राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

11 मे हा दिवस भारतासाठी अतिशय खास आहे. ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन’ 11 मे रोजी साजरा केला जातो. या दिवशी देशात तंत्रज्ञानाची क्रांती झाली. हा दिवस इतिहासात 1998 ची ‘पोखरण अणु चाचणी’ आणि अंतराळातील भारतातील मोठी प्रगती म्हणून ओळखला जातो. हा दिवस भारताने पोखरणमध्ये केलेल्या पाच अणुबॉम्ब चाचणीचा पहिला टप्पा होता. अणूबॉम्बची चाचणी करून भारताने जगात आपला दबदबा वाढवला होता. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यामुळे पाश्चात्य देशांच्या शक्तीला आणि वर्चस्वाला भारताने आव्हान दिले. 11 मे 1998 रोजी सकाळी वाळवंटातील पोखरणमधील खेतोलाई गावाजवळ भारताने अणुचाचणी घेतली. व्हाइट हाऊस नावाच्या शाफ्टचा स्फोट झाला. 58 किलोग्राम टन अणुबॉम्बची चाचणी घेऊन भारताने सर्वांना चकित केले. भारताने ही अणूचाचणी गुप्तपणे केली होती. डॉ.कलाम आणि त्यांची टीम यांनी अनेक वेळा चाचणी स्थळाला भेट दिली. लष्करी अधिकारी म्हणून त्यांनी अनेक महिने त्या भागात वास्तव्य केले. परंतु कोणालाही याबद्दल माहिती मिळाली नाही आणि त्यानंतर यशस्वी अणुचाचणी झाली.

११ मे हा प्रत्येक भारतीयासाठी खास आहे. १९९८ पासून ११ मे रोजी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ साजरा केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारताने केलेले प्रगती आणि त्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बहुमूल्य योगदानाचे स्मरण राहावे या उद्देशाने हा दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. ११ मे १९९८ रोजी अशी एक घटना घडली होती, ज्यामुळे जगासमोर भारताने आपली खरी ताकद दाखवली होती. त्या ऐतिहासिक घटनेची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस; साजरा करणे अधिक महत्त्वपूर्ण समजले जाते.

१९७४ मध्ये भारताने पोखरणमध्ये पहिल्यांदा अणु चाचणी केली होती. या मोहिमेला Smiling Buddha असे नाव देण्यात आले होते. आपल्या देशाला अण्वस्त्र संबंधितचे तंत्रज्ञान सिद्ध करण्यासाठी काही विशिष्ट चाचण्या करण्याची गरज होती. परंतु त्यावेळी आंतरराष्ट्रीय दबावामुळे आणि राजकीय कारणांमुळे अणु चाचण्या करण्यामध्ये अडचणी येत होत्या. पुढे १९९८ मध्ये पाच यशस्वी अणु चाचण्या करुन भारताने जगाला आपली खरी ताकद दाखवून दिली. लगेच दोन दिवसांनी दोन नवीन अण्वस्त्रांची चाचणीदेखील करण्यात आली. या संपूर्ण प्रकल्पाचे नेतृत्त्व देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम करत होते.
पोखरणमध्ये मिळालेला विजय साजरा करत तेव्हाचे तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताला आण्विक राष्ट्र घोषित केले होते. यामुळे यशस्वी अणुचाचणी करणाऱ्या राष्ट्रांच्या गटामध्ये भारताने प्रवेश केला होता. त्यानंतर दुसऱ्या वर्षी ११ मे हा दिवस ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला होता. ११ मे १९९८ मध्ये पोखरणमध्ये घडलेल्या या ऐतिहासिक घटनेला या वर्षी २५ वर्ष पूर्ण होत आहेत. या गोष्टीचे निमित्त साधत देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतातील पहिल्या स्वदेशी विमानाचे यशस्वी उड्डाण
११ मे १९९८ रोजी पोखरण चाचणी व्यतिरिक्त आणखी काही कारणांसाठी खास होता. या दिवशी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) त्रिशूल क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. त्याशिवाय भारतातील पहिले स्वदेशी विमान हंसा-३ या विमानाने पहिल्यांदा भरारी घेतली होती. वैमानिकांचे प्रशिक्षण, हवाई छायाचित्रण आणि पर्यावरणीय प्रकल्पांसाठी हे विमान वापरले जाणार होते.

.
१८ मे १९७४ रोजी, १९७४ सालच्या बुद्ध पौर्णिमेला, भारताने पहिला चाचणी अणुस्फोट केला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, अणुऊर्जाआयोगाचे अध्यक्ष डॉ. होमी सेठना आणि भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजा रामण्णा यांच्या नेतृत्वाखाली हा स्फोट करण्यात आला. या घटनेचे वर्णन ’बुद्ध हसला’ असे करण्यात आले. या घटनेनंतर सारे जग भारताच्या या अणुसामर्थ्याने विस्मयचकित झाले. आपल्याहून भारताने वरचढ होऊ नये म्हणून, अनेक देशांनी भारतास उच्चतम तंत्रज्ञान देणे बंद केले. त्याचा परिणाम होऊन भारत असमर्थच राहील, असे त्यांना वाटत होते. मात्र तसे झाले नाही. भारताने स्वबळावर ’महासंगणक (सुपरकॉम्प्युटर)’, ’निम्नतापी (क्रायोजनिक)’ तंत्रे, ’प्रक्षेपणास्त्रे (मिझाईल्स)’, ’भूस्थिर उपग्रह (जिओस्टेशनरी सॅटेलाईटस)’ इत्यादी क्षेत्रांत अभूतपूर्व प्रगती स्वबळावरच केली

.
१९७४ साली पोखरण येथे चाचणी करण्यात आलेल्या अणुविस्फोटक साधनाकरता अंतर्स्फोटाची पद्धत डॉ. राजगोपाल चिदंबरम यांनीच विकसित केली होती. याकरता त्यांनी, संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेसोबतच्या घट्ट परस्पर समन्वयातून, भाभा अणुसंशोधन केंद्रात धक्कालहरींचे (शॉकवेव्हजचे) संशोधन सुरू केले. १९९८-च्या अणुचाचण्यांकरता त्यांनी अत्यंत सुटसुटीत अंतर्स्फोटक प्रणाली उपयोगात आणली, जिचे रूपांतरण पुढे अण्वस्त्रांत करता आले.
.
११ मे १९९८ रोजी, बुद्ध पौर्णिमेलाच भारताने पुन्हा एकदा चाचणी अणुस्फोट केले. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, अणुऊर्जाआयोगाचे अध्यक्ष डॉ. राजगोपाल चिदंबरम आणि भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली हे स्फोट करण्यात आले. विलक्षण गोपनीयता पाळून हे स्फोट घडवले गेले. या स्फोटांनंतर भारतात काहीही करण्याचे सामर्थ्य आहे, असा विश्वास भारतीय जनमानसात निर्माण झाला.
.
अणुस्फोटांचे जादुगारः डॉ. राजगोपाल चिदंबरम
.
जादूगार जसे जना भुलवतो शोधून युक्ती नवी
तैसे दंग चिदंबरं करवुनी योजीति सार्‍या कृती ।
झाले स्फोट कळे, नियोजन कधी झाले कुणा ना कळे
झाली पूर्व तयारिही कशि, कुणी काही न संवेदले ॥ १ ॥
.
धक्का जो बसला जगास सगळे गेले विरोधातही
रोखील्या रसदा युरेनियमच्या तंत्रे न देती नवी ।
राष्ट्रा लागत ते इथेच घडुनी संशोध नेला पुढे
केले सज्ज स्वराष्ट्र ठोस दिधला विश्वास चोहीकडे ॥ २ ॥
.
आम्हीही अणु अस्त्र धारण करू, होऊन विश्वा गुरू
आम्हीही अणुला विभक्त करुनी, ऊर्जा अणूची वरू ।
आम्ही शांति उगा न सोडु तरीही, धाका न सोसू जनी
हा संदेश चिदंबरं विखुरती, स्फोटा करूनी रणी ॥ ३ ॥
.
अशा प्रकारे आधुनिक भारतास विश्वगुरू होण्यास उपकारक ठरणार्‍या वरील घटना वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच घडून आल्याने, आपल्याकरता या दिवसाचे मोल अनमोल आहे. त्यामुळे बुद्धपौर्णिमा साजरी करत असतांना आपण सगळ्यांनीच, आपल्या सनातन सामर्थ्यांना उजागर करणार्‍या या घटनांची स्मृती जागवून, भविष्यात त्यांना आणखीही सन्मान देणार्‍या घटना घडवून आणण्यास प्रवृत्त व्हावे हीच सदिच्छा. येती वैशाख पौर्णिमा सोमवार दिनांक १६ मे २०२२ रोजी आहे. त्या दिवसाकरता आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
.
पूर्वप्रसिद्धीः ठाणे येथील विद्याप्रसारक मंडळाच्या ’दिशा’ या मासिकाचा मे-२०२२ चा अंक.

श्री.नरेंद्र गोळे, निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ यांच्या मुखपुस्तकावरून साभार दि.११-०५-२०२३

*********************************

पोखरण परमाणु परीक्षण १९७४

पोखरण परमाणु परीक्षण

43 वर्ष पूर्व आल इंडिया रेडियो पर सुनाया गया भारत परमाणु शक्ति बन गया है….

आज की पीढ़ी भी जाने

बुद्ध मुस्कुराए
पोखरण टेस्ट 1: जब कृष्ण ने उंगली पर उठाया पहाड़ को…

  • रेहान फ़ज़ल बीबीसी संवाददाता

18 मई, 1974 की सुबह आकाशवाणी के दिल्ली स्टेशन पर ‘बॉबी’ फ़िल्म का वो मशहूर गाना बज रहा था, “हम तुम एक कमरे में बंद हों और चाबी खो जाए.”
ठीक नौ बजे गाने को बीच में ही रोक कर उद्घोषणा हुई, कृपया एक महत्वपूर्ण प्रसारण की प्रतीक्षा करें.
कुछ सेकंड बाद रेडियो पर उद्घोषक के स्वर गूंजे, “आज सुबह आठ बजकर पांच मिनट पर भारत ने पश्चिमी भारत के एक अज्ञात स्थान पर शांतिपूर्ण कार्यों के लिए एक भूमिगत परमाणु परीक्षण किया है.”
इससे एक दिन पहले लंदन में तत्कालीन भारतीय प्रधानमंत्री इंदिरा गाँधी के प्रधान सचिव पीएन हक्सर बार-बार भारतीय उच्चायुक्त बीके नेहरू से सवाल कर रहे थे, “दिल्ली से कोई ख़बर आई?”
जैसे ही भारत के परमाणु परीक्षण की ख़बर मिली नेहरू ने हक्सर के चेहरे पर आई राहत को साफ़ पढ़ा.
वो समझ गए कि हक्सर क्यों बार-बार दिल्ली से आने वाली ख़बर के बारे में पूछ रहे थे.
किसका सिर काटा जाए
पाँच दिन पहले 13 मई को परमाणु ऊर्जा आयोग के अध्यक्ष होमी सेठना की देखरेख में भारत के परमाणु वैज्ञानिकों ने परमाणु डिवाइस को असेंबल करना शुरू किया था.
14 मई की रात डिवाइस को अंग्रेज़ी अक्षर एल की शक्ल में बने शाफ़्ट में पहुंचा दिया गया था. अगले दिन सेठना ने दिल्ली के लिए उड़ान भरी. इंदिरा गाँधी से उनकी मुलाक़ात पहले से ही तय थी.
सेठना ने कहा, “हमने डिवाइस को शाफ़्ट में पहुंचा दिया है. अब आप मुझसे ये मत कहिएगा कि इसे बाहर निकालो क्योंकि ऐसा करना अब संभव नहीं है. अब आप हमें आगे जाने से नहीं रोक सकतीं.”
इंदिरा का जवाब था, “गो अहेड. क्या तुम्हें डर लग रहा है?”
सेठना बोले, “बिल्कुल नहीं. मैं बस ये बताना चाह रहा था कि अब यहाँ से पीछे नहीं मुड़ा जा सकता.” अगले दिन इंदिरा गाँधी की मंज़ूरी ले कर सेठना पोखरण वापस पहुँचे.
उन्होंने पूरी टीम को जमा किया और सवाल किया कि अगर ये परीक्षण असफल हो जाता है तो किसका सिर काटा जाना चाहिए? बम के डिज़ाइनर राजगोपाल चिदंबरम ने छूटते ही जवाब दिया, “मेरा.”

टीम के उपनेता पी के आएंगर भी बोले, “किसी का सिर काटने की ज़रूरत नहीं है. अगर ये असफल होता है तो इसका मतलब है भौतिकी के सिद्धांत सही नहीं हैं.” ( राजा रमन्ना, इयर्स ऑफ़ पिलग्रिमेज)
जीप ने दिया धोखा
18 मई की सुबह पोखरण के रेगिस्तान में गर्मी कुछ ज़्यादा ही थी. विस्फोट को देखने के लिए वहाँ से पाँच किलोमीटर दूर एक मचान-सा बनाया गया था.
वहाँ पर होमी सेठना, राजा रमन्ना, तत्कालीन थल सेनाध्यक्ष जनरल बेवूर, डीआरडीओ के तत्कालीन अध्यक्ष बीडी नाग चौधरी, टीम के उपनेता पी के आयंगर और लेफ़्टिनेंट कर्नल पीपी सभरवाल मौजूद थे.
नाग चौधरी के गले में कैमरा लटक रहा था और वो लगातार तस्वीरें खींच रहे थे. चिदंबरम और एक दूसरे डिज़ाइनर सतेंद्र कुमार सिक्का कंट्रोल रूम के पास एक दूसरे मचान पर थे
श्रीनिवासन और इलेक्ट्रॉनिक डेटोनेशन टीम के प्रमुख प्रणव दस्तीदार कंट्रोल रूम के अंदर थे. परीक्षण के लिए सुबह आठ बजे का समय निर्धारित किया गया था.
लेकिन इससे एक घंटे पहले अंतिम जाँच करने गए वैज्ञानिक वीरेंद्र सिंह सेठी की जीप परीक्षण स्थल पर स्टार्ट होने का नाम ही नहीं ले रही थी. समय निकलता जा रहा था. आख़िरकार सेठी ने जीप वहीं छोड़ी और दो किलोमीटर पैदल चल कर कंट्रोल रूम पहुँचे.
सेठना ने वहाँ मौजूद थल सेनाध्यक्ष जनरल बेवूर से पूछा कि जीप का क्या किया जाए जो परीक्षण स्थल के बिल्कुल पास खड़ी थी. जनरल बेवूर का जवाब था, “ओह यू कैन ब्लो द डैम थिंग अप.”

ऐसा करने की नौबत नहीं आई क्योंकि इस बीच भारतीय सेना के जवान एक जीप ले कर वहाँ पहुंच गए और ख़राब जीप को टो करके सुरक्षित जगह पर लाया गया. लेकिन इस चक्कर में परीक्षण का समय पाँच मिनट और बढ़ा दिया गया.
वी विल प्रोसीड
अंतत: मचान के पास मौजूद लाउड स्पीकर से उल्टी गिनती शुरू हुई. सेठना और रमन्ना ने ट्रिगर दबाने का गौरव प्रणव दस्तीदार को दिया.
जैसे ही पाँच की गिनती हुई प्रणव ने हाई वोल्टेज स्विच को ऑन किया. दस्तीदार के पैरों से ज़मीन निकल गई जब उन्होंने अपनी बाईं तरफ़ लगे इलेक्ट्रीसिटी मीटर को देखा.
मीटर दिखा रहा था कि निर्धारित मात्रा का सिर्फ़ 10 फ़ीसदी वोल्टेज ही परमाणु डिवाइस तक पहुँच पा रहा था. उनके सहायकों ने भी ये देखा. वो घबराहट में चिल्लाए, “शैल वी स्टॉप ? शैल वी स्टॉप?” हड़बड़ी में गिनती भी बंद हो गई.

लेकिन दस्तीदार का अनुभव बता रहा था कि शॉफ्ट के अंदर अधिक आद्रता की वजह से ग़लत रीडिंग आ रही है. वो चिल्लाए, “नो वी विल प्रोसीड.”
जॉर्ज परकोविच अपनी किताब ‘इंडियाज़ न्यूकिल्यर बॉम्ब’ में लिखते हैं आठ बज कर पाँच मिनट पर दस्तीदार ने लाल बटन को दबाया.
कृष्ण ने पर्वत को अपनी उंगली पर उठाया
उधर मचान पर मौजूद सेठना और रमन्ना ने जब सुना कि गिनती बंद हो गई है तो उन्होंने समझा कि विस्फोट को रोक दिया गया है.
रमन्ना ‘इयर्स ऑफ़ पिलग्रिमेज’ में लिखते हैं कि उनके साथी वैंकटेशन ने जो इस दौरान लगातार विष्णु सहस्रनाम का पाठ कर रहे थे, अपना जाप रोक दिया था.
अभी सब सोच ही रहे थे कि उनकी सारी मेहनत बेकार गई है कि अचानक धरती से रेत का एक पहाड़-सा उठा और लगभग एक मिनट तक हवा में रहने के बाद गिरने लगा. बाद में पी के आएंगर ने लिखा, “वो ग़ज़ब का दृश्य था. अचानक मुझे वो सभी पौराणिक कथाएं सच लगने लगी थीं जिसमें कहा गया था कि कृष्ण ने एक बार पर्वत को अपनी उंगली पर उठा लिया था.”

उनके बग़ल में बैठे सिस्टम इंटिगरेशन टीम के प्रमुख जितेंद्र सोनी को लगा जैसे उनके सामने रेत की क़ुतुब मीनार खड़ी हो गई हो.
औंधे मुंह गिरे
तभी सभी ने महसूस किया मानो एक ज़बरदस्त भूचाल आया हो. सेठना को भी लगा कि धरती बुरी तरह से हिल रही है. लेकिन उन्होंने सोचा कि विस्फोट की आवाज़ क्यों नहीं आ रही? या उन्हें ही सुनाई नहीं पड़ रहा ? (रीडिफ़.कॉम से बातचीत- 8 सितंबर 2006)
लेकिन एक सेकेंड बाद विस्फोट की दबी हुई आवाज़ सुनाई पड़ी. चिदंबरम, सिक्का और उनकी टीम ने एक दूसरे को गले लगाना शुरू कर दिया. चिदंबरम ने बाद में लिखा, ”ये मेरे जीवन का सबसे बड़ा क्षण था.” जोश में सिक्का मचान से नीचे कूद पड़े और उनके टख़ने में मोच आ गई.
कंट्रोल रूम में मौजूद श्रीनिवासन को लगा जैसे वो ज्वार भाटे वाले समुद्र में एक छोटी नाव पर सवार हों जो बुरी तरह से डगमगा रही हो. रमन्ना ने अपनी आत्मकथा में लिखा, “मैंने अपने सामने रेत के पहाड़ को ऊपर जाते हुए देखा मानो हनुमान ने उसे उठा लिया हो.”
लेकिन वो इस उत्तेजना में भूल गए थोड़ी देर में धरती कांपने वाली है. उन्होंने तुरंत ही मचान से नीचे उतरना शुरू कर दिया. जैसे ही धरती हिली मचान से उतर रहे रमन्ना अपना संतुलन नहीं बरक़रार रख पाए और वो भी ज़मीन पर आ गिरे.
ये एक दिलचस्प इत्तेफ़ाक़ था कि भारत के परमाणु बम का जनक, इस महान उपलब्धि के मौक़े पर पोखरण की चिलचिलाती गर्म रेत पर औंधे मुँह गिरा पड़ा था.

बुद्धा इज़ स्माइलिंग
अब अगली समस्या थी कि इस ख़बर को दिल्ली इंदिरा गाँधी तक कैसे पहुँचाया जाए?

सिर्फ़ इसी मक़सद से सेना ने वहाँ पर प्रधानमंत्री कार्यालय के लिए ख़ास हॉट लाइन की व्यवस्था की थी. पसीने में नहाए सेठना का कई प्रयासों के बाद प्रधानमंत्री कार्यालय से संपर्क स्थापित हुआ.
दूसरे छोर पर प्रधानमंत्री के निजी सचिव पी एन धर थे. सेठना बोले, “धर साहब, एवरी थिंग हैज़ गॉन…” तभी लाइन डेड हो गई.
सेठना ने समझा कि धर को लगा होगा कि परीक्षण फ़ेल हो गया है. उन्होंने सेना की जीप उठाई और लेफ़्टिनेंट कर्नल पीपी सभरवाल के साथ बदहवासों की तरह ड्राइव करते हुए पोखरण गाँव पहुँचे जहाँ सेना का एक टेलिफ़ोन एक्सचेंज था.
वहाँ पहुँच कर सेठना ने अपना माथा पीट लिया जब उन्होंने पाया कि वो धर का डाएरेक्ट नंबर भूल आए हैं.
यहाँ सभरवाल उनकी मदद को आगे आए. उन्होंने अपनी सारी अफ़सरी अपनी आवाज़ में उड़ेलते हुए टेलिफ़ोन ऑपरेटर से कहा, “गेट मी द प्राइम मिनिस्टर्स ऑफ़िस. “
ऑपरेटर पर उनके इस आदेश का कोई असर नहीं हुआ. उसने ठेठ हिंदी में पूछा आप हैं कौन?
काफ़ी मशक्क़त और हील हुज्जत के बाद आख़िरकार प्रधानमंत्री कार्यालय से संपर्क हुआ.
बहुत ख़राब लाइन पर लगभग चीखते हुए सेठना ने वो मशहूर कोड वर्ड कहा, “बुद्धा इज़ स्माइलिंग. “
प्रधानमंत्री निवास
उस घटना के 29 वर्षों बाद तक पी एन धर ने ये बात किसी को नहीं बताई कि सेठना के ये सारे प्रयास बेकार साबित हुए थे क्योंकि दस मिनट पहले ही थलसेनाध्यक्ष जनरल बेवूर का फ़ोन उन तक पहुँच चुका था.
धर उनसे सीधा सवाल नहीं कर सकते थे क्योंकि टेलिफ़ोन लाइन पर बातचीत सुनी जा सकती थी. धर ने उनसे पूछा था ‘ क्या हाल है?’ बेवूर का जवाब था,’ सब आनंद है.’
धर को उसी समय लग गया कि भारत का परमाणु परीक्षण सफल रहा है. उन्होंने तुरंत प्रधानमंत्री निवास का रुख़ किया. उस समय इंदिरा गाँधी अपने लॉन में आम लोगों से मिल रही थीं.
जब उन्होंने धर को आते हुए देखा तो वो लोगों से बात करना बंद उनकी तरफ़ दौड़ीं. उखड़ी हुई साँसों के बीच उन्होंने पीएन धर से पूछा, “क्या हो गया.”
धर का जवाब था, “सब ठीक है मैडम.”
धर ने अपनी आत्मकथा में लिखा, “मुझे अभी भी याद है कि ये सुनते ही इंदिरा गाँधी की बाँछे खिल गई थीं. एक जीत की मुस्कान को उनके चेहरे पर साफ़ पढ़ा जा सकता था.”🙏🏻🙏🏻🙏🏻

. . . . . वॉट्सॅपवरून साभार दि.२५-०५-२०२३

वसंत वैभव आणि एप्रिल फुले

मी शाळेत असतांना एक कविता शिकलो होतो. त्याच्या पहिल्या कडव्यातच असे लिहिले होते.
वसंत वनात जनात हासे| सृष्टीदेवी जणू नाचे उल्हासे
गातात सृष्टीचे सौंदर्य भाट| चैत्रवैशाखाचा ऐसा हा थाट।।
भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने मी सर्व ऋतूंमध्ये कुसुमाकर म्हणजे वसंत ऋतू आहे असे सांगितले आहे. (ऋतूनां कुसुमाकरः।) वसंत ऋतूला ऋतुराज असेही म्हणतात कारण सर्व सहाही ऋतूंमध्ये सर्वात जास्त आनंददायी असतो. आपल्यासाठीच नव्हे तर निसर्गालासुद्धा उल्हास देतो.

‘एप्रिल फुले’ या विषयावरील मी पूर्वी लिहिलेला लेख इथे पहावा.
https://anandghare2.wordpress.com/2013/04/27/%e0%a4%8f%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b2-%e0%a4%ab%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%87/

पहायला गेल्यास भारतात निरनिराळ्या ऋतूंमध्ये फुलांना बहर येत असतात. त्यामुळे वसंत ऋतूच्या या वैशिष्ट्याचे व्हावे तेवढे कौतुक होत नाही. पण युरोप अमेरिकेत स्प्रिंग हा एकच फुलांनी बहरलेला सीझन असतो. विशेषतः विंटरसीझन (शिशिर ऋतू)मध्ये सगळी झाडे निष्पर्ण झालेली असतात आणि वातावरण उदास झालेले असते. त्यानंतर मार्चअखेर सगळ्या झाडांना नव्या पालवीचे कोंब फुटतात आणि एप्रिलमध्ये ती फुलांनी डंवरून जातात हे दृष्य फारच मनोहारी असते. आपल्याकडील चैत्रातल्या फुलांच्या सौंदर्यउधळणीत दोन रंग प्रामुख्याने आढळतात. लाल आणि पिवळा. यातल्या अनेक छटा संपन्नतेने मिरवत असल्या तरी हे दोन रंग नजरेत भरतात. सृष्टीत जास्वंद, गुलमोहर, सावरी, पांगारा, पलण, बाहवा, बाभुळ असे हळदीकुंकवाचे करंडे भरलेले असतात.


अमेरिकेतल्या टूलिपच्या फुलांमध्येही हे दोन रंग असतातच, शिवाय अनेक रंगांची उधळण केलेली दिसते. याशिवाय ब्लूबॉनेट्स च्या निळ्या फुलांनी फुललेला निसर्ग बहारदार असतो. यावर लिहिलेला एक लेख खाली दिला आहे.

ब्लुबॉनेटस

पुण्याला गेल्यावर मंडईत गेलं की झेंडूच्या फुलांचे मोठं मोठे ढीग लागलेले दिसायचे ,पूर्वी बंगलोर गुलाबाच्या फुलांसाठी प्रसिद्ध ,तर हॉलंड म्हंटल कि ट्युलिप्स आठवतात. पुण्याच्या घराच्या दारात प्राजक्ताचा सडा पडायचा , तर मुंबईला दारात खूप वरपर्यंत वाढलेला मधुमालतीचा वेल होता. तो वेल म्हणजे वर्षभर रंगीत फुल दिसायची खात्री …..ते घराचं वैभव होतं. पूर्वी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स बघायला लांब हिमालयात खूप प्रवास करून जाणारे खूप लोक होते. कास पठारावर जाऊन रान फुलांचा आनंद घेणारे खूप आहेतच.
टेक्सास मध्ये सर्वत्र फुलणारे ब्लुबॉनेट हे टेक्सास स्टेट चे फुल आहे , स्प्रिंग सुरु झाला की काही आठवड्यासाठी येणारी ही फुले सर्वांचेच आकर्षण असतं. ती खूप लकी असतात अशी प्रत्येकाची खात्री असते . संपूर्ण राज्यात या फुलाचे साम्राज्य असतं . ही फुले बघण्यासाठी सगळे टेक्सन्स उत्सुक असतात .1901 साली टेक्सास असेम्ब्लीनें एक ठराव करून ब्लुबॉनेट हे स्टेट फुल ठरवल होत. टेक्सास चा ट्रान्सपोर्ट विभाग प्रत्येक वर्षी सर्व रस्त्यांच्या दुतर्फा ब्लुबॉनेटस च्या बिया पेरते . त्यामुळे सगळीकडे दरवर्षी ही फुले येतात , रस्त्यांचे सौंदर्य देखील वाढते , थंडी संपल्यावर जसे ट्युलिप्स, डॅफोडिल्स जमिनीतून वर येतात , तसेच ब्लुबोनेटस या वाईल्ड फ्लॉवर्सच असतात. पूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूच गवत कापलं जायचं ,परंतु गेली 60 वर्ष ब्लुबॉनेटस चा सिझन संपला की मगच गवत काढलं जात. दरवर्शी 30 हजार पाउंड बिया पूर्ण टेक्सासभर पेरल्या जातात .त्यामुळे सगळीकडेच ब्लुबॉनेटस येतात .घरात लहान मुल आल्यावर जेव्हा पहिल्यांदा ब्लुबॉनेटस फुलतात तेव्हा मुलाचा ब्लुबॉनेटबरोबर फोटो काढण्याची टेक्सासमध्ये प्रथा आहे . घरातल्या सगळ्यांचे ब्लुबॉनेटस बरोबर फोटो काढले जातात. त्यात घरातले सगळेच अगदी डॉग्स ,कॅट्स ,घोडे सुद्धा आलेच .


जपान मध्ये चेरी ब्लॉसम ,इंग्लंड मध्ये गुलाब ,हॉलंड मध्ये ट्युलिप्स तसं टेक्सास मध्ये ब्लुबॉनेटस . इनीस हे टेक्सासमधील शहर ब्लुबॉनेट साठी जास्त प्रसिद्ध . इनिसला कमीत कमी लाखभर टुरिस्ट ब्लुबॉनेटस बघायला जातात . पेरी अँजेला दरवर्षी संपूर्ण टेक्सास मध्ये फिरून येते आणि कुठे कुठे ब्लुबॉनेटस छान फुलली आहेत हे तिच्या वेबसाईट वर सांगते . ते बघून बरेच लोक कुठे जायचं ते ठरवतात . ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यात बी टाकलं जात ,थंडी ,बर्फ यामुळे बी चांगलं उगवतं आणि एप्रिल मध्ये छान झाड वाढून फुलतात . स्प्रिंग येतो तेव्हा सगळीकडे पक्षी येऊन गाणं गातात आणि सगळ्या पर्वत आणि व्हॅलीतुन सुंदर ब्लुबॉनेटस फुलतात अशी गाणी रचली गेली आहेत . टेक्सासमध्ये या झाडांवरील प्रेमामुळे लाल ,मरून ,पांढरी आणि बऱ्याच प्रकारची बॉनेट्स वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीत तयार केली जात आहेत हे विशेष. ..श्री मोकाशी लांसिंग.
. . . . . वॉट्सॅपवरून साभार दि.२६-०४-२०२३

हॉलंडमधील ट्यूलिप गार्डन

आम्ही २००७मध्ये युरोपदर्शनाच्या सहलीवर गेलो होतो तेंव्हा एक पूर्ण दिवस नेदर्लँड्समधील कोकेनाफ इथल्या ट्यूलिपच्या बागा पाहण्यात घालवला. युरोपमध्ये उतरल्यापासूनच ट्युलिपची फुले दिसायला लागली होती. कुठे हॉटेलच्या स्वागतकक्षात त्याचा गुच्छ ठेवलेला असे, तर कुठे इमारतींच्या समोरील बगीचामध्ये त्या टवटवीत फुलांचा छोटासा ताटवा फुललेला दिसायचा. कांही ठिकाणी रस्त्यांच्या चौकांमधील वर्तुळात तर कधी रस्त्यांना विभागणा-या जागेत त्यांची रांग दिसे. हॉलंडमध्ये गेल्यावर त्यांनी फुललेली शेते दिसू लागली. आमच्या हॉटेलच्या रस्त्यावरच रस्त्याच्या कडेपासून थेट नजर पोचेपर्यंत लाल, पिवळ्या, केशरी किंवा हिरव्या लांब रुंद पट्ट्यांचा अवाढव्य गालिचा पसरलेला पाहून डोळे तृप्त होत होते. कोकेनॉफ येथील ट्यूलिप गार्डन ही बाग सुमारे ऐंशी एकर आकाराच्या एका मोठ्या शेताएवढ्या विस्तीर्ण जागेत ऐसपैस पसरली आहे. ट्यूलिपखेरीज कितीतरी इतर सुंदर फुलझाडे, लुसलुशीत गवत आणि घनदाट झाडीसुद्धा या आवारात पद्धतशीररीत्या वाढवलेली आहे. पाण्याचे तलाव आणि त्यात तरंगणारी ‘बदके पिले सुरेख’ही आहेत आणि हंससुद्धा आहेत.
ट्यूलिप ही लिलीच्या जातीची वनस्पती आहे. त्याचे हजाराहून अधिक प्रकार या बागेत लावतात. सर्वसामान्य ट्यूलिपचे झाड गुढघाभर उंचीचे असते. झाड म्हणजे एक सरळ उभा दांडा, त्याला दोन तीन कर्दळीसारखी मोठी पण दांड्याला लपेटलेली पाने आणि डोक्यावर एक मोठे फूल एवढेच. हे फुल उमलल्यावर अप्रतिम सुंदर दिसतेच, पण न उमललेली पेरूएवढी मोठी कळीसुद्धा खूप छान दिसते. एकच कळी किंवा फूल पहायला गेले तर कदाचित थोडे बटबटीत वाटेल, पण खरे नेत्रसुख एक फूल हांतात घेऊन पाहण्यात नसून एकसारख्या झाडांना एकाच वेळी लागलेल्या असंख्य एकसारख्या फुलांच्या रांगा पहाण्यात आहे. याचे कंद लावल्यापासून सुमारे वर्षभराने त्यावर फुले येतात, पण ती फक्त वसंत ऋतुमध्येच येतात. फक्त दोन महिने ती बाग प्रदर्शनीय असते. तेवढ्यात जवळ जवळ एक कोटी पर्यटक ती पाहून जातात म्हणे.
ट्यूलिपच्या फुलांच्या शेकडो रंगछटा तर इथे पहायला मिळतातच, पण दोन दोन रंग असलेली फुलेही आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे वेगवेगळे आकारसुद्धा आहेत. कांहींच्या पाकळ्या सरळ असतात, तर कांही फुलांच्या पाकळ्यांना दंतुर कडा असलेल्या दिसतात. कांही ताटवे एकाच रंगाच्या फुलांनी भरलेले होते तर कांहींमध्ये दोन किंवा अधिक रंगांचे डिझाईन केलेले दिसले. वसंत ऋतूमध्ये फुलणारी इतर अनेक फुलझाडेसुद्धा इथे आहेत. कांही झाडांची पानेच फुलांसारखी सुंदर आहेत, तर कांहींची फुले पानांसारखी हिरवी गार दिसतात. निसर्गाचे वैभव असे अनंत त-हांनी मुक्तपणे खुललेले पहायला मिळते.
http://anandghan.blogspot.com/2009/05/blog-post_23.html

जागतिक वसुंधरा दिवस


वसुंधरा दिनानिमित्त मी केलेली कविता व संकलित माहिती

श्री.माधव विद्वांस

काय किमया निसर्गाची,
मातीत दडले किती अविष्कार
बीज पेरले पाणी घालता,
अंकुर त्यालाही फुटणार
सप्तरंग घेउनी फुले उमलती,
शालू दिसती हिरवेगार
सप्त रस घेउनी फळे लगडती,
चोचले अमुचे पुरविणार
कारल्याचा कडू पण घेउनी,
उसाला पण गोडी देणार
मिरचीचा तिखट झटका,
नयनी आसवे येणार
कपाशीची मृदू मुलायमता,
बाभळीचे काटेही टोचणार
विषवल्ली हा जहरी धोतरा,
संजीवनी पण तुम्हा तारणार
श्रीफलातील मधुर पाणी,
थंडाई अन शक्ती देणार
केवद्यास जरी झाकून ठेविले,
सुगंध त्याचा नाही दडणार
या अवनीने सलिला संगे,
केले किती चमत्कार
रचना : माधव विद्वांस
जागतिक वसुंधरादिनाच्या शुभेच्छा


वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे. आपल्या एकुलत्या एका पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उदिद्ष्ट आहे. आहे. ‘माणसाची प्रत्येक गरज पृथ्वी पूर्ण करते पण हाव नाही’ अशा अर्थाचे महात्मा गांधींचे एक वचन आहे. हवा, पाणी, जंगले यांसारख्या पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा भसाभस अविचारी वापर केल्याने आणि वाढत्या प्रदुषणाचे परिणाम दिसतच आहेत आणि हे असेच चालू राहिले तर मानवाचेच भविष्य अंध:कारमय आहे हे निश्चित ! याबाबत प्रबोधन करण्यासाठी २२ एप्रिल हा वसुंधरा दिन मानला जाऊ लागला.
मूळ संकल्पना व सुरुवात
वसुंधरा दिनाची संकल्पना अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन यांनी मांडली. त्यांनी अमेरिकेतील २ कोटींपेक्षा जास्त लोकांमध्ये पर्यावरणाच्या समस्यांबाबत जागृती केली. प्रदूषण आणि वन्यजीवांचा –हास या मुद्यावर तेथील समाजाच्या सर्व थरांतील लोकांनी आवाज उठवला. हवा, पाणी, वने आणि वन्यजीव, निसर्ग यांच्या संरक्षणासाठी तेथे मोठा राजकीय दबाव निर्माण झाला अशा प्रकारे १९७० सालापासून हा ‘अर्थ डे’ जगभर साजरा केला जात आहे.

