळी यशस्वीरीत्या पार पडली आहे!
आपात्कालीन परिस्थितीत अंतराळयात्री बसलेली कुपी (Crew Module – CM) यानापासून विभक्त होईल, आणि क्रू एस्केप सिस्टिम (Crew Escape System – CES) ती कुपी सुखरूप आणि सुरक्षितरीत्या समुद्रात उतरवेल, ह्या चाचणीसाठीचे उड्डाण आज सकाळी ८ वाजता इस्रोने आयोजित केले होते…
पहिल्यांदा ७:३० वाजता हवामान अनुकूल नसल्याने ८ वाजताचे उड्डाण ८:३० पर्यंत पुढे ढकलले गेले…
रिशेड्यूलमधे लिफ्ट-ऑफ् ला केवळ ५ सेकंद राहिली असताना, इंजिन्स प्रज्वलित केल्यानंतर, लिफ्ट-ऑफ् सिस्टिममधे काही विसंगती आढळल्याने, कंट्रोल काँप्युटरने काऊंटडाऊन थांबवला…
त्यानंतर केवळ तासाभरात (!!) शास्त्रज्ञांनी लिफ्ट-ऑफ् होऊ न शकल्याची कारणे शोधून काढली, आणि ती दुरुस्त करून, यानात आवश्यक ते इंधन रिफिल करून, १० वाजताची उड्डाण वेळ ठरवली!…
१० वाजताचे उड्डाण यशस्वी झाले, आणि ठरवल्याप्रमाणे साधारण १७ किमी उंचीवर आपात्कालीन परिस्थिती मुद्दाम निर्माण करून CM Abort Test घेतली गेली…
चाचणीत योजलेल्या सर्व सिस्टिम्स आणि प्रोसिजर्स यशस्वीपणे पूर्ण पार पडल्या, आणि साधारण १०:०९ वाजता, उड्डाणानंतर ९ मिनिटांनी आणि किनार्‍यापासून १० किलोमीटर अंतरावर, CM यशस्वीपणे 🌊 समुद्रात उतरवले गेले!
त्यानंतर 🛳️ भारतीय नौसेनेच्या जवानांनी CM समुद्रातून जहाजावर घेतले!
टेस्ट फ्लाईटमधे निर्माण झालेली ग्लिच त्वरित शोधून काढून, केवळ दीड तासात रिशेड्यूल्ड चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करणार्‍या इस्रोच्या शास्त्रज्ञांचे भरपूर अभिनंदन!… 🇮🇳👍🏼💐🙏🏼

शरद केळकर
२१ ऑक्टोबर २०२३
आता TV-D2 TV-D3 आणि TV-D4 अश्या टप्प्या-टप्प्याने पुढच्या चाचण्या घेण्यात येतील ज्यामुळे CES ही संपूर्णपणे सुरक्षित सिस्टिम अस्तित्वात येईल, जी गगनयान अभियानासाठी वापरली जाईल…

गगनयान #इस्रो #भारतीय_नौसेना

·
अवकाशयानाच्या बांधणीत आता 🇮🇳 इस्रोचे तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ एवढे निष्णात झाले आहेत, की 🚀 गगनयान मोहिमेत अवकाशयात्रींना घेऊन जाणारी कुपी आपात्कालीन परिस्थितीत यानापासून विलग होऊन 🌊 समुद्रात सुरक्षित उतरवण्यासाठी करायच्या TV-D1 या प्रायोगिक उड्डाणासाठी त्यांनी द्रव इंधनावर चालणारे एक स्वतंत्र यानच डिझाईन केले!…
आणि केवळ काही मिनिटांसाठी उपयोगात आणले जाणारे ते यान नुसते डिझाईनच केले नाही, तर उड्डाणाच्या आधी केवळ ५ सेकंद त्यात झालेला बिघाड त्यांनी तासाभराच्या आत शोधून दुरुस्तही केला, आणि त्यानंतरच्या अर्ध्या तासात इंधन रिफिल करून यानाचे यशस्वी उड्डाणही त्यांनी करून दाखवले!… 💪🏼👍🏼
🇮🇳 इस्रोच्या तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या ह्या कौशल्य आणि प्राविण्यासाठी त्यांचे हार्दिक अभिनंदन!… 💐🙏🏼

