मराठी कवी आणि कविता

मराठी कवी

हा ब्लॉग सुरू केल्यापासून वेळोवेळी निरनिराळ्या कवींची माहिती आणि त्यांच्या काही उत्कृष्ट कविता यांचे संकलन मी निरनिराळ्या लेखांमध्ये करत आलो आहे. त्यानंतर मला जसजशी अधिक माहिती मिळत गेली तसतशी ती माहिती मी त्या त्या पानांवर देत गेलो आहे. त्या सगळ्यांचे दुवे या पानावर खाली दिले आहेत. यापुढे मिळणाऱ्या कवींची माहिती आणि त्यांच्या कविता मी आता या पानावर साठवत जायचे ठरवले आहे.
दि.०८-०१-२०२०

ही पाने अवश्य पहावीत. श्रेष्ठ संतांच्या रचना
https://anandghare.wordpress.com/2021/09/27/%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80/

पंतकवींच्या रचना
https://anandghare.wordpress.com/2023/04/10/%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a4%a8%e0%a4%be/

मराठी कवी

असे छायाचित्र तुम्ही कधी पाहिले असेल असे वाटत नाही,ना असे छायाचित्र परत कधी काढले जाईल, मराठीतले नऊ नामवंत कवी एकाच फोटोत! ज्यांची नावे आपण फक्त शाळेच्या पाठ्यपुस्तकात तर कधी सुंदर काव्याच्या पुस्तकावर बघत आलो असे नऊ नामवंत कवी.

नवरत्ने : (बसलेले) संजीवनी मराठे,पद्मा गोळे,कवी यशवंत,बा.भ.बोरकर व वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज.

(मागे उभे) मंगेश पाडगावकर,वसंत बापट, ग.दि.माडगूळकर, वा.रा.कांत


या पानावर नवी भर घालण्यात येत आहे.

१. कविवर्य कुसुमाग्रज             दि.२६-०२-२०२०

२. कवी आणि राजकारणी      दि. १४-०२-२०२०

३. कवी पी.सावळाराम          दि.२३-०२-२०२०, ०४-०७-२०२१

४. कवी अनिल                     दि. ०८-०५-२०२०

५. कवी गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी)     दि.२६-०५-२०२०

६. कवयित्री शांताबाई शेळके आणि त्यांचे कवित्व     दि. ०६-०६-२०२०

७. केशवकुमार (आचार्य प्र,के.अत्रे)         दि. १४-०६-२०२० 

८. बहिणाबाई आणि सोपानदेव चौधरी दि.२३-०६-२०२०/ १६-१०-२१

९. कवि दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी दि.१८-०७-२०२०

१०. बाबा आमटे दि.१९-०९-२०२०

११.भा.रा.तांबे दि.२८-१०-२०२०

१२.कवी सुधांशु दि.१९-११-२०२०

१३. कवी यशवंत (पेंढारकर) दि.२६-११-२०२०

१४. साने गुरुजी दि.२४-१२-२०२०

१५. सुधीर मोघे दि. ०८-०२-२०२१

१६.स्वातंत्र्यशाहीर गोविंद दि. ०९-०२-२०२१

१७. वासुदेवशास्त्री खरे दि. २७-०३-२०२१

१८. आरती प्रभू (चिं.त्र्यं.खानोलकर ) दि.२६-०४-२०२१

१९. संदीप खरे दि. १३-०५-२०२१

२०. कवी बी (नारायण मुरलीधर गुप्ते) दि. ०२-०६-२०२१

२१. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर दि. ०२-०६-२०२१

२२. निसर्गकवी ना.धों.महानोर दि. १३-०७-२०२१

२३. कृ. ब. निकुम्ब दि. ०९-०८-२०२१

२४. गुरु ठाकूर दि. ३०-०८-२०२१

२५. शंकर वैद्य दि. २२-०९- २०२१

२६. स्वातंत्र्यवीर सावरकर दि. २५-०९-२०२१

२७. फ. मु. शिंदे दि.३०-०९-२०२१

२८. द.मा.मिरासदार दि. ०३-१०-२०२१

२९. वा.रा.कांत दि. ०६-१०-२०२१

३०. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दि. ११-१०-२०२१

३१. गीतकार, संगीतकार, गायक यशवंत देव दि. ३०-१०-२०२१

३२. माधव ज्युलियन दि.२९-११-२०२१

३३. बा.सी.मर्ढेकर दि. १-१२-२०२१

३४. अनंत काणेकर दि.४-१२-२०२१

३५. माधव काटदरे दि.४-१२-२०२१

३६. दिलीप चित्रे दि. ११-१२-२०२१

३७. राजा मंगळवेढेकर दि.११-१२-२०२१

३८. राजा बढे दि. ०७-०४-२०२२

३९. दिपाली ठाकूर दि. १७-०४-२०२२

४०. एक मुखडा दोन कविता – खेड्यामधले घर कौलारू दि.२९-०५-२०२२

४१. कृष्णाजी नारायण आठल्ये दि. २९-०५-२०२२

४२. कविवर्य वसंत बापट दि.०२-०६-२०२२

४३. वीर वामनराव जोशी . . दि.०६-०६-२०२२

४४. दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त . . दि.२७-०६-२०२२

४५. वा.गो.मायदेव ऊर्फ कवी वनमाळी . . दि.२६-०७-२०२२

४६. जगदीश खेबुडकर . . . दि.०२-०८-२०२२

४७. शास्त्रज्ञांच्या कविता . . . दि.०२-०८-२०२२

४८. नारायण सुर्वे . . . दि.१६-०८-२०२२

४९. कवयित्री पद्मा गोळे . . . दि.२२-०२-२०२३

५०. गजलकार आप्पा ठाकूर . . . दि.१६-०३-२०२३

५१. सूर्यकांत खांडेकर . . . दि.०३-०४-२०२३

५२. इलाही जमादार . . . . दि.११-०४-२०२३

५३. रेव्ह.नारायण वामन टिळक . . . दि. १०-०७-२०२३

५४. वामन तबाजी कर्डक . . . दि. १६-०८-२०२३

५५. प्रा, ग.ह.पाटील . . . दि. १९-०८-२०२३

५६. कवि गिरीश . . . दि.२०-११-२०२३

५७ मुन्शी प्रेमचंद (मराठी रूपांतर) . . . ०५-१२-२०२३

५८. पठ्ठे बापूराव . . . दि.२९-१२-२०२३

ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः

या पोस्ट्सही पहा :

१. कवीवर्य विंदा करंदीकरांना आदरांजली Mar 28, 2010
कविता : चुकली दिशा तरीही, धीर थोडासा हवा, उपयोग काय त्याचा, सब घोडे बारा टक्के, देणाऱ्याने देत जावे, त्याला तयारी पाहिजे, एवढे लक्षात ठेवा, त्याला इलाज नाही https://anandghare.wordpress.com/2010/03/28/%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8/

२. बालकवी ठोंबरे, श्रावणमासी कविता आणि विडंबने
https://anandghare.wordpress.com/2012/07/17/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a1/

३.छत्रपती शिवाजी महाराजांची गीते (शिवकल्याणराजा) आणि सेर सिवराज है|
सरणार कधी रण, वेडात मराठे वीर, अरुणोदय झाला,
https://anandghare.wordpress.com/2014/10/30/%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%b9%e0%a5%88/


४. प्रसिद्ध कवींच्या काव्यरचना Nov 25, 2014 11:00 PM
सतारीचे बोल : केशवसुत,
सिंहस्थ, तळघर, नदीबाई, देव आहे की नाही : कुसुमाग्रज,
धीर थोडासा हवा : विंदा करंदीकर,
जगत मी आलो असा : सुरेश भट
https://anandghare.wordpress.com/2014/11/25/%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9a%e0%a4%be/

५. कवयित्री इंदिरा संत Jan 7, 2019
कविता : कुब्जा (अजून नाही जागी राधा), आली बघ गाई गाई, नको नको रे पावसा, नको पाठवू
https://anandghare.wordpress.com/2019/01/07/%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%af%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4/

६. कवी केशवसुत 25/01/2019
कविता : तुतारी, सतारीचे बोल, अढळ सौदर्य (हस्ताक्षरात)
https://anandghare.wordpress.com/2019/01/25/%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a4/

७. कविवर्य मंगेश पाडगावकर आणि त्यांची गीते मार्च 27, 2019
कविता : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, इतर कवितांमधील निवडकउतारे
https://anandghare.wordpress.com/2019/03/27/%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%86/

८. कविवर्य सुरेश भट आणि त्यांच्या कविता मार्च 26, 2019
कविता : जगत मी आलो असा, कापूर, कोण जाणे कोण हे जवळून गेले?, आशा भोसले यांना काव्यमय पत्र, सुरेश भटांचे शेर. अ ते ज्ञ
https://anandghare.wordpress.com/2019/03/26/%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%ad%e0%a4%9f/

९. महाराष्ट्र गीते मे 1, 2019
बहु असोत सुंदर :श्री.कृ.कोल्हटकर, मंगल देशा :गोविंदाग्रज, जय जय महाराष्ट्र माझा : राजा बढे, मराठी असे आमुची मायबोली : माधव ज्यूलियन, माझा महाराष्ट्र : वसंत बापट
https://anandghare.wordpress.com/2019/05/01/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%87/

१०. कविवर्य ग्रेस मे 14, 2019
कविता : पांढरे हत्ती, वाटेपाशी, तुझी बहार मंदशी, तुझ्यात नभवाहिनी, अज्ञेयाहून गूढ, जे सोसले नाही, पद्मबंध, निरोप, काळीज धुक्यानेउडते, दुःख घराला आले, आठवण, असे रंग, बदाम झाडे, ती गेली तेंव्हा रिमझिम,
https://anandghare.wordpress.com/2019/05/14/%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8/

११. पावसाची गाणी जून 27, 2019
नको नको रे पावसा : इंदिरा संत
ए आई मला पावसात जाऊ दे : वंदना विटणकर
नभं उतरू आलं : शांता शेळके
भेट तुझी माझी स्मरते : मंगेश पाडगांवकर
मन चिंब पावसाळी : ना. धों. महानोर
राया मला, पावसात नेऊ नका : वसंत सबनीस
https://anandghare.wordpress.com/2019/06/27/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80/

१२ कविवर्य बा.भ.बोरकर यांच्या कविता Nov 30, 2019
तेथे कर माझे जुळती, त्या दिसा वडाकडेन, तू गेल्यावर, नाही पुण्याची मोजणी, सरिंवर सरी आल्या गं, समुद्रराग, अनंता तुला कोण पाहूं शके, कांचनसंध्या,
जीवन त्यांना कळले हो, प्रतिएक झाडामाडा, झिणि झिणी वाजे बीन
https://anandghare.wordpress.com/2019/12/01/%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%ac%e0%a4%be-%e0%a4%ad-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af/

१३. कृष्ण – दोन कविता : कृष्णा : दुर्गा भागवत, कृष्ण भेटायलाच पाहिजे : अज्ञात
https://anandghare.wordpress.com/2019/09/24/%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be/

१४. कवि, कविता आणि विडंबने ऑक्टोबर 11, 2019
आम्ही कोण : केशवसुत, विडंबन : केशवकुमार (आचार्य अत्रे)
दासबोध : समर्थ रामदास, उदासबोध : मंगेश पाडगावकर
‘विरामचिन्हे’ : राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज, विडंबन : केशवकुमार
रांगोळी घालतांना पाहून : केशवसुत, विडंबन: गोविंदाग्रज :
स्वयंवर झाले सीतेचे : ग दि माडगूळकर, विडंबन झाले कवितेचे : खोडसाळ
जन पळभर म्हणतील : भा रा तांबे, विडंबन : मकरंद करंदीकर
https://anandghare.wordpress.com/2019/10/11/%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a1%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%a8%e0%a5%87/

१५ भोंडल्याची / हादग्याची १६ गाणी – पारंपरिक
https://anandghare.wordpress.com/2019/10/01/%e0%a4%ad%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a5%a7%e0%a5%ac/

१६. लोककवि मनमोहन नातू

https://anandghare.wordpress.com/2020/05/07/%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf-%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%a8-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82/

१७. स्व.यशवंत देव यांना श्रद्धांजलि
https://anandghare.wordpress.com/2018/11/18/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-

पृष्ठ ३ शाळेतल्या कविता
१. केशवसुत : आम्ही कोण, काठोकाठ भरू द्या पेला, तुतारी, सतारीचे बोल, आम्हीच नव्हतो
२. भा.रा.तांबे : पिवळे तांबुस ऊन, मधुघट, जन पळभर, रुद्रास आवाहन, तुझ्या गळा माझ्या गळा
३. ना.वा.टिळक : केवढे हे क्रौर्य
४. बालकवी ठोंबरे : श्रावणमासी, औदुंबर
५. केशवकुमार : आजीचे घड्याळ
६. ग.दि.माडगूळकर : नाच रे मोरा
७. भानूदास : पडू आजारी
८. वि.म.कुलकर्णी : आधी होते मी दिवटी
९. अनंत फंदी : बिकट वाट वहिवाट नसावी
१०. माधव ज्यूलियन : भ्रांत तुम्हा का पडे
११. बा.भ.बोरकर : दिव्यत्वाची जेथ प्रचीती
१२. बहिणाबाई चौधरी : मन वढाय वढाय, अरे खोप्यामाजी खोपा
१३. कुसुमाग्रज : जीर्ण पाचोळा
१४. यशवंत : आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी

https://anandghare.wordpress.com/%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%a3-%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af/
पृष्ठ १६ : स्व.गदिमा आणि बाबूजी
गाणी : घन घन माला नभी दाटल्या, एकतारीसंगे एकरूप झालो, माना मानव वा परमेश्वर
https://anandghare.wordpress.com/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a5%82%e0%a4%9c%e0%a5%80/?frame-nonce=6de4fea64c

*********************************************

कवितांचे गाणे

कधी कधी मला वाटतं…

कधी कधी मला वाटतं विद्यार्थी व्हावं अन्
विंदा मास्तरांच्या वर्गात बसावं
‘कोणाकडून काय घ्यावं..’ ते त्यांनी शिकवावं.
वर्गातून बाहेर पडताना विंदांकडून कवितेची हिरवी पिवळी शाल घ्यावी
आयुष्यभरासाठी समाधानाने अंगावर ओढून घ्यावी. ।। १ ।।

कधी कधी मला वाटतं साने गुरुजींच्या वर्गात बसावं
श्यामची आई लिहिणाऱ्या प्रेमळ श्यामला अनुभवावं.
त्यांच्या डोळ्यातलं अपार प्रेम, माया अनुभवावी.
‘खरा तो एकची धर्म’ शिकवण त्यांच्याकडून घ्यावी. ।। २ ।।

कधी कधी मला वाटतं बोरकरांच्या वर्गात बसावं
त्यांचे सागरासारखे सागरापरी गहिरे डोळे अनुभवावे
जे ‘जीवन त्यांना कळले हो’
ते मलाही शिकवाल का विचारावं. ।। ३ ।।

कधी कधी मला वाटतं कुसुमाग्रजांच्या वर्गात जावं
‘कशास आई भिजविसी डोळे’ त्यांच्याकडून ऐकावं
रात्रीच्या गर्भातील उषा:कालाची आशा जागवीत निघावं.
पाठीवर तात्यासाहेबांचा हात असावा
‘लढ रे पोरा…’ ऐकताना ‘कणा’ ताठ व्हावा. ।। ४ ।।

कधी कधी मला वाटतं शांताबाईंकडे जावं
ऋतू हिरवा, ऋतू बरवा कुठे भेटला जाणून घ्यावं. ।। ५ ।।

माझे जीवनगाणे लिहिणाऱ्या पाडगावकरांच्या वर्गात
एक चक्कर मारावी, विचारावं त्यांना…
व्यथा असो आनंद असो तुम्ही गात कसे राहता
आनंदाच्या रसात न्हात कसे राहता

त्यांच्या चष्म्याआडच्या प्रेमळ, मिश्किल डोळ्यात
खोल खोल डोकावून बघावं
‘शतदा प्रेम करावे’चं रहस्य समजून घ्यावं. ।। ६ ।।

कधी कधी मला वाटतं ग्वाल्हेरला तांब्यांकडे जावं
‘कळा ज्या लागल्या जिवा…’ त्या जीवाला भेटावं
दिवसभर त्यांच्याजवळ राहावं
पहाटे त्यांच्याकडून ‘घनतमी राज्य करणाऱ्या शुक्राला’ बघावं
‘ते दूध तुझ्या त्या घटातले’चा गोडवा त्यांच्याकडूनच अनुभवावा.
सायंकाळी त्यांच्यासोबत ‘मावळत्या दिनकराला’ प्रणाम करावा.
‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या…’ ऐकताना पुन्हा भेटण्याचं
‘देई वचन मला…’ म्हणावं. ।। ७ ।।

कधी कधी वाटतं जावं बालकवींच्या गावा
पाय टाकुनी जळात बसलेला तो ‘औदुंबर’ अनुभवावा.
सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुन घ्यावे
‘आनंदी आनंद गडे’च्या सड्यात न्हाऊन निघावे. ।। ८ ।।

कधी कधी वाटतं सुरेश भटांना गाठावं
‘चांदण्यात फिरताना’ त्यांच्याशी संवाद साधावा
दुभंगून जाता जाता मी अभंग कसा झालो
त्यांच्याकडून ऐकावं. ।। ९ ।।

कधी कधी मला असं खूप काही वाटतं
कवी आणि कविता यांचं प्रेम हृदयात दाटतं.
कवी असतात परमेश्वराचेच दूत
घेऊन येतात प्रतिभेचं लेणं
तुमच्या माझ्यासाठी ते असतं
नक्षत्रांचं देणं. ।। १० ।।
कवी माहिती नाही परंतू रचना मात्र अप्रतिम आहे…🌹🌹

१. कुसुमाग्रज

कुसुमाग्रज १

ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित पद्मभूषण वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज हे महान चतुरस्र साहित्यिक होते. कथा, कविता, कादंबऱ्या, नाटके आदि मराठी साहित्याच्या सर्व दालनांमध्ये त्यांनी उत्तमोत्तम रचना करून त्याला समृद्ध केले आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेतच, त्यांच्या साहित्यावर इतर नामवंत लेखकांनी लेखन केले आहे. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्त्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. २७ फेब्रूवारी हा या थोर साहित्यिकाचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

त्यांच्यासंबंधी समग्र माहिती या संकेतस्थळांवर दिली आहे

कुसुमाग्रज प्रतिष्ठान
https://www.kusumagraj.org/index.php

वि.वा. शिरवाडकर (विकीपीडिया)
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF.%E0%A4%B5%E0%A4%BE._%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0
——————————————————–
खालील माहिती कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावरून साभार

कुसुमाग्रज

वि.वा. शिरवाडकर यांचे खरे नांव गजानन रंगनाथ शिरवाडकर दत्तक गेल्यामुळे त्यांचे नांव विष्णु वामन शिरवाडकर झाले. २७ फेब्रुवारी १९१२ साली त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पिपंळगाव येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण नाशिक येथील न्यू इंग्लीश स्कुलमध्ये म्हणजे आजचे जे जु. स. रुंगठा विद्यालय आहे तेथे झाले. मॅट्रिक परिक्षा ते मुंबई विद्यापीठातून पास झाले.

१९३० साली हं. प्रा. ठाकरसी विद्यालयात ते होते तेव्हा ‘रत्नाकर’ मासिकातुन त्यांच्या कविता प्रसिध्द होत. अस्पृश्य समजल्या जाणार्‍या लोकांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून १९३२ साली जो सत्याग्रह झाला त्यात त्यांनी सहभाग घेतला होता, त्यामूळे बाल्यावस्थेतील त्यांच्या लिखाणाला प्रौढत्वाची लकाकी चढून हळूहळू त्यांच्या साहित्याने आकाशाला गवसणीच घातली. ज्यात त्यांनी फक्त कविताच नाही तर कथा, कादंबर्‍या, नाटके, ललित साहित्य याबरोबर प्रभा साप्ताहिक, प्रभात वृत्तपत्र, सारथी, धनुर्धारी व नवयुग यामध्ये पत्रकारिता पण केली. त्यांचा आवडता लेखक पी. जी. वुडहाऊस व आवडता नट चार्ली चाप्लिन होता.

१९४२ साली प्रसिध्द झालेला ‘विशाखा’ हा काव्यसंग्रह म्हणजे मराठी वाङमयातील उच्च कोटीचे वैभव होय. जे आजही मराठी साहित्यप्रेमींना भुरळ घालते. ‘मराठी माती’, ‘स्वागत’, ‘हिमरेषा’ यांचबरोबर ‘ययाती आणि देवयानी’ व ‘वीज म्हणाली धरतीला’ ही नाटके १९६० ते १९६६ साली प्रसिध्द झाली. सार्‍या साहित्य कृतींना राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९४६ साली ‘वैष्णव’ ही कादंबरी व ‘दूरचे दिवे’ हे नाटक प्रसिध्द झाले.

‘नटसम्राट’ ही त्यांच्या लेखणीतून उतरलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती तर होतीच पण त्याचे नाटयप्रयोगही खूप गाजले. नाटयवेडया मराठी रसिकांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. अत्यंत नाजुक व भावुक विषयाला हाताळणारे हे नाटक वयोवृध्दांचा दृष्टीकोन बदलणारे ठरले कारण अनेक वृध्दांनी हे नाटक पाहिल्यावर आपले मृत्यूपत्र बदलले. तरूणांचाही वृध्दांकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला.

कुसुमाग्रज एक वेगळं व्यक्तिमत्व
त्यांच्या साहित्य प्रवासाबरोबर माणूस म्हणून त्याचं वेगळं व्यक्तिमत्व अभ्यासायचं तर अनेक पैलूनी ते पहावे लागेल. नाशिकमधील अनेक चळवळींचे ते प्रणेते होते. उदाहरणार्थ, त्यांनी लोकहितवादी मंडळ १९५० मध्ये सुरू केले. नाशिकच्या प्रसिध्द सार्वजनिक वाचनालयाचे ते १९६२ ते १९७२ पर्यंत अध्यक्ष होते. ते दशक वाचनालयाचे सुवर्णयुग म्हटले पाहीजे. सामाजिक वा वैयक्तिक अशा कुठल्याही प्रकल्पांना ते मार्गदर्शन करीत. कोणीही कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन मागण्यास आला तर क्षणात त्या व्यक्तीची क्षमता ओळखून ते मदत करीत. असं असूनही यश साजरं करतांना ते मागे राहणंच पसंत करत.

साहित्यसूर्य मावळला
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात कुसुमाग्रजांच्या निधनाने जी पोकळी निर्माण झाली ती कधीच भरून निघणार नाही. नाशिककरांना तर आपल्या घरातील वडीलधारं माणूस गमावल्याचं दु:ख आहे. मानवतेचा कळवळा व मराठी भाषेवरचं प्रभुत्व यामुळेच ‘नटसम्राट’ व ‘विशाखा’ सारखे साहित्य जन्माला आले. एवढं उत्तुंग कर्तृत्व व अनेक पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व अत्यंत साधे तर होतेच पण शेवटपर्यंत अत्यंत नम्र व सत्कार्याला वाहून घेतलेले जीवन ते शेवटपर्यंत जगले. शिक्षणक्षेत्रात त्यांनी खूप मार्गदर्शन केले. आजची परीक्षा पध्दती मुलांसाठी निष्ठुर पध्दती आहे असे त्यांचे मत होते. इतरही अनेक क्षेत्रात त्यांनी लोकांना योग्य मार्ग दाखवले. त्यांचे घर म्हणजे तीर्थक्षेत्र झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्थापण्यात आलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचे समाजातील गरीब, गरजू व मागासलेल्या जनतेसाठी योगदान वाखाणण्यासारखे आहे.
————-

जीवनपट

वर्ष                        वाटचाल
२७ फेब्रुवारी १९१२ : पुणे येथे जन्म, नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर दत्तक विधान व नामांतर – विष्णु वामन शिरवाडकर
१९१९ – २४ प्राथमिक शिक्षण – पिंपळगांव बसवंत
१९२४- २९ माध्यमिक शिक्षण – नाशिक येथील न्यू इंग्लिश स्कूल (आत्ताची जु. स. रुंगठा हायस्कूल, नाशिक)
१९२९ बालबोधमेवा (संपादक – दे. ना. टिळक) मध्ये लेखन व कविता, मॅट्रिक्युलेशन उत्तीर्ण मुंबई विद्यापीठ
१९३० हं. प्रा. ठा महाविद्यालयात प्रवेश व ‘रत्नाकर’ मासिकात कवितांना प्रसिध्दी
१९३२ काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात सहभाग
१९३३ धृव मंडळाची स्थापना, ‘नवा मनू’ मध्ये वृत्तपत्रीय लेखन, ‘जीवन लहरी’ या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
१९३४ बी. ए. परीक्षा उत्तीर्ण (मराठी – इंग्रजी)
१९३६-१९३८ गोदावरी सिनेटोनमध्ये प्रवेश, ‘सती सुलोचना’ कथालेखन व लक्ष्मणाची भूमिका
१९३८- १९४६ वृत्तपत्र व्यवसाय, साप्ताहिक प्रभा, दैनिक प्रभात, सारथी, धनुर्धारी, नवयुग इत्यादी. विशाखा काव्यसंग्रह प्रकाशित (१९४२)
१९४४ विवाह. पत्नीचे नाव मनोरमा ( माहेरचे नाव गंगुबाई सोनवणी )
१९४६ ‘वैष्णव’ पहिली कांदबरी. ‘दूरचे दिवे’ पहिले नाटक
१९४६-१९४८ साप्ताहिक ‘स्वदेश’ संपादन
१९५० लोकहितवादी मंडळ स्थापना, संस्थापक सदस्य, शालेय पुस्तकांचे संपादन
१९५६ अध्यक्षपद मुंबई उपनगर साहित्य (मालाड)
१९५९ संयुक्त्त महाराष्ट्राच्या चळवळीत सत्याग्रह
१९६० मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ६२ व्या वार्षिक उत्सवाचे अध्यक्षपद
१९६० राज्य पुरस्कार ‘मराठी माती’ (काव्यसंग्रह)
१९६२ राज्य पुरस्कार ‘स्वगत’ (काव्यसंग्रह)
१९६४ राज्य पुरस्कार ‘हिमरेषा’ (काव्यसंग्रह)
१९६४ अध्यक्षपद, ४५ वे मडगाव (गोवा) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिवेशन
१९६४ ‘जीवनगंगा’ नाशिक नगर पालिका शतसांवत्सरिक ग्रंथाचे संपादन
१९६६ राज्य पुरस्कार ‘ययाति आणि देवयानी’ या नाटकास
१९६७ राज्य पुरस्कार ‘वीज म्हणाली धरतीला’ नाटकास
१९६४-१९६७ पुणे विद्यापीठ विधी मंडळावर सदस्य
१९७० अध्यक्षपद, मराठी नाटय संमेलन, कोल्हापूर
१९७१ राज्य पुरस्कार ‘नटससम्राट’ नाटकास
१९६२-१९७२ अध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय, नाशिक
१९७२ सौ. मनोरमाबाईंचे निधन
१९७४ ‘नटसम्राट’ नाटकास साहित्य अकादमी पुरस्कार (ताम्रपट व पाच हजार रूपये)
१९८५ अखिल भारतीय नाटयपरिषदेचा राम-गणेश गडकरी पुरस्कार
१९८६ डि. लिट् पुणे विद्यापीठ
१९८७ अमृत महोत्सव
१९८८ संगीत नाटयलेखन अकादमी पुरस्कार
१९८८ ज्ञानपीठ पुरस्कार
१९८९ अध्यक्ष, जागतिक मराठी परिषद, मुंबई
१९९१ पद्मभूषण
१९९६ कुसुमाग्रज तारा
१० मार्च १९९९ कुसुमाग्रजांचे निधन
२००३ पोष्टाचे तिकीट प्रकाशन

बळी : नवी भर दि.१९-११-२०२०

कुसुमाग्रज जयंतिनिमित्त त्यांची एक सुंदर कविता

आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते………
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा……
– कुसुमाग्रज

नवी भर दि.१२-०४-२०२१


एका हिंदी कवीने म्हंटले आहे,

पाँव सूखे हुवे पत्तोंपे अदबसे रखना, धूपमें माँगी थी तुमने पनाह इनसे कभी !!!

नवी भर दि. ०४-०१-२०२२ :

चार होत्या पक्षिणी त्या,
रात्र होती वादळी
चार कंठी बांधलेली
एक होती साखळी॥

दोन होत्या त्यात हंसी,
राजहंसी एक ती
आणि एकीला कळेना
जात माझी कोणती॥

शुभ्र पंखांतून त्यांच्या,
वीज होती साठली
ना कळे एकीस की
माझी लियाकत कोठली॥

_तोडुनी आंधी तुफ़ाने,
चालल्या ती चालली
तीन होत्या दीपमाला
एक होती सावली॥

बाण आला एक कोठुन,
जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली
जात माझी कोकिळा॥

कोकिळेने काय केले?
गीत झाडांना दिले
आणि मातीचे नभाशी
एक नाते सांधले॥

मी सुरांच्या अत्तराने
रात्र सारी शिंपली
साधनेवर वेदनेवर
रागदारी ओतली॥

ती म्हणाली, एकटी मी
राहिले तर राहिले
या स्वरांचे सूर्य झाले
यात सारे पावले॥

– कुसुमाग्रज
स्वर : फैय्याज
संगीत : पं. वसंतराव देशपांडे
नाटक : वीज म्हणाली धरतीला

नवी भर दि. २८-०२-२०२२ :

आज ज्येष्ठ व श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस!!
मराठी भाषा गौरव दिन!
मनातली कविता ह्या आजच्या थीमसाठी माझ्या मनात कायमची रूजून बसलेली एक कविता कविवर्य कुसुमाग्रज ह्यांची आहे. शाळेत असताना इ.९ वी त ती पाठ्यपुस्तकात होती.
पृथ्वीचे प्रेमगीत
खगोल शास्त्रीय सत्य सुंदर प्रेमकाव्यात गुंफण्याची कवी कुसुमाग्रज यांची प्रतिभा व त्यांचे कौशल्य हे अतुलनीय आहे! पृथ्वी ही युगानुयुगे सूर्याच्या कक्षेत फिरते आहे व तिच्या ह्या परिभ्रमणामुळेच चराचर अस्तित्वात आहेत! हे एक खगोलशास्त्रीय सत्य ! ह्या खगोलशास्त्रीय सत्याला कुठेही बाधा न आणता सुंदर रूपक त्यांनी रचले.

पृथ्वी पूर्वी तप्त लाव्हा रसयुक्त होती व नंतर तिचा पृष्ठभाग थंड होत गेला हे आपणा सर्वांना माहिती आहे. हे सांगताना कुसुमाग्रज म्हणतात,
विझून आता यौवनाच्या मशाली उरी राहिले काजळी कोपरे

पहाटेच दारी उभा असलेला प्रेमळ शुक्र, लाजेने लाल झालेला मंगळ किंवा पिसाटापरी केस पिंजारलेला धूमकेतू,सन्यस्थ ध्रुव, तपाचार स्वीकारलेला सुधांशु (चंद्र) या सर्व खगोलशास्त्रीय या तत्त्वांवर आधारित कल्पना किती सुंदर आहेत, खगोलशास्त्रीय सत्य अबाधित राखले, एवढेच नाही तर एक उदात्त असे प्रेम काव्य त्यांनी रचले. ही कल्पनाशक्ती खरोखरच अद्वितीय आहे.
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्याहुनी साहवे

ह्या पृथ्वीच्या मनोगताने तर प्रेमाला एक वेगळेच परिमाण दिले आहे!
ऐकू या, ही सुंदर कविता कुसुमाग्रजांच्या स्वतः च्या आवाजात!!! ☘️☘️ (ध्वनिफीत देऊ शकत नाही. क्षमस्व)

पृथ्वीचे प्रेमगीत – कुसुमाग्रज👆

युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करु प्रीतीची याचना

नव्हाळीतले ना उमाळे उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझोनी आता यौवनाच्या मशाली
ऊरी राहीले काजळी कोपरे

परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न नेणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा
मला वाटते विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेजःकण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारुनी दारुण

निराशेत सन्यस्थ होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव

पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी
लाल होऊनिया लाजरा मंगळ

परी दिव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तूझ्या
स्मृतीने उले अन् सले अंतर

गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धुलिःकण
अलंकारण्याला परी पाय तूझे

धुळीचेच आहे मला भूषण

निळा पक्षी – कुसुमाग्रज

नवी भर दि. २७-०२-२०२३ :

माझ्या मराठी मातीचा

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दर्‍याखोर्‍यांतील शिळा

हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात

नाही पसरला कर, कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मान

हिच्या गगनांत घुमे, आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहूंत, आहे समतेची ग्वाही

माझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर, मला हिचे महिमान

रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी
चारी वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखी

रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर
येथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घर

माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान
हिच्या दारिद्य्रात आहे, भविष्याचे वरदान

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतील, मायदेशांतील शिळा

गीतकार : कुसुमाग्रज

२. कवी आणि राजकारणी     

दि. १४-०२-२०२०

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात ज्यांनी गांवोगांवी काव्यवाचनाचे प्रयोग करून मराठी कवितांना लोकप्रियता मिळवून दिली त्या कवींमध्ये विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर हे प्रमुख होते. राजकारणी लोकांचे वागणे त्यांच्या संवेदनशील मनाला कसे खुपत होते हे त्यांनी असे व्यक्त केले आहे.

१.विंदा करंदीकर : सब घोडे बारा टक्के!

जितकी डोकी तितकी मते जितकी शिते तितकी भूते;
कोणी मवाळ कोणी जहाल कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढीले कोणी घट्ट; कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!

गोड गोड जुन्या थापा (तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग, जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार? आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्या मधे पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के, सब घोडे बारा टक्के!

जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी;
(जिकडे टक्के तिकडे टोळी) ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता; पुन्हा पुन्हा जुनाच वार
मंद घोडा जुना स्वार; याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!

सब घोडे! चंदी कमी; कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी; कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा, मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा; कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्ऱ्या कोणी छक्के; सब घोडे बारा टक्के!

__विंदा करंदीकर

२. मंगेश पाडगांवकर
१९८१ सालातील मंगेश पाडगावकर रचित ही कविता कालबाह्य कधी होईल ???

थोर आपण मानिली
ही भ्रष्ट सारी माकडे…
अन् दिले हातांत त्यांच्या
पेटलेले काकडे !

कां अता छाती पिटावी
लागतां आगी घरां…
देव येइल कोणता
हे निस्तराया सांकडे !

धर्म यांचा मारणे
सोयीप्रमाणे या उड्या…
याचसाठी लाभलेले
पाय यांना फाकडे !

काल ज्या झाडांवरी
ही आश्रयाला थांबली…
आज ही शत्रूप्रमाणे
पाहती त्यांच्याकडे !

जा कुठेही हीच तेथे
चेहरे फेंदारुनी…
पाय जेथे टाकिती
ते सर्व रस्ते वाकडे !

पक्ष यांचा कोठला,
टोळी तयांची कोठली ?
जात यांची एक अंती,
प्रश्न सारे तोकडे !

हालवोनी शेपट्यांना
घोषणा यांनी दिल्या…
आणि तुमच्या चितेस्तव
शोधुनी ही लाकडे !

🙉🙈🙊
——————————
-मंगेश पाडगांवकर : १० मार्च, १९८१ 🙏🏻

वॉट्सअॅपवरून साभार  दि. १४-०२-२०२०


३. कवी पी.सावळाराम

पी सावळाराम

लेखक : माधव विद्वांस

जनकवी, ठाणे नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष पी. सावळाराम यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म कोल्हापूर जवळील येडेनिपाणी येथे 4 जुलै 1913 रोजी झाला.त्यांचे मूळ नाव निवृत्ती रावजी पाटील असे होते. विधान परिषदेचे सभापती वि. स. पागे यांनी ह. ना. आपटे यांच्या ‘उष:काल’ या कादंबरीतील ‘सावळ्यातांडेल’ या पात्रावरून त्यांना प्रेमाने ‘पी. सावळाराम’ हे नाव दिले. ते नावच नंतर रूढ झाले.

त्यांचे प्राथमिक शिक्षण येडेनिपाणी येथे झाले. पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते कोल्हापूर येथे गेले. तेथे कविवर्य माधव ज्युलियन हे त्यांना प्राध्यापक होते.कॉलेजमध्ये असताना ‘सौंदर्य नसते रंगात। सौंदर्य असते अंतरंगात। उघडुनि पाही।’ या ओळी असलेली ‘काळा गुलाब’ ही कविता लिहिली. वर्ष 1943 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर ते कुर्ला-मुंबई येथे रेशनिंग ऑफिसमध्ये रुजू झाले. वर्ष 1949 मध्ये ‘राघू बोले मैनेच्या कानात’ हे त्यांचे पहिले भावगीत एचएमव्हीने ध्वनिमुदित केले. ‘राम राम पावणं’ या चित्रपटाचे गीतलेखनही त्यांनी केले. गीत लेखनाला वेळ देता यावा यासाठी कुर्ल्याच्या रेशनिंग ऑफिसमधील सरकारी नोकरी त्यांनी सोडली. सुमारे 50 हून अधिक चित्रपटांच्या कथा-पटकथांचे लेखन त्यांनी केले. त्यांच्या कवितेत भाव, भक्‍ती, कुटुंबातील संबंध हळुवारपणे गुंफले आहेत.त्यामुळे त्यांच्या सर्वस्पर्शी कविता पाहून कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी त्यांना ‘जनकवी’ ही उपाधी दिली. कुसुमाग्रज असे म्हटले आहे, पी. सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांद्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत- नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरातही पोहोचले आहेत.

पंढरपुरातील पुजाऱ्यांच्या विळख्यात अडकलेला विठोबा पाहून ‘पंढरीनाथ झडकरी आता पंढरी सोडून चला विनविते रखुमाई विठ्ठला’ हे गीत सुचले. ‘गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा’ हे गीतही सगळ्यांनाच भावले. सर्वच घरात हा प्रसंग येतोच. तीनच कडव्यांचे हे गीत हेलावून टाकते.

‘गोड गोजरी लाज लाजरी’ या गीतातून लहान भावंडांचे आपल्या मोठ्या बहिणीचे कौतुकही दिसून येते’. ‘ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता’ या गीतातून ज्ञानदेव देवालाच गीता सांगतो ही किती उत्तुंग कल्पना, त्यातून मराठी व ज्ञानदेवाची थोरवी ध्वनित होते. ‘माझ्या शेतात सोनंच पिकतंय पानापानात लखलख करतंय साता समिंदराचं माणिक मोती’ या कवितेतून त्यांच्यातील मूळचे मातीशी असलेले नातेही दिसून येते. ‘पुत्र व्हावा ऐसा’, ‘नांदायला जाते’, ‘कन्यादान’, ‘सलामी’ आणि ‘बेरडाची अवलाद’ या चित्रपटांच्या कथाही लिहिल्या. 1982 सालच्या ‘गदिमा’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. 1985 मध्ये जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी त्यांनी भूषविले होते.

——————
पी.सावळाराम यांची गाजलेली गीते

१. कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला
वैभवाने बहरुन आला, याल का हो बघायाला
तुम्ही गेला आणिक तुमच्या देवपण नावा आले
सप्तस्वर्ग चालत येता थोरपण तुमचे कळले
गंगेकाठी घर हे अपुले तीर्थक्षेत्र काशी झाले!
तुम्हावीण शोभा नाही वैभवाच्या देऊळाला
सूर्य-चंद्र तुमचे डोळे दुरुनीच ते बघतात
कमी नाही आता काही कृपादृष्टीची बरसात
पाच बोटे अमृताची पंचप्राण तुमचे त्यात
पाठीवरी फिरवा हात या हो बाबा एकच वेळा
https://www.youtube.com/watch?v=bTNOY03Dxgs

२. कृष्णा मिळाली कोयनेला
तसंच माझं माहेरबाई, येऊन मिळालं सासरला

कृष्णेचं पाणी, कोयनेचं पाणी एकरुप झालं, आलिंगनी बाई आलिंगनी
ओळाखायचं सांगा कसं कुणी ?
संसाराच तीर्थ बांधलं, लक्ष पायऱ्या घाटाला

एक आईच्या पोटी येऊनी, ताटातूटी जन्मापासूनी
सासर माहेर नाव सांगूनी, नयनी नातं गहिवरुनी
बहीण भेटली बहिणीला

शतजन्माची ही पुण्याई, घेऊन आली कृष्णामाई
कोयना येई झुलवित डोई, मंगल घट ते न्हाऊ घालण्या
सुवासिनीच्या प्रीतीला
https://www.youtube.com/watch?v=D3SE3LAVF9s

३. कोकिळा गा गा गा रे
भूलोकीच्या गंधर्वा तू अमृतसंगीत गा, गा रे
सप्तसुरांचा स्वर्ग उभारून
चराचराला दे संजीवन
अक्षय फुलवित हे नंदनवन
पर्णफुलांतून गा
कुहुकुहु बोलत मधुर गायनी
मोहित होता सारी अवनी
कुसुमकोमला ही वनराणी
नाचत थयथय गा
मन्मथ मनीचा इंद्रधनुला
शरपंचम तो लावुनी आला
प्रीत भेटता अनुरागाला
मिलन होऊन गा
https://www.youtube.com/watch?v=plc7BF1x8JA

४. गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का ?
जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा

कडकडुनी तू मिठी मारता बाळे,
बाळपण आले, आले, घुमवित घुंगुरवाळे
आठवले सारे सारे, गहिवरले डोळे
कढ मायेचे तुला सांगती, जा

दारात उभी राहिली खिलारी जोडी
बघ दीर धाकले बसले, खोळंबुन गाडी
पूस ग डोळे या पदराने, सावर ही साडी
रूप दर्पणी मला ठेवुनी जा

मोठयांची तू सून पाटलिण मानाची
हसले तुझे ग, हिरवे, बिलवर लगीनचुडे
बघु नकोस मागे मागे, लाडके बघ पुढे
नकोस विसरू परि आईला, जा
https://www.youtube.com/watch?v=qgfk6OrWuOA

५. जो आवडतो सर्वाला तोचि आवडे देवाला
दीन भुकेला दिसता कोणी, घास मुखीचा मुखी घालुनी
दुःख नेत्रिचे घेता पिउनी, फोडी पाझर पाषाणाला
घेउनि पंगू अपुल्या पाठी, आंधळ्याची होतो काठी
पायाखाली त्याच्यासाठी, देव अंथरि निज हृदयाला
जनसेवेचे बांधुनि कंकण, त्रिभुवन सारे घेई जिंकुन
अर्पुन अपुले दृढ सिंहासन, नित भजतो मानवतेला
https://www.youtube.com/watch?v=vxgrKmKj518

नवी भर दि. ०४-०७-२०२१

गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जेथे सागरा धरणी मिळते अशी सुंदर भावगीते रचणाऱ्या जनकवी पी सावळाराम यांची आज जयंती (०४-०७-२०२१)
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ज्यांना ‘जनकवी’ या उपाधीने गौरविले ते ठाणे नगरपालिकेचे नगराध्यक्षही होतें राघू बोले मैनेच्या कानात हे त्यांचे पहिले भावगीत एचएमव्हीने ध्वनीमुदित केले. राम राम पावणं या चित्रपटाचे गीतलेखन त्यांनी पहिल्यांदा केले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. सुमारे ५० हून आधिक चित्रपटांच्या कथा – पटकथाचे लेखन त्यांनी केले. जनकवींनी लिहिलेल्या २५० हून अधिक गीतांचे पार्श्वगायन लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, तलत मेहमूद, मन्ना डे, ह्लदयनाथ मंगेशकर या सारख्या दिग्गजांनी केले. सावळाराम यांचा आणखीही एक विशेष दिसून येतो. तो म्हणजे संतसाहित्याचे, लावणी-पोवाडय़ांचे, लोकगीतांचे त्यांनी केलेले परिशीलन होय. त्यामुळे त्यांची रचना ग्रांथिक, विद्वज्जड वा क्लिष्ट न वाटता ती लोकभाषेला सहजपणे जवळ जाणारी आणि तिच्यातील नादमाधुर्य टिपणारी आहे. उदाहरणार्थ, ‘ज्ञानदेव बाळ माझा’, ‘विठ्ठल तो आला आला’ व ‘सखू आली पंढरपुरा’ ही गीते. इथे संतांबद्दलचा अतीव जिव्हाळा आणि सगुण उपासनेचे मर्म ते सहज पकडतात. पण त्याचबरोबर एखादी लावणी लिहिताना ते लावणीचा म्हणून जो ठसका असतो, तिथे नायिकेची प्रेमासंबंधातली जी धिटाई असते ती ते नेमक्या शब्दांमध्ये टिपतात. उदाहरणार्थ, ‘काल रातीला सपान पडलं’ किंवा ‘तुला बघून पदर माझा पडला’ या त्यांच्या लावण्या पाहाव्यात.
सावळारामांनी जवळजवळ सातशे-आठशे गीते लिहिली. त्यांपैकी पाचशे-सहाशे रेकॉर्डवर आली. लता मंगेशकर-आशा भोसले यांच्या सुरेल सुरांमध्ये ती ध्वनिमुद्रित झाल्याने घराघरात पोहोचली.
पी. सावळाराम यांची गाजलेली १२५ गीते
अपुरे माझे स्वप्‍न राहिले —- अरुण उगवला अनुरागाचा —— असावे घर ते अपुले छान —–आई कुणा म्हणू मी —– आई होऊन चुकले का मी आठवणींनो उघडा डोळे —– आली दिवाळी आली दिवाळी—–आली हासत पहिली रात —– उघडी द्वार पूर्वदिशा — उठि गोविंदा उठि गोपाला —–ओळख पहिली गाली हसते—ओळखले मी ओळखले —— कलेकलेने चंद्र वाढतो—-कल्पवृक्ष कन्येसाठी ——-का चिंता करिसी—— काय करू मी बोला —– कुबेराचं धन माझ्या शेतात ——कोकिळ कुहुकुहु बोले —- कृष्णा मिळाली कोयनेला—–खरा ब्राम्हण नाथची —- गळ्यात माझ्या तूच—–गा रे कोकिळा गा —- गोड गोजरी लाज लाजरी —– गोड तुझ्या त्या स्वप्‍नामधली—— गंगा जमुना डोळ्यांत उभ्या
गंध फुलांचा गेला ——- घट डोईवर घट कमरेवर —- घरोघरी वाढदिन —– चंद्र तोच अन्‌ तेच तारे —–चंद्रकळा रुक्मिणी नेसली — चंद्रा रे मी तुझी रोहिणी—– चंपक गोरा कर कोमल —- छुन छुन बोलतीया —- जनता येथे राज्य करी—–जय देवी मंगळागौरी —-जिथे सागरा धरणी मिळते —– जीवित माझे हवे तुला —–जो आवडतो सर्वांला —— जो तो सांगे ज्याला त्याला ——टक्‌टक्‌ नजर पडतोय्‌ —–डाव टाका नजर माझी —-तुजसाठी शंकरा भिल्लीण—-तुझे डोळे पाण्याने भरले —-तुझ्याचसाठी तुझे घेउनी —–तू असता तर कधि नयनांनी —– तू सहज मला पाहिले —– तूच कर्ता आणि करविता ——दर्पणी बघते मी गोपाळा —– दिलवर माझा नाही आला ——दे कंठ कोकिळे मला—— देव जरी मज कधी भेटला—— देवरूप होऊ सगळे ———देशिल का रे मजला क्षणभर—— धागा धागा अखंड —– नशिब शिकंदर माझे—— नसता माझ्या मनात काही —–नसती झाली भेट तुझी ती —–नीज गुणिले नीज लवलाही —–पर्णपाचू सावळा सावळा —-पाहिलेस तू ऐकिलेस तू —–पाहुणा म्हणूनी आला—–पूर्व दिशेला अरुणरथावर—— पैठणी बिलगुनी म्हणते—–पंख हवे मज पोलादाचे —– पंढरीनाथा झडकरी —-प्रीत माझी पाण्याला जाते—– प्रीत सागरी तुझ्या स्मृतीचे —– प्रेम करुन मी चुकले—–प्रेम तुझ्यावर करिते मी —–प्रेमा काय देऊ तुला—–फुटतो पान्हा पुन्हा—– बघता हसुनी तू मला —– बघा ना छळतो हा —–बाळा होऊ कशी उतराई —–भक्‍तिच्या फुलांचा बोलतो——-मजवरी माधव रुसला बाई ——मनात नसता काहि गडे —– मनात नसता तुझ्या गडे——-मनी वसे जे स्वप्‍नी दिसे —–महाराष्ट्राच्या कृष्णेकाठी —-माझिया नयनांच्या कोंदणी —— माझ्या शेतात सोनंच —–मानसकन्या कण्वमुनींची —– मानसीचा चित्रकार तो —-मी आज बहिण हो भावाची —— मुली तू आलीस अपुल्या —- मूर्त रूप जेथे ध्यान —–मोहरला मधुमास —–म्हण भाबडी तू —–म्हणे यशोदा माझा —-यश हे अमृत झाले —-रघुनंदन आले आले —–रघुपति राघव गजरी गजरी—-राधा कृष्णावरी भाळली—–राधा गौळण करिते —- रामा हृदयी राम नाही—–रिमझिम पाऊस पडे —— लख लख चांदणं—–लेक लाडकी या घरची —- वसंत जेथे तेथे सुमने——विठु माझा लेकुरवाळा —–विठ्ठल तो आला आला —-विठ्ठल रखुमाईपरी — विठ्ठला समचरण तुझे —- वीणावती मी तुझी प्रियकरा —– शपथ दुधाची या —- शिकवितेस तू शिकता — शिका शिका रे शिका—-शेत बघा आलंया —- शंकर भेटता मजसी —– सखी ग मुरली मोहन —सखू आली पंढरपूरा —-सजू मी कशी —-सप्‍तपदी हे रोज चालते —– सारी भगवंताची करणी Sari —– सावध हरिणी सावध —–सुख येता माझ्या दारी —–सांग धावत्या जळा—- सांजवात लाविते —स्वप्‍न उद्याचे आज — हरवले ते गवसले का —- हसले आधी कुणी Hasale—- हसले ग बाई हसले—- हसुनि एकदा मला मुकुंदा —-हर्षाचा वर्षाचा दिवाळीहासता मी हाससी का—- हिरव्या कुरणी घडली कहाणी —- ज्ञानदेव बाळ माझा—- हृदयी जागा तू अनुरागा — श्रीरामा घनश्यामा बघशिल”

नवी भर दि.२१-१२-२०२१ : २५० चे वर भाव आणि भक्ती गीत लिहिणारे व अभ्यासू नगराध्यक्ष अशी ओळख असणाऱ्या पी. सावळाराम (निवृत्तीनाथ रावजी पाटील ) यांचे आज पुण्यस्मरण . गीत लेखनाला न्याय देता यावा यासाठी कुर्ल्याच्या रेशनिंग ऑफिसमधील सरकारी नोकरीला त्यांनी रामराम ठोकला. एचएमव्हीच्या वसंत कामेरकर (अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे वडील) यांनी त्यांच्यातला गीतकार हेरला. राघू बोले मैनेच्या कानात हे त्यांचे पहिले भावगीत एचएमव्हीने ध्वनीमुदित केले. राम राम पावणं या चित्रपटाचे गीतलेखन त्यांनी पहिल्यांदा केले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. सुमारे ५० हून आधिक चित्रपटांच्या कथा – पटकथाचे लेखन त्यांनी केले. जनकवींनी लिहिलेल्या २५० हून अधिक गीतांचे पार्श्वगायन लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, तलत मेहमूद, मन्ना डे, ह्लदयनाथ मंगेशकर या सारख्या दिग्गजांनी केले. . . . . . . माधव विद्वांस .. फेसबुकवरून साभार.

