संस्कृतचा व्याकरणकार पाणिनी आणि संगणकाची भाषा
मी लहानपणापासून पाणिनीचे नाव आणि काही आख्यायिका ऐकल्या आहेत. एकदा तो एका झाडाखाली आपल्या शिष्यांना समोर बसवून व्याकरण शिकवत होता आणि त्यात इतका तल्लीन होऊन गेला होता की तिथे एक वाघ आलेला त्याला दिसलाच नाही. व्याघ्र ! व्याघ्र !असे ओरडून त्याचे शिष्य पळून गेले, पण तो पंडित व्याघ्र या शब्दाची व्युत्पत्ती सांगत तिथेच बसून राहिला आणि त्या वाघाच्या भक्ष्यस्थानी पडला असे मी ऐकले होते. संस्कृत भाषेच्या व्याकरणाला सूत्रबद्ध करून अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ पाणिनीने लिहिला. तो आजही संस्कृत भाषेच्या अभ्यासासाठी प्रमाण मानला जातो. त्यानंतर अनेक इतर विद्वानांनी त्यावर भाष्ये लिहिली आहेत किंवा तो सोपा करून सांगण्याचे प्रयत्नही केले आहेत..
संस्कृत भाषा अत्यंत शास्त्रशुद्ध असल्यामुळे संगणकासाठी उपयुक्त आहे असेही मी गेली कित्येक वर्षे ऐकत आलो आहे, पण कुठल्याही व्यावसायिक कंपनीने संस्कृत भाषेमध्ये आज्ञाप्रणाली लिहिलेला संगणक अजून तरी बाजारात आणलेला नाही. अलीकडे केंब्रिज विद्यापीठामधल्या एका विद्वानाने पाणिनीच्या सूत्रांवर संशोधन करून एक प्रबंध लिहिला या बातमीला खूप प्रसिद्धी मिळाली आणि त्यामुळे आता येणार असलेल्या क्वाँटम कॉंप्यूटरची भाषा संस्कृत असणार अशा वावड्या उठवल्या गेल्या.
मला पाणिनीच्या अष्टाध्यायीचीही काही माहिती नाही आणि क्वांटम काँप्यूटर हा काय प्रकार आहे तेही माहीत नाही. या संबंधात फेसबुकवरील सफर विज्ञानविश्वाची या समूहावर मिळालेले काही लेख आणि चर्चा या पानावर जशीच्या तशी संग्रहित केली आहे. सर्व मूळ लेखकांचे मनःपूर्वक आभार.
जाता जाता पाणिनीवरील एक सुसंस्कृत विनोद. नपुंसकमिति ज्ञात्वा प्रियायै प्रेषितं मनः । तत्तु तत्रैव रमते हताः पाणिनिना वयम् ॥
मन नपुंसक(लिंगी) आहे असे समजून मी त्याला निरोप घेऊन प्रियेकडे पाठवले तर ते तिथेच रमले. अहो आम्हाला पाणिनीने कसे फसवले बघा.
. . . आनंद घारे
**********************************
Shrinivas Phadke , January 14,2023 – फेसबुकवर
सफर_विज्ञानविश्वाची

संस्कृत क्वांटम कम्प्युटरची भाषा होऊ शकेल का ?
पाकिस्तानी मंत्रिमंडळातील एक मंत्री श्री.खोकार यांनी, १४ डिसेंबर २०२०, रोजी व्हिएटनाम मध्ये चाणक्य, पाणिनी पाकिस्तानी असल्याचा दावा केला . खोकर यांच्या दाव्याने भारतात खळबळ उडाली . समाज माध्यमे आणि वर्तमान पत्रातून टीकेचा गदारोळ झाला. भारत सरकारने तीव्र निषेध केला.
महर्षी पाणिनीचा जन्म इसवी सन पूर्व सहाव्या शतकात झाला. सिंधू नदी काबुल नदीला मिळते त्या संगमा पासून पासून काही किलोमीटर असलेल्या सालातुर या गावात त्यांचा जन्म झाला. आज हा भाग उत्तर पश्चिम पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमारेषेवर पख्तुनी प्रांतात आहे. पाणिनी ,चरक ,चाणक्य तक्षशिला विद्यापीठात अध्यापन करत होते. आता भाग पाकिस्तानात असला एके काळी अखंड हिंदुस्थानचा भाग होता. पाणिनी हिंदूं धर्मियांची पवित्र भाषा संस्कृतचे व्याकरणकार होते. पाकिस्तानचा त्यांच्यावर कसलाच अधिकार नव्हता. आजही पाकिस्तानी शाळात असाच मोडतोड केलेला, चुकीचा इतिहास शिकवण्यात येतो.