माधव विद्वांस


जागतिक वसुंधरा दिन

दरवर्षी २२ एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन साजरा होतो. २०२३च्या त्रेपन्नाव्या पृथ्वी दिनाचे कार्यक्रमसूत्र, ‘पृथ्वी आपले घर आहे त्यात गुंतवणूक करा,’ असे घोषित झाले आहे. जगातील सर्वात मोठा जनजागरणाचा कार्यक्रम, असे या दिवसाचे वर्णन केले जाते.

अमेरिकेच्या सांता बार्बारातील तेलगळती पीडितांनी पृथ्वीवरचे जीवन वाचवण्यासाठी ‘२२ एप्रिल’ वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना प्रथम १९७० मध्ये मांडली. ती सर्वमान्य होऊन पहिल्या वर्षी त्यात २० लाख लोक सहभागी झाले. ही संख्या आता एक अब्जाहून जास्त झाली आहे. वसुंधरा दिनानिमित्तच्या देशोदेशींच्या कार्यक्रमांची अधिकृत माहिती आंतरजालावर (https:// http://www.earthday.org) देतात. वन्यप्राणी निधीसारख्या स्वयंसेवी संस्थादेखील कार्यक्रमांत सहभागी होतात.

या दिवशी शैक्षणिक संस्था, विविध गट, मंडळांतर्फे पृथ्वीच्या संरक्षणासाठीचे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले जातात. ‘‘आपण सामान्य लोक काय करणार? शासनाने ही जबाबदारी घ्यावी’’ हा प्रचलित दृष्टिकोन बदलण्यासाठी पर्यावरण आणि परिस्थितीकी शास्त्राचे ज्ञान दिले जाते. जसे प्रत्येकजण आपले घर व्यवस्थित ठेवतो, तसेच त्याने पृथ्वी चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी काळजी घ्यावी हे यमनिमित्ताने अधोरेखित केले जाते. शाश्वत जीवनपद्धती संदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. हवामान बदलाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा बचत, हरितीकरण, प्रदूषणमुक्त परिसर, घनकचरा व्यवस्थापन अशा साध्या आणि सहज करता येतील अशा उपायांबद्दल जाणीवजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

सध्या आपल्याला मिळालेल्या अंतराळाबद्दलच्या माहितीनुसार जीवसृष्टी असणारा पृथ्वी हा एकच ग्रह आपल्याला वास्तव्यासाठी उपलब्ध आहे. पर्याय नसाल्याने आपण इथेच काळजीपूर्वक शाश्वतरीत्या राहणे गरजेचे आहे. विनाकारण अतिप्रमाणात साधनसंपदा वापरून आपण प्रदूषणाचे डोंगर निर्माण करत आहोत. त्यामुळे इतर जैवविविधता धोक्यात येत आहे. विकासाच्या अनेक कल्पनांनी आपण निसर्गाची रचना बदलून टाकतो. मग निसर्गही त्याला वेळोवेळी चोख प्रत्युत्तर देतो. त्यामुळे मानवाचे जीवन खडतर होते. ऊर्जा बचत करणे; सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय वापरणे; प्लास्टिक, थर्मोकोल किमान वा न वापरणे; वस्तूंचा पुनर्वापर, यांचा आग्रह धरणे एवढे तरी आपण सहजच करू शकतो.

नारायण वाडदेकर … लोकसत्ता वरून साभार दि.२२-०४-२०२३


FAQs काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न
जागतिक वसुंधरा दिवस म्हणजे काय?
प्रत्येक वर्षी 22 एप्रिल रोजी लोक ग्रहाचे जंगलतोड आणि प्रदूषण यांसारख्या विरोधकांपासून संरक्षण करण्यासाठी जागतिक पृथ्वी दिन साजरा करतात.

पृथ्वी दिवसाची सुरुवात कोणी केली?
सिनेटचा सदस्य गेलॉर्ड नेल्सन

पृथ्वी दिनाचा जनक कोणाला म्हणतात?

1970 च्या वसंत ऋतूमध्ये, सिनेटर गेलॉर्ड नेल्सन यांनी या समस्येला राष्ट्रीय अजेंडावर भाग पाडण्याचा एक मार्ग म्हणून पृथ्वी दिवस तयार केला.

मराठी दुनियावरील माहिती

वसुंधरा दिन मराठी निबंध माहिती

आपला देश सर्व जगातील सर्वात जास्त जैवविविधता असलेला आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला देश आहे. भारत हा खेड्यांचा देश आहे.आपल्या भारत देशात सर्वात जास्त परंपरा,रीती रिवाज खेड्यामध्ये पळाल्या जातात. ज्यामध्ये निसर्गाचा अनमोल ठेवा जपण्याची तसेच हिरवीगार वनराई अमूल्य ठेवा म्हणून जतन करून ठेवण्याची परंपरा आहे. पण काळाच्या ओघात विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर हिरवी वनराई नष्ट होत सिमेंटची जंगले उभी राहत आहेत. वाढते प्रदूषण काळजीचे कारण बनत आहे. जागतिक तापमानात वाढ झाली आहे. अनेक स्वास्थ्याच्या व पर्यावरणाच्या, आरोग्याच्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. झाडांची कत्तल आणि वन्यप्राण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष होणे हा आपल्यासाठी धोक्याचा दिवा लुकलुकायला लागला आहे…. असे म्हणावे लागेल.

कोरोनाच्या संकटाने आपल्याला अनेक गोष्टी शिकविल्या. लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र ठिकाणी गाड्याचा वापर कमी झाल्या मुळे प्रदूषणात घट झाली. आज आपण विकास करण्यासाठी आपण झाडतोड करतो आणी नंतर ऑक्सिजन मिळवण्यासाठी आपण यंत्रणा वापरत असतो. माझी वसुंधरा अभियान हे म्हणूनच आपल्या वसुंधरेला, आपल्या पृथ्वीला निसर्गसंपन्न हिरवाईने समृद्ध बनवण्याचे अभियान आहे.

पूर्वी चित्रकला स्पर्धेत मुले चित्र काढायची तेंव्हा उगवणाऱ्या सूर्याचे चित्र काढत असताना अनेक मुले दोन डोंगरां मधून उगवणाऱ्या सूर्याचे चित्र काढत असत. पण आता मुले हेच चित्र दोन इमारतींच्या मधून उगवणाऱ्या सुर्याचे चित्र काढतात. ही आताची स्थिती अवघड आणि धोकादायक असून हे सर्व पर्वत,नेचर,नदी,हे सर्व आपल्या पुढच्या पिढी साठी चांगलं ठेवण ही आपली सर्वांची मोठी जबाबदारी आहे पर्यावरणाचे संरक्षण करणे हे सरकारचेच नसून आपलेही काम आहे.. ‘माझी वसुंधरा अभियान राबविताना यामध्ये प्रत्येकाने सहभाग द्यावा व त्यातून याला लोकचळवळीचे स्वरुप देण्यात यावे. एक झाड लावून त्याचे संवर्धन करून अशी लाखोच्या संख्येने झाडे वाढू शकतात जगू शकतात परंतु बरेचदा आपण वृक्षारोपणाचे फक्त सोपस्कार करतो. झाडाचे रक्षण व संवर्धनाची जबाबदारी मात्र घेत नाही.

म्हणून चला या अभियानाचा भाग बनू या! आपल्या स्वतःसाठी नाही तर आपल्या येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी या निसर्ग संपन्न जैव विविधतेने नटलेल्या सृष्टीचे, वसुंधरेचे रक्षण करूया…!!!

वसुंधरा दिन मराठी निबंध
माझी वसुंधरा : वसुंधरेची एकच हाक,पर्यावरणाचा घ्या ध्यास.वसुंधरा म्हणजेच पृथ्वी, आणि पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर जीवन संभव आहे. पृथ्वीला वसुंधरा, भूमी, धरती, वसुधा अशी अनेक नावे आहेत. पृथ्वी ही सूर्यापासून तिसऱ्या स्थानावर आहे. तिचा जन्म सुमारे ४.५४ अब्ज वर्षांपूर्वी झाला असे मानले जाते. या पृथ्वीवर मानवाच्या जगण्या करीता पर्याप्त संसाधने उपलब्ध आहेत. या सोबतच पृथ्वी वर आपल्या जगण्यासाठी चांगले वातावरण देखील उपलब्ध आहे. या धरतीला आईचा दर्जा देण्यात आला आहे. म्हणूनच आपण सर्वांनी या धरतीचे रक्षण करावयास हवे. पण आज मानव पृथ्वी ची सुरक्षा करण्या ऐवजी तिचे अस्तित्व नष्ट करायला निघाला आहे. धरतीला वाचवण्याकरीता आणि लोकांना जागरूक करण्यास प्रत्येक वर्षी २२ एप्रीलला “वसुंधरा दिन” साजरा करण्यात येतो. या निमीत्त्याने अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येतं. या दिवशी जागोजागी वसुंधरा संवर्धन अभियान चालवले जाते.
माझी वसुंधरा माझी जबाबदारी हे ब्रीदवाक्य सर्वांनी अंगीकारले पाहिजे. माझी वसुंधरा मी कशी समृद्ध करणार याची प्रत्येकाने जबाबदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी वृक्षतोड़ थांबवणे, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर न करणे, वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवणे, कचऱ्याची योग्य विल्हेवात लावणे व वसुंधरा मी कशी समृद्ध करणार याची प्रत्येकाने जबाबदारी घेणे आवश्यक आहे. तेव्हाच आपली वसुंधरा स्वच्छ आणि सुंदर बनविण्याचे ध्येय गाठता येईल. आणि तेव्हाच वसुंधरेचे सवंर्धन होऊ शकते.

वसुंधरा दिवस म्हणजे काय ? का आणी केव्हापासून साजरा करतात
२२ एप्रिल हा दिवस म्हणजेच Earth Day म्हणून साजरा केला जातो.पण वसुंधरा दिवस म्हणजे नक्की काय आणि केव्हापासून तो साजरा केला जातो ते पाहूयात.
अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को गेलार्ड नेल्सन यांनी 1970 मध्ये सर्वप्रथम अर्थ डे ही संकल्पना मांडली त्यांनी अमेरिकेतील २ कोटींपेक्षा जास्त लोकांमध्ये पर्यावरणाच्या समस्यां बाबत जागृती केली.तेव्हापसून 22 एप्रिल हा दिवस प्रतिवर्षी वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो .आपल्या पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उदिष्ट आहे. झाडें,पर्वत, हवा,नदी,समुद्र यांमुळे या सृष्टीतील पर्यावरण चांगले राहते या घटकांची पर्यावरण संवर्धनात प्रमुख भूमिका असते आजच्या दिवशी आपण समाजात पर्यावरणाविषयी जनजागृती करु शकतो वृक्षा रोपण करू शकतो.

वसुंधरा दिन मराठी कविता |
वसुंधरा मी तुम्हां सांगते
माझी जीवन कहाणी
हिरवा शालू माझा देखणा
दिसायची की देखणी ||१||

हिरवे शामल डोंगर सारे
स्वच्छ नदीचे झुळझुळ पाणी
किलबिलाट तो पक्ष्यांचा
मधुर सुस्वर मंजुळ गाणी ||२||

गरजा साऱ्या पुरवीत होते
पण हाव मानवा लागली
यह दिशांनी काया माझी
“स्वार्थासाठी ओरबडली ||३||

उजाड भेसूर डोंगर झाले
दूषित झाले निर्मळ पाणी
वृक्षतोड ती भयाण केली
विरली मंजुळ पाखरं गाणी ||४||

काय असेल भविष्य माझे
विचार करते क्षणीक्षणी
प्रदूषणाने काळवंडली काया
आता दिसेना मी देखणी ||५||

नष्ट होईल माझी काया
श्वास तुझाही गुदमरून जाईल
माझ्यावरचे अस्तित्व तुझे
तुझ्यामुळेच संपून जाईल ||६||

माझ्या मनाची आर्त विनवणी
आता तरी समजून घे
पर्यावरण संरक्षण, संवर्धनाचे
वचन आज तू मला दे ||७||

किलबिलणारे बोल गोठले
खळखळणारे झरे आटले
शुद्ध हवा ना निर्मळ पाणी
दुष्काळाचे मेघ दाटले ||८||

कत्तल झाली परंपरेची
डोंगर राने उघडी पडली
उजाड झाली अवघी सृष्टी
हिरवी मखमल हरवून गेली||९||

सिमेंटच्या या जंगलामध्ये
नद्या नि विहिरी तळास गेल्या
प्रदूषणाच्या विळख्यामध्ये
दूषित होऊन लोप पावल्या ||९||

ऋतुचक्राचे नियम चुकले
निसर्गाचा प्रकोप झाला
कधी कोरोना, कधी त्सुनामी
दैवाचा हा विपरीत घाला||१०||

धरतीमाता माय आपली
रक्षण तिचे करू चला
झाडे लावू, प्लास्टिक बंदी
थोडे नियम पाळू चला||११||

जलाशयांची वाढ करूनी
वनसंवर्धन करू चला
पाणी, इंधन अमूल्य धन हे
जपून वापर करू चला||१२||

परिसर ठेवू स्वच्छ नेटका
फळा-फुलांच्या बागा सजवू
तलम रेशमी शालू हिरवा
प्रकृतीला पुन्हा नेसवू||१३||

येथील पुन्हा दिवस सुगीचे
पशु-पक्षीही होतील गोळा
हिरवी क्रांती जगात होऊन
सौख्यात्वाचा जमेल मेळा||१४||

जिथे जन्मतो, जिथे खेळतो
अंगावरती जिच्या वाढतो
ऋण फेडू या वसुंधरेचे
जिच्याच अंती कुशीत शिरतो||१५||

झाडे लावा आणि झाडे जगवा
सुजल, निर्मळ भविष्य घडवा||

वसुंधरा दिन मराठी स्लोगन्स

स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे |
परिसर स्वच्छ ठेवाल, तर निरोगी व्हाल|
व्हावया पर्जन्यवृष्टी, वृक्षांनी सजवा सृष्टी|
करूया चराईबंदी, कुऱ्हाडबंदी पर्यावरणासाठी ही शेवटची संधी|
ओझोन वाचवा, जीवन वाचवा|
पाणी, जमीन, झाडे, पशुपक्षी, हवा
आपल्या सुखासाठी राखा हा ठेवा|
वसुंधरेची एकच हाक, पर्यावरणाचा घ्या ध्यास|
प्रदूषण रोखा, पर्यावरण राखा|
पर्यावरण रक्षण, राष्ट्राचे संरक्षण|
ओला अन कोरडा कचरा काढा वेगळा,
गांडूळ खत निर्मितीचा नियम हा पाळा|
पर्यावरण रक्षणाची धरा कास
तरच होईल मानवाचा विकास |
जिथे पर्यावरणाचा ऱ्हास, तिथे प्रदूषणाचा त्रास |
राखावया पर्यावरण, करू चला वनीकरण|

निसर्गासारखा नाही रे सोयरा,
गुरू, सखा, बंधू, मायबाप,
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप,
मिटती क्षणात आपोआप |

पुढच्या पिढीला हक्काने सांगू,
पर्यावरणाचा तोल आताच सांभाळू..|
नका करू अंगण तुझं आणि माझं,
पर्यावरण तर आहे सर्वांचं |
पर्यावरण वाचवण्यासाठी उचला पाऊल,
जीवन होईल सर्वांसाठी अनुकूल |
निसर्गामधून हा धडा गिरवूया,
पर्यावरणाचे संरक्षण करूया |
जर पर्यावरण दूषित होईल,
तर आरोग्य निहित असेल.
पर्यावरण वाचविण्यासाठी पाउल उचला,
जीवनाला पर्यावरणास अनुकूल बनवा|
कचरा आणि प्रदूषण पसरले,
दिवसाढवळ्या अत्याचार सहन करावे लागतात,
जगायचे असेल तर मला वाचवा,
पृथ्वी आम्हाला हाक मारायला सांगते |
झाडे लावून प्रदूषण कमी करूया,
पृथ्वीला स्वर्ग बनवूया |
हे उदात्त कार्य करण्यासाठी काही तरी निमित्त असेल,
पृथ्वीच्या रक्षणासाठी सर्वांना पुढे यावे लागेल |

आजूबाजूला स्वच्छता ठेवा, कचरा पसरवू नका, प्रदूषण दूर करून, रोज पृथ्वी दिन साजरा करा |

दूषित धरती, दूषित वायु और दूषित होगा यदि पानी,
न बचेंगे मानव धरती पर, न बचेगी उनकी कहानी |

ज्याने आपल्याला जीवन दिले तो सर्व ग्रहांमध्ये विशेष आहे,
पृथ्वी मातेचे आभार, ज्यावर आपण श्वास घेतो |
ती खायला अन्न देते, प्यायला पाणी देते, पृथ्वी मातेची काळजी घेते,
तिची कोणतीही हानी होऊ नये |
शुद्ध हवा, शुद्ध पाणी दिले, कोणताही खर्च घेतला नाही,
पृथ्वीच्या रक्षणासाठी आपणही काही काम केले पाहिजे |
आपल्या स्वार्थासाठी भविष्याची शिडी कापू नका,
पृथ्वीचे रक्षण करा आणि पुढच्या पिढीकडे सोपवा|

https://www.marathidunya.com/2022/04/2022-earth-day-marathi-mahiti.html

श्री,माधव विद्वांस, फेसबुक, लोकसत्ता आणि मराठी दुनिया या सर्वांचे मनःपूर्वक आभार

. . . . . . .

पृथ्वीदिन २२ एप्रिल

आजच्या जगात जेंव्हा मानसशास्त्रीय संशोधक नवीन पिढीच्या संगणकाच्या अतिवापरामुळे कसे धोके निर्माण होत आहे, याविषयी लिहितात, त्यावर सॉक्रेटिस जर जिवंत असते तर हसले असते, आणि म्हणाले असते, “बघा, मी तुम्हाला हेच सांगत होतो!” आपल्या सभोवतीच्या जगाचे आकलन करण्या ऐवजी केवळ माहिती संकलन आणि योग्य/अयोग्य, सत्य/असत्य, हो/नाही अशा खुणा करीत राहून त्यावर निष्कर्ष नोंदविण्याची पद्धत त्यांच्यातील तत्ववेत्त्याला नक्कीच हादरवून गेली असती! जगाचे आकलन होण्यासाठी जगाविषयी प्रेम वाटले पाहिजे. सॉक्रेटिस म्हणायचे, ” मला फक्त प्रेम समजते!” जागतिक समस्यांविषयी आणि त्या अंतर्गत जागतिक हवामान बदल, तापमानवृद्धी, कचरा समस्यांविषयी जेंव्हा असे माहिती संच गोळा करून निष्कर्ष काढले जातात, तेंव्हा हेच महत्वाचे असते, की कचऱ्यावर प्रेम करायला शिकले पाहिजे. जागतिक हवामान बदल समजण्यासाठी आजवरच्या हवामानाने पृथ्वीवर नंदनवन कसे निर्माण केले ह्याचे आकलन करून घेतले पाहिजे आणि तापमानवृद्धीचे परिणाम जाणून घेण्यासाठी आत्तापर्यंत अस्तित्वात असलेल्या तापमानामुळे वसुंधरेच्या अक्षयतेला कसे जोपासले होते, हेही समजावून घेतले पाहिजे. तसे झाले तरच या समस्यांविषयीचे गांभीर्य लोकांच्या लक्षात येईल आणि मग समस्यांची उकल होण्यासाठी ती मोलाची मदत असेल!.

……….. शरद काळे (लवकरच प्रकाशित होणाऱ्या निसर्गऋण या पुस्तकातील उतारा).

पंत कवींच्या रचना

मध्ययुगीन काळात काही पंडितांनी मराठी भाषेत सुश्राव्य अशा छंदबद्ध रचना केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने वामन पंडित, रघुनाथ पंडित, मोरोपंत आदींचा समावेश होतो. “सुश्लोक वामनाचा, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची, आर्या मयूरपंताची” असे म्हंटले जाते. त्यातले ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे महान संत होते. वामन पंडित आणि मोरोपंत पंतकवी होते. या दोघांची माहिती देऊन हे पान उघडत आहे. पुढे इतर पंतकवींच्या रचना यातच संग्रहित करायचा विचार आहे.

मी लहानपणी पाठ केलेली दोन यमकाची उदाहरणे या पंतकवींनीच रचलेली आहेत.
१. विराट राजाच्या गावावर कौरवांनी हल्ला करून काही गायी चोरून नेल्या होत्या त्या वेळी अर्जुन असे म्हणतो.
ते गुरु, ते गुरुनंदन, ते कृप, ते कर्ण ते पितामह रे।
यांनी धेनु हराव्या, शिव शिव गोपाळ रामकृष्णहरे ।।
२. पांडव वनवासात फिरत असतांना एका गावातल्या ब्राह्मणाच्या घरी वस्तीला असतांना तिथल्या बकासुर नावाच्या राक्षसाची खूप दहशत असते. त्या वेळी भीम असे म्हणतो,
भीम म्हणे मातेला, ब्राह्मणसमुदाय रडति का पूस ।
त्यांचे दुःख हराया अग्नीला भार काय कापूस ।।

*****

पंत ही व्युत्पन्न जात. संस्कृतचा, काव्य शास्त्राचा अभ्यास केलेली. छंद माहितेचे. ललित लेखनाचे हौस असलेले. पण तरीही धार्मिक बंधन पाळणारे. सर्व सामान्य लोकांची मनोरंजनाची गरज तर भागवयाची पण बायका-मुलांना ऐकावयास संकोच वाटू नये ही लक्ष्मणरेषाही ओलांडवयाची नाही. त्यांनी महाभारत-पुराणातील आख्याने निवडली व त्यावर रसाळ काव्य केले. रसाळ ! एका विशेषणात त्यांच्या काव्यातील नवरसांची ओळख पटावी. आणि परत हे सर्व सोपे-सुलभ.जरा प्रयत्न करा. शाळेत किती सहजपणाने मोरोपंत- वामन पंडित पाठ झाले होते, केले होते म्हणत नाही, हे आठवेल. धडाधडा म्हणतांना मजा यावयाची. ” देवी दयावती दवडसी दासाची दु:खदुर्दशा दूर पापाते पळवितसे परमपवित्रे तुझा पय; पूर .” आठवले की परत शाळेतला वर्ग, ठणठणीत आवाजात केलेले कोरडे घसे [माफ़ करा, यना सर ] याद येतात. तर असे हे पंत आणि पंडित.
श्री.शरद यांच्या उपक्रमवरील (२००९मधील) लेखातून साभार दि.१०-०४-२०२३

१. वामन पंडित

वामन पंडित यांचे आज पुण्यस्मरण (तारखेने ९ एप्रिल)
अर्थातच, श्लोक म्हटला वामन पंडित (यमक्या वामन ) आठवतात. आर्यावृत्त मोरोपंतांचे प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतील ओव्या विख्यात आहेत. तर तुकोबा अंभगरचनेत अग्रगणी आहेत.
भर्तृहरीच्या शतकत्रयीचा अनुवाद आणि यथार्थदीपिका ही गीतेवरील टीका हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
’आंधळी भक्ती ही कुचकामाची असून ज्ञानयुक्त सगुण भक्तीच श्रेष्ठ व मोक्षसाधनाचा उत्तम मार्ग आहे’ हि टिप्पणी आहे ‘यथार्थदीपिका’ या गीतेवरील भाष्यात वामन पंडित यांनी केलेली . अनेकाक्षरी यमके साधण्याकडे त्यांचा कल होता. ‘वनी खेळती बाळ हे बल्लवांचे। तुरे खोवती मस्तकी पल्लवांचे। ’ (वनसुधा) किंवा ‘ म्हणति हे परिसा नवल क्षण। त्रिभुवनेश्वर मानवलक्षण। ’ (वेणुसुधा) ही अशा यमकांची काही उदाहरणे होत. ‘ वंशी नादनटी, तिला कटितटी खोवूनि पोटी पटी, कक्षे वामपुटी स्वश्रृंगनिकटी वेताटिही गोमटी। ’ (वनसुधा) ही त्यांची अनुप्रासात्मक रचना विख्यात आहे.
वामन पंडित इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले मराठी कवी होते.
वामन पंडिताबद्दल खात्रीची माहिती मिळत नाही. ठिकठिकाणच्या दोन भिन्न गोत्रांच्या उल्लेखामुळे कोणी वामन दोन होते असेही मानतात. यथार्थ दीपिकाकार वामन व भर्तृहरीच्या श्लोकांचे भाषांतर करणारा वामन हे दोन वेगळे होते, असे काहींचे मत आहे.
कै लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे मते ते मराठवाड्यातील असावेत क़हिञ्चे मते ते विजापूर भागातील असावेत
समाधिस्थान सातारा जिल्ह्यातील वाईजवळ भोगांव (धोम धरणाचे खालचे बाजूस ) नांवाच्या खेड्यात आहे असे स्थानिक सांगतात .काहींचे मते त्यांची समाधी वारणेकाठी कोरेगाव येथे आहे.तर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव जवळील कुमठे हे त्यांचे गाव असे काहींचे म्हणणे आहे. ते काही असले तरी त्यांनी केलेले लेखन उच्च दर्जाचे होते ,
अभिवादन

श्री.माधव विद्वांस . . . . फेसबुकवरून साभार दि.९-४-२०२३


वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते. त्यांच्या रचना : भागवत रामायण, ब्रह्मस्तुति, श्रीहरीगीता,द्वारकाविजय, कर्मतत्व, नामसुधा, वेणुसुधा, मुकुंदविलास इ.

वामन पंडितांनी राजा भर्तृहरीच्या सुभाषितांचे मराठी रूपांतर केले होते. त्यांची उदाहरणे :

तदितर खग भेणे वेगळाले पळाले
उपवन-जल-केली , जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो, त्याचपाशी नसे तो
कठिण समय येता कोण कामास येतो।।

फळे मधुर खावया असति नित्य मेवे तसे,
हिरेजडित सुंदरी कनकपंजरीही वसे,
अहर्निश तथापि तो शुक मनात दुःखे झुरे,
स्वतंत्र वनवृत्तिच्या घडिघडी सुखाते स्मरे.

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे,
तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनही वितळे,
सशाचेही लाभे, विपिन फिरता शृंगही जरी,
परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी

विद्यासमन्वितही दुष्ट परित्यजावा|
त्यासी बुधे न सहवास कधी करावा||
ज्याच्या असे विमलही मणी उत्तमांगी |
तो सर्प काय न डसे खल अंतरंगी ||

आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला।
झाला तशांत मग वृश्र्चिकदंश त्याला।
झाली तयास तदनंतर भूतबाधा।
लीला वदूं मग किती कपिच्या अगाधा।।

योजी हिताप्रति निवारूनि पापकर्मे
गुह्ये करोनि प्रकटी गुण तो स्वधर्मे
दे आपणास असतां व्यसनी त्यजीना
सन्मित्रलक्षण असे वदताति जाणा

गेला तो नृप, ते प्रधान अवघे, ती पंडितांची सभा
गेली ती नगरी, तशा शशिमुखी, त्या तप्तहेमप्रभा॥
गेला तो नृपपुत्र, त्या शुभकथा, म्या देखिलें सर्व जें
तें जेणें स्मरणास योग्य रचिले, काळास त्या वंदिजे॥

***************

२. मोरोपंत

विकीपीडियावरून साभार दि.१०-०४-२०२३
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0

मोरेश्वर रामचंद्र पराडकर तथा मोरोपंत, मयूर पंडित (जन्म : पन्हाळगड इ.स. १७२९; – बारामती, चैत्री पौर्णिमा, १५ एप्रिल १७९४), हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवी होते. ते मुक्तेश्वर, वामन पंडित, रघुनाथ पंडित आणि श्रीधर यांचे समकालीन पंडित कवी होते.

पराडकर कुटुंब हे कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंब मूळचे कोकण येथील सौंदळ गावचे होय. मोरोपंतांचा जन्म पन्हाळगड येथे झाला. मोरोपंताचे पणजे रामजीपंत हे नोकरीच्या निमित्ताने कोकणातून पन्हाळगडावर येऊन राहिले. रामजीपंताचे नातू रामचंद्रपंत हे मोरोपंताचे वडील. ते कोल्हापूरच्या छत्रपतींच्या पदरी नोकरीस होते. मोरोपंताचे बालपण तिथेच गेले. तेथेच त्यांचा विद्याभ्यासही झाला. पन्हाळगडावरील केशव पाध्ये व गणेश पाध्ये या दोन वेदशास्त्रपारंगत विद्वान बंधूंकडे मोरोपंतांनी न्याय, व्याकरण, धर्मशास्त्र, वेदान्त व साहित्य यांचे अध्ययन केले. वयाच्या २४व्या वर्षांपर्यंत मोरोपंताचे पन्हाळगडावर वास्तव्य होते. मोरोपंताचे वडील इ.स. १७५२ च्या सुमारास पन्हाळगडावरून बारामतीस गेले. पुढे मोरोपंतही वडिलांना भेटण्यासाठी म्हणून बारामतीस गेले व कायमचे बारामतीकर होऊन गेले. पन्हाळगडावरील वास्तव्यात थोडीफार काव्यनिर्मिती सोडल्यास मोरोपंताचे सर्व लेखन बारामतीस झाले. सुमारे ४५ वर्ष अखंडितपणे काव्यरचना करणाऱ्या मोरोपंतानी ७५ हजाराच्यावर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर २६८ काव्यकृतींची नोंद आहे. त्यांनी सुमारे ६० हजार आर्या, श्लोकबद्ध स्तोत्रे, आख्याने व महिलांसाठी ओवीबद्ध गीते लिहिली; तसेच १०८ रामायणे रचली.

पुण्यातील पेशवेकालीन सावकार श्रीमंत बाबुजी नाईक यांच्याकडे पुराणिक म्हणून मोरोपंतांना राजाश्रय मिळाला होता. बारामतीतील कऱ्हा नदीकाठचा एक वाडा बाबुजी नाईकांनी मोरोपंतांना भेट दिला होता. या वाड्यातील एका खोलीत बसून मोरोपंतांनी आपल्या काव्यरचना निर्मिल्या. या खोलीच्या भिंतींवर यमक आणि अनुप्रास असलेले अगणित शब्द मोरोपंतांनी लिहून ठेवले होते. ते शब्द योग्य तेथे वापरून मोरोपंतांनी आपली काव्ये सजवत असत.
मोरोपंतांचे काव्य
मोरोपंतांची काव्यरचना विपुल असून तिचे कालक्रमानुसार पाच खंड पडतात. काव्यरचनेला प्रारंभ त्यांनी वयाच्या बाविसाव्या-तेविसाव्या वर्षी केला असे मानल्यास पहिली दहा वर्षे (सुमारे१७५० ते १७६०) त्यांनी उमेदवारीत घालवली असे म्हणता येईल. विविध वृत्तांमध्ये रचिलेले ‘कुशलवोपाख्यान’ हे त्यांचे पहिले काव्य. त्याशिवाय या प्रारंभीच्या कालखंडात त्यांनी शिवलीलांचे वर्णन करणारा ब्रम्होत्तर खंड आर्यावृत्तात लिहिला आणि भागवताच्या दशम स्कंधाच्या आधारे आर्यागीतावृत्तात कृष्णविजय लिहिण्यास सुरुवात केली. याच काळात प्रल्हादविजय या ग्रंथाची रचनाही त्याच वृत्तात केली. यापुढील पाच वर्षांचा काळ (१७६१ ते १७६५) त्यांच्या श्लोकबद्ध रचनेचा कालखंड होय. पूर्वी आर्यागीतिवृत्तात आरंभिलेला कृष्णविजय हा काव्यग्रंथ त्यांनी या काळात श्लोकबद्ध रचनेने पुढे चालविला. त्यापुढील तिसरा कालखंड १७६६ ते १७७२ पर्यंतचा सहा वर्षांचा असून या काळातील रचनेचा मुख्य विशेष म्हणजे आर्यावृत्ताचे पूर्णपणे प्रस्थापित झालेले प्राबल्य होय. कृष्णविजयाची समाप्ती या कालखंडात झाली. त्याशिवाय सीतागीत, सावित्रीगीत आणि रुक्मिणीगीत ही तीन ओवीबद्ध काव्ये याच काळात लिहिली गेली. मंत्ररामायण, आर्याकेकावली, संशयरत्नावली, नामसुधाचषक इत्यादी ईशस्तोत्रे व काही भागवती स्तोत्रेही याच काळातील होत. यापुढील दहा वर्षांचा (१७३३ ते १७८३) कालखंड मोरोपंतांच्या काव्यजीवनात अत्यंत महत्त्वाचा असून त्याला महाभारतरचनेचा कालखंड म्हणता येईल. आतापर्यंत घटवून चांगले तयार केलेले आर्यावृत्त त्यांनी महाभारताच्या रचनेसाठी योजिले व महाराष्ट्राच्या हाती आपले मराठी आर्याभारत दिले. या दहा वर्षांत त्यांनी त्याशिवाय विशेष काही लिहिले नाही. त्यांच्या काव्यरचनेचा अखेरचा कालखंड म्हणजे महाभारताच्या समाप्तीपासून ते त्यांच्या निधनापर्यंतचा काळ. या अखेरच्या सुमारे बारा वर्षांत मंत्रभागवत, हरिवंश, संकिर्ण रामायणे आणि मुख्य म्हणजे श्लोककेकावली हे त्यांचे अखेरचे काव्य असावे असे त्यातील, ‘कृतान्तकटकामलध्वजजरा दिसो लागली’ या उद्‌गारांवरून वाटते.

मोरोपंत हे मोठे रामभक्त होते आणि त्या भक्तीपोटी त्यांनी अष्टोत्तरशत म्हणजे १०८ रामायणे विविध छंद आणि वृत्त वापरून लिहिलेली आणि प्रत्येक रामायणाचे काहीतरी वैशिष्ट्य होते. मराठी वाङ्मयाचे जुन्या काळातील एक प्रसिद्ध अभ्यासक रामचंद्र दत्तात्रेय पराडकर ह्यांनी ही रामायणे त्यांच्याजवळ असलेल्या मोरोपंतांच्या कागदपत्रांचा वापर करून १९१६ साली दोन भागांमध्ये प्रसिद्ध केली. ही सर्व रामायणे प्रत्येकी काहीशे श्लोकांची आहेत, यद्यपि एकदोन आकाराने त्याहून बरीच मोठी आहेत. त्याचप्रमाणे १८९० च्या दशकामध्ये छापलेल्या काव्येतिहाससंग्रहामध्ये ५ भागांत ह्यातील पुष्कळशी रामायणे तत्पूर्वीच छापली गेली होती.

मोरोपंतांनी गझलाही लिहिल्या आहेत. त्या प्रकाराला ते गज्जल म्हणत.

मोरोपंतांच्या गज्जलेचा नमुना :- रसने न राघवाच्या । थोडी यशांत गोडी ॥
निंदा स्तुती जनांच्या । वार्ता वधू-धनाच्या ।
खोट्या व्यथा मनाच्या । कांही न यांत जोडी ॥

या गज्जलेच्या पहिल्या शब्दावरून ह्या वृत्ताला ‘रसना’ हे नाव मिळाले.


आर्या वृत्तातील प्रचंड काव्यरचनेबद्दल ते प्रसिद्ध होते. त्याबद्दलचा एक श्लोक प्रसिद्ध आहे. ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी तुकयाची, सुश्लोक वामनाचा, आर्या मयूरपंतांची !!