. . . . .

नवी भर दि. १४-१२-२०२२ :

जनकवी पी.सावळाराम

सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणीचे निवृत्तीनाथ रावजी पाटील ह्यांना जनकवी पी.सावळाराम म्हणून सारे जग ओळखते. जनकवी,ही पदवी कसुमाग्रजांनी पी. सावळाराम यांना दिली.सावळाराम ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. स्वत:च्या कवितांवर मतं मिळवून नगराध्यक्ष पद मिळविणारा हा जगातला पहिला कवी. एकदा मुलाखत देताना ते म्हणाले होते,‘गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का,जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा..’‘या एका गीतावर मी नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो आहे,’ आणि ते खरेच होते.

पी. सावळाराम यांच्या गाण्यातून स्त्री-सुलभ भावना सगळ्यात प्रभावीपणे व्यक्त झाल्या.त्यांची गाणी एकाहून एक सुंदर आहेत.त्या पैकी स्त्रीचं अवघं भावविश्व एका महत्वाच्या घटनेवर आधारीत असतं, ती घटना म्हणजे तिचं लग्न आणि पुढचं आयुष्य.स्त्री मनाची हळुवार रूपं साकारणारा कवी सावळारामांच्या गीतांतून दिसतो.

चला तर,करूया सुरवात

मुलगी मोठी झाली, यौवनात पदार्पण करताना सारखं आरशापुढे उभं राहून स्वतःच्या प्रतिबिंबाला न्यहाळतांना ती म्हणते
ओळख पहिली गाली हसते,सांग दर्पणा कशी मी दिसते

अशातच एक दिवस तिला तिचा जिवलग भेटतो. दोघे एकमेकांकडे तिरके कटाक्ष टाकू लागतात, अंतरीची खूण पटल्यावर दोघेजण एकमेकांना म्हणतात
हसले आधी कुणी तू का मी

मग सुरु होतो प्रेमाचा सिलसिला आणि सार जग तिला सप्तरंगी दिसायला लागत, तिला स्वप्नातला राजकुमार भेटला आहे म्हणून ती म्हणते
हसले ग बाई हसले अन कायमची मी फसले

आता तिने इतके म्हटल्यावर तो राजकुमार थोडाच गप्प बसणार तो देखील तिला म्हणतो
मानसीचा चित्रकार तो,तुझे निरंतर चित्र काढतो

दोघांचेही प्रणयाराधन जोरात सुरु असताना तिच्या कल्पनेला नव नवीन धुमारे फुटू लागतात आणि ती गाणी म्हणू लागते
गंध फुलांचा गेला सांगून
भूलोकीच्या गंधर्वा तू अमृत संगीत गा,गा रे कोकिळा गा
कोकीळ कुहू कुहू बोले
जिथे सागरा धरणी मिळते

तो ही काही कमी नाही त्याने देखील गाण्यातच तिला उत्तर दिले
मनात नसता तुझ्या गडे,नकळत का मग असे घडे

मग रीतसर पाहण्याचा कार्यक्रम पार पडला आणि लग्न नक्की झालं,मग काय तिच्या बहिणी तिला म्हणू लागल्या
गोड़ गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी,फुला फुलांच्या बांधून माळा मंडप घाला ग दारी

आता तिला देखील तिकडचे वेध लागले आहेत म्हणून ती म्हणते
लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची

बघता बघता आतुरतेने वाट बघत असलेला तो दिवस उजाडला आणि लग्न झाले,त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले,त्या मुळे आनंदून गेलेली ती नवोढा पत्नी,त्याला म्हणतेय
गळ्यात माझ्या तूच जिवलगा मंगलमणि बांधले,जन्मोजन्मीची सुवासिन मी तुझ्यामुळे जाहले

आता पुढचा विधी म्हणजे सप्तपदी,एकमेकांना सात जन्म सोबत करण्याचे आश्वासन देताना ती म्हणते आहे, सात जन्मच काय,आपले नाते तर शंभर जन्मांचे आहे आणि म्हणते,
सप्तपदी हे रोज चालते, तुझ्या सवे ते शतजन्मीचे हो माझे नाते

सप्तपदी झाल्यावर सर्वार्थाने त्याची झालेली ती आतुर अभिसारिका त्याला म्हणते,मी माझा हात विश्वासाने तुझ्या हातात दिला आहे,आता पुढची सगळी वाटचाल तू म्हणशील तशी करू असे सांगताना म्हणते
चंपक गोरा कर कोमल हा करात तुझिया देते,नेशील तेथे येते

लग्न झाले आता वेळ आली लेकीची पाठवणी करण्याची.लाडात वाढवून मोठ्या केलेल्या लाडक्या लेकीला निरोप देणारी आई स्वतःच्या डोळ्यातले अश्रू थोपवून लेकीला सांगते आहे.
गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का,जा मुली जा,दिल्या घरी तू सुखी रहा

नवी नवरी माहेर सोडून सासरी आली,सारे काही तिच्या मनाजोगे झाले असले तरी सासरच्या इतर माणसांबरोबर आणि खास करून सासूबरोबर आपले छान जुळेल ना,या विचाराने कावऱ्या बावऱ्या झालेल्या सुनेला आश्वस्त करताना प्रेमळ सासू सुनेला सांगते आहे, मला तुझ्या मनीचे काहूर कळले आहे. पण अजिबात काळजी करू नको,मी देखील मुलीची आई आहे आणि काही वर्षांपूर्वी सून म्हणून या घरी आले आहे, मी तुझी आई होईन आणि तू देखील माझी मुलगीच हो असे सांगताना सासूच्या ओठी शब्द आले.
लिंबलोण उतरता अशी का झालीस ग बावरी, मुली तू आलीस अपुल्या घरी

सासरच्या घरातला तिचा पहिलाच दिवस आणि येणाऱ्या रात्रीची आतुरतेने वाट बघणाऱ्या त्या प्रियेला आसुसून ओढ लागते आणि ती म्हणते
आली हसत पहिली रात,उजळत प्राणांची फुलवात

रात्र सरली,पहाटेची शुक्राची चांदणी उगवली आणि गात्रा गात्रातून तृप्त झालेली ही ललना गुणगुणते
माझिया नयनांच्या कोंदणी,उमलते शुक्राची चांदणी
हृदयी जागा तू अनुरागा,प्रीतीला या देशील का ?

उजाडायला लागले,साऱ्या घराला हलके हलके जाग येऊ लागली आहे.पहाटवारा अंगणातल्या प्राजक्ताला मिठी मारतोय त्या मुळे अंगणभर प्राजक्ताचा सडा पडला आहे, आणि तिच्या ओठी भूपाळीचे सूर येतात
उठी गोविंदा उठी गोपाळा,हलके हलके उघड राजीवा नील नेत्रकमला

लग्न होऊन थोडे दिवस झाले ,बघता बघता श्रावण महिना आला सुद्धा आणि मंगळागौरीचे व्रत करून, पतीसाठी दीर्घायुष्य मागताना देवीची प्रार्थना करते
जयदेवी मंगळागौरी, सुवासिन मी तुला पूजिते

आता तिला वेध लागले आहेत दिवाळीचे.भाऊबीजेला भाऊ येणार म्हणून आनंदित झालेली बहीण म्हणते आहे
आली दिवाळी आली दिवाळी,घर घर उजळीत मानवतेचे तेजाच्या पाउली

कालांतराने नव्या पाहुण्याचे घरी आगमन होते , त्या आनंदात आई झालेली ती, बाळाला सांगतेय
बाळा होऊ कशी उतराई? तुझ्यामुळे मी झाले आई

पाठोपाठ बारशाचा दिवस आला .बोलावलेल्या सख्या जमल्या आणि सगळ्या गाऊ लागल्या
कुणी गोविंद घ्या ,कुणी गोपाळ घ्या,या ग सयांनो,या ग या

बाळाची पावले सगळ्या घरभर दुडदुडू पडतायत, त्या मुळे आनंदी आनंद आहे,तो आनंद साजरा करताना ती मायाळू माता म्हणते
कलेकलेने चंद्र वाढतो चिमणा नंदाघरी

सासरी ती आता रूळली आहे तिच्या बऱ्याच इच्छा आकांक्षा पुऱ्या झाल्या आहेत,आता आपले घर कसे असावे याचे संकल्प चित्र आता तिच्या डोळ्यापुढे येत आहे ते गाण्यातून सांगताना ती म्हणते
असावे घर ते अपुले छान

आजचे लिखाण बरेच लांबले आहे याची जाणीव आहे ,पण वाचताना कुणीही कंटाळणार नाही याची देखील खात्री आहे.
आता शेवटाकडे जाताना,जीवनातली कृतार्थता अनुभवताना देवाजवळ देखील स्वतःसाठी काही न मागता तिने तिच्या बाळासाठी मागणे मागितले.
देव जरी मज कधी भेटला
माग हवे ते माग म्हणाला
म्हणेन प्रभू रे माझे सारे
जीवन देई मम बाळाला

स्त्रीमनाचे पैलू उलगडून दाखवताना सावळारामांनी अशी वेगवेगळी गाणी लिहिली

आजचा अख्खा लेख म्हणजे गाणं,गाणं आणि गाणं पण सगळीच गाणी एकाहून एक सुंदर

निवृत्ती रावजी पाटील उर्फ पी.सावळाराम यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

. . . वॉट्सॅपवरून साभार दि.१४-०२-२०२२

*************************************


४. कवी अनिल

आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांचा स्मृती दिन
(८ मे,१९८२)

मुर्तिजापूर ह्या गावी त्यांचा जन्म ११ सप्टेंबर, १९०१ (9/11 !) रोजी झाला. तेथेच शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर ते १९१९ मध्ये पुण्याला आले. फर्गसन महाविद्यालय येथे कलाशाखेचा पदवी मिळवलीपदवी मिळवल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी ते कोलकाता इथे गेले . ह्याबाबत अब्रिंद्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बसू ह्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले . त्यानंतर १९३५ साली विधिशाखेची पदवी त्यांनी संपादली. सनद घेतल्यावर त्यांनी वकिलीचा व्यवसाय केला.
त्यांची लोकप्रिय गाणी

अजुनी रुसून आहे.
आज अचानक गाठ पडे.
केळीचे सुकले बाग.
गगनी उगवला सायंतारा.
बाई या पावसानं
थकले रे डोळे माझे.
वाटेवर काटे वेचीत चाललो
वेळ झाली भर मध्यान्ह
कुणी जाल का ,सांगाल का.

एखादी संध्याकाळ हसत हसत अवतरते आणि मन प्रसन्न करुन जाते. मात्र एखादी निरव संध्याकाळ उदासीची छाया घेऊन येते नि प्रत्यक्षात काहीही उदासवाणं घडलेलं नसतानाही, जीव कातर होतो. अशावेळी आपण एकटे असलो, तर अधिकच एकाकी वाटायला लागतं. एकटेपणाची-एकाकीपणाची ही जाणीव जीवघेणी असते. विरहाची उजळणी करणारी असते.

जेव्हा एखादी संध्याकाळ अंगावर येते, तेव्हा कवी अनिल यांची गाणी मनात रुंजी घालू लागतात . कारण ती गाणी विरहवेदना, एकांत अधिक गहिरा करणारी आहेत. मनात एखादा भाव जागृत झाल्यावर जर विशिष्ट गाणी आठवत असतील, तर ते त्या गाण्याचं यशच म्हणायला हवं.अगदी उदाहरण देऊन सांगायचं तर अनिलांचं “केळीचे सुकले बाग असुनिया पाणी” हे गाणं आठवून पाहा-म्हणजे काय म्हणायचे आहे ते लक्षात येईल.

प्रसाद जोग.सांगली.

वॉट्सअॅपवरून साभार दि.०८-०५-२०२०

. . . . .
वेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन
नको जाऊ कोमेजून, माझ्या प्रीतिच्या फुला
तप्‍त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी
कसा तरी जीव धरी, माझ्या प्रीतिच्या फुला
वाहतात वारे जळते, पोळतात फुलत्या तनुतें
चित्त इथें मम हळहळते, माझ्या प्रीतिच्या फुला
माझी छाया माझ्याखाली, तुजसाठी आसावली
कशी करू तुज सावली, माझ्या प्रीतिच्या फुला
दाटे दोन्ही डोळां पाणी, आटे नयनांतच सुकुनी
कसे घालु तुज आणुनी, माझ्या प्रीतीच्या फुला
मृगजळाच्या तरंगात, नभाच्या निळ्या रंगात
चल रंगू सारंगात, माझ्या प्रीतीच्या फुला
.
गीत – आ. रा. देशपांडे ‘अनिल’
संगीत – यशवंत देव
स्वर – उषा मंगेशकर
राग – खमाज
गीत प्रकार – भावगीत

#मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक कवि अनिल यांचा आज स्मृतिदिन
कवी अनिलांचा जन्म सप्टेंबर ११, इ.स. १९०१ रोजी मुर्तिजापूर ह्या गावी झाला. तेथेच शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर ते इ.स. १९१९ पुणे शहरास आले. फर्गसन महाविद्यालय येथे कलाशाखेचा पदवी अभ्यासक्रम करीत असतानाच कुसुम जयवंत ह्या तरुणीशी परिचय, त्याचे पुढे प्रेमात रूपांतर आणि ऑक्टोबर ६, १९२९ ला विवाहात परिणती.पदवी मिळवल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कोलकाता इथे प्रयाण. ह्याबाबत अब्रिंद्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बसु ह्यांचे मार्गदर्शन. त्यानंतर १९३५ साली विधिशाखेची पदवी. सनद घेतल्यावर वकिलीचा व्यवसाय. १९४८ साली मध्यप्रदेश सरकारतर्फे सामाजिक शिक्षण संस्थेचे उप-मुख्याधिकारी म्हणून नेमणूक. १९५६ साली राष्ट्रीय मूलभूत शिक्षण केंद्र, दिल्ली इथे मुख्याधिकारी या, आणि पुढे १९६१ साली भारत सरकारच्या समाज शिक्षण मंडळाचे सल्लागार ह्या पदांवर नेमणुका.असा मार्गक्रम करत असताना मराठी वाङ्मयात महत्त्वाचे योगदान. कवी अनिलांना इ.स. १९७९ची साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान करण्यात आली.मे ८, इ.स. १९८२ रोजी नागपूरला निर्वाण.
श्री.माधव विद्वांस
                         . . . . . . . .. फेसबुकवरून साभार दि.०८-०५-२०२०
************************************************

५. कवी गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी)

ज्यांनी महाराष्ट्र गीत लिहिले, तसेच एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, आणि ‘भावबंधन’ अशी सुंदर नाटके लिहिणारे शब्दप्रभू श्री.राम गणेश गडकरी,यांची आज जयंती

राम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम) (मे २६, इ.स. १८८५; नवसारी, गुजरात – जानेवारी २३, इ.स. १९१९; सावनेर
हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले.
वाग्वैजयंती हा गडकर्‍यांचा एकमेव काव्यसंग्रह. त्यातील कवितांचे वैविध्य लक्ष वेधून घेणारे आहे. मुक्तच्‍छंदापासून ते छंदबद्ध कवितेपर्यंत, आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत.

आज गडकरींच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांची एक सुंदर कविता

एखाद्याचे नशीब

काही गोड फुले सदा विहरती स्वर्गांगनांच्या शिरी,
काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरी ;
काही जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि ते ;
एकादें फुटके नशीब म्हणुन प्रेतास शृंगारिते !
कोणी पर्वत आपुल्या शिरिं धरि हेमप्रभा शीतला,
कोणाच्या उदरामधून निघती मोठया नद्या निर्मला ;
कोणाला वनदेवता वरितसे मोदांत जी नाहते,
एकाद्यामधुनी परंतु जळती ज्वालानदी वाहते !
झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळया पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !
चाले खेळ असा जगांत; बहुधा सौख्यांत सारे जरी,
एखादा पडतो तसाच चुकुनी दुःखार्णवी यापरी
पाही कोण अशा हताश हृदया? जो तो असे आपला,
देवा ! तू तरि टाकि अश्रु वरुनी, त्यासाठी तो तापला !

विकीपीडियावर मिळालेली माहिती

राम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम) (मे २६, इ.स. १८८५; नवसारी, गुजरात – जानेवारी २३, इ.स. १९१९; सावनेर) हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला ‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, आणि ‘भावबंधन’ ही चार पूर्ण नाटके (आणि ‘राजसंन्यास’ आणि ‘वेड्यांचा बाजार’ ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहिली.

राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा ’शेक्सपियर’ समजले जाते.

विविध नाट्यप्रेमी संस्थांनी, राम गणेश गडकरी यांच्या आणि त्यांची पत्‍नी रमाबाई यांच्या नावाने नाटककारांसाठी आणि नाट्याभिनयासाठी अनेक गडकरी पुरस्कार ठेवले आहेत.

नागपूरला ’राम गणेश गडकरी’ या नावाचा एक साखर कारखाना आहे.

जीवन
गडकरींचा जन्म मे २६, इ.स. १८८५ रोजी नवसारी येथील गणदेवी या गावात झाला. वयाच्या ८ व्या वर्षीच त्यांचे वडील गणेश वासुदेव गडकरी निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. या कौटुंबिक धक्क्यांतून सावरताना गडकरींचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. गडकऱ्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.

महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरिभाऊ आपट्यांच्या ‘करमणूक’ नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कविता व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले.

वयाच्या पस्तीसाव्या वर्षी त्यांचे अकाली निधन झाले.

नाटके
गडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला यांसारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. गडकरी दीर्घायुषी झाले असते ती नाटके तर पूर्ण झालीच असती पण आणखी काही नव्या नाटकांचीही त्यात भर पडली असती. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकऱ्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे.

एकच प्याला ,गर्वनिर्वाण, पुण्यप्रभाव, प्रेमसंन्यास, भावबंधन, मित्रप्रीती (अप्रकाशित), राजसंन्यास, वेड्याचा बाजार

काव्य
वाग्वैजयंती हा गडकरींचा एकमेव काव्यसंग्रह आहे. यात मुक्तच्‍छंदापासून ते छंदबद्ध कवितेपर्यंत, आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत. ते कवितांची पार्श्वभूमी एखाद-दुसऱ्या परिच्छेदात सांगून नंतर कविता सादर करीत. आपले लहान बालक मृत्युशय्येवर असतानाची मातेची मनःस्थिती राजहंस माझा निजला ह्या कवितेत गडकर्‍यांनी मांडलेली आहे. त्या कवितेच्या प्रस्तावनेचा तो परिच्छेद वाचला की कवितेत शिरण्याची एक विशिष्ट मनःस्थिती तयार होते. कवितालेखनासाठी गडकऱ्यांनी गोविंदाग्रज हे टोपण नाव घेतले होते.

विनोदी लेखन
गडकऱ्यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम ह्या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. नाट्यछटेपासून ते संवाद आणि विडंबनापर्यंत विविध प्रकारांतून गडकर्‍यांनी विनोद हाताळला. संपूर्ण बाळकरामचे पानन्‌पान खरोखरीच उच्च अभिरुचीच्या हास्यरसाची निर्मिती करणारे आहे. राम गणेश गडकऱ्यांनी ‘मासिक मनोरंजन’मध्ये ‘बाळकराम’ ह्या टोपण नावाने विपुल लेखन केले. पुढे त्यांतील काही लेखांचा संग्रह ‘रिकामपणची कामगिरी’ ह्या नावाच्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला.

अन्य साहित्य
नाटके, काव्य आणि विनोदी लेखन ह्या तीन मुख्य प्रकारांच्या बाहेर वर्गीकरण करावे लागेल असे लेखन अन्य साहित्य ह्या विभागात समाविष्ट केले आहे. चिमुकली इसापनीती हे गडकऱ्यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम दहा पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनीतीतील गोष्टी आहेत. या पुस्तकांच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य असे की, गडकऱ्यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेले नाही.

याशिवाय, गडकऱ्यांनी काही स्फुट लेखही लिहिलेले आहेत. राम गणेश गडकरी यांचे अन्य साहित्य:-

चिमुकली इसापनीती
समाजात नटाची जागा आणि इतर दोन निबंध
नाट्यकलेची उत्पत्ती
गुरू श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना पत्र
—————-
राम गणेश गडकरी यांची एक अप्रसिद्ध गद्य कविता
भांबूराव आणि दाणेवाला यांच्यातील संवाद :-

भांबूराव : आंबेमोहर काय भाव?
दाणेवाला : असडी सत्तविसाने दिला.
भांबूराव : बोला; एकच गोष्ट
दाणेवाला : हा मण दिला, आत्ताच गोमाजिला.
भांबूराव : जातो.
दाणेवाला : माल जरा पहा तर खरे; भावात सव्वीस घ्या.
भांबूराव : साडे पंच्विस द्या.
दाणेवाला : हं घ्या. कितिकसा (हवा?)
भांबूराव : पल्ला.
दाणेवाला : चला माप घ्या.

हाच मजकूर शार्दूलविक्रीडित वृत्तात :-

आंबे॒मो | हर का | य भाव | असडी सत्तावि |साने | दिला
बोला; | एकच गोष्ट | हा | मण दिला,| आत्ताच | गोमा |जिला.|
जातो | माल जरा |पहा | तर खरे; | भा | वात | सव्वीस घ्या |
साडे पंच्विस द्या. | हं घ्या | कितिकसा? | पल्ला. || चला माप घ्या. ||

*******

नवी भर दि.३०-०१-२०२३ :

महाराष्ट्राचे ’शेक्सपियर’ कैराम गणेश गडकरी यांना आज पुण्यस्मरणानिमित्त श्रद्धांजली अर्पण.
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,
वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥
अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी.. ॥२॥

वरील कविता आहे कै. रामगणेश गडकरी यांची **

जन्म: २६ मे १८८५; गणदेवी, जि. नवसारी, गुजरात
साहित्य प्रकार: कविता, नाटके, विनोदी कथा
मृत्यू: २३ जानेवारी १९१९; सावनेर,जि. नागपूर
भाषा: मराठी
एक श्रेष्ठ मराठी नाटककार, विनोदकार आणि कवी. कवितालेखन ‘गोविंदग्रज’ ह्या नावाने. विनोद लेखन ‘बाळकराम’ ह्या नावाने. जन्म गुजरात राज्यातील नवसारी येथे. शिक्षण दामनगर (सौराष्ट्र), कर्जत आणि पुणे येथे महाविद्यालयीन पहिल्या वर्षापर्यंत (१९१२). त्यापूर्वी काही काळ त्यांनी किर्लोस्कर नाटक कंपनीच्या नाटकांत कामे करणाऱ्या मुलांचे मास्तर म्हणून काम केले. तेथे काही मतभेद झाल्यानंतर विदर्भातील बाळापूर ह्या गावी ते काही दिवस शिक्षक होते. पुण्याच्या ज्ञानप्रकाशात काही काळ उपसंपादकाची नोकरी केली (१९०९–१०). तसेच पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाचे काम केले. १९१० मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळीशी नाटकासाठी पदे रचण्याच्या निमित्ताने त्यांचा पुन्हा एकदा संबंध आला. त्यानंतर त्यांनी सर्वस्वी लेखानावरच आपला चरितार्थ चालविला.
वयाच्या सतराव्या वर्षी लिहिलेले मित्रप्रीती हे त्यांचे पहिले नाटक अनुपलब्ध आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ह्यांच्या नाटकांचा आणि विनोदी लेखनाचा प्रभाव त्यांच्यांवर संस्कारक्षम वयातच पडला. नाट्यविनोदाच्या संदर्भात ते श्रीपाद कृष्णांना आपले गुरू मानीत असत. त्यांचे पहिले पुस्तक कोल्हटकरांच्या नाटकांतील उताऱ्यांचे आहे (१९०७). वेड्यांचा बाजार (लेखनकाळ १९०६–०७) हे त्यांचे अपूर्ण नाटक महाराष्ट्रातील एक विख्यात नट आणि गडकऱ्यांचे एक निकटचे मित्र चिंतामणराव कोल्हटकर ह्यांनी पूर्ण केले व ते १९२३ मध्ये प्रकाशित झाले. काव्यलेखानाच्या बाबतीत ते स्वतःस केशवसुतांचे ‘कट्टे चेले’ म्हणवीत. त्यांच्या काव्याची प्रकृती मात्र केशवसुतांच्या काव्याहून भिन्न आहे. ‘अल्लड प्रेमास’ (१९०९) ही गडकऱ्यांची प्रसिद्ध झालेली पहिली कविता. मासिक मनोरंजनात ती प्रसिद्ध झाली. ह्याच मासिकातून १९१३–१५ मध्ये त्यांचे विनोदी लेख प्रसिद्ध झाले. हे लेख पुढे रिकामपणाची कामगिरी (१९२१) ह्या नावाने प्रसिद्ध झाले. रंगभूमि ह्या मासिकात ‘सवाई नाटकी’ ह्या टोपण नावाने आणि कधीकधी निनावी लेखन गडकरी करीत असत.
प्रेमसंन्यास (१९१३) हे त्यांचे रंगभूमीवर आलेले पहिले नाटक. त्यानंतरची त्यांची नाटके अशी : पुण्यप्रभाव (१९१७), एकच प्याला (१९१९), भावबंधन (१९२०) व राजसंन्यास (१९२२, अपूर्ण). वाग्वैजयंती (१९२१) ह्या नावाने त्यांच्या कविता संगृहीत केलेल्या आहेत. त्यांचे समग्र विनोदी लेख संपूर्ण बाळकराम (१९२५) ह्या नावाने प्रसिद्ध झाले. ह्यांशिवाय गडकऱ्यांचे बराच काळ अप्रकाशित राहिलेले साहित्य अप्रकाशित गडकरी (१९६२) ह्या नावाने प्रल्हाद केशव अत्रे ह्यांनी संपादित केले आहे. गडकऱ्यांच्या लेखनसंकल्पांची त्यावरून कल्पना येते.
मृत्युसमयी ते विदर्भातील सावनेर ह्या गावी होते. ते क्षयाने आजारी होते. भावबंधन ह्या नाटकाचा अखेरचा प्रवेश लिहिल्यानंतर थोड्या वेळाने त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. गडकऱ्यांचे साहित्य अल्प असले, तरी मराठी मनावरील त्यांचा प्रभाव मात्र अपूर्व असून तो त्यांच्या मृत्यूनंतरही टिकून आहे. त्यांच्या कवितेत भावोत्कटता व कल्पनाचमत्कृती ह्यांचा एकाच वेळी प्रत्यय येतो. त्यांच्या नाट्यकृतींतून नाट्यात्मतेबरोबर ठिकठिकाणी काव्यात्मतेचा साक्षात्कार होतो आणि त्यांचे विनोदी लेखन उपहासापेक्षा कोटित्वाचाच विशेषत्वाने आश्रय घेताना आढळते. असाधारण कल्पनाशक्ती आणि तितकीच असाधारण शब्दशक्ती हे गडकरी वाङ्‌मयाचे विशेष आहेत. करूण आणि हास्य ह्या दोन्ही रसांची निर्मिति त्यांनी आपल्या लेखनातून सारख्याच परिणामकारकपणे साधली आहे. त्यांची कल्पनाशक्ती उच्छृंखल आहे; कलादृष्ट्या प्रस्तुताप्रस्तुताचा विवेक करण्याचे सामर्थ्य तिच्या ठायी तितकेसे नाही; तिचा स्वाभाविक कल अतिशयोक्तीकडे आहे; परंतु असे असूनही त्यांच्या सर्वच लेखनात वाचक-प्रेक्षकांच्या मनांची पकड घेण्याचे विलक्षण सामर्थ्य अवतरलेले आहे. उत्कटता हा त्यांच्या वृत्तीचा सहजधर्म आहे. कल्पनेची झेप अशी, की तिच्या हाती अनेकदा लागतात ती मती गुंग करणारी विचारमौक्तिके. गडकऱ्यांचे यश ह्या असाधारण गुणविशेषांमध्ये आहे. एकच प्याल्यातील सिंधू, गीता, तळीराम; भावबंधनातील धुंडिराज, घनःश्याम, कामण्णा; प्रेमसंन्यासमधील गोकुळ; पुण्यप्रभावातील कालिंदी आणि राजसंन्यासमधील तुळशी ह्या गडकऱ्यांच्या नाट्यकृतींतील काही अविस्मरणीय व्यक्तिरेखा होत.(मराठी विश्वकोश )
नाटके, काव्य आणि विनोदी लेखन ह्या तीन मुख्य प्रकारांच्या बाहेर वर्गीकरण करावे लागेल असे लेखन अन्य साहित्य ह्या विभागात समाविष्ट केले आहे. चिमुकली इसापनीती हे गडकर्‍यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम दहा पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनीतीतील गोष्टी आहेत. या पुस्तकांच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य असे की, गडकर्‍यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेले नाही.
त्यांनी लिहिलेले छ शिवबाराजे यांचे साठी अंगाई गीत
गुणि बाळ असा, जागसि का रे वाया
नीज रे नीज शिवराया
अपरात्रीचा प्रहर लोटला बाई
तरि डोळा लागत नाही
हा चालतसे चाळा एकच असला
तिळ उसंत नाहि जिवाला
निजवायाचा हरला सर्व उपाय
जागाच तरी शिवराय
चालेल जागता चटका
हा असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका
का कष्टविशी तुझी सावळीं काया ?
नीज रे नीज शिवराया
ही शांत निजे बारा मावळ थेट
शिवनेरी जुन्‍नरपेठ
त्या निजल्या ना, तशाच घाटाखाली
कोकणच्या चवदा ताली
ये भिववाया, बागुल तो बघ बाळा
किति बाई काळाकाळा
इकडे हे सिद्धि-जमान
तो तिकडे अफजुलखान
पलीकडे मुलुख मैदान
हे आले रे, तुजला बाळ, धराया
नीज रे नीज शिवराया

श्री.माधव विद्वांस … फेसबुकवरून साभार दि.३०-०१-२०२३

. . नवी भर दि.२४-०२-२०२३ :

राम गणेश गडकरी यांची कविता
चिंतामणराव ऊर्फ सी. डी. देशमुख यांचे अभिनंदन करण्यासाठी राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रजांनी केलेली ही कविता …या कवितेला २०१२ साली शंभर वर्षे झाली. (श्रीयुत चिंतामणि द्वारकानाथ देशमुख , I.C.S., हे मुंबई विश्वविद्यालयाच्या सन १९१२ च्या प्रवेशपरीक्षेंत पहिले आले. त्या प्रसंगावर खालील ‘ शब्दपुष्पहार ‘ गुंफिला होता.)

अभिनंदनपर वर्धमान

धन्य! धन्य! बा तव सुयशाची होतां जाणीव,
सहर्ष वर्षत आशीर्वच कवि ‘ वत्स, चिरंजीव ‘.
परिचय नसतां करित अतिक्रम कविमानस माझें
राग नसावा त्याचा बाळा! क्षमा इथें साजे.
आनंदाचे भरांत नाचे मन्मानस, बाळ!
कशास त्याला उगीच सांगू ‘ शिष्टनियम पाळ?’
हर्षदर्शना नियम न कांहीं; हृदयहि अनिवार ;
गुण आकर्षण; परिचय केवळ उपचार!
अथवा कविला बंधन कोठें मनिं आणुनि हेंची–
क्षमा करावी, बाळ! माझिया पुरोभागितेची.
विद्येच्या दरबारीं मिळतां तुज पहिला मान
तुझ्या कुळाला, जातीलाही त्याचा अभिमान.
पारितोषिकें त्रिविध गौरवी श्रीविद्या तुजला;
स्वानंदानें उधळूं आम्ही सहजचि अश्रुजला!
स्वज्ञातीचें नांव उजळिलें आज, महाभागा!
भरुनी जाइल दुथडी म्हणुनी तुझी जातगंगा!
समाधानमय निःश्वासाच्या वातें तुजवरती
उत्कटाश्रुजललहरी उडवुनि सुखविल शतधा ती!
गरीब माझी रसवंती; परि होतां अतिहृष्ट
शब्दमौक्तिकें ओवाळुनि तुजवरूनि, काढि दृष्ट.
ममत्वमय दोषाचें लावुनि तुला गालबोट,
सदा सदिच्छासदनीं तुजला जपूं कडेकोट.
धरिलें आम्हीं शिरिं तुज पाहुनि तुझा गुणासार,
परी तुझ्याही शिरीं भार नव तसाच देणार.
वंश, जाति तव, समाज, त्यापरि महाराष्ट्रभाषा,
आजपासुनी सर्वांनाही तुझी फार आशा.
दिव्य अलौकिक जें जें दिधलें ईशें मनुजाला,
ईश्वरांश तें सदा लावणें ईश्वरकार्याला.
ईश्वररूपा जगीं रमे श्री मानवता देवी,
निजदिव्यांशा जीवेंभावें तिच्या पदीं ठेवीं!
गुढी पाडवा आज तुझ्या हा यशोजीवनाचा,
वर्षोंवर्षीं असाच उगवो चढत्या मानाचा.
दंभ, गर्व, अभिमान दडपुनी पायांनीं अरतीं
निजपुण्यबळें असा सारखा जा वरती वरती.
प्रतिक्षणीं वर जातां दृष्टी व्यापकतर होई,
क्षितिजवर्तुलासह वाढूं दे स्वार्थ-वर्तुलाही!
‘ मी, माझें कुळ, माझी जाती, समाज माझा हा
श्री मानवता देवी माझी, ईश्वर मीच अहा! ‘
अशा भावना मनि ठेवुनियां जा वरती वरती,
हृदयसागरा सदा येऊं दे अमर्याद भरती!
उंच भराऱ्या गगनीं तुजला पाहुनि घेतांना,
परस्परांना दावूं इथुनी डोलावून माना.
धन्य धन्य तूं त्रिवार धन्यचि; धन्य पिता-माता!
हर्षाश्रूंनीं न्हाणित असतिल ते तुजला आतां!
फुला उमलल्या! वास यशाचा नित्य नवा पसरीं,
दरवळुनी मोहुनी गुंगवीं ही दुनिया सारी!
‘विजयी भव, महदायुष्मान् भव, चढविं यशोनाद! ‘
खेळतील तुजभंवति आमुचे हे आशीर्वाद!
पाप, अमंगल, अनिष्ट किंवा अभद्र हें कांहीं,
स्पर्श तयाचा कधीं न होवो तव छायेलाही.
जें जें मंगल , दिव्य तसें जें , पुण्यहि जगतीं,
दृष्टि तयाची होवो बाळा, सदैव तुजवरती!
नभीं चकाके सकल कलांची तारामय सृष्टि,
करो तुझ्यावर निजतेजोयुत दिव्यपुष्पवृष्टि!
श्रीपरमात्मन्! मागतसों हें तुजपाशीं एक,
करिं बाळावर कृपादृष्टिचा अखंड अभिषेक.
असो; असों दे ओळख बाळा, लोभहि राहूं दे.
नित्य नवा उत्कर्ष तुझा या नयनां पाहूं दे.
बालमित्र तव जमले असतिल सर्व तुझ्या भंवतीं,
अथवा चिमणीं भावंडेंही असतिल आवडतीं.
किंवा कौतुक करीत असतिल तात गोड वचनीं,
असेल जननी तुज कुरवाळित सजल अशा नयनीं.
अशा सुखाच्या काळीं आलों घटकाभर आड,
क्षमा तयाची करिं; कविता ही अशीच रे द्वाड!
हृदयदर्शना कसाबसा हा शब्दपुष्पहार–
‘ गोविंदाग्रज ‘ धाडी प्रेमें, बाळा, स्वीकार.
दिनांक : १९-१२-१९१२ . . . . विकीपीडियावरून साभार


****************************

६.कवयित्री शांताबाई शेळके आणि त्यांचे कवित्व

‘काटा रुते कुणाला’ गाण्याच्या निर्मितीच्या वेळचा हा किस्सा आहे. जितेंद्र अभिषेकींना हवं तसं गाणं तयार होत नव्हतं. शांताबाई थोड्या वैतागल्या, त्यांनी अभिषेकींना विचारलं की त्यांना नक्की काय हवं आहे. तेव्हा ..

आप काटों की बात करते है हमने फुलोंसे जख्म खाये है,
आप गैरोंकी बात करते हमने अपनोसें भी जख्म खाये है
असा एक शेर त्यांनी ऐकवला, आणि शांताबाईंच्या लेखणीतून शब्द उमटले,

काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
मज फुलही रुतावे हा दैवयोग आहे.

*

हृदयनाथ मंगेशकर आणि शांताबाईंनी काही कोळीगीतं करायची ठरवली. त्यानुसार त्या भागाचा दौरा करून आले. त्यानंतर एक महिना शांताबाईंचा काही पत्ता नाही. एक महिन्यानंतर जेव्हा शांताबाई हृदयनाथांना भेटायला गेल्या तेव्हा ते थोडे चिडले. शांताबाई हृदयनाथांच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागल्या आणि सांगितलं की त्यांना नागिण झाली होती. त्यामुळे त्यांना उशीर झाला. बरं त्याही अवस्थेत गाणी कोणती लिहावीत तर, ‘वल्हव रे नाखवा हो’ .. त्यात कोळीबांधवांसाठी त्यांनी ‘दर्याचा राजा’ हा सुंदर शब्द वापरला आहेत.

‘हात नका लावू माझ्या साडीला’ हे गाणं शांताबाईंनीच लिहिलं आहे. हे गाणं मंगेशकरांच्या घरात रचलं. पदराची जी किनार असते त्यासाठी शब्द सुचत नव्हता. तेव्हाच कुणीतरी घरात खायला शेव आणली. तेव्हा ‘तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला, हात नका लावू माझ्या साडीला’ या ओळी प्रकटल्या.

कविता म्हटलं की फक्त प्रेम असं नाही. प्रेमकवितांच्या प्रांतात शांताबाईंनी मुशाफिरी केलीच पण त्याबरोबर लहान मुलांसाठीही ‘किलबील किलबील पक्षी बोलती’ सारख्या सुंदर कविता आणि गाणी रचली.

गणेशोत्सवाच्या काळात हमखास ऐकू येणारी ‘गणराज रंगी नाचतो’, ‘गजानना श्री गणराया’ ही गाणी शांता शेळकेंच्या लेखणीतून अवतरली आहेत. घरून निघताना आठवणारे ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे’ हे गाणंही त्यांचीच देणगी. या गाण्यातली ‘ही घटकेची सुटे सराई मिटले दरवाजे’ ही ओळ आली की हमखास डोळ्यात पाणी येतं आणि आपण शांताबाईंपुढे नतमस्तक होतो.

नाट्यसंगीत, लावणी या गीत प्रकारातही शांताबाईंनी आपला ठसा उमटवला आहे. प्रतिभा हा शब्द थिटा पडावा अशा दैवी देणगी लाभलेल्या शांताबाई अर्थात ‘शान्ता.ज.शेळके’ यांचा आज स्मृतीदिन.

शांताबाईंना शतश: नमन.

…….. नवी भर दि.१३-०६-२०२०

. . . . . . . . . . . . .

लेखीका, कवयित्री, शांता शेळके यांची आज #जयंती (१२ ऑक्टोबर १९२२-निधन ६ जून २००२) त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथिल . पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. तेथे श्री. म. माटे, के. ना. वाटवे हे प्राध्यापक म्हणून त्यांना लाभले. याच सुमाराला प्रा. रा. श्री. जोग फर्ग्युसन महाविद्यालयात शांता शेळके आले. काव्यलेखनाबाबत त्यांचे त्यांना मार्गदर्शन व उत्तेजन मिळाले. एम्.ए.च्या परीक्षेत मराठी हा विषय घेऊन तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक त्यांनी मिळविले (१९४४). त्यानंतर मुंबई येथे अल्पकाळ आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात नोकरी केली. पुढे नागपूर आणि मुंबई येथील महाविद्यालयांतून मराठीचे अध्यापन केले. कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रे, बालसाहित्य, चित्रपटगीते, समीक्षा, आत्मकथन, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले; तथापि कवयित्री आणि गीतकार म्हणून त्या विशेष प्रसिद्घ आहेत.

त्यांनी एक गोष्ट मात्र नमूद केली होती कि संस्कृत मुळे माझे लेखन ,भाषण सुधारले खरंच आज लोकांनी या भाषेकडे पाठ फिरविली आहे त्यामुळे दर्जेदार साहित्य निर्मिती होत नाही.
वर्षा (१९४७) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्या नंतर रुपसी (१९५६), तोच चंद्रमा … … (१९७३), गोंदण (१९७५), अनोळख (१९८६), जन्मजान्हवी (१९९०), पूर्वसंध्या (१९९६), इत्यर्थ (१९९९) इ. काव्यसंग्रह व गीतसंग्रह प्रसिद्घ झाले. त्यांनी विपुल बालकथा, बालगीतेही लिहिली (थुई थुई नाच मोरा, १९६१; टिप् टिप् चांदणी, १९६६; झोपेचा गाव, १९९०). गीतांचे इतरही अनेक प्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले. उदा., लावण्या, कोळीगीते. मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठीही त्यांनी गीतलेखन केले आहे. नादलयींचे नेमके भान जपणारी सुभग, प्रासादिक रचना हे त्यांच्या काव्यलेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. संतांचे अभंग व ओव्या, तसेच पारंपरिक स्त्रीगीते, लोकगीते इत्यादींचे संस्कार त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येतात.

नवी भर दि.06-06-2021ः

एक लेखिका, एक अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि एक पत्रकार म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखतो शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने देखील गीते लिहिली.ग्रामीण भागात जन्मलेल्या या विदुषीने संस्कृत मध्ये प्राविण्य मिळविले ,तसेच माझी साहित्यसंपदा त्यामुळेच बहरली असे त्या आवर्जून सांगत

शांताबाईची #गीत #काव्य #संपदा

अजब सोहळा—-अपर्णा तप करिते काननी—–अशीच अवचित भेटून जा —– असता समीप दोघे हे — असेन मी नसेन मी —— अहो जाईजुईच्या फुला —आई बघ ना कसा हा—-आज चांदणे उन्हात हसले — आज मी आळविते केदार—-आज मी निराधार एकला — आज सुगंध आला लहरत — आधार जिवा — आला पाऊस मातीच्या वासात– आली सखी आली प्रियामीलना —आले वयात मी बाळपणाची —एक एक विरते तारा —- कर आता गाई गाई — कशि गौळण राधा — कशी कसरत दावतुया न्यारी —कळले तुला काही — कळ्यांचे दिवस फुलांच्या — का धरिला परदेश — काटा रुते कुणाला— कान्हू घेउन जाय — काय आणितोसी वेड्या–काय बाई सांगू — किलबिल किलबिल पक्षि— कुणीतरी सांगा हो सजणा — खोडी माझी काढाल तर — गगना गंध आला — गजानना श्री गणराया —गणराज रंगी नाचतो — गाव असा नि माणसं अशी — गीत होऊन आले सुख माझे– गोंडा फुटला दिसाचा —घन रानी साजणा — घर परतीच्या वाटेवरती–चित्र तुझे हे सजीव होऊन — चंद्र दोन उगवले — चांदणं टिपूर हलतो वारा — चांदण्या रात्रीतले ते— छेडियल्या तारा —जय शारदे वागीश्वरी — जा जा रानीच्या पाखरा —जा जा जा रे नको बोलु –जाईन विचारित रानफुला —जायचे इथून दूर –जिवलगा राहिले रे दूर — जीवनगाणे गातच रहावे— जे वेड मजला लागले
जो जो गाई कर अंगाई —झाला साखरपुडा ग बाई — झुलतो झुला जाई आभाळा –टप टप टप टाकित टापा — डोळ्यांत वाकुन बघतोस– तळमळतो मी इथे तुझ्याविण—तुझा गे नितनूतन सहवास —तुझा सहवास —तुझी सूरत मनात राया —तुला न कळले मला न —तू नसता मजसंगे वाट—तू येता सखि माझ्या—तोच चंद्रमा नभात — दशदिशांस पुसतो —दाटतो हृदयी उमाळा दाटून कंठ येतो– दिवस आजचा असाच गेला —दिसते मजला सुखचित्र–दु:ख हे माझे मला — दूर कुठे चंदनाचे बन —दैव किती अविचारी— नको रे नंदलाला —ना ना ना नाही नाही — ना मानो गो तो दूँगी — नाही येथे कुणी कुणाचा
निळ्या अभाळी कातरवेळी—पप्पा सांगा कुणाचे —पहा टाकले पुसुनी डोळे —- पाऊस आला वारा आला —पाखरा गीत नको गाऊ—– पायावरी प्रियाच्या सर्वस्व —पालखी हाले डुले —-पावनेर ग मायेला करू —-पुनवेचा चंद्रम आला– प्राणविसावा लहरि सजण –प्रीतफुले माझी सोनेरी —प्रीति जडली तुझ्यावरी — बहरुन ये अणुअणू —बाळ गुणी तू कर अंगाई —बाळा माझ्या नीज ना —बोल बोलना साजणा — मध्यरात्रिला पडे तिच्या — मनाच्या धुंदीत लहरीत — मराठी पाउल पडते पुढे —मला आणा एक हिर्‍याची — मागते मन एक काही —मागे उभा मंगेश — माजे रानी माजे मोगा —–माजो लवताय डावा डोळा —माज्या मुखार गर्भच्छाया
माज्या सारंगा राजा –माझी न मी राहिले –माझ्या मना रे ऐक जरा —-माझ्या मायेच्या माहेरा —माणुसकीचे पाईक आम्ही — मानत नाही श्याम —मारू बेडूक उडी गड्यांनो —मी आळविते जयजयवंती —मी डोलकर डोलकर —मी नवनवलाचे स्वप्‍न — मी ही अशी भोळी कशी ग –राघुमैना रानपाखरं —राम भजन कर लेना —- रूपसुंदर सखी साजिरी —-रूपास भाळलो मी— रेशमाच्या रेघांनी —वहिनी माझी हसली ग –वादलवारं सुटलं गो—- विकल मन आज झुरत —विकल सांजवेळी —विहीणबाई विहीणबाई उठा—शारद सुंदर चंदेरी—शालू हिरवा पाच नि — शूर अम्ही सरदार —शोधितो राधेला श्रीहरी
शोधू मी कुठे कशी — सब गुनिजन मिल गावो –साजणी सई ग — सुकुनी गेला बाग — सुख भरुन सांडते —सुखवितो मधुमास हा— सूर येती विरुन जाती — संगीतरस सुरस — संपली कहाणी माझी —संपले स्वप्‍न ते—- सांग सांग नाव सांग — सांगू कशी प्रिया मी — सांज आली दूरातून —स्पर्श सांगेल सारी — स्वर्गाहुनही प्रिय आम्हांला — स्वप्‍ने मनातली का — हा दु:खभोग सारा —हा माझा मार्ग एकला— हाऊस ऑफ बॅम्बू —हिरव्या रंगाचा छंद —ही कनकांगी कोण ललना– ही चाल तुरुतुरु—ही वाट दूर जाते — हे बंध रेशमाचे — हे रान चेहर्‍यांचे –हे श्यामसुंदर राजसा –क्षणभर भेट आपुली — ऋतु हिरवा ऋतु बरवा — श्रावणसरी

माधव विद्वांस

. . . . . . . . . . . नवी भर दि.१२-१०-२०२० : फेसबुकावरून साभार

नवी भर दि. १२-०६-२०२१:

एक लेखिका, एक अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि एक पत्रकार म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखतो. शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने देखील गीते लिहिली.
ग्रामीण भागात जन्मलेल्या या विदुषीने संस्कृत मध्ये प्राविण्य मिळविले , तसेच माझी साहित्यसंपदा त्यामुळेच बहरली असे त्या आवर्जून सांगत.
गीतांचे इतरही अनेक प्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले. उदा., लावण्या, कोळीगीते. मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठीही त्यांनी गीतलेखन केले आहे. नादलयींचे नेमके भान जपणारी सुभग, प्रासादिक रचना हे त्यांच्या काव्यलेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. संतांचे अभंग व ओव्या, तसेच पारंपरिक स्त्रीगीते, लोकगीते इत्यादींचे संस्कार त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येतात.
त्यांच्या दीर्घ लेखन-कारकीर्दीत मराठी साहित्यनिर्मिती व साहित्यविचार ह्यांत अनेक स्थित्यंतरे झाली आणि त्यांच्या अनुषंगाने वादविवादही झाले; तथापि कोणत्याही पक्षाची वा पंथाची बाजू घेऊन त्यात न गुंतता आस्वादक आणि स्वागतशील वृत्तीने त्या ह्या सर्व स्थित्यंतरांना सामोऱ्या गेल्या. १९९६ मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. ह्यांखेरीज फाय फाउंडेशन; मंगेशकर प्रतिष्ठानचा ‘ वाक्‌विलास ’; यशवंतराव चव्हाण; गदिमा; सु. ल. गद्रे इ. अनेक पुरस्कार व मानसन्मान त्यांना लाभले. त्यांच्या चिमणचारा, कविता करणारा कावळा, गोंदण इ. ग्रंथांसही महाराष्ट्र शासनाचे वाङ्‌मयीन पुरस्कार मिळाले.