पाणिनीने पख्तुनीस्थानातील त्या वेळच्या पाचशे नगरांचा उल्लेख केलेला आहे .त्यात अनेक दहा हजाराच्या वर लोकसंख्या असलेली शहरे होती .११ व्या शतकात महंमद गझनीने, हिंदुस्थांवरील स्वाऱ्यां बरोबर, पख्तुनीस्थान लुटून, उध्वस्त करून पख्तुनी लोकांचे सामुदायिक धर्मांतर केले. नंतर पाणिनीच्या काळी वैभवशाली नगरे असणारा भाग वैराण बनला .
हिंदुस्थानात आक्रमकांचा इतिहास क्रमिक पुस्तकात विस्ताराने शिकवण्यात येतो.उलट प्राचीन, ऐतिहासिक काळातील हिंदुस्थानातील, महान कार्यासाठी , जागतिक स्तरावर दखल घेतल्या जाणाऱ्या व्यक्तींची बोळवण दोन तीन वाक्यात केली जाते . शालेय अभ्यासक्रमात देशासाठी गौरवशाली असणाऱ्या पाणिनिंचा नगण्य उल्लेख असतो . अपमानास्पद इतिहास जतन केला जातो . मरहूम पाकी संस्कृत पंडित प्राध्यापक अहमद हसन दाणी यांच्या म्हणण्या प्रमाणे पाणिनींवर अधिकार सांगणाऱ्या पाकिस्तानने, ज्या काबुल नदीच्या काठावर महर्षी पाणिनीनी “अष्टाध्यायी”ची रचना केली ते सालातूर जमीनदोस्त केले आहे. त्या शेजारी तीन किलोमीटरवर वेगळे गाव बसण्यात आले आहे .पाणिनींवर हक्क सांगणाऱ्या पाकिस्तानने या भागाची उपेक्षाच केली आहे.
पाणिनींच्या वडिलांचे नाव पणिन शलांक होते . आईचे नाव द्राक्षी होते .जन्मगावावरून पाणिनींना सालातुरीय असेही म्हणत. तसेच द्राक्षीपुत्र पाणिनी आईच्या नावावरूनही ते ओळखले जात . गुरूंचे नाव उपवर्ष होते. पाणिनीचे वडील पणीन प्रतिष्ठित विद्वान होते. पाणिनी एकटा असल्याने सर्वांचा लाडका होता . त्याला उपवर्ष गुरूंकडे शिक्षणासाठी पाठवण्यात आले . मात्र पाणिनीची अभ्यासातली प्रगती यथातथाच होती.
एक दिवस चिडून गुरूंनी शिक्षा करण्यासाठी दांडू उगारला . पाणिनींनी बचावासाठी दोन हात पुढे केले . त्याचे तळहात बघून गुरुजी शिक्षा न करता शांत झाले . नंतर पाणिनीनी गुरुजींना न मारण्याचे कारण विचारले . गुरु खेदाने मान हलवत म्हणाले. ” मारून उपयोग नाही . तुझी चूक नाही . तुझ्या हातावर ज्ञानरेषाच नाही . तुला मारून अगर शिकवून उपयोग नाही ” पाणिनीने हे वडिलांना सांगितल्यावर त्यांनी गुरूंजींची भेट घेतली . गुरुजी हस्त सामुद्रिक जाणणारे ज्योतिषी होते. इतर अनेक ज्योतिषांनी दुजोरा दिल्याने जे आहे ते आहे असे म्हणून पाणिनीच्या वडिलांनी सत्य स्वीकारले.
इतिहासात आणि वर्तमानात ज्योतिष अनेक वेळा खोटे ठरल्याची उदाहरणे आहेत, तरीही अजून माणसे ज्योतिष बघतात .
अश्या भविष्याने तरुण झाल्यावर पाणीनीना फक्त तपस्वी होण्याचा मार्ग मोकळा होता. त्यांनी हिमालयात जाऊन तपश्चर्या करण्याचे ठरवले. युरोपमध्ये माणसे गुहेत राहत असताना हिंदुस्थानच्या गांधार (अफगाणिस्थान)भागात संस्कृतचा वैभवकाळ होता. पाणिनीनी अनेक व्याकरणकारांचा उल्लेख केला आहे. संस्कृत संहिता ब्राह्मणे आरण्यके उपनिषदे यांचा उल्लेख येतो या सर्वांचा सखोल अभ्यास पाणिनींनी केला होता . त्या भागात संस्कृत बोलली जात होती अनेक ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिले जात होते
हिमालय आणि त्या भोवतालच्या प्रदेशात भ्रमण करताना त्या भागात बोलल्या जाणाऱ्या जानपद संस्कृत बोलीभाषेतील अनेक शब्द, धातू ,क्रियापदे यांची नोंद त्यांच्या कुशाग्र मेंदूने करून ठेवली. पुस्तकी संस्कृत बरोबर प्रत्यक्ष बोलल्या जाणाऱ्या संस्कृतच्या अभ्यासाने “अष्टाध्यायी” मधील तर्कशुद्ध आणि तंतोतंत अर्थ व्यक्त करणारे नियम बनवणे शक्य झाले. पाणिनी हिमालय भ्रमणानंतर पाटलीपुत्रमध्ये स्थिरावले . तेथे तेव्हा महानंदांचे राज्य होते . हे नंद राजे गुणग्राहक होते .