केका म्हणजे वातावरणातील तप्तता कमी करण्यासाठी मोराने आकाशाकडे पाहून केलेले त्याच्या आवाजातील आर्जव. केकावलीच्या रचना १७ अक्षरी “पृथ्वी” वृत्तात रचल्या आहेत,त्यामुळे त्या एका विशिष्ट ठेक्यामधे शाळेतून पाठ करून घेतल्या जायच्या.
सुसंगति सदा घडो सुजनवाक्य कानीं पडोकलंक मतिचा झडो विषय सर्वथा नावडो ।ही कविता सर्वपरिचित आहे. ” पिता जरि विटे, विटो; न जननी कुपुत्री विटे; “दयामृतसार्द्रधी न कुलकज्जले त्या किटे”; या काव्यपंक्तीतून माता पित्याच्या मनोवृत्तीचे सुंदर दर्शन होते. ‘झाले बहू, होतील बहू, आहेतही बहू, परंतु या सम हा’आणि ‘बालिश बहु बायकांत बडबडला’ ह्या त्यांच्या काव्यांतल्या ओळी आजही एखाद्या मोठ्या व्यक्तीचे गुणगान करताना आजही वापरल्या जातात. पण याचे रचनाकार मोरोपंत आहेत हे कोणाच्या गावीही नसते.

मोरोपंताची समयसूचकता

मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत. एकदा ते सरदार घोरपडे यांच्याकडे पुराण सांगायला गेले. कार्यक्रमाला अतिशय रंग चढला. श्रोते अगदी बेभान होऊन पुराण श्रवणात रंगून गेले. पुराण कथनाचा कार्यक्रम संपायच्या बेताला आला असतां, ‘या विद्वान बुवांना बिदागी म्हणून द्यायचे तरी काय ?’ हा विचार सरदार घोरपडे यांच्या मनात येऊन ते त्यांच्याजवळ बसलेल्या खाजगी कारभाऱ्यांच्या कानात त्यासंबंधी कुजबुजू लागले.

ही गोष्ट मोरोपंताच्या लक्षात येताच मनातल्यामनात तत्क्षणी रचलेल्या आर्येत ते घोरपड्यांना उद्देशून म्हणाले,

भोजासम कविताप्रिय, कर्णासम दानशूर घोरपडे ।
ऐसे असता माझ्या बिदागिचा का तुम्हास घोर पडे ॥
ही आर्या कानी पडताच श्रोतृवृंदात हास्याची खसखस पिकली. घोरपड्यांनी मोरोपंताच्या या समयसूचकतेबद्दल त्यांच्यावर प्रसन्न होऊन, त्याच क्षणी आपल्या गळ्यातला कंठा काढून तो त्यांच्या गळ्यात घातला.

परि म्यां एके दिवशी रेवडिचा स्वाद का न चाखावा?
मोरोपंतांच्या लहानपणी त्यांना रेवडीकरबुवांच्या कीर्तनाला जायला एकदा मना केले होते, त्यावेळी बाल-मोरोपंतांनी आर्येतच आपली तक्रार मांडली :

नित्य तुम्ही प्रभुपाशी पेढे बर्फी नवा खवा खावा ।
परि म्यां एके दिवशी रेवडिचा स्वाद कां न चाखावा ।।

मोरोपंतांची सुप्रसिद्ध केकावली :

सुसंगति सदा घडो सुजनवाक्य कानीं पडो
कलंक मतिचा झडो विषय सर्वथा नावडो ।
सदन्घ्रिकमळी दडो मुरडिता हटानें अडो
वियोग घडता रडो मन भवच्चरित्री जडो ॥

न निश्चय कधी ढळो; कुजनविघ्नबाधा टळो;
न चित्त भजनी चळो मति सदुक्तमार्गी वळो ।
स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;
पुन्हा न मन हे मळो दुरित आत्मबोधे जळो ॥

मुखी हरि ! वसो तुझी कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी सकल कामना, मावली ।
कृपा करिशि तू जगत्रयनिवास दासांवरी,
तशी प्रकट हे निजाश्रितजनां सदा सावरी ॥

दयामृतघना ! अहो हरि ! वळा मयूराकडे,
रडे शिशु, तयासि घे कळवळोनि माता कडे।
असा अतिथि धार्मिकस्तुतपदा कदा ! सापडे ?
तुह्मा जड भवार्णवी उतरिता न दासा पडे
संकलक Hrishikesh (हृषीकेश) . . . कविता या अनुदिनीवरून साभार दि.१०-०४-२०२३

. . . . . .

सुप्रसिद्ध कृष्ण कर्णसंवादील भाग :
कर्ण : रथचक्र उद्धरूं दे श्रुति-शास्त्रज्ञा, महा-रथा कुल-जा,
साधु न हाणिति अरिला, पाहति अ-धृतायुध व्यथाकुल ज्या. ।।

कृष्ण म्हणे, “राधेया, भला बरा स्मरसि आजि धर्मातें
नीच व्यसनीं बुडतां निंदिति दैवास, न स्वकर्मातें. ।।
जेव्हा तूं दुर्योधन, दुःशासन, शकुनि एक-मति झालां,
कैसे कपट-द्यूतीं चित्तींहि न धर्म लंघितां भ्याला? ।।
जेव्हां सभेसी नेली पांचाळी, मानिलें मनी न शर्म!
तेव्हां गेला होता कोठे, राधासुता तुझा धर्म? ।।
फेडी वस्त्र सतीचें जेव्हां उघडे करावया आंग,
गेला होता कोठें धर्म तुझा तेधवां? वृषा, सांग ।।
चारुनि विषान्न भीमा सर्प डसविले, असें नृपें खोटें
कर्म करवितां, कर्णा, होता तव धर्म तेधवां कोठें? ।।
केले दग्ध जतु-गृहीं त्वां पांडव वारणावतीं जेव्हां,
गेला होता कोठें धर्म तुझा, सूत-नंदना, तेव्हां? ।।
अभिमन्यु बाळ बहुतीं वधितां, त्वां वारिलें न तें कर्म;
तेव्हा गेला होता कोठें, राधासुता, तुझा धर्म? ।।

शब्दयात्री यांच्या अनुदिनीवरून साभार दि.१०-०४-२०२३


जगजीतसिंग यांच्या गजला

प्रसिद्ध गायक जगजीतसिंह यांना माझे मित्र श्री.सुधीर काळे यांनी वाहिलेली ही भावपूर्ण श्रद्धांजली मी त्यांच्या फेसबुकवरील लेखातून घेतली आहे. जगजीतसिंह यांनी गायिलेल्या काही गजलांच्या आधारेच त्यांनी ही श्रद्धांजली वाहिली होती. त्यांचे मनःपूर्वक आभार.
. . . . . . . . . . . .
जगजीतसिंग यांच्या निधनानंतर इतरत्र प्रकाशित झालेला माझा हा लेख वाचकांना आवडेल अशी आशा करतो! सुधीर काळे

अलविदा जगजीतसिंग!

जगजीत सिंग यांच्या गायनाबद्दलच्या माझ्या आठवणी
पोलाद बनविण्यासारख्या नीरस कामात सारी व्यावसायिक हयात ‘घालवलेला’ इसम या नात्याने माझे कला क्षेत्राशी नाते तसे ‘चुलत’सुद्धा नाहीं. संगीताच्या/काव्याच्या जगात मी एक नाचीज माणूसच. माझे संगीताशी नाते आहे ते केवळ एक हौशी श्रोता म्हणूनच. पण मी जगजीत सिंग यांच्या गायनाचा एक प्रचंड चहाता आहे.
त्यांचे गायन मी जवळ-जवळ १९७५-१९८० सालापासून सातत्याने ऐकत आलेलो आहे. मी त्यावेळी मुकुंद या पोलाद बनविणार्‍या प्रख्यात कंपनीत ‘Kalwe Steel Plant Division’चा प्रमुख म्हणून काम करत होतो व आम्ही कंपनीच्या कळव्यातील कॉलनीत रहात असू. बाहेर जाणे फारसं व्हायचं नाहीं, गेलो तरी आठवड्यातून एकादे वेळी. त्यामुळे बर्‍याचदा घरी आलो कीं “दूरदर्शन-एक्के-दूरदर्शन” हाच पाढा असायचा आणि जे दाखविले जाईल ते आम्ही (मुकाट्याने) पहायचो. मला त्या काळात हिंदी सिनेसंगीत ऐकायची खूप आवड होती व माझी आवडती हिंदी गाणी टेप-प्लेयरवर ऐकणे हाही एक विरंगुळा असायचा.
मी जगजीत सिंग यांचे गायन सर्वप्रथम ऐकले ते दूरदर्शनच्या वाहिनीवरच. त्यावेळी ते नव्यानेच प्रसिद्धीस येऊ लागले होते. गझल हा काव्य (आणि गान)प्रकारही आजच्याइतका लोकप्रिय झाला नव्हता. उर्दू भाषा समजायची नाही. म्हणजे उर्दूतील बहुतांश क्रियापदांचे हिंदी क्रियापदांशी (व म्हणूनच संस्कृत क्रियापदांशी) बरेच साम्य असल्यामुळे गझल ऐकताना असे वाटायचे कीं आपल्याला अर्थ कळतोय् बरं कां, पण लक्ष देऊन ऐकल्यावर समजून यायचे की तो फक्त एक भासच होता. शिवाय सिनेसंगीताच्या मानाने गझलांच्या चालीत फारसे वैविध्यही नसायचे.
शेवटी अर्थही कळत नाही व संगीतही कांहीसे गंभीर धाटणीचे आणि चालींमध्ये फारसे वैविध्य नसलेले इत्यादी कारणांमुळे मी उर्दू गझलांपासून (आणि जगजीत सिंग यांच्या गायनापासून) तसा दूरच राहिलो.
पुढे मुकुंदमधील एका मुस्लिम सहकार्‍याला न समजलेल्या उर्दू शब्दांचा अर्थ विचारायचा सपाटा लावला. खरा अर्थ कळल्यावर “युरेका-युरेका”ची नशा यायची. पण असे किती दिवस चालणार? मग मी देवनागरीतील शब्दकोषाचा शोध सुरू केला. शब्दकोष खूप पाहिले पण त्यातले उर्दू शब्द उर्दू लिपीत असल्यामुळे त्या माझ्यासारख्याला उर्दू लिपी न येणार्‍याला उपयोगी नव्हत्या. शेवटी (मरहूम जरीना सानी) आणि डॉ. विनय वाईकर यांनी संकलित केलेल्या “आईना-ए-गझल” हा शब्दकोश हातात पडला आणि एकादे घबाड मिळावे तसा आनंद झाला[१].
त्यात शब्दांचे अर्थच आहेत असे नाहीं तर त्या शब्दाचा उपयोग कसा करतात हे वाचकाला कळावे म्हणून जवळ-जवळ १०,००० अत्यंत सुंदर, अर्थपूर्ण शेरही दिलेले आहेत. हा शब्दकोष घेतल्यावर मात्र गझलांचा अर्थ कळू लागला आणि गझला ऐकायची गोडी वाढू लागली आणि मग मात्र मी जगजीत सिंग यांच्या गायनाच्या पार प्रेमात पडलो व त्यांचे गायन जास्त-जास्त आवडू लागले.
त्यांच्या आवाजातला “दर्द” मला फार भावायचा. अर्थ कळायला लागल्यापासून त्यांच्या आवाजातली मिठ्ठास, आवाजातला दर्द, आधुनिक वाद्यवृंदाचा वापर (पूर्वी गझल गायकांच्या साथीला केवळ ’तबला-पेटी’च असायची, पण जगजीत सिंग आपल्या साथीला भारतीय आणि पाश्चात्य वाद्येही वापरायचे) या त्यांच्या गायकीतील सर्व बाबींपेक्षा मी त्यांच्या गझलांच्या “निवडी”च्या सर्वात जास्त प्रेमात पडलो. जगजीतसिंग यांच्या आवाजातला ’दर्द’ खूप आवडतो तर त्यांच्या पत्नी चित्रा सिंग यांच्या गायनाच्या बाबतीत त्यांचा आवाज व त्यांच्या गाण्यातला डौल, गाण्याची सहजता या बाबी मला खूप आवडतात.
हळू-हळू जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांचे गायन ऐकण्याचा मला आणि सौ.ला छंदच लागला. अर्थ चांगला व चालीही कांहींशा सोप्या, मग आणखी काय हवे? आजही त्यांनी निवडलेल्या गझलांच्या अर्थानेच मी मंत्रमुग्ध होतो.
आता जगजीत सिंग यांच्या मी ऐकलेल्यापैकी मला आवडणार्‍या गझलांकडे वळतो. (बर्‍याच मी ऐकलेल्या नाहींत.)
बर्‍याचदा त्यांनी निवडलेल्या कांहींशा गंभीर गझलांमध्ये खट्याळ शेर यायचे व मजा वाटायची. ज्यांनी सईद राहींनी लिहिलेली त्यांची “कोई पास आया सवेरे सवेरे” ही गझल ऐकले आहे त्यांना तिच्या शेरात दोन्ही रस दिसतील.
“कहता था कल शब संभलना-संभलना,
वही लडखडाया सवेरे सवेरे”
असा कवीच्या मित्राबद्दलचा हा खट्याळ शेर संपतोय्-न संपतोय् तोच….
“कटी रात सारी मेरी मयकदेमें,
खुदा याद आया सवेरे सवेरे”
या ओळींचे गांभिर्य माझ्या हृदयाला स्पर्शून जाते.
तसेच “बडी हसीन रात थी” या गझलेतील
“मुझे पिला रहे थे वो कि खुदहि शम्मा बुझ गयी,
गिलास गुम, शराब गुम, बडी हसीन रात थी”
हा शेर आपल्याला प्रियकर-प्रेयसींच्या अंधारातील प्रेमचेष्टांचा मखमली स्पर्श जाणवून देतो तर त्यातलाच पुढचा शेर
“लबसे लब जो मिल गये, लबसे लबही सिल गये,
सवाल गुम, जवाब गुम, बडी हसीन रात थी”
हा शेर ऐकल्यावर प्रश्नोत्तरे “बंद” व्हायचे कारण लक्षात येऊन चेहर्‍यावर नक्कीच हास्य उमटते.
त्यांच्या “बाद मुद्दत उन्हे देखकर यूं लगा, जैसे बताब दिलको करार आ गया” या गझलेतील दुसर्‍या कडव्याचा अर्थ किती बहारदार आहे! दारूच्या प्याल्यात दारू ओतणार्‍या “साकी”ला “आज तेरी जरूरत नहीं” असे हा शायर कां बरे सांगत आहे? कारण ‘बिन पिये बिन पिलाये’ खुमार आलेला आहे!
“तिश्न नजरें मिली, शोख नजरोंसे जब,
मय बरसने लगी, जाम भरने लगे!
साकिया आज तेरी जरूरत नहीं
बिन पिये बिन पिलाये, खुमार आ गया!
“कल चौदहवी की रात थी, शब-भर रहा चर्चा तेरा..” ही गझल गुलाम अली आणि जगजीत अशी दोघांनी आपापल्या चालीत गायलेली आहे, दोन्ही चाली चांगल्या आहेत पण मला तर जगजीत यांचीच चाल आवडते. तसेच दिलके दीवारों-दर पे क्या देखा” या गझलेत “तेरी आँखोंमें हम ने क्या देखा” असा प्रश्न करत ते “कभी कातिल कभी खुदा देखा” असे बहारदार उत्तर देतात, आणि शेवटी “फिर न आया खयाल जन्नत का, जब तेरे घर का रास्ता देखा” असेही प्रेयसीला सांगून मोकळे होतात! ही गझलही माझी खूप आवडती आहे.
आणखी एक सुंदर गझल आहे “होठोंसे छूलो तुम” आणि त्यातले शेवटचे कडवे तर लाजवाब आहे:
“जगने छीना मुझसे, मुझे जो भी लगा प्यारा,
सब जीता करे मुझसे, मैं हरदम ही हारा,
तू हारके दिल अपना, मेरी जीत अमर कर दो”
असे आपल्या प्रेयसीला सांगत हा प्रियकर तिच्या प्रेमाची परिणामकारकपणे पण कारुण्यपूर्ण याचना करतो आहे.
त्याकाळी अदलीब शादानी यांची “देर लगी आनेमें तुमको, शुकर है फिरभी आये तो” ही गझलही माझी आवडती गझल होती. त्यातला हा शेर किती अर्थपूर्ण आहे:
शफक धनुक महताब घटायें तारे नगमें बिजली फूल
उस दामनमें क्या क्या कुछ है, वो दामन हाथमें आये तो…!
वा क्या बात है!!
त्यांनी संगीत दिलेल्या “अर्थ” या चित्रपटातील त्यांची “झुकी झु़की सी नजर..”, “तुमको देखा तो ये खयाल आया” आणि “तुम इतना जो मुस्कुरा रहे हो” ही तीन गीते मला खूपच आवडतात.
मला त्यांची अतीशय खट्याळ असलेली (आणि म्हणूनच आवडती) गझल आहे अमीर मीनाई यांनी लिहिलेली “सरकती जाये है रुखसे नकाब आहिस्ता, आहिस्ता” ही! त्यात “आहिस्ता-आहिस्ता” हा “रदीफ” आहे. तरुण मंडळी अगदी आजही ही गझल तंद्रीत गातात. मला आवडते ते हे शेवटचे कडवे: शायर म्हणतो कीं माझी प्रेयसी माझी मान निर्दयपणे कापत असली तरी मी तिला प्रेमानेच म्हणतो की “बाई, काप पण जरा आहिस्ता-आहिस्ता”!
वो बेदर्दीसे सर काटे “अमीर” और मैं कहूं उनसे
हुजूर आहिस्ता-आहिस्ता, जनाब आहिस्ता-आहिस्ता”
त्यांच्या मला सर्वात जास्त आवडणार्‍या दोन गझला आहेत (कीं नज्म? हे आपल्याला कधी कळलेही नाहीं व त्याची कधी गरजही वाटली नाहीं) “ये दौलत भी लेलो, ये शोहरत भी लेलो…” ही पहिली आणि सरफरोशमधील “होशवालों को खबर क्या” ही दुसरी.
त्यापैकी ’ये दौलत भी लेलो’मधील मक्ता (शेवटचा शेर) आहे माझा आवडता आहे:
कभी रेतकी ऊंचे कीलोंपे जाना, घरोंदे बनाना बनाके मिटाना,
वो मासूम चाहतकी तस्वीर अपनी, वो ख्वाबों-खिलौनोंकी जागीर अपनी,
न दुनियाका गम था न रिश्तोंके बंधन,
बडी खूबसूरत थी वो जिंदगानी”
हा शेर प्रत्येक वेळी माझ्या डोळ्यात पाणी आणते.
“होशवालोंको” ही गझल तर जगजीतजींच्या डोक्यावरील मुकुटच आहे! त्यातलाही मक्ता फारच हृदयाला भिडतो
“हम लबोंसे कह न पाये उनको हाल-ए-दिल कभी,
और वो समझे नहीं है खामोशी क्या चीज है”!
वाह वा क्या बात है!
जगजीत सिंग यांच्या गायनाची गोडी लावण्यात व उर्दू भाषेशी परिचय करून देण्यात सिंहाचा वाटा होता डॉ. विनय वाईकर यांचा आणि त्यांच्या “आईना-ए-गझल” या शब्दकोषाचा. म्हणून जगजीत सिंग गेल्यावर मला त्यांची खूप आठवण झाली आणि मी त्यांना नागपूरला फोन करून तसे सांगितलेही. त्यावेळी त्यांच्या सौ.नी (मीनाताईंनी) जगजीत सिंग यांच्या “जिंदादिली”च्या दोन हृद्य आठवणी सांगितल्या त्या इथे सांगायलाच हव्यात.
“आईना-ए-गझल”चे हस्तलिखित तयार झाल्यावर डॉक्टरसाहेब प्रकाशक शोधू लागले, पण त्यांनी संपादित केलेल्या या “रत्ना”ची त्यावेळी कुणाला पारखच झाली नसावी बहुदा. शेवटी त्यांनी हे पुस्तक स्वत:च प्रकाशित करायचे ठरविले. १९७८ साली त्याला ५०,००० रुपये खर्च येईल असा अंदाज होता व तेवढी रक्कम कशी उभी करायची असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला. कुणी तरी त्यांना सांगितले कीं तुम्ही जगजीत सिंग यांना भेटा, त्याप्रमाणे हे दांपत्य त्यांना प्रत्यक्ष भेटले. जगजीत-जींनी ते हस्तलिखित पाहिले आणि एक पैसाही मानधन न घेता एक पूर्ण कार्यक्रम त्यांना दिला व त्यातूनच “अमित प्रकाशन”ची स्थापना झाली व “आईना-ए-गझल” प्रकाशित झाले.
सौ. मीनाताई दुसरी आठवण सांगत होत्या….! एकदा जगजीत सिंग छिंदवाडाला मेहफिल करून रात्री परत येत होते तेंव्हा वाटेत चहासाठी एका ठिकाणी थांबले. तिथे त्यांना एका ट्रक ड्रायव्हरने ओळखले. तो बिचकत-बिचकतच त्यांच्याकडे आला आणि त्याने त्यांच्या गायनाची मनापासून खूप तारीफ केली. एका आड जागी एकाद्या ट्रक ड्रायव्हरसारखा रसिक श्रोता भेटल्यामुळे सद्गदित झालेल्या जगजीत सिंग यांनी त्यांना छिंदवाड्याच्या कार्यक्रमात मिळालेली शाल त्या ट्रक ड्रायव्हरला पांघरली व त्याच्या हातात श्रीफळ ठेवले.
माझी खात्री आहे कीं त्या ट्रक ड्रायव्हरने ती शाल आजही त्यांची आठवण म्हणून जपली असणार!
अशा थोर गायकाला आणि जिंदादिल मनुष्याला भावपूर्वक आदरांजली! आज जगजीत सिंग यांच्या (आणि चित्राजींच्या) एका गाजलेल्या गझलेतील या ओळी ओठावर येतात…..
मिलकर जुदा हुए तो, न सोया करेंगे हम
इक दूसरेकी यादमें, रोया करेंगे हम…..
आँसू छलक छलक के, सतायेंगे रात भर
मोती पलक-पलकमें, पिरोया करेंगे हम…..
जब दूरियोंकी याद, दिलोंको जलायेगी
जिस्मोंको चाँदनीमें, भिगोया करेंगे हम…..
गर दे गया दगा हमें, तूफानभी ‘कतिल’
साहिलपे कश्तियोंको, डुबोया करेंगे हम…..

अलविदा, जगजीत सिंग! तुम्ही तुमच्या गझलांच्या रूपाने अमर आहात!!

टिपा:
[१] या शब्दकोशामुळेच मला मत्ला (गझलेचा पहिला शेर), मक्ता (गझलेचा शेवटचा शेर), रदीफ (गझलेच्या पहिल्या दोन्ही शेरात शेवटी येणारा आणि नंतरच्या शेरात दुसर्‍या ओळीत येणारा शब्दसमुदाय), काफिया वगैरे गोष्टी कळू लागल्या. गझलेतील कडव्यांना ’शेर’ म्हणतात हेही तिथेच कळले.
कांहीं शब्दांचे अर्थ: (१) तिश्न-तहानलेली, प्यासी (२) शोख-खट्याळ, नटखट (३) मय-मद्य (४) जाम-मद्याचा प्याला (५) खुमार-नशा (६) शफक-अरुणिमा, संधिप्रकाश (७) धनुक: इंद्रधनुष्य (८) महताब-चंद्र (९) घटा-ढग (११) जिस्म-शरीर (१२) साहिल-किनारा (१३) कश्ती-नाव
“गझल”चे अनेकवचन “गझलें” आहे (गझलियात हे अनेकवचनसुद्धा वापरतात). पण मी इथे त्याचे “गझला” असे मराठीकरण केले आहे.

सुधीर काळे
November 23, 2016

‘गॅसलायटिंग’ : मानसिक स्वास्थ्यावर होणारा छुपा हल्ला

काही काही वेळी आपण कुणाचे तरी बोलणे ऐकून बुचकळ्यात पडतो. आपली बाजू बरोबर असली तरी त्याबद्दल शंका वाटायला लागते. असे जर कुणी मुद्दाम करत असेल तर तो आपल्याला मामा बनवतो आहे असे पूर्वी म्हंटले जात असे. मनोवैज्ञानिकांनी यावर संशोधन करून त्या गॅसलाइटिंग असे नाव दिले आहे हे मला इतके दिवस माहीत नव्हते. या विषयावर मिळालेला एक माहितीपूर्ण आणि उद्बोधक लेख खाली दिला आहे. या लेखाच्या मूळ लेखिकेचे मन:पूर्वक आभार

‘गॅसलायटिंग’ : मानसिक स्वास्थ्यावर होणारा छुपा हल्ला

गॅसलायटिंग काय असते?
नात्यामधल्या या नव्या प्रकाराला ‘डिकोड’ कसे करावे?
गॅसलायटिंगला तोंड कसे द्यावे?
कसे थांबवाल गॅसलायटिंग?
तेजसी आगाशे
हेही वाचा किंवा ऐका: मनही दुखतं आणि ते बरं करण्यासाठी डॉक्टरही लागतो!

मुलगा : अरे यार याला काय अर्थ आहे ? पर्सनली घेऊ नको म्हणजे काय ? ती मनाला येईल तेव्हा, हवं तसं बोलणार आणि वर म्हणणार की प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची नसते वगैरे वगैरे…

मुलगी : कूल कूल… काय झालं…

मुलगा : अरे हे दर वेळचं आहे यार…

मुलगी : हं… हं… आता आलं लक्षात. आता, नातं म्हटलं, की भांड्याला भांडं लागणार, वादविवाद, रुसवे फुगवे होणारच. कधी कुरबुरी होणार ना आणि आरोप प्रत्यारोपांचं तर काय, ते तर होतच असतात.

मुलगा : हो… पण ना… कधीकधी एखादी गोष्टी मनाला खूप लागते. एकटं वाटतं. रागही येतो; पण कळत नाही काय होतंय. थोड्या वेळानं सगळं पूर्वपदावर येतं.

मुलगी : पण अरे, विशिष्ट नात्यात हे जर सततच होत असेल आणि त्यामुळं तुमची स्वप्रतिमा खालावत असेल, तुम्ही स्वतःवर, स्वतःच्या क्षमतांवर शंका घेऊ लागला असाल, तर मात्र हा ‘रेड सिग्नल’ आहे. अशा वेळेस आपल्याबाबतीत ‘गॅसलायटिंग’ होत असण्याची शक्यता असू शकते.

मुलगा : गॅसलायटिंग? म्हणजे काय ? आणि ते होतंय हे ओळखायचं कसं? ते कसं थांबवता येईल?

मुलगी : हो! हो! हो! सगळं सांगते… ऐक!

हल्ली नातेसंबंधांवर भाष्य करणारे, नाती आणि आपल्या भावनांचं व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन करणारे अनेक लेख, ब्लॉग्ज, लघुपट, पुस्तकं, व्हिडिओज उपलब्ध आहेत. समुपदेशक आणि मानसशास्त्रज्ञ या संबंधातले प्रश्न नेहमीच हाताळत असतात; पण बरेचदा असंही होतं, की आपल्याच जवळच्या माणसांबरोबर किंवा परिचितांबरोबर ‘कोपअप’ करताना आपणच कुठे तरी सतत कमी पडतोय, किंवा चुकतोय असं वाटायला लागतं. म्हणूनच तर आपल्याला ही गॅसलायटिंग संकल्पना माहीत असणं गरजेचं ठरतं. एखाद्या व्यक्तीवर आपलं नियंत्रण कायम ठेवण्यासाठी तिचा आत्मविश्वास हेतूपूर्वक घालवणं याला गॅसलायटिंग म्हणतात.

‘तूच नेहमी चुकीचा विचार करतोस’ किंवा ‘तू अति भावनाशील आहेस’ हे त्या व्यक्तीच्या मनावर इतकं ठसवलं जातं, की आपणच चुकत आहोत, आपल्यालाच अधिक स्ट्रॉंग होण्याची गरज आहे अशी त्या व्यक्तीची ठाम धारणा होते. मग ती हळूहळू आत्मविश्वास गमावू लागते. म्हणजे, हे सगळं पटकन लक्षात येणार नाही; पण भावनिक पिळवणुकीचाच हा एक प्रकार आहे. कधी हे ठरवून केलं जातं, तर कधी नकळत होतं; पण ते कोणत्याही व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यासाठी हानिकारकच आहे. ते होतंय, हे ओळखणंच मुळात तसं कठीण आहे. कारण अर्थातच, ‘तू इतकं पर्सनली घेऊ नकोस’ हे आपण कोणाला तरी सांगणं किंवा कोणी तरी आपल्याला सांगणं हे नेहमीच गॅसलायटिंग असतं, असं नाही.

मुलगा : हं खरंय; कारण बरेचदा या वाक्यामागं ‘जेन्युइन कन्सर्न’ आणि आपलेपणा असू शकतो ना? पण ते कळायचं कसं?

मुलगी : हो! या दोन्हीमधली सूक्ष्म रेषा ओळखणं आवश्यक आहे. त्यासाठीच आपण तज्ज्ञांनी सांगितलेल्या काही टिप्स समजून घेऊ.

‘सायकॉलॉजी टूडे’ या नियतकालिकातील आपल्या लेखात मानसोपचारतज्ञ डॉ. क्लॅरी जॅक म्हणतात, ‘मनाला लागेल अशा गोष्टी एखादं जनरल विधान केल्याप्रमाणे एखाद्याला बोलणं आणि वरती हे तू मनाला लावून घेऊ नकोस किंवा पर्सनली घेऊ नकोस असं सांगणं ही गॅसलायटर्सची नेहमीची ‘ट्रिक’ असते. आणि ज्या व्यक्तीला असं बोललं जातं, तिला राग आला, वाईट वाटलं किंवा तिच्याकडून त्यावर कोणतीही प्रतिक्रिया आली तर गॅसलायटर्स टीका तिच्यावरच करतात.’

मुलगा : येस! अगदी करेक्ट, मलाही हाच अनुभव आहे. म्हणजे दोष माझा नसतोच; पण समोरच्याकडून अशी काही प्रतिक्रिया येते, की असं वाटतं माझंच चुकलंय.

मुलगी : हो. मग तुम्ही स्वतःवर शंका घ्यायला लागता. आपल्याला विनोदबुद्धी नाही, आपण अतिसंवेदनशील आहोत, असं तुम्हाला ऐकवलं जातं.

Gaslighting
आधी उल्लेख केलेल्या लेखामध्येच, डॉ. जॅक पुढे म्हणतात, ‘व्हॉट द गॅसलायटर्स डू इज, दे इनव्हॅलिडेट युअर फिलिंग्ज ऑर एक्सपिरियन्स.’ आणि मग तुमचा स्वतःच्या विचारप्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो. आपल्याला जे वाटत असतं, ते वाटत असतं. ते बरोबर, की चूक हे ठरवण्याचा अधिकार दुसऱ्या कोणालाही नसतो, असंही ते म्हणतात.

ही प्रक्रिया जर वारंवार घडायला लागली, तर एखादं नातं ‘टॉक्सिक’ होऊ शकतं. रिलेशनशिपमध्ये, मित्रमंडळींत, कामाच्या ठिकाणी, घरात किंवा नातेवाइकांमध्ये, कुठेही हे गॅसलायटिंग होऊ शकतं. सायकोथेरपिस्ट स्टेफनी सर्किस यांच्या ‘गॅसलायटिंग : हाऊ टू रेकग्नाईझ मॅनिप्युलेटिव्ह अँड इमोशनली अब्युजिव्ह पीपल’ या पुस्तकात या संकल्पनेविषयी सविस्तर माहिती वेगवेगळ्या उदाहरणांसकट आहे. प्रत्येकानं आपल्या बाबतीत गॅसलायटिंग होत नाहीये ना, आणि आपणही कळत-नकळत कोणाला तसं करत नाहीये ना, याबाबत जागरूक राहणं गरजेचं आहे. अशा नात्यापासून अंतर राखून राहणं किंवा दूर होणं हेच हिताचं असतं. आता आपल्याबाबतीत गॅसलायटिंग होत आहे हे ओळखायचं कसं? त्याची एक सोपी पद्धत पाहू या. गॅसलायटिंग म्हणजेच अप्रत्यक्ष अपमान. काही नात्यांमध्ये सतत अप्रत्यक्षरीत्या समोरच्याचा अपमान करून मग तिला ते मनावर न घेण्याचे सल्ले दिले जातात. हे जर वारंवार होत असेल, तर ते गॅसलायटिंग याच प्रकारात मोडतं. उदाहरणार्थ, हा संवाद बघा.

नेहा : निनाद, कशी दिसतीये आज मी? थोडा मेकओव्हर केलाय मी आज. वाटतोय काही फरक?

निनाद : ओहह. नाईस. पण अगं तू हाय हिल्स वापरत जा ना. वन पीसवर तेच चांगले वाटतात. आणि आयब्रोज करत जा. रेग्युलर. नाही तर काकूबाई दिसतं ते ! आय मीन, फॅशन सेन्सच्या दृष्टिकोनातून म्हणतोय मी.

नेहा : चांगली एकही गोष्ट नाही दिसली तुला निनाद? तू नेहमी असंच करतोस, मी काहीही नवीन केलं की. मला काहीच बोलायचं नाहीये यावर.

निनाद : ओ कम ऑन नेहा! एक सजेशन दिलं मी तुला फक्त. डोन्ट ओव्हररिॲक्ट. आणि सतत सगळं पर्सनली घेत जाऊ नकोस. दर वेळी ऑफेन्ड होण्याची गरज नाहीये.

वरवर बघता हा संवाद फारच नॉर्मल, आणि कपल्समध्ये नेहमी होणारा असा वाटतोय; पण निनाद जर सतत या पद्धतीने बोलत असेल आणि नेहाला राग आला, की तिलाच दोष देत असेल, तर हळूहळू तिची आत्मप्रतिमा खालावण्याची, तिचा स्वतःच्या फॅशन सेन्सवरचा आणि एकूण व्यक्तिमत्त्वावरचाच विश्वास उडण्याची शक्यता आहे. अर्थात प्रत्येकावर असाच परिणाम होईल, असं नाही.

मनानं खंबीर असलेली माणसं या प्रकाराला समर्थपणे तोंड देऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीवर होणारा परिणाम जरी वेगवेगळा असला, तरी गॅसलायटर व्यक्तींचा समोरच्यावर नकारात्मक प्रभावच पडत असतो. आता गॅसलायटिंगला तोंड कसं द्यायचं, ते बघू या; कारण आपल्या आयुष्यातल्या गॅसलायटर्सना आपण नेहमीच काढून टाकू शकू, असं नाही.

माय फीलिंग्ज आर माय फीलिंग्ज- म्हणजे स्वतःच्या भावना मान्य करणं आणि त्या संपूर्णपणे स्वीकारणं. आपल्या ‘गट फीलिंग’वर विश्वास ठेवणं. मला जे वाटतंय ते नैसर्गिक आणि साहजिक आहे हे स्वतःला आणि समोरच्याला ठणकावून सांगणं.
आत्मपरीक्षण- मी खरंच खूप रिॲक्ट होतीये का आणि मनाला लावून घेतीये का, हे स्वतःला विचारणं. कधी कधी आपल्यालाच आपलं उत्तर सापडतं.
विश्वासातल्या जवळच्या व्यक्तीजवळ मोकळं होणं- यामुळे नक्की काय होतंय याबद्दल क्लॅरिटी यायला मदत होते. आपल्या परिस्थितीबद्दल अशा व्यक्तीचं मत आपण घेतलं, की आपल्याला एक नवीन दृष्टिकोन मिळतो आणि आपलं चुकतंय की समोरची व्यक्ती आपल्याला गॅसलाइट करतीये हे समजणं सोपं जातं.
सशक्त नाती निर्माण करणं- आपल्या प्रेमाच्या माणसांमध्ये म्हणजे कुटुंब, मित्रमैत्रिणी यांच्याबरोबर अधिकाधिक वेळ घालवणं. यामुळे तुम्हाला ‘व्हॅलिडेशन’ही मिळतं आणि स्वतःवरचा विश्वास वाढायला मदत होते.
शक्य आहे तिथे नकारात्मक नात्यापासून संपूर्ण बाजूला होणं- हे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी फायदेशीर ठरतं.
मुलगा : ओह! हं! आत्ता थोडं थोडं उकलतंय सगळं. खरंय! मित्रांनो, गॅसलायटिंग वेळीच ओळखा, ते सहन करू नका आणि स्वतःकडूनही कोणाच्या बाबतीत असं होत नाहीये ना, याची खात्री करून घ्या.