  • शरद केळकर
    २१ ऑक्टोबर २०२३

गगनयान यात्री

स्वदेशी अंतराळयानातून जाणारे भारताचे “गगनयान यात्री”
शुभांषु शुक्ला
प्रशांत बाळकृष्णन नायर
अजित कृष्णन
अंगद प्रताप
असे ४ भारतीय हवाई दलातील पायलट इसरो तर्फे सोडण्यात येणाऱ्या गगनयान अंतराळ यानातून अंतराळात जाणारी पहिली भारतीय टीम होणार आहे.
गगनयान हे भारतीय बनावटीचे मानव अंतराळ प्रवास करण्यासाठी बनविलेले एक क्रू मोड्युल आहे, एखाद्या छोट्या खोली इतक्या आकाराचे बनलेले आहे ज्यात हे ४ अंतराळ यात्री बसतील. रॉकेट च्या साहाय्याने हे गगनयान अवकाशात जाईल आणि मुख्य रॉकेट पासून वेगळे होईल.
गगनयान पृथ्वी भोवती एखाद्या सॅटेलाईट प्रमाणे भ्रमण करीत सुमारे ३ दिवस अवकाशात राहील आणि नंतर पॅराशूट च्या साहाय्याने समुद्रात सॉफ्ट लँडिंग करेल असे मिशन प्लॅन मध्ये आहे.
सुमारे ४०० किलोमीटर उंचीवर कक्षेत हे गगनयान ४ अंतराळयात्रींना घेऊन जाणार आहे ज्यामुळे हा भारतीय रॉकेट विज्ञान आणि भविष्यातील मानव मिशन साठी सर्वात मोठा टप्पा असणार आहे.
ऑक्टोबर २०२३ मध्ये गगनयान क्रू इमरजेंसी इजेक्ट सेफ्टी टेस्ट केली गेली जी यशस्वी झाली.
आता ह्या वर्षी व्योममित्र (Vyoma-mitra) नावाचा test humanoid robot रोबोट या गगनयानात प्रवास करून टेस्ट फ्लाईट करणार आहे.
सर्व टेस्ट रिझल्ट अपेक्षे प्रमाणे आल्यावर इसरो तर्फे ट्रेनिंग घेतलेले हे ४ पायलट गगनयान मधून २०२५ मध्ये यात्रा करतील अशी अपेक्षा आहे.
रशियाच्या Gagarin Cosmonaut Training Center येथून गगनयान यात्रींचे स्पेस फ्लाईट आणि अवकाश यात्री संदर्भातील ट्रेनिंग गेले १३ महिने चालू होते जे पूर्ण झाले आहे, आता ते मिशन डिटेल आणि वेहिकल ऑपेरेशन संदर्भातील पुढील ट्रेनिंग इसरो च्या बंगळुरू मधील Human Space Flight Center मधून घेणार आहेत.
अंतराळ प्रवास हा जोखमीचा भाग असल्याने भारत देश त्यात स्वबळावर टेक्नॉलॉजी बनवून छोट्या टप्प्यात काम करीत आहे.
गगनयान २०२५ मिशन सफल झाल्यास भारत पुढे २०३५ पर्यन्त स्वतःचे बनविलेले अंतराळ स्थानक (स्पेस स्टेशन) उभरण्याकडे काम करीत आहे ज्याने सन २०५० पर्यन्त आपल्या स्वदेशी रॉकेट टेकनॉलॉजीने चंद्रावर जाता येईल असा विश्वास आहे.
हे ४ जण स्वदेशी रॉकेट मधून जाणारे पहिले भारतीय जरी असले तरी प्रत्यक्ष अवकाशात जाणारे पहिले भारतीय हे कॅप्टन राकेश शर्मा हे होते ज्यांनी रशियाच्या रॉकेट मधून एप्रिल १९८४ मध्ये पहिला अंतराळ प्रवासी होण्याचा मान मिळविला होता.

अवकाश कचर्‍याचे व्यवस्थापन

१० जानेवारी २००७ रोजी इस्रोने ६८० किलोग्रॅम वजनाचा Cartosat-2 हा high resolution imaging satellite अवकाशात सोडला होता… पृथ्वीपासून ६३५ किलोमीटर उंचीवर Sun synchronous Polar orbit मधे सोडलेल्या ह्या सॅटेलाईटमधील इंधन संपत आल्यावर, अवकाशातल्या कचर्‍याचे व्यवस्थापन करणार्‍या IADC ह्या एजन्सीच्या मानकांनुसार, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी २०२० साली, कार्टोसॅट-२ हा उपग्रह आपला आपण डीऑरबिट होत असताना इतर सॅटेलाईट्सवर आदळणार नाही अश्या ३८० किलोमीटर उंचीवरच्या कक्षेत आणून ठेवला होता… त्यानंतरही कार्टोसॅट-२चे ट्रॅकिंग होत होते, आणि इस्रोच्या अनुमानाप्रमाणे, १४ फेब्रुवारी २०२४ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ३:४८ वाजता कार्टोसॅट-२ ने हिंद महासागरावर असताना पृथ्वीच्या वातावरणात पुनर्प्रवेश केला… विविध डेटा अ‍ॅनालिसिस झाल्यावर, कार्टोसॅट-२ची बहुतेक उपकरणे वातावरण घर्षणामुळे जळून गेली आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
उपग्रहाचे काम संपल्या कारणाने अवकाश कचरा बनून अवकाशात फिरणार्‍या सॅटेलाईट्सना पृथ्वीच्या वातावरणात आणून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याची क्षमता इस्रोने सिद्ध केली आहे!
इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांचे अभिनंदन!

  • शरद केळकर
    १७ फेब्रुवारी २०२४
    एकीकडे अवकाश कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन करत असतानाच, आज – १७ फेब्रुवारी २०२४ रोजी – संध्याकाळी ५:३५ वाजता, इस्रोने श्रीहरिकोटा येथील लाँचपॅडवरून 🚀 GSLV F14 ह्या अवकाश वाहकाद्वारे 🛰️ INSAT 3DS हा हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी उपयोगात आणला जाणारा उपग्रह यशस्वीपणे अवकाशात सोडला आहे! GSLVचे हे १६वे यशस्वी उड्डाण आहे! इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांचे परत एकदा अभिनंदन!