मठ्ठ मानले जाणाऱ्या पाणिनीचे थक्क करणारे संस्कृत व्याकरणाचे ज्ञान बघून बहुधा त्यांच्या मागे दैवी दंतकथा चिकटली . त्या नुसार तपश्चर्येत गढून गेले असता त्यांना प्रत्यक्ष शंकराने दर्शन दिले . पण पाणिनीचे लक्षच गेले नाही . म्हणून शंकराने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी डमरू वाजवला आणि त्यातून चौदा शब्द समूह बाहेर पडले . ती महेश्वर सूत्रे किंवा शिवसूत्रे अष्टाध्यायीचा मूलाधार बनली.
प्रत्यक्षात ही चौदा सूत्रे म्हणजे पूर्वी कुठेही वापरले न गेलेले चौदा संस्कृत अक्षर समूह आहेत. आपल्या बुद्धिमत्तेने या अक्षर समूहाचा वापर करून पाणिनी यांनी त्यातून व्याकरणाचे चौदा नियम बनवले आणि ते समजायला सोपे जावे म्हणून त्याच भाषेतून अधिनियम बनवले हे उल्लेखनीय आहे. पुढे यातूनच त्यांनी “अष्टाध्यायी “.संस्कृत शब्द आणि वाक्य यांची गणिती सुत्रा प्रमाणे रचना करणारा ग्रंथ लिहिला. यात ३९५९ सूत्रे बनवली.
पाणिनीं जगातले भाषेचे पहिले व्याकरणकार होते. संस्कृत भाषेला संक्षिप्त, तर्कशुद्ध, ध्वनी, शब्द ,वाक्य तयार करता येणारे अजोड व्याकरण पाणिनींनी दिले. पाणिनींनी २७०० वर्षे पूर्वी दिलेल्या व्याकरणा सारखे व्याकरण, आधुनिक व्याकरणाचे जनक म्हटले जाणाऱ्या Ferdinand de Saussure (1857–1913) यांना तयार करायला १९ वे शतक उजाडावे लागले.
ऋषी मुनी, किंवा संस्कृत नाव घेतले की फेसबुकी विज्ञानवादी “छद्म विज्ञान ” अशी ओरड सुरु करतात . काही फेसबुकी डॉक्टर संस्कृत मृत भाषा असल्याचे डेथ सर्टिफिकेट देतात . डॉ अमर्त्यसेन यांनी ‘The Argumentative Indian.’ पुस्तकात अष्टाध्यायी आणि संस्कृत भाषेचे व्याकरण आणि स्वरशास्त्र (phonetics) आणि पाणिनीचा गौरवपूर्ण भाषेत उल्लेख केला आहे . myweb.uiowa.edu/pjai/Sanskrit/SanskritStudies.htm. या साईटवर जगभरातील संस्कृत शिकवले जाणाऱ्या देशाची नावे आणि विद्यापीठांची यादी उपलब्ध आहे.
आज पाणिनीची आठवण होण्याचे कारण , १५ डिसेंबर २०२२ रोजी, केंब्रिज विद्यापीठातील स्कालर डॉक्टर ऋषी राजपोपट यांनी “In Panini, We Trust: Discovering the Algorithm for Rule Conflict Resolution in the Astadhyayi” हा प्रबंध सादर केला . यात “अष्टध्यायी” ग्रंथ समजण्यात , सत्तावीस शतके होत असलेली चूक दुरुस्त केली . डॉ राजपोपट यांनी शोधलेल्या पद्धतीने, संस्कृत भाषा अधिक तर्कशुद्ध होऊन कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि संगणकाची भाषा बनवण्याच्या दृष्टीने महत्वाची बनली आहे
“अष्टाध्यायी ” ग्रंथात संस्कृत भाषेचे स्वरशास्त्र, वाक्यरचना, किंवा मांडणी, आणि व्याकरण याचा सखोल अभ्यास आहे . म्हणून “अष्टाध्यायी “ला भाषायंत्र असे म्हटले गेले. या यंत्रात कोणताही मूळ संस्कृत शब्द, आणि प्रत्यय टाकला असता, व्याकरणदृष्ट्या अचूक शब्द, आणि वाक्ये बनवता येतात . हे भाषायंत्र अधिक तर्कशुद्ध व्हावे म्हणून पाणिनी यांनी ३९५९ नियम बनवले.