. . . माधव विद्वांस आणि फेसबुकचे आभार

नवी भर दि. २४-०६-२०२१ :

४, ‘शाकुंतल’..

सुभाष अवचट

‘साहित्य सहवासा’तला हा पत्ता मूळचा माझा नव्हे. तो शांताबाईंचा.

शांताबाई म्हणजे एकच- शेळके!

१९८० च्या आसपास कधीतरी पहिल्यांदा मी या घराचं दार वाजवलं होतं. दुपार सरत आलेली. वाटलं, बाई असतील; तर दारात त्यांचे मित्र. प्रभुणे. चट्टय़ापट्टय़ाचा लेंगा आणि वर बनियन- असे. हातात एक फाऊंटन पेन होतं आणि शाई भरायचा ड्रॉपर.

‘आत या..’ म्हणाले. मी गेलो.

– तर एखादा जुनाट, थकलेला, विटका माणूस असावा तसं घर. सगळीकडे अंधार. चिमुकल्या खिडक्या. आत नुस्त्या भिंती आणि ज्यात त्यात का कोण जाणे, पार्टिशन्स घातलेली. पुस्तकांचा हा एवढा पसारा. पुस्तकं तेवढी चकचकीतशी. बाकी सगळ्या घरावर जुनाट, कुबट कळा.

एक भिंत आणि आणखी एका पार्टिशनच्या मागल्या खोलीत जुन्या प्रचंड पलंगावर शांताबाई बसलेल्या होत्या. गादीवर. मुटकुळं केल्यासारख्या. समोर उतरत्या पाठीचं लाकडी डेस्क. लिहिता लिहिता शाई संपली असावी. प्रभुणे मला आत घेऊन गेले. त्यांनी मला तिथे बसवलं. ताजी शाई भरलेलं पेन पुन्हा नीट पुसून शांताबाईंना दिलं आणि माझ्यासाठी चहा टाकायला म्हणून ते आणखी एका भिंतीच्या आत गडप झाले.

मग शांताबाईंशी गप्पा झाल्या. चहा झाला. मी तिथे कशाला गेलो होतो ते आता आठवत नाही. आठवते ती त्यांची गाठोडय़ासारखी आकृती आणि त्यांच्या कपाळावरचं ते हसरं, ठळक, ठसठशीत लाल कुंकू!

निघायच्या तयारीत निरोप घेत मी उठलो, तर शांताबाई हसून म्हणाल्या,‘‘चल, आज मी तुला भेळ खायला नेते. कवितेचं मानधन आजच आलंय. दहा रुपये. आपण भेळेची पार्टी करू!’’

साहित्य सहवासच्या कोपऱ्यावर तेव्हा गुप्ता नावाचा कुणीएक भेळवाला होता, त्याच्याकडे ही पार्टी होणार होती.

प्रभुण्यांनी बनियनवर शर्ट चढवला आणि शांताबाईंच्या हाताला धरून अलगद जिने उतरून ते त्यांना खाली घेऊन आले. एकेक पाऊल टाकणं म्हणजे शांताबाईंना फार त्रास होत होता. एकमेकांच्या आधाराने चालणारी ती दोन थकलेली माणसं पाहताना माझ्या पोटात तुटत राहिलं. शांताबाईंचा चेहरा मात्र चमचमीत भेळेच्या नुसत्या कल्पनेनेच चमकत होता. आम्ही शेवटी ती भेळ खाल्ली. पैसे द्यायला पाकीट काढलं तर मला रागावल्या. म्हणाल्या, ‘‘अरे सुभाष, मी आज श्रीमंत आहे रे! मानधन आलंय ना कवितेचं!! तेव्हा आजची पार्टी मीच देणार. तू असा येत जा मात्र. गप्पांना ये. नक्की ये हो!!’’

मी कुठला नेहमी जाणार गप्पांना?

शांताबाई मुंबईत. मी पुण्यात.

पण आम्ही गप्पांना रोज एकत्र भेटणार हे नियतीने आधीच ठरवलेलं होतं.

प्रभुणे निवर्तले आणि शांताबाई मुंबईत अगदीच एकटय़ा पडल्या. त्यांना साधं घर चालवणं जमेना. कसं जमणार? आयुष्यात कधी घरात काही पाहिलं नव्हतं. संसार असा केला नव्हता. स्वयंपाक सोडा, साधा आमटी-भातही कधी रांधला नव्हता. मुंबईतलं त्यांचं अख्खं आयुष्य हे अभ्यास, लेखन, कविता, गाणी आणि उदंड यश, कीर्ती यांच्या समृद्ध वैभवाने अखंड गजबजलेलं होतं. इतक्या कमिटय़ांवर कामं केली. इतका अभ्यास, इतकं लेखन, इतकी गाणी लिहिली. गायक-संगीतकारांबरोबर इतक्या बैठकी रंगवल्या. खुद्द लताबाई आणि अख्ख्या मंगेशकर कुटुंबासह आयुष्यात इतकी स्नेहाची श्रीमंती मिळवली. दुसऱ्याकशाला जागा होती कुठे कधी?

शांताबाईंच्या अवघ्या आयुष्याला लखलख देणारे हे सगळे दिवे हलके हलके मंदावू लागल्यावर मग मात्र उतरत्या उन्हांनी कदाचित काहीशी कासाविशी आणली असावी त्यांच्या आयुष्यात.

प्रभुणे गेले.. आणि त्या कासावीस जंगलात एकाकीपणाचं श्वापद घुसलं.

शांताबाईंचे बंधू राम शेळके. पुण्यात राहात. मोठा दिलदार माणूस. रामभाऊंशी, शांताबाईंच्या वृद्ध, पण खणखणीत आईशी माझी सख्खी मैत्री होती. माझं त्या घरी जाणं-येणं होतं.

रामभाऊंना वाटे, आयुष्यभर कुटुंबाबाहेरच राहिलेल्या आपल्या गुणी बहिणीने आता घरी परतावं. तिची निवृत्ती सुखाची व्हावी. एका भेटीत त्यांनी माझ्याकडे विषय काढला. म्हणाले, ‘‘बंगला आहे एवढा. वर एक खोली बांधतो मी तिच्यासाठी स्वतंत्र. सगळ्यांमध्ये आनंदात राहील इथे पुण्यात!’’

शांताबाईंच्या आईनेही गळ घातली होतीच. मग मी मुंबईत जाऊन एकदा भेटलोच शांताबाईंना. म्हटलं, ‘‘रामभाऊ एवढे म्हणतायत तर आता ऐका की त्यांचं! चला पुण्याला!!’’

शेवटी माझ्यासारखे मित्र आणि कुटुंबाच्या अगत्याचा मान राखून शांताबाई मुंबईतला त्यांचा एकाकी संसार उचलून पुण्यात यायला तयार झाल्या. आल्याही. रामभाऊंच्या बंगल्यात वर एक नवी खोली बांधली गेली. ती पुस्तकांनी सजली. शांताबाईंच्या उत्तरायुष्यातला पुण्यातला काळ सुरू झाला.

मीही पुण्यातच होतो. माझ्या स्टुडिओत कामांचा पूर असे तेव्हा. माझा गोतावळा मोठा. स्टुडिओत मित्रांचे अड्डे पडलेले असत. मी भरपूर मजा करीत असे. दंगा घालत असे. त्याहून दुप्पट कामही करीत असे.

असाच एके दिवशी दुपारी शांताबाईंचा फोन. मला म्हणाल्या, ‘‘अरे सुभाष, मी आज येऊ का तुझ्या स्टुडिओत संध्याकाळी? माझं काहीही काम नाहीये तुझ्याकडे. फक्त गप्पा मारायच्या आहेत.’’

मी म्हटलं, ‘‘अहो शांताबाई, विचारताय काय? या की!!!’’

त्या आल्या.

आणि मग येतच राहिल्या.

अख्खं आयुष्य मुंबईत गेलेलं. इथे पुण्यात आल्यावर त्या एकटय़ा पडल्या होत्या. त्यांना माणसांची भूक फार. माणसं आणि गप्पा यावरच त्या जगत.. आणि खाणं!!

गप्पा मारायला म्हणून दुपारच्या स्टुडिओत आल्या की जमिनीवर अंथरलेल्या गादीवर मुटकुळं करून बसत. डोक्यावरचा पदर सारखा सावरीत लडिवाळ, गोड, आग्रहाचं, लाघवी बोलत राहत. मला म्हणत, ‘‘सुभाष, तुला त्रास नाही ना रे होत माझ्या बोलण्याचा? मी आपली रिकामी आहे, तू असा कामात!! म्हणशील, काय म्हातारीची टकळी काही थांबत नाही!’’

मी म्हणायचो, ‘‘नाही हो शांताबाई, बोला तुम्ही.. मला कसलाही त्रास नाही होत.’’

कधी कधी मी कामात असलो की नुसत्याच अवघडल्यासारख्या बसत. मग एकदा त्यांना विचारलं, ‘‘कागद देऊ का तुम्हाला लिहायला?’’

‘‘कागद?’’ त्यांनी काहीशा विचित्र रिकाम्या नजरेने माझ्याकडे पाहिलं अन् म्हणाल्या, ‘‘काही सुचत नाही रे आता..’’

चटका बसल्यासारखा मी चरकलो.

मग त्याच म्हणाल्या, ‘‘तू असं कर, मला एक ड्रॉईंग पेपर दे. मला चित्र काढायचंय.’’

मग मी त्यांना ड्रॉईंग पेपर द्यायला लागलो. सोबत पेन्सिली, रंगखडू असत. शांताबाई दोनच चित्रं काढत. एक त्यांच्या लाडक्या मांजरीचं चित्र आणि दुसरी म्हणजे स्मिता पाटील!

स्मिता त्यांची फार लाडकी. तिचं चित्र म्हणजे काय, तर तिचा चेहरा रेखणाऱ्या काही रेघा आणि कपाळावर कुंकू. ही स्मिता. तिच्या-माझ्या प्रेमाबद्दल शांताबाईंना भारी कुतूहल आणि कौतुकही!! स्मिताची आठवण आली की त्यांच्या डोळ्यात लगेच पाणीच भरे!!

मी म्हणायचो, ‘‘शांताबाई, स्मिताचं चित्र काढायची ही आयडिया भारी आहे तुमची! दोन-चार रेषा काढल्या आणि वर एक कुंकू ठेवलं की झालं!’’

त्या म्हणायच्या, ‘‘हो रे सुभाष!! तुला माझंही असंच चित्र काढता येईल. एक मोठ्ठं गाठोडं काढ आणि त्याच्यावर एक कुंकू ठेव, की झाल्या शांताबाई शेळके! काय?’’

असं साधंच बोलता बोलता अचानक इतक्या उन्मळून हसत की त्यांच्या डोळ्यांतून पाणीच वाहू लागे. मग गप्पगप्पशा होऊन जात. असं अस्वस्थ अबोलपण आलं की मी त्यांना चित्र काढायला नवा कागद द्यायचो. मग शांतपणे काहीतरी रेघाटत खूप वेळ मुक्याने त्या बसून राहात.

आठवडय़ातून दोन-चारदा यायला लागल्या तशी मला शांताबाईंची तहान हळूहळू उमजू लागली. घरचे लोक त्यांच्यावर जीव ओवाळून टाकत असत. पण कुटुंबाबरोबर कसं राहायचं याची त्यांना सवयच नव्हती. घरातल्या कामांत रस नसे. साधं भाजी निवडणं, देवपूजा, घरातल्या शिळोप्याच्या गप्पा हे त्यांनी आयुष्यात कधी केलेलंच नव्हतं. तरी घरातला प्रत्येक जण त्यांच्यासाठी जीव पाखडीत असे. शांताबाई त्या प्रेमाने गुदमरून जात आणि अधिकच एकटय़ा होत.

त्यांची नजर सतत भिरभिरत असे आणि नाकाला सारखे कसकसले वास येत. स्टुडिओत आल्या की म्हणत, ‘‘खमंग वास येतोय रे सुभाष!!’’

हा खमंग वास खालच्या बाजूला तळल्या जाणाऱ्या काका हलवाईंच्या सामोशाचा असे. मग मी विचारी, ‘‘खाणार का सामोसा शांताबाई?’’

‘‘कशाला रे उगीच ते तळकट खायचं?’’ असले लटके नकार त्या देत खरे, पण त्यांची लकलकलेली नजर बरोबर पकडायला मी एव्हाना शिकलो होतो. मग मी विचारायचो, ‘‘हे बघा, स्टुडिओच्या खाली उतरलं की कल्पना भेळ मिळते, सामोसे मिळतात आणि पलीकडच्या गल्लीत फक्कड आल्याचा चहा मिळतो. काय खायचंय तुम्हाला?’’ की त्या खूश होऊन म्हणत, ‘‘आज सामोसे खाऊ, चल!’’

वरून आवाज दिला की काका हलवाईंच्या दुकानातला मुलगा सामोशांच्या बशा घेऊन धावत आलाच वर!

तेव्हा मी ‘तुंबाडचे खोत’ या पुस्तकाचं काम करत होतो. पेंडश्यांचं हे एवढं भलंमोठं पुस्तक! चांगलंच वजनदार.

हलवाईंचा तो गरगरीत सामोसा बघून एकदा शांताबाई हसून म्हणाल्या, ‘‘अरे सुभाष, हा तुंबाड सामोसाच आहे की रे!’’

तेव्हापासून आम्ही त्याला ‘तुंबाड सामोसा’च म्हणायला लागलो. शांताबाई एका वेळी दोन-तीन तुंबाड सहज संपवत असत. मला हळूहळू त्यांची काळजी वाटायला लागली होती. यांचा हा एकटेपणा कसा संपवावा याचा विचार माझ्याही नकळत मी करायला लागलो. म्हटलं, पुणं नवं आहे यांना.. अजून रुळल्या नाहीयेत इथे!! तर आता आपणच काहीतरी करू या!

संध्याकाळ झाली की माझ्या स्टुडिओत संपादक, प्रकाशक, लेखक, कवींचा राबता सुरू होई. गप्पांचे अड्डे जमत. सुभाषच्या स्टुडिओत शांताबाई असतात, ही बातमी पसरायला पुण्यात कितीसा वेळ लागणार? मग त्यांच्याशी गप्पा मारायला म्हणून मुद्दाम लोक येऊ लागले. कुणी आलं आणि गप्पा रंगल्या की मी ‘आलोच’ म्हणून हळूचकन् निसटून माझी कामं करून यायचो. संध्याकाळ उतरली की मग खायच्या-प्यायच्या ओढीने स्टुडिओ बंद करून आम्ही सगळे बाहेर पडत असू. हळूहळू आग्रह करकरून आम्ही शांताबाईंनाही आमच्याबरोबर नेऊ लागलो. त्या असल्या की जुन्या आठवणींचा पाऊस अखंड कोसळत असे. आम्ही सगळे चिंब भिजून जात असू. मैफिलीत खुललेल्या शांताबाईंना बघताना माझ्या पोटातला त्यांच्यासाठीचा खड्डा तेवढय़ापुरता का असेना, आनंदाने भरून जाई. रात्री उशिरा शांताबाईंना घरी सोडायलाही जो-तो आनंदाने तयार असे. त्या गाडीत नीट बसल्या का, त्यांची साडी दारातून नीट आत घेतली का, अशी काळजी करून आपल्या आज्जीला सांभाळून न्यावं तसं लोक त्यांना अलगद घेऊन जात.

अर्थात रोज त्यांना स्टुडिओत बोलावणं शक्य नसे. मग मी मुद्दाम प्रयत्न करून शांताबाईंना कुणाकुणाच्या घरी गप्पांची आमंत्रणं मिळतील असं पाहू लागलो. कधी तात्या माडगूळकर, कधी मिरासदार.. हळूहळू शांताबाईंना पुण्यात कार्यक्रमाची निमंत्रणं येऊ लागली. पुढे खुद्द शंतनुराव किर्लोस्करांशी त्यांची मैत्री झाली. शंतनुराव त्यांना गाडी पाठवून गप्पांसाठी बोलावत. हलके हलके शांताबाईंची स्वत:ची वर्तुळं पुण्यात तयार झाली.

मग एकदा मला कुठला तरी पुरस्कार मिळाला. कार्यक्रम कोल्हापूरला होता. मी आयोजकांना म्हटलं, ‘मला शांताबाईंच्याच हस्ते पुरस्कार घ्यायला आवडेल.’ सगळे खूश! कोल्हापूरच्या प्रवासाचा बेत ठरल्यावर शांताबाई लहान मुलीसारख्या खुलल्या. तेव्हा व्होल्व्हो गाडय़ा नुकत्याच सुरू झालेल्या. आम्ही त्या गाडीने फक्त पुण्याहून कोल्हापूरला गेलो, तर शांताबाईंनी गाडीत खायला म्हणून पिशव्याच्या पिशव्या भरून खाऊ आणलेला! मी म्हटलं, ‘‘अहो, मोजून पाच तासांत पोचू आपण कोल्हापूरला! कशाला हे?’’

तर म्हणाल्या, ‘‘मला सारखी भूक लागते रे, सुभाष!! तोंड चाळवायला हवं काहीतरी बरोबर!!’’

कोल्हापुरातले मित्र आधीच आतिथ्यशील. त्यातून शांताबाई बरोबर.. मग काय विचारता!! खाण्यापिण्याची, कोडकौतुकाची नुसती धूम उडाली. यजमानांच्या घरच्या लेकी-सुना, त्यांनी बोलावलेल्या पाहुण्या मुलीबाळी शांताबाईंना चिकटल्याच. शांताबाई मुळातच लाघवी स्वभावाच्या.. सगळ्यांमध्ये विरघळून गेल्या. यजमानीणबाईंनी मला विचारलं, ‘‘जेवायला काय करू? शांताबाईंना काय आवडेल?’’ मी म्हटलं, ‘‘त्यांना काय तुम्ही साबुदाण्याची खिचडी देणार की काय? शांताबाई म्हणजे फक्त मटण!!! बास!! दुसरा विचारसुद्धा करू नका.’’

सकाळी नाश्ता झाला, दुपारी मटण झालं, संध्याकाळी च्याऊम्याऊ झालं आणि मग पार्टी सुरू झाली. शांताबाई आमच्या यजमान डॉक्टरांना सारखं म्हणत होत्या, ‘‘डॉक्टर, काहीतरी उपाय सांगा हो, माझं वजन फार वाढलंय. गुडघे फार दुखतात हो सारखे!’’

डॉक्टरांना यजमानधर्म निभावणं भाग होतं. ते म्हणत राहिले, ‘‘जाऊ दे हो शांताबाई, वयानुसार अशा तक्रारी असायच्याच आता!’’

की शांताबाई लगेच म्हणणार, ‘‘अगंबाई, हो का? तरी सांगा हो काहीतरी.. गुडघे फार दुखतात!!’’

शेवटी एकदाचे ते गोरेपान काळे डॉक्टर म्हणाले, ‘‘खरं सांगू का शांताबाई तुम्हाला, तुम्ही तुमच्या तोंडाला चिकटपट्टी लावा!!’’

‘‘अगंबाई, म्हणजे खायचं नाही का? तसंच करते आता.’’ शांताबाई गंभीर होऊन म्हणाल्या.

ही रात्रीची गोष्ट.

सकाळी उठून सगळे नाश्त्याच्या टेबलाशी आलो. पोहे, खिचडी, इडली-सांबार असे कितीएक प्रकार हौसेने रांधलेले. टेबल मस्त सेट केलेलं. शांताबाई अंघोळ करून नाश्त्याला आल्या. डोक्यावरचा पदर सरळ करत घरातल्या तरुण, उत्साही सुनेला कौतुकाने म्हणाल्या, ‘‘किती गं बाई हौशी तू!! किती छान मांडलंयस हे सगळं! पण ते कालचं मटण असेल ना शिळं? मुरलं असेल आता छान. तेच दे मला नाश्त्याला. बरोबर एखादा पाव चालेल!’’ मी थक्क होऊन बघत राहिलो. काय बोलणार?

कोल्हापूरच्या त्या मुक्कामात ‘महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन मला बांगडय़ा भरायच्यात..’ म्हणून हट्ट धरून बसल्या. मी म्हटलं, ‘‘अहो, गाडी नाही जात आतपर्यंत. कशा चालणार तुम्ही? एक पाऊल नाही टाकता येत तुम्हाला!!’’

तरीही मेहतांच्या दुकानात जाऊन गप्पा मारून आलोच आम्ही! संध्याकाळच्या कार्यक्रमात इतकं सुंदर भाषण केलं शांताबाईंनी- की सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. एकदा बोलायला लागल्या की खरंच सरस्वती असे त्यांच्या वाणीत. स्मरणशक्ती, पाठांतर, वाचन, कविता आणि अनुभवांची स्तिमित करणारी श्रीमंती!!

हळूहळू शांताबाईंना बाहेरगावच्या कार्यक्रमांची निमंत्रणं येऊ लागली. त्या हौसेने सगळीकडे जायला लागल्या. कार्यक्रम झाला की मानधनाचं पाकीट मिळे आणि त्यांच्या आवडीची एक साडी. मग मला त्या कौतुकाने दाखवीत. शांताबाईंना ना त्या पाकिटातल्या पैशांची मिरास होती, ना त्या साडीचं अप्रूप. आयुष्याच्या उतरत्या एकाकी संध्याकाळी मिळणारा मानसन्मान, कानात प्राण आणून त्यांचा शब्दन् शब्द टिपून घेणारे श्रोते, त्यांच्याकडची पोतडी उघडून गाण्यांच्या निर्मितीच्या कहाण्या ऐकणारे रसिक या लोभात त्या गुंतून पडल्या होत्या. स्वत:चं कौतुक ऐकायला कुणाला आवडत नाही? पण तरीही इतकं लखलखतं वैभव अनुभवलेल्या शांताबाईंमध्ये अजूनही टिकून असलेली ही तहान समजून घेताना मी सारखा अडायचोच.

शेवटी हे सगळे प्रवास, दगदग त्यांना झेपेनाशी झाली. रामभाऊ माझ्याकडे तक्रार करीत. मला म्हणत, ‘‘तू तरी सांग रे तिला. आता नाही होत तिच्याच्याने.’’ मलाही ते दिसत होतंच. शेवटी एकदा स्टुडिओत आल्या तेव्हा विषय काढलाच. म्हटलं, ‘‘शांताबाई, आता खूप झाले तुमचे कार्यक्रम आणि प्रवास. आता बास करा!! लोक प्रेम करतात तुमच्यावर. त्यांना हव्या असता तुम्ही. पण आता तुम्हाला चालता येत नाही, उभं राहता येत नाही. कशाला स्वत:ला एवढा त्रास घेता करून? घरी बसा आता छान!’’

‘‘अरे, पण मी घरी बसून करू काय?’’ त्या एकदम कळवळल्याच! मी म्हटलं, ‘‘का? लिहा की भरपूर. खूप दिवसांत काही लिहिलं नाहीये तुम्ही. इतके प्रकाशक मागे असतात सारखे तुमच्या. मी करतो कव्हर. मी सगळं करतो. तुम्ही फक्त लिहा!!’’

‘‘..नाही रे सुचत आता काही!’’ त्या म्हणाल्या आणि एकदम गप्पच बसल्या.

मी त्यांच्या उदास, रिकाम्या, भरून आलेल्या डोळ्यांत खोल पाहिलं.

इतके दिवस मला छळणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिथे होतं.

अवघं आयुष्य सर्जनाच्या प्रांतात मनमुक्त विहरलेल्या शांताबाईंजवळ सगळं होतं. वैभव, कीर्ती, प्रेम करणारी माणसं, जीव लावणारं कुटुंब. उरली नव्हती ती फक्त त्यांच्यावर जन्मभर प्रसन्न असलेली त्यांची प्रतिभा!! जे जे म्हणून लिहून झालं होतं, त्या त्या सगळ्याची पुस्तकं काढून झाली होती. सगळं खरवडून, उपसून संपलं होतं. आता दिवाळी अंकासाठी लेख, कथा, कविता मागणारे फोन येतात, त्यांना द्यायला आपल्याजवळ नवं काही असत नाही, या दु:खाचा लसलसता निखारा शांताबाईंना आतून जाळून काढत होता.

मला काय बोलावं सुचेना.

उगीच अपराधी वाटत राहिलं.

मुंबईत रुजलेल्या या बाईंना तिथून उचकटून ज्यांनी पुण्यात आणलं, त्यात आपणही होतो.. अवेळी उपटल्याने वठलं असेल का त्यांच्या मनातलं झाड? इतक्या जिवंत, रसरशीत शांताबाई या अशा वाळत का गेल्या असतील?

मी हडबडलोच.

त्याही विझल्यासारख्या समोर बसल्या होत्या.

मग उगीचच शब्द जुळवून मी म्हटलं,

‘‘डॉक्टरांकडे जा. चेकअप् करायला हवंय तुमचं. औषधाने बरं वाटेल तुम्हाला.’’

तर म्हणाल्या, ‘‘नाही रे सुभाष! काही उपयोग नाही.. आता कशाचाही उपयोग नाही.’’

त्या सळसळत्या झाडाने आता आपला पसारा आवरायला घेतला होता. आपल्याकडे फार दिवस शिल्लक नाहीत याची कसली तरी विचित्र खूण शांताबाईंना नक्की मिळाली होती. त्यांना झालेलं जीवघेणं दुखणं डॉक्टरांना कळायच्या आत त्यांनी स्वत:च ओळखलं होतं. आधी शांताबाईंच्या कविता, त्यांची गाणी गेली. कवितांच्या मागोमाग शांताबाई गेल्या. मग कालांतराने त्यांचं शरीरही गेलं.

..तरी त्यांची एक खूण आहे माझ्याजवळ!

‘४, शाकुंतल’मध्ये ज्या गादीवर बसून त्यांनी अमर्याद सौंदर्याची निर्मिती केली, ती त्यांची गादी!

साहित्य सहवासातलं शांताबाईंचं हे घर मी विकत घेतलं आणि राहायला यायच्या आधी त्या कुबट, दमलेल्या घरातला सगळा अंधार उपसून बाहेर काढला. भिंती पाडल्या. आधीच्या चिटकूर खिडक्या उखडून मोठय़ा केल्या. फक्त एकच गोष्ट ठेवली जपून : शांताबाईंची गादी!

माझ्या हॉलमध्ये अजून आहे ती. मी तिथेच असतो दिवस-रात्र. त्या गादीच्या बैठकीवर. गप्पा मारतो. गाणं ऐकतो. शांत बसतो. विचार करतो. मित्रांना शिव्या घालतो. दंगा करतो. तिच्याचसमोर बसून मी हजारो पेंटिंग्ज रंगवली असतील आजवर. अमिताभ बच्चनपासून विंदा करंदीकरांपर्यंत आणि श्रीदेवीपासून राशीद खानपर्यंत किती स्नेही आले माझ्या घरात; तेही त्याच गादीवर गप्पांना बसले.

..आता माझे दोन नातू त्या गादीवर खेळतात.

आज शांताबाई असत्या तर आम्ही दोघांनी त्या गादीवर बसून मजेत दोन-दोन ‘तुंबाड’ खाल्ले असते.
सुभाष अवचट

वॉट्सॅपवरून साभार . . दि.२४-०६-२०२१

– – – – – – –

चंद्रकळा

आठवणीतील चंद्रकळेचा
गर्भरेशमी पोत मऊ
गर्भरेशमी पदरापोटी
सागरगोटे नऊखऊ

आठवणीतील चंद्रकळेवर
तिळगूळनक्षी शुभ्र खडी
कल्पनेत मी हलक्या हाती
उकलून बघते घडी घडी

आठवणीतील चंद्रकळेचा
हवाहवासा वास नवा
स्मरणानेही अवतीभवती
पुन्हा झुळझुळे तरुण हवा!

आठवणीतील चंद्रकळेच्या
पदराआडून खुसूखुसू
जरा लाजरे,जरा खोडकर
पुन्हा उमटते गोड हसू.

आठवणीतील चंद्रकळेवर
हळदीकुंकू डाग पडे
संक्रांतीचे वाण घ्यावया
पदर होतसे सहज पुढे

शांता शेळके

नवी भर दि. १४-०१-२०२१

. . .. . . .. .

गौराई

चल ग सये चल चल बाई
गौराई आल्यात सोन्याच्या पायी

गौराई तुमची पुण्याई मोठी
चढून या ग अंगण ओटी
तुमच्या सांगाती लक्षुमी येई

गौराई तुमचे पाऊलठसे
घरात दारात उठले कसे
सुखाची बरसात अवघ्या ठायी

गौराई कोठीत पाऊल ठेवा
धान्यानं कुणगा भरून जावा
धनाला आता कमती नाही

सैपाकघरात गौराई बसा
चुलीला द्यावा अन्नाचा वसा
सुखाचा घास मुखात जाई

हातात चुडा कपाळी कुंकू
तुमच्या कृपेनं काळाला जिंकू
झुकते पायी ठेवते डोई

गीतकार : शांता शेळके, चित्रपट : सासुरवाशिण (१९७८)

. . . . . . नवी भर दि.१२-०९-२०२१

********

नवीन वर्षा तुझे स्वागत

नवी भर दि. ०४-०१-२०२२

. . . . . . . .

नवी भर दि.०९-०६-२०२२ :

शांताबाईंना रेखाचित्रांची खूप आवड होती. लहान वयात आईच्या रांगोळ्यांनी, त्यांना आकृष्ट केलं होतं. त्यामुळे कुठल्याही पुस्तकात, अथवा मासिकात रेखाचित्र आढळलं, की, त्या आधी ते रेखाचित्र नीट बघायच्या आणि मग तसंच रेखाटायचा सराव करत असत. रेखाचित्रांची पुस्तकही त्या स्वतःच्या संग्रहामध्ये जपून ठेवायच्या. शांताबाई गप्प बसल्या आणि त्यांच्या हातामध्ये कागद-पेन दिसलं की, खुश्शाल समजावं, की रेखांकन चालू आहे. मांजर हा त्यांच्या जिव्हाळ्याचा प्राणी होता. त्यांच्या घरात, खोलीत, आजू-बाजूला सतत मांजर असायची. कधी कधी त्या कौतुकानं मांजराला जवळ घेऊन, अगदी माणसांप्रमाणे गप्पागोष्टी करायच्या. तर अश्या मांजराचे चित्र रेखाटणे, त्यांच्या सरावाचं होतं. अगदी एखाद्या कार्यक्रमाला गेल्यावर, मधल्या छोट्याश्या फुरसतीच्या क्षणी, निमंत्रण पत्रिकेवर, झटकन, बोकोबांची छबी, शांताबाईंच्या पेनमधून साकारली जायची..

प्रतिभा हा शब्द थिटा पडावा अशा दैवी देणगी लाभलेल्या शांताबाई अर्थात ‘शान्ता.ज.शेळके’ यांचा आज स्मृतीदिन.
आज शांताबाईंना जाऊन विस वर्षं झाली. आपल्याला ज्ञात असलेल्या प्रदेशात शांताबाई भरून राहिल्या आहेतच. पण त्यांना अभिप्रेत असलेल्या ‘अज्ञात प्रदेशात’ही त्यांच्या अस्तित्वाने ‘सर्वभर’ भरून राहिल्या असतील..

शांताबाईंना शतश: नमन…

🌸 शांता शेळके रचित मराठी गाणी – भाग 1
🍁 सादरीकरण : अविनाश रानडे 🍁
🔹 भस्म विलेपित रूप 🎙️ लता मंगेशकर 📽️ तांबडी माती
🔸 आई बघ ना कसा हा दादा 🎙️ सुषमा श्रेष्ठ
🔹 आला पाऊस मातीच्या वासात 🎙️ पुष्पा पागधरे
🔸 आली सखी आली प्रिया मिलना 🎙️ डॉ. वसंतराव देशपांडे 📽️ अवघाची संसार
🔹 का धरीला परदेस सजणा 🎙️ बकुल पंडीत
🔸 काय बाई सांगु कसं ग सांगु 🎙️ उषा मंगेशकर
🔹 घन रानी साजणा 🎙️ आशा भोसले
🔸 चांदण्यात रात्रीतले ते स्वप्न 🎙️ माणिक वर्मा
🔹 जाईन विचारीत रानफुला 🎙️ किशोरी अमोणकर
🔸 दिसते मजला सुखचित्र 🎙️ अनुराधा पौडवाल 📽️ अष्टविनायक

☘️🌸🌺🍃🌹🍃🌺🌸☘️ 🍁🌙💫🍁
. 🌺 शांता शेळके रचित मराठी गाणी – भाग 2
🍁 सादरीकरण : अविनाश रानडे 🍁
🔹 निळ्या आभाळी कातरवेळी 🎙️ लता मंगेशकर 📽️ मोहित्यांची मंजुळा
🔸 पप्पा सांगा कुणाचे 🎙️ अरुण सरनाईक, प्रमिला, राणी वर्मा 📽️ घरकुल
🔹 प्रीती जडली तुझ्या वरी 🎙️ पद्मजा फेणाणी
🔸 मनाच्या धुंदीत लहरीत ये ना 🎙️ जयवंत कुलकर्णी
🔹 माझी न मी राहिले 🎙️ लता मंगेशकर 📽️ मंगळसुत्र
🔸 राघु मैना रान पाखरं 🎙️ लता मंगेशकर 📽️ मोहित्यांची मंजुळा
🔹 शोधु मी कुठे कशी प्रिया 🎙️ लता मंगेशकर 📽️ नाव मोठं लक्षण खोटं
🔸 ही चाल तुरुतुरु 🎙️ जयवंत कुलकर्णी
🔹 हे श्यामसुंदर राजसा 🎙️ किशोरी अमोणकर
🔸 ऋतु हिरवा ऋतु बरवा 🎙️ आशा भोसले

☘️🌸🌺🍃🌷🍃🌺🌸☘️


आज शांता शेळके यांची पुण्यतिथी
विनम्र अभिवादन!!!

लाडकी बाहुली – शांता शेळके
लाडकी बाहुली होती माझी एक

मिळणार तशी न शोधूनी दुसऱ्या लाख
किती गोरी गोरी गाल गुलाबच फुलले
हासती केसही सुंदर काळे कुरळे
अंगात शोभला झगा रेशमी लाल
केसांवर फुलले लाल फितीचे फूल
कितीतरी बाहुल्या होत्या माझ्या जवळी
पण तीच सोनुली फार मला आवडती
मी तिजसह गेले माळावर खेळाया
मी लपुनी म्हटले साई-सूट्यो या या
किती शोध-शोधली परी न कोठे दिसली
परतले घरी मी होऊन हिरमुसलेली
वाटते सारखे जावे त्याच ठिकाणी
शोधूनी पहावी पुन्हा पुन्हा ती चिमणी
जाणार कशी पण पाऊस संततधार
खल मुळी न तिजला वर झोंबे फार
पाऊस उघडता गेले माळावरती
गवतावर ओल्या मजला सापडली ती
कुणी गेली होती गाय तुडवूनी तिजला
पाहुनी दशा ती रडूच आले मजला
मैत्रिणी म्हणाल्या काय अहा हे ध्यान
केसांच्या झिपऱ्या रंगही गेला उडून
पण आवडली ती तशीच मजला राणी
लाडकी बाहुली माझी माझी म्हणुनी

2

पैठणी – शांता शेळके
पैठणी

फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करुन
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी

माझी आजी लग्नामध्ये
हीच पैठणी नेसली होती
पडली होती सा-यांच्या पाया
हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती
दरवळणारा सुष्म वास
ओळखीची.. अनोळखीची..
जाणीव गुढ़ आहे त्यास

धूर कापूर उदबत्यांतून
जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले
एक तन.. एक मन..
माखली बोटे
पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची चमेलीची
आरास पदराआडून हसली

वर्षामागुन वर्षे गेली
संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत
एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून
अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले
आजीचे माझ्या सोने झाले

कधीतरी ही पैठणी
मी धरते ऊरी कवळुन
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळुन
मधली वर्षे गळुन पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यानो
आजीला माझ्या कुशल सांगा


नवी भर दि.१८-०४-२०२३ : रेशमाच्या रेघांनी …..

ही मनोरंजक माहिती वॉट्सॅपवर फिरत आहे. मला तरी ती खरी वाटत नाही. सोशल माध्यमांमध्ये काहीही कसे पसरवले जाते याचे एक उदाहरण म्हणून ती खाली दिली आहे … आनंद घारे

हृदयनाथ मंगेशकर हे त्यांच्या घरात लाडके! त्यांना सवय होती की जेवायला बसण्यापूर्वी व नंतर हात धुतले की ते माई मंगेशकरांच्या पदराला पुसत, लग्नानंतर पदराला हात पुसण्याचा शिरस्ता कायम राहिला फक्त पदर आईच्या ऐवजी पत्नीचा म्हणजे भारती मंगेशकरांचा झाला.
शांताबाई शेळके ह्या मंगेशकरांना जवळच्या, एकदा मंगेशकरांकडे कोणत्यातरी कार्यक्रमाच्या निमित्ताने शांताबाईंना भोजनाच आमंत्रण होत. कार्यक्रम म्हणून भारतीताईं कशिदाकाम केलेली रेशमी साडी नेसल्या होत्या ; हृदयनाथांबरोबर शांताबाई जेवायला होत्या. हृदयनाथांचे जेवण आटोपल्यावर त्यांनी हात धुतले आणि शिरस्त्याप्रमाणे हात पुसायला मोहरा भारतीताईंकडे वळवला. आता नवी साडी खराब होईल म्हणून माझ्या साडीला हात पुसू नका असं भारतीताईं सांगत होत्या. तरीही हृदयनाथ त्यांच्या रोखाने जायला लागले मग भारतीताईं पुढे धावताहेत आणि हृदयनाथ लंगडत मागे असा पकडापकडीचा खेळ तिथे उपस्थित असलेल्या शब्दसम्राज्ञी शांताबाईंनी पाहिला आणि तिथल्या तिथे गाण जन्माला आलं……।

” रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढिला
हात नगा लावू माझ्या साडीला!
नवी कोरी साडी लाखमोलाची
भरली मी नक्षी फूलवेलाची
गुंफियलं राघूमोर, राघूमोर जोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला!
जात होते वाटंनं मी तोऱ्यात
अवचित आला माझ्या होऱ्यात
तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला?
हात नगा लावू माझ्या साडीला!
भीड काही ठेवा आल्यागेल्याची
मुरवत राखा दहा डोळ्यांची
काय म्हणू बाई बाई, तुमच्या या खोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला!”

एका कार्यक्रमाला ही गोष्ट सांगतांना आशाताईं भोसले म्हणाल्या की, मग त्या गाण्याला दीदीने चाल लावली. एके दिवशी मला दीदीने बोलवलं आणि सांगितलं आशा तुझ्यासाठी एक गाण बसवलयं मग तिने ते मला गाऊन चाल शिकवायला सुरवात केली. तिच्या स्वभावाप्रमाणे अगदी मृदुमुलायम चाल! मी तिला म्हटल, “दीदी ही लावणी आहे की भजन ?” मग दीदी म्हणाली, “मी अशी चाल लावली आहे तुला गायच तस गा.!” मग एवढा privilege मिळाल्यावर आवश्यक बदल, लावणीचा बाज ठेवत पहिल्या कडक ढोलकीसकट एक फर्मास अजरामर लावणी आशा ताईंनी सादर केली.

संकलित……

 

७. केशवकुमार (आचार्य  प्रल्हाद केशव अत्रे)

आचार्य अत्रे यांची माहिती आणि त्यांचे लेख इथे पहा : https://anandghare.wordpress.com/2011/07/09/%e0%a4%86%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%85%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%aa%e0%a5%81-%e0%a4%b2-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%aa/

आज आचार्य अत्रे यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त थोडेसे .
आचार्य हे नाव त्याना कुठून मिळाले ? ते काही काळ शिक्षणक्षेत्रात होते . माध्यमिक शाळेत ते बहुधा प्राचार्य असावेत . त्यातला प्र गेला आणि आचार्य उरले .
मुळाना शाळेत करण्यासाठी त्यानी गुरुदक्षिणा हे छोटेसे नाटक लिहिले . सांदिपनी ऋषीन्च्या आश्रमात कृष्ण शिकत असतो . राक्षस त्यांच्या मुलाला पळवितात . कृष्ण त्याला सोडवून आणतो . ही ती गुरुदक्षिणा . या नाटकात संस्कृत वर खूप विनोद आहेत . मी दारु पिऊन नाही वारी पिऊन दारु आणायला जातो . ( दारु म्हणजे संस्कृतमध्ये लाकडे ) एक जण संस्कृतमध्ये कारिका पाठ करत आहे तेव्हा ” कोण इथे बेडकाचे आवाज काढत आहे ? ” असे एक शिष्य म्हणतो . कदाचित संस्कृतचा अपमान म्हणून आजच्या काळात हे पुस्तक बॅन पण करतील .
***
वि . द . घाटे यांच्या मदतीने त्यानी माध्यमिक शालेय पुस्तके ” नवयुग वाचन माला ” या नावाने काढली . शिवाजी महाराज यांचा उल्लेख पूर्वी एकेरी होत असे . या पुस्तकातून प्रथम “छत्रपती शिवाजी महाराज ” असा उल्लेख झाला आणि तो रूढ झाला .
***
शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, आंबेडकर ( हल्ली अण्णाभाऊ साठे पण ) आणि मधूनमधून ” त्या ठिकाणी ” असे बोलत भाषण करायची हल्ली पद्धत आहे . पण फुले याना महात्मा फुले प्रथम अत्रे यांनीच बनविले. ७० वर्षांपूर्वी त्यानी ” महात्मा फुले ” हा सिनेमा काढला .
***
साने गुरुजी यांचेवर अपार प्रेम . ” श्यामची आई ” ला अत्रे यांची प्रस्तावना आहे उत्कृष्ट साहित्याचा तो अद्भुत नमुना आहे . ” आईचे मंगल स्तोत्र ” असे या पुस्तकाला त्यानी म्हटले आहे .श्यामची आई हा पहिले राष्ट्रपती सुवर्णपदक मिळालेला मराठी सिनेमा त्याची निर्मिती त्यानी केली
पंढरपूरचे मंदिर हरिजनांना खुले व्हावे म्हणून साने गुरुजीनी आमरण उपोषण केले . तेव्हा महाराष्ट्रात त्यानी जनजागृतीसाठी अनेक सभा घेतल्या .
***
२७ मे १९६४ ला पंडित नेहरू यांचे निधन झाले . त्यावेळी मराठा मध्ये सूर्यास्त, पंतप्रधान नेहरू , स्वातंत्र्यसेनानी नेहरू, शांतिदूत नेहरू, साहित्यिक नेहरू , रसिक नेहरू, चाचा नेहरू असे एकापाठोपाठ एक १४ लेख मराठात प्रसिध्द झाले .
***
ते सर्व क्षेत्रात वावरले . नाटक ,सिनेमा आणि राजकारण हे त्यांची खास आवडती क्षेत्रे . पण त्याबद्दल सर्वानाच माहिती असते .
****
कवी म्हणून पण ते प्रसिद्ध आहेत . ” झेंडूची फुले ” या काव्यसंग्रहात त्यानी केशवसुत , गडकरी आणि खास करून माधव जूलियन अशा अनेक थोर कविताकारांच्या कवितेची विडंबन- काव्ये केली . कवी म्हणूनच त्यानी ” केशव- कुमार ” हे नाव धारण केले .
***
राम गणेश गडकरी हे त्यांचे दैवत . २३ जानेवारी हा सुभाषबाबू यांचा वाढदिवस आणि गडकरी यांचा स्मृतिदिन .
एकदा शाळेत २३ जानेवारी ला सुभाषबाबू यांच्याबद्दल बोलायला त्याना बोलावले होते . तेव्हा ३०-४० मिनिटे ते गडकरी यांचेबद्दलच बोलले .
त्याना कोणीतरी चिठ्ठी पाठवून – सुभाषबाबू – अशी आठवण करून दिली . मग १ तास भर ते सुभाषबाबू यांचेबद्दल बोलले .
म्हणजे त्याना तयारीची गरज नसे !
अशा महान लेखकाला आणि वक्त्याला सलाम !
***

श्री.श्यामसुंदर केळकर यांच्या फेसबुक वॉलवरून साभार

झेंडूची फुलेनधील एक विडंबन कविता

आम्ही कोण? म्हणून काय पुसतां दांताड वेंगाडुनी? ।
फोटो मासिक पुस्तकांत न तुम्ही का आमुचा पाहिला? ॥
किंवा गुच्छ तरंग अंजली कसा अद्यापि ना वाचिला? ।
चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी? ॥ १ ॥

ते आम्ही – परवाङ्मयातिल करूं चोरून भाषांतरे, ।
ते आम्ही – न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी! ॥
डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी! ।
त्याचे वाग्धन वापरून लपवूं ही आमुची लक्तरे! ॥ २ ॥

काव्याची भरगच्च घेऊनि सदा काखोटिला पोतडी, ।
दावूं गाउनि आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे, ॥
दोस्तांचे घट बैसवून करुं या आम्ही तयांचा उदे ।
दुष्मानांवर एकजात तुटुनी की लोंबवू चामडीं! ॥ ३ ॥

आम्हाला वगळा – गतप्रभ झणीं होतील साप्ताहिके! ।
आम्हाला वगळा – खलास सगळी होतील ना मासिके! ॥

विडंबन: आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार, १९२२


८. कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि कवी सोपानदेव चौधरी

बहीणाबाई चौधरी पुण्यस्मरण
अरे खोप्यामंधी खोपा सुगरणीचा चांगला
पहा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला..
तिला शिक्षण नव्हते पण जिच्या जिभेवर प्रत्यक्ष सरस्वती बोलत होती . शेतकाम आणि घरकाम सांभाळत अशी सुंदर अर्थपूर्ण जीवनाशी निगडीत अश्या कवने करणाऱ्या प्रतिभावंत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे आज पुण्यस्मरण
बहिणाबाईंचा जन्म असोदे (जळगाव जिल्हा ) ह्या गावी झाला. हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर आहे. जन्म नागपंचमीच्या दिवशी जन्म :२४ ऑगस्ट इ.स. १८८० रोजी महाजनांच्या घरी झाला.
वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला. नथुजी आणि बहिणाबाईंना तीन अपत्ये- ओंकार, सोपान आणि काशी झाली. जळगावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमच अपंगत्व आले. वयाच्या तिसाव्या वर्षी बहिणाबाईंना वैधव्य आले. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना सोपानदेव चौधरी यांनी व काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या. बहिणाबाईंचा वयाच्या बहात्तराव्या वर्षी जळगावात ३ डिसेंबर १९५१ रोजी मृत्यू झाला. त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या. लिहिता न येणार्‍या बहिणाबाई अहिराणीत आपल्या कविता रचत व त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत
कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू श्री. पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले.
ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे उद्‌गारले, “”अहो हे तर बावनकशी सोनं आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे!’,आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला.अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये (दुसरी आवृत्ती १९६९) प्रकाशित झाली आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणार्‍या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखनिविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे.(विकिपीडिया )

बहिणाबाईंच्या गाजलेली गीते
अरे खोप्यामधी खोपा – संगीत – वसंत पवार स्वर – आशा भोसले चित्रपट – मानिनी
अरे संसार संसार – संगीत – वसंत पवार स्वर – सुमन कल्याणपूर चित्रपट – मानिनी
धरित्रीच्या कुशीमधे – संगीत – वसंत पवार स्वर – सुमन कल्याणपूर चित्रपट – मानिनी
बिना कपाशीनं उले – संगीत – यशवंत देव स्वर – उत्तरा केळकर
मन वढाय वढाय – संगीत – वसंत पवारस्वर – आशा भोसले चित्रपट – मानिनी
माझी माय सरसोती – संगीत – यशवंत देव स्वर – उत्तरा केळकर
. . . माधव विद्वांस फेसबुकवरून दि.०४-१२-२०२१

नको नको ज्योतिषा,
माझ्या दारी नको येऊ ।
माझे दैव मला कळे,
माझा हात नको पाहू ।
धनरेषांच्या चऱ्यांनी,
तळहात रे फाटला ।
देवा तुझ्याबी घरचा,
झरा धनाचा आटला ।
म्हणे नशिबाचे नऊ ग्रह,
तळहाताच्या रेघोट्या ।
बापा नको मारू थापा,
अशा उगा खऱ्या खोट्या ॥

अशिक्षित बहिणाबाईंनी हे दारी आलेल्या ज्योतिषाला १०० वर्षांपूर्वी सुनावलं.
वॉट्सअॅपवरून साभार …..🙏🏽

दि. ०५-०७-२०२०

मन वढाय वढाय

मन वढाय वढाय
उभ्या पीकांतलं ढोर,
किती हांकला हांकला
फिरी येतं पिकांवर.
मन मोकाट मोकाट
त्याले ठायीं ठायीं वाटा,
जशा वार्‍यानं चालल्या
पान्यावर्‍हल्यारे लाटा.
मन लहरी लहरी
त्याले हातीं धरे कोन?
उंडारल उंडारलं
जसं वारा वाहादन.
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर,
आरे इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर !
मन पांखरू पांखरूं
त्याची काय सांगूं मात ?
आतां व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायांत.
मन चप्पय चप्पय
त्याले नहीं जरा धीर,
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर.
मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना,
मन केवढं केवढं ?
त्यांत आभाया मायेना.
देवा, कसं देलं मन
आसं नहीं दुनियांत !
आसा कसा रे यवगी
काय तुझी करामत !
देवा, आसं कसं मन ?
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनीं तुले
आसं सपन पडलं !
कवयित्री : बहिणाबाई चौधरी
या कवितेत बहिणाबाईंनी माणसाच्या मनाचं वर्णन त्यांच्या अहिराणी बोलीतून यथार्थपणे केलं आहे. मानवी मन हे फार विलक्षण असतं. एवढं विलक्षण असतं की, जणू काही ईश्वराला जागेपणी पडलेलं ते स्वप्नच असावं.
.
रामदास स्वामी म्हणतात
अचपळ मन माझें नावरे आवरीता.