तुमच्या मित्रांपैकी कोणी या प्रकाराला बळी पडत असेल, तर त्याला मदत करा. आनंदी, निरोगी आणि सकारात्मक नाती आपल्या आजूबाजूला तयार करण्यावर आपण भर देऊया.

(आवाज – तेजसी आगाशे, निखिल राखोंडे, अंकिता आपटे, दिव्या भंडारे )
Web Title: काय आहे गॅसलायटिंग ?

Some more information on Gaslighting from internet:

Gaslighting is a tactic for manipulating someone in a way that makes them question their own reality.
Merriam-Webster defines it as “psychological manipulation” to make someone question their “perception of reality” leading to “dependence on the perpetrator”.

Common gaslighting techniques
Gaslighters have many techniques, including:
Obfuscation: deliberately muddying or overcomplicating an issue.
Withholding: pretending not to understand the victim.
Countering: vehemently calling into question a victim’s memory despite the victim having remembered things correctly.
Blocking and diverting: diverting a conversation from the subject matter to questioning the victim’s thoughts and controlling the conversation.
Trivializing: making the victim believe their thoughts or needs are unimportant.
Forgetting and denial: pretending to forget things that have really occurred. The abuser may deny or delay things like promises that are important to the victim. Although anyone can deny or delay, the gaslighter does it regularly in the absence of real external limitations. The gaslighter may make up or create artificial barriers to allow themselves to deny or delay that which is important to the victim.

पाणिनी आणि क्वांटम संगणक

संस्कृतचा व्याकरणकार पाणिनी आणि संगणकाची भाषा

मी लहानपणापासून पाणिनीचे नाव आणि काही आख्यायिका ऐकल्या आहेत. एकदा तो एका झाडाखाली आपल्या शिष्यांना समोर बसवून व्याकरण शिकवत होता आणि त्यात इतका तल्लीन होऊन गेला होता की तिथे एक वाघ आलेला त्याला दिसलाच नाही. व्याघ्र ! व्याघ्र !असे ओरडून त्याचे शिष्य पळून गेले, पण तो पंडित व्याघ्र या शब्दाची व्युत्पत्ती सांगत तिथेच बसून राहिला आणि त्या वाघाच्या भक्ष्यस्थानी पडला असे मी ऐकले होते. संस्कृत भाषेच्या व्याकरणाला सूत्रबद्ध करून अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ पाणिनीने लिहिला. तो आजही संस्कृत भाषेच्या अभ्यासासाठी प्रमाण मानला जातो. त्यानंतर अनेक इतर विद्वानांनी त्यावर भाष्ये लिहिली आहेत किंवा तो सोपा करून सांगण्याचे प्रयत्नही केले आहेत..

संस्कृत भाषा अत्यंत शास्त्रशुद्ध असल्यामुळे संगणकासाठी उपयुक्त आहे असेही मी गेली कित्येक वर्षे ऐकत आलो आहे, पण कुठल्याही व्यावसायिक कंपनीने संस्कृत भाषेमध्ये आज्ञाप्रणाली लिहिलेला संगणक अजून तरी बाजारात आणलेला नाही. अलीकडे केंब्रिज विद्यापीठामधल्या एका विद्वानाने पाणिनीच्या सूत्रांवर संशोधन करून एक प्रबंध लिहिला या बातमीला खूप प्रसिद्धी मिळाली आणि त्यामुळे आता येणार असलेल्या क्वाँटम कॉंप्यूटरची भाषा संस्कृत असणार अशा वावड्या उठवल्या गेल्या. या विषयावरील कोरावरील एक उत्तर खाली दिले आहे.

मला पाणिनीच्या अष्टाध्यायीचीही काही माहिती नाही आणि क्वांटम काँप्यूटर हा काय प्रकार आहे तेही माहीत नाही. या संबंधात फेसबुकवरील सफर विज्ञानविश्वाची या समूहावर मिळालेले काही लेख आणि चर्चा या पानावर जशीच्या तशी संग्रहित केली आहे. सर्व मूळ लेखकांचे मनःपूर्वक आभार.

जाता जाता पाणिनीवरील एक सुसंस्कृत विनोद. नपुंसकमिति ज्ञात्वा प्रियायै प्रेषितं मनः । तत्तु तत्रैव रमते हताः पाणिनिना वयम् ॥
मन नपुंसक(लिंगी) आहे असे समजून मी त्याला निरोप घेऊन प्रियेकडे पाठवले तर ते तिथेच रमले. अहो आम्हाला पाणिनीने कसे फसवले बघा.

. . . आनंद घारे

**********************************

Shrinivas Phadke , January 14,2023 – फेसबुकवर

सफर_विज्ञानविश्वाची

संस्कृत क्वांटम कम्प्युटरची भाषा होऊ शकेल का ?

पाकिस्तानी मंत्रिमंडळातील एक मंत्री श्री.खोकार यांनी, १४ डिसेंबर २०२०, रोजी व्हिएटनाम मध्ये चाणक्य, पाणिनी पाकिस्तानी असल्याचा दावा केला . खोकर यांच्या दाव्याने भारतात खळबळ उडाली . समाज माध्यमे आणि वर्तमान पत्रातून टीकेचा गदारोळ झाला. भारत सरकारने तीव्र निषेध केला.
महर्षी पाणिनीचा जन्म इसवी सन पूर्व सहाव्या शतकात झाला. सिंधू नदी काबुल नदीला मिळते त्या संगमा पासून पासून काही किलोमीटर असलेल्या सालातुर या गावात त्यांचा जन्म झाला. आज हा भाग उत्तर पश्चिम पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमारेषेवर पख्तुनी प्रांतात आहे. पाणिनी ,चरक ,चाणक्य तक्षशिला विद्यापीठात अध्यापन करत होते. आता भाग पाकिस्तानात असला एके काळी अखंड हिंदुस्थानचा भाग होता. पाणिनी हिंदूं धर्मियांची पवित्र भाषा संस्कृतचे व्याकरणकार होते. पाकिस्तानचा त्यांच्यावर कसलाच अधिकार नव्हता. आजही पाकिस्तानी शाळात असाच मोडतोड केलेला, चुकीचा इतिहास शिकवण्यात येतो.

पाणिनीने पख्तुनीस्थानातील त्या वेळच्या पाचशे नगरांचा उल्लेख केलेला आहे .त्यात अनेक दहा हजाराच्या वर लोकसंख्या असलेली शहरे होती .११ व्या शतकात महंमद गझनीने, हिंदुस्थांवरील स्वाऱ्यां बरोबर, पख्तुनीस्थान लुटून, उध्वस्त करून पख्तुनी लोकांचे सामुदायिक धर्मांतर केले. नंतर पाणिनीच्या काळी वैभवशाली नगरे असणारा भाग वैराण बनला .
हिंदुस्थानात आक्रमकांचा इतिहास क्रमिक पुस्तकात विस्ताराने शिकवण्यात येतो.उलट प्राचीन, ऐतिहासिक काळातील हिंदुस्थानातील, महान कार्यासाठी , जागतिक स्तरावर दखल घेतल्या जाणाऱ्या व्यक्तींची बोळवण दोन तीन वाक्यात केली जाते . शालेय अभ्यासक्रमात देशासाठी गौरवशाली असणाऱ्या पाणिनिंचा नगण्य उल्लेख असतो . अपमानास्पद इतिहास जतन केला जातो . मरहूम पाकी संस्कृत पंडित प्राध्यापक अहमद हसन दाणी यांच्या म्हणण्या प्रमाणे पाणिनींवर अधिकार सांगणाऱ्या पाकिस्तानने, ज्या काबुल नदीच्या काठावर महर्षी पाणिनीनी “अष्टाध्यायी”ची रचना केली ते सालातूर जमीनदोस्त केले आहे. त्या शेजारी तीन किलोमीटरवर वेगळे गाव बसण्यात आले आहे .पाणिनींवर हक्क सांगणाऱ्या पाकिस्तानने या भागाची उपेक्षाच केली आहे.
पाणिनींच्या वडिलांचे नाव पणिन शलांक होते . आईचे नाव द्राक्षी होते .जन्मगावावरून पाणिनींना सालातुरीय असेही म्हणत. तसेच द्राक्षीपुत्र पाणिनी आईच्या नावावरूनही ते ओळखले जात . गुरूंचे नाव उपवर्ष होते. पाणिनीचे वडील पणीन प्रतिष्ठित विद्वान होते. पाणिनी एकटा असल्याने सर्वांचा लाडका होता . त्याला उपवर्ष गुरूंकडे शिक्षणासाठी पाठवण्यात आले . मात्र पाणिनीची अभ्यासातली प्रगती यथातथाच होती.
एक दिवस चिडून गुरूंनी शिक्षा करण्यासाठी दांडू उगारला . पाणिनींनी बचावासाठी दोन हात पुढे केले . त्याचे तळहात बघून गुरुजी शिक्षा न करता शांत झाले . नंतर पाणिनीनी गुरुजींना न मारण्याचे कारण विचारले . गुरु खेदाने मान हलवत म्हणाले. ” मारून उपयोग नाही . तुझी चूक नाही . तुझ्या हातावर ज्ञानरेषाच नाही . तुला मारून अगर शिकवून उपयोग नाही ” पाणिनीने हे वडिलांना सांगितल्यावर त्यांनी गुरूंजींची भेट घेतली . गुरुजी हस्त सामुद्रिक जाणणारे ज्योतिषी होते. इतर अनेक ज्योतिषांनी दुजोरा दिल्याने जे आहे ते आहे असे म्हणून पाणिनीच्या वडिलांनी सत्य स्वीकारले.
इतिहासात आणि वर्तमानात ज्योतिष अनेक वेळा खोटे ठरल्याची उदाहरणे आहेत, तरीही अजून माणसे ज्योतिष बघतात .
अश्या भविष्याने तरुण झाल्यावर पाणीनीना फक्त तपस्वी होण्याचा मार्ग मोकळा होता. त्यांनी हिमालयात जाऊन तपश्चर्या करण्याचे ठरवले. युरोपमध्ये माणसे गुहेत राहत असताना हिंदुस्थानच्या गांधार (अफगाणिस्थान)भागात संस्कृतचा वैभवकाळ होता. पाणिनीनी अनेक व्याकरणकारांचा उल्लेख केला आहे. संस्कृत संहिता ब्राह्मणे आरण्यके उपनिषदे यांचा उल्लेख येतो या सर्वांचा सखोल अभ्यास पाणिनींनी केला होता . त्या भागात संस्कृत बोलली जात होती अनेक ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिले जात होते
हिमालय आणि त्या भोवतालच्या प्रदेशात भ्रमण करताना त्या भागात बोलल्या जाणाऱ्या जानपद संस्कृत बोलीभाषेतील अनेक शब्द, धातू ,क्रियापदे यांची नोंद त्यांच्या कुशाग्र मेंदूने करून ठेवली. पुस्तकी संस्कृत बरोबर प्रत्यक्ष बोलल्या जाणाऱ्या संस्कृतच्या अभ्यासाने “अष्टाध्यायी” मधील तर्कशुद्ध आणि तंतोतंत अर्थ व्यक्त करणारे नियम बनवणे शक्य झाले. पाणिनी हिमालय भ्रमणानंतर पाटलीपुत्रमध्ये स्थिरावले . तेथे तेव्हा महानंदांचे राज्य होते . हे नंद राजे गुणग्राहक होते .
मठ्ठ मानले जाणाऱ्या पाणिनीचे थक्क करणारे संस्कृत व्याकरणाचे ज्ञान बघून बहुधा त्यांच्या मागे दैवी दंतकथा चिकटली . त्या नुसार तपश्चर्येत गढून गेले असता त्यांना प्रत्यक्ष शंकराने दर्शन दिले . पण पाणिनीचे लक्षच गेले नाही . म्हणून शंकराने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी डमरू वाजवला आणि त्यातून चौदा शब्द समूह बाहेर पडले . ती महेश्वर सूत्रे किंवा शिवसूत्रे अष्टाध्यायीचा मूलाधार बनली.
प्रत्यक्षात ही चौदा सूत्रे म्हणजे पूर्वी कुठेही वापरले न गेलेले चौदा संस्कृत अक्षर समूह आहेत. आपल्या बुद्धिमत्तेने या अक्षर समूहाचा वापर करून पाणिनी यांनी त्यातून व्याकरणाचे चौदा नियम बनवले आणि ते समजायला सोपे जावे म्हणून त्याच भाषेतून अधिनियम बनवले हे उल्लेखनीय आहे. पुढे यातूनच त्यांनी “अष्टाध्यायी “.संस्कृत शब्द आणि वाक्य यांची गणिती सुत्रा प्रमाणे रचना करणारा ग्रंथ लिहिला. यात ३९५९ सूत्रे बनवली.
पाणिनीं जगातले भाषेचे पहिले व्याकरणकार होते. संस्कृत भाषेला संक्षिप्त, तर्कशुद्ध, ध्वनी, शब्द ,वाक्य तयार करता येणारे अजोड व्याकरण पाणिनींनी दिले. पाणिनींनी २७०० वर्षे पूर्वी दिलेल्या व्याकरणा सारखे व्याकरण, आधुनिक व्याकरणाचे जनक म्हटले जाणाऱ्या Ferdinand de Saussure (1857–1913) यांना तयार करायला १९ वे शतक उजाडावे लागले.
ऋषी मुनी, किंवा संस्कृत नाव घेतले की फेसबुकी विज्ञानवादी “छद्म विज्ञान ” अशी ओरड सुरु करतात . काही फेसबुकी डॉक्टर संस्कृत मृत भाषा असल्याचे डेथ सर्टिफिकेट देतात . डॉ अमर्त्यसेन यांनी ‘The Argumentative Indian.’ पुस्तकात अष्टाध्यायी आणि संस्कृत भाषेचे व्याकरण आणि स्वरशास्त्र (phonetics) आणि पाणिनीचा गौरवपूर्ण भाषेत उल्लेख केला आहे . myweb.uiowa.edu/pjai/Sanskrit/SanskritStudies.htm. या साईटवर जगभरातील संस्कृत शिकवले जाणाऱ्या देशाची नावे आणि विद्यापीठांची यादी उपलब्ध आहे.

आज पाणिनीची आठवण होण्याचे कारण , १५ डिसेंबर २०२२ रोजी, केंब्रिज विद्यापीठातील स्कालर डॉक्टर ऋषी राजपोपट यांनी “In Panini, We Trust: Discovering the Algorithm for Rule Conflict Resolution in the Astadhyayi” हा प्रबंध सादर केला . यात “अष्टध्यायी” ग्रंथ समजण्यात , सत्तावीस शतके होत असलेली चूक दुरुस्त केली . डॉ राजपोपट यांनी शोधलेल्या पद्धतीने, संस्कृत भाषा अधिक तर्कशुद्ध होऊन कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि संगणकाची भाषा बनवण्याच्या दृष्टीने महत्वाची बनली आहे
“अष्टाध्यायी ” ग्रंथात संस्कृत भाषेचे स्वरशास्त्र, वाक्यरचना, किंवा मांडणी, आणि व्याकरण याचा सखोल अभ्यास आहे . म्हणून “अष्टाध्यायी “ला भाषायंत्र असे म्हटले गेले. या यंत्रात कोणताही मूळ संस्कृत शब्द, आणि प्रत्यय टाकला असता, व्याकरणदृष्ट्या अचूक शब्द, आणि वाक्ये बनवता येतात . हे भाषायंत्र अधिक तर्कशुद्ध व्हावे म्हणून पाणिनी यांनी ३९५९ नियम बनवले.
प्रत्यक्षात वापर करताना एका शब्दावर अनेक नियम लागू होऊन गोंधळ निर्माण होतो. हे लक्षात आल्यावर ,पाणिनींनी अधिनियम (meta rule ) बनवले. दोन नियमांमध्ये विरोधाभास निर्माण होईल, तेव्हा नंतर येणारा नियम ग्राह्य मानावा, असा नियम करण्यात आला. नंतर पाणिनींना काय म्हणायचे याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याने, नियमाला अपवाद निर्माण होत होते. वेगळे नियम तयार करावे लागत होते. आणि भाषायंत्राची शिस्त भंग पावत होती .
राजपोपट यांच्या प्रबंधात या चुका सप्रमाण दाखवून दिल्या आहेत . अधिनियम शब्दाच्या डाव्या, उजव्या बाजूला वापरण्याच्या ऐवजी, तो नियम उजव्या बाजूला वापरला गेला, तर शब्द ,वाक्य रचना,उच्चार अचूक होतात हे त्यांनी सिद्ध केले. राजपोपट यांनी सुचवलेल्या दुरुस्ती नंतर “अष्टाध्यायी” तर्कशुद्ध अचुक शब्द रचना करणारे भाषायंत्र बनले आहे
प्रत्याहार म्हणजे अर्थबदल न होता संक्षिप्त केलेला नियमात वापरल्या जाणाऱ्या अक्षरांचा समूह. प्रत्याहार नियमांचा मूलाधार आहे. प्रत्याहार महेश्वर सूत्रातील १४ ध्वनी समूहांवर अवलंबून आहे . १४ माहेश्वरी सूत्रे प्रत्याहार मिळवण्यासाठी, केलेली भाषेतील सुरांची आदर्श रचना आहे . महेश्वरी सूत्रांचे पहिले आणि शेवटचे अक्षर घेऊन, अशी अनेक सूत्रे एकमेकाला जोडून, तर्कशुद्ध माहिती साचेबंद संक्षिप्त शब्दात सांगता येते. याचे साधर्म्य प्रोग्रामिंग लँग्वेजशी आहे.
Backus normal form (BNF) ही खास संगणकांची भाषा, जॉन बाक्स यांनी १९५९ साली शोधून काढली. पाणिनीनी २५०० वर्षांपूवी शोधून काढलेली सूत्रांचे बाक्स, यांच्या नार्मल फॉर्मशी बरेच साधर्म्य आहे . आजच्या अत्याधुनिक कम्प्युटरच्या भाषेशी जुळणारी भाषा ,भारतात २५०० वर्षांपूर्वी होती हे उल्लेखनीय आहे .
संस्कृत संगणकासाठी नैसर्गिक भाषा म्हणून वापरता येईल, या कडे नासा मधील एक संशोधक रिक ब्रिज यांनी ,AI मॅगेझीन मध्ये “Knowledge Representation in Sanskrit and Artificial Intelligence.” जगाचे लक्ष वेधले . ती एकमेव किंवा सर्वोत्कृष्ट भाषा आहे,असा त्यांच्या म्हणण्याचा आशय नव्हता . नासाने संस्कृतला मान्यता देण्याचा प्रश्नच नव्हता . समजा संस्कृत भाषा तशी असती तरी, नासाने विचार केला नसता. संस्कृत येत असेल तोच ती वापरू शकेल. संस्कृतचे जाणकारच कमी आहेत. समजण्यास सुलभ म्हणून नासाने इंग्लिश भाषाच निवडली असती.
आपली मानसिक गुलामगिरी गेलेली नाही. त्यामुळे नासाची मान्यता आपल्याला लागते . इतर देशांनी त्यांच्या मातृभाषेचा वापर करून कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज बनवली आहे.
Chinese programming languages Wenyan.
जपान Dolittle (Japanese ドリトル doritoru)
रशिया ЯМБ (язык машин бухгалтерских) (machine language for accounting machines) – A Russian
फ्रान्स LSE (French: Langage symbolique d’enseignement) i
ब्रिटन Ferranti Autocode is british computer coding language
भारत OM Lang is unique because it supports programming in 9+ Indian languages, allowing Indians to learn programming in their native language more easily. It is also the world’s first Sanskrit programming language, fulfilling many Indians’ long-held desire for Sanskrit to have a place in the computer world
क्वांटम कम्प्युटर आला ,कि सध्याचे सुपर कम्प्युटर खेळणे ठरणार आहेत . त्याला लेखी प्रोग्रॅम देता येणार नाही .त्यासाठी अचूक उच्चार एकच अर्थ असणारे शब्द असणारी भाषा लागेल .आधुनिक सर्व भाषात इतर भाषांची भेसळ झालेली आहे . इंग्रजी तर मूळ भाषा कोणती हे शोधावे लागेल . या परिस्थितीत कोणत्याही इतर भाषेची भेसळ न झालेली, संस्कृत भाषा भविष्यात उपयोगाला येण्याची शक्यता आहे .
© श्रीनिवास प्र फडके

फोटो भारतीय पोस्ट अँड टेलिग्राफ खाते साभार

या लेखावरील चर्चा :

सुचिकांत वनारसे : नाही होऊ शकत. यावर संशोधन झालेलं आहे आणी ते शक्य नाही.
Atul Dravid : सुचिकांत वनारसे, वरती एका काँमेंट मध्ये मी सवीस्तर माहीती दिली आहे… संगणकातील Yac and Lex हे जर गुगल केलंत तर संगणक वैज्ञानीक संस्कृत का चांगली असु शकेल असं म्हणतात ह्याचा अंदाज येईल… संगणक प्रणाली म्हणजे केवळ SAP, Oracle etc नसुन Yac, Lex, Symentic Rules ह्या सुध्दा गोष्टी आहेत… सामान्यपणे ज्या गोष्टी जनतेसमोर आहेत त्या सोप्या, सहज, सरळ आहेत… जसं जसं पार्सल, इंटरप्रीटर किंवा मशीन भाषेकडे जालं तसं समजणे खुपचं क्लिष्ट होतात…
Shrinivas’s Post
Comments
सुचिकांत वनारसे
नाही होऊ शकत.
ReplyShare5d
Atul Dravid
·
सुचिकांत वनारसे वरती एका काँमेंट मध्ये मी सवीस्तर माहीती दिली आहे… संगणकातील Yac and Lex हे जर गुगल केलंत तर संगणक वैज्ञानीक संस्कृत का चांगली असु शकेल असं म्हणतात ह्याचा अंदाज येईल… संगणक प्रणाली म्हणजे केवळ SAP, Oracle etc नसुन Yac, Lex, Symentic Rules ह्या सुध्दा गोष्टी आहेत… सामान्यपणे ज्या गोष्टी जनतेसमोर आहेत त्या सोप्या, सहज, सरळ आहेत… जसं जसं पार्सल, इंटरप्रीटर किंवा मशीन भाषेकडे जालं तसं समजणे खुपचं क्लिष्ट होतात…

Shrinivas Phadke Author
OM Lang: World’s first multilingual programming language
TECHNOLOGY GUIDE
OM Lang: World’s first multilingual programming language
A new programming language has been released that will allow developers to code in Indian languages such as Sanskrit, Hindi, Tamil, and others. Here are the specifics.
354 Views5 May 2022, 06:15 AM
Pahi Mehra
OM Lang, a newly launched programming language that allows you to write code in Sanskrit, Tamil, Hindi, and other Indian languages, is taking the internet by storm.
Most people are surprised to learn that codes can be written in languages other than English. And if you are wondering how this is possible, as well as whether the language is available for your consumption.

There’s Finally a Programming Language in Sanskrit
#
sanskrit
#
vedic
#
programming
So, after taking inspiration from Christopher Nolan’s Interstellar (2014) this thought came to my mind. Why don’t we actually make a programming language in Sanskrit. so here is it Vedic.
logo
Vedic is the first programming language to utilize commands in Sanskrit and is available online for free. Vedic can be used in our Online IDE here for offline installation visit our
Install Instructions.
⌨️ Sample Code
sample vedic code
Output:
output
The Sanskrit language is the world’s oldest language. Once Rick Briggs, a researcher at NASA wrote a paper in 1985 titled Knowledge Representation in Sanskrit and Artificial Intelligence. claims that Sanskrit is the most suitable language to develop computer programming for their Artificial Intelligence program. The grammar of Sanskrit is rule-bound, formula-bound, and logical, which makes it highly appropriate to write algorithms. So, considering that Vedic designed to be a high-level, logical scripting language.
I’ve worked so hard for this project, I am trying to build a community around Vedic, so we can make the project sustainable. that’s by I made it open source.
Links :
Documentation
Github Org
Online IDE
Contributions, issues and feature requests are welcome!
सुचिकांत वनारसे हा घ्या संदर्भ अगोदर कोडिंग आणि इंटरफेस मधील फरक समजला तर बघा त्या नंतर क्लासिकल कॉम्पुटर आणि पुढे येऊ घातलेला क्वांटम काम्पुटर त्याला लागणारी भाषा यांचा अभ्यास करा . न्यूनगंड असला तर सोडा.

DrVivek Charjan
संगणकाची भाषा ही विविध कोड्स पासून बनलेली आहे तिचा बोलीभाषेचा काहीही संबंध नाही .
संस्कृत ही कॉम्पुटरची भाषा होईल हा भ्रम आहे .
ऐतिहासिक माहिती सोडल्यास पोस्ट अवैज्ञानिक वाटते

Shrinivas Phadke Author
DrVivek Charjan तुम्ही कोडिंग बद्दल बोलत आहात . मी क्वांटम कम्प्युटर इंटरफेस लँग्वेज बद्दल बोलतो आहे त्यात फरक आहे. पोस्ट मध्ये काय अवैज्ञानिक आहे दाखवून द्या
इथे कोडींग आणि इंटर फेस लँग्वेज एकच आहे असे गृहीत धरून कॉमेंट केली जात आहे. बीज गणितात आकड्याना अबक abc किंवा xyz अशी नावे दिली तरी गणित सुटते पण इंतरफेस आणि कोडींग मध्ये फरक आहे
Coding is testing a human’s skill to which rate it can reduce the complexity of the computer program. AI is testing human’s skill in making the machines learn to behave like humans. This behavior of machines learning like humans can be invoked only if machines are exposed to the world as humans

Vasudeo Bidve
ऋषी राजपोपट याच्या संशोधनात आणि प्रबंधात अनेक चुका आहेत, चुकीची गृहीतके आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे संशोधन म्हणजे, स्वतःला आणि स्वतःच्या पीएचडी गाईडला आजवर न समजलेल्या व्याकरण नियमांनाच “कोडे” समजून किंवा “२७०० वर्षे न उलगडलेली समस्या” समजून ती स्वतःच सोडवण्यासाठी केलेली हास्यास्पद, केविलवाणी आणि म्हणूनच दुर्लक्षणीय ठरणारी धडपड आहे.
त्याने हे तथाकथित ‘कोडे’ सोडवताना जो ‘अभिनव’ म्हणून त्याचा स्वतःचा नियम प्रबंधात सांगितला आहे, तो फक्त त्याने उदाहरणार्थ म्हणून दिलेल्या (किंवा तत्सम अजून काही) शब्दांपुरताच लागू होतो. उलट त्यानुसार अनेक प्रचलित संस्कृत शब्दांची मात्र भलतीच व पूर्णपणे चुकीची रूपे बनतात.
थोडक्यात, ऋषी राजपोपटने केलेला दावा आहे, तशा प्रकारचे इथे खरं तर कोणतेही कोडे / समस्या नाहीच!
प्रबंधाचे शीर्षक “In Panini (only) we trust” हे देऊन पाणिनीच्या पुढच्या संपूर्ण परंपरेला (कात्यायन, पतंजली, आणि पुढचे सगळे आचार्य / भाष्यकार / विद्वान यांना) फाट्यावर मारण्याचा जाहीर उच्चार आहे. (यातला कंसात लिहिलेला Only हा शब्द मी लिहिलेला असून त्याचे अत्यंत स्पष्ट प्रत्यंतर त्याच्या प्रबंधात सुरुवातीच्या एक-दोन प्रकरणांमध्येच दिसून येते – पुढेही सतत दिसत राहते).
केंब्रिज सारख्या विद्यापीठाने संशोधनाच्या नावाखाली हे असले प्रसिद्धीचे स्टंट का करावेत / करू द्यावेत, हे अनाकलनीय आहे.
सदर संशोधनाचे अत्यंत मुद्देसूद खंडन आणि तपशीलवार चीरफाड एव्हाना अनेक विद्वानांनी केलेली आहे. पैकी संस्कृत भारती, विद्वत् परिषदेद्वारा झालेल्या एका व्याख्यानात श्री. नीलेश बोडस यांनी केलेली चिकित्सा सर्वाधिक लक्षणीय आहे. त्याची लिंक पुढे देत आहे. नीलेश बोडस कोण आहेत, त्याचा सविस्तर परिचय यामध्ये सुरुवातीला आहेच. व्याख्यान मोठे झाले आहे, कारण ते सविस्तर आहे. व्याख्यान जरी संस्कृतमधून असले, तरी सामान्य लोकांना त्यातले मुद्दे आणि आशय सहजपणे समजतील, इतपत सोपे नक्कीच आहे. इच्छुकांनी (निदान 1.25x च्या गतीने का होईना, पण) शक्यतो पूर्णपणे पहावे. लिंक:
https://youtu.be/fVsn8jHFnLI
ऋषी राजपोपटला जगाने कृपया डोक्यावरून खाली उतरवावे आणि त्याला व केंब्रिजला त्यांच्या वाटेवर सोडून देऊन आपापल्या कामाला लागावे, ही नम्र विनंती.
“उदिते तु सहस्रांशौ न केम्ब्रीजम् न पोपटः”
शोधप्रबन्धस्य वस्तुतत्त्वविमर्शः – नीलेशबोडसः
YOUTUBE.COM


Dhananjaya Jadhav
December 21, 2022 at 3:17 PM ·
केंब्रिज विद्यापीठातील भारतीय पीएचडीधारक ऋषी राजपोपट यांनी अत्यंत किचकट व जगभरात कोणालाही न सुटलेले.. इसवी सनपूर्व ५ व्या शतकातील ग्रामायटिकल “पाणिनी” कोडे नुकतेच डिकोड केले आहे.
” इन पाणिनी, वुई ट्रस्ट: डिस्कव्हरिंग द अल्गोरिदम फॉर रूल कॉन्फ्लिक्ट रिझोल्यूशन इन द अस्ताध्यायी” या नावाने त्यांनी लिहलेल्या प्रबंधात ह्या “पाणिनी” कोड्याबद्दल डिटेल्स दिले आहेत.
आपले भारतीय हिंदू जगभरात विविध क्षेत्रात दैदीपमानः कामगिरी करून भारताचे नाव उंचावत आहेत… तर “हिरवे” लोकसंख्या वाढीच्या शास्त्रीय संशोधन क्षेत्रात वेगाने कार्य करत आहेत .
जय हिंद.
धनंजय जाधव.
२१/१२/२०२२.


Prasad Ramesh Bhide
December 17, 2022 at 5:23 PM ·
काल मी केंब्रिज विद्यापीठात पाणिनीच्या व्याकरणावर झालेल्या संशोधनावर माध्यमात ज्या बातम्या फिरत आहेत त्याचा उहापोह करणारी एक पोस्ट लिहिली. ती मराठीत असायला हवी असा आग्रह अनेकांनी केला.
गुगल translator च्या मदतीने केलेला मराठी अनुवाद.
माध्यमांना आकर्षित करणाऱ्या पाणिनीय भाषाशास्त्रावरील अलीकडील संशोधनाबद्दल
केंब्रिज विद्यापीठात पीएचडी पदवीसाठी स्वीकारण्यात आलेल्या पाणिनीच्या अष्टाध्यायीवरील प्रबंधाला माध्यमांमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.
या घटनेच्या संदर्भात विचार करण्यासारखे काही मुद्दे –

  1. स्क्रोलच्या वेबसाइटवर आलेली बातमी अशी आहे –
    एका भारतीय विद्यार्थ्याने 2500 वर्षांत प्रथमच संस्कृतचे ‘भाषा मशीन’ कसे कार्यरत केले”
    हे वर्णन ब्रेकिंग न्यूजच्या मोहामुळे आणि आधुनिक भाषाशास्त्राच्या एका महत्त्वाच्या शाखेबद्दलच्या अज्ञानामुळे केले गेले आहे, ज्याला संस्कृत संगणकीय भाषाशास्त्र म्हणता येईल. डॉ. अंबा कुलकर्णी, डॉ जेरार्ड ह्युट, डॉ पीटर शार्फ, डॉ मल्हार कुलकर्णी, डॉ तनुजा अजोतीकर आणि इतर विद्वानांचा गट पाणिनीच्या सूत्रांच्या पद्धतीचा संगणक तंत्रज्ञानावर वापर करण्यावर काम करत आहे आणि अनेक प्रकाशनांमधून त्याचे प्रतिबिंब पडले आहे. (मी आयआयटी बॉम्बेमधून पीएचडी पूर्ण केली आहे आणि प्रा मल्हार कुलकर्णी माझे पीएचडी पर्यवेक्षक होते.)
    त्यामुळे या कामात “पहिल्यांदा” असे काही नाही.
  2. विद्यापीठाच्या वेबसाइटवर दिसणारी मथळा आहे
    “प्राचीन व्याकरणाचे कोडे २५०० वर्षांनंतर सुटले”
    पाणिनीच्या व्याकरणातील हे एकमेव कोडे नाही किंवा ते पहिल्यांदाच सोडवण्याचा हा प्रयत्नही नव्हे.
    पाणिनीच्या अष्टाध्यायीची चौकट अशा नियमांवर आधारित आहे जे परस्परावलंबी आहेत आणि अनेक वेळा संघर्ष आणि गोंधळ निर्माण करतात. स्वतः पाणिनीने काही मेटारूल्स ( परिभाषा) सांगितले आहेत. मात्र, हे मेटारूल्स कमी पडतात. ह्यामुळे, भारतीय व्याकरणीय परंपरेत विद्वानांनी परिभाषा या शीर्षकाखाली अनेक मजकूर/ भाष्ये लिहिली आहेत. असेच एक महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे १९ व्या शतकातील नागेश भट्ट ह्याचा परिभाषेंदुशेखर हा ग्रंथ. ह्या स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये प्रस्तुत प्रबांधातील आधारभूत परिभाषेवर विस्तृत चर्चा आहे.
  3. या प्रबंधासाठी केलेले कार्य हे या क्षेत्रातील एकमेव संशोधन कार्य नाही. कारण अष्टाध्यायीमधील विविध मुद्द्यांवर हैदराबाद विद्यापीठ, आयआयटीची विविध कॅम्पस ह्यासारख्या ठिकाणी Natural Language Processing संदर्भात असेच संशोधन केले जात आहे.
  4. मग या कामाने अचानक जगाला का आकर्षित केले? –
    अ) बहुधा “केंब्रिज” टॅग असल्यामुळे.
    ब) संशोधक / पर्यवेक्षकाचा प्रसारमाध्यमांशी चांगला संबंध आहे आणि प्रसारमाध्यमातील लोकांना ते ब्रेकिंग न्यूज होण्यास योग्य वाटले.
  5. तरीही,
    प्रबंधात केलेले विधान अतिशय धाडसी आहे आणि संस्कृत विद्वान आणि भाषाशास्त्रज्ञ ह्यांनी त्यावर नीट विचार केला पाहिजे. मुख्य मुद्दा आहे तो ह्या संशोधनातील अपूर्वतेचा. संपूर्ण प्रबंध वाचल्याशिवाय ते अपूर्व आहे की नाही याची पुष्टी करणे कठीण आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या यू ट्यूब चॅनेलवरील एक छोटा व्हिडिओ आहे ज्यामध्ये संशोधकाने आपल्या प्रबांधाचे सार सांगितले आहे. ते खरोखर स्पष्ट, विचारप्रवर्तक आणि संभाव्यतः विवादास्पद देखील आहे.
    या प्रबंधात केलेला दावा आणि तत्सम इतर मुद्द्यांवर संस्कृत अभ्यासकांच्या क्षेत्राबाहेर या विषयाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी पॅनेल डिस्कशन व्हायला हवीत
  6. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टबद्दल-
    अ) ह्या संशोधन क्षेत्रासाठी एक प्रकारे चांगले आहे. या घडामोडींमुळे भारतीय ज्ञान परंपरेतील या संशोधन क्षेत्राबद्दल एका मोठ्या गटाला जाणीव झाली आहे. अन्यथा, लोक भारतीय ज्ञान परंपरेच्या “वैज्ञानिकतेवर” केवळ अणू आणि विमानांच्या संदर्भात वादविवाद करत राहतात. भारतीय ज्ञान परंपरेत असे बरेच काही आढळते ज्याचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करणे आवश्यक आहे, अगदी नेमके सांगायचे तर अश्या किमान 62 ज्ञानशाखा आहेत.
    ब) प्रस्तुत संशोधन केंब्रिजचे असल्याने, लोक त्याला लगेच भगवेकरण, छद्मविज्ञान किंवा तत्सम काहीतरी हिणवणार नाहीत. यामुळे ही घटना म्हणजे भारतीय ज्ञान परंपरेचे अधिक चांगले आणि ठोस चित्र मांडण्याची संधी आहे हे लक्षात घ्यायला हवे.
    डॉ प्रसाद भिडे
    संस्कृत आणि भाषाशास्त्राचे प्राध्यापक, सोमय्या महाविद्यालय, मुंबई

Pankaja Dhananjay
प्रसाद सर,यांवर खरंचच विस्तृतपणे लिहिलं गेलं पाहिजे कारण अनेक लोक संभ्रमात आहेत.कोडं सोडवलं म्हणजे नेमकं काय ? कोणतं कोडं ? इ.अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे लोकांकडून….
संस्कृतेतर जनांना तर हे खूप काहीतरी अभूतपूर्व घडल्याचा फील आलाय,त्यांना फार भारी वगैरे वाटतंय…..😊 वेगवेगळ्या पोस्टस् आहेत यासंदर्भात म्हणे….
Mukund Bhalerao
मी विद्यावाचस्पती (Ph. D.) नाही, परंतु MA (Sanskrit) आहे. तो प्रा राजपोपटांचा प्रबंध आजच प्राप्त केला व वाचत आहे. संस्कृत मध्ये Ph. D. असलेले खूप लोक आहेत. मला वाचल्यानंतर काही अर्थबोध झाला तर मी प्रयत्न करेन. हे शक्य आहे की अशा विषयावर खूप ठिकाणी संशोधन सुरु असेल किंवा झाले असेल, पण त्यास तितकीशी प्रसिद्धी मिळाली नसेल. याचा अर्थ हे नवीन संशोधन अगदीच निरर्थक आहे असा होत नाही. संस्कृतच्या प्रचारा व प्रसाराकरीता जे जे प्रयत्न करतील त्याची दखल घेतली गेली पाहिजे. 🙏
Prasad Ramesh Bhide
Kaushik Lele सूत्रातील एका शब्दाच्या अर्थाचा परंपरेने सांगितलेल्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ आहे असा दावा केला आहे . तो पूर्णपणे योग्य आहे का ह्यावर व्याकरण विद्वानांचे मत प्रतिकूल आहे.