प्रत्यक्षात वापर करताना एका शब्दावर अनेक नियम लागू होऊन गोंधळ निर्माण होतो. हे लक्षात आल्यावर ,पाणिनींनी अधिनियम (meta rule ) बनवले. दोन नियमांमध्ये विरोधाभास निर्माण होईल, तेव्हा नंतर येणारा नियम ग्राह्य मानावा, असा नियम करण्यात आला. नंतर पाणिनींना काय म्हणायचे याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याने, नियमाला अपवाद निर्माण होत होते. वेगळे नियम तयार करावे लागत होते. आणि भाषायंत्राची शिस्त भंग पावत होती .
राजपोपट यांच्या प्रबंधात या चुका सप्रमाण दाखवून दिल्या आहेत . अधिनियम शब्दाच्या डाव्या, उजव्या बाजूला वापरण्याच्या ऐवजी, तो नियम उजव्या बाजूला वापरला गेला, तर शब्द ,वाक्य रचना,उच्चार अचूक होतात हे त्यांनी सिद्ध केले. राजपोपट यांनी सुचवलेल्या दुरुस्ती नंतर “अष्टाध्यायी” तर्कशुद्ध अचुक शब्द रचना करणारे भाषायंत्र बनले आहे
प्रत्याहार म्हणजे अर्थबदल न होता संक्षिप्त केलेला नियमात वापरल्या जाणाऱ्या अक्षरांचा समूह. प्रत्याहार नियमांचा मूलाधार आहे. प्रत्याहार महेश्वर सूत्रातील १४ ध्वनी समूहांवर अवलंबून आहे . १४ माहेश्वरी सूत्रे प्रत्याहार मिळवण्यासाठी, केलेली भाषेतील सुरांची आदर्श रचना आहे . महेश्वरी सूत्रांचे पहिले आणि शेवटचे अक्षर घेऊन, अशी अनेक सूत्रे एकमेकाला जोडून, तर्कशुद्ध माहिती साचेबंद संक्षिप्त शब्दात सांगता येते. याचे साधर्म्य प्रोग्रामिंग लँग्वेजशी आहे.
Backus normal form (BNF) ही खास संगणकांची भाषा, जॉन बाक्स यांनी १९५९ साली शोधून काढली. पाणिनीनी २५०० वर्षांपूवी शोधून काढलेली सूत्रांचे बाक्स, यांच्या नार्मल फॉर्मशी बरेच साधर्म्य आहे . आजच्या अत्याधुनिक कम्प्युटरच्या भाषेशी जुळणारी भाषा ,भारतात २५०० वर्षांपूर्वी होती हे उल्लेखनीय आहे .
संस्कृत संगणकासाठी नैसर्गिक भाषा म्हणून वापरता येईल, या कडे नासा मधील एक संशोधक रिक ब्रिज यांनी ,AI मॅगेझीन मध्ये “Knowledge Representation in Sanskrit and Artificial Intelligence.” जगाचे लक्ष वेधले . ती एकमेव किंवा सर्वोत्कृष्ट भाषा आहे,असा त्यांच्या म्हणण्याचा आशय नव्हता . नासाने संस्कृतला मान्यता देण्याचा प्रश्नच नव्हता . समजा संस्कृत भाषा तशी असती तरी, नासाने विचार केला नसता. संस्कृत येत असेल तोच ती वापरू शकेल. संस्कृतचे जाणकारच कमी आहेत. समजण्यास सुलभ म्हणून नासाने इंग्लिश भाषाच निवडली असती.
आपली मानसिक गुलामगिरी गेलेली नाही. त्यामुळे नासाची मान्यता आपल्याला लागते . इतर देशांनी त्यांच्या मातृभाषेचा वापर करून कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज बनवली आहे.
Chinese programming languages Wenyan.
जपान Dolittle (Japanese ドリトル doritoru)
रशिया ЯМБ (язык машин бухгалтерских) (machine language for accounting machines) – A Russian
फ्रान्स LSE (French: Langage symbolique d’enseignement) i
ब्रिटन Ferranti Autocode is british computer coding language
भारत OM Lang is unique because it supports programming in 9+ Indian languages, allowing Indians to learn programming in their native language more easily. It is also the world’s first Sanskrit programming language, fulfilling many Indians’ long-held desire for Sanskrit to have a place in the computer world
क्वांटम कम्प्युटर आला ,कि सध्याचे सुपर कम्प्युटर खेळणे ठरणार आहेत . त्याला लेखी प्रोग्रॅम देता येणार नाही .त्यासाठी अचूक उच्चार एकच अर्थ असणारे शब्द असणारी भाषा लागेल .आधुनिक सर्व भाषात इतर भाषांची भेसळ झालेली आहे . इंग्रजी तर मूळ भाषा कोणती हे शोधावे लागेल . या परिस्थितीत कोणत्याही इतर भाषेची भेसळ न झालेली, संस्कृत भाषा भविष्यात उपयोगाला येण्याची शक्यता आहे .