नवी भर दि.२१-०८-२०२३ : नागपंचमी आणि बहिणाबाई
सुप्रसिद्ध कवयत्री बहिणाबाई यांचा जन्म १८८० साली नागपंचमीस झाला.त्यांच्या जीवनात एक अविस्मरणीय प्रसंग घडला .त्यांचा मुलगा (सुप्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी )तान्हा असताना त्याला टोपलीत घालून त्या शेतावर गेल्या .आम्ब्याच्या झाडाखाली टोपली ठेवून त्या शेतात काम करु लागल्या .थोड्या वेळाने त्यांचे टोपलीकडे लक्ष्य गेले तर टोपलीजवळ नाग फणा काढून डोलत होता तर टोपली उपडी पाडून बाळ नागासोबत खेळत होता .ते दृश्य पाहून बहिणाबाई घाबरल्या .त्यांनी नागोबाला हात जोडून विनंती केली की तुला शंकराची शंकराची शपथ आहे तू माझ्या बाळाला दंश करु नकोस.त्यांनी परमेश्वराचा सुद्धा धावा केला .योगायोगाने लहान बालकाशी खेळणारा नाग बालकाला काहीही न करता निघून गेला .बहिणाबाई या दैवी चमत्काराबद्दलची हकीगत काव्यात फार सुंदर रितीने वर्णिली आहे .
ऐकू ये आरायी
धावा,धावा ,घात झाला
अरे धावा लवकरी
आम्ब्याखाली नाग आला ,
फना उभारत नाग
व्हता त्याच्यामंदी दंग
हारा उपडा पाडूनी
तान्हा खेये नागासंग
हात जोडते नागोबा
माझं वाचरे तान्हा
अरे नको देऊ डंख
तुले शंकराची आन
आता वाजव ,वाजव
बालकिसना ,तुझा पावा
सांग सांग नागोबाले
माझा आयकरे धावा
तेवढ्यात नाल्याकडे
ढोखऱ्याचा पावा वाजे
त्याच्या सुरांच्या रोखाने
नाग गेला वजे वजे
तव्हा आली आम्ब्याखाली
उचललं तानक्याले
फुकीसनी दोन्ही कान
मुके कितीक घेतले
देव माझा रे नागोबा
नही तान्ह्याले चावला
सोता व्ह्यसनी तान्हा
माझ्या तान्ह्याशी खेयला
कधी भेटशीन तव्हा
व्हतीत रे भेटीगाठी
येत्या पंचमीले
आणीत दुधाची रे वाटी
अशातर्हेचा नागाच्या संदर्भातील अनुभव अनेकांना आला असेल .बहिणाबाई यांनी मात्र स्वताच्या अनूभवाला काव्यात गुम्फुन नाग हा मानवाचा मित्र आहे हे सिध्द केले आहे .
दिलीप प्रभाकर गडकरी, कर्जत -रायगड . . . फेसबुकवरून साभार दि.२१-०८-२०२३

नवी भर दि. १५-०७-२०२०

सोपानदेव चौधरी

जन्मदिन १६ ऑक्टोबर,१९०७. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र होते. ते स्वतः कवी होते. त्यांच्या काही कविता शालेय मराठी पाठ्यपुस्तकांत आहेत.
आई निरक्षर, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. जरी त्या निरक्षर होत्या; तरिही त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या.
सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर लिहून घेतलेल्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे म्हणाले , हे तर बावनकशी सोनं आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे!’,
आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये प्रकाशित झाली.
‘जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे, हा तर मोहोरांचा हंडा आहे’, अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता.
आचार्य अत्रे त्यांना म्हणाले, “गाढवा, तू नुसत्या कविता लिहितोस ? तू गद्य लिही. तुला इतकी देन आहे. मी जर बहिणाबाईच्या पोटी आलो असतो तर सबंध जग जिंकून टाकलं असतं.

सोपानदेव, कॅन्सरने आजारी होते त्यावेळी लोकांना वाटत होतं, की ते या आजारातून आताकाही उठत नाहीत त्या बद्दल ते म्हणायचे , मी स्वप्नांमध्ये रंजन करणारा माणूस आहे.त्या स्वप्नामध्ये यमराज अगदी रेड्यावर बसून न येता हेलिकॉप्टरवरून आले, माझ्याशी गोष्टी करताहेत; मी यमकं घालून बोलतो, यमाशी, “मामा, मला नेता का ? ” यम म्हणतो, ” नाही नाही, तुझा कॅन्सर घेऊन जायला आलोय. बेटा, भिऊ नकोस, ” आणि यम निघून जातो.
आयुष्याची समाप्ती होईल असं वाटलं असताना माझं मरण मला हसलं. रात्री मी सिस्टरला सांगितलं, की पॅड आणून दे. रात्री बारा वाजता ही कविता लिहिली आणि पाक्षिक ‘रुद्रवाणी’कडे पाठवून दिली. ती कविता वाचून मित्रमंडळी फार गहिवरून गेली होती.

माझे मरण मला हसले
मरणाचे ते अमर निवेदन हृदयांतरि ठसले
ये म्हणताना नच येणारे
जा म्हणताना नच जाणारे
आळविती रे वृथा कशाला, वेद कसे असले ?
काळवेळ तो नाही मजला
कधी अचानक घालील घाला
बघता माझी वाट आजवरि कितीक ते फसले

प्रा. शंकर वैद्य त्यांना भेटायला गेले होते त्या वेळी.त्यांचा अस्थिपंजर देह बघून ते कळवळ्याने म्हणाले, ” आप्पा, अहो, हे काय ? ” त्याला त्यांनी उत्तर दिल, आता मी अक्षरशः हाडाचा कवी ! ” त्यांचा कळवळाही खळाळून हासला.

सोपानदेव चौधरी यांचे गाजेलेले गाणं
आली कुठूनशी कानी, टाळ-मृदुंगाची धून (गायक आणि संगीतकार वसंत आजगावकर)

सोपानदेव चौधरी यांना विनम्र अभिवादन
प्रसाद जोग .सांगली.
संदर्भ : विकिपीडिया / स्नेहबंध’ पुस्तकातील लेख

. . . . . . . . . . . .

बहिणाबाई पुत्र सोपानदेव चौधरी यांची आज जयंती. (१ ६ -१ ० -१ ९ ० ७) आई कडूनच कवितेचा वारसा त्यांचेकडे आला. त्यांची एक कविता.
स्वतंत्र भारती आता, तुझेच रुप पाहू दे..
जुने पणास त्याजिता, वसुंधरा नवी कळा
मनामनात आगळ्या नवीनता समावुदे !
दिवाकरा, मिषे तुझीच दिव्य दर्शने किती
कणाकणातली श्रुती जनाजनात ते नेऊ दे !
नभी दयार्द्रता तुझी. धरेत नित्य पाझरे
परात्परा असाच रे, झरा अखंड वाहू दे !

अभिवादन . . . श्री.माधव विद्वांस फेसबुकवरून

आली कुठूनशी कानी

आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगाची धून
नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोमरोमांतून

नाभी तेजात नाहली चंद्रप्रभा चंद्रायणी
बोले शब्देवीण काही चंद्रासवे इंद्रायणी
इंद्रायणीच्या पाण्यात शहारले अंग अंग
मन झाले ओलेचिंब जैसे भिजले अभंग

वृक्ष दिसला सामोरी काय सांगू त्याची शोभा
जसे कितीवरी हात युगे अठ्ठावीस उभा
भूक नयनांची सारे मूक वाचा ये रंगात
माझा देह झाला देहु तुकयाच्या अभंगात

गीत – सोपानदेव चौधरी , संगीत आणि स्वर – वसंत आजगावकर

दि. १६-१०-२०२१

**************************

९. दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी

मोहरा इरेला पडला

बेलाग दुर्ग जंजिरा वसईचा किल्ला असला
दुश्मन फिरंगी तिथला आटोपेना कोणाला
त्या सिंहाला पकडाया भारतीय चिमणा सजला
गोव्याचा टोपीवाला कोंकणचा पगडीवाला
लागली झुंज उभयाला बुद्धीचा डाव उडाला
मोहरा इरेला पडला ||१||

बोलावूनी सरदारांना तो समरधुरंधर बोले
शूरांनो वेढा द्याया चारमास होऊनी गेले
बेहीम्मत जे असतील परतोनी ते जातील
जा कळवा की दादाला मोहरा इरेला पडला ||२||

तोफेच्या तोंडी माथे बांधोनी उडवा हाथे
शीर तुटुनी त्या आघाते किल्ल्यात पडूद्या त्याते
ती निर्वाणीची वाणी डोळ्यास आणि पाणी
प्रत्येक वदे गहीवरुनी इर्षेस वीर हा चढला
मोहरा इरेला पडला ||३||

गोळ्यांच्या मार्याखाली चर खोदोनी रेतीत
उडविले सुरंगी बार तट लोळविला मातीत
गर्जना एकदम झाली पडलेल्या खिंडारात
जो बांध तटाचा फुटला तो सेनासागर सुटला
धैर्याचा किल्लेवाला बंदुकीस भाला भिडला
मोहरा इरेला पडला ||४||

मर्दच्या मराठी फौजा रणकीर्ती जणांच्या गाव्या
जणू घोंगावत मधमाश्या मोहोळाला बिलगाव्या
कडकडात वरुनी व्हावा सारखा अग्निवर्षावा
परी तो सिंहाचा छावा परतेना हिम्मतवाला
मोहरा इरेला पडला ||५||

वारावर करतची वार अनुसरले शूर पवार
शिंद्यांचा खांदा घोडा चालला जणू की तीर
बावटा धरुनी तोंडात भोसले चढे जोमात
आगीच्या वर्षावात सामना भयंकर झाला
मोहरा इरेला पडला ||६||

गरनाळी तोफा मोठ्या धुंकार कराया सजल्या
घायाळ धडाधड खाली तनु कितक्यांच्या धड्पडल्या
धातीचे निधडे वीर चिंध्यापरी त्यांच्या झाल्या
पगडीची फौज हटेना क्षत्रुची पकड सुटेना
तो विजयश्रीचा चिमणा बेहोष होऊनी लढला
शौर्याची शर्थ जहाली बावटा तटावर चढला
जयनादाने वसईचा दिग्प्रांत पहा दुमदुमला

तो समय आणि ती मूर्ती ठाके कवीनयनापुढती
मोहरा इरेला पडला ||७||

  • कै. दु. आ. तिवारी यांच्या मराठ्यांची संग्रामगीते ह्या काव्यसंग्रहातून

कवि दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी (जन्म १८८७, मृत्यु १९३९) यांची माहिती:

खानदेशात राहणार्‍या दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी यांचे घराणे उत्तर हिंदुस्थानातले होय. रजपूत व मराठे यांच्या पराक्रमाने भारून गेलेल्या तिवारींनी देशभक्ती आणि वीरशक्ती यांचा गौरव करणारी स्फूर्तीपर गीते लिहिली.

‘काव्यकुसुमांजली’ (१९१६) व ‘काव्यरत्नमाला’ (१९२०) या स्फुट कविता. यांव्यतिरिक्त तिवारींनी ‘मराठ्यांची संग्राम गीते’ (१९२०), ‘मनोहरलीला’ (१९२०), ‘ऐतिहासिक खंडकाव्य’ (१९२०), ‘काव्यतुषार’, (१९२३, राष्ट्रीय कविता) ‘चंडीशतक’ (१९२७) अशी विविध प्रकारची दीर्घकाव्येही लिहिली. शौर्य, वीर्य, स्वातंत्र्य अशा भावनांची उत्कटता त्यांच्या काव्यात अवतरते. त्यासाठी झुंजलेल्या वीरांचा त्यांना अभिमान वाटे. ‘झाशीची संग्रामदेवता’ (१९२५) या काव्यसंग्रहात झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या पराक्रमाचे वर्णन येते. ‘मेरी झाँसी नही दूंगी’ या प्रतिज्ञेपासून तिच्या बलिदानापर्यंतच्या पराक्रमावर त्यांनी दहा कवने लिहिली आहेत.

पूर्वसूरींच्या पराक्रमाची आठवण देऊन वाचकाला अंतर्मुख करणारे त्यांचे आणखी एक ओजस्वी खंडकाव्य ‘महाराणा प्रतापसिंह’ (१९२६) हे फार गाजले.

‘मनोहरलीला’, ‘मान्यांची यमुना’ (१९२६) आणि ‘नंदिनी’ (१९३०) ही अद्भुतरम्य कल्पित व इतिहास यांचे मिश्रण असलेली खंडकाव्ये आहेत. ‘पूर्वदिव्य ज्यांचे त्यांना रम्य भाविकाल’ असे प्रतिपादन करण्यासाठी या पराक्रमाची कवने निर्माण झाली असे दिसते.

शिवकालीन हिंदी कवी भूषण यांच्या ‘शिवबावनी’, ‘शिवप्रताप’, ‘शिवराजभूषण’ या काव्यांची मराठी रूपांतरेही त्यांनी केली. मायभूमीसाठी प्राणाची बाजी लावणार्‍या वीर पुरुषांचा सातत्याने जयजयकार करणार्‍या तिवारींचे मराठी काव्यसृष्टीत वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे.

नवी भर दि.१८-०७-२०२० वॉट्सअॅप आणि गूगलवरून

———–

१०. बाबा आमटे

माणूस माझे नाव
.
माणूस माझे नाव, माणूस माझे नाव
दहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव
.
बिंदु मात्र मी क्षुद्र खरोखर,
परी जिंकले सातहि सागर,
उंच गाठला गौरीशंकर
अग्नीयान मम घेत चालले आकाशाचा ठाव
.
मीच इथे ओसाडावरती,
नांगर धरुनी दुबळ्या हाती,
कणकण ही जागवली माती
दुर्भिक्ष्याच्या छाताडावर हसत घातला घाव
.
ही शेते अन् ही सुखसदने,
घुमते यातून माझे गाणे,
रोज आळवित नवे तराणे
मी दैन्याच्या विरुद्ध करतो क्षण क्षण नवा उठाव
.
सुखेच माझी मला बोचती,
साहसास मम सीमा नसती,
नवीन क्षितिजे सदा खुणवती
दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव
.
[बाबा आमटे, संग्रह: ज्वाला आणि फुले]

जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा
सातारचे डॉ कवारे यांचे बरोबर वरोरा येथील आनंदवनातील आनंद अनुभवण्याचा योग आला .
दिव्यत्वाची येथे प्रचीती येथे कर अमुचे जुळती . दिसते करणे खूप अवघड आहे सामन्यांचे हे कामच नाही यालाच अवतार म्हणतात .
बाबांचे आश्रमातील सर्वावर प्रेम होते .
तेथे सर्वांसाठी जेवण एकाच स्वयपाक घरात होते. बाबांचे कुटुंब ,व अभ्यागत यांना तसेच आश्रमातील रुग्णानाही एकाच पाकशालेतील जेवण नाष्टा दिले जाते .
बाबा आमटे यांचे मूळ नाव मुरलीधर देवीदास आमटे. कुणी ऋषी किंवा संत म्हणून त्यांना बाबा म्हणत नव्हते. तर त्यांच्या घरातच त्यांना लहानपणी बाबा म्हटले जायचे आणि एका क्षणी कुष्ठरोग्यांसाठी जीवन वेचण्याचा निर्णय घेऊन हा मुरलीधर लाखो कुष्ठरोग्यांना आपलासा वाटणारा ‘ बाबा ‘ झाला.
त्यांचा जन्म वर्ध्यातील हिंगणघाटच्या जहागीरदार कुटुंबातला. २६ डिसेंबर १९१४ सालचा. बाबांचे वडिल देवीदास हरबाजी आमटे प्रशासकिय सेवेत होते. प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे जाणारे बाबा आमटे बालपणापासूनच साहसी आणि निर्भय होते. अनेकांच्या जीवनात चैतन्य निर्माण करणारे बाबा सदैव आपल्या कर्तव्य पथावर एका कर्मवीर योद्ध्याप्रमाणे अथक लढले.
गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. इ.स. १९४३ मध्ये वंदेमातरम्‌ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी इ.स. १९८५ मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्‍न केला. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते.
श्रम ही है श्रीराम हमारा’ असं म्हणणार्‍या बाबांनी वरोड्याच्या ओसाड, खडकाळ जमिनीवर ‘आनंदवन’ उभारलं. कुष्ठरुग्णांना आत्मसन्मान मिळवून दिला. ताठ मानेने जगण्याचं बळ दिलं. विकास आणि प्रकाश या त्यांच्या अफाट कर्तृत्ववान मुलांनी बाबांचा वारसा चालवला. डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे हे गेली अनेक वर्षं भामरागडच्या जंगलात राहून आदिवासींचं जगणं सुसह्य व्हावं, म्हणून प्रयत्नरत आहेत.”

माधव विद्वांस

********

११.कविवर्य भा.रा.तांबे

कविवर्य भा.रा.तांबे यांच्या अनेक कविता मी शाळेत असतांना पाठ केल्या होत्या आणि मला अतीशय आवडत होत्या. त्या मी ‘शाळेतल्या कविता’ या पानावर दिल्या आहेत.

कवीवर्य भा.रा.तांबे

कविवर्य भा.रा.तांबे यांची संक्षिप्त माहिती – विकीपीडियावरून

भा रा तांबे
भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३ – डिसेंबर ७, १९४१)[१], अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५ मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.
————————–

श्री. माधव विद्वांस यांच्या फेसबुक पानावरून साभार. (संपादित) दि. २७-११-२०१९

डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका !! असे सुंदर भाव गीत लिहिणारे स्वर्गीय कविवर्य भा. रा. तांबे यांचा आज जन्म दिवस .(२ ७ नोव्हेंबर १ ८ ७ ४ )
मरावे परी गीत रुपी उरावे .
हिंदी भाषिक प्रदेशात जन्म घेऊन व त्याच भागात जीवन घालविलेल्या या कविश्रेष्ठाची मराठी प्रतिभा अदभुत होती
त्यानी २२५ चे वर कविता लिहिल्या त्यांचा जन्म ग्वाल्हेर जवळ मुगावली येथे झाला तर शिक्षण अलाहाबाद व आग्रा येथे झाले. महाराष्ट्राच्या बाहेर राहूनही त्यांनी त्यानी २२५ चे वर कविता लिहिल्या मराठीची केलेली सेवा उल्लेखनीय आहे
त्यांची लोकप्रिय अजरामर गाणी ”’ नव वधु प्रिया मी बावरते — मधु मागसी माझ्या सख्या –तुज्या गळा माझ्या गळा — डोळे हे जुलमी गडे – कला ज्या लागल्या जीवा -जन पळभर म्हणतील हाय हाय -मावळत्या दिनकरा–रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी -कवी वासुदेव गोविंद मायदेव यांनी त्यांच्या ७ ५ कविता संपादित केल्या तर डॉ माधवराव पटवर्धनानी “तांबे यांची समग्र कविता” हे पुस्तक १ ९ ३ ५ मध्ये प्रकाशित केले. तांबे यांचे मुलाचे (डॉ र भा. तांबे ) घरी भावनगर येथे १ ९ ६ २ साली जाणेचा योग आला होता त्यावेळी शाळेत असल्याने तांबे यांचे तैलचित्र पाहून यांचा फोटो तुमचेकडे कसा ? या प्रश्नावर माझे वडील असे ऐकताच मला खूप आनंद झाला होता .
!!अभिवादन !!
त्यांची गाजलेली गीतें
नववधू प्रिया मी ——तुझ्या गळां माझ्या गळां —–मधु मागशि माझ्या —-मावळत्या दिनकरा ——या बालांनो या — रे या हिंदबांधवा थांब——-अजुनि लागलेंचि दार —– कशी काळनागिणी—— कळा ज्या लागल्या जीवा —–कुणि कोडें माझें उकलिल —-घट तिचा रिकामा —-घन तमीं शुक्र बघ—– चरणिं तुझिया मज देईं —–जन पळभर म्हणतिल —– डोळे हे जुलमि गडे —–तिनिसांजा सखे मिळाल्या ——–तें दूध तुझ्या त्या — —— निजल्या तान्ह्यावरी माउली —– पिवळे तांबुस ऊन कोवळे —– भाग्य उजळलें तुझे —-

श्री भा.रा.तांबे यांच्या दोन कविता

डोळे हे जुल्मी गडे, रोखून मज पाहू नका
जादूगिरी त्यात पुरी, येथ उभे राहू नका—————–।।धृ ।।
घालू कशी कशिदा मी, होती किती सांगू चुका
बोचे सुई फिरफिरुनी, वेळ सख्या जाय फुका
खळबळ किती होय मनी, हसतील मज सर्वजणी
येतील त्या संधी बघूनी, आग उगा लावू नका
डोळे हे जुल्मी गडे …..—————।।१।| भा ऱा . तांबे
गोड स्मित ओठा वरती ,धड धडते अधर किती
सांगू कुणा व्यथा हृदयी , नसे तुम्हा काय भीती ?
पदर अधरी निसटताना, सावरू किती पुन्हा पुन्हा
गोड तनी शिरी शिरवे , आता स्वप्नी येऊ नका
डोळे हे जुल्मी गडे—————–।।२।।
,
शिळ शूल सदा स्मरते, ऐकून तरी मनी दचकते
कुणी कधी पाहिलं जरी , हे सगळे ना वळते
मन नाही थार्या वरी , कळवळते सांगू उरी
धाक मज चहु कडूनि , चोरून असे भेटू नका
डोळे हे जुल्मी गडे————————।।३।।
जरी मनी असले भलते , नकोच उगीच काय तरी हे ?
वडील धारी आप्त असती , कुणी तरी पाहिल बरे !!
जमले सूत्र तुमचेशी तर , गुण मिलन करू नका
चुकून चूक तसली घडली , वेळ तशी आणू नका
डोळे हे जुल्मी गडे———————।।४।।”


तुझ्या गळां, माझ्या गळां
गुंफूं मोत्यांच्या माळा-
“ताई, आणखि कोणाला ?”
“चल रे दादा चहाटळा !”
“तुज कंठी, मज अंगठी !”
“आणखि गोफ कोणाला ?”
“वेड लागलें दादाला !”
“मला कुणाचें ? ताईला !”
“तुज पगडी, मज चिरडी !”
“आणखि शेला कोणाला ?”
“दादा, सांगूं बाबांला ?”
“सांग तिकडच्या स्वारीला !”
“खुसूं खुसूं, गालिं हसूं”
“वरवर अपुले रुसूं रुसूं”
“चल निघ, येथे नको बसूं”
“घर तर माझें तसू तसू.”
“कशी कशी, आज अशी”
“गम्‍मत ताईची खाशी !”
“अता कट्टी फू दादाशीं”
“तर मग गट्टी कोणाशीं ?

***********************

‘नववधू प्रिया मी’ ही मी शाळेत न शिकलेली कविता आणि मी श्री.ठाकूर यांच्या लेखातून घेतलेली त्यांची माहिती खाली दिली आहे.

आज कविराज आणि राजकवी भा.रा. तांबे यांचा एकशेसत्तेचाळीसावा वाढदिवस ! जे कवी आपल्या कवितेने चिरंजीव चिरायु झालेले आहेत, त्यांचे वाढदिवस साजरे करायचे ! पुण्यदिन नाहीत. कविराज आणि राजकवी या उपाधी पेक्षा तांबे लोककवीच जास्त होते. जन पळभर म्हणतील हाय हाय, सायंकाळची शोभा आणि या बालांनो या केवळ तीनच कविता लिहून तांबेनी आपली काव्यलेखणी थांबविली असती , तरीही ते अमरकवीच झाले असते. एका पोलीस सुपरिटेण्डेंटनी ह्या अमर कविता लिहिल्या आहेत याचे आजही खाकीवर्दीला आश्चर्य आणि कौतुक वाटेल ,अशा या कविता ! आधुनिक गीतकाव्याचे आद्यप्रवर्तक भा. रा तांबे मध्यप्रदेशातील मुंगावली येथे जन्मले असले, तरीही त्यांच्या कवितेतील नाद, लय, गेयता, शब्दांच्या सुंदर अर्थछटा, यामुळे कविवर्य तांबे गेले शतकभर मराठी मनात दरवळतच राहिले आहेत. मध्यभारतातील सरकारी वकील, पोलीस सुपरिटेडेंट, न्यायाधीश, शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकारी, ग्वाल्हेर संस्थानचे ‘राजकवी ‘ आधी अनेक सन्मान त्यांना लाभले. पण गेयतापूर्ण काव्यरचनेमुळे “आपलेच अजरामर स्मारक आपणच उभारून गेलेला कविराज” हे पद फारच मोठे आहे.

विद्यापीठ आणि लोकपीठ यांचा इंद्रधनुचा गोफ विणून गेलेल्या या कविराजांना आणि राजकवींना माझा मानाचा मुजरा!
कविवर्य भा.रा.तांबे यांची कविता संग्रहरुपाने रसिकांसमोर आली त्याचे हे शतकमहोत्सवीवर्ष आहे.
सुरेश शामराव ठाकूर

. . . . .. . . . वॉट्सअॅपवरून साभार .. दि.२८-१०-२०२०

भास्कर रामचंद्र तांबे

विकीपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३ तेे डिसेंबर ६, १९४१ ), अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५ मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते. त्यांच्या काही प्रसिद्ध कविता :

अजुनि लागलेचि दार , कशी काळ नागिणी, कळा ज्या लागल्या जीवा, कुणि कोडे माझे उकलिल का, घट तिचा रिकामा, घन तमीं शुक्र बघ, चरणि तुझिया मज देई, जन पळभर म्हणतील हाय हाय, डोळे हे जुलमि गडे, तिनी सांजा सखे मिळाल्या, तुझ्या गळा माझ्या गळा, ते दूध तुझ्या त्या, नववधू प्रिया मी बावरते, निजल्या तान्ह्यावरी माउली, पिवळे तांबुस ऊन कोवळे, भाग्य उजळले तुझे, मधु मागशी माझ्या, मावळत्या दिनकरा, या बाळांनो या रे या, रे हिंदबांधवा थांब


नववधू प्रिया मी

नववधू प्रिया, मी बावरते;
लाजते, पुढे सरते, फिरते

कळे मला तू प्राण-सखा जरि,
कळे तूच आधार सुखा जरि
तुजवाचुनि संसार फुका जरि,
मन जवळ यावया गांगरते

मला येथला लागला लळा,
सासरि निघता दाटतो गळा,
बागबगीचा, येथला मळा,
सोडिता कसे मन चरचरते !

जीव मनीचा मनी तळमळे
वाटे, बंधन करुनि मोकळे
पळत निघावे तुजजवळ पळे
परि काय करू ? उरि भरभरते

चित्र तुझे घेऊनि उरावरि
हारतुरे घालिते परोपरि,
छायेवरि संतोष खुळी करि,
तू बोलविता परि थरथरते

अता तूच भय-लाज हरी रे !
धीर देउनी ने नवरी रे :
भरोत भरतिल नेत्र जरी रे !
कळ पळभर मात्र ! खरे घर ते !

कवी : भा.रा.तांबे, संगीत : वसंत प्रभू, गायिका : लता मंगेशकर
https://www.youtube.com/watch?v=aSMzPWNAD5c

या गाण्याचे एक रसग्रहण :
सन १९७२-७३ चा काळ होता. आकाशवाणीवर लतादीदींच्या आवाजातलं ‘नववधू प्रिया मी बावरते’ हे गाणं लागलं होतं. त्याचे सूर ऐकून मी त्या गाण्याकडे ओढली गेले आणि मन लावून ऐकू लागलं. गाणं ऐकून मला इतकंच समजलं की सासरी जाणारी नववधू तिच्या मनातल्या भावना व्यक्त करीत आहे. यानंतर बीएला शिकत असताना ‘समग्र तांबे’ अभ्यासले. त्यावेळी या गीतातला गर्भितार्थ मला समजला. हा नवाच अर्थ लागल्यावर हे गाणं एक वेगळाच आनंद देऊन गेलं आणि ‘मनातलं गाणं’ बनलं. कवीवर्य भा. रा. तांबे म्हणजे महान प्रतिभेचा कवी. आपल्या कवितेतून त्यांनी मृत्युलाही सुंदर बनवलं. हे गाणंसुद्धा असंच आहे. जन्माला आलेला प्रत्येकजण कधी ना कधी मरणारच.तरीही मृत्युला सामोरं जाताना प्रत्येकाच्या जीवाची घालमेल होते. ती व्यक्ती गांगरून जाते, बावरून जाते; अगदी तशीच जशी सासरी जाणारी एखादी नववधू बावरलेली असते.
मला येथला लागला लळा, सासरी निघता दाटतो गळा
लग्न होऊन सासरी जाताना आपल्याही मनात अशा भावना नाही का आल्या? असा प्रश्न मी स्वतःलाच विचारला आणि हे गाणं कायमचं माझं होऊन गेलं.
जीव मनीचा मनी तळमळे, वाटे बंधन करुनि मोकळे, पळत निघावे तुजजवळ पळे, परि काय करु ? उरी धडधडते
अशा परस्परविरोधी भावना मनात निर्माण होतात. पण शेवटी निग्रहाने म्हणावंच लागतं,
आता तूच भय लाज हरी रे, धीर देऊनि ने नवरी रे, भरोत भरतील नेत्र जरी रे, कळो पळभर मात्र खरे घर ते
ऐन तारुण्यातली ती भावना आणि आता उतार वयात मृत्युकडे कधीतरी जावंच लागणार न्हणून व्याकुळलेलं मन… या भावना या गीताशी जोडल्या गेलेल्या आहेत.
नववधू आणि मृत्युची चाहूल लागलेली व्यक्ती या दोघांच्या मनातील भावनांचा कल्लोळ खोलवर पोहोचणारा आहे. मुळात भा. रा. तांबेंच्या या कल्पनाविष्कारालाच सलाम करायला हवा.
लतादिदींच्या सुरेल स्वरामुळे ही भावना अधिक गडद आणि गहिरी झाली आहे. मृत्युच्या अपरिहार्यतेमुळे कातर होणा‍‍ऱ्या माझ्या मनाला हे गाणं मृत्युबद्दल सकारात्मकता देऊन जाते. मृत्युकडे पाहण्याचा दृष्टीकोनच या गाण्यामुळे बदलून जातो म्हणूनच हे गाणं माझ्या मनातलं आहे.

पण सर्व सामान्य लोकांना नववधूचे गाणेच इतके छान वाटते की ते ऐकताना परमात्म्याचा विचार मनात येत नाही आणि समजा आता तो आला तरी त्यात वाईट काय आहे? असे या गाण्यात सुचवले आहे असे मला वाटते. . . . . . . .. . .. . नवी भर दि. ०६-११-२०२०

. . . . . . . . . . . . . . . .

घनतमी शुक्र बघ राज्य करी

राजकवी भास्कर रामचंद्र तांबे (भा.रा.तांबे) जन्म दिन (२७ऑक्टोबर १८७३).
या आधी त्यांच्या बद्दल लिहिले होतेच. त्यांच्या नववधू प्रिया मी बावरते या गाण्याबद्दल ही एकदा विस्ताराने लिहिले होते.मात्र त्यांचे कार्यच एवढे मोठे आणि त्या मुळेच दरवेळी काहीतरी वेगळे सापडते.त्यांच्या घनतमी शुक्र बघ राज्य करी या गाण्याने वेगळीच उंची गाठली आहे.

या गाण्याबद्दल स्वतः लता मंगेशकर म्हणाल्या
‘घन तमीं शुक्र बघ राज्य करी’ या गाण्याला  बाळचं संगीत आहे. बाळने तांबेंच्या कवितांतील शब्दांचं आणि अर्थाचं वजन छान पेललं आहे. साहजिकच ते वजन संगीतात येण्यासाठी त्याने आरोह-अवरोहांचे जे लगाव बांधलेत, ते अप्रतिम आहेत. गायकाचा कस पाहणारे आहेत. मला तर तांबे यांची सगळीच गाणी आवडतात. मी त्यांची भक्तच आहे. परंतु जेव्हा कुणी मला त्यांचं एकच गाणं निवडायला सांगतं, तेव्हा मात्र मी झुकतं माप ‘घन तमीं शुक्र बघ राज्य करी’ या गाण्याच्या पारड्यात टाकते. 

आजच्या जन्मदिनी त्यांचे स्मरण करताना घन तमी शुक्र बघ राज्य करी ह्या गाण्या विषयी : रचना : २९ ऑक्टोबर,१९२०
 
घनतमी शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना बघ जरा तरी

इथे तांब्यांच्या रसिकतेला मनापासून दाद द्यावीशी वाटते. ते आपल्या कवितेतील उपमा, रुपके नेहमीच खुप सुचकतेने, रसिकतेने निवडतात, वापरतात. इथेच पाहा ना, “घन तमी ‘शुक्र’ बघ ‘राज्य’ करी ”  शुक्राची चांदणी ही चंद्राच्या खालोखाल सर्वाधिक प्रकाशमान असल्याने काळोख्या रात्रीच्या वेळी चंद्राच्या अनुपस्थितीत तीच आकाशातल्या अंधुक प्रकाश देणा-या तारकांच्या जगावर राज्य करतांना दिसते. शुक्राच्या चांदणीचे वैशिष्ठ्य हे आहे की शुक्र हा ग्रहसुद्धा सूर्याच्या एक दोन घरे मागे पुढे चालत असतो, पहाटेच्या वेळी शुक्राचा तारा उगवला तर लवकरच सूर्योदय होणार असल्याची तो वर्दी देतो आणि रात्री तो मावळतांना दिसला तर झोपायची वेळ झाल्याचे दाखवतो. शुक्र हा ग्रह मध्यरात्री किंवा माथ्यावर आलेला कधीच दिसणार नाही.

‘काळोखातसुद्धा तो ‘शुक्र’ कसा ‘राज्य’ करतोय’ या ओळीतील ‘राज्य’ हा शब्द खूप काही सांगून जातो. केवळ एका समर्पक शब्दात प्रतिकूलतेतही चमकत राहण्याचा डौल आहे, तोरा आहे. हे भा.रा. तांब्यांचं वैशिष्ठ्य आहे. या एकाच शब्दात त्यांनी अनेक गोष्टी साधल्या..

ये बाहेरी अंडे फोडूनी
शुद्ध मोकळ्या वातावरणी
का गुदमरसी आतच कुढूनी
रे मार भरारी जरा वरी

ये बाहेरी ‘अंडे’ फोडूनी   यातील ‘अंडे’ या शब्दाचे दोन अर्थ निघतात. एक असा की, तुझ्या मनाने आलेल्या नैराष्यातून नकारात्मक विचारांचा जो एक गंडकोष निर्माण केलाय, तो फोडून तू बाहेर ये. दुसरा अर्थ जरा तत्वज्ञानाच्या मार्गाने जाणारा आहे. ‘अंडे’ म्हणजे देह, तनू, काया , ज्यात ते ‘आत्मा’रुपी सत्य, सत्त्व वसलेले आहे. ‘मी’ म्हणजेच माझे शरीर ही ओळख पक्की झालेली असली की मृत्यूचे भय निर्माण होते.

फुल गळे, फळ गोड जाहले
बीज नुरे, डौलात तरु डुले
तेल गळे, बघ ज्योत पाजळे
का मरणी अमरता ही न खरी ?

प्रत्येक ओळ कशी सहजपणे आयुष्याच्या सार्थकतेवर भाष्य करतेय पाहा. ‘जो आला तो जाणारच’ हे एकमेव त्रिकालाबाधित सत्य आहे. मृत्यू हेच अंतीम सत्य, तीच जीवनाची सार्थकता असते . साधी-साधी उदाहरणे दिली आहेत तांब्यांनी. पहिल्या ओळीतल्या “रे खिन्न मना” ची ती उदासी कशातून आली असेल हे इथे स्पष्ट होते. हे कडवं नीट वाचलं तर इथे नाशाचा, मृत्यूचा उल्लेख प्रथम येतोय. फुलाच्या नष्ट होण्यात फळाचा जन्म दडलेला असतो हा निसर्गनियम आहे. एखादा वटवृक्ष डौलाने झूलत येणार्‍या-जाणार्‍या पांथस्थाला शीतल छाया देत असतो. पण केव्हा जेव्हा त्याचं ‘बीज’ रुजतं, जमिनीत मिसळून जावून नष्ट होतं ,तेव्हा त्यातून नवा अंकुर जन्माला येतो, ज्याचं कालौघात एखाद्या डेरेदार वृक्षात रुपांतर होतं. ज्योतीच्या उजळून निघण्यासाठी तेलाचे जळणे अत्यावश्यक असते. किती साध्या, आणि रोजच्या आयुष्यातील उदाहरणांच्या साह्याने तांबे मृत्यूची गुढ संकल्पना विषद करताहेत पाहा. मुळात आपण मृत्यूची उगाचच भीती बाळगतो. नवी पालवी फुटण्यापुर्वी झाडावरचं जुनं जीर्ण पान गळून पडतं. प्रियेच्या आवेगाने वाहत आलेली नदी समुद्रात विसर्जीत होणे हे तिचे मरणच असते.

मना, वृथा का भिशी मरणा ?
दार सुखाचे हे हरीकरुणा
आई पाहे वाट रे मना
पसरुनी बाहू, कवळण्या उरी

शब्द न शब्द जणु काही हिर्‍या-मोत्यांचे जडजवाहिर आहे. ते स्वतःलाच समजावतात,‘ का घाबरतोस इतका मृत्यूला ? मृत्यू हे अमृताचे दार आहे. आत ‘आई’ तुझी वाट पाहत उभी आहे; तुला कुशीत घ्यायला.’ केवढी सुंदर कल्पना आहे. ‘हरिकरुणा’ , मृत्यूला ‘हरिकरुणेची उपमा देणारे तांबे इथे कविच्या भुमिकेतून बाहेर पडतात आणि आणि तत्त्वचिंतकाच्या भुमिकेत शिरतात.. साक्षात मृत्यूला ‘सुखाच्या दरवाजाची’ उपमा.

घन तमी शुक्र बघ राज्य करी’ या ओळीतल्या ’राज्य’ या शब्दाची जागा घेताना लतादीदी जी कमाल करतात त्यावरून लक्षात येते की एकहाती एवढं मोठं साम्राज्य उभं करण्याची कमाल कशी जमली असेल त्यांना. हे गाणं संगीतबद्ध करताना हृदयनाथ मंगेशकर हे  नक्की कुठल्या मनोवस्थेत होते ते त्यांनाच ठाऊक. पण त्यांच्या चालीने, त्यांच्या संगीताने या गाण्याला अगदी उच्चपदावर, नेवून बसवले आहे.

भा.रा.तांबे यांना विनम्र अभिवादन !!

🙏🙏 वॉट्सॅपवरून साभार . . दि.२९-१०-२०२१

***********

१२. कवी सुधांशु

इथेच आणि या बांधावर, अशीच श्यामल वेळ———तसेच दत्त दिगंबर दैवत माझे———–
हे सर्वांचे तोंडी असलेले गोड गीत लिहिणारे कै.सुधांशु यांचे आज पुण्यस्मरण १८ नोव्हेंबर, इ.स. २००६ (जन्म ६ एप्रिल १९१७ )
पूर्ण नाव हणमंत नरहर जोशी, अर्थात “#काव्यतीर्थ” कवी सुधांशु (६ एप्रिल, इ.स. १९१७:औदुंबर, सांगली जिल्हा, महाराष्ट्र – :सांगली, महाराष्ट्र) हे मराठी भाषेतील कवी होते. त्यांनी अनेक मराठी भावगीते लिहिली आहेत.


मराठी कवी कुंजविहारी यांनी ह.न. जोश्यांना सुधांशु हे नाव दिले, आणि पुढे त्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले.
खालील परिच्छेद **यशवंतराव चव्हाण समग्र संदर्भ साहित्य.मधून ..
श्री. सुधांशु हे आमच्या कृष्णाकाठचे संवेदनशील प्रसिद्ध कवी आहेत. आपल्या साध्या, पण संवेदनशील जीवनात रममाण असणारा हा कवी अवतीभोवतीच्या समाजजीवनात सहानुभूतीने समरस होणारा खराखुरा साहित्यिक आहे. त्यांच्या कवितांचे प्रसिद्ध झालेले छोटे छोटे काव्यसंग्रह यापूर्वीच मराठी वाचकांपुढे आलेले आहेत, आणि त्या सर्व कविता मी पहिल्यापासून अत्यंत आवडीने वाचीत आलो आहे. त्यांच्याबद्दल व त्यांच्या कवितांबद्दल मला वाटणारा जिव्हाळा मी येथे व्यक्त करीत आहे. काव्याच्या क्षेत्रात जाणता वाचक या नात्याखेरीज अकारण प्रवेश करण्याचा मला फारसा अधिकार नाही, हे मी जाणतो.


इ.स. १९३७पासून सुधांशु यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. त्यांच्या कविता किर्लोस्कर, स्त्री, मनोहर आदी मासिकांतून प्रसिद्ध होत होत्या. या कवितांचे पुढे पुस्तकरूपाने संग्रह झाले. सुधांशूंना एकदा रा. अ. कुंभोजकर यांनी ’तुम्ही कवी कसे झालात?’ असे विचारले. त्यावर ते म्हणाले, ’मी दोन मातांच्यामुळे कवी झालो. एक माझी जन्मदात्रीमाऊली आणि दुसरी कृष्णामाई. एकीने माझ्या अंत:करणात कवितेची बीजे रुजवली आणि दुसरीने आपल्या निर्मलतेने आणि समृद्धीने मला काव्यदृष्टी दिली.’
कवी सुधांशु यांनी आयुष्यभर खादीचे कपडे घातले. त्यांच्या अंगावर सतत एक शाल असे. सुधांशूंनी भारताच्या १९४२सालच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. आपल्या स्वातंत्र्यगीतांतून आणि पोवाड्यांतून त्यांनी स्वातंत्रसैनिकांना स्फूर्ती दिली. त्यांच्या घरी काही भूमिगत स्वातंत्र्यसैनिक एकदोन दिवसांसाठी गुप्तपणे मुक्कामासाठी राहून जात. गावकऱ्यांच्या कवी सुधांशूंवर असलेल्या अतूट प्रेमामुळे ही बातमी पोलिसांपर्यंत कधीच पोहोचली नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी स्वत:ला ग्रामसुधारणेला वाहून घेतले. इ.स.१९६०मध्ये ते अंकलखोप या गावाचे सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले आणि १९६५पर्यंत त्या पदावर राहिले. त्याच सुमाराला गावाला स्वच्छतेचा आणि व्यसनमुक्तीचा पुरस्कारही मिळाला. कवि सुधांशु दत्ताचे पुजारी होते आणि ते पौरोहित्यही करीत.
औदुंबर येथे सदानंद साहित्य मंडळाची स्थापना करून कवी सुधांशूंनी १९३९पासून ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरविण्यास सुरुवात केली. दरवर्षी मकर संक्रातीला होणाऱ्या या औदुंबर ग्रामीण साहित्य संमेलनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील साहित्यरसिक येतात. १८ नोव्हेंबर, इ.स. २००६ला कवि सुधांशु यांचे निधन झाले. (विकीपीडिया )अभिवादन


औदुंबर हे पवित्र दत्तस्थान आहे तर सुंदर पर्यटन स्थळ आहे आवर्जून भेट द्यावी असे


त्यांची गाजलेली गीते
अनसुयेच्या धामी आले——- इथेच आणि या बांधावर —— गोकुळाला वेड लाविले —— जय जय दत्तराज माउली —–दत्तदिगंबर दैवत माझे —— दिगंबरा दिगंबरा श्रीपाद —–देव माझा विठू सावळा ——-भुकेला भक्‍तीला भगवान ——— भुलविलेस साजणी —- मनी माझिया नटले गोकुळ —— माझ्या मनात विणिते नाव —–मी खरंच रुसले ——या धुंद चांदण्यात तू —– राधिके ऐक जरा बाई —- स्मरा स्मरा हो —– हिरवे-पिवळे तुरे उन्हाचे
दत्त दिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे ॥धृ॥
अनुसूयेचे सत्य आगळे । तीन्ही देवही झाली बाळे
त्रैमुरि अवतार मनोहर । दीणोध्दारक त्रिभुवनी गाजे ॥१॥
तीन शिरेम कर सहा शौभती । हास्य मधुर शुभ वदनावरती
जटाजूट शिरी, पायी घडावा । भस्मविलोपित कांती साजे ॥२॥
पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ति । आनंदाचे आसू झरती
सारे सात्विक भाव उमलती । हळू हळू सरते मीपण माझे ॥३॥

श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुक भिंतीवरून साभार दि.१९-११-२०२०

***********

१३. यशवंत दिनकर पेंढारकर ऊर्फ कवी यशवंत

  • आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी.
    ती हाक येई कानी, मज होय शोककारी
    —- स्वामी तिन्ही जगांचा आईविना भिकारी
    आईचे महत्व सांगणारी सुंदर कविता लिहिणारे यशवंत दिनकर पेंढारकर ऊर्फ कवी यशवंत यांचे आज पुण्यस्मरण. (२६ नोव्हेंबर १९८५). त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यात चाफळ येथे ९ मार्च १८९९ रोजी झाला. त्यांचे बालपण तेथेच. आपण चाफळचे रहिवासी आणि जुन्या कालखंडात सांस्कृतिक उत्थानासाठी भरीव कार्य केलेले पुण्यपुरूष समर्थ रामदास चाफळचे, या योगायोगाबद्दल त्यांना अत्यंत अभिमान वाटायचा. समर्थ रामदास आणि शककर्ते छत्रपती शिवाजीमहाराज ही त्यांची श्रद्धास्थाने. संस्कारक्षम वयात डॉ. दत्तोपंत पटवर्धन यांची लोकमान्य टिळकांची युयुत्सू राष्ट्रवादी वृत्तीचा संस्कार करणारी कीर्तने यशवंतांना स्फूर्तिप्रद वाटायची.
    “छंद लागला टिटवीला । तिने समुद्रहि आटविला” हे शब्द त्यांच्या अंतःकरणावर कोरलेले. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या शिवजयंतीत्युत्सवाचा संस्कार त्यांच्यावर झालेला. तेव्हापासून त्यांच्या भावविश्‍वात समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांना महत्त्वाचे स्थान मिळालेले.यशवंतांच्या लौकिक जीवनाचा मार्ग अत्यंत खडतर होता. शालेय शिक्षणास ते सांगलीला राहिले. तेथील सिटी हायस्कूलमधून डिपार्टमेंट स्कूल फायनलच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. पुढचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना घेता आले नाही.
    ‘महाराष्ट्रकवी’ म्हणून त्यांना गौरवाने उल्लेखले जाते. ते बडोदा संस्थानाचे राजकवी होते.
    आधुनिक मराठी कवी परंपरेत राजकवी यशवंत यांना महत्त्वाचे स्थान आहे. रविकिरण मंडळातील’ सप्तर्षींमध्ये माधव जूलियन सोबत यशवंत यांच्या नावांचा अग्रक्रमाने उल्लेख केला जात असे.
    यशवंतांच्या प्रेमकवितेत प्रीतिसाफल्य, तिची विफलता, मृत्यूवर मात करणारे तिचे चिरंजीवीत्व इत्यादी छटांचे चित्रण आढळते. त्यांच्या प्रेमकवितेवर रविकिरणमंडळातील कवींचा ठसा उमटलेला दिसतो. केवळ प्रियकराच्या नवथर भावनांचे प्रकटीकरण करण्यात त्यांची प्रतिभा रमत नाही. कल्पनासृष्टीतील प्रेयसीच्या सौंदर्याचे मानसिक चिंतन करण्याची प्रवृत्ति त्यांच्यात आढळते. स्त्रीच्या शारीरिक सौंदर्यामुळे पुरुषाच्या मनात प्रीतीभाव निर्माण होत असला तरी, त्याची परिणती आत्मिक मिलनात होणे ही खरी कसोटी. प्रेयसीच्या अंतःकरणातील उदात्ततेला कवी प्राधान्य देतो. यादृष्टीने तूच रमणी ही त्यांची कविता उल्लेखनीय होय. प्रीतिसंगम, प्रेमाची दौलत, चमेलीचे झेले आणि एक कहाणी या कवितांचा आवर्जून निर्देश करायला हवा. ‘एक कहाणी’ मध्ये बारा कवितांचा गुच्छ आहे. ‘चमेलीचे झेले’मध्ये तीन कविता एकत्र गुंफलेल्या आहेत. ‘एका वर्षानंतर’ या कवितेत सुरवातीला प्रसन्न भावनांचे प्रतिबिंब आढळते. ती तू दिसतां हृदयी येती कितीक आठवणी, मम सौख्यांची झाली होती तुझ्यांत साठवणी! या कवितेत आठ कवितांची मालिका आहे. प्रेमनैराश्‍यामुळे निर्माण झालेल्या व्यथेंचे चित्रण करताना कवी उद्‌गारतो…
    सुहासिनी, कां दर्शन देसी? मी हा दरवेशी!
    समोरूनी जा, झाकितोंच वा हृदयाच्या वेशी!
    नीज नीज माझ्या बाळा, करू नको चिंता
    काळजी जगाची सार्‍या आहे भगवंता !
    अंगावर पांघरूण ओढुनिया काळे
    देवाजीच्या मांडीवर ब्रह्मांड झोपले
    लाख चांदण्यांचे डोळे उघडे ठेवून
    पिता तो जगाचा बैसे जागत अजून
    ज्याने मांडियला सारा विश्वाचा हा खेळ
    तोच चालवील त्याला, तोच सांभाळील
    झोपली पाखरे रानी, झोपली वासरे
    घरोघरी झोपी गेली आईची लेकरे
    नको जागू, झोप आता, पुरे झाली चिंता
    काळजी जगाची सार्‍या आहे भगवंता

माधवविद्वांस यांच्या फेसबुक भिंतीवरून दि. २६-११-२०२०

* कवी यशवंत यांची आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी ही कविता मी शाळेतल्या कविता या पानावर दिली आहे.