*******

कोरावरील एक प्रश्न आणि उत्तर

Vinod Chelladurai
·
Follow
Avid reader, but not on Kindle.
If Tamil has uniqueness then why was Sanskrit chosen for AI, and not Tamil?
I would sincerely request to people who post these sort of questions to do some simple google research before posting the question. Because, it’s not only the asker (who posted this question), but also respected people like Kanchi Vijayendra Saraswati come up with the statement “Sanskrit has been proved to be the most suitable language for Artificial Intelligence/ Computer Programming”. Let me come straight to the point. Sanksrit was NEVER PROVED to be the most suitable/perfect language for computer programming and this is completely an INTERNET HOAX. It may be the perfect language for computers, but it is never proved till date. There is no single claim by NASA or their official website for this statement. This is one of the biggest false claims by the same set of people who were spreading old-age rumours like Sanskrit is the oldest language in the World. OK, from where this rumor was actually began?

A NASA researcher, named Rick Briggs, published a research paper titled “Knowledge Representation in Sanskrit and Artificial Intelligence” in 1985 (https://www.aaai.org/…/inde…/aimagazine/article/view/466/402), where he attempts to justify that a natural language (especially a language with certain unique attributes) has qualities to be blended and used for the purpose of Artificial Intelligence, but never mentioned that Sanskrit was that natural language. To enhance his justification, he took Sanskrit just as a case study to derive his final claim in this paper. Further, he discusses that every language (especially the classical language) has certain unique qualities and likewise, Sanskrit has certain excellent beautiful qualities that makes it unique in its own style. Among its unique qualities, the highlight is its order-free grammatical style which makes it ideal for Artificial Intelligence. For example, the words in a sentence can be mixed in more than one way and still we get a logical meaning. Honestly, I don’t know much about Sanskrit (though I have an idea to master this language in future for some reasons) and hence, I don’t want to discuss about this further. But, fact is this research paper was never proved practically until now for any natural language. But, if it’s proved in future with Sanskrit, people like me would be more generous to accept it.

I repeat again – please understand that the paper claims that ANY natural language with certain unique qualities can be used for AI and sanskrit was just used as a case study.

So, please make sure that you understand that this is Quora and not a place to post questions based on claims that have never been proved or something that is absolutely an INTERNET HOAX.

Cheers!!

नवरात्र २०२२

या वर्षी नवरात्राच्या काळात मिळणारे संदेश आणि चित्रे या पानावर संग्रहित केले आहेत.

पूर्वीचे हे भाग अवश्य पहा :
नवरात्र स्पेशल २०१८ : https://anandghare.wordpress.com/2018/10/11/%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%b2-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a7%e0%a5%ae/

नवरात्र २०१९ :
https://anandghare.wordpress.com/2019/09/30/%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a7%e0%a5%af/

नवरात्र या विषयावरील लेख इथे पहावा. https://anandghare2.wordpress.com/2010/10/16/%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0/

आदिमाया अंबाबाई, सार्‍या दुनियेची आई l
तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई ll

उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई
हे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई ll

सार्‍या चराचरीं तीच जीवा संजीवनी देते l
तीच संहारप्रहरीं दैत्य-दानव मारीते l
उग्रचंडी रूपाआड झरा वात्सल्याचा गाई ll

क्षेत्र नामवंत एक त्याचे नाव कोल्हापूर l
अगणित खांबावरी उभे राहिले मंदिर l
नाना देव ते भोवती देवी मधोमध राही ll

तुळजापूरीची भवानी जणु मूळ आदिशक्ती l
घोर आघात प्रहार तिने पचविले पोटी l
स्वत: तरली, भक्तांना स्वयें तारुनिया नेई ll

अमरावतीची देवता शाश्वत, अमर l
अंबेजोगाईत तिने एक मांडियले घर l
मुंबापुरीच्या गर्दीला दान चैतन्याचे देई ll

कुणी म्हणती चंडिका, कुणी म्हणती भवानी l
दुर्गा दुर्घट यमाई, अंबा असुरमर्दिनी l
किती रूपें, किती नावें परि तेज एक वाहीं ll

गीत: सुधीर मोघे
संगीत: सुधीर फडके
स्वर: आशा भोसले
चित्रपट: थोरली जाऊ


. –II ● शारदीय नवरात्र उत्सव ● II–
या देवी सर्व भूतेषु,शक्तिरूपेण संस्थिता I
नमस्तस्यै,नमस्तस्यै,नमस्तस्यै नमोनमःII
आश्विन शुध्द प्रतिपदा. शारदीय नवरात्रात दुर्गेच्या ९ रुपांचे पूजन केले जाते.
प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च ।
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता:।
उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।।
नवरात्र- घटस्थापना..
नवरात्र- स्त्री शक्तिचा उत्सव..
नवरात्र- सतत तेवणाऱ्या दिव्याची ज्योत.
नवरात्र- भोंडला..
नवरात्र- गिरगिर गिरकितला गरबा..
नवरात्र- नऊ दिवसांचे उपवास..
नवरात्र- कुमारीका पुजन..
नवरात्र- चक्रपुजा..
नवरात्र- तीळाच्या फुलांची माळ..
नवरात्र- घागरी फुंकण..
नवरात्र- शस्त्रपुजन..
नवरात्र- श्रीसूक्त
नवरात्र- कुंकुमार्चन..
नवरात्र – ब्रम्हभोजन..
नवरात्र- विजयादशमी ‘दसरा’..
नवरात्र- आपट्याची पाने..
नवरात्र- रावण दहन..
नवरात्र- सीमोल्लंघन..
नवरात्र- दृष्ट प्रवृत्तींचा विनाश..
नवरात्र- भगवतीची पुजा..
नवरात्र- शौर्याचा उत्सव..
नवरात्र- एक चैतन्यमय वातावरण..
अशा मंगलमय वातावरणात नवरात्र उत्सवाची सुरुवात आजपासून होत आहे.
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके I
शरण्ये त्रयम्बकेगौरी नारायणी नमोस्तुते II
चराचरातील दुष्ट प्रवृत्तींचाै नाश होऊन, जे जे सुंदर आणि शुभंकर आहे, ते, ते अस्तित्वात राहो हीच, पूर्ण कृपाळू भगवती चरणी प्रार्थना….
★ शुभेच्छुक – प्रा.अमोल श्रीकृष्ण अहिरे, व समस्त अहिरे परिवार, दाभाडी ता.मालेगाव जि. नाशिक यांचे कडून आपणा सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा…
आई जगदंबेच्या कृपेने आपणांस उत्तम आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, भरभराटी, मांगल्यमय सहजीवन, दिर्घायुष्य लाभो हिच प्रार्थना..!!

नवरात्रीच्या शुभेच्छा!🙏🌹🙏
पराक्रमी शूरवीरा, शोभे कुंकुमतिलक लाल!
धमन्यातून वाहे आपुल्या,रुधिराचा रंगही लाल!
प्रेमाने गाली लाली, क्रोधाने डोळे लाल!
नको युध्द,द्वेष अन् हत्या,
नको अतिरेकी अत्याचारी लाल!
प्रेमाचे प्रतिक देऊ, गुलाब हा लाल!
सौभाग्याचं लेण, भाळी कुंकू लाल!
नेसली ‘अवनी पैठणी’ लाल,हाती भरला चुडा!
सुखी ठेव देवी,अलका रंजनचा जोडा! सुरळीत होवो पुन्हा,
या जगताचा गाडा!🙏

सौ.अलका पटवर्धन.

पिवळा
पिवळी पिवळी हळद लागली,
डोई शेवंती पिवळी, सुंदर नववधू सजली!
पिवळे पितांबर नेसूनी,नवरदेव आला,पुष्कराज शोभे हाती,
गुरूंचा अनुग्रह झाला!
अंगी चढले तेज,आली सोन्याची झळाळी! साता जन्माचे बंध,
बांधुनी शालू शेला सोनसळी!
जाऊ जेजुरीच्या खंडोबाला,
तेथे भंडारा उधळा!
उधळण हळदीची,
करेल आसमंत पिवळा!
हळदीसम शुध्द पवित्र,
मन आहे रंजनचे!
धन धान्य सौभाग्य लाभो,
आशिर्वच स्कंदमातेचे!🙏
सौ.अलका पटवर्धन..

अंजली पटवर्धन रचीत….
सप्तरंगातील पंचम स्थानी,निलवर्ण असे सजला!
करुया उधळण, मातेच्या पंचम रुपाला!
निलवर्ण ते मयुर शोभती,
अवनी पैठणी च्या पदराला!
निळी पैठणी नेसून करते,
नमस्कार मातेला!
निलवर्ण तो अथांग सागर,
निलरंगी ते विशाल अंबर!
विशाल ह्रुदयी नांदो रंजन,
अथांग प्रिती मानवतेवर!
राम कृष्ण ही निळे सावळे,
विष्णू चे अवतार आगळे!
रामायण गितेतुनी सगळे,
आयुष्याचे सार आकळे!🙏

पौर्णिमेच्या चंद्राच शुभ्र चांदण!
शुभ्र सडा प्राजक्ताचा, सजल आंगण!
गिरीशिखरांवर चमकती, पांढरे हिमकण!
फेसाळत्या लाटा येती, शुभ्र तुरे माळून!
शांतता, पवित्रता दिसे, पांढ-या रंगातून!
रंजन अलकाचे राहो,निर्मल सहजिवन!
शुभ्रवसना सरस्वतीला, करून वंदन!
शुभ्र”अवनी पैठणी” तिच्या चरणी अर्पण!🙏.

अंजली पटवर्धन

नवरात्रीत ९ दिवस देवीला दाखवले जाणारे ९ नैवेद्य, नवरंग आणि माळा (2022)
 (१) *सोमवार २६/९/२०२२ शैलपुत्री पांढरा शेवंती तूप
(२) *मंगळवार २७/९/२०२२ ब्रह्मचारिणी लाल साखर जाई/तगर
(३) *बुधवार २८/९/२०२२ चंद्रघंटा निळा खीर गोकर्णी
(४) *गुरुवार २९/९/२०२२ कुष्मांडा पिवळा गुलगुले अबोली/तेरडा
(५) *शुक्रवार 30/९/२२ स्कंदमाता हिरवा केळी बेल/तुळस
(६) *शनिवार १/१०/२०२२ कात्यायनी.. राखाडी मध कर्दल
(७) *रविवार २/२०/२०२२ कालरात्री झेंडू गूळ
(८) *सोमवार ३/१०/२०२२ महागौरी मोरपंखी नारळ जास्वंद, कण्हेर किव्वा गुलाबांच्या फुलांची माळ.
(९) *मंगळवार ४/१०/२०२2 सिद्धिदात्री:- गुलबी तीळ कुकुमार्चन.


आरती दुर्गा मातेची

जय देवी जय देवी जय दुर्गा माते
आरति तुज ओवाळू स्मरुनी नव रूपे
जय देवी जय देवी (धॄ)

पहिली हिमगिरिकन्या, नाम ‘शैलपुत्री’
‘ब्रह्मचारिणी’ दुसरी, उग्र तपाचरणी
तिसरी तु ”चंद्रघण्टा’’, शीतल चन्द्रमुखी
त्रिविध_ताप ‘उष्मा’हर, ‘कूष्माण्डा’ चौथी (१)

पाचवि ‘स्कन्दमाता’, षण्मुख माण्डिवरी
सहावी कात्यायनाऽश्रमि, प्रगटलि ‘कात्यायनी’
‘महांकाला’ची रात्री, सातवी ‘कालरात्री’
गोरीपान तु सुन्दर, ‘महागौरि’ आठवी (२)

सत्कार्य ‘सिद्धिदात्री’, तू दुर्गा नववी
ऐशा नव रूपान्नी, दुर्गति तू हरिसी
दारिद्र्य, आधि_व्याधी, चिन्ता, भय आदि
‘दुर्गति’ छळती भक्ता, त्यान्ना तू हरिसी (३)


🍃🍃🍃 आश्विन नवरात्रौत्सव 🍃🍃🍃
⚜⚜⚜⚜ तृतीय दिन ⚜⚜⚜⚜
🌿🌿🌿 श्री चंद्रघंटा माता 🌿🌿🌿

🌺 पिण्डजप्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैर्युता।। 🌺
🌺 प्रसाद तनुते महां चंद्रघंटेती विश्रुत।। 🌺

🌺 दुर्गेच्या तिसर्‍या शक्तीचे नाव ‘चंद्रघंटा’ आहे. नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी या देवीची पूजा केली जाते. तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन ‘मणिपूर’ चक्रात प्रविष्ट होते. चंद्रघंटेच्या कृपेने अलौकीक वस्तुचे दर्शन होते. दिव्य सुगंधाचा अनुभव येतो किंवा विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला येतो. हे क्षण साधकासाठी अत्यंत सावधान राहण्यासाठी असतात. देवीचे हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे. तिच्या मस्तकावर घंटेच्या आकराचा अर्धचंद्र असल्यामुळे तीला ‘चंद्रघंटा देवी’ असे म्हटले जाते. शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे. या देवीला दहा हात आहेत. या दहा हातामध्ये खड्ग, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत. तीचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते. 🌺

🌺 माँ चंद्राघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर केले जाते. माँ भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते. तीचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो. तीच्या घंटेच्या आवाज प्रेतबाधेपासून भक्तांचे रक्षण करतो. या देवीच्या चरणी शरणागती पत्करल्यास घंटेचा आवाज निनादतो. या माँ देवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतीपूर्ण आहे. या देवीची आराधना केल्यास वीरता-निर्भयता बरोबर सौम्यतेचा विकास होवून संपूर्ण शरीरात कांती-गुणांची वाढ होते. 🌺

🌺 आवाजात मधुरता येते. माँ चंद्राघंटाचे भक्त आणि उपासक जेथे जातात तेथील लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात. आपण आपले मन, वचन, कर्म हे पवित्र करून देवीची उपासना करण्यासाठी तयार व्हा. तीची उपासना केल्यामुळे सर्व संसारीक संकटातुन मुक्ती मिळते. आपण नेहमी तीची उपासना करण्यासाठी अग्रेसर असावे. इहलोक आणि परलोक दोन्हीच्या कल्याणकारी आणि समृद्धीसाठी तीचे लक्ष आहे. 🌺
⚜️ श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू ⚜️

⚜️⚜️⚜️⚜️ श्री स्वामी समर्थ ⚜️⚜️⚜️⚜️
🌸🌸🌸 आश्विन नवरात्रौत्सव 🌸🌸🌸
🍁🍁🍁🍁 चतुर्थ दिन 🍁🍁🍁🍁
🌺🌺🌺 श्री कुष्मांडा माता 🌺🌺🌺

🌺 सुरासम्पूर्णकलशं रूधिराप्लुतमेंव च।🌺
दधाना हस्तपदमाभ्यां कुष्माण्डा शुभदास्तु में।। 🌺

🌺 दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव ‘कुष्मांडा’ आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुम्हड असे म्हणतात. कुम्हड्यांचा बळी तिला अधिक प्रिय आहे. या कारणामुळेही तिला कुष्मांडा म्हणून ओळखले जाते.🌺

🌺 नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन ‘अदाहत’ चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना केली पाहिजे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे. 🌺

🌺 या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे. तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे. देवीच्या आठ भुजा आहेत. ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातात क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे. 🌺

🌺 कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. या देवीला प्रसन्न करण्यासाठी फार काही करावे लागत नाही. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडाची उपासना मनु्‍ष्याला रोगापासून मुक्त करते. त्याला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे. 🌺
🍁🍁 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🍁🍁

🚩🚩🚩 आश्विन नवरात्रौत्सव 🚩🚩🚩
🔸🔸🔸🔸 पंचम दिन 🔸🔸🔸🔸
🌹🌹🌹 श्री स्कंद माता 🌹🌹🌹

🌺 सिंहासनगता नित्य पदमाश्रितकरद्वया। 🌺
शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी।। 🌺

🌺 दुर्गेचे पाचवे रूप ‘स्कंदमाता’ या नावाने ओळखले जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन ‘विशुद्ध’ चक्रात स्थिर झालेले असते. भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते. 🌺

🌺 भगवान स्कंद ‘कुमार कार्तिकेय’ नावानेही ओळखले जातात. ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते. पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे. भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गाच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते. स्कंदमाता चारभुजाधारी आहे. तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा, जी वर उचललेली आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे. 🌺

🌺 डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजुला उचललेली आहे त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे. या देवीचा रंग पूर्णत: शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते. यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते. तिचे वाहन सिंह आहे. 🌺

🌺 नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्त्व सांगितले आहे. यावेळी चक्रात स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप पावते. सर्व बंधनातून साधकाचे मन मुक्त होऊन पदमासना स्कंदमातेच्या रूपात तल्ल‍ीन होते. यादरम्यान साधकाला पूर्ण सावधगिरीने उपासना करणे आवश्यक आहे. सर्वतोपरी एकाग्र होऊन साधनेच्या मार्गावर जायला पाहिजे. 🌺

🌺 स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते. मृत्यूलोकातच त्याला परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो. त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो. स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते. सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकीक तेज प्राप्त होते. आपण एकाग्र मनाने पवित्र होवून मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या भवसागरात दु:खापासून मुक्ती मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय दुसरा नाही. 🌺
💠 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 💠

💫💫💫 आश्विन नवरात्रौत्सव 💫💫💫
⚜⚜⚜⚜ षष्ठ दिन ⚜⚜⚜⚜
🌺🌺🌺 श्री कात्यायनी माता 🌺🌺🌺

🌺 दुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन ‘आज्ञा’ या चक्रात स्थिर होते. योगसाधनेत या आज्ञा चक्राचे विशेष स्थान आहे. या चक्रात स्थिर झालेला साधक कात्यायनीच्या चरणी आपले सर्वस्व वाहून देतो. परिपूर्ण आत्मदान करणार्‍या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते. 🌺

🌺 दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागे एक कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला.🌺

🌺 काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले. to महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता. सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. अशी ही कथा पुराणात आहे. 🌺

🌺 कात्यायनी अमाप फलदायक आहे. कालिंदीच्या यमुना किनारी भगवान कृष्‍णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी ब्रज गोपींनी या देवीची पूजा केली होती. ही देवी ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे. कात्यायनीचे रूप अत्यंत तेजःपुंज आहे. तिला चार भुजा आहेत. देवीचा उजव्या बाजूकडील वरचा हातात अभयमुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे. तिचे वाहन सिंह आहे. 🌺

🌺 कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चार फळाची सहजतेने प्राप्ती होते. तो इहलोकात राहूनही त्याला अलौकीक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो. जो व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतो. तो रोग, भय, दु:ख आणि संतापापासून मुक्त होतो. सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे. 🌺
🪷🍃🪷🍃🪷🍃🪷🍃🪷🍃🪷

⚜🚩⚜🚩🕉🚩⚜🚩⚜

⚜🙏⚜🌸🛕🌸⚜🙏⚜

आजची नवदुर्गा..’सिद्धीदात्री’

या देवी सर्वभूतेषु माँ सिद्धिदात्री रूपेण संस्थिता.
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:
देवीचे नवरात्र आले अन् सृष्टीत.. बाजारात.. मनामनात चैतन्य आले. शेतबागा रंगीबेरंगी फळाफुलांनी फुलल्या. गावोगाव मंदिरावर रोषणाई झाली. पहाटे संबळ.. चौघडा वाजू लागला, देवीची कवने गाणारे पोतराज दिसू लागले. मंदिरात नवनव्या रंगाच्या वेशभूषा करून सजलेल्या भाविक महिलांची पहाटेपासून देवीची ओटी भरायला विक्रमी गर्दी झाली. घरोघरच्या देवीची नित्य पूजा.. आरती.. उपवास.. आराधना, कुमारीका पूजन यामुळे भक्तमन प्रसन्न झालेय. घटाभोवती उगवलेली हिरवी सप्तधान्ये बघून आनंद व्दिगुणीत झालाय. पुराणकाळातील पुण्याची ग्रामदेवता.. तांबडी जोगेश्वरी. जीव आणि ईश्वर यांची एकरूपता असणारी ही आदिशक्ती.
आज भारतीय संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा असा हा नवरात्रातील नवमीचा दिवस. आज प्रत्यक्ष शंकरानी ज्या देवीकडून आठ सिद्धीची प्राप्ती केली त्या सिद्धिदात्री देवीचे पूजन.. उपासना.. होमहवन होणार. आमचे संस्कृती सण हे आरोग्याची काळजी घेणारे. या ऋतूबदलात संयमाचे उपवास.. धान्यफराळ. यामुळे नवउर्जा प्राप्त होते. आज नवमीला देवीला षड्रस नैवेद्य अर्पण होणार.
आज खंडेनवमी. शस्त्र पूजनाचा दिवस. संपूर्ण औद्योगिक क्षेत्रात उत्साहाने पूजा संपन्न होणार. कारखान्याचा संपूर्ण परिसर स्वच्छता.. सजावट.. रांगोळी रेखाटनाने उजळून निघालाय. हार फुले.. देवीची स्तुती सुरू आहे. आज प्रत्येक क्षेत्रातील यंत्रसामुग्रीची, आयुधाची, अवजारे, वाहनांची, शस्त्राची नावे वेगळी असतील. अगदी स्टेथोस्कोप ते संगणक, या सर्वांची हार घालून आज पूजन होणार. आज जीवन हे आयुधे.. अवजारे.. शस्त्र यांशिवाय अशक्यच. या निर्जीव, जडाच्या कृपेनेच आमचा जीव सुखी झालाय.. होत आहे. मग त्यांचा सन्मान हवाच. आज त्यांचे भाविकतेने पूजन होणार.
विश्वाची रचना या जगन्मातेने केलीय. तिच्याच छत्रछायेत.. तिच्या दयेने आनंदात आमचे जगणे सुरू आहे. सगळ्या दैन्य.. दुःख.. दैत्यांवर ती विजय मिळवून देते. आमच्या आशा आकांक्षाची पूर्तता करणारी म्हणून ख्यातीप्राप्त आहे. आमच्या जीवनी सर्व शुभंकर घटना ती पूर्णत्वास नेते.
या मातेनेच अजातशत्रू होण्यासाठी मंजुळ वाणी आम्हांला प्रदान केली आहे. तर सर्वांविषयीचा पवित्र भावनांचा दृष्टीकोन या नयनी आहे. हे आई.. माय भवानी याच भरवशावर हे तुझे लेकरु तुझ्याकडे आलेय. या तुझ्या अजाण बाळाला तुझ्या कुशीत घे. या अज्ञ भक्ताकडून होईल तशी तुझी सेवा गोड मानून घे. हेच काय ते मागणे.

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ॥

🌻🔆🌹⚜️🛕⚜️🌹🔆🌻

माय भवानी तुझे लेकरु
कुशीत तुझिया येई
सेवा मानून घे आई

तू विश्वाची रचिली माया
तू शीतल छायेची काया
तुझ्या दयेचा ओघ अखंडित
दुरित लयाला नेई

तू अमला अविनाशी कीर्ती
तू अवघ्या आशांची पूर्ती
जे जे सुंदर आणि शुभंकर
पूर्णत्वा ते नेई

तूच दिलेली मंजुळ वाणी
डोळ्यांमधले निर्मळ पाणी
तुझ्या पूजना माझ्या पदरी
याविण दुसरे नाही

गीत : सुधीर मोघे ✍
संगीत : मीना खडीकर
स्वर : लता मंगेशकर
चित्रपट : शाब्बास सूनबाई (१९८६)

🎼🎶🎼🎶🎼 🎧

‼नमस्तेsस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते‼
‼शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोsस्तुते‼

🌷☘🛕🌸🌼🌸🛕☘🌷

लक्ष्मीच्या शेजारी काली आणि सरस्वती कशासाठी ?

हजारो वर्षे जुन्या अशा आपल्या हिंदू धर्मामध्ये हजारो देवदेवता, विधी, कर्मकांडे, चिन्हे इत्यादी अनेक गोष्टी या सांकेतिक आहेत. सर्वांनाच त्यांचा अर्थ कळतो असे नाही. जरी आपल्याला समजले नाही तरी श्रद्धेने हे सर्व पाळले जाते. पण जर या सर्वांचा अर्थ समजून या गोष्टी करता आल्या तर अधिक समाधान लाभते. म्हणूनच काही गोष्टींचा थेट सोपा अर्थ सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
महालक्ष्मीच्या अनेक देवळांमध्ये तिच्या एका बाजूला महाकाली आणि दुसऱ्या बाजूला महासरस्वती हमखास आढळते. नवरात्रीत या तिन्ही देवतांसाठी विशेष पूजा, अनुष्ठाने केली जातात. अनेकांना या प्रतिकांचा अर्थ माहिती असला तरी तो सर्वांनाच माहिती असतो असे नाही.चित्रात किंवा मूर्तीमध्ये लक्ष्मी बहुतेकवेळा उभी दाखवलेली असते. कारण ती अस्थिर आहे. ती कायमची कुणाकडेही बसत / थांबत नाही. आज तुमच्याकडे असली तर उद्या असेलच असे नाही. त्यामुळे संपत्तीचा अहंकार कुणाला असू नये. ज्याच्याकडे ती विपुल प्रमाणात आहे त्याला तिचे रक्षण करता आले नाही तरी ती निघून जाते. चोरी, लुटमार, फसवणूक यातून तुमच्या संपत्तीला वाचवायचे असेल तर कणखर रक्षणकर्ती महाकाली तिच्या एका बाजूला हवीच. म्हणजेच तुम्हाला तिचे रक्षण करता आले पाहिजे. लक्ष्मीचा म्हणजे संपत्तीचा वापर करतांना तुमच्यापाशी बुद्धी, विद्या, विवेक नसेल तर संपत्ती उधळली जाते. हल्ली आपण अगदी हास्यास्पद योजनांमध्ये पैसे गुंतविल्यामुळे ते साफ बुडल्याचे वारंवार पाहतो. म्हणून बुद्धी, विद्या, सारासार विवेक या सर्व गोष्टींची दात्री सरस्वती ही दुसऱ्या बाजूला हवीच.
एखाद्याने लक्ष्मी प्राप्तीसाठी जर फक्त बळाचा, शक्तीचा वापर केला असेल तर त्याला त्या संपत्तीचा गर्व होतो, अहंकार होतो. फक्त सरस्वतीच्या मार्गाने संपत्ती लाभलेला शक्तीचा उपहास करू शकतो. यासाठी या तिन्ही शक्तींचा समतोल आणि समन्वय अत्यावश्यक आहे. काहीवेळा लक्ष्मीच्या शेजारी बुद्धिदाता गणपती असतो. गणपतीदेखील संपत्तीचा वापर, सारासार विवेक व बुद्धीचातुर्याने करण्याचे सुचवतो.
म्हणूनच संपत्ती सोबत तिच्या रक्षणाची शक्ती आणि योग्य वापराची बुद्धी देण्याची जरूर प्रार्थना करा !
( हा लेख आणि फोटो शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावेत )
* मकरंद करंदीकर.
makarandsk@gmail.co

🔸श्री ललितापंचमी.🔸

ललितापंचमी या दिवशी श्री ललितादेवीची पूजा करून महाप्रसादासाठी भक्तांना बोलावतात.

हा कुळधर्म आहे. श्रीयंत्र,देवीचा टाक, प्रतिमा, अथवा हळदीकुंकवाच्या करंडकाचे झाकण घेऊन त्याची श्री ललितादेवी म्हणजे प्रतीकात्मक पूजा करतात. पुष्पगंध,अठ्ठेचाळीस दूर्वा आणि कुंकू श्री ललितादेवीला वाहण्याची परंपरा आहे. या दिवशी श्री ललितादेवीला कुंकुमार्चन करतात.

ललितापंचमी या दिवशी कुंकुमार्चन म्हणजे श्री ललितादेवीला कुमारिका आणि सुवासिंनीकडून कुंकू वाहतात. कुंकवाबरोबर अठ्ठेचाळीस दूर्वा आणि फुले वाहून देवीला नैवेद्य दाखवतात. नंतर देवीची आरती करतात. घरात सदैव मंगल वातावरण राहावे यासाठी व सौभाग्यरक्षणासाठी सुवासिनी देवीला कुंकू वाहतात.

🔸श्री ललितापंचमी कुंकुमार्चन पूजा.

आपल्या घरी किंवा आपल्या गावातील देवीच्या मंदिरात सुवासिनी आणि कुमारिका यांनी एकत्र येऊन कुंकुमार्चन हा विधी करावा.

पूजेची मांडणी
ज्या ठिकाणी कुंकुमार्चन करायचे आहे. ती जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी रांगोळी काढून त्यावर हळदीकुंकू टाकावे. नंतर त्यावर पाट किंवा चौरंग ठेवून त्यावर लाल वस्त्र टाकावे. पाटावर उजव्या बाजूला श्री गणपती साठी मुठभर तांदूळ ठेवून त्यावर एक सुपारी ठेवावी. पाटावर तांदूळ ठेवून त्यावर एक ताम्हण ठेवावे आणि ताम्हणामध्ये श्री ललितादेवीचे प्रतीक म्हणून हळदीकुंकू भरलेला करंडा झाकणासहीत ठेवावा. कारण या करंड्याच्या झाकणावर श्री ललितादेवी विराजमान झालेली असते. ज्यांच्या कडे करंडा नसेल अशांनी हळदीकुंकू भरलेली दोन खण असलेली कुयरी झाकणासहीत ठेवावी. पूजेची सर्व साहित्य जवळ घेऊन श्री ललितादेवीच्या पूजेस प्रारंभ करावा.

पूजा करणाऱ्या सुवासिनी आणि कुमारिका यांनी अभ्यंगस्नान केल्यानंतर आपल्या घरातील देवांना आणि घरातील मोठ्या व्यकतींना नमस्कार करून पूजेस प्रारंभ करावा. प्रथम आचमन करून पूजेचा संकल्प करावा. नंतर श्री गणपती पूजन करावे. (उजव्या बाजूस तांदळावर सुपारी ठेवली आहे तिचे गणपती म्हणून पूजन करावे) श्री गणपतीला गुळखोबरे याचा नैवेद्य दाखवून एक नारळ आणि दक्षिणा गणपतीसमोर ठेवून श्री गणपतीची प्रार्थना करावी. नंतर कलश, घंटा आणि समईचे पूजन करावे. नंतर ताम्हणामध्ये करंडा किंवा कुयरी झाकणासहीत ठेवली आहे.

(प्रथम करंड्यामध्ये किंवा कुयरीमध्ये हळदीकुंकू वेगवेगळे भरून त्यावर झाकण लावावे. कारण करंड्याच्या किंवा कुयरीच्या झाकणावर श्री ललितादेवी बसलेली आहे. म्हणून झाकणावर श्री ललितादेवीची पूजा करावी.)

आता हातात अक्षता आणि फुले घेऊन श्री ललितादेवीचे ध्यान आणि आवाहन करावे. नंतर श्री ललितादेवीला पंचामृत स्नान, अत्तर, उटणे, गुलाबपाणी, गंध इत्यादी प्रकारचे स्नान घालून झाकणावर हळदीकुंकू वाहून पंचामृताचा नैवेद्य दाखवून झाकण आणि ताम्हण स्वच्छ करून झाकणावर श्री ललितादेवीसाठी श्रीसूक्त किंवा श्री देवीअथर्वशीर्ष म्हणून पाणी आणि दूधाचा अभिषेक करावा.अभिषेक करून झाल्यावर झाकण स्वच्छ करावे. नंतर चौरंगावर किंवा पाटावर ताम्हण ठेवून ताम्हणामध्ये ते झाकण मधोमध ठेवून झाकणावर गंधाक्षता, हळदीकुंकू वाहून सुवासिक फुले वाहावी. अठ्ठेचाळीस दूर्वा वाहून उदबत्ती आणि निरांजन ओवाळावे. नंतर १) पूजा सामुहिक असल्यास पूजेला बसलेल्या सर्व कुमारिका आणि सुवासिनी यांनी श्री ललितादेवीची पूजा केलेल्या पाटाभोवती किंवा चौरंगाभोवती गोलाकार बसावे. किंवा स्वतंत्रपणे पूजा केली असल्यास श्री ललितादेवी पूजेच्या पाट किंवा चौरंगासमोर बसावे.

नंतर हातामध्ये पाणी आणि अक्षता घेऊन आज श्री ललितापंचमी निमित्ताने श्री ललितादेवीला श्री ललितादेवीची एक हजार नावे घेऊन/अथवा श्रीसुक्तने, कुंकुमार्चन करीत आहे असा संकल्प करून झाकणावर कुंकुमार्चन करावे. नंतर नैवेद्य दाखवून श्री ललितादेवीची आरती करावी. आरती झाल्यावर पूजेला बसलेल्या सर्व सुवासिनी आणि कुमारिका यांनी एकमेकांना हळदीकुंकू लावावे नंतर सर्वांना पूजेसाठी आमंत्रित करून सर्वांना प्रसाद वाटप करावा.

श्री ललितादेवीला सुवासिनींनी केलेली पूजा आणि सुवासिनींनी दुसऱ्या सुवासिनींची केलेली पूजा खूप आवडते.