© श्रीनिवास प्र फडके
फोटो भारतीय पोस्ट अँड टेलिग्राफ खाते साभार
या लेखावरील चर्चा :
सुचिकांत वनारसे : नाही होऊ शकत. यावर संशोधन झालेलं आहे आणी ते शक्य नाही.
Atul Dravid : सुचिकांत वनारसे, वरती एका काँमेंट मध्ये मी सवीस्तर माहीती दिली आहे… संगणकातील Yac and Lex हे जर गुगल केलंत तर संगणक वैज्ञानीक संस्कृत का चांगली असु शकेल असं म्हणतात ह्याचा अंदाज येईल… संगणक प्रणाली म्हणजे केवळ SAP, Oracle etc नसुन Yac, Lex, Symentic Rules ह्या सुध्दा गोष्टी आहेत… सामान्यपणे ज्या गोष्टी जनतेसमोर आहेत त्या सोप्या, सहज, सरळ आहेत… जसं जसं पार्सल, इंटरप्रीटर किंवा मशीन भाषेकडे जालं तसं समजणे खुपचं क्लिष्ट होतात…
Shrinivas’s Post
Comments
सुचिकांत वनारसे
नाही होऊ शकत.
ReplyShare5d
Atul Dravid
·
सुचिकांत वनारसे वरती एका काँमेंट मध्ये मी सवीस्तर माहीती दिली आहे… संगणकातील Yac and Lex हे जर गुगल केलंत तर संगणक वैज्ञानीक संस्कृत का चांगली असु शकेल असं म्हणतात ह्याचा अंदाज येईल… संगणक प्रणाली म्हणजे केवळ SAP, Oracle etc नसुन Yac, Lex, Symentic Rules ह्या सुध्दा गोष्टी आहेत… सामान्यपणे ज्या गोष्टी जनतेसमोर आहेत त्या सोप्या, सहज, सरळ आहेत… जसं जसं पार्सल, इंटरप्रीटर किंवा मशीन भाषेकडे जालं तसं समजणे खुपचं क्लिष्ट होतात…
Shrinivas Phadke Author
OM Lang: World’s first multilingual programming language
TECHNOLOGY GUIDE
OM Lang: World’s first multilingual programming language
A new programming language has been released that will allow developers to code in Indian languages such as Sanskrit, Hindi, Tamil, and others. Here are the specifics.
354 Views5 May 2022, 06:15 AM
Pahi Mehra
OM Lang, a newly launched programming language that allows you to write code in Sanskrit, Tamil, Hindi, and other Indian languages, is taking the internet by storm.
Most people are surprised to learn that codes can be written in languages other than English. And if you are wondering how this is possible, as well as whether the language is available for your consumption.
There’s Finally a Programming Language in Sanskrit
#
sanskrit
#
vedic
#
programming
So, after taking inspiration from Christopher Nolan’s Interstellar (2014) this thought came to my mind. Why don’t we actually make a programming language in Sanskrit. so here is it Vedic.
logo
Vedic is the first programming language to utilize commands in Sanskrit and is available online for free. Vedic can be used in our Online IDE here for offline installation visit our
Install Instructions.
⌨️ Sample Code
sample vedic code
Output:
output
The Sanskrit language is the world’s oldest language. Once Rick Briggs, a researcher at NASA wrote a paper in 1985 titled Knowledge Representation in Sanskrit and Artificial Intelligence. claims that Sanskrit is the most suitable language to develop computer programming for their Artificial Intelligence program. The grammar of Sanskrit is rule-bound, formula-bound, and logical, which makes it highly appropriate to write algorithms. So, considering that Vedic designed to be a high-level, logical scripting language.
I’ve worked so hard for this project, I am trying to build a community around Vedic, so we can make the project sustainable. that’s by I made it open source.
Links :
Documentation
Github Org
Online IDE
Contributions, issues and feature requests are welcome!
सुचिकांत वनारसे हा घ्या संदर्भ अगोदर कोडिंग आणि इंटरफेस मधील फरक समजला तर बघा त्या नंतर क्लासिकल कॉम्पुटर आणि पुढे येऊ घातलेला क्वांटम काम्पुटर त्याला लागणारी भाषा यांचा अभ्यास करा . न्यूनगंड असला तर सोडा.
DrVivek Charjan
संगणकाची भाषा ही विविध कोड्स पासून बनलेली आहे तिचा बोलीभाषेचा काहीही संबंध नाही .
संस्कृत ही कॉम्पुटरची भाषा होईल हा भ्रम आहे .