———————-

विकीपीडियावरील अधिक माहिती :
पुणे वास्तव्य आणि साहित्यिक सहवास
पुढे यशवंत पुण्याला गेले. अभिरुचिसंपन्न कवी गिरीश त्यांना मित्र म्हणून लाभले. प्रा. श्री. बा. रानडे आणि सौ. मनोरमा श्रीधर रानडे या प्रेमळ दांपत्याची पाखर त्यांना लाभली. मनोरमा रानडे तर सर्वांची आवडती जिजी होती. माधव जूलियन यांच्यासारख्या व्युत्पन्न, प्रतिभावंत आणि मनस्वी कवीचा सहवास त्यांना लाभला. दिवाकरांसारखे चोखंदळपणे वाचन करणारे मित्र होते. शिवाय वि. द. घाटे, प्रा. द. ल. गोखले आणि ग. त्र्यं. माडखोलकर होते. या समानधर्मी मित्रांच्या सहवासामुळे यशवंतांना नवीन क्षितिज खुणावू लागले. औपचारिक शिक्षणाची उणीव त्यांनी चौफेर आणि चोखंदळ वाचनाने भरून काढली. एकीकडे लौकिक जीवनातील वैशाखवणवा होता, तर दुसरीकडे अलौकिक काव्यानुभूतीचे मोरपीस अंतर्मनाला आल्हाद देत होते. अशा संघर्षमय परिस्थितीतही कवितेवरील अनन्य निष्ठा यशवंतांनी ढळू दिली नाही. त्याविषयीची मानसप्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणतात, “कारकुनी म्हणजे असेल नसेल त्या अभिरुचीची राखरांगोळीच! अशा परिस्थितीत कवितेच्या आवडीचे कोवळे मुगारे करवून जायचे. पण वावटळीत पदराआड दिव्याची ज्योत सांभाळून ठेवावी त्याप्रमाणे अंतर्यामीची असलेली कवितेची आवड मी जोपासली.” काव्य ही एक उपासना आहे, ते एक व्रत आहे, अशी त्यांच्या मनाची धारणा होती.

१९५० साली मुंबईस भरलेल्या तेहतिसाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

स्थायीभाव
उत्कट आत्मपरता हा यशवंतांच्या प्रतिभेचा स्थायीभाव आजच्या गतिमान जीवनप्रवाहातील संवेदनशीलतेला कदाचित मानवणारे नाही. पण, एकेकाळी यशवंतांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची मुद्रा जनमानसावर उमटवली होती. एकत्र कुटुंबपद्धतीतील शाश्‍वत जीवनमूल्यांचा त्यांनी उद्‌घोष केला. त्यांची कुटुंबवेल्हाळ वृत्ती त्यांच्या आत्मनिष्ठ कवितांतून प्रकट होते. १९२२ मध्ये त्यांना लिहिलेल्या “आई’ या कवितेतील गोडवा आजही कायम राहिला आहे.

“आई” म्हणोनि कोणी, आईस हाक मारी
ती हाक येई कानी, मज होय शोककारी

स्वामी तिन्ही जगांचा आईविना भिकारी
या ओळींतील आर्तता आणि करुणा अंतःकरणाला स्पर्श करते. मातेची महत्ता समुचित शब्दांत कवीने वर्णिलेली आहे.

आई! तुझ्याच ठायी सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे अद्वैत तापसांचे

“दैवतें माय-तात” या कवितेतही आई वडिलांविषयी कृतज्ञताभाव परिणामकारक शब्दांत व्यक्त झाला आहे. आपल्या मनातील भाव-भावनांचे कढ, आशा-निराशेची स्पंदने आणि तीव्र दुःखाच्या छटा यशवंतांनी समरसतेने रंगवल्या. “समर्थांच्या पायांशी’, “माण्डवी’ व “बाळपण’ अशा कितीतरी आत्मप्रकटीकरण करणाऱ्या कविता त्यांनी लिहिल्या आहेत. “लाह्या-फुले’ या कवितेत आपल्या जीवनातील प्रखर वास्तवाचे चित्रण कवी करतो. माझें हें जीवित तापली कढई मज माझेंपण दिसेचि ना माझें जीवित तापली कढई तींत जीव होई लाही-लाही वसन्त, हेमन्त, निशा किंवा उषा लाहीच्या विकासासारखेंच लाह्या-फुलें ऐशीं देहीं फुलतात. ऐश्‍वर्य अनन्त हेंच आम्हां!

प्रेम कविता
यशवंतांच्या प्रेमकवितेत प्रीतिसाफल्य, तिची विफलता, मृत्यूवर मात करणारे तिचे चिरंजीवीत्व इत्यादी छटांचे चित्रण आढळते. त्यांच्या प्रेमकवितेवर रविकिरणमंडळातील कवींचा ठसा उमटलेला दिसतो. केवळ प्रियकराच्या नवथर भावनांचे प्रकटीकरण करण्यात त्यांची प्रतिभा रमत नाही. कल्पनासृष्टीतील प्रेयसीच्या सौंदर्याचे मानसिक चिंतन करण्याची प्रवृत्ति त्यांच्यात आढळते. स्त्रीच्या शारीरिक सौंदर्यामुळे पुरुषाच्या मनात प्रीतीभाव निर्माण होत असला तरी, त्याची परिणती आत्मिक मिलनात होणे ही खरी कसोटी. प्रेयसीच्या अंतःकरणातील उदात्ततेला कवी प्राधान्य देतो. यादृष्टीने तूच रमणी ही त्यांची कविता उल्लेखनीय होय. “प्रीतिसंगम’, “प्रेमाची दौलत’, “चमेलीचे झेले’ आणि “एक कहाणी’ या कवितांचा आवर्जून निर्देश करायला हवा. “एक कहाणी’ मध्ये बारा कवितांचा गुच्छ आहे. “चमेलीचे झेले’मध्ये तीन कविता एकत्र गुंफलेल्या आहेत. “एका वर्षानंतर’ या कवितेत सुरवातीला प्रसन्न भावनांचे प्रतिबिंब आढळते… ती तू दिसतां हृदयी येती कितीक आठवणी मम सौख्यांची झाली होती तुझ्यांत साठवणी! या कवितेत आठ कवितांची मालिका आहे. प्रेमनैराश्‍यामुळे निर्माण झालेल्या व्यथेंचे चित्रण करताना कवी उद्‌गारतो… सुहासिनी, कां दर्शन देसी? मी हा दरवेशी! समोरूनी जा, झाकितोंच वा हृदयाच्या वेशी!

सामाजिक आशयाची कविता
यशवंतांनी राष्ट्रीय वृत्तीचा परिपोष करणारी आणि सामाजिक आशयाची कविता लिहिली. महाराष्ट्र प्रेमाकडून राष्ट्रप्रेमाकडे त्यांच्या कविमनाचा विकास होत गेला. इतिहासातील स्फूर्तिप्रद क्षणांचे शब्दांकन करणारी, महापुरुषांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवण्यासाठी भावनात्मक आवाहन करणारी कविता त्यांनी लिहिली. त्यांच्या प्रतिभेने निरंतर स्वांतत्र्यांचा ध्यास घेतला. “आकाशातील तारकांच्या राशी लाथेच्या प्रहाराने मी झुगारीन. पण स्वातंत्र्यलक्ष्मी, तुझ्या चरणांशी लीन होईन. (स्वातंत्र्यलक्ष्मीस मुजरा/यशोधन) ” स्वातंत्र्यभानूने भारतात लवकर दर्शन द्यावे. तेव्हाच आपण पावन होऊ. असे ते उद्‌गारतात. (तुरुंगाच्या दारात/यशोधन) “तुटलेल्या तारा’ या विलापिकेत राष्ट्रीय भावनांचे दर्शन घडते. “सिंहाची मुलाखत’ या कवितेत राष्ट्रीयता आणि मानवता या दोन्ही मूल्यांचा पुरस्कार ते करतात. “गुलामाचे गाऱ्हाणे’ आणि “इशारा’ या प्रतिकात्मक आशय करणाऱ्या कविता आहेत. राष्ट्रजीवनातील पुरूषार्थाला जाग आलेली आहे, तिचे प्रतिबिंब या कवितांत आढळते. “तुरुंगाच्या दारात’ या कवितेत कवी उद्‌गारतो… वाढु दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती मन्मना नाही क्षिती. भिंतिच्या उंचीत आत्मा राहतो का कोंडुनी? मुक्त तो रात्रंदिनी.
शृंखला पायात माझ्या चालताना रुमझुमे, घोष मंत्रांचा गमे. या ओळीतून आत्मनिर्भर वृत्तीचे प्रभावी दर्शन घडते. “मायभूमीस अखेरचे वंदन’ या कवितेत मृत्यूवर मात करणारी वृत्ती दिसून येते.
जीवनाचे विविध पैलू यशंवतांनी आपल्या कवितेतून आकळले. त्यांची कविता विविधरुपिणी आणि विपुल आहे. १९१५ ते १९८५ या सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी काव्यनिर्मिती केली. त्यांच्या स्फुट कवितेत सुनीतांचा समावेश आहे. “बंदीशाळा’ हे बालगुन्हेगांरांच्या करुण स्थितीचे चित्रण करणारे खंडकाव्य आहे. “काव्यकिरीट’ हे बडोद्याच्या राजपुत्राच्या राज्यारोहणविषयावरील खंडकाव्य आहे. “जयमंगला’ मधील २२ भावगीतांमधून यशवंतांनी हृदयसंगम प्रेमकथा साकार केली आहे. यात प्रयोगशीलता आहे. म्हटले तर यातील प्रत्येक भावगीते ही स्वतंत्र कविता आहे. दुसरीकडे एकत्र गुंफलेली ही मालिका-कविता आहे. शिवाजी महाराजांच्या जीवन त्यांनी “छत्रपती शिवराय’ हे महाकाव्य रचले. “मुठे, लोकमाते’ हे दीर्घकाव्य पानशेत धरण फुटले त्या दुर्घटनेवर आधारलेले आहे. “मोतीबाग’ हा त्यांचा एकमेव बालगीतांचा संग्रह आहे. यशवंतांचा काव्यप्रवास हा एका प्रयत्नवादी आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्वाच्या जीवनविकासाचा आलेख आहे.

गद्यलेखन
यशवंतांनी लिहिलेली ’घायाळ’ ही कादंबरी म्हणजे लेखक स्टीफन झ्वाईग यांच्या Downfall of the Heart या दीर्घकथेचे रूपांतर आहे. यशवंतांनी या पुस्तकाला मोठी प्रस्तावना लिहिली आहे.तीत त्यांनी स्टीफन झ्वाईग यांची प्राथमिक माहिती, मराठीत झालेले त्यांचे अनुवाद, मराठी साहित्यिकांना वाटत असलेले झ्वाईग यांचे महत्त्व इत्यादी विस्तृत टिप्पणी केली आहे.

प्रस्तावनेच्या शेवटी यशवंतांनी झ्वाईग यांच्या सपत्‍नीक आत्महत्येचा तपशील सांगितला आहे, तो असा – झ्वाईग यांनी महायुद्धाने समग्र भूगोलाची आणि मानवी संस्कृतिविजयाची राखरांगोळी होणार हे पाहून, कल्पनाचक्षूंना दिसणारे जगाचे भेसूर भवितव्य न सहन होऊन २३ फेब्रुवारी १९४२ रोजी पत्‍नीसह आत्महत्या केली.

नवी भर दि.२६-११-२०२०

******

१४. साने गुरुजी

हे खरे तर माझ्या पिढीमधल्या लोकांचे बालपणातले सर्वात आवडते गद्य लेखक म्हणूनच अधिक प्रसिद्ध आहेत, पण त्यांची एक देशभक्तीपर कविता अजरामर आहे.

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो

पू.साने गुरूजींची आणखी एक प्रसिद्ध कविता

खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे।।
जगी जे हीन अति पतित
जगी जे दीन पद दलित
तया जाऊन उठवावे। जगाला प्रेम अर्पावे।।
सदा जे आर्त ‍अति विकल
जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे। जगाला प्रेम अर्पावे।।
कुणा ना व्यर्थ शिणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधु मानावे। जगाला प्रेम अर्पावे।।
प्रभूची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे। जगाला प्रेम अर्पावे।।
असे हे सार धर्माचे
असे हे सार सत्याचे
परार्था प्राणही द्यावे। जगाला प्रेम अर्पावे।।

  • साने गुरुजी

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो………. हे गीत लिहिणारे सर्वांचे लाडके सानेगुरुजी.

लेखक,कवी ,स्वातंत्र्यसैनिक, अध्यापक, साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक, लोकशाही समाजवादाचे भाष्यकार आणि आंतर-भारती चळवळीचे प्रवर्तक. पांडुरंग सदाशिव साने, तथा परंतु साने गुरुजी यांची आज (२४ डिसेंबर) जयंती . त्यांचा जन्म पालगड (ता. दापोली; जि. रत्नागिरी ) येथे झाला. प्राथमिक शिक्षण पालगडला; माध्यमिक शिक्षण दापोली, औंध, पुणे येथे. बी. ए. ची पदवी घेऊन (१९२२) मुंबई विद्यापीठाची एम. ए. ची पदवी (१९२४) त्यांनी संपादन केली. अमळनेर ( जि.जळगांव ) येथील तत्त्वज्ञान मंदिरात अधिछात्र (फेलो); पुढे तिथल्याच ‘प्रताप हायस्क्रूल’ मध्ये शिक्षक व वसतिगृहप्रमुख म्हणून काम केले. १९३०–३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीतील सहभागामुळे धुळे, नासिक आणि तिरुचिरापल्ली येथे तुरुंगवास भोगला. नासिक जिल्ह्यातील चांदवड येथे बिटिश सरकारविरुद्ध परखड भाषण केल्याबद्दल पुन्हा एकदा धुळे येथील तुरुंगात त्यांची रवानगी झाली (१९४०). दरम्यानच्या काळात साक्षरतेचे वर्ग चालविणे, खादी विकणे, काँग्रेससाठी निधी जमविणे, देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेल्यांच्या तसेच देशासाठी बलिदान केलेल्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करणे इ. कार्यांत त्यांनी स्वतःला झोकून दिले. जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता ह्यांचे निर्मूलन झाले पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. १९४६ मध्ये पंढरपूरचे विठ्ठलमंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे, म्हणून त्यांनी प्राणांतिक उपोषण केले आणि त्यांच्या मंदिरप्रवेशाचा मार्ग मोकळा करून दिला.
तिरुचिरा-पल्लीच्या तुरुंगात असताना त्यांनी विश्वभारतीच्या धर्तीवर ‘आंतर-भारती’ ही संस्था स्थापन करण्याचा संकल्प केला. भारतात ‘आंतरभारती’चे केंद्र असावे; त्याच्या शाखा निरनिराळ्या राज्यांत असाव्यात; त्यांच्या माध्यमातून विविध राज्यांतील भाषा, चालीरीती, परंपरा, कला, कारागिरी, लोकसाहित्य, नृत्ये ह्यांचा अभ्यास व्हावा आणि अशा तऱ्हेने राष्ट्रीय एकात्मता साधावी, अशी त्यांची कल्पना होती. १९४८ साली त्यांनी साधना हे साप्ताहिक पुण्यात सुरू केले .समाजवादी विचारप्रणालीच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक बंधुभाव वाढीला लागावा व समतेची प्रस्थापना व्हावी, हा त्यामागील हेतू होता. विद्यार्थी (मासिक), काँग्रेस (साप्ताहिक), कर्तव्य (सायंदैनिक) अशी अन्य नियतकालिकेही त्यांनी चालवली. युवकांच्या आणि किसानांच्या संघटना बांधण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.पुणे येथे १९४७ साली भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

साने गुरुजींनी कादंबरी, कथा, बालसाहित्य, कविता, निबंध, चरित्र इ. साहित्यप्रकारांत विपुल लेखन केले. त्यात बालांसाठी आणि कुमारांसाठी केलेले लेखन ठळकपणे नजरेत भरते. ‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे’ ही त्यांची ह्या लेखनामागची भूमिका होती; तथापि मनोरंजनाबरोबरच मुलांवर उत्तम नैतिक संस्कार व्हावेत, हेही त्यांचे उद्दिष्ट होते. त्या दृष्टीने श्यामची आई (१९३५) हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक विशेष उल्लेखनीय होय. त्यात श्याम हा आपल्या आईच्या आठवणी सांगत आहे आणि त्या स्मृतींतून भारतीय संस्कृतीतल्या उदात्त पैलूंनी समृद्घ झालेले एका मनस्वी स्त्रीचे व्यक्तिमत्त्व विलोभनीयपणे आकारत गेलेले आहे. आपल्या मुलांचे आयुष्य उन्नत करण्याची केवढी मोठी अंतःशक्ती आईमध्ये असू शकते, ह्याचा प्रत्यय ह्या पुस्तकातून अत्यंत प्रभावीपणे येतो. श्यामची आईचे अर्धेअधिक यश प्रांजळ, सरळ आणि निश्चल आत्मनिवेदनात आहे. मराठी कादंबरीवर झालेला गांधीवादाचा अनुकूल प्रभाव लक्षात घेता कादंबरी आणि स्मृतिचित्रे यांच्या मीलनरेषेवर उभी असलेली साने गुरुजींची एकमेव कृती श्यामची आई हीच सर्वार्थाने गांधीवादी व अजरामर ठरलेली कृती होय. ‘मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र’ म्हणून वर्णिल्या गेलेल्या ह्या पुस्तकावरून आचार्य अत्रे यांनी काढलेल्या श्यामची आई ह्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट-निर्मितीचा स्वतंत्र भारतातील पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला (१९५४).(मराठी विश्वकोष )

श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुकावरील लेखावरून साभार दि.२४-१२-२०२०

नवी भर :दि.११-०६-२०२१

स्वातंत्र्य सैनिक,समाजवादी विचारसरणीच्या ,सृजनशील ,भावनाशील , साने गुरुजींचे आज पुण्यस्मरण (११ जून १९५०)
त्यांचे बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो !!!असे सुंदर गीत सगळ्यांच्याच आजही तोंडी आहे
साने गुरुजी यांनी ७३चे र पुस्तके लिहिली,भारतीय संस्कृती ,व श्यामची आई ,तसेच साधना साप्ताहिक हि त्यांचीच अपत्ये . आचार्य अत्र्यांनी त्यांचे श्यामच्या आई कथेवरून सुंदर चित्रपटाची निरमिती झाली .
हरिजनांच्या विठ्ठल मंदीर प्रवेश्या साठी त्यांनी पंढरपूर येथे उपोषणहि केले .लहन मुलांचे साठी त्यांनी भरपूर साहित्य लिहिले.
साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.
इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढणे, दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी कार्य करणे, इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचरसरणीस अनुसरून त्यांनी ‘मैला वाहणे’ व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.(विकिपीडिया )
अभिवादन “”
साने गुरुजी यांचे प्रकाशित साहित्य
अमोल गोष्टी (हे पुस्तक बोलके पुस्तक-Audio book म्हणून पण मिळते)आपण सारे भाऊ भाऊ आस्तिक इस्लामी संस्कृति कर्तव्याची हाकक ला आणि इतर निबंध कला म्हणजे काय?कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य ‘कुरल’ नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठी भाषांतरक्रांतिगीताहृदय गुरुजींच्या गोष्टीगोड गोष्टी (कथामाला), भाग १ ते १० भाग १ – खरा मित्र भाग २ – घामाची फुले भाग ३ – मनूबाबा भाग ४ – फुलाचा प्रयोग भाग ५ – दुःखी भाग ६ – सोराब आणि रुस्तुम भाग ७ – बेबी सरोजा भाग ८ – करुणादेवी भाग ९ – यती की पती भाग १० – चित्रा नि चारू गोड निबंध भाग १, २गोड शेवट गोष्टीरूप विनोबाजीजीवनप्रकाश तीन मुले ते आपले घर त्रिवेणी दिल्ली डायरीदे शबंधु दास धडपडणारी मुले नवा प्रयोगपंडित ईश्वरचंद्र विद्यासागर पत्रीभगवान श्रीकृष्ण व इतर चरित्रे भारतीय संस्कृती (मराठीसह इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांत) मानवजातीचा इतिहास मोरी गाय मृगाजिन रामाचा शेला राष्ट्रीय हिंदुधर्म. (भगिनी निवेदिता यांच्या मूळ पुस्तकाचा अनुवाद)विनोबाजी भावे विश्राम श्याम खंड १, २ (हे पुस्तकही बोलके पुस्तक म्हणून मिळते.)श्यामची आई श्यामची पत्रे सती संध्या समाजधर्म. (लेखक : भगिनी निवेदिता व साने गुरुजी)साधना (साप्ताहिक)(संस्थापक, संपादक)सुंदर पत्रे सोनसाखळी व इतर कथासोन्या मारुती स्त्री जीवन स्वप्न आणि सत्य स्वर्गातील माळ **हिमालयाची शिखरे व इतर चरित्रे”(गुरुजींचे स्केच Uday Kolambekar यांचे )

श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुकावरील लेखावरून साभार दि.११-०६-२०२१

१५.सुधीर मोघे

मराठी कवी, गीतकार व संगीतकार सुधीर मोघे यांची आज जयंती त्यांचा जन्म किर्लोस्करवाडी येथे , ८ फेब्रुवारी, इ.स. १९३९ रोजी झाला. (निधन १५ मार्च, इ.स. २०१४) सुधीर मोघे हे पुण्यातील स्वरानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते. स्वरानंदच्या सर्व कार्यक्रमांचेही ते अध्यक्ष असत. नाट्य‌अभिनेते श्रीकांत मोघे हे सुधीर मोघे यांचे थोरले बंधू.
मूळ कवी पण काव्य, गीत- चित्रपटगीत लेखन, ललित लेखन, पटकथा-संवाद लेखन, सुगम गायन, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्करण आणि दिग्दर्शन या माध्यमांतून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, अक्षर प्रकाशन इत्यादी क्षेत्रात सुधीर मोघे यांचा संचार होता. ते एक उत्तम चित्रकार होते. त्यांच्या चित्रांची प्रदर्शनेही भरली होती. ’विमुक्ता’ या चित्रपटाद्वारे ते चित्रपट दिग्दर्शक बनणार होते, पण त्या चित्रपटाचे पहिले शूटिंग होण्याआधीच सुधीर मोघे यांचे निधन झाले.
सुधीर मोघे मूळचे किर्लोस्करवाडीचे. ते इ.स. १९६८-६९च्या सुमारास पुण्यात आले. त्या वेळी ते ’किर्लोस्कर’ कारखान्यात नोकरी करत होते. १९७१ मध्ये त्यांनी ’स्वरानंद’ सादर करीत असलेल्या ’आपली आवड’ या रंगमंचीय कार्यक्रमात निवेदक म्हणून काम करावयास सुरुवात केली. निवेदक म्हणून सुधीर मोघे यांची स्वतःची खास ’स्टाइल’ होती. स्वतः जातिवंत कवी असल्याने, कधी स्वतःचीच कविता, तर कधी एखाद्या नामवंत कवीची कविता वापरून ते प्रत्येक गाण्याची अप्रतिम काव्यातून ओळख करून द्यायचे.
’कविता पानोपानी’ या रंगमंचीय कार्यक्रमात सुधीर मोघे हे कागद हातात न घेता, ध्वनिप्रकाश योजनेच्या साहाय्याने स्वत:च्या मराठी कविता, गीते सादर करीत असत. ’राजा शिवछत्रपती’ या चित्रपटापासून सुधीर मोघे गीतकार झाले. त्या चित्रपटांत त्यांनी एक भूमिकाही केली होती. ’समिंदरा समिंदरा माझ्या भाग्याचा मुहूर्त झाला’ अशी त्यां चित्रपटातील एका गाण्याची ओळ होती. आणि खरोखरच त्यांचा चित्रपटातून त्यांच्या भाग्याचा उदय झाला, आणि पुढील आयुष्यात त्यांनी अनेक चित्रपटांची गाणी लिहिली.

फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरीखोर्‍यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश
रान जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य, आले भरास भरास
दव पिऊन नवेली झाली, गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी
क्षणापुर्वीचे पालटे जग उदास उदास
झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरी ही नवा सुवास सुवास
गीतकार :सुधीर मोघे
गायक :श्रीधर फडके
संगीतकार :श्रीधर फडके

सुधीर मोघे यांनी लिहिलेली रसिकप्रिय भावगीते आणि चित्रपट गीते
अरूपास पाहे रूपी, आदिमाया अंबाबाई, आला आला वारा, एक झोका चुके काळजाचा, एकाच ह्या जन्मी जणू, ॐकार अनादि अनंत अथांग, कधी गौर बसंती, काजल रातीनं ओढून नेला, कुण्या देशीचे पाखरू, गुज ओठांनी ओठांना, गोमू संगतीनं माझ्या तू, घर दोघांचे, घरकुल पाखरांचे, जरा विसावू या वळणावर, झुलतो बाई रास-झुला, तपत्या झळा उन्हाच्या, तिथे नांदे शंभू, तूच मायबाप बंधू, त्या प्रेमाची शपथ तुला, दयाघना का तुटले, दिसलीस तू फुलले ॠतू, दिसं जातील दिसं येतील, देवा तुला शोधू कुठं, दृष्ट लागण्याजोगे सारे, नवाडाव चल मांडायाला, निसर्गासारखा नाही रे, फिटे अंधाराचे जाळे, बारा पुण्यक्षेत्रे झाली बारा ज्योतिर्लिंगे, भन्‍नाट रानवारा, मस्तीत शीळ (संगीत स्वत:चेच),भेटशील केव्हा माझिया जिवलगा , (संगीत स्वतःचेच), मन मनास उमगत नाही, मन लोभले मनमोहने, मना तुझे मनोगत, मनी जे दाटले, माझे मन तुझे झाले (संगीत स्वतःचेच), माय भवानी तुझे लेकरू, मी फसले ग फसले, मी सोडुन सारी लाज, मंदिरात अंतरात तोच, रात्रीस खेळ चाले, विषवल्‍ली असुनी भवती, विसरू नको श्रीरामा, शंभो शंकरा करुणाकरा, सखि मंद झाल्या तारका, सजणा पुन्हा स्मरशील ना, सप्‍तस्वरांनो लय, सूर कुठूनसे आले अवचित, सांग तू माझाच ना, सांज ये गोकुळी सावळी सावली, हे जीवन सुंदर आहे, हे नायका जगदीश्वरा_

श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुकावरील लेखावरून साभार दि.०८-०२-२०२१

. . . . . . . . . .

माझे मन तुझे झाले

माझे मन तूझे झाले
तुझे मन माझे झाले
माझे प्राण तूझे प्राण
उरले ना वेगळाले॥

मला लागे तुझी आस
तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहीकडे
माझे तूझे होती भास॥

माझ्यातून तू वाहसी
तुझ्यातही मी पाहसी
तूझ्यामाझ्यातले सारे
गुज माझ्यातुझ्यापाशी॥

तुझी माझी पटे खूण
तुझी माझी हीच धून
तूझे प्राण माझे प्राण
माझे मन तूझे मन॥

_ सुधीर मोघे

नवी भर दि.१६-०३-२०२३ :

🕉 भक्ती प्रभात 🕉

बारा पुण्यक्षेत्री बारा लिंगे बारा ज्योती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

दक्षशापे चंद्र पुरा कोमेजला
शिवकृपायोगे पुन्हा तेजाळला
ज्योतिर्लिंग हे पहिले, ब्रह्मदेवे स्थापियले
सोरटीचा सोमनाथ नामें याची ख्याती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

श्रीशैल गिरीशिखरी शिवतेज वास करी
सती चंद्रावतीसाठी इथे आले उमापती
शैलमल्लिकार्जुन गुण भक्तजन गाती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

दैत्यदूषण करी निर्दाळण हुंकाराने त्रिपुरारी
तोच रुद्र सहज होय गवळ्याचा कैवारी
तोच सांब झालासे महाकालेश्वर क्षिप्राकाठी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

ॐकार होऊन ये चंद्रमौली
विंध्याद्रीची कामना पूर्ण झाली
ॐकार तो जाण हा अमलेश्वर, हीच जाण शिवकुटी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

रावणासी फसवुनी गजानने वसविले, ते हे ज्योतिर्लिंग वैजनाथ
देवांचेही धन्वंतरी ज्याच्यामधे प्रवेशले, ते हे ज्योतिर्लिंग वैजनाथ
छायेपरी जिथे आहे संगती पार्वती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

भीमनामे दानवाने बह्मदेवाच्या वराने
केले सार्‍या जगतासी त्राही त्राही त्राही
संहाराया त्या दैत्यासी घेई भीमस्वरुपासी
हर विश्व व्यापुनिया राही राही राही
भीमाशंकराचे ठायी नदी भीमा जन्म घेई
वनी डाकिनी या शंकराच्या अभिषेकासाठी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

जानकीने रचियले
वालुका लिंग हे श्रीरामाने स्थापियले
भाविकास साधकास नित्‌ देत आस
उभा सेतुबंधी रामेश्वरतटी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

ब्रह्मवाणी ठरू नये खोटी याच्यासाठी इथे शिव भस्मसात झाले हो
त्याच भस्मातून फिरुनिया तेजाळून तिथे ज्योतिर्लिंग प्रकटले हो
औंध्या नागनाथ जाणा वसे सदा येथ नागजनासाठी, तेच तया त्रिकाळी पूजिती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

कैलास सोडून ये सांब भोळा
भुलला कसा या वाराणशीला?
विश्वेश्वर शिवक्षेत्र सदैव स्मर
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

गोदावरीतटी एका ठायी नांदताती तिघे, ब्रह्मा विष्णु महेश
वैकुंठ चतुर्दशी त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीस
भक्त लोटती भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास
त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

गंगाधरा, गिरिजावरा, अभयंकरा, नित्‌ त्या स्मरा
केदारनाथ, कर्पूरगौर, शिवनीलकंठ सूख शांती देत
भवदु:ख दूर करी विश्वनाथ, केदारनाथ केदारनाथ
परतत्त्व येथ पावेल शांती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

श्री घॄष्णेश्वर वेरूळ गावी, काय तयाची महती गावी
विरह न साहे कैलासाला, लेणे होऊन समीप आला
ग्रहणकाली शिवपावनवेडी शिवभक्तांची दाटी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

गीत – सुधीर मोघे
संगीत – सुधीर फडके
स्वर – अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगांवकर, रवींद्र साठे, रंजना जोगळेकर

सखी मंद झाल्या तारका या गीताची गोष्ट

गीतकार सुधीर मोघेंना एका चित्रपटात गीत लिहण्यासाठी बोलवणे आले. प्रसंगानुरूप त्यांना गीतलेखन करण्यास सांगण्यात आले. कविवर्य प्रसंगानुरूप गीत लेखनास तर बसले पण “मुळचे कवि” असल्याने मनासारखे गीत तयार होईना. त्या गीताची आराधना करतांनाच कविवर्य सुधीर मोघें यांनी गीता ला “सखी” असे संबोधिले.

आणि ….

मुळ गीत राहिले बाजूला पण एका अजरामर काव्याचा जन्म झाला.
“सखी मंद झाल्या तारका,
आता तरी येशील कां? “

अनेक रसिकांचा असा समज आहे की, हे काव्य प्रेयसीला उद्देशून लिहिलं आहे. आपण जर एकाग्रपणे या काव्याचा रसास्वाद घेतलात तर कविवर्य सुधीर मोघेंच्या असाधारण काव्यप्रतिभेची आपणास प्रचिती येईल.

रात्र सरत चाललीय पण काव्य सुचत नाहीय. कविवर्य म्हणतात :

“मधुरात्र मंथर देखणी,
आली तशी गेली सुनी,
हा प्रहर अंतिम राहिला,
त्या अर्थ तू देशील कां?”

स्वत: संगीतकार असलेले कविवर्य त्या गीतास उर्फ सखीस म्हणतात :

“हृदयात आहे प्रीत अन्
ओठांत आहे गीत ही,
ते प्रेम गाणे छेडणारा
सूर तू होशील कां?”

जीवनांत मला सर्वकाही लाभलंय पण, तरीही कशाची तरी उणीव भासतेय. सखी ! तू येत नाहीस तीच तर उणीव आहे. सांग,
पुर्तता करशील ना?

“जे जे हवेसे जीवनी,
ते सर्व आहे लाभले,
तरीही उरे काही उणे,
तू पुर्तता होशील कां?”

सरतेशेवटी कविवर्य सुधीर मोघें म्हणतात :

“बोलावल्या वाचूनही,
मृत्यू जरी आला इथे,
थांबेल तो ही क्षणभरी,
पण सांग तू येशील कां?”

कविवर्य सुधीर मोघेंच्या दैवदत्त प्रतिभेला
“इये मराठीचिये नगरी” चा सलाम !!
याच काव्या संदर्भात सुप्रसिध्द संगीत संयोजक श्री आप्पा वढावकर यांच्याशी बातचित करतांना त्यांनी ज्या आठवणी सांगितल्या त्या फारच सुखद आणि रोमांचक आहेत.

या गीताला सुप्रसिध्द संगीत दिग्दर्शक श्री राम फाटक यांनी संगीत दिलंय. आकाशवाणी वर हे गीत प्रथम गायलंय….
भारतरत्न पं.भिमसेन जोशी यांनी.

त्यावेळी एका तबकडीवर दोन गाणी ध्वनिमुद्रित होत. त्यासाठी “दिसलीस तू, फुलले ऋतू” आणि
“सखी मंद झाल्या तारका” या गाण्यांचं ध्वनिमुद्रण सुप्रसिध्द गायक श्री सुधीर फडके उर्फ
बाबुजींच्या आवाजात कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील एचएमव्ही च्या स्टुडिओत करावयाचे ठरले.
रेकॉर्डिंगच्या दिवशी नेमका बाबुजींना आवाजाने दगा दिला.

त्यावेळी आतासारख्या अनोख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. वादकांना परत ध्वनिमुद्रणाला बोलवायला लागू नये
म्हणून संपुर्ण गाण्याचे आरंभ ते शेवट (start to end continuous) ध्वनिमुद्रण करावयाचे ठरले.
व्हायोलिन वादक श्री हेमंत पंडित यांनी संपुर्ण गाणे नोटेशन्ससहित उतरवून घेतले. ऑर्गनवर (जुन्या काळातल्या ऑर्गनवर) आपले आप्पा वढावकर होते. त्यांना “नजरे” ची अडचण असल्याने त्यांनी हे सर्व गाणे त्यांतील मधल्या संगीतासह तोंडपाठ केले. संगीतकार श्री राम फाटकांनी हे गाणं कसं गायचं हे ते चारही कडव्यांसह बाबुजींना समजावून सांगितले.

सुरांच्या दृष्टीने पहिले आणि तिसरे कडवे जरी सारखे वाटले तरी “सुरांचे वजन” वेगवेगळे होते. बाबुजींचं म्हणणं होतं की गाण्यातील शब्द न् शब्द स्पष्ट “वाजायला” हवा. आप्पा वढावकर व हेमंत पंडित यांनी हे शिवधनुष्य पेललं. हे संपुर्ण ध्वनिमुद्रण पहिल्या टेकमध्ये ओके झाले. काही दिवसांनंतर आवाज ठीक झाल्यावर बाबुजी जेव्हां हे गाणं गायले तेव्हां आप्पांनी ऑर्गनवर केलेली “शाब्दिक कमाल” पाहून ते अवाक् झाले. त्यांनी आप्पांच्या आणि हेमंत पंडितांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. अशा रितीने मराठी संगीत सृष्टीतील पहिले वेगवेगळे ध्वनिमुद्रीत झालेले गाणे जन्माला आले.

या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गाण्यात “चार सुधीरांचा” सहभाग आहे
१ कविवर्य -> *सुधीर मोघे
२ गायक -> *सुधीर फडके
३ बासरी -> *सुधीर खांडेकर
४ तबला-> *सुधीर रानडे
एकाच गाण्यात एकाच नांवाच्या चार व्यक्ती असण्याचा मराठी संगीतातील तरी हा विश्वविक्रम असावा.
  समीर परांजपे

१६. स्वातंत्र्यशाहीर गोविंद

स्वातंत्र्यशाहीर गोविंद यांचे पूर्ण नाव गोविंद त्र्यंबक दरेकर मूळ गाव – कन्हेर पोखरी ता.पारनेर (जन्म: ९ फेब्रुवारी, इ.स. १८७४ – २८ फेब्रुवारी, इ.स. १९२६) यांना निसर्गाने कमालीची काव्यप्रतिभा दिली होती. गोविंद यांचे वडील नाशिकमध्ये गवंडीकाम करीत असत. गोविंद चार-पाच वर्षांचे असतानाच वडील वारले. स्वतः गोविंद यांनाही त्यानंतर काही दिवसांतच मोठा ताप भरला व त्यांचे दोन्ही पाय लुळे बनले. ते अपंग झाले.
नाशिकमध्ये विनायक दामोदर सावरकर आणि बाबाराव सावरकर हे काही काळ गोविंद यांच्या शेजारीच राहायला होते. सावरकरबंधूंनी ‘मित्रमेळा’ ही संस्था स्थापन केली होती. या संस्थेत गोविंद रमू लागले. गोविंद यांच्या देशभक्तिपर रचना ‘लघु अभिनव माला’मध्ये प्रसिद्धही होऊ लागल्या. पुढे हाच ‘मित्रमेळा’ ‘अभिनव भारत’ या नावाने ओळखला जाऊ लागला. गोविंद या संस्थेचे एक महत्त्वाचे सदस्य होते.
‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले? ‘,’सुंदर मी होणार’, ‘कारागृहाचे भय काय त्याला? ‘, ‘नमने वाहुनि स्तवने उधळा’, ‘मुक्या मनाने किति उधळावे शब्दांचे बुडबुडे? ‘ (लोकमान्य टिळकांवरील काव्य) अशा कवी गोविंदांच्या किती तरी कविता त्या काळी महाराष्ट्रभर गाजल्या आणि पुढे या कवितांमधील ओळींना सुभाषिते होण्याचे भाग्य लाभले.
प्रखर देशभक्तिपर कविता लिहिणार्‍या या स्वातंत्र्यशाहिराच्या काही कविता स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारकडून जप्‍तही करण्यात आल्या होत्या.(विकिपीडिया)
**क्रांतिवीर बाबाराव यांना त्या चार आक्षेपार्ह कवितां प्रसिध्द केल्याबद्दल जन्मठेप दिली गेली व काळ्यापाण्याची जन्मठेप सुनावण्यात आली.पुढे या अपंग कवीसही सरकारी जुलूम व छळ यांना सामोरे जावे लागले, मात्र आपल्या कवितांमुळे बाबारावांना शिक्षा झाली याचा सल त्यांना कायम होता.
त्यांचे कवितेतील एक कडवे
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना।
असा भूतकालीन सिद्धांत जाणा।एज
स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मीळाले॥


देशाचा पालनवाला, तो शिवाजि राजा झाला!
धर्माचा रक्षणवाला, तो शिवाजि राजा झाला!
त्रिभुवनात डमरू ज्याचे, नांदताच नंदी नाचे!
जो परित्राण या भूचे, शंकर भोला, तो शिवाजि!

. . . . . श्री.माधव विद्वांस – फेसबुकवरून साभार

नवी भर दि.०९-०२-२०२२ : कवी गोविंद
रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ या काव्याचे जनक कवी गोविंद (गोविंद त्र्यंबक दरेकर) यांची आज जयंती ९ फेब्रुवारी १८७४. त्यांना वयाच्या आठव्या वर्षी अपंगत्व आल्या मुळे व घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेत आले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर त्यांची नितांत श्रद्धा होती. गोविंद यांचे कवित्व बालपणापासूनच दिसून आले होते. सुरुवातीला लावण्या व शृंगारिक काव्य करणाऱ्या गोविंदांनी पुढे अनेक ओजस्वी काव्ये लिहिली त्यावर सरकारने बंदी आणली. सावरकरांचे बंधू क्रांतिवीर बाबाराव यांना त्या चार आक्षेपार्ह कविता प्रसिध्द केल्याबद्दल जन्मठेप दिली गेली व काळ्यापाण्याची जन्मठेप सुनावण्यात आली. पुढे या अपंग कवीसही सरकारी जुलूम व छळ यांना सामोरे जावे लागले, मात्र आपल्या कवितांमुळे बाबारावांना शिक्षा झाली याचा सल त्यांना कायम होता. त्यांचे कवितेतील एक कडवेः
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना ।
असा भूतकालीन सिद्धांत जाणा ।
स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले ।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले ॥
त्यांची दुसरी एक सुरस कविता आहे ’असा धरि छंद’.
ही कविता आठवणीतल्या कवितांत दिलेली आहे.
असा धरिं छंद जाइ तुटोनिया भवबंध ॥ धृ ॥
छंद लागला टिटवीला सप्तसागर शोषित केला ।
मैनावतिने कृतार्थ केला गोपीचंद ॥ १॥
दुधाचा सागर उपमन्यूला ध्रुव तो अढळपदी स्थापिला ॥
मार्कंड्याने यम हटवीला चालिला मंद ॥ २ ॥
तीन देह जडभरताला रावण रामरूप तो झाला ॥
गोपी चढल्या वैकुंठाला यशोदानंद ॥ ३ ॥
अशा या छंदे कितिएक तरती नराचे नारायण ते होती ॥
दीनबंधु अपुला करिती निजसुखकंद ॥ ४ ॥

. . . श्री.नरेंद्र गोळे फेसबुकवरून साभार दि. ०९-०२-२०२२


१७. वासुदेवशास्त्री वामन खरे

वासुदेव वामन खरे ऊर्फ वासुदेवशास्त्री खरे यांचा जन्म कोकणातील गुहागर इथे १८५८ साली झाला.  त्यांच्या घराण्यात शास्त्राध्ययनाची आणि पुराण सांगण्याची परंपरा होती. पण त्यांची घरची परिस्थिती बेताची होती. त्यांना तीन भाऊ व दोन बहिणी होत्या. वासुदेवशास्त्री बुद्धिमान होते. गुहागरच्या मराठी शाळेत ते सहावीपर्यंत शिकले. कवितांची आणि नाट्यकलेची त्यांना देण होती. गावातल्या देवीच्या उत्सवाच्या वेळी नाटक मंडळींना ते नाटके लिहून व बसवून देत. १८७२च्या डिसेंबर महिन्यात त्यांचा विवाह झाला. त्यानंतर विद्याभ्यासासाठी आणि जमल्यास उद्योग करण्यासाठी वासुदेवशास्त्री यांनी कोकण सोडले व ते साताऱ्यास आले.

साताऱ्यात वासुदेवशास्त्री तत्कालीन विख्यात संस्कृत पंडित अनंताचार्य गजेंद्रगडकर यांच्या हाताखाली संस्कृत शास्त्र विद्या शिकण्यासाठी राहिले. अनंताचार्य यांच्याकडे वासुदेवशास्त्र्यांनी काव्ये, तर्कसंग्रह व व्याकरण यांचा अभ्यास केला. त्यांची शास्त्रींची बुद्धिमत्ता आणि अभ्यासाची कळकळ पाहून आचार्य त्यांच्यावर संतुष्ट झाले आणि लवकरच त्यांनी आपल्या घरीच वासुदेवशास्त्री यांची जेवणाची सोय केली. साताऱ्याला वासुदेवशास्त्री अडीच वर्षे होते. त्यांचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले पण नंतर त्यांना पैशांची मोठी चणचण भासू लागली. एकदा शास्त्री साताऱ्यातील भटमहाराजांच्या हौदावर गेले असता पुण्याचे शिक्षक बजाबा बाळाजी नेने यांच्याशी त्यांची गाठ पडली. नेने मास्तर व वासुदेवशास्त्री यांच्यात ‘एखाद्या विषयावर कोण जास्त चांगली व जलद कविता करतो’ याची पैज लागली व वासुदेवशास्त्रींनी ती पैज जिंकली. नेने मास्तर वासुदेवशास्त्र्यांच्या ज्ञानावर खूष झाले व त्यांनी पुण्याला शाळेत आपल्या बदली नोकरीवर जाण्यासंबंधी विचारले. शास्त्रीबुवा त्यासाठी लगेच तयार झाले. त्यानंतर वासुदेवशास्त्री पुण्यात दरमहा पंधरा रुपये पगारावर शाळेत रुजू झाले.

पुण्यात आल्यावर वासुदेवशास्त्री यांची माधवराव कुंटेश्रीधर विठ्ठल दातेलोकमान्य टिळकगोपाळ गणेश आगरकरसार्वजनिक काकाविष्णुशास्त्री चिपळूणकर अशा थोरामोठ्यांशी ओळख झाली. विष्णुशास्त्र्यांनी काढलेल्या ‘काव्येतिहास संग्रह’ या मासिकातील संस्कृत विभागाचे संपादन विष्णुशास्त्र्यांच्या गैरहजेरीत वासुदेवशास्त्रींनी केले. लोकमान्य टिळक आणि वासुदेवशास्त्रींची ओळख डेक्कन कॉलेजपासून होती. म्हणूनच वासुदेवशास्त्रींनी आपली शाळेतील नोकरी सोडून टिळक, आगरकर व विष्णुशास्त्री यांनी स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली. टिळक व आगरकर यांनी काढलेल्या वर्तमानपत्राला ‘केसरी’हे नाव वासुदेवशास्त्री यांनी सुचवले होते.

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वासुदेवशास्त्रींनी केवळ दहा महिने शिकवले. त्यानंतर त्यांनी पुणे सोडले व २८ नोव्हेंबर १८८० रोजी ते मिरजेत नव्याने स्थापन झालेल्या हायस्कूलमध्ये संस्कृत शिक्षक म्हणून रुजू झाले. मिरज येथील शाळेत ते संस्कृत आणि मराठी हे विषय शिकवत. शाळेतील विद्यार्थी त्यांना फार घाबरत. पण तेच वासुदेवशास्त्री विद्यार्थांना जीव ओतून शिकवत. सर्व विद्यार्थांना ते समान वागणूक देत. गरीब-श्रींमंत असा भेदभाव करत नसत. तसेच ते शाळेप्रमाणे घरीही मुलांना बोलवून शिकवत असत.

लोकमान्य टिळकांच्या केसरीच्या पहिल्या पानावर वरच्या भागी वासुदेवशास्त्री खरे यांचा हा श्लोक असे.
गजालिश्रेष्ठा ह्या निबिडतरकान्तारजठरी।
मदान्धाक्षा मित्रा क्षणभरिहि वास्तव्य न करी।
नखाग्रांनी येथे गुरुतर शिला भेदुनि करीं।
भ्रमाने आहे रे गिरिकुहरि हा निद्रित हरी॥
इथे गजालिश्रेष्ठ म्हणजे ब्रिटिश राजवट आणि झोपलेला सिंह म्हणजे भारतीय जनता असे रूपक होते असे मला वाटत होते. हा श्लोक म्हणजे वासुदेवशास्त्री खरे यांनी जगन्नाथ पंडिताच्या भामिनीविलासमधील श्लोकाचा मराठी समश्लोकी काव्यानुवाद होता.
जगन्नाथ पंडिताचा मूळ श्लोक :
स्थितिं नो रे दध्या: क्षणमपि मदान्धेक्षण सखे।
गजश्रेणीनाथ त्वमिह जटिलायां वनभुवि।
असौ कुम्भिभ्रान्त्या खरनखरनिर्दारितमहा-
गुरुग्रावग्राम: स्वपिति गिरिगर्भे हरिपति:॥

वासुदेवशास्त्री खरे यांची एक प्रसिद्ध कविता अशी आहे.

पोटासाठी भटकत जरी दूर देशी फिरेन,
मी राजाच्या सदनी अथवा घोर रानी शिरेन ।
नेवो नेते जड तनुस या दूर देशास दैव,
राहो चित्ती प्रिय मम परि जन्मभूमी सदैव ।।
जेथे माझे जनन घडले पूर्व पुण्येच थोर,
जेथे गेले दिवस,असता बाळ, सौख्यात फार ।।

इंटरनेट आणि विकीपीडियावरून साभार. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87

१८. आरती प्रभू (चिं.त्र्यं.खानोलकर)

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ——–हे गीत लिहिणारे नाटककार ,कादंबरी लेखक आरती प्रभू यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचे नाव चिंतामणी त्र्यंबक खानोलकर (मार्च ८, इ.स. १९३०- एप्रिल २६, इ.स. १९७६) कोकणातल्या कोण्या एका गावी त्यांच्या मातोश्री, खानावळ चालवीत. तेथे गल्ल्यावर बसून खानोलकर कविता करत. त्यांच्या खानावळीत जेवायला येणाऱ्या काही मंडळींनी त्यांच्या कवितेचे काही कागद चोरून त्या कविता आरती प्रभू या नावाने ‘मौज’मधे छापण्यास पाठवून दिल्या. ‘मौज’च्या अंकात आपल्या कविता प्रकाशित झाल्याचे बघून खानोलकर बावरून गेले. त्या अवस्थेतच त्यांनी खालील कविता लिहिली.
ये रे घना, ये रे घना, न्हाउं घाल, माझ्या मना …
खानोलकरांना भीती होती की अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीमुळे आपली प्रतिभा, आपल्याला मिळालेली शब्दांची ही देणगी आपल्या हातून निसटून तर जाणार नाही ना. पण तसे काही झाले नाही. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य त्यांच्या अकाली निधनापर्यंत मराठी साहित्यसॄष्टीत तळपतच राहिला.कुडाळला असताना चि.त्र्यं.खानोलकरांनी एक तीन अंकी नाटक लिहिले होते. त्याचा प्रयोगही कुडाळला झाला होता, पण ते लिखित नाटक कुठेतरी गहाळ झाले. त्यानंतर खानोलकरांनी ’एक शून्य बाजीराव’ लिहिले, ते ‘रंगायन‘ने विल्सन कॉलेजच्या रंगमंचावर सादर केले आणि प्रेक्षकांना आवडले. नाटकाच्या दिग्दर्शिका विजया मेहता होत्या.
त्यांची साहित्यसंपदा
अजगर (कादंबरी, १९६५)—–अजब न्याय वर्तुळाचा (नाटक, १९७४)—–अभोगी (नाटक)—–अवध्य (नाटक, १९७२)—–आपुले मरण—–एक शून्य बाजीराव (नाटक, १९६६)—–कालाय तस्मै नमः (नाटक, १९७२)—–कोंडुरा (कादंबरी, १९६६)——गणूराय आणि चानी (कादंबरी, १९७०)—–चाफा आणि देवाची आई (कथा संग्रह, १९७५)—–जोगवा (काव्यसंग्रह, १९५९)—–त्रिशंकू (कादंबरी, १९६८)—–दिवेलागण (काव्यसंग्रह, १९६२)—–नक्षत्रांचे देणे (काव्यसंग्रह, १९७५)—–पाषाण पालवी ((कादंबरी, १९७६)——पिशाच्च ((कादंबरी, १९७०)——रखेली (नाटक)——राखी पाखरू (कथा संग्रह, १९७१)——–रात्र काळी, घागर काळी (कादंबरी, १९६२)——श्रीमंत पतीची राणी (नाटक)—–सगेसोयरे (नाटक, १९६७)——सनई (कथा संग्रह, १९६४)—-हयवदन (नाटक)
त्यांची गीत संपदा
एकाच एकाच वेळे ——– कसे ? कसे हासायाचे ——-कुणाच्या खांद्यावर——- गेले द्यायचे राहून ——–ती येते आणिक जाते ——-तुम्ही रे दोन दोनच ——- तू तेंव्हा तशी ——तो एक राजपुत्र मी ——दुःख ना आनंदही ——नाही कशी म्हणू तुला——- बंद ओठांनी निघाला ——– मीच मला पाहते आजच —— ये रे घना ये रे घना ——- लवलव करी पातं ——- विश्रब्ध मनाच्या कातरवेळी —— समईच्या शुभ्र कळ्या —– ही निकामी आढ्यता का


कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ।।
कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्‍त ओकून
जगतात येथे कुणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे ।।
दीप सारे जाती येथे विरून, विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून, झडून
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे ।।
अंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी
देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे ।।

श्री.माधव विद्वांस यांच्या मुखपुस्तक भिंतीवरून (Face Book Wall) साभार दि.२६-०४-२०२१

*******

ये रे घना, ये रे घना , न्हाऊ घाल माझ्या मना…

मला हा अर्थ माहित नव्हता.. मला सुद्धा हे पावसाचे गाणे आहे असेच वाटायचे!
गाणं ऐकताना पावसाचं वाटतं, पण पु.लं देशपांडे यांच्या पत्नी सुनीता बाईंनी या मागची गोष्ट सांगितली होती, ती थोडक्यात अशी –
खूप प्रसिद्धी मिळू लागल्यावर आपल्याला अहंकार होऊन प्रतिभा तर कोमेजून जाणार नाही ना, अशी भीती खानोलकरांना वाटली. त्या वेळेस परमेश्वराची भाकलेली ही करुणा आहे..