श्री ललितादेवीची पूजा आश्विन महिन्यात पंचमीला केली जाते. म्हणून तर या पंचमीला ललितापंचमी असे म्हणतात. या दिवशी सुवासिनी देवीची पूजा करून नंतर कमीतकमी पाच सुवासिनी आणि कुमारिका यांना बोलावून हळदीकुंकू देऊन त्यांची पूजा करतात. वरील प्रमाणे पूजन करून श्री ललितादेवी संतुष्ट झाली तर ती आपल्या भक्तांना ऐहिक आणि पारमार्थिक सुखांचा लाभ करून देऊन शेवटी मुक्ती देते.श्री ललितादेवी हि धनधान्यवर्धिनी आणि साम्राज्य दायिनीही आहे.

‘उपांगललिता गौरी’ या नावाने ही देवता प्रसिद्ध आहे.पार्वतीचेच एक रूप या देवतेच्या नावाने पूजिले जाते.या देवीचे प्रतीक म्हणून एक ‘कुंकमकरंडक’,हे व्रत करत असलेल्या घराण्यांच्या देव पूजेत असते.’उपांगललिता’ पूजेला,मुख्यस्थानी कलशावर, ताम्हनामधे,-(इंद्र,वरूण,ईत्यादी देवता मंडल,अष्टदिक्पाल इत्यादींची प्रतिष्ठापना करून)-या करंड्याची व त्याच्या झाकणाची प्रतिष्ठापना केलेली असते. पुरूषसूक्त,श्रीसूक्त ईत्यादींच्या शास्त्रोक्त आवर्तनासह शोडषोपचारपूजा असते.त्यानंतर,४८दूर्वांची एक जुडी याप्रमाणे, दुर्वांच्य ४८ जुड्या वहावयाच्या असतात.रवा,दूध,तूप,गूळ यांच्या सारणा पासून,तळून बनवलेल्या ४८घारग्यांचे वायन द्यावयाचे असते.सवाष्ण,ब्राह्मण,कुमारिका याना भोजनासाठी आमंत्रित कराण्याचा प्रघात आहे.

आई तुळजाभवानी तुळजापूर परिपूर्ण माहिती :

कॉपी पेस्ट: श्री श्रीविद्या सरवणकर,संचालक डोंबिवली ब्लड बँक,

तुळजापूरची भवानीमाता हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत. वर्षांतून एकदा तरी तुळजा पूरला जायचं आणि देवीचं दर्शन घ्यायचं ही प्रथा कित्येक घरांमध्ये आजही नेमाने सुरू आहे.

मात्र तुळजापूरला जाऊन देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्यांना तुळजापूरमधील कित्येक प्रथा-परंपरांबद्दल माहिती नसते. म्हणूनच तुळजाभवानीच्या विविध प्रथा-परंपरांचा हा परिचय-

श्री श्रेत्र तुळजापूर हे आई तुळजाभवानीचे शक्ती पीठ! वर्षभर भक्तांचा लोंढा तुळजापूरच्या दिशेने येत असतो. बाहेरून येणाऱ्या भक्तांना फक्त तुळजाभवानीचे मंदिर व परिसर अशा काही ठरावीक गोष्टीच माहीत असतात.
परंतु यापलीकडे जाऊन पाहिल्यास तुळजापूरकरांनी अनेक अशा प्रथा- परंपरा जपलेल्या आहेत, त्या ऐकल्यानंतर नवीन माणसाला त्याविषयी नवल वाटल्याशिवाय राहणार नाही.

साडेतीन शक्ती पीठांपैकी फक्त श्री तुळजाभवानीची मूर्ती तिच्या जागेवरून सहजपणे काढता येते व तेवढय़ाच सहजपणे पुन्हा जागेवर बसवता येते. त्यामुळे वर्षांतून तीन वेळा म्हणजे भाद्रपद वद्य अष्टमी, आश्विन शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीच्या मूर्तीला सिंहासनावरून
काढून पलंगावर झोपविले जाते. ज्याला देवीचा निद्राकाल म्हटले जाते. घोरनिद्रा, श्रमनिद्रा आणि सुखनिद्रा या नावाने चालणारा देवीचा निद्राकाल आजही तेवढय़ाच परंपरेने जोपासला जातो. अन्य कुठल्याही देवाला या प्रकारे सहजपणे उचलून झोपविण्याची पद्धत नाही.
श्री तुळजाभवानीचे पहाटेचे चरणतीर्थ, सकाळ व सायंकाळची महापूजा तसेच रात्रीची प्रक्षाळपूजा व इतर प्रत्यक्षात ज्या पूजा होत असतात, त्या वेळी देवीला प्रत्यक्ष स्पर्श करण्याचा अधिकार मात्र फक्त पानेरी मठाचे महंत व सोळाआणे कदम पुजारी या घराण्यातील स्त्री-पुरुषांना असून आजही ती परंपरा कायम आहे. यांच्या व्यतिरिक्त कुणीही असलातरी तो देवीच्या मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेऊ शकत नाही.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजाभवानीचे स्थान वरचे असून छत्रपती शिवरायांच्या भोसले घराण्यासह अनेकांची ती कुलदेवता आहे. तुळजाभवानीची मूर्ती ही चल मूर्ती असून काळ्याभोर गंडकी पाषाणातून बनविलेली ही मूर्ती साधारणपणे २x३.१५ इंच आकाराची अष्टभूजा मूर्ती असून मंदिरातील गाभाऱ्यात सिंहासनावरील एका खाचेत बसविली जाते. मूर्तीला सिंहासनावरील खाचीत बसविण्याकरिता दीड फूट लांबीचा क्रुस मूर्तीच्या खालच्या बाजूला असून मूर्ती घट्ट बसावी म्हणून मेण बसविले जाते. याकरिता मूर्तीच्या खालच्या बाजूला ६’’ लांबीचा क्रूस ठेवलेला आहे. त्यामुळे तुळजाभवानीची मूर्ती बाहेर काढून प्रत्यक्ष विधीकरिता वापरली जाते. कदाचित ही अनोखी प्रथा असावी.

यात विशेष बाब म्हणजे मंदिर संस्थानकडे सर्व आर्थिक कारभार असतानाही मेण पुरविण्याची जबाबदारी परंपरेनेयेथील पाणेरी मठाच्या महंताकडे आहे. साडेतीन शक्तिपीठांत तुळजापूर प्रथा-परंपरा, पूजाअर्चा याबाबतीतच नव्हे तर देवीची मूर्ती अशा सर्वच बाबतीतली भिन्नता आहे. माहूरला मूर्तीऐवजी तांदळा आहे तर वणीला एका मोठय़ा दगडावर देवी प्रतिमा शिल्पांकन करण्यात आलेली आहे. मूर्तिशास्त्रानुसार कोल्हापूर आणि तुळजापूरच्या मूर्तीत काही प्रमाणात साम्य असले तरी तुळजाभवानीची मूर्ती पूर्णत: चलमूर्ती म्हणजे उत्सवाला बाहेर काढून परत त्याच ठिकाणी बसविली जाते. वीरांची देवता महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजापूरची श्री तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही पूर्ण पीठं तर वणीची सप्तशृंगी हे अर्धपीठ म्हणून परिचित आहे. पैकी तुळजाभवानी ही महिषमर्दिनी असल्याने तिला वीरांची देवता म्हटलं जातं. त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले कुळाची ती कुलदेवता असल्याने तुळजाभवानीला विशेष महत्त्व प्राप्त झालं. म्हणूनच कदाचित कोल्हापूर, माहूर आणि वणीच्या मंदिरात तुळजाभवानीचं मंदिर आहे.

त्याप्रमाणे तुळजाभवानी मंदिर परिसरात इतर तीन शक्तिपीठांचा समावेश करण्यात आलेला नाही. महाराष्ट्रातील बहुतेकांची ती कुलदेवता असल्याने वर्षभर भक्तांचा महापूर इथं सुरू असतो.

बालाघाट डोंगररांगातील प्राचीनकाळातील यमुनाचल प्रदेशातील चिंचपूर या ठिकाणी एका दरीत तुळजाभवानीचं ठाणं आहे. तुळजाभवानी म्हणजे भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जाणारी ती त्वरिता! त्वरितावरूनच तुळजापूर नामाभिधान तयार झालं. तुळजाभवानीचं शारदीय आणि शाकंभरी असे दोन नवरात्र महोत्सव असून या उत्सवापूर्वी देवाला मूळ स्थानावरून उचलून शयनगृहात झोपविलं जातं. याला देवीचा निद्राकाल म्हणतात. त्यानुसार भाद्रपद वद्य अष्टमी, आश्विन शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीजींचा निद्राकाल असून त्याला अनुक्रमे घोरनिद्रा, श्रमनिद्राआणि सुखनिद्रा म्हटलं जातं. देवीच्या निद्राकालाची परंपरा शतकानुशतकं आजही कायमआहे. एवढंच नाही तर दसऱ्याचं सीमोल्लंघन साजरं करण्याकरिता देवीला एका विशिष्ट पालखीत बसवून मिरविलं जातं. वर्षांतून तीन वेळा तुळजाभवानीची मूर्ती निद्राकाळाकरिता एका विशिष्ट पलंगावर झोपविली जाते.

तर सीमोल्लंघना करिता मूळ मूर्ती पालखीत घालून मिरविली जाते. तुळजाभवानीची पूजाअर्चा करण्याचं काम वर्षभर स्थानिक पुजारी करत असले तरी पालखी आणण्याचा मान नगरजवळील भिंगारच्या भगत घराण्याकडे आहे. तर परंपरेने पालखीच्या पुढच्या खांद्यांचा मान बार्शी तालुक्यातील आगळगांव गोर माळय़ाच्या लोकांचा आहे. याचबरोबर देवीला ज्या पालखीतून मिरविली जाते ती आणण्याचा मान नगरजवळील जनकोजी तेली (भगत) घराण्याकडे आहे. मध्ययुगीन कालखंडात भिंगारचा जनकोजी तेली तुळजापूरला येताना आपल्या घराला आग लावून निघाला. तुळजापूरला येत असताना रस्त्यातच त्याचं निधन झालं. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने दरवर्षी तेल्याच्या पालखीत बसून सीमोल्लंघन खेळण्याकरिता जाण्याची प्रथा आजही कायम आहे. जनकोजीची अकरावी पिढी ही सेवा अविरतपणे बजावते. जनकोजी तेल्याच्या घराण्याचा मान म्हणून पालखी तर आहेच, शिवाय देवीला सीमोल्लंघनाकरिता
सिहासनावरून हलविण्यापूर्वी तेल्याचे वंशज आपल्या करंगळीच्या रक्ताचा टिळा देवीच्या चरणाला लावण्याची प्रथा होती.तुळजाभवानीची पालखी आणण्याचा मान भिंगारला असला तरी प्रत्यक्षात पालखी तयार करण्याचा सन्मान मात्र राहुरीकरांना लाभतो. पालखी तयार करताना सर्व समाजातील लोकांना त्यात सामावून घेतलेले आहे. पालखीचे सुतारकाम, लोहारकाम आणि रंगरंगोटीचे काम राहुरी येथे पूर्ण केले जाते.निद्राकालावधीत देवी ज्या पलंगावर झोपतात तो पलंग अहमदनगरमधील पलंगे नावाच्या तेली घराण्याकडून दिला जातो. तर पलंग तयार करण्याचं काम आंबे गाव-घोडेगावमधील ठाकूर घराने पार पाडते. दसऱ्यापूर्वी एक महिना अगोदर हा पलंग धुणं अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातून मिरवत तुळजापूरला येत असतो. यातही विशेष बाब म्हणजे तुळजाभवानीचा पलंग जुन्नरला गेल्यानंतर शिवनेरी किल्ल्यासमोर विश्रांतीसाठी ठेवला जातो.

छत्रपती शिवरायांच्या भक्तीत तुळजाभवानीचा अग्रक्रम आहे. त्याचा हा योगायोगच. कुठल्याही मंदिरामध्ये पलंग आणि पालखी या वस्तू पवित्र असल्याने त्याचं जतन करून ठेवलं जातं. याउलट तुळजाभवानी मंदिरातील पलंग आणि पालखी एकाच वेळी वापरून त्या होमात टाकून नष्ट केल्या जातात. हे वेगळेपण आहे. देवीच्या शिरावर मुकुट बसविण्यापूर्वी देवीच्या मस्तकी पानाची चुंबळ करावी लागते. ते पान पुरविण्याची जबाबदारी एका तांबोळी नामक मुस्लिम घराची आहे. हे तांबोळी घराणे नवरात्रीत आपल्या घरी परंपरेने घटस्थापनासुद्धा करते. त्यानुसार मंदिरातील अनेक कामे परंपरेने एकाच घराण्याकडे अखंडपणे चालत आलेली आहेत. अल्पशामोबदल्यात ही मंडळी देवीची सेवा म्हणून दिवसरात्र राबतात. त्यामध्ये जाधव घराणे नगारा वाजविण्याचे काम करते. कदम घराण्यातील घरे घंटी वाजवितात. पलंगे देवीच्या पलंगाची सेवा करतात, न्हावी समाजाकडे सनई-चौघडा वाजविण्याचे काम आहे. याप्रमाणे हरेक जाती-धर्माला इथं परंपरेनं सेवा बजाविण्याचा अधिकार आहे.लाखोचे दान देणारी तुळजाभवानी पहिला नैवेद्य भाजीभाकरीचा पसंत करते. तो उपरकर घराण्याकडूनयेतो. देवीची प्रक्षाळ, सिंहासन यांसारख्या पूजेदरम्यान हाताखाली मदत करण्याचे काम पवेकर करतात. भक्ताने सिंहासनपूजा केल्यानंतर देवीजींच्या अंगावरील चिन्हे दाखविण्याचे काम हवालदार करायचा. सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा तीन वेळा दूधखिरीचा नैवेद्य हा कोल्हापूर संस्थानच्या वतीने दिला जातो. त्यासोबत पानाचा एक विडाही दिला जातो.तुळजाभवानीच्या सेवेत खंड पडू नये म्हणून अनेक सेवेकरी रात्रंदिवस झटत असतात. त्यातही एक विशेष सेवा म्हणजे तुळजाभवानीला उन्हाळय़ात उकाडा लागू नये म्हणून पलंगे सलग तीन महिने देवीजींना वारा घालतात. सिंहासनारूढ देवीजींना वारा घालण्याकरिता पलंगे हातात पंखा घेऊन आपली चाकरी बजावत असतातच यासोबतच चैत्रशुद्ध बलिप्रतिपदेपासून ते मृगाच्या आगमनापर्यंत दररोज दुपारी देवीला नैवेद्यात सरबत दिले जाते. हे लिंबू सरबत पुरविण्याचेकाम वंशपरंपरेने भिसे आणि दीक्षित घराण्याकडेच आहे. विनामोबदला ही मंडळी आपले काम चोखपणे करत असतात.मूळ नाव चिंचपूरतुळजापूरचं मूळ नाव चिंचपूर. यमुनाचल प्रदेशातील चिंचपूर भागातील एका दरीत तुळजाभवानीचं ठाणं असून मंदिराची मूळ बांधणी किल्लेवजा असून मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील आहे. प्राचीन काळी तुळजापुरात मोठय़ा प्रमाणावर चिंचेची झाडं असल्याचा संदर्भ सापडत असला तरी आज तेथे हे झाड दिसणं दुर्मीळ झालं आहे.निजाम राजवटीपासून तुळजाभवानी मंदिराचा कारभार हाकण्याकरिता संस्थानची निर्मिती झाली असून उस्मानाबाद जिल्ह्याचे कलेक्टरत्याचे प्रमुख आहेत. मंदिराचा कारभार सरकारी यंत्रणेकडे असला तरी प्रत्यक्ष देवीची पूजाअर्चा कदम घराण्यातील १६ घरांकडे आहे.यांना भोपे पुजारी तर अन्य घराणी जे देवीचा नवस-सायास पार पाडतात त्यांना पाळीकर पुजारी म्हणतात. त्यांच्यासोबत पानेरी मठाचे महंत देवीच्या सेवेकरिता अहोरात्र मंदिर परिसरातील आपल्या मठात राहतात. महंत आणि वरील दोन्ही प्रकारचे पुजारी यांच्यात मानापमानावरून वरचेवरमतभेद वाढत गेल्याने हैद्राबाद संस्थानमधील धार्मिक विभागाने १९१९ साली ‘देऊळ-ए-कवायत’ नावाचा कायदावजा करार केला. त्यानुसार संस्थानसह पुजारी आणि मानकऱ्यांनी कोणत्या प्रकारच्या सेवा बजावाव्यात तसेच त्यांचे अधिकार आणि उत्पन्न स्पष्ट करण्यात आले असल्याने आजही मंदिराचा कारभार ‘देऊळ-ए-कवायत’ नुसारच चालविला जातो.
तुळजापुरातील पुजाऱ्यांचे वैशिष्टय़ म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या भक्ताची ते लेखी नोंद ठेवतात. त्यामुळे वंशपरंपरेने आपल्या कुलदेवतेचा पुजारी हा ठरलेला आहे. साहजिकच आपल्या वंशजांना इतिहास जाणून घेण्याकरिता पुजाऱ्यांचे बाड उपयोगी ठरते. देवीचे पुजारी हे आपल्याकडे येणाऱ्या भक्ताची राहण्याखाण्याची व्यवस्था स्वत:च्या घरीच करतात हे वेगळेपणआहे. भक्ताला लाखोने देणारी देवी स्वत: मात्र पहिला नैवेद्य भाजी भाकरीचा स्वीकारते. गेल्या अनेक दशकांपासून उपरकर हा नैवेद्य देतात. याप्रमाणे पवेकर, हवालदार, दिवटे, जाधव, लांडगे यांसारखे अनेक सेवेकरी अखंडपणे सेवा बजावतात. देवीच्या सेवेत तुळजापुरातील पानेरी, मळेकरी, दशावतार आणि भारतीबुवाचे मठ कार्यरत आहेत. शेकडो वर्षांपासून या मठाचे मठाधिपती दिवसरात्र सेवा करतात. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत या मठाधिपतींना देवीच्या सेवेत राहावे लागते. दशावतार मठाची जागा देवी मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असली तरी या मठाच्या महंतांना आश्विन अमावास्ये शिवाय वर्षभर कधीच मंदिरात प्रवेश करण्याचा हक्क नाही. त्यामुळे हे महंत वर्षभर हा दिवस सोडून कधीच पूर्वेकडे असणारा आपल्या मठाचा दरवाजा ओलांडत नाहीत.
तुळजापुरात देवीच्या सेवेत सर्व जातीधर्माना स्थान आहे. देवीला टोपासाठी लागणारी पानं पुरविणारे तांबोळी मुस्लीम असले तरी देवीची माळ, पोत, परडी तर पाळतातच शिवाय घटस्थापनाही करतात. देवीच्या नैवेद्यात मांसाहार, तर येथील काळभैरवाला नैवेद्यानंतर गांजाची चिलीम तोंडात दिली जाते. याशिवाय अख्खेगावही अनेक परंपरा पाळते. त्यानुसार नवरात्रीत गादी पलंगाचा त्याग करतात. चप्पल घालतनाहीत. इतरही अनेक प्रथा आहेत. त्यानुसार कुंभाराचे चाक, तेलाचा घाणा गावात चालवत नाहीत.
तुळजाभवानी म्हणजे शाक्त संप्रदायाशी निगडित असल्याने तिच्या प्रथापरंपराही काही वेगळय़ाच असणार! त्यानुसार देवीच्या नावाने गोंधळ घालणे आलेच. एका भक्ताच्या घराण्याची प्रथा तर अशी आहे की, चक्क बोंबलतजाऊन दर्शन घ्यावे लागते. एक दंतकथा अशी सांगितली जाते की मौजे रांजणी ता. घनसांगवी जि. जालना येथील
तुकाराम नावाचा भक्त शेकडो वर्षांपूर्वी देवीच्या दर्शनासाठी आला असता रात्रीच्या समयी त्याला भूकंप झाल्याचा दृष्टांत होऊन भीतीने तो ओरडतच घराबाहेर पडला. त्याच्या आवाजाने सर्व जण घराबाहेर पडल्याने अनेकांचे प्राण वाचले. परंतु याच भक्ताला रस्त्यात काही जणांनी लुटले म्हणून तो देवीला साकडे घालण्याकरिता माझे काय
चुकले म्हणत बोंब ठोकतच गेला. देवीला साकडे घालण्यासाठी बोंबलतच जाण्याची परंपरा निर्माण झाली. त्यानुसार दत्त जयंतीला त्याचे वंशज तुळजापुरात प्रवेश केल्यानंतर देवीच्या गाभाऱ्यापर्यंत चक्क बोंबलत जाऊन दर्शन घेतात. त्यामुळे या घराण्याला नाव पडले बोंबले! विशेष म्हणजे देवीच्या भक्तीत गढून गेलेल्या तुकारामाचा अंत तुळजापुरात व्हावा हा पण योगायोगच. त्यामुळे शहरात या तुका बोंबल्याची समाधीसुद्धा आहे. अशा अनेक चित्रविचित्र परंपरा तुळजापूरवासीयांनी जपल्या आहेत.
देवीच्या परंपरेत काळभैरवाचा भेंडोळी उत्सवही महत्त्वाचा आहे. एका काठीला पलिते बांधून ती पेटवून निघालेली ती भव्य ज्वालायात्रा पाहताना थरकाप उडतो. देवांचे रक्षण करणारा कालभैरव म्हणजे या परिसराचा कोतवालच. त्याच्या अक्राळविक्राळ रूपाला अनुसरून त्याला रोजचा नैवेद्यही मांसाहाराचा असतो. शिवाय त्याच्या तोंडात गांजाची चिलीम पेटवून दिली जाते. ही परंपरा आजही जोपासली जाते. काळभैरव रखवालदार आहे. तो वर्षांतून एकदाअश्विन अमावस्येला तुळजाभवानी परिसराची पाहणी करायला निघतो. त्याचे फिरणे हे रात्रीचे असते. त्याला उजेड हवा म्हणून हा भेंडोळी उत्सव आला असावा. भैरोबाच्या नावानं चांगभलं आणि तुळजाभवानीचा उदो उदो करत तरुणांनी भेंडोळी अंगावर घेतलेली असते. ही भेंडोळी घेऊन ते अरुंद गल्लीबोळातून जातात. पण या भेंडोळीमुळे त्यांना कधीही इजा झाल्याचे उदाहरण नाही. काळभैरवाला काशीचा कोतवाल म्हटले जाते. त्याची ठाणी भारतात सर्वत्र असली तरी भेंडोळी उत्सव उत्तरेत काशी आणि दक्षिणेत तुळजापूर येथेच फक्त साजरा होतो.
मंदिरात आल्यावर देवीला पदस्पर्श करून ही भेंडोळी वेशीबोहर जाऊन विझवली जातात.
अश्विन अमावस्येला भेंडोळी बरोबरच महत्त्वाचा समारंभ म्हणजे दशावतार मठाचे महंत या दिवशी वाजतगाजत देवीच्या दर्शनासाठी येतात. या दिवशी देवीला पांढरी साडी नेसवण्याची प्रथा आहे. ही साडी हा दशावतार मठाचा आहेर असतो. ते वैराग्याचे प्रतीक समजले जाते. या दिवशी दशावतार मठाचे महंत आणि काळभैरवाचे पुजारी यांना
पेहराव देऊन त्यांचा सत्कार केला जातो. त्यात त्यांना जो फेटा बांधला जातो, तो देवीच्या साडीचा असतो. काही प्रथापरंपरा अगदी समाजानेही जपल्या आहेत. अद्यापही तुळजापुरात तेल्याचा घाणा, कुंभाराचे चाक, कातडी कमावण्याचा उद्योग इथं चालविला जात नाही. हेच काय तर तुळजापुरात भिंतीवर पाल कधी चुकचुकत नाही अशी
या लोकांची श्रद्धा आहे.
श्री तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी त्यामुळे ज्याप्रमाणे आई सर्वाना सामावून घेते त्याप्रमाणे देवीच्या दरबारात गुढीपाडवा, होळी, रंगपंचमी असे सर्वच सण साजरे होतात. एवढेच नव्हे तर वैष्णवपंथाचा गोपाळकालाही आषाढी एकादशीला इथं साजरा होतो. गुढीसोबतच सर्व राष्ट्रीय सणाला मंदिरावर राष्ट्रध्वजही फडकविण्याची परंपरा इथं कायम आहे. या प्रमाण परंपरेला प्राचीन इतिहास आहे. बदलत्या जगात आजही त्याचे मनोभावे पालन केले जाते. तुळजाभवानीच्या दरबारातील प्रथापरंपरा अगदी निर्विघ्न पणे पुढे चालू आहेत. म्हणूनच तिच्या दरबारात पाऊल ठेवताच लहानथोर एकच जयघोष करतात.

‘आई राजा उदोऽऽ उदोऽऽ!’

जय जगदंबा
. . . . . . वॉट्सॅपवरून साभार दि.०४-१०-२०२२


श्री वेंकटेश नवरात्र पूजा, कल्ल्हळ्ली

गणेशोत्सव २०२२

श्रीगजाननाची स्थापना करून या वर्षाच्या गणेशोत्सवाची सुरुवात केली आहेच.
या उत्सवाच्या कालावधीत मला मिळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण लेखांचे संकलन मी या पानावर करणार आहे. जसजसे लेख आणि चित्रे मिळत जातील तसतशी ती या पानावर देत जाईन . मला यातले बहुतेक लेख व चित्रे फेसबुक किंवा वॉट्सॅपवर मिळणार आहेत. सर्व मूळ लेखकांचे मनापासून आभार मानून त्यानी आपली अनुमति द्यावी अशी विनंति आधीच करत आहे. दि.१-०९-२०२२

गणपतीची ११ संस्कृत स्तोत्रे आणि गणेश पुराणाचे मराठीतून संक्षिप्त ओवीबद्ध रूपांतर इथे : https://anandghan.blogspot.com/2021/07/blog-post_15.html
गणपतीअथर्वशीर्ष या संस्कृतमधील स्तोत्राचे सुलभ असे ओवीबद्ध रूपांतर मराठी भाषेत रूपांतर इथे :
https://anandghan.blogspot.com/2020/08/blog-post.html

माझे हे जुने संग्रह अवश्य पहा : गणेशोत्सव २०१९ : https://anandghare.wordpress.com/2019/09/08/%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b5-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a7%e0%a5%af/
गणेशोत्सव २०२१ : https://anandghare.wordpress.com/2021/09/10/%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b5-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a8%e0%a5%a7/

गणपती मिथिला शैली

या वर्षीचा संग्रह

श्रीगणेशाय धीमहि

गायक’ – शंकर महादेवन

https://www.bhaktibharat.com/mantra/gananaykay-gandevatay-ganadhyakahay-dheemahi

गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि
गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि
गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि
एकदंताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि
गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि

गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने
गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे
गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायीने
गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे
गुरुदैत्यगलच्छेत्रे गुरुधर्मसदाराध्याय
गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय
गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि
गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि

ग्रन्थगीताय ग्रन्थगेयाय ग्रन्थातरात्मने
गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे
गेयचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते
गायकाधीनविग्रहाय गंगाजलप्रणयवते
गौरीस्तनन्धनाय गौरिहृदयनन्दनाय
गौरभानुसुताय गौरीगणेश्वराय
गौरीप्रणयाय गौरीप्रणवाव गौरभावाय धीमहि
गोसहस्त्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि


मुंबईचे गणपती १

🌺

नास्तिक असून तुला
दर्शनाला नेणारी मी
माझ्या इच्छेखातर
येणारा तू

हार-फुलांचा भाव करत
ताट घेणारी मी
दारातल्या भिक्षुकांना
मदत करणारा तू

रांगेत पुढे जाण्यासाठी
धडपडणारी मी
देवळाची सुबकता
न्याहाळाणारा तू

चिडून नमस्कारासाठी
तुला खुणावणारी मी
देवळातली प्रसन्नता
अनुभवणारा तू

देवळातही चपलेची
काळजी करणारी मी
गरजूने नेली असेल असा
विचार करणारा तू

खरेच देव नक्की
कुणाला पावत असेल
माझ्यासारख्या आस्तिकाला
की तुझ्यासारख्या नास्तिकाला ?

बाप्पामोरया

मुंबईचे गणपती २

========

आनंदे वंदावा गणनायक तो

संगीत, निरुपण : डॉ. अशोक रानडे

आनंदे वंदावा…
(श्री अमृतराय रचित कटाव – गणेश स्तुती)

आनंदे वंदावा गणनायक तो मंगलदायक ।।

मुंडमथन करि, जननिजनक निज रुंडमालधर, अमळकुंड तो, तृतियनयन परि, तनय विनयविभु, वक्रतुंड जिथे, धुंडिराज करि,
शुंड सरळ, मुनि धुंडिति जनि वनि, झुंडनिका बहु, विकटतुंड, गणपुंडरीक, मणिहारप्रलंबित,

कुंडलीशकटिबंधतनुद्भव पुंडदमन, मणिकुंडल श्रुतियुगि, गंडस्थळि अळि, चंद्रखंडघर, गुणगणमंडित,
कीर्ति अखंडित, खंड दुरितचय, पंडितगामिनि, तांडव करि जो, पद्मभवांडी, मंडलाकृति, चंडपराक्रम,
वितंडखंडन, विपक्षदंडन, स्वभक्तमंडन, सुरवर मुनिवर, सकल चराचर पावन करि निज प्रसाद देऊनि, पुरवि मनोरथ,
परमककृपालय, भालविलसदलि, मालदान रसपान करिति, कलिकाल कापती, परनिर्दाळण करित समरि जो,
पालन करि सुरचालक त्रिभुवनि, शंभुबाल भवजाल तेच जंजाळ कटनकरवाल, स्मरण ते, सप्तताल करि
नृत्य सरस तो, झुणझुण झुण झुण क्वणित नूपुरे, खुळ खुळ खुळ खुळ वाळे वाकि पदि, फुं फुं फूं करि नागबंध कटि,
लळ लळ लळ लळ ललित कुंडले, चप चप चप चप न्यस्त पाउले, किणि किणि किणि किणि क्षुद्र घंटिका,
दण दण दण दण उठति गुंजरव, गुं गुं गुं गुं भ्रमर गुंजती, खण खण खण खण ताल वाजती,
धिक् धिक् धिलांग मृदंगरव मृदु, धिमिघिमि घिमिकिट, थथथथ थरिकिट थरिकिट,

सारेगम, सारेगमपधनी नीधपमगरेसा, सप्तस्वर मुखि भेद आलापित,
स्वर वर्तुनियां, वेष्टनसंगित, तननं तननं रागरागिणी ध्रुपदत्रिवट गति, गद्यपद्यविभु हृद्य सद्य करि,
प्रबंध निबंध जगनल लगबग, विसरुनि तटस्थ, मौन्यमुद्रा धरुनी सादर समुदाय सवे आयकतो ।।

न्यू जर्सीमधील गणपती स्थापना

👉#बातूगणपती_महाराजा 🌺🙏
[ या वर्षी गावागावात गणेशोत्सवात गा-हाणी अगदी दीर्घ स्वरात घातली जातील ] 🌺🙏

सूर्योदय होताच जसा अंधकाराचा नाश होतो. तसा कालपर्यंत छोटय़ा-मोठय़ा उत्सवात रंगलेले अवघे कोकण गणेशोत्सवाचा दिवस उजाडताच, सारा माहोल हर्षभरीत झाला आहे. घराघरात, सार्वजनिक ठिकाणी पारंपरिक रितीरिवाजात आज गणेशोत्सव सुरू होत आहे. या मंगलमूर्तीची पूजा-अर्चा केल्यानंतर गा-हाणे घालण्याची परंपरा येथे मोठी आहे. मंगलमूर्तीच्या उत्सवात दीर्घ गा-हाणे आणि आरतींचा माहोल उभा करण्याची परंपरा मोठी आहे. यावर्षी गावागावात गणेशोत्सवात गा-हाणी अगदी दीर्घ सुरात घातली जातील. मुलाखातली ही मजा गावात पोहचल्याशिवाय समजायची नाही. परंतु मुंबई असलेल्या चाकरमान्यांसाठी आमच्या मुलखातले हे गा-हाणे इथूनच गणपतीला साकडे घालतो तुमच्यासाठी..
बा तू गणपती म्हाराजा ऽऽ !!

चवथीच्या सणाक ही तुझी यथाशक्ती पूजा केलेली आसा, तू ती पावन करून घे. हे गणनायका, प्रत्येक वर्षाक तुझ्या स्वागताक तुझी सारी ही लेकरा सज्ज आसतत. तुझ्या उत्सवात रंगताना मिळणारो आनंद हय़ो वर्षभर पुरत असता, रे म्हाराजा ऽऽ पण या वर्षाक विघ्नहर्ता जी काय इडापिडा उत्पन्न झाली हां ती तुझी तू पायाबुडी घालून ठेव. सगळय़ांका सुखी ठेव. ज्यांच्या ज्यांच्या जा-जा मनात हां ता-ता घडांदे
शेराचे सव्वाशेर कर आणि असाच आनंदात तुझा लेकरू, असोच मोठो उत्सव करत -हवांदेरे म्हाराजा
ऽऽ (होय देवा म्हाराज्या)

बा देवा म्हाराजा ऽऽ सृष्टिचो निर्मातो तूच आसस. बुद्धीचो अधिपती तूच आसस. सोळा विद्या चौसष्ट कलांच्या रे परमेश्वरा आज जा काय घडतासा ता तुका सगळा ठावक आसा. तुझीच लेकरा अशी काय करतहत हय़ा तुका म्हायती नाय आसा नाय. पावसान जशी दिशा बदलल्यान तशीच दिशा आता माणसाव बदलतहत. नव्या नव्या रोगांची नावा कानार येतहत.

ते रोग नायनपड करूचे, तुझ्याच हातात आसत. कोणाक कधी घालूचो आणि कोणाक कधी ठेवचो हय़ा तुच करूचाहस म्हाराजा ऽऽ महागाईचो कळस झालोहा, ती कमी होवची नाय पण तेका सामारे जावची शक्ती दे, बुद्धी दे रे म्हाराजा ऽऽ रेशनावर तांदूळ मिळांदे, राकेल मिळांदे, डाळ, गव्ह मिळांदे ऽऽ रे म्हाराजा ऽऽ
बा गणपती म्हाराजा ऽऽ स्वाईन फ्लू नावाचा जो काय राक्षस उठलो हा, तो हय़ा चतु:सीमेत पाऊल ठेवता नये.

यासाठी हयल्या लेकरांका जा जा काय करूचा आसा ऽऽ जा पत्थ पाणी पाळूक व्हया, ता ता सगळा पाळूची बुद्धी दे रे म्हाराजा ऽऽ वैदपान वेळीच मिळांदेरे म्हाराजा ऽऽ आजपासून तुझो उत्सव सुरू होताहा.

सगळे निरोगी ऱ्हवाचे आणि तुझो हय़ो उत्सव मोठय़ा थाटात संपन्न होवचो रे म्हाराजा. जे चाकरमानी इलेहत त्यांच्या हाता-पाया बुडी संभाळ कर आणि जशे आनंदात इलेहत, ते इल्यामुळे जशे हयले आनंदीत झालेहत, तशेच आनंदात परत जावंदेत रे म्हाराजा ऽऽ त्यांच्या कुटुंबाक सुखी ठेवरे म्हाराज्या.. बा म्हाराजा ऽऽ तुझ्याकडे दर वर्षासारखे आमचे यंदा नवस न्हाय, सगळय़ांचा आरोग्य ठिक ऱ्हवाचा, डोळ्याची साथ येवंदे नको
तापाची साथ येवंदे नको, जा जा खातत ता ता पचांदेरे म्हाराजा ऽऽ पुढच्या वर्षी याच्यापेक्षा दुप्पट उत्सव करूनघीरे म्हाराजा ऽऽ बा तू गणपती म्हाराजा ऽऽ जय देवा म्हाराज्या, बा तू स्वामी समर्था.. (होय देव म्हाराज्या) पात पुरये तू बाये माझे आवशी.. बाराच्या पुरवसा.. पुरवेच्या वसा..आणि देवा लिंगा, गांगो, बाराच्या पूर्वसा वशिका ब्राह्मणा, उगवाई, काळकाई, इटलाई, नवलाई, सातेरी बेळाजैना पानपुरका आणि सगळ्या दिशेंच्या चाळ्या आणि तू, ग्रामदेवते, कुलदेवते सगळय़ांचा भला करा, कल्याण कर.