ऐतिहासिक माहिती सोडल्यास पोस्ट अवैज्ञानिक वाटते
Shrinivas Phadke Author
DrVivek Charjan तुम्ही कोडिंग बद्दल बोलत आहात . मी क्वांटम कम्प्युटर इंटरफेस लँग्वेज बद्दल बोलतो आहे त्यात फरक आहे. पोस्ट मध्ये काय अवैज्ञानिक आहे दाखवून द्या
इथे कोडींग आणि इंटर फेस लँग्वेज एकच आहे असे गृहीत धरून कॉमेंट केली जात आहे. बीज गणितात आकड्याना अबक abc किंवा xyz अशी नावे दिली तरी गणित सुटते पण इंतरफेस आणि कोडींग मध्ये फरक आहे
Coding is testing a human’s skill to which rate it can reduce the complexity of the computer program. AI is testing human’s skill in making the machines learn to behave like humans. This behavior of machines learning like humans can be invoked only if machines are exposed to the world as humans
Vasudeo Bidve
ऋषी राजपोपट याच्या संशोधनात आणि प्रबंधात अनेक चुका आहेत, चुकीची गृहीतके आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे संशोधन म्हणजे, स्वतःला आणि स्वतःच्या पीएचडी गाईडला आजवर न समजलेल्या व्याकरण नियमांनाच “कोडे” समजून किंवा “२७०० वर्षे न उलगडलेली समस्या” समजून ती स्वतःच सोडवण्यासाठी केलेली हास्यास्पद, केविलवाणी आणि म्हणूनच दुर्लक्षणीय ठरणारी धडपड आहे.
त्याने हे तथाकथित ‘कोडे’ सोडवताना जो ‘अभिनव’ म्हणून त्याचा स्वतःचा नियम प्रबंधात सांगितला आहे, तो फक्त त्याने उदाहरणार्थ म्हणून दिलेल्या (किंवा तत्सम अजून काही) शब्दांपुरताच लागू होतो. उलट त्यानुसार अनेक प्रचलित संस्कृत शब्दांची मात्र भलतीच व पूर्णपणे चुकीची रूपे बनतात.
थोडक्यात, ऋषी राजपोपटने केलेला दावा आहे, तशा प्रकारचे इथे खरं तर कोणतेही कोडे / समस्या नाहीच!
प्रबंधाचे शीर्षक “In Panini (only) we trust” हे देऊन पाणिनीच्या पुढच्या संपूर्ण परंपरेला (कात्यायन, पतंजली, आणि पुढचे सगळे आचार्य / भाष्यकार / विद्वान यांना) फाट्यावर मारण्याचा जाहीर उच्चार आहे. (यातला कंसात लिहिलेला Only हा शब्द मी लिहिलेला असून त्याचे अत्यंत स्पष्ट प्रत्यंतर त्याच्या प्रबंधात सुरुवातीच्या एक-दोन प्रकरणांमध्येच दिसून येते – पुढेही सतत दिसत राहते).
केंब्रिज सारख्या विद्यापीठाने संशोधनाच्या नावाखाली हे असले प्रसिद्धीचे स्टंट का करावेत / करू द्यावेत, हे अनाकलनीय आहे.
सदर संशोधनाचे अत्यंत मुद्देसूद खंडन आणि तपशीलवार चीरफाड एव्हाना अनेक विद्वानांनी केलेली आहे. पैकी संस्कृत भारती, विद्वत् परिषदेद्वारा झालेल्या एका व्याख्यानात श्री. नीलेश बोडस यांनी केलेली चिकित्सा सर्वाधिक लक्षणीय आहे. त्याची लिंक पुढे देत आहे. नीलेश बोडस कोण आहेत, त्याचा सविस्तर परिचय यामध्ये सुरुवातीला आहेच. व्याख्यान मोठे झाले आहे, कारण ते सविस्तर आहे. व्याख्यान जरी संस्कृतमधून असले, तरी सामान्य लोकांना त्यातले मुद्दे आणि आशय सहजपणे समजतील, इतपत सोपे नक्कीच आहे. इच्छुकांनी (निदान 1.25x च्या गतीने का होईना, पण) शक्यतो पूर्णपणे पहावे. लिंक:
https://youtu.be/fVsn8jHFnLI
ऋषी राजपोपटला जगाने कृपया डोक्यावरून खाली उतरवावे आणि त्याला व केंब्रिजला त्यांच्या वाटेवर सोडून देऊन आपापल्या कामाला लागावे, ही नम्र विनंती.
“उदिते तु सहस्रांशौ न केम्ब्रीजम् न पोपटः”
शोधप्रबन्धस्य वस्तुतत्त्वविमर्शः – नीलेशबोडसः
YOUTUBE.COM
Dhananjaya Jadhav
December 21, 2022 at 3:17 PM ·
केंब्रिज विद्यापीठातील भारतीय पीएचडीधारक ऋषी राजपोपट यांनी अत्यंत किचकट व जगभरात कोणालाही न सुटलेले.. इसवी सनपूर्व ५ व्या शतकातील ग्रामायटिकल “पाणिनी” कोडे नुकतेच डिकोड केले आहे.