ये रे घना, ये रे घना (परमेश्वरा धाव) न्हाऊ घाल माझ्या मना (माझ्या मनाला शांतव)
फुले माझी अळुमाळू (माझ्या काव्य प्रतिभेची सुकुमार फुले)
वारा बघे चुरगळू (अहंकाराचा वारा चुरगळू पहात आहे)
नको नको म्हणताना गंध गेला रानावना (कितीही नाही म्हणताना या फुलांचा सुगंध दूरवर पसरला आहे, पसरत आहे)

टाकूनिया घरदार नाचणार नाचणार, नको नको म्हणताना मनमोर भर राना (मी कितीही नको म्हंटलं, तरी माझा मनमोरही त्या प्रसिद्धीवर नाचतोच)
नको नको किती म्हणू वाजणार दूर वेणू (कितीही नको म्हंटले तरी या कवितांची गाणी होणार, कोणीतरी गुणगुणणार)
बोलावतो सोसाट्याचा वारा मला रसपाना (त्या अहंकाराचा सोसाट्याचा वारा मला त्या प्रसिद्धीचा रसास्वाद घ्यायला बोलावतोच आहे)
म्हणून तू येरे घना, येरे घना,
न्हाऊ घाल माझ्या मना…
🌸

वॉट्सॅपवरून साभार . . दि.१०-०६-२०२१




१९. संदीप खरे

मला माहीत असलेले नव्या पिढीमधले एकमेव प्रसिद्ध कवी. मी शाळेत असतांना त्यांचा जन्मही झालेला नव्हता, त्यामुळे मी त्यांच्या कविता शिकण्याचा प्रश्नच नाही. ‘आयुष्यावर बोलू काही’ या अप्रतिम कार्यक्रमामुळेच मला ते माहीत झाले आणि आवडले. पूर्वी कवीवर्य मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, वसंत बापट वगैरेंचे कविता वाचनाचे कार्यक्रम होत असत, पण आजच्या युगात फक्त कवितांवर आधारलेला दुसरा कुठलाही इतका यशस्वी कार्यक्रम मी पाहिला नाही.

संदीप खरे (जन्म : १३ मे १९७३) हे प्रसिद्ध मराठीकवी व गायक आहेत. त्यांचे ‘दिवस असे की’ आणि ‘आयुष्यावर बोलू काही’ हे गीतसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. सलील कुलकर्णींबरोबर त्यांनी बरेच गीतसंग्रह प्रकाशित केले आहेत. त्यांच्या व्यासपीठावरील आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमांमुळे ते सुरुवातीला प्रसिद्धी झोतात आले. त्या कार्यक्रमाचे हजाराच्यावर प्रयोग झाले आहेत. आजही त्यांचे कार्यक्रम हाऊसफुल असतात. आयुष्यावर बोलू काही बरोबरच, ते कवी वैभव जोशी ह्यांच्यासोबत ‘इर्शाद’ हा कवितांचा कार्यक्रम देखील करतात. संदीप यांनी ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ या मराठी चित्रपटात प्रमूख भूमिकाही केली आहे.

मी मोर्चा नेला नाही

मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही

भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना
कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही

नेमस्त झाड मी आहे, मूळ फ़ांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने

पण पोटातून कुठलीही, खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही

धुतलेला सात्विक सदरा, तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजून रुळते, अदृश्य लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो
मी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही

मज जन्म फळाचा मिळता, मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो
मज चिरता चिरता कोणी, रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही

मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . .

आयुष्यावर बोलू काही !

जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही !
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !

उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू
भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही

तुफान पाहुन तीरावर कुजबुजल्या होड्या
पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही

हवेहवेसे दुःख तुला जर हवेच आहे
नकोनकोसे हळवे कातर बोलू काही

उद्या-उद्याची किती काळजी बघ रांगेतुन
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही

शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणुनी
वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही

. . . . . . . . . .

आजी आणि तिची नातवंडं यांच्या नात्यावरची एक खूप सुंदर कविता आहे, संदीप खरे यांची…

आजी म्हणते काढल्या खस्ता
जन्मभर मी केले कष्ट
तू म्हणजे त्या सगळ्याची
शेवट गोड असलेली गोष्ट

सगळं कथा पुराण झालं
देव काही दिसला नाही
कुशीत येतोस तेंव्हा कळतं
कृष्ण काही वेगळा नाही . . .

  • संदीप खरे

ह्या कवितेला नातवाने दिलेले उत्तर :

प्रश्न खूप पडतात ग, आज्जी,
देशील का मज उत्तरं त्यांची?
ठाऊक आहेत देवकी-यशोदा,
पण . . . .
आज्जी होती का कृष्णाची?

खाण्यासाठी चोरून माखन
उगाच करी सवंगड्यांसी गोळा?
खडीसाखरेवरती आज्जी
देई न त्या लोण्याचा गोळा?

बांधुन ठेवी माय यशोदा
उखळासी करकच्चुन त्याला,
धावूनी का ग गेली नाही
आज्जी त्याला सोडविण्याला?

कधी ऐकले, त्यास आजीने
दिला भरवुनी मऊ दूधभात?
निळ्या मुखावर का ना फिरला
सुरकुतलेला थरथरणारा हात?

असेल मोठ्ठा देव, तरी पण
आज्जी त्याला नव्हती नक्की,
म्हणूनी सांगतो मी सर्वांना ..
कृष्णापेक्षा मीच लकी.

  • सर्व आज्ज्यांना समर्पित
    🙏🙏🌹🌹 वॉटसॅपवरून साभार दि. १९-०६-२०२१

. . . . . . . . . .

संदीप खरे यांची काही अत्यंत लोकप्रिय झालेली गाणी :

दूरदेशी गेला बाबा गेली कामावर आई।
नीज दाटली डोळ्यात तरी घरी कुणी नाही।।
http://www.youtube.com/watch?v=Q-qlT0-XuL8&NR=1

दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला

http://www.youtube.com/watch?v=xaH5-4Lp1qw&feature=related

२०. कवी बी अर्थात नारायण मुरलीधर गुप्ते

चाफा बोलेना चाफा चालेना……. चाफा खंत करी, काही केल्या फुलेना अश्या सुंदर कविता गाणी लिहिणारे कवी बी अर्थात नारायण मुरलीधर गुप्ते यांची आज जयंती (जून १, १८७२ – ऑगस्ट ३०, १९४७)
त्यांनी प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इ. नानाविध विषयांवर कविता केल्या. तसेच, त्यांनी काही भाषांतरे ही केली आहेत. त्यांची पहिली कविता ‘प्रणय पत्रिका’ १८९१ साली ‘करमणूक’ मध्ये छापून आली होती. त्यांच्या प्रसिद्धी पराङ्मुख स्वभावामुळे ‘कवी बी’ कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते.
‘फुलांची ओंजळ’ हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह प्रसिद्ध झाला त्यांच्या प्रणयपत्रिका, बकुल, माझी कन्या, चाफा, वेडगाणे या काही विशेष उल्लेख कराव्या अश्या कविता! यातील ‘माझी कन्या‘ ही कविता पूर्वी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना अभ्यासाला असल्यामुळे आणि ‘चाफा‘ ही कविता लता मंगेशकरांच्या समधुर स्वरात गीतबद्ध झाल्यामुळे सर्वोपरीचीत आहे. (हा मूळ कविताचा एक भाग आहे. पूर्ण कविता खाली दिली आहे.)
चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना
गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनासवे गाणी
आम्ही गळयांत गळे मिळवूनी रे
गेले केतकीच्या बनी, गंध दरवळला मनी
नागासवे गळाले देहभान रे
चल ये रे, ये रे गडया, नाचू उडू घालू फुगडया
खेळू झिम्मा झिम पोरी झिम पोरी झिम
हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण
उणे करु आपण दोघे जण
जन विषयाचे किडे, ह्यांची धाव बाह्याकडे
आपण करु शुद्ध रसपान रे
चाफा फुले आला फुलून
तेजी दिशा गेल्या आटून

कोण मी चाफा, कोठे दोघे जण रे”

श्री.माधव विद्वांस – फेसबुकवरून साभार

. . . . .

30-08-2021 . . . चाफा बोलेना चाफा चालेना अश्या सुंदर कवितेचे रचनाकार कवी “बी ” तथा नारायण मुरलीधर गुप्ते यांची आज पुण्यतिथी
नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी बी (जून १, १८७२ – ऑगस्ट ३०, १९४७) हे मराठी कवी होते. त्यांनी प्रेमगीते, भावगीते , सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इ. नानाविध विषयांवर कविता केल्या. तसेच, त्यांनी काही भाषांतरे ही केली आहेत. त्यांची पहिली कविता ‘प्रणय पत्रिका’ १८९१ साली ‘करमणूक’ मध्ये छापून आली होती. त्यांच्या प्रसिद्धी पराङ्मुख स्वभावामुळे ‘कवी बी’ कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते.
‘फुलांची ओंजळ’ हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना आचार्य अत्र्यांची आहे.
आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त मराठी विश्वकोशातील लेख , तुमच्यासाठी
प्रणयपत्रिका’ ही ‘बीं’ची पहिली कविता १८९१ची; पण १९११ मध्ये लिहिलेल्या ‘वेडगाणे’ या कवितेपासून त्यांनी ‘बी’ हे टोपणनाव घेतले; रसिकांचे लक्ष वेधून घेणारी त्यांची पहिली कविता तीच.
‘बी’ हे केशवसुतांचे समकालीन; आणि वृत्ती व विचार यांबाबत तत्कालीन कवींत केशवसुतांना सर्वांत जवळचे. तसेच खऱ्या अर्थाने आधुनिक असलेल्या कवींतील श्रेष्ठांपैकी एक; परंतु ते त्यांच्या हयातीत एकंदरीने उपेक्षितच राहिले. त्यांचे अल्प लेखन (एकुण कविता ४९) व प्रसिद्धीबाबतची उदासीनता यामागे ‘उणीव रसिकांचीच खरी, आज भासते परोपरी’ ही त्यांची भावनाच असावी. त्यांच्या कित्येक कवितांतील विचार जटिल आहे आणि त्याला अध्यात्माचे अंग आहे. त्यांची लेखनसरणी काहीशी वेगळी, अल्पाक्षरी आणि दुर्बोध आहे; ती दुर्बोधता अध्यात्माच्या परिभाषेचा स्पर्श झाल्यामुळे, तर कित्येकदा क्लिष्ट शब्दयोजनेमुळेही, आलेली आहे. ‘बीं’ची बहुतेक कविता ज्या काळात लिहिली गेली, (१९११ ते १९२३) तो काळ गोविंदाग्रजांच्या आणि काहीसा बालकवींच्या झळाळीचा, म्हणून ‘बी’ निष्प्रभ ठरले असावेत. नंतरच्या काही वर्षांतील अभिरुचीशीही त्यांचा सुर जमणे कठीण होते. फुलांची ओंजळ या ‘बीं’च्या अडतीस कवितांच्या पहिल्या संग्रहाला (१९३४) प्र. के. अत्रे यांच्या दीर्घ प्रस्तावनेने उठाव दिला आणि जाणकारांपर्यंत ती पोहोचली. दुसरी आवृत्ती १९४७ साली प्रसिद्ध झाली. ह्या आवृत्तीत नंतरच्या अकरा कवितांचा ‘पिकले पान’ या शीर्षकाखाली समावेश केला गेला. त्यानंतर आणखी पाच आवृत्त्या निघाल्या. दीर्घकाळ उपेक्षित राहिलेल्या या कवितेला असे थोडे साफल्य लाभले; पण हा सामान्य वाचकाच्या सहज पचनी पडणारा कवी नव्हेच.
केशवसुतांचा ‘बीं’ वरील प्रभाव विविध तऱ्हांनी जाणवतो. एक तऱ्हा म्हणजे ‘डंका’, ‘आम्ही’, ‘भगवा झेंडा’ इ. कवितांतील जुने नष्ट करण्याची चेतना देणाऱ्या बंडखोर विचाराची; दुसरी ‘वेडगाणे,’‘पिंगा’, ‘चाफा’ यांसारख्या अलौकिकाचा ध्यास व्यक्त करणाऱ्या गूढ कवितांची; तिसरी, ज्यांत ‘आनंदाला म्‍लानपणा नच सौदर्याला क्षय’ अशा पूर्णाकडे जग जाणार असल्याचा निर्भर आशावाद उच्चारणाऱ्या‘फुलांची ओंजळ’ सारख्या कवितांची. सौंदर्यानंदाची तीच आस आणि ‘सान्त अनन्ताची मिळणी’ झाल्याचा उत्फुल्ल क्षणी होणारा साक्षात्कार, ‘बीं’चे बालकवींशी साधर्म्य दाखवतो.‘आठवण’-मधील निसर्गचित्रण काहीसे बालकवींच्या ढंगाचे आहे. ‘विचार-तरंगां’मध्ये वारंवार बालकवींच्या ‘फुलराणी’चा भास होतो.‘कमळा’ ही कथन-कविता गोविंदाग्रजांच्या इतिहासविषयक स्वच्छंदतावादी वृत्तीची आणि मधूनमधून त्यांच्या शाहिरी थाटाच्या शब्दकळेची आठवण जागी करते. पण ही साधर्म्ये कमीअधिक वरवरची. काही प्रमाणात ती एकाच युगातील समानधर्मी कवींची प्रस्फुरणे. पण ‘बीं’च्या स्वतंत्र काव्यव्यक्तित्वाला त्यांनी ढळ पोचत नाही.
‘बीं’ नी काव्यासंबंधीची आपली मते ‘कविवंदन’, ‘विचारतरंग,’ यांसारख्या कवितांत ठामपणे व्यक्त केली आहेत. छन्द – व्याकरण – रसादींची जुनी मापेकोष्टके लावून आधुनिक कवितेवर रोष धरणाऱ्या विद्वद्वर्यांचा (ते ‘विशाळ मणिगोटे’) ‘बी’ धिक्कार करतात. ‘संस्कृत-भाषानियमांची का तुजवरि बळजोरी’ असे मराठी भाषेला विचारतात; पण त्यांची स्वतःची भाषा बरीच संस्कृतप्रचुर आहे. ‘कमळा’ या कवितेत ते ‘निळ्या सारणीमध्ये वाहते मोत्याचे पाणी’ अशी नायिकेविषयी सहजसुंदर, चित्रमय, लावणी बाजाची ओळ लिहून जातात; पण तिच्यावर ‘विकासोन्मुखलावण्य-शुद्धशालीन्यसुगुणशाली,’‘तमालदल-सन्निभाभिरामा’ यांसारखी जडजंबाल विशेषणेही लादतात. संस्कृत आणि पंडिती कवितेप्रमाणे शाहिरी कविताही ‘बीं’ नी आत्मसात केली होती; पण त्या निरनिराळ्या शैलींच्या विसंवादी मिश्रणांमुळे ‘बीं’ची शब्दकळा गंगाजमनी झाली; त्याच्या तात्त्विक विचाराशी विसंगत झाली. बहिरंग हे गौण; अंतरंगातच सौंदर्य असते, ही त्यांची धारणा एका परीने खरी असली, तरी ती हा दोष पुरा झाकू शकत नाही.


किति तरि दिन झाले ! भेट नाही पदांची,
करमत मज नाही; वेळ वाटे युगाची.
या ओळींवरून आपल्या पतीचा विरह सहन होत नाहीये त्या प्रेयसीला हे दिसून येते तर,
तरल मन नराचे राहते ऐकते मी
विसर बघुनि पावे अन्य पात्रास नामी.
कमलिनि भ्रमराला नित्य कोशात ठेवी
अविरत म्हणुनी तो पंकज प्रेम दावी.
विसर पडुनि गेला काय माझाही नाथा ?
म्हणुनिच धरिले हे वाटते मौन आता




********************

मराठबोली दिवाळी अंक 2020 मधील दीर्घ लेख, ‘कवी बी- पिंगा आणि चाफा नव्या अर्थासह’

-मनीषा अतुल(मनीषा साधू)

‘पिंगा’ आणि ‘चाफा’ या कवी ‘बी’ यांच्या अगदीच साध्याशा वाटणाऱ्या पण अद्भुत अशा कविता आहेत.साध्याशा कश्या?आणि मग अद्भुत तरी कशा?
त्यांच्याच माझी कन्या या कवितेतल्या सारखा,
‘लाट उसळोनी जळी खळे व्हावे त्यात चंद्राचे चांदणे पडावे
तसे गाली हासता तुझ्या व्हावे उचंबळूनी लावण्य वर वहावे।’ किंवा
‘उष्ण वारे वाहती नासिकांत गुलाबाला सुकविती काश्मिरात
नंदनातील हलविती वल्लरीला कोण माझ्या बोलले छबेलीला।’
यासारख्या चमत्कृतीजन्य प्रतिमांचा स्पष्ट खेळ यात नाही. तर ढगांनी आच्छादिलेल्या आभाळात नजर जावी आणि क्षणार्धात कुठेतरी वीज लकाकून जावी. मग आपण भरले अभाळ विसरून त्यामागच्या विजेची लकीर निर्माण करणाऱ्या जलतत्त्वाचा शोध घेत बसावे, तशी अवस्था या दोन कविता वाचताना होते. साध्या शब्दांमधून आपल्याला एका अद्भुत विश्वपसाऱ्यात त्या गुंतवत नेतात.
त्यांच्या पिंगा या कवितेवर लिहावं,वारंवार लिहावं,अशी ही कविता आहे.जीव आणि परमात्मा यांच्या मिलनातून निर्माण होणारा अद्वयानंद तर त्यांनी रेखाटला आहेच,मात्र त्यासोबतच हे होत असतांनाच्या, म्हणजे या प्रक्रियेदरम्यानच्या पायऱ्या आणि त्याची कारणे ज्या सहज क्रियांमधून उलगडत नेली आहे, त्यामुळे एकदा ती कविता भिनू लागली तर आपल्यालाही भौतिक आणि परातात्त्विक पिंगा घ्यायला लावते.
नारायण मुरलीधर गुप्ते म्हणजे कवी बी,यांच्या कवितांचा आधारच तत्त्वज्ञान आहे,त्यात त्यांच्या गूढगुंजनपर कवितांमध्ये जीव आणि आत्मा किंवा प्रकृती आणि अतीन्द्रिय भावना यांची एक लयबद्ध सांगड घातली गेलेली दिसते. विशेषतः पिंगा या कवितेचा विज्ञानाच्या सर्व अंगाने अभ्यास करता येईल.जसे, शारीरिक हालचालीतून मानसिक उत्तेजना,त्यामुळे स्त्रवणाऱ्या हॉर्मोन्सने मेंदूला मिळणारी उत्तेजना,त्याने येत जाणारी तरल अवस्था, त्या अवस्थेमुळे जिवाला भौतिक जाणिवेतून अध्यात्मिक जाणिवेचा स्पर्श होण्याची पातळी गाठता येणे, हे सगळे आले आहे.पिंगा या कवितेत जीव आणि परमात्मा यांच्या मिलनातून होणारा अद्वयानंद रेखाटतांनाच मायेत गुरफटलेल्या जीवाला या भौतिक हालचालींच्या दरम्यान, मूळ आत्मस्वरूपाचे ज्ञान होणे आणि त्याने त्याचे दुर्बलपण संपून, द्वैताच्या जाणिवेचे निराकरण होणे आणि पुन्हा मूळ पदावर येत,द्वैताचा समंजस स्वीकार करणे,हे ज्या सुंदर आणि सहज क्रियेतून उलगडले आहे ते निव्वळ अद्भुत आहे!
आता या कवितेच्या माध्यमातून या सगळ्या पायऱ्या चढत जाऊया.या कवितेची सुरुवात बघा, एक स्त्री आहे. ती अनेक स्त्रियांसह रिंगण करून उभी राहते. त्या हातात हात घालतात आणि पिंगा घालू लागतात.हळूहळू ती एकटी आहे याचा तिला विसर पडून ती समूहाचा एक अविभाज्य भाग होते. मी’पणाचा विसर पडू लागला, की चैतन्यानं मन- शरीर फुलून येतं. पिंगा घेत शरीर झुलू लागलं की चित्तालादेखील गुंगी येते.नशा येते.’मिळून आम्ही सर्वजणी।नाच मांडिला एकपणी।’ आपल्या अनेक आवृत्त्या सभोवती पसरल्यात, चैतन्यानं भारल्यात, याचा प्रत्यय ‘स्व’च्या उर्जेला अनेक पटीनं वाढवतो. ‘अनेक नेत्रांचे बघणे।अनेक कंठांचे गाणे।
अनेक चरणांचे जाणे।अनेक चित्तांचे स्फुरणे।दृष्टी,वाणी, गती,मती।एकच येथून तेथून ती।’
या साऱ्या जणीतर माझ्याचसारख्या.काय फरक आहे माझ्यात,यांच्यात?आम्ही साऱ्याजणीतर त्याचेच अंश आहोत.अगदी एकसारख्याच की! म्हणजे सर्व जीव सारखेच? मग माझे वेगळेपण काय? मीही एक जीव इतरांसारखाच.आणि हे जाणवण्याचाच क्षण साक्षात्काराचा क्षण ठरतो.मी अनेकांमधली एक आहे.विश्व चैतन्याचा एक भाग आहे.पण विश्व चैतन्याचा एक लहानसा भाग असल्याने का होईना माझं महत्त्व आहे.म्हटलं तर एक, म्हटलं तर मिळून विशालच की.
‘ प्रवाह बहुमुख जो होता। वाहे एक मुखे आता। वृत्तींचे बळ मज मिळता। विश्व सहज आले गिळता।’
याच्या पायऱ्या बघा,सुरुवात एकटेपणाने होते.एकली स्त्री नाचाला उभी राहते. मग अनेक जणी एक असल्याचा प्रत्यय येतो. स्वतःला खूप मोठ्या कॅनव्हासवर मोठ्या चित्राचा एक लहानसा भाग म्हणून बघणं होतं. मग परत स्वतःत परत येऊन मीपणाचा साक्षात्कार होतो. पण आताचं एकटेपण हे नाचाला सुरुवात होण्यापूर्वीच्या एकटेपणापेक्षा वेगळं आहे.आपल्या अस्तित्वाचा अर्थ गवसल्यानंतरचा, आपले स्थान कळल्यानंतरचा निराळेपणा आहे हा. म्हणजे एकदम एका बिंदूवर जगापासून सुटून,स्वतःला विलग करता येऊन तटस्थ बघता यावं आणि इतकं अद्वैत व्हावं की त्याचक्षणी द्वैताचाही साक्षात्कार व्हावा,ही खरी त्या कवितेतील गंमत आहे आहे.
अधिक उलगडून बघूया.मी आहे.मी एक अस्तित्व आहे. परंतु मी एकटी नाही,या विश्वाचा अंश आहे.आता माझं मीपण लख्ख होऊन माझ्या समोर उभं आहे. मला ओळखल्यानंतरची ही मी आहे.सारं स्वच्छ आहे.कारण आता मला उमगतं आहे की,
‘ दानव मानव सुरासुर। मी,मजविण ते नि:सार।
मी येता उदयोन्मुख ते। जग तेव्हाची संभवते।’
हे जग मी आहे म्हणून आहे. मी आहे तोवर आहे. माझ्या जगाची सुरुवात माझ्या जन्मानंतर होते आहे. शाश्वत जगाच्या जाणीवेची सुरुवातच जन्मानंतर होते आहे.म्हणजे माझ्यामुळे माझं जग संभवतं. आता गंमत अशी की स्वतःहून सुटून विश्व दर्शनाचा साक्षात्कार झाल्यावर, क्षणभर मी तिथे हरवते की काय असं वाटतं. माझं मीपण शूद्र वाटतं.पण पुढल्याच क्षणी, ते क्षूद्र नसून त्यामुळेच हे सारं आहे हा प्रत्यय येऊन त्याचं महत्त्व कैकपट वाढतं.आता मी या विश्वाचा एक भाग म्हणूनही महत्त्वाची.
‘झपुर्झा गडे झपुर्झा’ या कवितेची आठवण इथे झाल्याशिवाय रहात नाही. एकटेपण-द्वैत-एकटेपणात परत, असा प्रवास या नृत्यादरम्यान होतो. त्याने काय होतं?
‘दुर्बलपण पहिले गेले। क्षूद्रपणातून मी सुटले।
जीर्णबंध सारे तुटले। मी माझी मज सापडले।
स्वार्थजनित सद्गुण भास। जडले होते अंगास
ते गुण झाले मम धर्म। प्रेमास्तव आता प्रेम।’
आणि हा चमत्काराचा क्षण सांगून जातो,
‘मज कसले येणे-जाणे। भाव-अभावाविण असणे। बुदबुद हो की कल्लोळ। अर्णवपद माझे अटळ।
काय करू पण कसे करू?मीपण माझे का विसरू? दीपकळी गे! दीप्तीला। सोड- म्हणे का बुध तिजला?’
माझ्या मीपणाचं एक निराळंच महत्त्व मला पटतं. आत चैतन्याची ज्वाला आहे.हे शरीर कुडी आहे. परंतु ज्योतीची ज्वाला पणती टाकून देत नाही. पणती आहे म्हणून ज्योतीला धरून आहे. दोघांचेही असणे अटळ आहे, महत्त्वाचे आहे. मी आहे म्हणून हा चैतन्याचा साक्षात्कार आहे. हे द्वैत आहे म्हणून त्या परमेश्वराची ओढ आहे.जेव्हा मी माझं असणं नि:शंकपणे स्वीकारलं तेव्हा हेही स्वीकारल्या गेलं की मग शरीर आहे तर वृत्ती आहेत.
‘नाच परी मम राहिना। स्वभाव मूळचा जाईना।’ मोह माया आहे.आता त्यांच्याकडे अलिप्त भावाने बघता येते आहे. भोगता येते आहे. मायेचा खेळ समजून घेऊन परत त्यात शामील होण्यासारखा शहाणा आनंद नाही.
‘ नाचा माझ्या वृत्तींनो। नाचा भुवन समूहांनो।
नाच आपुला भुताला। होवो शांतीप्रद सकला।’
हा पिंगा खेळ म्हणजे जीवनखेळ आहे. हा खेळच मुळी चालतो तो चित्तवृत्ती शांत करण्यासाठी चालतो.मन अधीर होतं,नाचतं, ऊर्जेचा वापर करतं शांत होतं.त्याकरिता हा प्रपंचखेळ त्याकरिता हा वासनाखेळ.
पिंगा कविता लेखाच्या शेवटी दिली आहे.आता दुसऱ्या कवितेकडे वळू.
कवी ‘बी’ची, ‘चाफा’ ही अशी बहुचर्चित कविता आहे जिने समीक्षकांना कायम मोहात पाडले आहे. या कवितेचा समीक्षकांनी अनेक तऱ्हेने अर्थ लावू पाहिलाय. बहुतांश समीक्षकांच्या मते ही रूपकात्मक प्रेम कविता आहे, ज्यात द्वैताचा लोप होऊन अद्वैताचं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. जीवाची अध्यात्मिक अनुभूती देणारी ही कविता आहे.
समीक्षक या कवितेबद्दल काय म्हणतात ते अगोदर बघूया.
डॉ. अमृता इंदूरकर यांच्या ग्रंथात समीक्षकांच्या निरनिराळ्या मतांचा उल्लेख आढळतो. समीक्षकांच्या मते जीवरूपी प्रेयसी,आत्मारूपी चाफ्याला म्हणजे प्रियकराला मोहवते आहे. प्रणयोत्सुक होऊन त्याला साद घालते आहे.परंतु तो रूसलेला आहे.बोलत नाही.त्याला खुलवण्यासाठी ती त्याला निरनिराळ्या ठिकाणी घेऊन जाते आहे. आंब्याच्या बनात नेते.केतकीच्या बनात नेते.माळावर हिंडवून आणते.डोंगरकड्यावरून कोसळणारे पाणी दाखवते.निसर्गातील युग्मांच्या जोड्या दाखवते, जसे वीज- ढग, राघू-मैना,वारा- कलिका, नदी-डोंगरकडा. परंतु या प्रणयचेष्टांमध्ये चाफ्याला रस वाटत नाही.ती त्याला मुखस्तंभराणा म्हणते. मग ती त्याला झिम्मा फुगडी खेळायला बोलावते आणि म्हणते, हे विश्वाचे अंगण आपल्याला लग्नाचे आंदण म्हणून मिळाले आहे, ते आपण आपल्या व्यापक आणि विशुद्ध प्रेमाने थिटे करू. चाफा एकदम खुलतो.जीवाचे-आत्म्याचे अद्वैत होते व सर्व दिशा तेजामध्ये आटून जातात.
कृ.बा.मराठे यांच्या मते, शिवपार्वतीचा संबंध नाट्यमय रीतीने इथे आला असल्याने या गीताला नाट्यगीत म्हणता येईल.कर्मेन्द्रियांप्रमाणेच ज्ञानेंद्रियांचा खोल तपास करणारी ही रचना आहे.
डॉ द भि कुलकर्णी यांनी म्हटलं आहे,चाफा हा आत्मा आणि या आत्मतत्त्वाला खेचू पाहणारी प्रेयसी म्हणजे,तत्त्वज्ञानात जी माया, प्रकृती,अहंता,जीव इत्यादी नावांनी ओळखल्या जाते ती आहे. तिला इंद्रियवृत्ती असं त्यांनी म्हटलं आहे.सांख्य दर्शनाने प्रकृतीला नर्तकीची उपमा दिली आहे.त्या प्रकृतीची ही इंद्रियवृत्ती असं ते म्हणतात.
गो.मा. कुलकर्णी,श्यामसुंदर स्वात यांनीही साधारण याच प्रकारे या रूपकांना बघितले आहे.
चाफा वाचताना मला वाटलं की ही कविता काहीतरी निराळं सांगते आहे.इतरजण जातात त्या अर्थापेक्षा निराळ्या अर्थाकडे जाते आहे.वाटलं एका कलावंताचं रसरशीत जगणं आणि चाफा यात काहीच अंतर नाहीये.
ते कसं हे सांगते.आधी कविता वाचू आणि मग त्या शब्दाबर या नव्या अर्थासह फिरुया.
‘चाफा बोलेना,चाफा चालेना
चाफा खंत करी काही केल्या फुलेना।।
गेले आंब्याच्या बनी , म्हटली मैनांसवे गाणी, आम्ही गळ्यात गळे मिसळून।
गेले केतकीच्या बनी , गंध दरवळला मनी, नागासवे गळाले देहभान।
आले माळ सारा हिंडुन, हुंबर पशूंसवे घालून, कोलाहलाने गलबले रान।
कडा धिप्पाड वेडी, घाली उडयावर उडी, नदी गर्जून करी विहरण।
मेघ धरू धावे, वीज चटकन लवे, गडगडाट करी दारूण।
लागुन कळिकेच्या अंगा, वायू घाली धांगडधिंगा, विसरूनी जगाचे जगपण।
सृष्टी सांगे खुणा, आम्हा मुखस्तंभराणा, मुळी आवडेना!रे आवडेना!!
चल ये रे ये रे गड्या! नाचु उडु घालू फुगड्या, खेळु झिम्मा झिम-पोरी-झिम-पोरी झिम।
हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण, उणे करू आपण दोघेजण।
जन विषयाचे किडे, यांची धाव बाह्याकडे, आपण करू शुद्ध रसपान।
दिठी दीठ जाता मिळुन,गात्रे गेली पांगळुन, अंगी रोमांच आले थरथरून।
चाफा फुली आला फुलून, तेजी दिशा गेल्या आटुन
कोण मी-चाफा? कोठे दोघे जण?
मला वाटतं,ही कविता म्हणजे कलावंताची तडफड आहे प्रतिभेला बहरवत ठेऊ पाहण्याची.इथे थोड्यावेळासाठी कलावंत म्हणून कवी घेऊ.कवी हा जीव आणि त्याची प्रतिभा, त्याची सर्जनशीलता म्हणजे चाफा.इथे प्रियकर-प्रेयसी नाहीये आणि प्रणय देखील नाही. चाफ्याचे झाड म्हणजे कविचं बाह्य स्वरूप.जे रुक्ष, अनाकर्षक असू शकतं. त्याला काही बारा महिने फुलं नसतात. महिनोन् महिने ते नुसतं कटरलेली,राकट पानं घेऊन सरळसोट उभं असतं.बाहेरून कुठलीही लवचिकता, नाजूकता लक्षात येत नाही.मात्र जेव्हा निर्मिती होते तेव्हा कवितेनं बहरून आलेलं ते झाड किती सुंदर दिसतं! हे सुंदर रूप काही नेहमी नसतं. प्रतिभा बहरायला किती त्रास सोसावा लागतो कवीला. प्रतिभा जेव्हा रुसते, तेव्हा कवी काय करतो? तो वेगवेगळे उपाय करतो.त्याचे उपाय कसे असतील? तर तो निरनिराळ्या ठिकाणी जाऊन बघतो. की चल बागेत जाऊन बघू. फुलं उमलताना बघून,किंवा कळीची, हवेची नाजूक हालचाल बघून तरी प्रतिभा उमलेल का बघूया. वीज-पाणी यातलं काहीतरी आत खळबळ निर्माण करेल का? नाहीतर डोंगरावर जाऊन तिथून कोसळणारे पाणीतरी आत काही हलवून सोडेल का? पशूंसोबत हंबरून बघू का, काही सूर उमटतात का ते?
त्याला वाटतं,कदाचित या उपायांनी सापाच्या कातीसारखं आपलं देहभान गळून जाईल आणि प्रतिभा सळसळेल. तो तिला लोभवायला सगळं करतो आहे. इथे चाफ्याचं झाड, फुल,सगळं कविच आहे.म्हणजे तो स्वतःलाच खुलवायला हे सगळं करतो आहे.आपल्या प्रतिभेला कुरवाळतो आहे.पण ती, म्हणजे प्रतिभा मुखस्तंभराणा!शब्द येईल तर शपथ!
मग हळूहळू ती खुलते.झिम्मा- फुगडी सुरू होते. शरीर झुलायला लागतं, हलायला लागतं आणि पिंगा कवितेच्या बाबतीत सांगितलं, तसं मेंदूत हॉर्मोन्स स्त्रवायला लागतात. सकारात्मकता निर्माण होते. आणि शरीर-मन तरल होत जातं. मग प्रतिभेला पंख फुटतात. इथे ‘पिंगा’ कवितेतली अवस्था या कवितेतल्या झिम्मा अवस्थेशी मेळ खाते आहे . या दोन्ही कवितेत हे एकच तत्वज्ञान आहे, की ‘दिठी दिठ जाता मिळून। गात्रे गेली पांगळून। अंगी रोमांच आले थरथरून।’ त्या क्षणाचा रोमांच फक्त आणि फक्त कविच सांगू शकतो.गात्रे पांगळून जातात. दोघांचं अस्तित्व उणं होऊन एकाच कवितेच्या रूपानं बहरायला लागतं. हे विश्वाचं अंगण थिटं पडेल इतकी प्रतिभा झरू लागते. मग कोण चाफा? कुठली कविता? कुठला कवी? कोण मी-चाफा ?कोठे दोघेजण?इथे तर कविच कविता बनवून गेला की!
समीक्षक चाफ्याला प्रियकर का म्हणतात हा प्रश्न मला नेहमीच पडतो. कधी पाहिला आहे का की प्रियकर रुसला आहे,तो बाईसारखा अबोला धरतो आहे आणि ती त्याला घेऊन इकडे तिकडे फिरवतेय की हे बघ,हे कसं प्रेम करताहेत,आपण असं करायचं का? आणि हा मख्ख उभा.प्रियकर या भूमिकेत कसासाच वाटतो. प्रेयसीला रुसणं शोभतं,लाजणं शोभतं,अबोलाही शोभतो.
तसेच आत्म्याला प्रियकर समजून जीव त्याच्याशी खेळायला बघतो, प्रणय करायला बघतो असं जेव्हा सांगितल्या जातं, तेव्हा प्रश्न पडतो की,जेव्हा जीव भोगात असतो त्यावेळी आत्मा हा त्या भोगाचा समान वाटेकरी असतो. प्रणयात आत्मा नसेल तर तो फक्त वासनाखेळच होतो.अगदी खाता-पितांना किंवा प्रत्येकच भोगात जीव एकटा भोगू शकतच नाही. तर आत्म्याच्या सोबतीने भोगतो. इथे भोग्य विषय वेगळा असतो आणि भोगणारे जीव आणि आत्मा हे भागीदार असतात. दोघे मिळून तिसऱ्या गोष्टीचा आस्वाद घेतात. एकमेकांना नाही भोगत. जीव एकटा बरेचदा घेतो आस्वाद,पण त्यात आत्मिक अनुभूतीचा अभाव राहतो.तो फक्त वासनाखेळ होतो.
या कवितेतून भारतीय तत्त्वज्ञानाच्या जीव आणि आत्मा यांचा अद्वैतभाव सांगता येतो परंतु तेही प्रियकर-प्रेयसीच्या रूपात मांडण्याची आवश्यकता नाही.
डॉ.द भि कुलकर्णी म्हणतात त्याप्रमाणे चाफा म्हणजे आत्मतत्त्व आणि त्याला खेचून पाहणारी प्रेयसी म्हणजे प्रकृती,माया.
मी म्हणेन की माणसातली लालसा, इंद्रिय वासना आणि त्याचा अलौकिकाचा साक्षात्कार झालेली अवस्था,हे दोन्ही चाफ्याच्याच झाडातून व्यक्त होते.फुले न आलेले नुसते रांगडे, अनाकर्षक झाड आणि पाने गळून पडलेले गुळगुळीत, फांद्यांच्या टोकांवर फुलांनी लगडलेले ध्यानस्थ चाफ्याचे सुगंधी झाड ही दोन्ही माणसाच्या मनाची प्रतीके आहेत.
कवितेचा आस्वाद घेताना अनेक प्रश्न पडू लागतात.कवीने चाफ्याचंच झाड का निवडलं असेल? इतर फुलझाडं म्हटली असती ? मोगऱ्याची फुलं सुगंधित आहेत, मोगरा म्हटलं असतं. गुलाब किती सुंदर आहे गुलाब म्हटलं असतं.मग चाफाच का?कदाचित चाफ्याचे झाड दारात असेल. त्याच्याशीच रोज संवाद होत असेल.कधी मला वाटतं,ते पुरुषासारखं राकट, रांगडं,जाडीभरडी पानं असलेलं, रूक्ष वाटणारं आहे म्हणून तर निवडलं नसेल? जे स्थितप्रज्ञासारखं वर तोंड करून उभं असतं! त्याच्याकडून कुणी फार अपेक्षा करीत नाही बहरायची.पण जेव्हा ते बहरून येतं,तेव्हा बरेचदा पानं गळून जातात आणि नाजूक फुलांनी डवरलेल्या त्या राकट झाडातूनही कोमलता डोकावते.पुरुष असाच तर असतो. त्याच्या आतली कोमलता, सुंदरता, त्याच्यातलं नाजूक प्रेमळ मन हे फक्त प्रेयसीच उमलवू शकते. प्रेमात पडलेल्या पुरुषाचं एक वेगळं,कोवळं रूप जगाला दिसतं.
कवीही असाच असतो चाफ्यासारखा. वास्तव जीवनात,भौतिक व्यवहार सांभाळत रुक्ष.त्यालादेखील त्याच्यातील प्रतिभा उमलण्याची वाट बघावी लागते.नाना प्रयोग करावे लागतात तिला खुलवायला.आणि मग शब्दांनी लगडलेला,उमललेला,बहरलेला तो चाफ्याच्या झाडासारखा दिसतो.

  • पिंगा- कवी बी –
    माझा पिंगा गोड गडे, अद्वयरंगी रंग चढे।
    नाचण मी मुळची मोठी , उद्भवल्या माझ्या पोटी
    कोमल नवनीतापरिस, जोत्सनेहुनि कांती सरस
    दिकरांगाहुनी दिव्यतर, चंचल चपलेच्याही पर
    वृत्ती गोरट्या अकलंकी, माय तशा झाल्या लेकी।
    प्रसन्न हृदयाच्या कोशि, असती सौरभ रसराशी
    त्यांस लुटाया पोटभरी, वृत्ती झाल्या हो भ्रमरी!
    गोंगाटाला थांबविले, श्रवनमनाला कळु न दिले
    कौशल्याची नवलाई, रस चोरुनि प्याल्या बाई!
    तो प्रमादांचा संभार, लोटूनि आला अनिवार
    बळेंची माझा धरुनि कर, मज केले नृत्याकार
    धुंद नशा भरली नेत्री, जीवन मुसमुसले गात्री
    गुरू लघुतेची कृत्रिम ती, पार उडाली मम भ्रांती
    मिळून आम्ही सर्वजणी, नाच मांडीला एकपणी
    अनेक नेत्रांचे बघणे , अनेक कंठांचे गाणे
    अनेक चरणांचे जाणे , अनेक चित्तांचे स्फुरणे
    दृष्टी ,वाणी,गती, मती , एकच येथून तेथुन ती
    प्रवाह बहुमुख जो होता, वाहे एकमुखे आता
    वृत्तींचे बळ मज मिळता, विश्व सहज आले गिळता
    पिंगा माझा सोन्याचा, पंजर रत्नाचा त्याचा
    पहा!उघडिले दाराला, पिंगा आकाशी गेला!
    पिंगा माझा अलौकिक, शोधूनि आला भूलोक
    चारी खाणी मी वाणी, सांगितले त्याने कानी!
    पिंगा माझा स्वर्गाला, भूवरि घेऊनि त्या आला
    अंघ्रीतली दडपूनी त्याला, नाच वरी म्या मांडियला
    दानव मानव सुरासुर, मी,मजविण ते नि:सार
    मी येता उदयोन्मुख ते, जग तेव्हाची संभवते!
    दुर्बलपण पहिले गेले, क्षुद्रपणातुन मी सुटले
    मी माझी मज सापडले!,
    स्वार्थजनित सद्गुणभास, जडले होते अंगास,
    ते गुण झाले मम धर्म, प्रेमास्तव आता प्रेम!,
    तारा सारंगीवरल्या, सम सुरीं लागुनी गेल्या,
    भूतें आली साम्याला, मोहर आंनदा आला!,
    विश्वबंधुता एकांगी, न पुरे माझ्या पासंगी,
    भृतें मी,मजला नाते, द्वैत कसे हे संभवते?,
    मज कसले येणे जाणे!, भाव-अभावावीण असणे,
    बुदबुद हो की कल्लोळ, अर्णवपद माझे अढळ!
    काय करू पण कसे करू?, मी पण माझे का विसरू?
    ‘दिपकळी गे!दिप्तीला, सोड-‘म्हणे का बुध तिजला?
    म्लानपणाविण लावण्य, क्षीणपणाविण तारुण्य
    मंगल मांगल्यायतन, नित्यानंद निरावरण
    विश्ववैभवालंकरण, ते माझे ते- स्वयंपण
    पिंगा आला भर रंगा, आत्मभान भिडला अंगा
    नाच परि मम राहिना, स्वभाव मूळचा जाईना!
    नाचा माझ्या वृत्तींनो!, नाचा भुवनसमूहांनो!
    नाच आपुला भुतांला, होवो शांतीप्रद सकला! -मनीषा अतुल(मनीषा साधू)
  • गूगल आणि फेसबुकावरून साभार

२१.श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

बहु असोत सुंदर संपन्न की महा” या महाराष्ट्रगीताचे रचनाकार म्हणून ते सुपरिचित कवी, विनोदी लेखक, नाटककार, कवी व समीक्षक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा आज स्मृती दिन त्यानिमित्त दैनिक प्रभात पुणे दिनांक १ जून २०२१ पुणे मधील माझा लेख त्यांचा जन्म नागपूर येथे दिनांक २९ जून १८७१ रोजी झाला.त्यांचे वडील शिक्षक होते.कोल्हटकर कुटुंब मूळचे रत्नागिरी जवळील नेवरे येथील होते.त्यांचे पणजोबा गोविंदभट वाई येथे येऊन राहिले.त्यांना हरिपंत व महादेवशास्त्री ही दोन मुले, हरिपंत हे श्रीकृष्ण यांचे आजोबा. कोल्हटकरांच्या घराण्यात नाटक आणि लेखन जणू मुरलेलेच होते.हरिपंतांचे बंधू महादेवशास्त्री हे “अथेल्लो”चे भाषांतरकार म्हणून प्रसिद्ध होते.हरिपंतांचे पुत्र कृष्ण हे श्रीपाद कोल्हटकरांचे वडील.कृष्णराव नोकरीनिमित्ताने अमरावतीस येऊन राहिले.श्रीपाद यांना वयाच्या ९ व्या वर्षी तोंडाला लकवा आला व मान आणि जीभ यावर परिणाम झाला होता.त्यामुळे त्यांचे शिक्षणाचे १ वर्ष वाया गेले याची त्यांना खंत होती.त्यांच्या शारीरिक विकलांगतेची थट्टा होऊ लागल्याने ते काहीसे एकलकोंडे झाले होते.मात्र त्यांचे याच काळात वाचन सुरु झाले.ते पाचवीत असताना संगीत शाकुंतल या नाटकाची चर्चा होऊ लागली होती,व त्यांना नाटक लिहावेसे वाटू लागले.त्यांनी एक “ सुखमालिका “नावाचे ५ अंकी नाटक लिहूनही काढले.
श्रीपाद कृष्ण यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अकोला येथे झाले नंतर पुणे डेक्कन कॉलेज अधे त्यांनी प्रवेश घेतला, दरम्यान त्यांचे वयाच्या १५ व्या वर्षी खामगावचे वकील वामनराव जोशी यांच्या कन्येशी विवाह झाला.त्यावेळी मुलीच्या वडिलांनी मुलाला व मुलाच्या वडिलांनी मुलीला पहिले नव्हते.
पुणे तेथे शिकत असतांना त्यांना शिवराम महादेव परांजपे, वि. का.राजवाडे, एस. एस. देव यांच्यासारखे शिक्षक लाभले.१८८७ साली कोल्हटकरांनी एल.एल.बी.चे शिक्षण पूर्ण केले व ते अकोला येथे वकिली व्यवसाय करू लागले,याच वेळी वकिली बरोबरच कोल्हटकरांच्या स्वतंत्र लेखनालाही बहरआला. वर्ष १८९१ मध्ये कोल्हटकरांनी पहिल्यांदा संस्कृत नाटक मृच्छकटिकमध्ये अभिनय केला.त्यांनी आपल्या वाङ्म्यसेवेचा आरंभ संगीत विक्रमशशिकला नाटकावरील टीकालेखाने (१८९३) केला.त्यांचा ‘साक्षीदार’ हा विनोदी लेख वर्ष १९०२ मधे ऑगस्ट-सप्टेंबरच्या ‘विविधज्ञानविस्तार’च्या अंकात प्रसिद्ध झाला.न्यायालयातील साक्षीदारांच्या उलटतपासणीतून निर्माण झालेले विनोद त्यांनी मांडले आहेत. तीन पात्रांचा समावेश असणाऱ्या या विनोदी कथासंग्रहात सुदामा, बंडुनाना आणि पांडुतात्या अश्या तीन व्यक्ति रेखांचे माध्यमातून त्यांनी तत्कालीन धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनातील विसंगतींवर त्यांनी बोट ठेवले. त्यांच्या अशा १८ लेखांचा ‘सुदाम्याचे पोहे ’ हा संग्रह १९१० साली प्रसिद्ध झाला. त्यात पुढे आणखी १४ लेखांची भर घालून १९२३ साली ‘सुदाम्याचे पोहे अर्थात साहित्यबत्तिशी’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले ‘‘वर्ष १९१३ मधे ‘ ज्योतिर्गणित ’ हा ज्योतिषशास्त्रावरील विवेचक ग्रंथही कोल्हटकरांनी लिहिला.त्यांनी त्यांचे आत्मचरित्राची लिहिले आहे.त्यामध्ये त्यांनी त्यांच्या काव्य नाट्य व इतर लेखनासंबंधी लिहिले आहे.त्यांच्या साहित्यसेवेबद्दल त्यांना १९२२ साली पुण्यास भरलेल्या कविसंमेलनाचे अध्यक्षपद व १९२७ साली महाराष्ट्र साहित्यसंमेलनाच्या बाराव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद देण्यात आले.वर्ष १९२० मधे सांगली येथे भरलेल्या तृतीय ज्योतिष संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.१ जून १९३४ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.