काय चूक-अपराध झालो असात गाळण कर.. मगे तू या रवळनाथा, मगे तू या चाळगता, बा तू येतोबा नि येताळा (होय देवा म्हाराजा) मगे तुया संबंधा, मगे तुया हडळी, तू जुलमी म्हारींगना, बाय माझे माऊली तुयाच आसस सगळय़ांची सावली. तुम्ही सगळय़ांनी आता येक होवकं व्हया. (होय देवा म्हाराजा) तू या पावणेच्या पुरवसाक राजी कर. पुढाकार घेवन सगळय़ांका एक कर.. आंगणेवाडीच्या भराडीदेवी, दिर्बादेवी, तू जुगाई माते. बाये तू भगवती देवी,
आडीवरच्या महाकाली, आई तू भगवती, माते तू गांगोमाऊली, अंबादेवी, उगवाई, एकवीरा माते आणि तू भैरी भवानी, बा तू रामेश्वरा, श्री महालिंगेश्वरा, भैरवनाथा, विश्वेश्वरा, बा तू गिरोबा, आई पावनादेवी, जरीमरी, भावई देवी, आरवलीच्या जागबाई, श्री देव पाटेकरा, आणि तू गांगोभैरी, स्वयंभू रवळनाथा, गांगेश्वरा, सोनुर्लीच्या माऊली, श्री देवा कुणकेश्वरा, नारायणा..कोळंबच्या खापल्या म्हाराजा, भरडा वयल्या , एकमुखी दत्तात्रया, कोईलच्या गणपती म्हाराज्या, गणपतीपुळ्याच्या गणराया, जयगडच्या कराडेश्वरा, पल्लीनाथा, काशीविश्वेश्वरा, बा तू धुतपापेश्वरा, कशेळीच्या कनकादित्या, म्हापुरुषा, आदिनाथा, भद्रकाली माते आणि भुतनाथा, सगळय़ांका तुया राजी कर. एक कर, नवसाक पाव. मुनग्याची भगवती जागी कर. गोयची कामाक्षी जागी कर. सहा मुली, बारा कुळी आणि चौवीस बरामन राजी कर. म्हारवसाचा गनीत पुरा कर (होय देवा म्हाराजा).. बारा पाचाचा गनीत याक कर (होय देवा म्हाराजा) सगळ्या गावक-यांचा कल्याण कर. देवा तुझ्या रखवालीत ही सगळी सृष्टी तुझीच लेकरा आसत.

तुझ्याच येलीची फळा आसत. लय दिसानी तुझ्या पायाकडे इली आसत. मूळच्या तुझ्या भूमिक हाक मारीत आसत. (होय देवा म्हाराजा). त्यांका जसा समाजला, उमाजला तशी तशी सेवा त्यांनी केलेली आसा. याच्या म्होर पण त्यांच्याकडसून तुझ्या मनापरमाण करून घे. (होय देवा म्हाराजा). शेराचे सव्वा शेर कर, पाचाचे पंचवीस कर. हे लहान-थोर सगळे तुझ्यासमोर हात जोडून उभे आसत. (होय देवा म्हाराजा). सगळीकडेच दुष्काळाची चिंता हा. पावसान ह्या वर्षी पाठ फिरवल्यान आसा. काय लेकरा तुझ्या भूमित गेली आसत. काय लेकरा नोकरी-धंद्याच्या निमित्तान मुंबईतच थांबली आसत. त्या सगळ्या लेकरांचा हाता-पायाबुडी संभाळ कर. (होय देवा म्हाराजा). कोणाची काय करणी आसात, कोणाचा काय वाईटपण आसात, कोणाचा काय इक्रित आसात, ता तुझा तुका माह्यती. वडाची साल पिंपळाक कर, पिंपळाची साल वडाक चिकटा दे, आंब्याचो टाळ काज-याक जाव दे. ख-याचा खोटा आणि खोटय़ाचा खरा कसो कोण करता हा? हकडचा तकडे अन् तकडचा हकडे कसा कोन साधता हा ह्या तुझा तुका माह्यती हा. (होय देवा म्हाराजा). ज्याची त्याच्या कर्तृत्वापरमान त्याच्या त्याच्या झोळीत यश टाक. (होय देवा म्हाराजा). देवा म्हाराज्या, तुझा तू कार्य करून घेवक. तू समर्थ आसस.

ज्याच्या त्याच्या मनातली इच्छा पूर्ण होवोंदे. नोकरीक असलेल्यांचो पगार वाढव, नसल्यांका नोकरी लाव, दररोजचो प्रवास सुखाचो कर, ज्यांची इच्छा हा त्येका बायल दे. पोरांका चांगलो नवरो मिळां दे. मगे तुझ्या समोर जोडय़ांनी येतीत रे म्हाराज्या. (होय देवा म्हाराजा). तुझ्या पाया पडणारी ही जी लेकरा आसत ती सगळय़ांची नाव मी आता घेत नाय.. त्या सगळय़ांवर तुझी कृपादृष्टी ठेव. ते ते मनातसुन तुका साद घालतत. त्यांच्या त्यांच्या हाकेक ओ दे. मागल्यार ते तुझ्या दाराक दहा नारळाचा तोराण बांधतीत. (होय देवा म्हाराजा). बा देवा म्हाराज्या या तुझ्या लेकरांपैकी काईंका वायट?नाद लागलो हा. तो नाद सुटात असा कायतरी कर. तुका हात जोडून प्रार्थना करता आसव. आयुष्य सगळय़ांचा सुखाक जावचा, दरवर्षी तुझी सेवा अशीच यथासांग तूच करून घेवूची आसस. कुणाची मती फिरली आसात तर त्येका तुझी माती दाखवून तुझी प्रचिती तूच दाखवूची आसस. लेकरांचा कल्याण कर. बरा ता कर आणि तुझ्या नावाचो डंको असोच वर्षानवर्षा वाजां दे रे म्हाराज्याऽऽ!

🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺🙏

पुण्यातले मानाचे गणपती २०२२


संकटनाशन द्वादश गणपती

आपण असंख्य वेळेला हे “गणपती स्तोत्र” “संकटनाशन स्तोत्र” म्हणतो परंतु यामध्ये उल्लेख केलेल्या गणेशाची प्रत्यक्ष स्थाने आपल्यापैकी
बहुतेकांना माहीत नाहीत….

नारदकृत – ‘संकटनाशन’ स्तोत्रात उल्लेखिलेली बारा नावे व त्यांची सद्यस्थाने….

प्रथमं वक्रतुण्ड च
एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं
गजवक्त्रं चतुर्थकम्
लम्बोदरं पंचमं च
षष्ठ विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं
धूम्रवर्णं तथाष्टमम्
नवमं भालचन्द्रं च
दशमं तु विनायकम् ।
एकादशम् गणपति
द्वादशं तु गजाननम्

१. वक्रतुण्ड :- मद्रास राज्यातील कननूरजवळ

२. एकदन्त :- पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्याजवळ.

३. कृष्णपिंगाक्ष :- मद्रास राज्यातील कन्याकुमारीजवळ.

४. गजवक्त्र :- ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे.

५. लंबोदर :- ह्याची दोन स्थाने उल्लेखिली जातात. (१) रत्नागिरी
जिल्ह्यातील गणपती पुळे क्षेत्रात, (२) मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर या प्रसिद्ध
ज्योतिर्लिंगाजवळ असलेला पंचमुखी गणपती.

६. विकट :- हिमालयाच्या पायथ्याशी हृषीकेश येथे.

७. विघ्नराजेन्द्र :- कुरु क्षेत्रात कौरव-पांढवांच्या युद्धभूमीजवळ.

८. धूम्रवर्णं :- १) दक्षिणेकडील केरळ राज्यात कालिकतजवळ. २) तिबेटमध्ये ल्हासापासून १५ मैलांवर.

९. भालचंद्र :- रामेश्वरजवळ धनुष्कोडी येथे मद्रास राज्य.

१०. विनायक :- काशीक्षेत्रातील अन्नपूर्णामंदिराजवळचा धुण्डिराज गणेश.

११. गणपती :- क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथील द्विभुज महागणपती.

१२. गजानन :- हिमालयातील शेवटचे तीर्थस्थान पांडुकेसर येथील मुंडकटा गणेश. गौरी कुंडाजवळील ही गणेशमूर्ती शिरविरहित आहे.

समर्थ रामदास स्वामींनी ही बाराही गणेशस्थाने शोधून काढून सर्व गणपतींचे दर्शन घेतले होते, असे म्हणतात

।। जय श्री गणेश ।।

विविध रूपे

चौसष्ट कला

गणपती चौसष्ट कलांमध्ये निपुण आहे. या चौसष्ट कला कोणत्या ?

चौसष्ट कला पुढीलप्रमाणे.
१. पानक रस तथा रागासव योजना – मदिरा व पेय तयार करणे.
२. धातुवद- कच्ची धातू पक्की व मिश्रधातू वेगळी करणे.
३. दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे.
४. आकर ज्ञान – खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे.
५. वृक्षायुर्वेद योग- उपवन, कुंज, वाटिका, उद्यान बनविणे.
६. पट्टिका वेत्रवाणकल्प- नवार, सुंभ, वेत इत्यादींनी खाट विणणे.
७. वैनायिकी विद्याज्ञान- शिष्टाचार व विनय यांचे ज्ञान असणे.
८. व्यायामिकी विद्याज्ञान- व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान असणे.
९. वैजापिकी विद्याज्ञान- दुसऱ्यावर विजय मिळविणे.
१०. शुकसारिका प्रलापन- पक्ष्यांची बोली जाणणे.
११. अभिधान कोष छंदोज्ञान- शब्द व छंद यांचे ज्ञान असणे.
१२. वास्तुविद्या- महाल, भवन, राजवाडे, सदन बांधणे.
१३. बालक्रीडाकर्म- लहान मुलांचे मनोरंजन करणे.
१४. चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया- पाकक्रिया, स्वयंपाक करणे.
१५. पुस्तकवाचन- काव्यगद्यादी पुस्तके व ग्रंथ वाचणे.
१६. आकर्षण क्रीडा- दुसऱ्याला आकर्षित करणे.
१७. कौचुमार योग- कुरुपव्यक्तीला लावण्यसंपन्न बनविणे.
१८. हस्तलाघव- हस्तकौशल्य तथा हातांनी कलेची कामे करणे.
१९. प्रहेलिका – कोटी, उखाणे वा काव्यातून प्रश्न विचारणे.
२०. प्रतिमाला – अंत्याक्षराची योग्यता ठेवणे.
२१. काव्यसमस्यापूर्ती – अर्धे काव्य पूर्ण करणे.
२२. भाषाज्ञान – देशी-विदेशी भाषांचे ज्ञान असणे.
२३. चित्रयोग – चित्रे काढून रंगविणे.
२४. कायाकल्प – वृद्ध व्यक्तीला तरुण करणे.
२५. माल्यग्रंथ विकल्प – वस्त्रप्रावरणां ची योग्य निवड करणे.
२६. गंधयुक्ती – सुवासिक गंध वा लेप यांची निर्मिती करणे.
२७. यंत्रमातृका – विविध यंत्रांची निर्मिती करणे.
२८. अत्तर विकल्प – फुलांपासून अर्क वा अत्तर बनविणे.
२९. संपाठय़ – दुसऱ्याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे.
३०. धारण मातृका – स्मरणशक्ती वृद्धिंगत करणे.
३१. छलीक योग- चलाखी करून हातोहात फसविणे.
३२. वस्त्रगोपन- फाटकी वस्त्रे शिवणे.
३३. मणिभूमिका – भूमीवर मण्यांची रचना करणे.
३४. द्यूतक्रीडा – जुगार खेळणे.
३५. पुष्पशकटिका निमित्त ज्ञान – प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्य सांगणे.
३६. माल्यग्रथन – वेण्या, पुष्पमाला, हार, गजरे बनविणे.
३७. मणिरागज्ञान – रंगावरून रत्नांची पारख करणे वा ओळखणे.
३८. मेषकुक्कुटलावक – युद्धविधी- बोकड, कोंबडा इ.च्या झुंजी लावणे.
३९. विशेषकच्छेद ज्ञान – कपाळावर लावायच्या तिलकांचे साचे करणे.
४०. क्रिया विकल्प – वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटविणे.
४१. मानसी काव्यक्रिया – शीघ्र कवित्व करणे.
४२. आभूषण भोजन – सोन्या- चांदी वा रत्नामोत्यांनी काया सजवणे.
४३. केशशेखर पीड ज्ञान – मुकुट बनविणे व केसात फुले माळणे.
४४. नृत्यज्ञान – नाचाविषयीचे शास्त्रोक्त सखोल ज्ञान असणे.
४५. गीतज्ञान – गायनाचे शास्त्रीय सखोल ज्ञान असणे.
४६. तंडुल कुसुमावली विकार – तांदूळ व फुलांची रांगोळी काढणे.
४७. केशमार्जन कौशल्य – मस्तकाला तेलाने मालीश करणे.
४८. उत्सादन क्रिया – अंगाला तेलाने मर्दन करणे.
४९. कर्णपत्र भंग – पानाफुलांपासून कर्णफुले बनविणे.
५०. नेपथ्य योग – ऋतुकालानुसार वस्त्रालंकाराची निवड करणे.
५१. उदकघात – जलविहार करणे. रंगीत पाण्याच्या पिचकारी करणे.
५२. उदकवाद्य – जलतरंग वाजविणे.
५३. शयनरचना – मंचक, शय्या व मंदिर सजविणे.
५४. चित्रकला – नक्षी वेलवुट्टी व चित्रे काढणे.
५५. पुष्पास्तरण – फुलांची कलात्मक शय्या करणे.
५६. नाटय़अख्यायिका दर्शन – नाटकांत अभिनय करणे.
५७. दशनवसनांगरात – दात, वस्त्रे, काया रंगविणे वा सजविणे.
५८. तुर्ककर्म – चरखा व टकळीने सूत काढणे.
५९. इंद्रजाल – गारुडविद्या व जादूटोणा यांचे ज्ञान असणे.
६०. तक्षणकर्म – लाकडावर कोरीव काम करणे.
६१. अक्षर मुष्टिका कथन – करपल्लवीद्वारे संभाषण करणे.
६२. सूत्र तथा सूचीकर्म – वस्त्राला रफू करणे.
६३. म्लेंछीतकला विकल्प – परकीय भाषा ठाऊक असणे.
६४. रत्नरौप्य परीक्षा – अमूल्य धातू व रत्ने यांची पारख करणे.

या सर्व कला व्यवस्थित वाचा. हे वेगवेगळे ६४ प्रकारचे व्यवसाय आहेत. यातील एका कलेतील नैपुण्य सुद्धा मानवाचा चरितार्थ व्यवस्थित चालेल इतपत द्रव्य त्याला मिळवून देऊ शकतो. व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जावे ज्यातून कौशल्य विकसित होईल हे आपल्याला समजायला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे जावी लागली. ब्रिटिशांनी या सर्व कला शिकवणारी गुरुकुल पद्धती उध्वस्त करून macaly ची शिक्षण प्रणाली लादली आणि या कितीतरी कुशल मंडळींचा भविष्यकाळ त्यांनी चौसष्ट नष्ट केला. तीच शिक्षण प्रणाली आंधळेपणाने गेली ७० वर्ष पालन केली गेली.

आज संपूर्ण समाजात जी अस्वस्थता आणि निराधार असल्याची असुरक्षिततेची भावना आहे त्याचे कारण रोजगार किंवा चरितार्थाची शाश्वती नसणे. जुन्याकालात या ६४ कलांपैकी एक कला आत्मसात झालेला व्यक्ती स्वतःचे पोट भरू शकत होता.. आज पदवीधरांचे लोंढे नोकरीच्या शोधात वणवण फिरतात कारण कौशल्य असे कुणाकडेच नाही. सगळ्यांकडे पदवी नावाचा असा एक कागद आहे ज्याची व्यावहारिक जगात फारशी किंमत नाही.

जुन्या काळात गुरुकुलात या कला शिकवल्या जात. या कलांचा वापर करत जीवन व्यतीत करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील लोकांनी तोच व्यवसाय पिढ्यानपिढ्या केल्यावर ती त्यांची जात झाली.

जात म्हणजे विशिष्ट व्यवसाय करणाऱ्या कुळात जन्म घेणे आणि ते कौशल्य आत्मसात करून तोच व्यवसाय आपण सुद्धा करणे.

या कलांच्या पैकी बहुसंख्य कला या शुद्र वर्णात मोडतील अश्या आहेत. पण या कलांचा स्वामी कोण आहे ? शिव आणि पार्वतीचा लाडका पुत्र गणेश. या चौसष्ट कलांचा स्वामी म्हणून तो या सर्व जातींच्या साठी वंदनीय आहे. आदर्श आहे. त्या अर्थाने तो गणांचा नायक अर्थात सामान्य जनांचा देव आहे. ही सर्व ६४ कर्मे करणारा हा देव साक्षात शिव पार्वतीचा पुत्र आहे. त्यामुळे तो , त्याची कला आणि त्या कलेची सेवा करणारे सामान्य जन कोणत्याही दृष्टीने गौण नाहीत.

हे डोक्यात कोरून घ्या… आणि जातीभेद ब्राह्मणांनी निर्माण केला छाप प्रचार करणाऱ्या सडक्या मेंदूंना आवर्जून सांगा.. हे कौशल्य आमचा देव गणेशाचे आहे. त्याने आम्हाला शिकवले आणि आम्ही त्याला व्यवसाय आणि जात म्हणून स्वीकारले आहे. यात गौण काहीही नाही. तुझा विषारी विचार तू तुझ्याकडेच ठेव..
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया….🙏🌸🌹

गणपती जन्माची कथा

गणपती जन्माची कथा एका वेगळ्या पद्धतीने आध्यात्मिक रूपकाच्या स्वरूपात …. आक्षेप…. व खंडन !

गणपती जन्माच्या कथेमागचा अर्थ:-
कथा:-
पार्वती आंघोळीला जाते आणि जाताना नंदीला पाहाऱ्यावर ठेऊन जाते. काही वेळाने महादेव पार्वतीला भेटायला येतात , नंदी त्यांना अडवु शकत नाही. मग पार्वती स्वतःच्या मळापासून एक मुलगा तयार करते. तो मुलगा पाहाऱ्यावर थांबतो. थोड्यावेळाने पुन्हा महादेव येतात,मुलगा त्यांना अडवतो, महादेव त्याला बाजूला व्हायला सांगतात मुलगा ऐकत नाही, महादेव संतापून त्याचे त्रिशूळाने डोके उडवतात, पार्वती अंघोळ करून बाहेर येते आणि आपल्या मुलाचे तुटलेले डोके पाहून विलाप करू लागते. तेव्ह महादेवांना कळते की हा आपलाच पुत्र आहे . आणि ते आपल्या सेवकांना (गणांना)आज्ञा देतात कि याला एक शीर घेऊन या. गं जातात आणि मानवी शीर मिळत नाही म्हणून हत्तीच शीर घेऊन येतात. त्यानंतर सर्व देव मिळून ते शीर त्या मुलाला बसवतात. तोच गणपती .
आक्षेप:-
१) एक अक्खा मुलगा तयार होईल इतका मळ माणसाच्या अंगावर साचतो का?त्यासाठी किती महिने पारोसे राहावे लागेल?
२) महादेवना स्वतःचा मुलागाच ओळखु येत नाही तर त्यांना त्रिकाल ज्ञानी कसे म्हणावे?
३)कितीही छोटा हत्ती असला तरी त्याचे डोके मुलाला कसे बसेल?
४) जर डोके हत्तीचे असेल तर मेंदूसुद्धा हत्तीचाच असेल मग असा देव(?) बुद्धीची देवता कसा ?

खंडन :-
मुळात ही कथा जिवशास्त्राची नाही. ही कथा अध्यात्मिक रूपक आहे.म्हणजे अध्यात्मिक बोध समजेल अशा भाषेत सांगणे. अगदी इसापनीती किंवा पंचतंत्रातील गोष्टीप्रमाणे जसे त्याच्यात अतिशोयोक्ती असते जसे प्राणी आणि पक्षी बोलतात (जे कि वास्तवात अशक्य आहे.) ह्या गोष्टी स्वतः ला बुद्धिवादी म्हणवणारे देखील सांगतात . कारण गोष्ट काय आहे यापेक्षा बोध महत्वाचा !
आता गणेश जन्म कथेचा अध्यात्मिक बोध :-
पार्वती म्हणजे बुद्धी. पार्वती आंघोळीला निघाली म्हणजे बुद्धी शुद्ध व्हायला निघाली(ज्याला आत्मज्ञान म्हणतात.)
आणि ती पाहाऱ्यावर नंदीला म्हणजे मनाला ठेवते (नंदी मनाचे प्रतीक ) आणि तेथे शिव येतात शिव म्हणजे शुभ विचारांचे प्रतीक. मन कधीही शुभ विचारांना अडावू शकत नाही. म्हणून बुद्धी स्वतः च्या मळापासून म्हणजे अहंकारापासून मुलगा बनवते म्हणजे त्याला मूर्त स्वरूप देते,आणि पाहाऱ्यावर ठेवते. कारण अहंकार चांगल्या विचारांना अडवू शकतो. आणि अहंकाराने अडवल्यावर शुभ विचार त्याचे शीर उडवतात. म्हणजे अहंकाराची ओळख मिटवतातत. आणि हत्तीचे शीर लावतात. हत्ती म्हणजे गज. हत्तीच का ?तर लांब नाक दुरदृष्टी. बारीक डोळे तीक्ष्ण नजर सुपासारखे कान म्हणजे वाईट बाहेर टाकून चांगले आत ठेवणे. हे सर्व गुण फक्त गजमुखातच असतात आणि हे सर्व गुण बुद्धिमान माणसात असतातच. म्हणून गणेश बुद्धीची देवता आहे.

🚩⚜️🚩🔆🕉🔆🚩⚜️🚩

म्हातोबा मंदिर हिंजवडी

🚩⚜️🚩🔆🕉🔆🚩⚜️🚩

⚜🌺🔆🌸👣🌸🔆🌺⚜

ज्येष्ठा गौरी कनिष्ठा गौरी

🌻 आनंदी पहाट अनुराधा नक्षत्री गौरी आवाहनाची🌻

🔆ॐ गं गणपतये नमः🔆

भक्तीचे ते वर्म जयाचिये हाती ।
तया घरी शांती क्षमा दया ॥
अष्ट महासिद्धि वोळंगती व्दारी ।
न वजती दूsरी दवडिता ॥
तुका म्हणे त्याचा देव सर्व भार ।
चालवी कामार होवोनिया ॥  

    भारतीय संस्कृतीने समाजात आणि देशात एकात्मता टिकविण्यासाठी परंपरागत सणवार बहाल केलेत. हे सण भक्तीभावाने संपन्न होतात. सणवार आमचा जीवनाचा अविभाज्य भागच झालाय. गणेशोत्सवातील आजचा दिवस तर भक्तांचा आनंद व्दिगुणीत करणारा. वर्षभर भक्त ज्यांची वाट बघत असतात त्या गौरी.. महालक्ष्मी आज घरी येणार.
    संत तुकोबा म्हणतात तशी भक्तांच्या आनंदाची तजवीज परमेश्वर करतोच. वरुण राजा कृपेने राने.. वने.. शेती संतृप्त  झालीय. चराचरात प्रत्येक जीवाची क्षुधा शांतीची सोय झालीय. रंगीबेरंगी फुला.. फळांनी बागा बहरल्यात. या संतृप्तीचा आनंद मानवी मनालाही झालाय.  
    आज घरातील ज्या मुली सासरी गेल्या आहेत, त्या मुली या भक्ती सणासाठी विशेष निमंत्रीत असतात. मग त्यांना सासरहून आणायला भाऊराया घुंगराची गाडी घेऊन जातो. त्यामुळे बहिणींना आनंदाचे भरते आलेय. त्याना नविन साड्या नेसून मैत्रीणींसह या सणाचा आनंद लुटता येणार म्हणून त्यांनाही आनंद होतोय.
    मूर्ती मग कोणत्याही प्रकारची असो त्याकडे भक्तीभावाने बघितले की देवत्वाचा लाभ होतो. आम्ही सगुण भक्तीचे उपासक. पिढ्यानपिढ्या घरोघरी हे गौरी.. महालक्ष्मी पूजन होत आहे. हे पूजन म्हणजे हर्षोल्हासी मनाचे.. समृद्धीचे प्रतिक. कुठे खड्यांच्या गौरी तर कुठे उभ्या महालक्ष्मी. नावे प्रांतवार वेगवेगळी, पण भक्ती भाव तोच. गौरींच्या पूजनात कोणतीच उणीव नसते. सजावट.. गौरींसाठी भरजरी साड्या.. अलंकार.. हार.. गजरे आणि गौरींचे आवडते पदार्थ.. अशी सगळी हौस भागविणार.
    गौरींचे मुखवटे बाहेरून कूंकूम पाऊल खुणासह, कुठे दाराबाहेरुन.. नदीवरुन तर कुठे समुद्रापासून वाजत गाजत आणत मिरवून घरभर फिरवले जाणार. या सोन्याच्या पाउलांनी येणाऱ्या गौरींच्या कृपेने घरात सुख.. मनःशांती.. समाधान.. ऐश्वर्य नांदो गृहिणींना अखंड सौभाग्य लाभो ही धारणा.   
    ॐ महालक्ष्मी नमो नमः
    ॐ विश्व जनन्या नमो नमः

🌺☘🌸🌿👣🌿🌸☘🌺
गौरी गणपती

बंधु येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला
गाडी घुंगराची येईल न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला

सण वर्साचा हा गौरी गणपती
सण वर्साचा गणपती
इथ येईल आनंदाला भरती
येई आनंदाला भरती
साडी चोळी नवी ओ ओ ओ ओ
साडी चोळी नवी नेसुन मिरवायाला
गौरी गणपतीच्या सणाला
बंधु येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला

तिथ जमतील लाडक्या मैतरणी
माझ्या लाडक्या मैतरणी
घेर धरतील भवती साऱ्या जनी
घेर धरतील साऱ्या जनी
मला विनवणी करतील नाचायला
गौरी गणपतीच्या सणाला
बंधु येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला

माहेरी जाया घूमत मन पाखरु
हे घूमत मन पाखरु
आय बापाची ओढ कशी आवरु
मी ओढ कशी आवरु
गोड कौतिक करउनी घ्यायला
गौरी गणपतीच्या सणाला
बंधु येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला
गाडी घुंगराची येईल न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला

गीत : विलास जैतापकर ✍
संगीत : अरविंद -निर्मल
स्वर : माधुरी कर्माकर

☘🌺🔆🌸👣🌸🔆🌺☘

चल ग सई चल ग बाई
गौराई आल्यात सोन्याच्या पायी

गौराई तुमची पुण्याई मोठी
चढून यावं अंगण ओटी
तुमच्या सांगाती लक्ष्मी येई

गौराई तुमचे पाऊलठसे
घरात दारात उठले कसे
सुखाची बरसात अवघ्या ठायी

गौराई कोठीत पाऊल ठेवा
धान्यानं कुणगा भरून जावा
धनाला आता कमती नाही

सैपाकघरात गौराई बसा
चुलीला द्यावा अन्नाचा वसा
सुखाचा घास मुखात जाई

हातात चुडा कपाळी कुंकू
तुमच्या कृपेनं काळाला जिंकू
झुकते पायी,ठेवते डोई

गीत : शांता शेळके ✍
संगीत : बाळ पळसुले
स्वर : आशा भोसले
चित्रपट : सासुरवाशीण (१९७८)

🎼🎶🎼🎶🎼 🎧

डोळ्यातला गणपती

दिवस गणपतींचे – कोकणातले

आशुतोष बापट
गणपती उत्सव सगळीकडे मोठ्या दणक्यात साजरा होत असला तरी कोकणातले गणपतींचे दिवस हे जगात कुठेही दुसरीकडे अनुभवता येणार नाहीत. भले हा अभिमान वाटेल, गर्व वाटेल, काहीही वाटू देत पण कोकणात जर गणपतीच्या दिवसात राहायची संधी मिळाली तर आयुष्य १० वर्षांनी तरी नक्की वाढतं.

मधु मंगेश कर्णिक याबद्दल म्हणतात की, “आमच्या मुलखात गणपतीचे दिवस म्हणजे मंतरलेले दिवस, या दिवसांना एक वेगळे रूप असते. या दिवसांना सुवास असतो; नाद असतो, रंग असतो. मळ्यामळ्यांतून हळवी भाते पिकू लागतात त्यांच्या केसरांचा सुगंध दशदिशांत भरून राहिलेला असतो. रात्र होताच टाळमृदुंगाच्या गजरात ‘अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र’ सुरू होते नि सारी रात्र त्या नादात डोलत राहते. हिरवीगार शेते, हिरवेपिवळे माळ, स्फटिकासारखे प्रवाह, लाल-पांढरी आणि निळी-पिवळी फुले, यांनी वातावरण गजबजून जाते, मग हलकेच ‘गणेशचतुर्थी’चा दिवस उजाडतो, ‘सुखकर्त्या’ मोरयाच्या आगमना बरोबर सगळीकडे जादू पसरू लागते आणि दिवस ‘मंतरलेले’ होतात. माणसांना भूल पडते आणि त्यांना भुकेचा विसर पडतो. माणसे एका तंद्रीतून वावरू लागतात. आरत्या आणि भजने, अभंग आणि गवळणी, टाळ आणि मृदुंग, आवाज आणि आलाप याशिवाय त्यांना काही सुचत नाही की समजत नाही.”
🌿☘️🍀💐🌸🌼🌺🌿☘️🍀🌼🌸💐🌿☘️🍀
गणपती उत्सव हा काही फक्त माणसांसाठी उत्साहाचा असतो असं नाही तर निसर्ग सुद्धा या दिवसात एकदम जोरात असतो. भरपूर हिरवाई, असंख्य फुलं, आणि सर्वत्र फक्त उत्साह आणि उत्साह भरलेला जाणवतो. सगळ्या जगातून कोकणी मंडळी या दिवसात गावी आलेली…. घरीदारी नुसती धमाल…. गणपतीची सजावट..मग ती मंडपी सजवणे..गणपतीची पूजा…खिरापत…घरोघरी जाऊन दणक्यात केलेल्या आरत्या…गावात यष्टी जिथे थांबते तिथल्या हाटलात चाय चिवडा खाता खाता केलेल्या गजाली…. नातलगांच्या जुन्या घरी दिलेल्या भेटी…त्यांची ती चौसोपी घरे…नक्षीदार खिडक्या…सगळं सगळं वातावरण नुसतं आनंदाचं झालेलं असतंय. आमच्या गावी तर मोबाईलला अजिबात रेंज नाही त्यामुळे ते एकदा घरी गेल्यावर बंद करून ठेऊन द्यायचे की गाव उंडारायला आपण मोकळे. हिरवीगार भातशेती…माडाची झाडे…गावदेवीचे सुंदर देऊळ…त्या देवळात मारलेल्या गप्पा….शेजारच्याच गावी निर्मनुष्य रस्त्यावरून चालत जाणे…मधेच लाल परी येऊन जाणारी…. खरोखर स्वर्ग अनुभवायचा असेल तर गणपतीत कोकणात जावे….नातलग…सगे…सोयरे…यांच्या सोबत बाप्पाचे गुणगान करावे….वर्षभराची उर्जा घेऊन परत यावे…..एक वर्ष कसे सरते समजतच नाही….परत वेध लागतातच कोकणात जायचे……कोकणातले गणपतीचे दिवस हे अक्षरशः स्वर्गीय दिवस….. ते अनुभवण्याचे सुख ज्यांच्या नशिबी आहे त्यांनी बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून कोकणात जावे….गणपतीच्या दिवसात सगळे विसरून जावे….प्रचंड उर्जा आणि आनंद घेऊन घरी परतावे..!!!
साभार👇
©•••• Ashutosh Bapat

संतांचा मेळा

काय रे गणपती बाप्पा

काय रे गजानना?
आता कुठं आरत्यांचा क्रम नक्की व्हायला लागला होता…
आता कुठं ओवाळू आरत्या नंतर चंद्रभागे मधे सोडोनीया देती जमायला लागलं होतं..
आता कुठं आरतीच्या वेळेत घरी पोचायची सवय लागत होती..
एरव्ही स्वयंपाकघर न सोडणाऱ्या घरच्या बायका आरतीच्या निमित्तानं लवकर आवरून बाहेर यायला लागल्या होत्या…
रिमोट साठी भांडणाऱ्या आमचं टिव्ही बंद करून तुझ्या समोर बसण्यावर एकमत व्हायला लागलं होतं…
भाजीच्या पेंढीला न लागणारे हात दूर्वा निवडायला शिकत होते….
साधं दूध आणायला रखडणारे पाय प्रसादाला काय आणू म्हणत धावायला लागले होते.. आणि एवढ्यात ?
एवढ्यात हा दिवस आणलास पण?
काल तर आलास आणि आज निघालास पण?
कठोर पणाने सृष्टीचे नियम शिकवणारा तू आदिगुरू
जिथं सृजन आहे तिथं विसर्जन अपरिहार्य असते असं म्हणत निघालास. पण गजानना जाताना एवढं कर
फक्त तुझ्या च नाही तर कुणाही अतिथीच्या येण्यानं सुखावणारं आणि विरहानं कातर होणारं साधं सरळ मन दे‌.
भाजी भाकरी असो वा पुरणपोळी सारख्याच आनंदाने खाण्याची स्थीर बुद्धी दे
प्रत्येकाच घर आणि ताट भरलेलं असू दे.
आणि त्या भरल्या ताटातलं पोटात जाण्याची सहजता दे.
लोकांचं दुःख कळण्याची संवेदना दे
अडचणीला धावून जाणारे तुझे पाय दे
अपराध क्षमा करून पोटात घेणारे तुझे लंबोदर दे
सूक्ष्मदृष्टीने पाहणारे बारीक डोळे दे
सार स्विकारून फोल नाकारणारे सुपासारखे कान दे
भलंबुरं लांबूनच ओळखणारी सोंड दे
शत्रूला न मारता त्याला आपला दास करणारा पराक्रम दे
सगळ्यात महत्त्वाचं सर्वांचं मंगल करणारी बुद्धी दे
बहुत काय मागू गणेशा? त्या खुस्रो च्या शब्दात बदल करून मागतो अपनी सी रंग दिजो मोसे नैना मिलायके….
श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः

उत्साही महिला

ज्याक्षणी या शरीरात अडकणं संपेल
तो क्षणच अनंत – चतुर्दशी !

जेंव्हा अहम् आणि त्वम् एकजीव
होतील तीच अनंत – चतुर्दशी !

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण
बाप्पासारखा काही दिवसांचा
कोणी दीड, कोणी पाच
तर कोणी दहा दिवसांचा…

थोडा वेळ आहोत इथे
तर थोड जगुन घेऊया
बाप्पा सारखे थोडे
लाडु मोदक खाऊन घेऊया…

इथे सर्वच आहेत भक्त आणि
सगळ्यांमध्ये आहे बाप्पा
थोडा वेळ घालवू सोबत
आणि मारु थोड्या गप्पा…

मनामनातले भेद मिटतील
मिटतील सारे वाद
एक होईल माणुस
आणि साधेल सुसंवाद…

जातील निघुन सारेच
कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला
ना चुकेल हा फेरा
जन्माला आलेल्या कोणाला…

बाप्पा सारखं नाचत यायचे
आणि लळा लावुन जायचे
दहा दिवसांचे पाहूणे आपण
असे समजून जगायचे…

किंमत तुमची असेलही
तुमच्या प्रियजनांना लाख
आठवणी ठेवतील जवळ
अन् विसर्जित करतील तुमची राख…

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण
दीड दिवस अन् दहा दिवसाचा
हे जगणे म्हणजे एक उत्सव
हा काळ दोन घडींच्या सहवासाचा………….