” इन पाणिनी, वुई ट्रस्ट: डिस्कव्हरिंग द अल्गोरिदम फॉर रूल कॉन्फ्लिक्ट रिझोल्यूशन इन द अस्ताध्यायी” या नावाने त्यांनी लिहलेल्या प्रबंधात ह्या “पाणिनी” कोड्याबद्दल डिटेल्स दिले आहेत.
आपले भारतीय हिंदू जगभरात विविध क्षेत्रात दैदीपमानः कामगिरी करून भारताचे नाव उंचावत आहेत… तर “हिरवे” लोकसंख्या वाढीच्या शास्त्रीय संशोधन क्षेत्रात वेगाने कार्य करत आहेत .
जय हिंद.
धनंजय जाधव.
२१/१२/२०२२.
Prasad Ramesh Bhide
December 17, 2022 at 5:23 PM ·
काल मी केंब्रिज विद्यापीठात पाणिनीच्या व्याकरणावर झालेल्या संशोधनावर माध्यमात ज्या बातम्या फिरत आहेत त्याचा उहापोह करणारी एक पोस्ट लिहिली. ती मराठीत असायला हवी असा आग्रह अनेकांनी केला.
गुगल translator च्या मदतीने केलेला मराठी अनुवाद.
माध्यमांना आकर्षित करणाऱ्या पाणिनीय भाषाशास्त्रावरील अलीकडील संशोधनाबद्दल —
केंब्रिज विद्यापीठात पीएचडी पदवीसाठी स्वीकारण्यात आलेल्या पाणिनीच्या अष्टाध्यायीवरील प्रबंधाला माध्यमांमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.
या घटनेच्या संदर्भात विचार करण्यासारखे काही मुद्दे –
- स्क्रोलच्या वेबसाइटवर आलेली बातमी अशी आहे –
एका भारतीय विद्यार्थ्याने 2500 वर्षांत प्रथमच संस्कृतचे ‘भाषा मशीन’ कसे कार्यरत केले”
हे वर्णन ब्रेकिंग न्यूजच्या मोहामुळे आणि आधुनिक भाषाशास्त्राच्या एका महत्त्वाच्या शाखेबद्दलच्या अज्ञानामुळे केले गेले आहे, ज्याला संस्कृत संगणकीय भाषाशास्त्र म्हणता येईल. डॉ. अंबा कुलकर्णी, डॉ जेरार्ड ह्युट, डॉ पीटर शार्फ, डॉ मल्हार कुलकर्णी, डॉ तनुजा अजोतीकर आणि इतर विद्वानांचा गट पाणिनीच्या सूत्रांच्या पद्धतीचा संगणक तंत्रज्ञानावर वापर करण्यावर काम करत आहे आणि अनेक प्रकाशनांमधून त्याचे प्रतिबिंब पडले आहे. (मी आयआयटी बॉम्बेमधून पीएचडी पूर्ण केली आहे आणि प्रा मल्हार कुलकर्णी माझे पीएचडी पर्यवेक्षक होते.)
त्यामुळे या कामात “पहिल्यांदा” असे काही नाही. - विद्यापीठाच्या वेबसाइटवर दिसणारी मथळा आहे
“प्राचीन व्याकरणाचे कोडे २५०० वर्षांनंतर सुटले”
पाणिनीच्या व्याकरणातील हे एकमेव कोडे नाही किंवा ते पहिल्यांदाच सोडवण्याचा हा प्रयत्नही नव्हे.
पाणिनीच्या अष्टाध्यायीची चौकट अशा नियमांवर आधारित आहे जे परस्परावलंबी आहेत आणि अनेक वेळा संघर्ष आणि गोंधळ निर्माण करतात. स्वतः पाणिनीने काही मेटारूल्स ( परिभाषा) सांगितले आहेत. मात्र, हे मेटारूल्स कमी पडतात. ह्यामुळे, भारतीय व्याकरणीय परंपरेत विद्वानांनी परिभाषा या शीर्षकाखाली अनेक मजकूर/ भाष्ये लिहिली आहेत. असेच एक महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे १९ व्या शतकातील नागेश भट्ट ह्याचा परिभाषेंदुशेखर हा ग्रंथ. ह्या स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये प्रस्तुत प्रबांधातील आधारभूत परिभाषेवर विस्तृत चर्चा आहे. - या प्रबंधासाठी केलेले कार्य हे या क्षेत्रातील एकमेव संशोधन कार्य नाही. कारण अष्टाध्यायीमधील विविध मुद्द्यांवर हैदराबाद विद्यापीठ, आयआयटीची विविध कॅम्पस ह्यासारख्या ठिकाणी Natural Language Processing संदर्भात असेच संशोधन केले जात आहे.