– श्री.माधव विद्वांस – फेसबुकवरून साभार

महाराष्ट्र गीत –
बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

गगनभेदी गिरीविण अणु नच जिथे उणे ।
आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे ।
अटकेवरी जेथिल तुरंगि जल पिणे ।
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ।
पौरुषास अटक गमे जेथ दुःसहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे ।
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे ।
रत्नां वा मौक्तिकांही मूल्य मुळी नुरे ।
रमणींची कूस जिथे नृमणीखनि ठरे ।
शुद्ध तिचे शीलही उजळवी गृहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

नग्न खड्ग करि उघडे बघुनि मावळे ।
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे ।
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले ।
भासति शतगुणित जरी असति एकले ।
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

विक्रम वैराग्य एक जागि नांदती ।
जरीपटका भगवा झेंडाही डोलती ।
धर्म राजकारण समवेत चालती ।
शक्ति युक्ती एकवटुनि कार्य साधिती ।
पसरे यत्कीर्ती अशी विस्मयावहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो ।
स्फूर्ती दीप्ती धृतिही जेथ अंतरी ठसो ।
वचनी लेखनीही मराठी गिरा दिसो ।
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनी वसो ।
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

. . . . .

हे प्रभो विभो अगाध किती तव करणी
मन चिंतुनि हो रत चरणी ॥

चांदवा नभाचा केला । रविचंद्र लटकती त्याला
जणू झुंबर सुबक छताला । मग अंथरली ही धरणी ॥

बाहुली मनुष्ये केली । त्या अनेक रूपे दिधली
परि सूत्रें त्याची सगळी । नाचविसी हाती धरूनी ॥

गीत – श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
संगीत – श्रीपाद कृष्ण कोल्हटकर


. . . . . . . .
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

जन्म : २९ जून १८७१, मृत्यू : १ जून १९३४
मराठी नाटककार, विनोदकार व वाङ्‍मयसमीक्षक. जन्म विदर्भातील बुलढाण्यास. अकोला, पुणे आणि मुंबई येथे बी.ए., एल्एल्. बी. पर्यंतचे शिक्षण. व्यवसाय वकिलीचा. त्यांनी आपल्या वाङ्‍मयसेवेचा आरंभ संगीत विक्रमशशिकला नाटकावरील टीकालेखाने (१८९३) केला. संगीत वीरतनय (१८९६) हे त्यांचे पहिले नाटक. त्यानंतर त्यांनी मूकनायक (आवृ. तिसरी, १९२२, प्रथम प्रयोग १९०१), गुप्तमंजूष (१९०३), मतिविकार (१९०७), प्रेमशोधन (१९११), वधूपरीक्षा (१९१४), सहचारिणी (१९१८), जन्मरहस्य (१९१८), परिवर्तन (आवृ. दुसरी, १९२३), शिवपावित्र्य (१९२४), श्रमसाफल्य (१९२९) आणि मायाविवाह (१९४६) ही नाटके लिहिली. उपर्युक्त बारा नाटकांपैकी पहिली आठच रंगभूमीवर आली. ‘साक्षीदार’ हा त्यांचा पहिला विनोदी लेख विविधज्ञानविस्तारात प्रसिद्ध झाला (१९०२). सुदाम्याचे पोहे अर्थात अठरा धान्यांचे कडबोळे (१९१०) हा त्यांच्या विनोदी लेखांचा संग्रह. त्याची तिसरी आवृत्ती सुदाम्याचे पोहे- अर्थात साहित्य बत्तिशी ह्या नावाने प्रसिद्ध झाली (१९२३). त्यांचे समीक्षालेख, अध्यक्षीय भाषणे, निबंध कोल्हटकरांचा लेखसंग्रह (१९३२) ह्या नावाने प्रसिद्ध झालेले आहेत. दुटप्पी की दुहेरी (१९२५) आणि श्यामसुंदर (१९२५) ह्या दोन कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांनी काही लघुकथाही लिहिल्या आहेत. गीतोपायन (१९२३) हा त्यांचा कवितासंग्रह. ‘बहु असोत सुंदर संपन्न’ ह्या सुप्रसिद्ध महाराष्ट्रगीताचे ते जनक आहेत. साधारणपणे १९२० पर्यंतच्या त्यांच्या जीवनाचा आढावा त्यांनी आपल्या आत्मवृत्तात (१९३५) घेतला आहे. भारतीय ज्योतिर्गणित (१९१३) ह्या ग्रंथातून त्यांच्या ज्योतिर्गणितविषयक व्यासंगाचा प्रत्यय येतो.
कोल्हटकरांचे नाव घेतले जाते ते मुख्यत: नाटककार, विनोदकार आणि वाङ्‍मयसमीक्षक म्हणून. त्यांची नाटके जरी त्यांच्या हयातीतच रंगभूमीवर नाहीशी झाली, तरी त्यांचा मराठी नाट्यलेखनावर झालेला परिणाम दुर्लक्षणीय नाही. त्यांच्या पदरचनेने ज्याप्रमाणे रंगभूमीवरील संगीताला वेगळे आकर्षक वळण लावले, त्याचप्रमाणे त्यांच्या संवादलेखनाने मराठी नाटकांतील संवादांमध्ये खटकेबाजपणा आणि कोटित्व आणले. आपल्या असाधारण कल्पकतेच्या साहाय्याने नाट्यसंवादांतून आणि विनोदी लेखांतून त्यांनी जी विरुद्धकल्पना–न्यासात्मक चमकदार वाक्यरचना–रूढ केली, तिला त्यांच्या हयातीत गडकऱ्यांनी व त्यानंतर प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे इत्यादींनी सुरूप प्राप्त करून दिले. त्यांचे सुदाम्याचे पोहे… हे पुस्तक हा मराठीचा बहुमोल वाङ्‍मय ठेवा आहे. त्यात संगृहीत झालेल्या त्यांच्या उपहासगर्भ व विनोदी लेखनाने एका अभिनव वाङ्‍मयप्रकाराला आणि लेखनपरंपरेला जन्म दिला. गडकरी, चिं.वि. जोशी, अत्रे, पु.ल. देशपांडे इ. विनोदी लेखक याच परंपरेतील. कोल्हटकरांचे सुदाम्याचे पोहे… मधील लेखन असामान्य कल्पनाविलास व कोटित्व यांच्याबरोबच समाजचिंतनातून जन्माला आलेल्या सामाजिक सुधारणांविषयीच्या पुरोगामी भूमिकेतून स्फुरलेले असल्यामुळे ते जितके रंजक तितकेच विचारप्रवर्तक ठरले. सुदाम्याचे पोहे… मध्ये संगृहीत झालेल्या लेखांची संख्या बत्तीसच असली, तरी त्यांतून प्रकट होणाऱ्या उपहासविषयांची व्याप्ती फार मोठी आहे. धर्मव्यवहार, सार्वजनिक जीवनव्यवहार, वाङ्‍मयव्यवहार ह्या आणि महाराष्ट्र समाजजीवनाच्या इतर अनेक व्यवहारांचे कोल्हटकरांनी त्यामध्ये विनोदगर्भ व उपहासगर्भ परीक्षण केले आहे. कोल्हटकरांचे वाङ्‍मयसमीक्षात्मक लेखन प्रत्येक प्रश्नाचा खोलवर जाऊन शास्त्रशुद्धपणे विचार करण्याच्या त्यांच्या वृत्तीचे निदर्शक आहे. ह्या वृत्तीतून ते समग्र लेखन झालेले असल्यामुळे तद्वारा कोल्हटकरांनी मराठी वाङ्‍मयविचाराला भरभक्कम असे तात्त्विक अधिष्ठान प्राप्त करून दिले. पुस्तकपरीक्षणे, ग्रंथांना लिहिलेल्या प्रस्तावना, साहित्य संमेलनांतील भाषणे व खास लिहिलेले अभ्यासलेख यांमधून त्यांनी जे मूलभूत स्वरूपाचे वाङ्‍मयीन प्रश्न वेळोवेळी उपस्थित केले व त्यांची जी शास्त्रीय काटेकोरपणे चर्चा केली, त्यामुळे मराठी वाङ्‍मयविचाराला योग्य दिशा मिळाली. त्यांच्या असाधारण कल्पकतेला व्यासंगाची, शास्त्रीय दृष्टीची, शिस्तप्रियतेची व परिश्रमशीलतेची सतत जोड मिळाल्यामुळे त्यांचे लेखन अत्यंत भारदस्त व प्रभावी ठरले आणि म्हणूनच विसाव्या शतकाच्या पहिल्या तीन दशकांत कोल्हटकर ही केवळ एक व्यक्ती न राहता ती संस्था बनली.
त्यांनी केलेल्या साहित्यसेवेबद्दल त्यांना १९२२ साली पुण्यास भरलेल्या द्वितीय कविसंमेलनाचे अध्यक्षपद व १९२७ साली पुण्यासच भरलेल्या महाराष्ट्र साहित्यसंमेलनाच्या बाराव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद देण्यात आले. सांगली येथे भरलेल्या तृतीय ज्योतिष संमेलनाचेही (१९२०) ते अध्यक्ष होते. पुणे येथे ते निधन पावले.
संदर्भ : १. कुळकर्णी, वा. ल. श्रीपाद कृष्ण : वाङ्‍मयदर्शन, मुंबई, १९५९.
२. खानोलकर, गं. दे. साहित्य-सिंह श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (जीवन गाथा), मुंबई, १९७२.
लेखक : वा.ल.कुळकर्णी
स्त्रोत : मराठी विश्वकोश …… विकासपीडियावरून साभार

२२. निसर्गकवी ना.धों.महानोर

जन्म १६ सप्टेंबर १९४२, पळसखेड (औरंगाबाद जिल्हा)

जीवन
महानोरांचा जन्म महाराष्ट्रातल्या वर्तमान औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झाले[ संदर्भ हवा ]. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले[ संदर्भ हवा ]. मराठी साहित्यविश्वात ते ‘रानकवी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो.

नामदेव धोंडो महानोर (जन्म : पळसखेड-कन्नड तालुका-औरंगाबाद जिल्हा, १६ सप्टेंबर १९४२) हे मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार आहेत.
महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा मराठीच्या बोलीभाषांचा वापर केला आहे.
ना. धों. महानोर यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. ना.धों. महानोरांचे ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ‘पळसखेडची गाणी म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिना. त्यांच्या ‘रानातल्या कवितां’ना खरा मातीचा गंध येतो.
झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरील नक्षत्रांचे देणे या प्रसिद्ध कार्यक्रमासाठी विंदा करंदीकर आणि ना.धों. महानोर यांच्या गीतरचना गायल्या गेल्या त्या शशांक पोवार याने संगीतबद्ध केल्या होत्या. देवकी पंडित यांनी महानोरांनी लिहिलेली काही चित्रपट गीते गायली आहेत, ती अशी :-
जाळीमधी झोंबतोया गारवा (कवी -ना.धों. महानोर, संगीत – आनंद मोडक, चित्रपट – एक होता विदूषक, सहगायक – रवींद्र साठे)
तुम्ही जाऊ नका हो रामा (कवी – ना.धों. महानोर, संगीत – आनंद मोडक, चित्रपट – एक होता विदूषक, सहगायक – आशा भोसले)
सूर्यनारायणा नित्‌ नेमाने उगवा (कवी – ना.धों. महानोर, संगीत – आनंद मोडक, चित्रपट – एक होता विदूषक)
श्रावणातल्या उन्हाचा कोवळेपणा आणि स्त्रीचा नाजूकपणा एकत्रितपणे दर्शवणारी कवी ना.धों. महानोर यांची लावणी ‘श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना’ ही आशा भोसले यांनी ‘एक होता विदूषक’ या चित्रपटासाठी गायली आहे.
डाॅ. शुभा साठे यांनी ना.धों. महानोरांच्या समग्र साहित्यावर व जीवनावर आधारित लेख अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम सादर केले आहेत.
संगीत दिगदर्शक हर्षित अभिराज यांनी ना.धों. महानोर यांच्या ‘दूरच्या रानात केळीच्या बनात’ या चित्रपटातील गीतांना संगीतबद्ध करून आपल्या सांगीतिक कारकिर्दीची सुरुवात केली कोती..

. . . . विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

*********

घन ओथंबून येती
बनांत राघू ओघिरती
पंखावरती
सर ओघळती
झाडांतून झडझडती

घन ओथंबून झरती
नदीस सागरभरती
डोंगरलाटा
वेढित वाटा
वेढित मजला नेती

घन ओथंबून आले
पिकात केसर ओले
आडोशाला
जरा बाजूला
साजण छेलछबिला
घन होऊन बिलगला

🍃🍃🍃🍃🍃🍃

गीत -ना. धों. महानोर, संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर, स्वर – लता मंगेशकर

ना. धों. महानोरांचे एक वैशिष्ट्य- यांच्या कवितेला निसर्ग, खेडे, शेत, पाऊस, पीकपाणी इ. यांतून बाहेरच पडता येत नाही. स्वत: कवीलाही आणि म्हणून वाचकालाही. खेड्याचे दु:ख ते कवीचे दु:ख, ओल्या जमीनीचा आनंद तो ह्याचा आनंद, शेताचे सृजन ते ह्याचे सृजन !
कवी काव्य का लिहतो? “अनुभवांच्या अभिव्यक्तीची आंतरिक निकड” हा एक निकष मानला तर समजणे थोडे सोपे जाईल. हा कवी खेडेगावात जन्मला, शेतकरी म्हणून वाढला. कविता लिहिल्या, विधान परिषदेत गेला, तरी शेतकरीच राहिला. त्यामुळे सगळे अनुभव या गोष्टींशीच निगडित. हा लळा इतका गाढ कीं कवी व निसर्ग एकरूपच होऊन गेले आहेत असे वाटावे. दोन उदा. बघून मग वरील कवितेकडे वळू.

(१) या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे
(२) ज्वार उभार, गर्भार, हिरव्या पदराला जर, निर्‍या चाळताना वारा घुसमटे अंगभर.

पहिल्यात मेघांनी भुईला दान दिले व पाणी कवीच्या डोळ्यांत आले तर दुसर्‍यात ज्वार गर्भार ! माणुस निसर्गात व निसर्ग मानवात एकरूप होऊनच कवितेत येतात. या वर जरा जास्त लिहावयाचे असल्याने येथे थांबू व कवितेकडे वळू.
घन ओथंबुन आल्यावर प्रथम कवी वनात बघतो, मग आजुबाजुला नदीनाल्यात व शेवटी शिवारात.. एकदा कावळे, कबुतरे व पोपट कसे उडतात ते बघाच व मगच ‘घिरघिरती’ याचा आनंद लुटा. पंखांवरचे पाणी झाडावर झडझडते यात ‘झ’ व ‘ड’ याची पुनरुक्ती महत्वाची नाही, जोरदार पावसात झाडाखाली भिजण्याकरिता उभे रहा व झडझडणारे पाणी उपभोगा.
आता हा पाऊस नदीत पडतो आहे. त्याने नदीला सागरभरती आणली, नदी ही सागरासारखी झाली आहे आणि लाटा डोंगरलाटा झाल्या आहेत. मला पहिल्यांदी ही अतिशयोक्ती वाटली पण या पावसाळ्यात नदीत बोट उलटी होऊन ३६ स्‍त्रीया बुडल्याचे वाचून या डोंगरलाटांची कल्पना आली. नदीवर पाणी भरावयाला जाण्याच्या वाटा आता वाटा रहिल्या नाहीत, ते ओसंडून वाहाणारे ओढे झाले आहेत. रोजची पायाखालची वाट पाण्याने वेढली नाही, तीच्यांबरोबर हीही वेढली गेली आहे. निसर्गाबरोबरची समरुपता तीलाही संगतीने घेऊन जात आहे.
खरी बहार तिसर्‍या कडव्यात आली. शिवारातल्या फुलांतले केसरच ओले झाले असे नव्हे; ही भिजली व तीला आठवण कसली झाली? छेलछबिल्या, साजणाची. जरा आडोशाला बिलगणार्‍या साजणाची. आणि इथे हा घनच साजण झाला आहे. खरा रसिक दिसतो नाही? (तेच पुरुष भाग्याचे !)
कवितेत निसर्ग व माणुस आपापल्या भुमिका कशा सहजतेने बदलतात पहा. लयही नैसर्गिक आहे.
(संपादित)

संकलन:अनिल कुमकर

नवी भर दि.१६-०९-२०२२ :

नामदेव धोंडो महानोर (जन्म : पळसखेड-कन्नड तालुका-औरंगाबाद जिल्हा, १६ सप्टेंबर १९४२) हे मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार आहेत.

ना.धों. महानोर : जन्म १६ सप्टेंबर १९४२, पळसखेड (औरंगाबाद जिल्हा)
महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा मराठीच्या बोलीभाषांचा वापर केला आहे. ना. धों. महानोर यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. ना.धों. महानोरांचे ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ‘पळसखेडची गाणी म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिना. त्यांच्या ‘रानातल्या कवितां’ना खरा मातीचा गंध येतो.

झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरील नक्षत्रांचे देणे या प्रसिद्ध कार्यक्रमासाठी विंदा करंदीकर आणि ना.धों. महानोर यांच्या गीतरचना गायल्या गेल्या त्या शशांक पोवार याने संगीतबद्ध केल्या होत्या.
देवकी पंडित यांनी महानोरांनी लिहिलेली काही चित्रपट गीते गायली आहेत, ती अशी :-
जाळीमधी झोंबतोया गारवा (कवी -ना.धों. महानोर, संगीत – आनंद मोडक, चित्रपट – एक होता विदूषक, सहगायक – रवींद्र साठे)
तुम्ही जाऊ नका हो रामा (कवी – ना.धों. महानोर, संगीत – आनंद मोडक, चित्रपट – एक होता विदूषक, सहगायक – आशा भोसले)
सूर्यनारायणा नित्‌ नेमाने उगवा (कवी – ना.धों. महानोर, संगीत – आनंद मोडक, चित्रपट – एक होता विदूषक)
श्रावणातल्या उन्हाचा कोवळेपणा आणि स्त्रीचा नाजूकपणा एकत्रितपणे दर्शवणारी कवी ना.धों. महानोर यांची लावणी ‘श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना’ ही आशा भोसले यांनी ‘एक होता विदूषक’ या चित्रपटासाठी गायली आहे.
डॉ. शुभा साठे यांनी ना.धों. महानोरांच्या समग्र साहित्यावर व जीवनावर आधारित लेख अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम सादर केले आहेत.
संगीत दिगदर्शक हर्षित अभिराज यांनी ना.धों. महानोर यांच्या ‘दूरच्या रानात केळीच्या बनात’ या चित्रपटातील गीतांना संगीतबद्ध करून आपल्या सांगीतिक कारकिर्दीची सुरुवात केली होती..

. . . अविनाश नेने

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता ऋतुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

गुंतलेले प्राण ह्या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुनी बेहोष होता
शब्दगंधे, तू मला बाहूंत घ्यावे

  • ना. धों. महानोर

मन चिंब पावसाळी, झाडांत रंग ओले
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले
पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी
शिडकाव संथ येता झाडें निळी कुसुंबी

घरट्यात पंख मिटले झाडांत गर्द वारा
गात्रांत कापणारा ओला फिका पिसारा
या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे
आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे

रानात एककल्ली सुनसान सांजवेळी
डोळ्यांत गल्बतांच्या मनमोर रम्य गावी
केसांत मोकळ्या त्या वेटाळुनी फुलांना
राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे

मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले
त्या राजवंशी कोण्या डोळ्यांत गुंतलेले
ना. धों. महानोर

****************

२३. कृ. ब. निकुम्ब

घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात…
एक भावकवी आणि ‘मृगावर्त’ या नाविन्यपूर्ण खंडकाव्याचे निर्माते म्हणून कविवर्य कृ. ब. निकुम्ब यांची आज जयंती .
डॉ संध्या देशपांडे यांनी पुढारी मध्ये त्यांचे बद्दल लिहिलेला लेख तुमच्यासाठी —-
‘घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात…’ असे हळूवारपणे लिहिणारे कृ. ब. निकुम्ब जितके कवी म्हणून प्रसिद्ध होते तितकेच एक गुरु म्हणूनही फार मोठे होते.
सर त्यावेळी लिंगराज कॉलेजमध्ये ‘साहित्यातील परंपरा आणि संप्रदाय’ हा विषय समरसून शिकवायचे. शिकविण्याच्या ओघात कितीतरी कवींच्या कविता सहज म्हणायचे. प्रत्येक वर्गाला काहीतरी नवीन देण्याचा सर प्रयत्न करायचे. त्यांच्या व्याख्यानातून विद्वतेचा फार मोठा ओघ विद्यार्थ्यांच्या काळजापर्यंत पोहोचायचा. कितीतरी कविता, ज्ञानेश्‍वरी सरांना पाठ होती. गर्व, अहंकार यापासून लांब राहून विद्यार्थ्यांत मिसळून सर समजावून द्यायचे. काही वर्षांपूर्वी आही ‘शब्दगंध’ कवी मंडळाची स्थापना केली. त्यावेळी सर आवर्जुन उपस्थित राहिले आणि बेळगाव भागात साहित्यिक चळवळ चालू केल्याबद्दल समाधान व्यक्‍त केले. गुरूपौर्णिमेदिवशी आम्ही त्यांच्या घरी जात असू. सर आपल्या विद्यार्थ्यांना भरभरून आशीर्वाद द्यायचे. काहीतरी गोड खाऊ घालायचे. आज गुरुपौर्णिमा असूनही सर आमच्यात नाहीत. त्यामुळे आठवणी दाटून येतात. पण सरांच्या साहित्यातून सरांचे प्रेमळ आशीर्वाद सतत पाठराखण करत राहतात, याचे समाधान वाटते.
अभिवादन

घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात !
“”सुखी आहे पोर””- सांग आईच्या कानात
“”आई, भाऊसाठी परि मन खंतावतं !
विसरली का ग भादव्यात वर्स झालं,
माहेरीच्या सुखाला ग मन आचवलं.
फिरुन-फिरुन सय येई जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग शेव ओलाचिंब होतो.
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार,
हुंगहुंगुनिया करी कशी ग बेजार !
परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे ?
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी, माय… !””
आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला !”

नवी भर दि. ०१-०७-२०२३ :

एक भावकवी आणि ‘मृगावर्त’ या नाविन्यपूर्ण खंडकाव्याचे निर्माते कविवर्य कृ. ब. निकुम्ब यांची आज पुण्यतिथी(३०जून१९९९). २२ नोव्हेंबर १९१९ रोजी जन्मलेले कवी निकुम्ब मराठी साहित्यसृष्टीला परिचित आहेत.
कृष्ण बलवंत निकुम्ब यांचे शालेय शिक्षण सरकारी हायस्कूल, नाशिक येथे झाले आणि महाविद्यालयीन शिक्षण हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालय नाशिक येथे झाले. मुंबई विद्यापीठातून ते एम.ए.ची परीक्षा प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. कर्नाटक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून आणि लिंगराज महाविद्यालय, बेळगाव येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. तसेच कर्नाटक विद्यापीठाच्या मराठी पदव्युत्तर केंद्रात निवृत्त मानसेवी प्रमुख प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती.
‘ऊर्मिला’ (१९४४), ‘उज्ज्वला’ (१९४५), ‘अनुबन्ध’ (१९६५), ‘अभ्र’ (१९७५) हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘पत्रं पुष्पम्’ हे मराठी कवितांचे संकलन व संपादन त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे ‘फणसाचं पान’ या गोविंदाग्रजांच्या निवडक कवितांचे, आणि ‘साहित्य पराग’ हे अर्वाचीन मराठी कवितांचे संकलन व संपादन त्यांनी केले आहे. ‘साहित्यसमीक्षा’ हे समीक्षालेखन त्यांनी केलेले आहे. ‘पारख’ या समीक्षात्मक ग्रंथात त्यांनी संत नामदेव, संत तुकाराम, मोरोपंत, केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज, बी, इत्यादी कवींच्या काव्याचे मूल्यमापन केले आहे. हा ग्रंथ १९७३ साली प्रसिद्ध झाला आहे. ‘पावसाचं घर’ आणि ‘सायसाखर’ (१९५४) हे त्यांचे बालगीतसंग्रह असून ‘मृगावर्त’ (१९७०) या खंडकाव्याचे लेखनही त्यांनी केले आहे.
कृ.ब.निकुम्ब यांना साहित्याबरोबरच चित्रकला, आणि संगीत ह्या कलामध्ये रुची होती. केशवसुतांपासून बदललेल्या मराठी कवितेच्या परंपरेत निकुम्बांची कविता अवतरली. भावगीत रचनेचे, काव्यरचनेचे विविध प्रकार कणिका, सुनीते, गझल या सार्‍यांचा समावेश त्यांच्या रचनांमध्ये होता. अपुर्‍या आकांक्षा आणि भग्न ध्येये हे त्यांच्या कवितेचे विषय झाले. सौम्य आणि शांत प्रकृती हे त्यांच्या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य होते. जीवनात जे-जे उदात्त आणि कोमल आहे त्याचे वर्णन त्यांनी आपल्या कवितेतून केले. निसर्गाची अनेक भावमधुर रूपे त्यांच्या कवितेतून साकारली. तसेच मानवी भाव-भावनांचा तरल आविष्कार त्यांच्या कवितेतून झाला. उत्तरोत्तर त्यांची कविता अधिकाधिक सूक्ष्म चिंतनशील होत गेली. तसेच वैयक्तिक अनुभूतींचे कलात्मक आविष्करण त्यांच्या कवितेतून होत गेले.
‘घाल घाल पिंगा वार्‍या’ हे त्यांचे गीत अजूनही आवडीने ऐकले जाते. लोकान्तापेक्षा एकान्तात रमणारा काव्यप्रेमी, स्वप्नाळू, सौंदर्यासक्त कवी म्हणून निकुम्ब ओळखले जातात. अनेक संतकवींच्या, आधुनिक कवींच्या काव्याची आस्वादक समीक्षा करून त्यांनी या काव्यांचे मोठेपण रसिकांना जाणवून दिले आहे.
‘अंतःकरणातील भावना काव्यरूपात प्रकट होणे, म्हणजे उंबराला फूल येणे’ अशी त्यांनी व्यक्त केलेली भावना त्यांच्या काव्यविषयक दृष्टीकोनाचा प्रत्यय आणून देते.

  • डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर
    (महाराष्ट्र नायक मधुन)

२४. गुरु ठाकूर

गुरू ठाकूर: मराठी राजकीय व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या गुरु ठाकूर यांनी स्तंभलेखक, नाटककार, कथा, पटकथा, संवाद लेखक, गीतकार अशी चौफेर मुशाफिरी केली असून त्यांतल्या प्रत्येक क्षेत्रात लोकप्रियतेसोबत त्या त्या क्षेत्रातल्या सर्वोच्च पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आले आहे. त्याचबरोबर उत्तम छायाचित्रकार, अभिनेता आणि कवी म्हणूनही त्यांनी स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला आहे.

तू बुद्धि दे तू तेज दे

तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे

हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
साधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे

जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना
तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना
धमण्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे
सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे

सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती
पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे

गीतकार : गुरु ठाकूर, गायक : विभावरी आपटे, संगीतकार : राहुल रानडे , गीतसंग्रह/चित्रपट : डॉ. प्रकाश बाबा आमटे (२०१४)

. . . . . . आंतर्जालावरून साभार.

२५. शंकर वैद्य

स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला गतजन्मीची खूण सापडे ओळखले का मला असे सुंदर गीत रचणाऱ्या कविवर्य शंकर वैद्य यांचे आज पुण्यस्मरण.
त्यांचा जन्म: ओतूर (पुणे जिल्हा), येथे १५ जून १९२८ रोजी झाला ; (मृत्यू : मुंबई, २३ सप्टेंबर २०१४) ते समीक्षक, शिक्षक, ललित लेखक, उत्तम वक्ते व सूत्रसंचालक म्हणूनही सर्वपरिचित होते
वयाच्या सहाव्या वर्षापासूनच शंकर वैद्यांना कवितेची गोडी लागली. या आवडीचा पाठपुरावा करता-करता ते कविता करू लागले. ‘कालस्वर’ हा पहिला काव्यसंग्रह होता. पहिल्या काव्यसंग्रहानंतर २७ वर्षांनी त्यांचा ‘दर्शन’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या दरम्यान अनेक मासिके व विशेषांकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. अत्यंत सोपे आणि सहजसुंदर शब्द हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. अगदी नवखा वाचकही त्यांच्या काव्याशी पटकन जोडला जायचा.
कवी कुसुमाग्रजांच्या निवडक कविता असलेल्या ’प्रवासी पक्षी’ या काव्यसंग्रहाचे, आणि कवी मनमोहन यांच्या कविता असलेल्या ’आदित्य’ या काव्यसंग्रहांचे संपादन शंकर वैद्य यांनी केले होते.

त्यांची गाजलेली गीते
आज हृदय मम —– रिमझिम चाले तनमन ओले——-वाळवंटांतून भीषण —— शतकांच्या यज्ञातुन ——– स्वरगंगेच्या काठावरती


स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला
गतजन्मीची खूण सापडे, ओळखले का मला
वदलीस तू, मी सावित्री ती
शकुंतला मी, मी दमयंती
नाव भिन्‍न परि मी ती प्रिती
चैतन्याचा पूर तेधवा गंगेला पातला
अफाट जगती जीव रजःकण
दुवे निखळता कोठुन मीलन
जीव भुकेला हा तुजवाचुन
जन्मांमधूनी पिसाट फिरता, भेट घडे आजला!!

२६. स्वातंत्र्यवीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माहिती त्यांच्यावरील दोन लेखांमध्ये दिली आहे. त्यांनी रचलेले एक प्रसिद्ध गीत आणि एक नाट्यगीत खाली दिले आहे.

जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची
स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी
स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची
स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते
तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, चराचर शरण, श्रीस्वतंत्रते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

🌹⚜️🌸🇮🇳🙏🇮🇳🌸⚜️🌹

शतजन्म शोधिताना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थानबद्धतेत असताना अनेक नाटके लिहिली, त्यातील सन्यस्त खड्ग हे नाटक ९० वर्षापुर्वी १८सप्टेंबर१९३१ रोजी बळवंत संगीत मंडळींनी रंगभूमीवर आणले. त्यातील काही गीते त्यांनी लिहिली होती त्यातील शतजन्म शोधिताना शोधिताना हे एक नाट्यगीत . भैरवी रागात असून ते वझेबुवांनी संगीतबद्ध केले होते. मास्टर दीनानाथ, पंडित वसंतराव देशपान्डे तसेच प्रभाकर कारेकर यांनी ते गायले . याखेरीज या नाटकातील आणखी सहा गीतेही त्यांनीच लिहिली होती .
शत जन्म शोधिताना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्य मालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥
तेंव्हा पडे प्रियासी । क्षण एक आज गाठी ।
सुख साधना युगांची । सिद्धीस अंति गाठी ॥
हा हाय जो न जाई । मिठी घालु मी उठोनी ।
क्षण तो क्षणांत गेला । सखि हातचा सुटोनी ॥
. . . . . नवी भर दि.२५-०९-२०२१

ने मजसी ने ……

आज १० डिसेंबर
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रायटन च्या समुद्र किनाऱ्यावर १० डिसेंबर १९०९ साली लिहिलेल्या ने मजसी ने परत मातृ भूमीला, सागरा प्राण तळमळला या अजरामर विरह गीताला ११३ वर्ष पूर्ण झाली.
इतक्या वर्षानंतरही या ओळी अंगावर रोमांच उभे करतात आणि आत खोल कुठेतरी प्रेरणेचे स्फुल्लिंग जागृत करतात. ब्रायटनच्या किनाऱ्यावर चिंतन करत असताना, तात्यारावांच्या मनात आत मातृभूमीची ओढ लागली होती. त्या भावनावेगातच त्यांना हे उत्कट काव्य स्फुरले. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे मित्र निरंजन पाल होते.
२७ मे १९३८ रोजी ‘मराठा’ या वृत्तपत्रात हे काव्य प्रसिद्ध झाले. भा. द. खेर यांनी लिहिलेल्या सावरकर चरित्रात तात्यारावांनी १० डिसेंबर १९०९ रोजी हे काव्य लिहिल्याचा उल्लेख केला आहे.
या सावरकरांच्या ओजस्वी शब्दातील या संपूर्ण काव्याचे हे शब्दस्मरण…
सागरास…

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा , प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता

मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी ।मी
तव अधिक शक्त उध्दरणी । मी
येईन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा , प्राण तळमळला
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें ।कीं तिने सुगंधा घ्यावें
जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता। रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला

नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थं हें आता । रे
बहुजिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते । जी सरिता । रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला
या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता ।रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक पळीं तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला
प्रियकर- प्रेयसीची विरह गीते खूप आहेत. आई- मुलगा यांच्या विरहालाही बऱ्याच जणांनी शब्दबद्ध केले आहे. पण मात्रूभूमीच्या विरहाची ही अत्युत्कट वेदना एकमेवाद्वितीय अशीच म्हटली पाहिजे. या गीत लेखनानंतरच्या तात्यारावांच्या प्रदीप्त जीवनाने या गीताला एक अनोखी झळाळी लाभली आहे आणि देशभक्तिपर स्तोत्राचा आणि सुक्ताचा दर्जा प्राप्त झाला आहे. या निमित्ताने या जाज्वल्य अलौकिक देशभक्ताचं उत्कट स्मरण करणे आवश्यक आहे. “झाले बहु होतीलही बहु परंतु ह्या सम हा” ज्यांच्या अथक परिश्रमामुळे देशाला स्वातंत्र मिळाले. मरेपर्यंत देशाचीच सेवा करणाऱ्या, अशा या महान क्रांतीकारकाला
विनम्र अभिवादन
🙏🙏 . . . . नवी भर दि. १०-१२-२०२२

. . . . . . . . . . . . . . . .

२७. फकीरराव मुंजाजी शिंदे

फ.मुं. शिंदे (फकीरराव मुंजाजी शिंदे. जन्म: १९४८) हे मराठी कवी, लेखक आहेत. त्यांची आई ही कविता खूप प्रसिद्ध आहे

आई

आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!
सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही

जत्रा पांगते पालं उठतात
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात
आई मनामनात तशीच जाते ठेवून काही
जिवाचं जिवालाच कळावं असं जाते देऊन काही

आई असतो एक धागा
वातीला उजेड दावणारी समईतली जागा
घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान
विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान

पिकं येतात जातात
माती मात्र व्याकुळच तिची कधीच भागत नाही तहान
दिसत नसलं डोळ्यांना तरी
खोदत गेलो खोल खोल की सापडतेच अंतःकरणातली खाण

याहून का निराळी असते आई?
ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गायी?
आई खरंच काय असते?
लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
लंगड्याचा पाय असते
धरणीची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही!

महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यातील ‘रुपूर’ गावी कलमानुरी तालुनक्यात १९४८ साली शिंद्यांचा जन्म झाला.
पेशाने ते मराठीचे प्राध्यापक आहेत.ते सध्या औरंगाबाद मधील पदंपुरा येथे राहतात. ‘ आई ‘ कविता प्रसिद्ध असुन वाचकांच्या अंतकरणाला भिडणारी आहे.

चांदोबा थकला होता
आज किल्लारी भूकंपाला २८वर्षे झाली त्यानिमित्त श्रद्धांजली )
चांदोबा भागला होता
रात्रभर एकटाच
चांदोबा जगला होता
मामा मामा म्हणणारे
सापडत नव्हते त्याला चिमुकले आवाज
ढगात तोंड खुपसून चान्दोबाही
रडत होता आज
चांदोबाचे चिमुकले गेले
चिमुकल्यांचे मामा गेले
मामांचे वाडे गेले
पाटीवर लिहून काढलेले
रात्रीचे पाढेही गेले
कवी फ मु शिंदे.

*****************************

२८.द.मा.मिरासदार

द.मा.मिरासदार हे मुख्यत्वे विनोदी गद्य लेखक, पण त्यांनी लिहिलेली एक विनोदी कविताही खूप गाजली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांना वाहिलेल्या श्रद्धाजलि इथे संग्रहित केल्या आहेत.

श्रद्धांजली….💐💐
दारुवरची हि कविता कितीही वेळा वाचली तरी आनंद देते व ते पण न दारू पीता,
द.मा.मिरासदार दि ग्रेट
पूर्वी वाचली असली तरी पुन्हा वाचायला मजा येते. –
द मा मिरासदारांची भन्नाट कविता –
रिस्क
🍷दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही…
मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयंपाक करत असते,
शेल्फमधील भांड्यांचा आवाज बाहेर येत असतो,
… मी चोरपावलाने घरात येतो,
माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो,
गांधीजी फोटोतून बघत असतात,
या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही …. ||१||
वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो,
पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो,
ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो,
अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो,
गांधीजी मंद हसत असतात,
स्वयंपाकघरात डोकावून बघतो,
बायको कणीकच मळत असते,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही …. ||२||
मी : जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गं?
ती : छे! दानत असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ!
मी परत बाहेर येतो, काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो,
बाटली मात्र मी हळूच काढतो,
वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो,
पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो, बाटली धुवून मोरीत ठेवतो,
काळा ग्लास पण कपाटात ठेवतो,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही …. ||३||
मी : अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय झालं नाही..
ती : नाही काऽऽय! अठ्ठावीस वर्षांची घोडी झालीये म्हणे..
मी : (आठवून जीभ चावतो) अच्छा अच्छा …
मी पुन्हा काळ्या कपाटातून कणीक काढतो,
मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते,
फळीवरुन बाटली काढून पटकन मोरीत एक पेग मारतो,
गांधीजी मोठ्ठ्याने हसतात,
फळी कणकेवर ठेवून, गांधीजीचा फोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो,
बायको गॅसवर मोरीच ठेवत असते,
या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही …. ||४||
मी : (चिडून) जाधवांना घोडा म्हणतेस? पुन्हा बोललीस तर जीभच कापून टाकीन!
ती : उगीच कटकट करु नका… बाहेर जाऊन गप पडा…
मी कणकेमधून बाटली काढतो, काळ्या कपाटात जाऊन एक पेग मळतो,
मोरी धुवून फळीवर ठेवतो,
बायको माझ्याकडे बघून हसत असते,
गांधीजी चा स्वयंपाक चालूच असतो,
पण ह्या जाधवांचा त्या जाधवाना पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही …. ||५||
मी: (हसत हसत) जाधवांनी घोडीशी लग्न ठरवलं आहे म्हणे!
ती: (ओरडून) तोंडावर पाणी मारा!!
मी परत स्वयंपाकघरात जातो, हळूच फळीवर बसतो,
गॅसही फळीवरच असतो..
बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो,
मी डोकावून बघतो … बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते,
ह्या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही…
अर्थात गांधीजी कधीच रिस्क घेत नाहीत..
जाधवांचा स्वयंपाक होईपर्यंत्…मी फोटोतून बायकोकडे बघून हसत असतो…
कारण मी कधीच रिस्क घेत नाही…||६||
😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄

मराठीतले विनोदी लेखक व कथाकथनकार द.मा.मिरासदार यांचे आज निधन झाले. (०२-१०-२०२१)
द. मा.मिरासदार यांचा अल्पपरिचय.
जन्म. १४ एप्रिल १९२७
दत्ताराम मारुती मिरासदार उर्फ द. मा. मिरासदार यांनी काही वर्षे पत्रकारी केल्यानंतर त्यांनी १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कँप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या त्रयीने १९६२ सालापासून कथाकथन करून महाराष्ट्रातलील जनतेला भुरळ घातली होती. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी केली होती. मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर असत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. असे असले, तरी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून त्यांनी जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले. तसेच अनेकदा त्यांच्या विनोदालाही कारुण्याची झालर असल्याचे दिसून येते. एक डाव भुताचा आणि ठकास महाठक ह्या दोन चित्रपटांच्या संवादलेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली होती. ‘व्यंकूची शिकवणी’ ह्या त्यांच्या गाजलेल्या विनोदी कथेवरुन गुरुकृपा हा मराठी चित्रपट काढण्यात आला होता. मराठी साहित्यिकांनी विनोदी वाङ्मयात ज्या अजरामर कथा लिहिल्या त्यात द. मा.मिरासदार यांची ‘माझ्या बापाची पेंड’ आणि ‘भुताचा जन्म’ यांचा समावेश व्हायला हरकत नाही. ‘मिरासदारी’ या पुस्तकातली ‘भुताचा जन्म’ ही कथा प्रसिद्ध आहे. ही लोकप्रिय कथा बारावीच्या अभ्यासक्रमातल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात घेतली आहे. द.मा.मिरासदार यांच्या ‘भुताचा जन्म’ या कथेवर बनलेली शॉर्टफिल्म आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये गाजली. ही कलाकृती रोममध्ये होणाऱ्या फेस्टिवलमध्येही दाखवली गेली. द. मा. मिरासदार यांच्या खास विनोदी शैलीतल्या निवडक कथांचा अत्यंत सुरस संग्रह म्हणजे मिरासदारी हे पुस्तक. गेल्या काही वर्षांत मराठी ग्रामीण कथेच्या उदयाबरोबर ग्रामीण वातावरणाशी संलग्न असणारी हास्यजनक कथा जन्माला आली. तिच्यात वृत्तीची विविधता आहे, केवळ एकसुरीपणा नाही. मिरासदारांच्या या कथांतून एक अनोखी मिश्किलपणाची, चमत्कृतीपूर्ण वळणांची व गमतीदार विक्षिप्तपणाची झाक वाचकाला अतिशय भावली. मिरासदारांच्या लेखनात अस्सल विनोदी अशी अनेक गावरान पात्रे आढळतात. त्यात नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, सुताराची चहाटळ आनशी, ज्ञानू वाघमोडे, अशी एकाहून एक अस्सल इब्लीस, बेरकी, वाह्यात, टारगट आणि क्वचित भोळसट अशी ही सारी पात्रे आहेत. ती श्रोत्यांना खळाळून हसायला लावत. मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. त्याचप्रमाणे त्यांनी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले आहे. द. मिरासदार हे नेहमीच त्यांच्या मार्मिक आणि शैलीदार विनोदांसाठी प्रसिद्ध राहिले आहेत. महाराष्ट्रातील विविध गाव आणि तिथे राहणारी माणस आपल्याला नेहमी मिरासदारांच्या कथेतून भेटत राहतात. ‘चकाट्या’ मध्ये ही अशाच काही गावात आणि शहरात राहणाऱ्या अवली माणसाच्या आणि त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात फक़्त शाब्दिक विनोद न करता प्रासंगिक विनोद लेखनातून वठवणे आणि साध्या लिखाणातून वाचकाला गुंतवून ठेवणे यातच लेखकाचे यश मानता येईल . ‘शिवाजीचे हस्ताक्षर’ ही कथा तर अप्रतिम. द. मा. मिरासदार यांना विंदा करंदीकर जीवनगौरव, पुलोत्सव जीवनगौरव’ पुरस्कार मिळाला आहे. रवींद्र मंकणी हे द. मा. मिरासदार यांचे जावई होत.
द.मा.मिरासदार यांना भावपुर्ण श्रध्दांजली.

संजीव_वेलणकर पुणे. संदर्भ :- इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

. . . . . . . . . . . . . .

दमा गेले. चिवि, पूल, वपु, शंन्ना या मालिकेतला कदाचित शेवटचा दुवा निखळला. आजूबाजूच्या समाजात दिसणाऱ्या विसंगती, बावळटपणा, विचित्रपणा, हट्टीपणा आणि इतर अवगुण घेऊन वावरणाऱ्या व्यक्तिरेखा मांडणे त्यातून निर्माण होणारे निखळ विनोद मांडणे हे या लेखकांचे वैशिष्ट्य. कुठेही समाज बदलण्याचा आवेश नाही. गरिबीत दुःखात राहणाऱ्या या सामान्य व्यक्तिरेखा विनोदाबरोबरच त्यांच्या सभोवतालची पात्रे जोडून विनोद निर्मिती करणे हे वैशिष्ट्य. मधल्या काळात काही नवलेखकांनी सामाजिक दुःख, दलित पददलितांची व्यथा मांडणारे सामाजिक भान जागृत करणारे साहित्य आणले पण यातून वर उल्लेखलेल्या लेखकांचे मोल कमी झाले नाही. मला कधी कधी वाटते की समाजातला भोळेपणा, थोडा बावळटपणा, काही अंशी अडाणीपणा, फसवणे आणि फसवून घेणे यातून घडणाऱ्या या गोष्टी आपली आजही करमणूक करतात. जो काळ या लेखकांनी मांडला तो गेल्या 3 दशकांपूर्वीचा. तंत्रज्ञानाने जग बदललं आहे पण माणूस नाही. वर वर्णन केलेले दुर्गुण आहेत पण त्यांचे दाखवण्याचे स्वरूप बदलले आहे. फोनवर आपला OTP सांगून आपले बँक अकाउंट उघडे करणारे भोळसट वा बावळट आजही आहेतच. शेजारणीने वस्तू घेतली म्हणून वास्तूची उपयोगिता न बघता विकत आणणाऱ्या गृहिणी आजही आहेत. या गोष्टींचे शब्दांकन करणारे लेखक तयार होत नाहीत. माणसाच्या वागण्यातल्या विसंगती तशाच आहेत फक्त काळानुसार विसंगतीच्या जागा बदलल्या आहेत. या तंत्रज्ञान, IT, परदेशात जाणे नव्या बदलाची पार्श्वभूमीवर अनेक गमती घडतात पण त्या समर्थपणे मांडणारे लेखक तयार होत नाही. किंबहुना दमांच्या काळात नव्हती इतकी विसंगती आज आहे.
दुर्दैवाने आज कथा वाचणारे मिळत नाहीत. 100 शब्दांच्या वर काहीही वाचयाचे म्हणले की लोकांचा पेशन्स तुटतो. तेच नवज्योत सिद्धूच्या राजकीय कोलांट्या उड्या दाखवणाऱ्या बातम्या 5-5 दिवस TVसमोर एक टक बघतो. आता सिद्धू ही विसंगती आहे. पण या विसंगतीचे शब्दांकन कोणी केले तर जास्त आनंद मिळू शकतो. असो कालाय तस्मै नमः
दमांनी त्यांच्या निखळ विनोदाने आपले आयुष्य केवळ समृद्ध केले नाही तर आजूबाजूच्या विसंगती स्पोर्टिंगली घेण्यास शिकवले.
दमांना प्रणाम आणि श्रद्धांजली🌹🙏

श्रीकांत कुलकर्णी
. . . . . . . . . . .

दमांनी निर्माण केलेल्या पात्रांनी त्यांना दिलेली श्रद्धांजलि

भोकरवाडीच्या चावडीवर नाना चेंगट आज उदास बसला होता. कुठल्या भुतानं त्याला कसं घोळसलं, याच्या कथा सांगत नव्हता. पायाला झालेलं कुरूप खाजवायची त्याला आज बुद्धी होत नव्हती, की मांडीला बेचक्यात आलेलं बेंड त्रास देत नव्हतं.
बाबू पैलवान त्याच्या शेजारी येऊन बसला, तरी त्यानं त्याच्या मांडीवर थाप मारून मांडी मोडली नाही, की त्याच्या पाठीत बुक्की हाणली नव्हती.
गणामास्तरही गप्प गप्प होता. सरकारच्या नव्या धोरणानं गावाचं कसं भलं होणार आहे वगैरे काही त्याला सुचत नव्हतं.
शिवा जमदाडे उगा खांबाला टेकून बिडी फुकायच्या आवेशात होता, पण बिडी आणि काडी यांची गाठ काही पडली नव्हती.
सकाळचं दोन शेर दूध पिऊन आणि भाकरीचा कुस्करा कालवणासकट खाऊन नागू गवळी चावडीवर आला होता, तरी त्याला आज झोप काही येत नव्हती.
गुंडगुळ्याच्या माळावर साळ्याच्या यशोदेला भुतानं घोळसलं, ते काढायला तुकाराम टेंगळ्याकडे कधी जायचं, याची चर्चा कुणी करत नव्हतं. जगन्याची बायकू कुणाबरोबर पळून गेली, या चर्चेतही आज रस नव्हता.
वाघासारखा पसरलेला तुका बनकर, हाडकुळा, निव्वळ कैकाड्याप्रमाणे दिसणारा नामा चौगुले, पोट सुटलेला आणि बेंबीखाली धोतर गेलेला सदा वाणी, उंचेला काळ्याठार वर्णाचा गणपत वाघमोडे, सोबतीला असावा म्हणून हातात कंदील घेऊन आलेला रामा खरात, सगळे सगळे शांत होते.
मध्यवस्तीत असलेल्या पांडू गुराड्याच्या हॉटेलातून चहाभजी मागवावीत, असा विषयही कुणी काढला नव्हता, की पांडूनं मागवलेल्या खव्याच्या गोळ्याबद्दल कुणाला काही बोलायचं नव्हतं.
चिपाडाला सदरा-धोतर घातल्यावर जसं बेंगरूळ दिसेल, तसा बोंबलभिक्या नाना घोडके त्याची एकमेकांना भेटायला जाणारी, खोल गेलेली गालफडं वाजवत हल्ली चावडीवर फिरकला नाही, याबदद्ल कुणाच्या मनात काही शंका आलेली नव्हती. गावातला रिकामटेकडा शंकर येलपलेच काय, एखादं कुलुंगी कुत्रंही त्याच्या घरी आढळायला गेलं नाही याबद्दल लोकांना चिंता नव्हती, की त्याच्या अंथरुणात गेल्या अमावस्येला ढाण्या वाघ रात्रभर झोपला होता आन् डव्हातल्या आसरेच्या आशीर्वादानं तो वाचला, याबद्दल त्यानं सांगितलेली कहाणी खरी का खोटी, याची शहानिशा करावीशी कुणाला वाटत नव्हती.
यदू वडाराच्या व्यंकूनं आजकाल कुणाकडं शिकवणी लावली हाय आन् कुठली बाई ठेवली हाय, याचीही कुणाला पर्वा नव्हती.
सगळे घराबाहेर वाळत टाकलेल्या चिरगुटागत गपकार झाले होते.