🌹🌹🌹🙏🏻🙏🏻

भाज्यांमधले गणपती

विसर्जन मिरवणूक – १२८वर्षाचा थोडक्यात इतिहास

गणपती विसर्जन मिरवणूकीची सुरूवात १८९३ मध्ये उत्सव सुरू झाला त्याच वर्षी झाली.त्या वर्षी बुधवार पेठेतील कोतवाल चावडी मधील लकडे सुगंधी यांच्या दुकानात बैठक होऊन मिरवणूक सामुदायिकरित्या अनंत चतुर्दशीला काढण्याचे ठरले.त्यात फक्त तीनच सार्वजनिक गणपती होते.
बैठकीला कै.लकडे, कै.गणपतराव सोहोनी, कै.गणपतराव घोटवडेकर, कै.भाऊ रंगारी इ.मंडळी उपस्थित लो.टिळकांसारखा खंबीर महापुरुष या उत्सवामागे असल्याने १८९४ मध्ये शंभरच्या पुढे सार्वजनिक गणपती. स्वतः टिळकांनी विंचूरकर वाड्यात उत्सव चालू केला. परंतु या वर्षी नऊ दिवस व्यवस्थित पार पडले व अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी रात्री दारुवाला पुलाजवळ मोठी दंगल होऊन त्यात एकाचा मृत्यू व तणाव. दुसऱ्या दिवशी मिरवणूक निघते की नाही अशी परिस्थिती. सुरुवातीपासूनच समाजातील काही लोकांचा आणि अधिकाऱ्यांचा विरोध. परंतु त्यास न जुमानता तेव्हाचे कलेक्टर श्री ओम्यानी यांनी मिरवणूकीस परवानगी दिली आणि रे मार्केट (म.फुले मंडई) येथे गणपती जमण्यास सुरूवात. परंतु मिरवणूकीत कोणी अग्रभागी राहायचे याबद्दल वाद तेव्हा ब्रह्मगिरीबुवा,लो.टिळक व अण्णासाहेब पटवर्धन यांनी ग्रामदैवत श्री कसबा गणपतीला अग्रक्रम व त्या पाठोपाठ श्री जोगेश्वरी,गुरूजी तालीम,तुळशीबाग,केसरीवाडा हे पहिले पाच तर भाऊ रंगारी,अखिल मंडई आणि श्रीमंत दगडूशेठ हे शेवटचे तीन असा क्रम ठरवून दिला तो आजतागायत चालू आहे पुढे १८९६ पासून १९०८ पर्यंत प्लेगचे सावट परंतु उत्सवावर त्याचा फारसा परिणाम नाही फक्त १९०० मध्ये प्लेग व दुष्काळ यामुळे गणपतींची संख्या कमी पण उत्सव थांबला नाही. १९०८ मध्ये लो.टिळकांना शिक्षा त्यामुळे देशभक्ती व जनजागृतीचे उत्सवात दर्शन व सरकारचे निर्बंध १९१२मध्ये तर जाहिरनामा उत्सवात देवांखेरीज इतर नावांचा उच्चारही न करणे आणि राजद्रोही लोकांचे फोटो न लावणे, सरकारी नोकर,विद्यार्थी,शिक्षक यांनी उत्सवात भाग न घेणे इ. १९१६मध्ये पाऊस व प्लेग यांचा पुन्हा उपद्रव.
१आॕगस्ट १९२० रोजी लो. टिळकांचा मृत्यू झाला. परंतु उत्सव नेहमीप्रमाणे. हिंदूंनी ताबूतापुढेही मेळे केले. दोन्ही धर्माचे लोक दोन्ही उत्सवात सहभागी झाले. १९२२ मध्ये तर गणपती व ताबूत शेजारी शेजारीच. १९२८ मध्ये भाद्रपद अधिक आल्याने काही लोकांनी नवीन तर काहींनी जुन्या पंचागाप्रमाणे असे दोन उत्सव अर्थात मिरवणूकाही दोन ( २९ ऑगस्ट व २८ सप्टेंबर ) एकात कसबा तर दुसऱ्यात जोगेश्वरी अग्रभागी.
१९४२ मध्ये कायदेभंगाची चळवळ व उत्सवावर बंधने, मिरवणूकीवर बंदी,संचारबंदी त्यामुळे गणपतीची उत्तरपूजा करून मिरवणूकीला परवानगी मिळेपर्यंत मूर्ती जागेवरून न हलवण्याचा सर्वानुमते निर्णय. प्रदीर्घ काळ वाट बघून शिवरामपंत केळकर यांनी रास्ता पेठ गणपतीची कोजागिरीला (२३आॕक्टो) दु.१ वा. मिरवणूक काढली.मंडईजवळ मिरवणूक अडवून धर्मवीर विश्वासराव डावरे आणि न.चिं.केळकर यांना अटक. अखेर ३नोव्हेंबर रोजी तब्बल चाळीस दिवसांनी मिरवणूकीस परवानगी मिळून ती निर्विघ्नपणे पार पडली.
१९४७मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याने आपोआपच गणपती मंडळांची संख्या ३००पर्यंत वाढली.१९४८ मध्ये गणेशोत्सवाच्या काळातच हैद्राबाद विलीनीकरणाची कारवाई आणि मिरवणूकीच्या दिवशीच निजामाच्या शरणागतीची बातमी त्यामुळे मिरवणूकीत आनंदोत्सव. १९५१ ते १९६० हा खरा गणेशोत्सवाचा सुवर्णकाळ या काळात मंडळ वाढून मिरवणूक लांबण्यास सुरूवात. १९६० मध्ये प्रथमच मिरवणूक मध्यरात्रीपर्यंत आणि त्याच वर्षी पानशेतच्या पुराने पुण्यात थैमान घातलेले पण त्याचा उत्सवावर फारसा परिणाम झाला नाही हे विशेष. १९६४ साली नवीन प्रथा मिरवणूकीच्या अग्रभागी सुमित्रा हत्तीण येऊ लागली ती प्रथम गजाननाला सोंड उंचवून मुजरा करे व मिरवणूकीला सुरुवात होई. तीच्या पाठीवर अंबारी त्यात छत्रपती शिवराय व लो.टिळकांचा फोटो व भगवा ध्वज असे. १९७१ मध्ये सुमित्रा थकल्याने तीची जागा अनारकली या हत्तीणीने घेतली पुढे बरीच वर्षे सेवा दिली त्यामुळे श्री कसबा गणपती मंडळाने पुढाकार घेऊन पुणेकरांतर्फे अनारकली हत्तीणीचा भव्य एकसष्टी समारंभ करून कृतज्ञता व्यक्त केली. १९८९मध्ये पायाच्या दुखण्यामुळे अनारकली मिरवणूकीत सामिल न होता फक्त गजाननास मुजरा करून निघून गेली व तेव्हापासून मिरवणूकीत तीची अनुपस्थिती. १९६५ मध्ये युद्ध आणि दंगल यामुळे थोडी बिकट परिस्थिती ३० आॕगस्टला गणपती बसले आणि १ सप्टेंबरला शेख हसन महंमद ऊर्फ हल्या याने मंडई गणपतीची विटंबना केली व पुण्यात दंगल कर्फ्यु. काही ठिकाणी गोळीबार. मात्र मिरवणूक ९ सप्टेंबरला सकाळी ८ वा. सुरु होऊन चोख बंदोबस्तात दुपारी ४.१५ वा.संपली. १९६८ मध्ये मिरवणूक लवकर संपावी म्हणून सकाळी ११.१५ वा.सुरू झाली परंतु संपली मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१५ ला.
१९८० मध्ये श्री कसबा गणपती मंडळाने प्रथमच मिरवणूकीत गुलालाचा वापर बंद करून अष्टगंधाचा टिळा लावून पुणे शहरात एक आदर्श निर्माण केला त्याचे अनुकरण अनेक मंडळांनी केले व मिरवणूकीत महिलांच्या सहभागाला सुरूवात झाली. १९८३ पासून श्री कसबा गणपती चांदीच्या पालखीत विराजमान झाल्याने दर्शनाला अजूनच झुंबड उडाली. त्याचप्रमाणे १९८५ पासून श्री कसबा गणपती मंडळाने पालखी प्रत्येक चौकात येण्याच्या वेळा निश्चित करून शिस्तबद्ध मिरवणूकीचा अजून एक पायंडा ठेवला. १९८८-८९ पासून मिरवणूकीत महिलांचा सहभाग वाढू लागला व मिरवणूकीला अजून शोभा आली. १९९२ हे तर शताब्दी वर्ष असल्याने सगळीच मिरवणूक शोभिवंत. परंतु १९९३ हे त्वष्टा कासार समाजाचे शताब्दी वर्ष उत्सवाच्या काही दिवस आधीच एक दुःखद घटना घडली ती म्हणजे त्यांच्या मंडपास आग लागून मंडप जळून खाक परंतु मा.काका वडकेंच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी पुन्हा सगळं जिद्दीने उभं केल हे नमूद करण्यासारखे आहे.
१९९८ पासून मिरवणूकीत ध्वनिवर्धकांच्या भिंती व हळूहळू डीजे चा धमाका वाढून ध्वनिप्रदूषणाने कळस गाठला.२००४ पासून मिरवणूकीतही जाहिरात,प्रायोजकांचा प्रवेश वाढू लागला. २००६ च्या मिरवणूकीवर “वंदेमातरम् ” च्या शताब्दीचा प्रभाव. २००९ला स्वाईन फ्लू ची दहशत असल्याने शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग नसलेली कित्येक वर्षानंतरची ही मिरवणूक होती. २०१० च्या मिरवणूकीत मोबाईलचा मोठा प्रभाव.
मिरवणूकीत शिस्तबद्धपणा आणण्यासाठी ज्ञानप्रबोधीनीने लेझीम,ढोलपथक,ध्वजपथक आणले त्यापाठोपाठ गरवारे प्रशाला,रमणबाग प्रशाला इ.शाळांनी पथके उभी केली परंतु नंतर खेड्यापाड्यातून आणि निरनिराळ्या संस्थेने ढोल पथक उभी करून फारच स्पर्धा उभी केली. मिरवणूकीचे वैशिष्ट्य म्हणजे २००५ मध्ये मिरवणूक ३३तास २०मिनिट चालली आणि कोवीड १९ मुळे यंदा २०२० मध्ये मिरवणूक रद्दच करण्यात आली. दुसरी गोष्ट म्हणजे मिरवणूकीत सामिल होण्यासाठी प्रभात बँडला न.चि.केळकर यांनी फक्त एक रुपया दिला होता तर मधल्या काळात ही प्रथा बंद पडलेली ती चालू करण्यास आम्ही श्री कसबा गणपती मंडळाकडून कै.बंडोपंत सोलापूरकर यांच्याशी बोलून १९७५ मध्ये फक्त ५१ रुपयात मिरवणूकीत सामिल होण्याचे तसेच कै.प्रभाशंकर गायकवाड व सुभाष देवळणकर यांना १०१ रुपयात दहा दिवस सेवा व मिरवणूकीत सहभागाचे निमंत्रण दिले त्यांनीही मोठेपणाने त्याचा स्विकार केला. नुकतेच २०१५ मध्ये गणपती मूर्ती चे विसर्जन प्रदुषणाचा विचार करून नदीपात्रात न करता म.न.पा. ने तयार केलेल्या स्वच्छ पाण्याच्या हौदात करण्याचा श्री कसबा गणपती मंडळाने ऐतिहासिक निर्णय घेतला त्याला अनेक मंडळांनी पाठिंबा देऊन अनुकरणही केले.
एकूणच आजपर्यंतचा मिरवणूकीचा इतिहास थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न केला…मुरलीधर देशपांडे कसबा गणपती पुणे
ह्याचे लेखक मुरलीधर देशपांडे हे कसबा गणपती देवस्थानचे एक विश्वस्त आहेत. एक उत्कृष्ठ विज्ञान शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते आहेत .

निरनिरीळ्या राज्यांच्या नावातले गणेश
मानवी तोंडाचा गणपती

वैश्विक गणेश उपासना.

Amazing facts of GANESHA : T.R. Arora

Did you know there are 250 temples of Ganesha in Japan.
In Japan, Ganesha is known as ‘Kangiten’, the God of fortune and the harbinger of happiness, prosperity and good.
An Oxford publication claims that Ganesha was worshipped in the early days in Central Asia and other parts of the globe.
Ganesha statues have been found in Afghanistan, Iran, Myanmar, Sri Lanka, Nepal, Thailand, Laos, Cambodia, Vietnam, China, Mongolia, Japan, Indonesia, Brunei, Bulgaria, Mexico and other Latin American countries.
It means the cult of Ganesha was prevelant all over the world in ancient times.
Ganesha in Europe, Canada and the USA
Ganesha’s idol and paintings are exhibited in all the important museums and art galleries of all the European countries especially in the UK, Germany, France and Switzerland.
Ganesha idols and paintings(as goodluck charm) are also present in thousands of houses/offices of successful business/writers/artists in all the European countries and in Canada and the USA. Recently a figure of Ganesha was unearthed in a village near Sofia, Bulgaria. Like Indians, the Romans worshipped Ganesha before any work was begun.
Irish believe in Ganesha luck.
The embassy of Ireland at New Delhi became the first European embassy to invoke the blessings of Ganesha by installing a statue of Ganesha at the main entrance of the embassy.
*Silicon Valley in USA selects Ganesha as the presiding Deity of cyberspace technology *
“Ganesha is the God of knowledge and Ganesha’s vehicle is the mouse and, as you know, for software engineers the mouse is the vehicle that they use to take their ideas and innovations from one place to the other.” Hence it was decided by the computer industry association to select Ganesha as the presiding Deity of Silicon Valley.
Ganesha on Greek coin.
Early images of an elephant headed Deity, including those on an Indo-Greek coin and elsewhere, dating between the first and third centuries BC, represent Ganesha as the demi God Vinayaka.
Indonesia Currency notes.
One of the Indonesian currency notes carries the picture of Ganesha.
Vedic origin of Ganesha.
10,000 year old secret of success.
Devotees of Ganesha make reference to his Vedic origin which is around 10,000 years old to push his antecedents back in time. The Vedas have invoked him as ‘namo Ganebhyo Ganapati’ (Yajurveda, 16/25), or remover of obstacles, Ganapati, we salute you. The Mahabharata has elaborated on his personal appearance and Upanishads on his immense power. “Scholars say artifacts from excavations in Luristan and Harappa and an old Indo-Greek coin from Hermaeus, present images that remarkably resemble Ganesha”. (“Robert Brown in his Book “Ganesha: Studies of an Asian God”:State University of New York Albany).


हसणारे बुद्ध आणि लंबोदर गणपती यातील साम्य

वंदे मातरम्

भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे होत आहेत या निमित्याने देशभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. या दिवशी घर घर तिरंगा अशी घोषणा दिली गेली आहे. तिरंगा झेंडा आणि वंदे मातरम् हे गीत या दोन्हींना देशाच्या दृष्टीने खूप महत्व आहे.

वंदे मातरम् या गीतासंबंधी उपयुक्त माहिती श्रीमती अलका विभास यांनी संग्रहित करून फेसबुकवर दिली आहे. त्यांचे मनःपूर्वक आभार मानून मी ती माहिती खाली देत आहे. याशिवाय या गीताचे बोल हिंदी, बांगला या भाषेत आणि त्यांचा इंग्लिश व मराठी भाषेत अर्थ वगैरे माहितीसुद्धा खाली दिली आहे.


वन्दे मातरम्‌
सुजलाम्‌ सुफलाम्‌ मलयजशीतलाम्‌
सस्यश्यामलाम्‌ मातरम्‌

  • बंकिम चन्‍द्र चट्टोपाध्याय
    बंगाली भाषेचा विचार करता, ‘बन्दे मातरम्‌’ असे असायाला हवे. कारण बंगाली लिपीत ‘व’ हे अक्षर नाही. श्री. बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय यांनी हे पद बंगाली लिपीत लिहिले. देवनागरीत लिपीत हे पद आणताना ‘बन्दे’ या शब्दास संस्कृत अथवा हिंदीत काहीच अर्थ नसल्याने, त्याचे ‘वन्दे’ असे संस्करण करण्यात आले.
    ठळक –
    • ७ नोव्हेंबर १८७६ रोजी श्री. बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय यांनी ‘वन्दे मातरम्‌’ या पदाची रचना केली.
    • १८८२ मध्ये श्री. बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय लिखित ‘आनन्दमठ’ या कादंबरीत या पदाचा सामावेश करण्यात आला.
    • १८९६ मध्ये गुरुदेव श्री. रबीन्द्रनाथ ठाकुर (टागोर) यांनी ‘वन्दे मातरम्‌’ला बंगाली शैली, लय आणि संगीतात बद्ध करून कलकत्ता येथील कॉंग्रेसच्या अधिवेशनात गायले.
    • हे पद संस्कृत-बाँग्ला मिश्र भाषेत आहे.
    • ‘वन्दे मातरम्‌’चा इंग्रजीत अनुवाद सर्वात प्रथम श्री. अरविंद घोष यांनी केला.
    • वंग-भंग आंदोलात ‘वन्दे मातरम्‌’ हे घोषवाक्य / प्रेरणागीत झाले होते.
    • १९०६ मध्ये ‘वन्दे मातरम्‌’ देवनागरी लिपीत प्रस्तुत करण्यात आले व कलकत्ता येथील कॉंग्रेसच्या अधिवेशनात गुरुदेव रबीन्द्रनाथ ठाकुर (टागोर) यांनी ते संशोधित रूपात सादर केले.
    • १९२३ च्या कॉंग्रेसच्या अधिवेशनात ‘वन्दे मातरम्‌’ या पदाच्या विरोधात सूर उठले.
    • १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री संविधान सभेची बैठक ‘वन्दे मातरम्‌’ने सुरू होऊन ‘जन गण मन’ने समाप्त करण्यात आली.
    • ‘वन्दे मातरम्‌’ हे भारताचे ‘राष्ट्रीय गीत’ (National Song) आहे तर ‘जन गण मन’ हे भारताचे ‘राष्ट्रीय गान’ (National Anthem) आहे.
    भारताचा स्वातंत्र्य लढा १८५७ च्या सशस्‍त्र क्रांतीपासून सुरू झाला. ही क्रांती यशस्वी झाली नसली, तरी याने पेटवलेली स्वातंत्र्याची मशाल पुढे अखंडितपणे निरनिराळ्या रूपांत प्रकट होत राहिली. बंगाल, महाराष्ट्र आणि पंजाब हे सशस्‍त्र क्रांतीचे केंद्र बनले. परंतु ही क्रांती वैयक्तिक पातळीवर किवा छोट्या समूहापर्यंत मर्यादित होती. अठराशे सत्तरच्या दशकात एका वेगळ्या आंदोलनाची पार्श्वभूमी तयार झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या, म्हणजे १८८५ पूर्वीचा, तो काळ होता. इंग्रजांचे कुटिल कारस्थान आणि जुलमी राजवटीमुळे भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत होऊ लागली. अशा या वातावरणात ‘वन्‍दे मातरम्’ या गीताचा जन्म झाला.
    कलकत्ता विश्वविद्यालयाच्या स्थापनेनंतर, सुरुवातीच्या काळात श्री. बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय यांनी या विद्यापीठातून बी.ए.ची पदवी प्राप्त केली. इंग्रज सरकारने त्यांची नियुक्ती कलकत्त्याचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून केली. नंतर ते कलकत्त्याचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर झाले. बंकिम चन्‍द्र प्रखर देशभक्त होते. त्यांना मागील शतकातील संन्याशांचे बंड आणि १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध यांचे फार आकर्षण होते.
    १८५७ साली इंग्रज सरकारने ‘गॉड सेव्ह दी क्वीन’ हे ब्रिटिशांचे राष्ट्रगीत भारतात रुजू करण्याचा प्रयत्‍न केला. त्यांचे हे राष्ट्रगीत, भारताचेही राष्ट्रगीत आहे, अशी वातावरण निर्मिती करण्याकरिता कार्यक्रमात, सैन्यात आणि शाळांमध्ये त्यांनी हे गीत रुजवण्याचा प्रयत्‍न केला गेला. यामुळे बंकिम चन्‍द्र खूप संतप्त झाले. सन् १८७६ चा तो काळ होता. भारतीय लोक या ब्रिटिश राष्ट्रगीताचा तिरस्कार करीत होते. बंकिम चन्‍द्रांनी या विषयावर गहन विचार केला. त्यांच्या लक्षात आले की गेल्या हजार वर्षांच्या गुलामगिरीमुळे भारत हा कधीच अखंड असा देश नव्हता आणि भारताचे कोणतेही राष्ट्रगीत नव्हते. म्हणून १८७६ मध्ये ७ नोव्हेंबरला त्यांनी देशभक्तीच्या भावनांनी ओथंबलेले आणि भारत देशाला मातृभूमी असे संबोधित करून तिचे नमन करणारे ‘वन्दे मातरम्‌’ हे सहा कडव्यांचे गीत लिहिले. आपल्या मित्रांना हे गीत वाचून दाखवल्यावर ते म्हणाले की, हे भारतीयांचे खरे राष्ट्रगीत असले पाहिजे.
    बंकिम चन्‍द्रांनी मागील शतकातील ‘संन्याशांचे बंड’ या ऐतिहासिक घटनेवर आधारित ‘आनन्दमठ’ ही कादंबरी इ.स. १८८२ साली लिहिली. त्यांनी या कादंबरीत ‘वन्‍दे मातरम्’ हे गीत समाविष्ट केले. या कादंबरीत देशभक्त संन्यासी ‘वन्‍दे मातरम्’ हे गीत सामूहिकपणे गाताना दाखवले आहे.
    ‘आनन्दमठ’ या कादंबरीला अभूतपूर्व यश मिळाले. ही कादंबरी खूप लोकप्रिय झाली. त्यामुळे ‘वन्दे मातरम्’ हे देशभक्तीचे अप्रतिम गीत लोकांपर्यंत पोहोचले. १८९६ साली काँग्रेसच्या कलकत्ता येथील राष्ट्रीय अधिवेशनात गुरुदेव श्री. रबीन्द्रनाथ ठाकुर (टागोर) यांनी हे गीत गाऊन, संपूर्ण अधिवेशन राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावून टाकले. १९०५ मध्ये इंग्रज सरकारने या गीतावर बंदी आणली. तरीसुद्धा बनारस येथील काँग्रेस अधिवेशनात गुरुदेव श्री. रबीन्द्रनाथ ठाकुर (टागोर) यांची पुतणी श्रीमती सरलादेवी यांनी हे गीत गायले.
    १९०५ मध्ये इंग्रजांनी बंगालचे विभाजन केले. ही घटना बंग-भंग(वंग-भंग चळवळ) या नावाने इतिहासात नमूद आहे. बंग-भंगच्या विरोधात झालेल्या प्रचंड आंदोलनात ‘वन्‍दे मातरम्’ हे गीत प्रेरणादायी ठरले. हिंदू-मुस्लिम सर्वांनी गायन केले. सर्वांनी एकजुटीने केलेल्या या उग्र आंदोलनामुळे इंग्रज सरकार हादरले आणि त्यांना बंगालची फाळणी रद्द करावी लागली.
    १९०४ मध्ये मादाम कामा यांनी भारताच्या राष्ट्रीय झेंड्याची पहिली रूपरेषा तयार केली. या झेंड्यात वर हिरवा, मध्य भागात पिवळा आणि खाली केसरी रंग होता. वर हिरव्या रंगावर कमळाची आठ फुले काढली असून, खालच्या केसरी रंगावर सूर्य आणि चंद्राच्या आकृत्या काढल्या होत्या. मध्य भागातील पिवळ्या रंगावर ‘वन्दे मातरम्’ असे लिहिले. ‘वन्दे मातरम्’ हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतका प्रेरक बीज मंत्र होता. मादाम कामा यांनी याला नियोजित राष्ट्रीय ध्वजाच्या मध्य भागात ठळकपणे स्थान दिले. २२ ऑगस्‍त १९०७ रोजी त्यांनी ‘वन्दे मातरम्’ लिहिलेला हा ध्वज स्टुटगार्ट, जर्मनी येथे फडकविला. ब्रिटिश सरकारने ‘वन्दे मातरम्’वर घातलेल्या बंदीच्या निषेधार्थ त्यांनी पॅरिस, फ्रान्स येथून याच नावाचे नियतकालिक चालू केले होते.
    लाला लजपतराय यांनी त्या काळात लाहोरहून एक पाक्षिक काढले, त्याचे नाव होते ‘वन्दे मातरम्.’
    हिरालाल जैन यांनी १९०५ मध्ये भारतातील पहिला राजकीय चित्रपट बनवला व त्याचा शेवट ‘वन्दे मातरम्’ या गीताने केला.
    १९१५ पासून काँग्रेसच्या प्रत्येक राष्ट्रीय अधिवेशनात नियमितपणे आग्रहपूर्वक ‘वन्‍दे मातरम्’ गायन होऊ लागले. त्यावेळी ‘वन्‍दे मातरम्’ इस्लामविरोधी नव्हते की जातीयही नव्हते. हिदू-मुस्लिम सर्वजण सारखेच ‘वन्‍दे मातरम्’चा जयघोष करीत होते. अनेक क्रांतिकारक इंग्रजांचे अत्याचार सहन करत व ‘वन्‍दे मातरम्’चा घोष करत फासावर जात. स्वातंत्र्य आंदोलनात ‘वन्‍दे मातरम्’ हा अतिशय लोकप्रिय नारा होता. कोणत्याही मोर्चामध्ये ‘भारत माता की जय’ आणि ‘वन्‍दे मातरम्’ हे असायचेच.
    १९२१ मध्ये काँग्रेसने खिलाफत आंदोलनाला पाठिबा दिल्यानंतर मुस्लिम समाजातील धर्मांध व कट्टरतावादी लोकांचे महत्त्व वाढले. याबरोबरच ‘वन्‍दे मातरम्’ला इस्लामविरोधी आणि जातीय ठरवून त्याचा विरोध सुरू झाला. १९२३ मध्ये काकीनाडा येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात तत्कालीन अध्यक्ष महंमद अली यांनी ‘वन्दे मातरम्‌’ या गीतात मूर्तिपूजा असल्यामुळे, याला इस्लामविरोधी घोषित केले. मुस्लिमांच्या कट्टर व जातीय नेतृत्वापुढे झुकत काँग्रेसने आपल्या अधिवेशनात ‘वन्‍दे मातरम्’चे गायन करण्याचा आग्रह सोडून दिला.
    १९३७ मध्ये राष्ट्रीय अधिवेशनात काँग्रेसने प्रतिपादन केले की ‘वन्‍दे मातरम्’च्या सहा कडव्यांपैकी पहिल्या दोन कडव्यांमध्ये देशाला मातृभूमी म्हणत देशाच्या सृष्टिसौंदर्याचे वर्णन केले असल्यामुळे त्यात मूर्तिपूजेचा काहीही संबंध येत नाही. परंतु शेवटच्या चार कडव्यांमध्ये काही ठिकाणी मातृभूमीचे हिदूंची देवी दुर्गेच्या रूपात वर्णन केले आहे. म्हणून राष्ट्रीय काँग्रेसने ‘वन्दे मातरम्‌” गीताच्या पहिल्या दोन कडव्यांना ‘राष्ट्रीय गीत’ म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव ठेवला व तो मंजूर पण झाला.
    परंतु १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाल्यावर काँग्रेस प्रणीत भारत सरकारने फक्त ‘जन गण मन’ या गीतालाच ‘राष्ट्रीय गीत’ म्हणून घोषित केले. ही गोष्ट अनेक नेत्यांना पटली नाही. घटना समिती गठित झाल्यावर ‘वन्‍दे मातरम्’ ला राष्ट्रीय गीताचा दर्जा देण्यावर अनेकदा चर्चा झाली. अखेर घटना समितीचे अध्यक्ष देशभक्त डॉ. राजेन्द्र प्रसाद यांनी घटना लागू होण्याच्या दोन दिवसापूर्वी २४ जानेवारी १९५० ला घटना समितीत हा ठराव मान्य करवून घेतला. अशा प्रकारे ‘वन्दे मातरम्‌’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा मिळाला.
    (डॉ. राजेन्द्र प्रसाद यांनी संविधान सभेत केलेले वक्तव्य-
    “शब्दों व संगीत की वह रचना जिसे ‘जन गण मन’ से सम्बोधित किया जाता है, भारत का राष्ट्रीय गान है; बदलाव के ऐसे विषय, अवसर आने पर सरकार अधिकृत करे और ‘वन्दे मातरम्‌’ गीत, जिसने कि भारतीय स्वतन्त्रता संग्राम में ऐतिहासिक भूमिका निभायी है; को ‘जन गण मन’ के समकक्ष सम्मान व पद मिले। (हर्षध्वनि)। मैं आशा करता हूँ कि यह सदस्यों को सन्तुष्ट करेगा ।” (भारतीय संविधान परिषद, द्वादश खण्ड, २४-१-१९५०))
    (‘राष्ट्रीय गान’ (National Anthem)चे गायन भारत सरकारच्या सर्व अधिकृत कार्यक्रमांतून होणे अनिवार्य आहे. ‘राष्ट्रीय गीत’ (National Song) हे असे गीत आहे ज्याच्याशी जनमानसाची देशभक्तीची भावनिक नाळ जोडली आहे.)
    • ‘जन गण मन’ या राष्ट्रीय गानाची एकच धून असून, त्याप्रमाणेच याचे गायन होत असते.
    • परंतु ‘वन्‍दे मातरम्’च्या अनेक धून प्रचलित आहेत.
    • सर्वप्रथम १८८२ मध्ये ‘आनंदमठ’ या कादंबरीत ‘वन्‍दे मातरम्’ या गीताचा समावेश केल्यावर श्री. बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय यांनी त्या काळातील बंगाली नाट्य क्षेत्रातील लोकप्रिय संगीतकार जदुनाथ भट्टाचार्य यांच्याकडून ‘वन्दे मातरम्‌’ची चाल बसवून घेतली. ही चाल अनेक वर्षे प्रचलित होती.
    • विसाव्या शतकामध्ये या गीताच्या ज्या चाली प्रचलित झाल्या, त्यापैकी अनेक चाली भारतीय संगीताच्या रागांवर लावल्या गेल्या. काही चित्रपटांमध्ये निरनिराळ्या चालींवर हे गीत चित्रित केले गेले. यापैकी ‘आनंद मठ’, ‘लीडर’ आणि ‘अमर आशा’ या चित्रपटांच्या चाली लोकप्रिय झाल्या.
    • ‘आनंद मठ’ या चित्रपटात ‘वन्‍दे मातरम्’ हे गीत लता मंगेशकर यांनी एका प्रसंगात गायिले आहे. दुसर्‍या एका प्रसंगात हेमंतकुमार यांनी हे गीत गायिले आहे. या चित्रपटाचे संगीत हेमंत कुमार यांचे आहे.
    • लोकप्रिय संगीतज्ञ रविशंकर यांनी आकाशवाणीकरिता या गीताची जी चाल लावून दिली, ती पण खूप लोकप्रिय झाली.
    • १५ ऑगस्‍ट १९४७ रोजी सकाळी साडे सहा वाजता आकाशवाणी वरून ‘देस’ रागात निबद्ध ‘वन्दे मातरम्’ पंडित ओंकारनाथ ठाकुर गायन थेट प्रक्षेपित करण्यात आले होते. हे गायन त्यांनी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये या पदास संपूर्ण सन्मान देत, उभे राहून केले. पंडित ओंकारनाथ ठाकुर यांच्या या गायनाचा, ‘दि ग्रामोफोन कम्पनी ऑफ इंडिया’चा रेकॉर्ड क्रमांक आहे- STC 048 7102
    • १९९७ साली भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी लोकप्रिय संगीतकार ए. आर. रहमान यांनी ‘वन्दे मातरम्’ हे शीर्षक असलेला गीत संग्रह प्रकाशित केला. २००२ मध्ये बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसने जगातील ७००० गीते निवडून सर्वात लोकप्रिय अशा पहिल्या १० गीतांकरिता एक सर्वेक्षण केले. त्यात ए. आर. रहमानच्या ‘वन्दे मातरम्’ला जगात दुसर्‍या क्रमांकाचे स्थान लाभले.
    • २०१८ मधे सुप्रसिद्ध शास्‍त्रीय गायिका कल्याणी बोंद्रे यांनी ‘वन्दे मातरम्’ या गीताला नवीन चालीत बांधून हे गीत रसिकांसमोर आणले.
  • आंतरजालावरून संग्रहित
    टीप-
    ‘वन्दे मातरम्’ आणि मा. कृष्णराव
    संदर्भ लेख- मिलिंद सबनीस, प्रिया फुलंब्रीकर
    https://www.aathavanitli-gani.com/Song/Vande_Mataram
  • अलका विभास
    • लेखिका आणि फेसबुक यांचे मनःपूर्वक आभार

The National song of India Vande Mataram lyrics Original in Hindi (Full )
“वंदे मातरम, वंदे मातरम

सुजलाम सुफाम मलयज शीतला
शस्य श्यामलम मातरम वंदे
सुजलाम सुफाम मलयज शीतला
शस्य श्यामलम मातरम वंदे

वंदे मातरम, वंदे मातरम

शुभ ज्योत्सना पुलकित यामिनी
फुल्ल कुसुमिता ड्रमदल शोभिनी
शुभ ज्योत्सना पुलकित यामिनी
फुल्ल कुसुमिता ड्रमदुल शोभिनी
सुहासिनी सुमाधुर भाषिणी
सुखदम वर्दम मातरम्

वंदे मातरम, वंदे मातरम

सप्तकोटि कुंठ कल कल निनाद करले
दिसप्तकोटि भुजैरधूत खर करवाले
सप्तकोटि कुंठ कल कल निनाद करले
दिसप्तकोटि भुजैरधूत खर करवाले
अबला केनो मा एतो बाले
बाहुबल धारिणी नमामि तारिणी
रिपुडल वारिणी मातरम्

वंदे मातरम, वंदे मातरम

तुमि बिद्या तुमि धर्म
तुमि हरिदी तुमि मर्मा
तबं ही प्राण: सोरिरे।
बहुत तुमि मा शक्ति,
होदे तुमी मा भक्ति,
तोमराई प्रतिमा गाइ मंदिरे मंदिरे।

वंदे मातरम, वंदे मातरम

त्वं ही दुर्गा दशप्रहरणधारिणी,
कमला कमलादला विहारिणी
वाणी विद्यादायिनी, नमामि त्वम्:
नमामि कमलम अमलम अतुलम
सुजलम सुफलम मातरम्
श्यामलम सरलम सुष्मितां भूष्टम,
धारिणिम भरनीम मातरम,

वंदे मातरम्वं, दे मातरम्


The National song of India Bande Mataram Original lyrics in Bengali (Full)
বন্দে মাতরম্ ৷
সুজলাং সুফলাং
মলয়জশীতলাম্
শস্যশ্যামলাং
মাতরম্ !
শুভ্র-জ্যোত্স্না-পুলকিত-যামিনীম্
ফুল্লকুসুমিত-দ্রুমদলশোভিনীম্,
সুহাসিনীং সুমধুরভাষিণীম্
সুখদাং বরদাং মাতরম্ ৷৷
সপ্তকোটীকন্ঠ-কল-কল-নিনাদকরালে,
দ্বিসপ্তকোটীভুজৈধৃতখরকরবালে,
অবলা কেন মা এত বলে!
বহুবলধারিণীং
নমামি তরিণীং
রিপুদলবারিণীং
মাতরম্ ৷
তুমি বিদ্যা তুমি ধর্ম্ম
তুমি হৃদি তুমি মর্ম্ম
ত্বং হি প্রাণাঃ শরীরে ৷
বাহুতে তুমি মা শক্তি,
হৃদয়ে তুমি মা ভক্তি,
তোমারই প্রতিমা গড়ি মন্দিরে মন্দিরে ৷
ত্বং হি দুর্গা দশপ্রহরণধারিণী
কমলা কমল-দলবিহারিণী
বাণী বিদ্যাদায়িণী
নমামি ত্বাং
নমামি কমলাম্
অমলাং অতুলাম্,
মাতরম্
বন্দে মাতরম্
শ্যামলাং সরলাং
সুস্মিতাং ভূষিতাম্
ধরণীং ভরণীম্
মাতরম্ ৷