- मग या कामाने अचानक जगाला का आकर्षित केले? –
अ) बहुधा “केंब्रिज” टॅग असल्यामुळे.
ब) संशोधक / पर्यवेक्षकाचा प्रसारमाध्यमांशी चांगला संबंध आहे आणि प्रसारमाध्यमातील लोकांना ते ब्रेकिंग न्यूज होण्यास योग्य वाटले. - तरीही,
प्रबंधात केलेले विधान अतिशय धाडसी आहे आणि संस्कृत विद्वान आणि भाषाशास्त्रज्ञ ह्यांनी त्यावर नीट विचार केला पाहिजे. मुख्य मुद्दा आहे तो ह्या संशोधनातील अपूर्वतेचा. संपूर्ण प्रबंध वाचल्याशिवाय ते अपूर्व आहे की नाही याची पुष्टी करणे कठीण आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या यू ट्यूब चॅनेलवरील एक छोटा व्हिडिओ आहे ज्यामध्ये संशोधकाने आपल्या प्रबांधाचे सार सांगितले आहे. ते खरोखर स्पष्ट, विचारप्रवर्तक आणि संभाव्यतः विवादास्पद देखील आहे.
या प्रबंधात केलेला दावा आणि तत्सम इतर मुद्द्यांवर संस्कृत अभ्यासकांच्या क्षेत्राबाहेर या विषयाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी पॅनेल डिस्कशन व्हायला हवीत - सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टबद्दल-
अ) ह्या संशोधन क्षेत्रासाठी एक प्रकारे चांगले आहे. या घडामोडींमुळे भारतीय ज्ञान परंपरेतील या संशोधन क्षेत्राबद्दल एका मोठ्या गटाला जाणीव झाली आहे. अन्यथा, लोक भारतीय ज्ञान परंपरेच्या “वैज्ञानिकतेवर” केवळ अणू आणि विमानांच्या संदर्भात वादविवाद करत राहतात. भारतीय ज्ञान परंपरेत असे बरेच काही आढळते ज्याचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करणे आवश्यक आहे, अगदी नेमके सांगायचे तर अश्या किमान 62 ज्ञानशाखा आहेत.
ब) प्रस्तुत संशोधन केंब्रिजचे असल्याने, लोक त्याला लगेच भगवेकरण, छद्मविज्ञान किंवा तत्सम काहीतरी हिणवणार नाहीत. यामुळे ही घटना म्हणजे भारतीय ज्ञान परंपरेचे अधिक चांगले आणि ठोस चित्र मांडण्याची संधी आहे हे लक्षात घ्यायला हवे.
डॉ प्रसाद भिडे
संस्कृत आणि भाषाशास्त्राचे प्राध्यापक, सोमय्या महाविद्यालय, मुंबई
Pankaja Dhananjay
प्रसाद सर,यांवर खरंचच विस्तृतपणे लिहिलं गेलं पाहिजे कारण अनेक लोक संभ्रमात आहेत.कोडं सोडवलं म्हणजे नेमकं काय ? कोणतं कोडं ? इ.अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे लोकांकडून….
संस्कृतेतर जनांना तर हे खूप काहीतरी अभूतपूर्व घडल्याचा फील आलाय,त्यांना फार भारी वगैरे वाटतंय…..😊 वेगवेगळ्या पोस्टस् आहेत यासंदर्भात म्हणे….
Mukund Bhalerao
मी विद्यावाचस्पती (Ph. D.) नाही, परंतु MA (Sanskrit) आहे. तो प्रा राजपोपटांचा प्रबंध आजच प्राप्त केला व वाचत आहे. संस्कृत मध्ये Ph. D. असलेले खूप लोक आहेत. मला वाचल्यानंतर काही अर्थबोध झाला तर मी प्रयत्न करेन. हे शक्य आहे की अशा विषयावर खूप ठिकाणी संशोधन सुरु असेल किंवा झाले असेल, पण त्यास तितकीशी प्रसिद्धी मिळाली नसेल. याचा अर्थ हे नवीन संशोधन अगदीच निरर्थक आहे असा होत नाही. संस्कृतच्या प्रचारा व प्रसाराकरीता जे जे प्रयत्न करतील त्याची दखल घेतली गेली पाहिजे. 🙏
Prasad Ramesh Bhide
Kaushik Lele सूत्रातील एका शब्दाच्या अर्थाचा परंपरेने सांगितलेल्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ आहे असा दावा केला आहे . तो पूर्णपणे योग्य आहे का ह्यावर व्याकरण विद्वानांचे मत प्रतिकूल आहे