आपले दमा गेले रं! शेवटी नानानंच न राहवून टाहो फोडला.
गप लेका! त्ये गेले न्हाईत. परमोशन झालं त्यांचं! गणामास्तरांनी मध्यस्थी केली.
परमोशन? एव्हाना पटका काखेत धरून हातातल्या चिलमीशी खेळ करत बसलेला महादा म्हणाला.
व्हय, परमोशन! आजपर्यंत त्यांनी आपल्या कहाण्या, किश्शे सांगून हितल्या लोकांना हसवलं. आता ते इंद्रदेवाच्या दरबारात ३३ कोटी देवांना आन् आसरांना हसवायला गेले हायंत! त्यो बघा, वरनं गडगडाटाचा आवाज येतोय न्हवं का, त्यो दमांचे किश्शे आन् कहाण्यांवरच्या हसण्याचाच! गणामास्तरांनी एका दमात सांगून टाकलं आन् सगळे आपापलं दुःख विसरून गाढवासारखं तोंड करून आभाळाकडे बघायला लागले. . . . . . . . . अभिजित पेंढारकर.


द . मा . मिरासदार
द . मा . मिरासदार यांचे अखेर निधन झाले . आमचे बालपण – अधिक योग्य शब्द कुमारपण ज्यानी समृद्ध केले अशा लेखकात मिरासदार हे नाव अग्रभागी होते . दिवाळी मध्ये दिवाळी अंक घरोघरी असत . हंस , मोहिनी , मौज , आवाज असे काही अंक आघाडीवर असत . अंक घेतला की त्यात पु . ल. देशपांडे आणि मिरासदार यांचे काही लिखाण आहे का ते मी प्रथम पहात असे . बाकी अंक नंतर पण ह्या लेखकांचे लिखाण प्रथम वाचत असे .
वाचनालयात देखील अंक निवडताना श्रेयनामावलीत ही नावे नसतील तर तो अंक बाद केला जायचा .
पुस्तके शोधताना देखील दमा यांचे पुस्तक सापडले तर झडप घालून मी ते ताब्यात घेत असे .
दमांचा विनोद हा गोष्टीच्या शेवटात असे आणि तो जर कळला नाही तर मग ” अवघडै ” –
माझ्या बापाची पेंड या गोष्टीचा शेवट ” पेंड म्हणून मी दुसरेच काहीतरी खाल्ले ” असा आहे . हे दुसरेच काहीतरी घरात काय असू शकेल ते समजले नाही तर ही गोष्ट समजू शकणार नाही .
मला वाटते की ज्यानी ग्रामीण जीवन अजिबात अनुभवले नाही त्याना कदाचित दमा कळणार नाहीत .पण एक काळ त्यानी गाजवला हे मात्र निश्चित . . . . . . श्याम केळकर


२९. वा.रा.कांत

बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात ——- असे सर्वांच्या ओठी असलेले गीत लिहिणारे ’वा. रा.’ कांत तथा वामन रामराव कांत यांची आज जयंती (जन्म- ६ ऑक्टोबर १९१३)
त्यांचा जन्म नांदेड येथे ६ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. वा.रा. कांत हे या नावाने लेखन करत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेड येथे झाले. इंटरपर्यंतचे शिक्षण १९३१ साली हैदराबाद येथे झाले. त्यानंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांचा विवाह सौ. लक्ष्मीबाई – पूर्वाश्रमीच्या गंगूबाई कुर्डूकर यांच्याशी १९३० मध्ये झाला.
त्यांची कारकीर्द
विहंगमाला’ या नियतकालिकाचे संपादक (१९२८) तसेच विहंग प्रेसचे व्यवस्थापन.
निजाम सरकारच्या शेतकी खात्यात लिपिक म्हणून नोकरी (१९३३-१९४५)
निजाम सरकारच्याच आकाशवाणी हैदराबाद व औरंगाबाद केंद्रांत मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले (१९४५- १९६०)
भारतीय आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले (१९६०-१९७०)
आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सेवानिवृत्त (१९७०)(विकिपीडिया )
त्यांची गाजलेली गीते
आज राणी पूर्विची ती ——–खळेना घडीभर ही बरसात———- त्या तरुतळी विसरले गीत —–बगळ्यांची माळ फुले —– राहिले ओठांतल्या ओठांत —–सखी शेजारिणी
त्यांचे काव्यसंग्रह
‘दोनुली’—-’पहाटतारा’—–’बगळ्यांची माळ’—-‘मरणगंध’ (नाट्यकाव्य)—–‘मावळते शब्द’—-‘रुद्रवीणा’—–‘वाजली विजेची टाळी’—-‘वेलांटी’—-’शततारका’ (१९५०)—-’सहज लिहिता लिहिता’


आज राणी, पूर्विची ती प्रीत तू मागू नको
कालचे वेड्या फुलांचे रंग तू मागू नको
सांजता चाफ्याकळीचे चुटपुटीचे भेटणे
पानजाळीतून झिरपे बावरेसे चांदणे
त्या क्षणांचे, चांदण्यांचे स्पर्श तू मागू नको
पाकळ्यांचे शब्द होती तू हळू निःश्वासता
वाजती गात्री सतारी नेत्रपाती झाकता
त्या फुलांचे, त्या स्वरांचे, गीत तू मागू नको
रोखुनी पलकांत पाणी घाव सारे साहिले
अन्‌ सुखाच्या आसवांचे मीठ डोळा साचले
या घडीला मोतियाचा घास तू मागू नको
काय बोलू श्वासभारे चांदणे डहुळेल का?
उमलण्याचे सुख फिरुनी या फुला सोसेल का?

नित्‌ नवी मरणे मराया जन्म तू मागू नको
आज राणी, पूर्विची ती प्रीत तू मागू नको

बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात
छेडीती पानांत बीन थेंब पावसाचे
ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात
त्या गाठी, त्या गोष्टी, नारळीच्या खाली
पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली
रिमझिमते अमृत ते विकल अंतरात
हातांसह सोन्याची सांज गुंफताना
बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनी मोजताना
कमळापरी मिटती दिवस उमलुनी तळ्यात
तू गेलीस तोडूनी ती माळ, सर्व धागे
फडफडणे पंखाचे शुभ्र उरे मागे
सलते ती तडफड का कधी तुझ्या उरात बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात

*********************************

३०. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

“राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या” अशासारख्या कवितांचे रचयिता आधुनिक काळातील राष्ट्रसंत शिरोमणी तुकडोजी महाराज (माणिक बंडोजी इंगळे ) यांचा आज स्मृतिदिन तारखेप्रमाणे (११ऑक्टोबर). त्यांनी विनोबाजींच्या भूदान चळवळीत भाग घेतला , तुकडोजी महाराज एक स्वयंसेवी संस्थाही चालवीत , ग्रामगीता –सार्थ अनंदामृत —सार्थ अत्म्प्रभाव –गीताप्रसाद –बोधामृत हि पुस्तके त्यांनी लिहिली . . . . . . . . त्रिवार वंदन

या झोपडीत माझ्या

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली।
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥धृ o॥
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने ।
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥१॥
भुमीवर पडावे , ताऱ्यांकडे पहावे ।
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥
स्वामीत्व तेथ त्याचे, तैसेचि येथ माझे ।
माझा हुकुम गाजे, या झोपडीत माझ्या॥३॥
महालापुढे शिपाई , शस्त्री सुसज्ज राही ।
दरकार तिही नाही, या झोपडीत माझ्या ॥४॥
जाता तया महाला, ‘ मत जाव ‘ शब्द आला ।
भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या ॥५॥
महालात चोर गेले,चोरुनी द्रव्य नेले ।
ऐसे कधी न झाले, या झोपडीत माझ्या ॥६॥
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातुनी होति चोऱ्या ।
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥७॥
महालि सुखे कुणा ही ? चिंता सदैव राही ।
झोपेत रात्र जाई , या झोपडीत माझ्या ॥८॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा।
कोणावरी न बोझा, या झोपडीत माझ्या ॥९॥
चित्तास अन्य रामा, शब्दी उदंड प्रेमा ।
येती कधी न कामा, या झोपडीत माझ्या ॥१०॥
पाहोनि सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे ।
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥११॥
वाडे, महाल, राणे केले अनंत ज्याने ।
तो राहतो सुखाने, या झोपडीत माझ्या ॥१२॥
‘ तुकड्या ‘ मती स्फ़ुरावी, पायी तुझ्या रमावी ।
मुर्ती तुज़ी रहावी, या झोपडीत माझ्या ॥१३॥

!!वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज !!

********************************

मराठी विश्वकोषावरील माहिती

तुकडोजी महाराज : (२९ एप्रिल १९०९–१० नोव्हेंबर १९६८). महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, भक्त, कवी व समाजसुधारक. मूळ नाव माणिक बंडोजी ठाकूर. विदर्भात यावली (जि. अमरावती) येथे जन्म. ठाकूर घराण्याचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा असल्याने लहानपणापासूनच त्यांना ध्यान, भजन, पुजन या गोष्टींची आवड निर्माण झाली. मराठी तिसरीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी शाळा सोडली. वरखेडला (जि. अमरावती) आजोळी असताना आडकूजी महाराजांना त्यांनी गुरू केले. पुढे किर्तन, भजनासाठी ते स्वतःच कविता रचू लागले. एके दिवशी गुरूमहाराजांनी माणिकला ‘तुकड्या’ म्हणून हाक मारली व म्हटले, की ‘तुका म्हणे’ असे किती दिवस म्हणशील? ‘तुकड्या म्हणे’ असे म्हणत जा. ‘तुकड्या म्हणे’ या वाक्याने संपणारे असंख्य अभंग त्यांनी लिहिले. यामुळे ते तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. ईश्वरभक्ती, सद्‌गुणांचा उपदेश, सामाजिक जागृती इ. विषय त्यांनी आपल्या कीर्तनांतून हाताळले, म्हणूनच त्यांना जनतेने ‘राष्ट्रसंत’ अशी उपाधी देऊन गौरविले.

तुकडोजी महाराजांचे कवित्व अस्सल आहे. कीर्तने व खंजिरी भजने यांच्या माध्यमातून समाजसेवा हेच तुकडोजींचे ध्येय होते. त्यासाठी परंपरागत अनिष्ट रूढी, जातिधर्मपंथभेद, अंधश्रद्धा इ. समाजघातक गोष्टींवर कठोर प्रहार करून ईश्वराचे विशुद्ध स्वरूप त्यांनी लोकांसमोर मांडले. त्यामुळे सर्व धर्माचे, सर्व पंथांचे लोक त्यांच्याकडे आकृष्ट झाले. आत्मसंयमाचा आणि देशभक्तीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी अविश्रांत श्रम केले. गावोगावी ‘गुरुदेव सेवा मंडळे’ स्थापली. व्यायामाचे महत्व सांगण्यासाठी आदेशरचना हा ग्रंथ त्यांनी लिहिला.

राष्ट्रीय विचारांचा पुरस्कार त्यांनी १९३० सालच्या सत्याग्रहात भाग घेऊन केला. गांधीजींसारख्या राष्ट्रनेत्यांबरोबर त्यांचा संबंध आला. तुकडोजी महाराजांनी राष्ट्रकार्याकरिताच आपले जीवन समर्पित केले. १९३६ साली गांधीजींच्या सहवासात राजेंद्र बाबू, पं. नेहरू, मौलाना आझादप्रभृती राष्ट्रनेत्यांशी त्यांचा परिचय झाला. भारत सेवक समाजात त्यांनी गुलझारीलाल नंदाजींबरोबर काम केले. आपल्या मतांच्या प्रचारार्थ त्यांनी विपुल ग्रंथरचना केली. त्यांची सु. चाळीस पुस्तके प्रसिद्ध आहेत. ४१ अध्यायांचे ४,६७५ ओवीसंख्या असलेले ग्रामग्रंथ हे त्यांचे प्रसिद्ध काव्य होय. त्यांनी हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषांत काव्यरचना केली. त्यांचे कवित्व जातिवंत असून ते आधुनिक संतप्रवृत्तीचे निदर्शक आहे. १९४२ च्या आंदोलनात भाग घेतल्याने त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगात त्यांनी सुविचारस्मरणी हा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यानंतर भूदान, अस्पृश्योद्धार, जातिनिर्मूलन इ. कार्यांकडे त्यांनी विशेष लक्ष पुरविले.

विश्वधर्म व विश्वशांती परिषदेसाठी १९५५ मध्ये ते जपानला गेले. त्यांच्या भजनाने अनेक पाश्च्यात्य व पौर्वात्य विद्वान मोहित झाले. १९६६ मध्ये प्रयाग येथे विश्वहिंदू परिषदेचे ते अध्यक्ष होते. सर्व धर्म, पंथ, जाती यांच्या पलीकडे असलेल्या ईश्वराचे स्वरूप ते आपल्या भजनांतून प्रकट करीत. ईश्वराचे ज्ञान करून घेऊन व्यक्तिविकास व समाजजागृती केली पाहिजे, असे ते म्हणत. धार्मिक एकात्मता निर्माण करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. गुरुकुंज आश्रमात (मोझरी, जि. अमरावती) त्यांचे निधन झाले. तेथेच त्यांची समाधी आहे. गुरुकुंज आश्रमाच्या वतीने अनेक प्रकारचे समाजोपयोगी कार्य चालू आहे.

भिडे, वि. वि.

३१. गीतकार, संगीतकार, गायक यशवंत देव

प्रिया आज माझी नसे साथ द्याया. अशी सुंदर गाणी देणारे ,आकाशवाणीवरील लोकप्रियतेचा उच्चांक मोडणारा भावसरगम हा कार्यक्रम करणारे संगीतकार
यशवंत देव यांचे आज (३० ऑक्टोबर) पुण्यस्मरण. यशवंत देव म्हणजे शब्दप्रधान गायकी. हा शब्द याच देवकाकांनी दिला. गीतकार आणि संगीतकार म्हणून अनेक मराठी चित्रपट व नाटकांना त्यांनी दिलेले भावपूर्ण संगीत आजही मराठी रसिकांच्या ओठावर आहे. यशवंत देवांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ सालचा. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू. देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.
यशवंतांची गाजलेली गीते
जीवनात ही घडी अशीच ——अरे देवा तुझी मुले अशी — अशी धरा असे गगन —–करिते जीवनाची भैरवी —-कामापुरता मामा— कोटी कोटी रूपे तुझी —- कृष्णा उडवू नको रंग —-चंद्राविना ठरावी जशी —- तुझ्या एका हाकेसाठी —- तू नजरेने ‘हो’ म्हटले —-तेच स्वप्‍न लोचनांत—- त्याची धून झंकारली —दिवाळी येणार अंगण सजणार —-प्रिया आज माझी नसे—- प्रिया साहवेना आता—- प्रेमगीते आळविता —- भारतमाता परमवंद्य धरा —–रात्रीच्या धुंद समयाला—-लागे ना रे थांग तुझ्या —शब्दमाळा पुरेशा न —– स्वर आले दुरुनी —–श्रीरामाचे चरण धरावे


प्रिया आज माझी नसे साथ द्याया
नको धुंद वारे, नको चांदण्या या

नको पारिजाता धरा भुषवू ही
पदांची तिच्या आज चाहूल नाही
प्रियेविण आरास जाईल वाया

फुले सान झेलू तरी भार होतो
पुढे वाट साधी तरी तोल जातो
कुणाला कळाव्या मनाच्या व्यथा या

न शांती जिवाला, न प्राणास धीर
कसा आज कंठात येईल सूर
उरी वेदना मात्र जागेल गाया

गीतकार : यशवंत देव, संगीत :प्रभाकर जोग, गायक :सुधीर फडके

स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी।।

निर्जीव उसासे वाऱ्याचे
आकाश फिकटल्या ताऱ्यांचे
कुजबुजही नव्हती वेलींची
हितगुजही नव्हते पर्णांचे
ऐशा थकलेल्या उद्यानी ।। १।।

विरहार्त मनाचे स्मित सरले
गालावर आसू ओघळले
होता हृदयाची दो शकले
जखमेतून क्रंदन पाझरले
घाली फुंकर हलकेच कुणी ।।२।।

पडसाद कसा आला न कळे
अवसेत कधी का तम उजळे
संजीवन मिळता आशेचे
निमिषात पुन्हा जग सावरले
किमया असली का केली कुणी।।३।।

गीत – यशवंत देव
संगीत – प्रभाकर जोग
स्वर – सुधीर फडके
————————-
स्व.यशवंत देव यांना श्रद्धांजलि
https://anandghare.wordpress.com/2018/11/18/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a6%e0%a5%8d/

तेथे कर माझे जुळती : यशवंत देव https://anandghare2.wordpress.com/2016/03/27/%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A5%AE-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AF/

३२. माधव ज्युलियन

प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधु आई!, मराठी असे आमुची मायबोली अशी सुंदर कविता व गाणी देणारे माधव जूलियन्’ यांचे आज पुण्यस्मरण (२१ जानेवारी, इ.स. १८९४; बडोदा – २९ नोव्हेंबर, इ.स. १९३९)
छंद:शास्त्राचे व्यासंगी, साहित्यविमर्शक आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्व निष्ठ पुरस्कृतें, प्रचारक, मूळ नाव माधव त्र्यंबक पटवर्धन. काव्यरचनेसाठी त्यांनी घेतलेल्या ‘माधव जूलियन्’ ह्या टोपण नावातील ‘जूलियन्’ हे नाव, सुप्रसिद्ध इंग्रज कादंबरीकर्ती मारी कोरले हिच्या गॉड्स गुड मॅन ह्या कादंबरीतील ‘जूलियन् ॲडर्ली’ ह्या उत्कट मनोवृत्तीच्या, सौंदर्यपूजक आणि स्वच्छंद कवीच्या व्यक्तिरेखेवरून त्यांनी घेतले आणि आपल्या ‘माधव’ या नावाला जोडले. माधवरावांचा जन्म गुजरातमध्ये, बडोदे शहरी, त्यांच्या आजोळी झाला. पुणे जिल्ह्यातील आवळस या गावी त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले.
माधवराव हे मूलतः कवी होते. काव्य हाच त्यांच्या समग्र वाङ्‍मयनिर्मितीचा केंद्रबिंदू होता; तसेच प्रयोगशीलता हा त्यांच्या काव्यात्म व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा घटक होता. काव्याच्या संदर्भात त्यांनी अनेक प्रयोग केले. प्रयोगशीलतेच्या दृष्टीने केशवसुत आणि मर्ढेकर ह्या दोन युगप्रवर्तक कवींच्या मधील एकमेव दुवा म्हणून माधवरावांचे नाव गौरवाने घेतले जाते.
काव्यनिर्मितीप्रमाणेच माधवरावांनी काव्यसमीक्षा आणि काव्यविचारही केला. आधुनिक मराठी कवी आणि कविता ह्यांच्या संदर्भात त्यांनी आपले समीक्षात्मक लेखन मुख्यतः केले; तिच्यातील न्यूनाधिकेय त्यांच्या दृष्टिकोणातून दाखवून दिले. आधुनिक मराठी कविता बरीचशी परपुष्ट आणि अनुकरणशील आहे, असे त्यांचे मत होते. आधुनिक मराठी कवितेवर त्यांनी इंग्रजीतूनही लेखन केले. चिकित्सकपणा आणि रसग्राही वृत्ती ह्यांचा समतोल समीक्षकाने सांभाळला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. त्यासाठी त्यांनी ‘काव्यचिकित्सा’ ही लेखमालाही लिहिली. रसव्यवस्था आणि वाङ्‍मयानंदमीमांसा ह्या विषयांवरही त्यांनी लेखन केले. काव्यविहार (१९४७) वकाव्यचिकित्सा (१९६४) हे त्यांचे कविकाव्यविषयक लेखसंग्रह आहेत.
प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधु आई!
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी?
नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.
चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.
ही भूक पोरक्याची होई न शांत आई,
पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही.
वाटे इथून जावे, तूझ्यापुढे निजावे,
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे!
वक्षी तुझ्या परि हे केव्हा स्थिरेल डोके,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके?
घे जन्म तू फिरूनी, येईन मीहि पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी!”

******

नवी भर दि.३०-०१-२०२३ :

मराठी असे आमुची मायबोली
जरी आज ही राजभाषा नसे
ही कविता रचणारे माधव जूलियन यांची आज जयंती
मुंबई विद्यापीठानची मराठी साहित्यासाठी पहिली डी.लिट. मिळविणारे , कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते
पटवर्धनांचा जन्म इ.स. १८९४ साली बडोदा, बडोदा संस्थान येथे झाला. त्यांनी इ.स. १९१६ साली फारसी भाषा हा विशेष विषय निवडून बी.ए. पदवी मिळवली, तर इ.स. १९१८ साली इंग्रजी साहित्य हा विषय निवडून एम.ए.चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. शिक्षणानंतर इ.स. १९१८ ते इ.स. १९२४ या कालखंडात ते फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे फारसी भाषा शिकवत होते. त्यानंतर ते कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात फारसीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी इ.स. १९२५ ते इ.स. १९३९ या काळात अध्यापन केले. माधव त्र्यंबक पटवर्धनांना त्यांच्या ’छंदोरचना’ या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाने १ डिसेंबर १९३८ रोजी डी.लिट्. ही सन्माननीय पदवी दिली. (विकिपीडिया )
मुंबई विद्यापीठाने मराठी साहित्यासाठी दिलेली ही पहिली डी.लिट. होती.
त्यांच्या गाजलेल्या कविता व गाणी
कशासाठी पोटासाठी—–जीव तुला लोभला माझ्यावरी——-प्रेम कोणीही करीना——प्रेमस्वरूप आई——मराठी असे आमुची मायबोली


********************************

३३. आद्य नवकवी बा.सी.मर्ढेकर


मराठी नवकाव्याचे प्रवर्तक कै. बा सी मर्ढेकर यांची आज जयंती ( डिसेंबर १, १९०९ – मार्च २०, १९५६)
मर्ढेकरांचे मूळ आडनाव गोसावी. त्यांचे गाव सातारा जिल्ह्यातील मर्ढे म्हणून मर्ढेकरझाले त्यांचा जन्म खानदेशात फैजपूर येथे झाला
मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते याचे कारण असे सांगितले जाते की, दुसर्‍या महायुद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, जीवनात जी नीरसता व कृत्रिमता आली अणि युद्धात जो मानवसंहार झाला तो पाहून त्यांचे मन विषण्ण झाले. त्यावर काही उपाय नसल्यामुळे त्यांच्या मनातील विफलता काव्यातून उमटली. बा.सी. मर्ढेकर हे भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे.
साताऱ्या जवळील मर्ढे हे त्यांचे गाव त्यांचे घर कृष्णा काठावर आहे त्यांचे स्मारक आता तेथे झाले आहे. सातारचे अलीकडे आनेवाडी टोल नाक्याचे पुढे आनेवाडी येथून डावीकडून तेथे जाता येईल .तेथुन जवळच प्रसिद्ध १२ मोटेची विहीर लिंबशेरी येथे आहे. पुण्याहून कोल्हापूरला जाताना वाट वाकडी करा.

श्री.माधव विद्वांस . . . फेसबुकवरून साभार दि.१-१२-२०२१

मर्ढेकरांच्या दोन प्रसिद्ध कविता
पिपांत मेले ओल्या उंदिर; —–माना पडल्या, मुरगळल्याविण;
ओठांवरती ओठ मिळाले; ——-माना पडल्या, आसक्तीविण;
गरिब बिचारे बिळातं जगले; ——पिपांत मेले उचकी दउेन;
दिवस सांडला घार्‍या डोळी ——–गात्रलिंग अन धुऊन घेउन.
जगायची पण सक्ती आहे; ——–मरायची पण सक्ती आहे.
उदासतेला जहरी डोळे, ——-काचचे पण;
मधाळ पोळे——– ओठांवरती जमले तेही
बेकलाइटी, बेकलाइटी! ———ओठांवरती ओठ लागले;
पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!

मर्ढेकरांची कविता पिंपात मेले ओल्या उंदिर ह्या कवितेला दुसऱ्या महायुध्दात झालेल्या ज्यूंच्या हत्याकांडाचा तसेच तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचा संदर्भ आहे. मर्ढेकर यांनी दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात केलेल्या कवितांवर तत्कालीन वातावरणाची गडद छाप आहेच. उदाहरणार्थ ‘या दु:खाच्या कढईची गा, अशीच देवा जडण असु दे’ या कवितेत महायुद्धातील संहार व विनाशामुळे सर्व समाजावर जी एक बधीरता, निराशा, सुन्नता पसरलीय त्याचेच प्रतिबिंब आहे. या कवितेत एक ओळ आहे.
‘दु:ख दे देवा, परंतु सोसण्याची शक्ती दे’
(आता इथे कुंतीचे प्रतिक आहे. महाभारतात असाच संहार झाला होता आणि लहानांपासून ते वृद्धांपर्यंत डोळ्यासमोरील सर्व पिढ्या मारल्या जाण्याचे बघणे माता कुंतीच्या नशिबी आले होते. तेव्हा तिने श्रीकृष्णाकडे ही आळवणी केली होती. दुसर्‍या महायुद्धानंतरची स्थिती बघून कुंतीचेच मागणे मर्ढेकर मागत आहेत.)
म्हणून मेलेले उंदिर म्हणजे ‘वंशसंहार झालेले ज्यू’ हे जास्त सयुक्तिक आहे. मला वाटते, की त्यातून या कवितेच्या अर्थाबाबतचे गूढही उकलण्यास मदत झाली आहे.

. . . . . कविता लिहून झाल्यावर त्याचा अर्थ कोणाला कसा भिडेल यावर कवीचा ताबा नसतो.
ज्यू कॉन्सेंट्रेशन कॅंपमध्ये तडफडून मेले – उंदीरही मेले – तेव्हा उंदीर हे ज्यूंचं प्रतीक आहे – इतका शब्दशः अर्थ काढणं फारच बाळबोध वाटलं. मर्ढेकरांची ही कविता खूपच अधिक तरल आहे.
मर्ढेकरांसाठी हे जीवन म्हणजे काय? हा प्रश्न आहे. हे जीवन दुःखी का? ज्यूंप्रमाणे माणसं तडफडून मरतात का? हा प्रश्न नाही. किंबहुना हे जीवन म्हणजे काय, याचा अर्थ लावता येत नाही हेच दुःख आहे. कोण कुठले उंदीर कुठल्यातरी बिळात सक्तीने जगतात, कुठल्यातरी पिंपात जाऊन ओलेगिच्च होऊन सक्तीने मरतात. तेवढ्यातल्या तेवढ्यात कुठल्यातरी ओठांवर ओठ टेकण्यात धन्यता मानतात. या सगळ्याला काय अर्थ आहे? हे जीवन आपण का जगतो? असे प्रश्न आहेत. . . . मिसळपाववरून साभार

गणपत वाणी ———-गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नसु तीच काडी; ——-म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी; ——-मिचकावुन मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भुवयी, ——–भिरकावुनी ती तशीच ध्यायचा
लकेर बेचव जैसा गवयी .——–गिर्‍हाईकाची कदर राखणे;
जिरे, धणे अन धान्य गिळत, ——–खोबरेल अन तेल तिळाचे
विकून बसणे हिशेब कोळित; ——–स्वप्नांवरती धुर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा ——-मिणमिण जळत्या;आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा. ———-गोणपटावर विडकररंगी
सतरंजी अन उशास पोते ——–आडोशाला वास तुपाचा;
असे झोपणे माहित होते ——–काडे गणपत वाणयाने ज्या
हाडांची ही ऐशी केली —दुकान्यातल्या जमीनीस ती
सदवै रूतल्या आणिक रूतल्या. ——–काड्या गणपत वाण्याने ज्या
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या, ——-दुकानातंल्या जमीनीस त्या
सदैव रुतल्या अणिक रुतल्या. ——-गणपत वाणी बिडी बापडा
पितापितांना मरुन गेला; ——एक मागता डोळे दोन
देव देत असे जन्मांधाला””

***********************

३४. अनंत काणेकर


आता कशाला उद्याची बात?……… बघ उडुनि चालली रात असे खट्याळ गीत लिहिणारे तसेच
आला खुशीत्‌ समिंदर, त्याला नाही धिर , होडीला देइ ना ग ठरू । सजणे, होडीला बघतोय्‌ धरू! हे गीत लिहिणारे पत्रकार , संपादक ,कवी, नाटककार , निबंध लेखक, प्रवास वर्णन ,पटकथा संवाद ,कथा लेखक अशी साहित्य क्षेत्रात अष्टपैलू विविधता असणारे कै . अनंत आत्माराम काणेकर यांची आज जयन्ती
‘धुक्यातून लाल तार्‍याकडे ’ हे त्यांचे प्रवासवर्णन तर खूपच गाजले होते. अनंत काणेकरांची महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणून ही नियुक्ती झाली होती. ते साहित्य अकादमीचे सदस्य होते. इ.स.१९६५ मध्ये भारत सरकारने ‘पद्‍मश्री ’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला होता.
ग्रंथसंपदा : चांदरात आणि इतर कवितासंग्रह. पिकली पाने, शिंपले आणि मोती, तुटलेले तारे, उघडया खिडक्या, राखलेले निखारे, बोलका ढलपा हे लघुनिबंधसंग्रह. दिव्यावरती अंधेरे हा लघुकथासंग्रह. धुक्यातून लाल तार्‍याकडे, आमची माती आमचे आकाश, निळे डोंगर तांबडी माती हे प्रवासवर्णनपर ग्रंथ इत्यादी.(मायमराठी )

अनंत काणेकर यांचे शालेय शिक्षण मुंबई-गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. मुंबई विद्यापीठातून १९२७मध्ये बी.ए.झाल्यावर त्यांनी १९२९ साली एल्‌एल.बी.ची पदवी संपादन केली. त्यानंतर १९३५ सालापर्यंत त्यांनी वकिलीचा व्यवसाय केला.
इ.स. १९४१मध्ये अनंत काणेकर हे मुंबईच्या खालसा कॉलेजात प्राध्यापक झाले. आणि तेथे पाच वर्षे नोकरी झाल्यावर सिद्धार्थ कॉलेजात आले. तेथूनच ते निवृत्त झाले. अनंत काणेकर हे मुंबईतील वांद्रे येथील साहित्य सहवास वसाहतीत ’झपूर्झा’ या इमारतीत रहात. काणेकरांच्या निधनानंतरही त्यांच्या पत्नी कमल या तेथे रहात होत्या. कमल काणेकर यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी १८ जानेवारी २००८ रोजी निधन झाले. त्यांना दोन मुली, एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी ‘अनन्वय’ या अनंत काणेकरांच्या आठवणींच्या पुस्तकाचे संपादन केले.. ’आशा’ आणि ’चित्रा’ या साप्ताहिकांचे ते काही काळ संपादक होते. (विकिपीडिया)

आला खुशीत्‌ समिंदर, त्याला नाही धिर,
होडीला देइ ना ग ठरू
सजणे, होडीला बघतोय्‌ धरू!
हिरवं हिरवं पांचूवाणी जळ
सफेत फेसाची वर खळबळ
माशावाणी काळजाची तळमळ
माझि होडी समिंदर ओढी खालीवर
पाण्यावर देइ ना ग ठरू
सजणे, होडीला बघतोय्‌ धरू!
तांबडं फुटे आभाळांतरी
रक्‍तावाणी चमक्‌ पाण्यावरी
तुझ्या गालावर तसं काही तरी
झाला खुळा समिंदर, नाजुक्‌ होडीवर
लाटांचा धिंगाणा सुरू
सजणे, होडीला बघतोय्‌ धरू!
सूर्यनारायण हसतो वरी
सोनं पिकलं दाहिदिशांतरी
आणि माझ्याहि नवख्या उरी
आला हासत समिंदर, डुलत फेसावर
होडीशी गोष्टी करू
सजणे, होडीला बघतोय्‌ धरू!
गोर्‍या भाळी तुझ्या लाल्‌ चिरी
हिरव्या साडीला लालभडक धारी
उरी कसली ग गोड शिरशिरी?
खुशी झाला समिंदर, त्याच्या उरावर
चाले होडी भुरुभुरू
सजणे, वार्‍यावर जणु पाखरू!”

************************

३५. माधव काटदरे

कविता ८४ओळींची कोकणाचे वर्णन करणारी कोकण कवी माधव काटदरे यांची कविता त्यांच्या जयंती निमित्त तुमच्या साठी खाली दिली आहे .
८० वर्षापूर्वीच्या काळातील एक संस्मरणीय मात्र उपेक्षित असं व्यक्तिमत्त्व. कोकणपुत्र निसर्ग कवी माधव केशव काटदरे. यांची आज जयंती
कोकण भूमीवर नितांत प्रेम करणारा एक कवी, या भूमीतील रम्य निसर्गचित्रे आपल्या कवितांमधून रेखाटणारा हा कवी इतिहासातही रमला.. मराठय़ांच्या इतिहासातील गौरवास्पद घटना आपल्या कवितेच्या माध्यमातून रोमारोमात निर्माण करणारा व शब्दबद्ध करणारा असा हा श्रेष्ठ कवी होता. कोकणातील गुहागर तालुक्यातील ‘शीर’ हे छोटेसे गाव कवी माधव यांचे मूळगाव. मात्र, कवी माधव यांचा जन्म ३ डिसेंबर १८९२ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर येथे झाला. प्राथमिक शिक्षण गुहागरमध्ये, त्यानंतर रत्नागिरी व नोकरीसाठी मुंबई आणि पुढे उत्तरायुष्य ते चिपळूणमध्ये होते.
माझ्या आजोळी भातगाव जवळच शीर हे काटदऱ्यांचे गाव आहे तेथे आमचे गावाचा तलाठी राहत होता त्यामुळे जमिनीचे कागद संबधाने त्याचेकडे मी गेलो तो काटदरे यांचे घरातच राहत होता त्यावेळी मला माहित नव्हते कि आपण एक महान व्यक्तीच्या घरात आलो आहे. . . . माधव विद्वांस

सहय़ाद्रीच्या तळी शोभिते हिरवे तळकोंकण,
राष्ट्रदेविचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन !
झुळझुळ गाणे मंजुळवाणे गात वाहती झरे,
शिलोच्चयांतुनी झुरूझुरू जेथे गंगाजळ पाझरे;
खेळत खिदळत नद्या चालल्या गुणगंभीराकडे
दरिखो-यांतुनि माणिकमोती फुलुनि झांकले खडे;
नील नभी घन नील बघुनी करि सुमनी स्वागत कुडा,
गोमेदांच्या नटे फुलांनी बरसातिंत तेरडा!
कडेपठारी खेळ मरूतासह खेळे हिरवळ,
उधळीत सोने हसे नाचरे बालिश सोनावळ!
शारदसमयी कमलवनाच्या तरल्या शय्येवरी
मदालसा स्वच्छंद लोळती जलदेवी सुंदरी!
कविकाव्यांतुनी तशी जींतुनी स्र्वते माध्वी झरी,
आमोदा उधळीत फुले ती बकुळींची मंजरी;
हिरव्या पिवळय़ा मृदुल दलांच्या रम्य गालीच्यावरी
स्वप्नी गुंगति गोकर्णीची फुले निळी पांढरी!
वृक्षांच्या राईत रंगती शंकुत मधु गायनी
तरंगिणीच्या तटी डोलती नाग केतकीवनी!
फुलपाखरांवरूनी विहरती पुष्पवनांतिल परी,
प्रसन्नता पसरीत वाजवून जादुची पांवरी!
शिताबाईच्या गोड हातचे पोहे जे काननी
रागाने दे बाईलवेडा कवडा भिरकावूनी;
रोपे त्यांची बनुनी पसरली नाचत चोहींकडे!
अजुनि पहाया! मंडित त्यांनी कोकणचे हे सडे;
इतिहासाला वार्ता ज्याची श्रुत नाही जाहली,
दंतकथांसह विस्मृती ज्याची होऊनिया राहिली
‘झिम्मा खेळे कोंकणचा तो नृपाळ’ म्हणती मुली
‘गळे वसंती टपटप जेव्हा आंब्याची डाहळी!’
पिकले आंबे गळुनी भूतळी रस जोंवरि वाहतो
वनदेवींसह झिम्मा खेळत तोवरि नृप राहतो.
कुठे आढळे फळभाराने लवलेली आंवळी,
कुठे गाळिती भुळभुळ अपुली पक्व फळे जांभळी,
कुठे हलवितो पिंपळपाने पिंपळ पारावर,
कुठे वडाच्या पारंबीवर झोंके घे वानरं!
कुठे बेहड्यावरि राघूस्तव विरही मैना झुरे,
प्राणविसांवा परत न आला म्हणूनी चित्त बावरे!
मधमाशांची लोंबती पोळी कुठे सात्त्विणावरी
रंग खेळती कुठे प्रमोदे पांगारे शेवरी!
पोटी साखरगोटे परि धरि कंटक बाहेरूनी
झुले कुठे तो फणस पुरातन रहिवासी कोंकणी.
कोठे चिंचेवर शठआंबा करि शीतल सांउली,
म्हणूनी कोपूनी नदी किनारी रातंबी राहिली!
निर्झरतीरी रानजाईच्या फुलल्या कुंजातुनी
उठे मोहमयी संगीताचा अस्फुट कोठे ध्वनी!
कुठे थाट घनदाट कळकिचा त्यांत संचरे कुणी
पुंगी बजावित फंदी मुशाफर दर्यापुर सोडूनी!
कुठे सुरंगी मुकुलकुलांच्या सस्मित वदनांतुनी
दरवळलेला परिमळ सेवित फिरती अपसरा वनी!
कोरांटीची नादवटीची नेवाळीची फुले
फुलुनि कुठे फुलबाग तयांनी अवघे श्रंगारिले!
नीललोचना कोंकणगौरी घालुनि चैत्रांगणी
हिंदोळय़ावर बसविती जेव्हा अंबा शुभदायिनी,
हळदीकुंकू तदा वटिता नसे प्रसादा उणे,
पिकली म्हणूनी रानोरानी करवंदे तोरणे.
औदुंबरतरू अवधुताचा छायादे शीतल,
शिवयोग्याचा बेल वाढवी भावभक्तीचे बळ;
बघुनि पांढरी भुतपाळ वेताळ काढितो पळ
आइनकिंजळ करिती मांत्रीकमंत्रबळ दुर्बळ!
गडागडावर निवास जेथे मायभवानी करी.
राहे उधळीत फुले तिथे खुरचांफा चरणांवरी!
पानफुलाच्या वाहुनि माळा अंजनिच्या नंदना,
तिजवर वरूनी वैधव्याच्या रूइ चुकवी यातना!
चिंवचिंव शब्दा करित निंवावर खार भराभर पळे
भेंडि उंडिणीवरी बैसुनी करकरती कावळे;
लज्जारंजित नवयुवतींच्या कोमल गालासमं
रंगुनि काजु, भरले त्यांनी गिरी डोंगर दुर्गम!
तिथे मंडलाकार मनोहर नर्तन आरंभुनी,
रूसल्या सखिची घुमत पारवा करितो समजावणी!
विविध सुवासी हिरवा चांफा चकीत करी मानस,
मंदमंद मधु गंध पसरिते भुइचांफा राजस,
हंसे उपवनी अधरेन्मीलित सुवर्णसंपक कळी,
पाडुनी तुळशीवरी चिमुकली हलती निज सांउली!
पराग पिवळे, धवल पाकळय़ा, परिमळ अंबर भरी
घालित रूंजी भ्रमति भृंग त्या नागचंपकावरी!
सौगंधिक उच्छ्वास सोडिती प्राजक्ताच्या कळय़ा,
लाजत लाजत हळुच उघडितां निज नाजुक पाकळय़ा
त्या उच्छ्वास पिउनि बिजेचा चांद हर्षनिर्भरी
होउनिया बेभान नाचतो निळावंतिच्या घरी!
धुंद सिंधुला मारवेलिची मर्यादा घालून
उभी सैकती कोंकणदेवी राखित तल कोंकण;
निकट माजली निवडुंगांची बेटे कंटकमय,
आश्रय ज्यांचा करूनी नांदती कोचिंदे निर्भय,
मागे त्यांच्या डुले नारळी पोफळिचे आगर
पुढे विराजे निळावंतिचे निळेच जलमंदिर

. . . निसर्ग कवी माधव काटदरे . . . . . संकलन माधव विद्वांस

३६. दिलीप चित्रे

कवी, कथालेखक, समीक्षक, चित्रकार, शिल्पकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे आज पुण्यस्मरण (सप्टेंबर १७, १९३८ – डिसेंबर १०, २००९) . मराठी साहित्यविश्वातील मानाचे पान समजल्या जाणा-या ‘लघुनियतकालिक चळवळी’मध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या मराठी साहित्याची जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश भाषांतरे झाली आहेत.
त्यांची साहित्यसंपदा
कविता, मौज प्रकाशन, मुंबई, १९६०—–ओर्फियस, मौज प्रकाशन, मुंबई, १९६८—–शिबा राणीच्या शोधात, मेजेस्टिक, मुंबई, १९६९—-कवितेनंतरच्या कविता, वाचा प्रकाशन, औरंगाबाद, १९७८—–चाव्या; प्रास प्रकाशन, १९८३—–दहा बाय दहा, प्रास प्रकाशन, मुंबई, १९८३—–मिठू मिठू पोपट आणि…, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, १९७९——-तिरकस आणि चौकस, लोकवाङ्मय गृह, मुंबई, १९८०——पुन्हा तुकाराम, १९९०; द्वितीय आवृत्ती: १९९५; तृतीय आवृत्ती: २००१——-शतकांचा संधिकाळ, लोकवाङ्मय गृह, मुंबई——-भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा( संपादित), लोकवाङ्मय गृह, मुंबई, १९९५——एकूण कविता-१, पॉप्युलर, मुंबई, १९९२; द्वितीय आवृत्ती: १९९५——एकूण कविता-२, पॉप्युलर; मुंबई;1995——–एकूण कविता-३, पॉप्युलर—–चतुरंग, पॉप्युलर, १९९५

त्यांची एक कविता
एक माणूस
रडण्याऐवजी चालत जातो पायाखाली येतील ते रस्ते
त्याच्या प्रत्येक पावलाएवढा अश्रू सांडतो एकेक रस्त्यावर.
एक माणूस…
दुःख झालं तर बडबडतो भलतंसलतंच
शब्दाने शब्द वाढवतो
एक माणूस
त्याच्या गळ्यातला विचार येत नाही कधीच जिभेवर..
एक माणूस
हसण्याऐवजी फक्त जोरात श्वास घेतो
भोवताली सर्वत्र हास्यध्वनी पसरतो
हादरतात इमारती, रस्ते गडाबडा लोळतात,
थरथरायला लागतं आकाश…
पण त्याच्या पोटातला धरणीकंप
तोंडावाटे पडत नाही कधीच बाहेर…
एक माणूस
वर्षानुवर्ष व्यवहार करतो झोपेतल्या झोपेत
क्वचित जागा होतो
आणि उन्हं घट्ट होतात त्याच्या चेहऱ्यावर.


विकिपीडियावरील माहिती : दिलीप पु. चित्रे (सप्टेंबर १७, १९३८ – डिसेंबर १०, २००९) हे मराठी कवी, कथालेखक, समीक्षक, चित्रकार, शिल्पकार होते. मराठी साहित्यविश्वातील मानाचे पान समजल्या जाणा-या ‘लघुनियतकालिक चळवळी’मध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या मराठी साहित्याची जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश भाषांतरे झाली आहेत.

जन्म नाव दिलीप पुरुषोत्तम चित्रे
जन्म १७ सप्टेंबर १९३८ बडोदा, गुजरात, भारत
मृत्यू १० डिसेंबर २००९ पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, चित्रकला
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कविता, समीक्षा
प्रसिद्ध साहित्यकृती पुन्हा तुकाराम
वडील पुरुषोत्तम आत्माराम चित्रे
आई विमल पुरुषोत्तम चित्रे

३७. राजा मंगळवेढेकर

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, ऊर्मिले त्रिवार वंदन तुला अशी सुंदर गीते लिहिणारे बालसाहित्यकार, कथालेखक, कवी, नाटककार, पत्रे, अनुवाद तसेच विज्ञान व पर्यावरणविषय असे चतुरस्त्र लेखन करणारे राजा मंगळवेढेकर ऊर्फ वसंत नारायण मंगळवेढेकर यांची आज जयंती. (११ डिसेंबर) त्यानिमित दैनिक प्रभा पुणे मधील माझा लेख – माधव विद्वांस
राजा मंगळवेढेकरांनी त्यांच्या लेखनातून मराठी साहित्याच्या दरबारात आपल्या वैविध्यपूर्ण ग्रंथसंपदेची मोलाची भर घातली आहे.त्यांचे यांचे संपूर्ण लेखन ‘राजा मंगळवेढेकर’ याच टोपणनावाने प्रसिद्ध आहे. त्यांनी बी.ए.पर्यंतचे शिक्षण घेतले होते. त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय भाग घेतला होता, त्यावेळी त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. त्यामुळे त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. “करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल प्रभूशी नाते तयाचे” या साने गुरुजींच्या उक्तीप्रमाणे त्यांनी बालगोपाळांचेसाठी विपुल साहित्य निर्माण केले. आजवर मंगळवेढेकरांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त गोष्टी, कथा, कविता, चरित्रे, पत्रे आणि विज्ञान व पर्यावरण याविषयीची पुस्तके आहेत. आपला भारत, शोध भारताचा या त्यांच्या गाजलेल्या पुस्तक मालिका असून त्यांनी साने गुरुजींच्या जीवनसंघर्षमय जीवनावर ‘साने गुरुजी जीवनचरित्र’हे सुंदर पुस्तक लिहिले. मोठय़ांसाठी केलेल्या साहित्य निर्मितीमधे अनेक विषयांना स्पर्श केला आहे. ‘मित्राय नम:’, ‘तरुण मित्रा’, ‘कहाणी एका प्रयोगाची’, ‘चित्रांगण’, ‘ग.दि.मा’, ही त्यांची काही पुस्तके.
राष्ट्रसेवादल, साने गुरुजी कथामाला, आंतरभारती इत्यादी सांस्कृतिक व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांच्या कार्यामधे त्यांचा मोठा सहभाग होता. कथाकथन, बालमेळावे, शिबिरे इत्यादींच्या निमित्ताने त्यांनी भारतभर भटकंती केली होती .”केल्याने देशाटन, पंडित मैत्री,आणि सभेत भाषण केल्याने मनुजा चातुर्य येते” या उक्तीप्रमाणे त्यांच्या अनुभवविश्वातून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींच्या सहवासातील गोड गोष्टी व इतर संस्कार कथा सांगत त्यांनी सा-या महाराष्ट्रभर भ्रमंती केली होती. स्वतःच्या कथाकथनातील अनुभवातून त्यांच्या ‘कथा आणि कथाकथन’ या पुस्तकात त्यांनी कथाकथनाची तंत्रे खुबीने मांडली आहेत. हे पुस्तक वक्त्यांना दीपस्तंभासारखे ठरले.या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या असून महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट ग्रंथाचे पारितोषिकही या पुस्तकास प्राप्त झालेले आहे. मंगळवेढेकरांच्या विपुल साहित्यनिर्मितीमधे २०० पेक्षा जास्त गोष्टी, कथा,आहेत.
याशिवाय, भारतरत्न (भाग १, २, ३), हा शोध भारताचा (पुस्तक मालिका-१०भाग) या पुस्तकांची मालिका लिहिली. चतुराई आणि बनवाबनवी ही बालनाट्ये लिहिली आहेत. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, कोणास ठाऊक कसा शाळेत गेला ससा, हि बालगीते आजही बालचमूत आवडीची असतात व त्यांच्या शालेय संमेलनात गायली जातात. दुर्लक्षित उर्मिलेवर “ऊर्मिले त्रिवार वंदन तुला ” हे गीत लिहून तिच्या त्यागाची जाणीव त्यांनी करून दिली तसेच , “सती तू दिव्यरूप मैथिली ” या गीतांमधून सीतेचा मोठेपणाही सांगितला .
त्यांना वर्ष १९९९ मध्ये गदिमा पुरस्कार, फुलराणी थिएटरचा ‘जवाहरलाल नेहरू स्मृती पुरस्कार’, बालसेवा पुरस्कार (इ.स. १९९५, बाबुराव शिरोळे बालसाहित्य पुरस्कार १९९७ हे पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांनी पुणे येथे १९८५ साली झालेल्या सहाव्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यांचे बहुतांश लेखन चरित्रे, वृक्ष, निसर्ग व विज्ञान या विषयांवर आधारित आहेत. त्यांच्या पुष्कळशा पुस्तकांना राज्य व केंद्रशासनाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांनी लिहिलेल्या चरित्रामध्ये इंदिरा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजा राममोहन रॉय, समर्थ रामदास, सर्वपल्ली राधाकृष्णन यांचाही समावेश आहे. १ एप्रिल २००६:रोजी त्यांचे पुणे येथे निधन झाले.

त्यांचे गाजलेले गीत
“उर्मिले, त्रिवार वंदन तुला !
त्यजुनि राजसुख जरी जानकी
वनात गेली प्रभु-सांगाती
राजमंदिरी तूच साहिल्या वियोगातल्या कळा !
सतत साउलीसम रामाला
भ्राता लक्ष्मण कृतार्थ झाला
तुझ्या मनातिल मुक्या भावना, कधी न तो उमगला !
अंधारातिल तू ज्योतीसम
आयु वेचिले अपुले कण कण
सुख-तृप्तीचा कधि न तुला गे वाराही लाभला !
राम-जानकी वियोगातुनी
घडले रामायण हे भुवनी
तुझी तपस्या, तुझा त्याग परि नच लोकी ठसला !
थोरचरित तू, दूर राहुनी
सुगंध भरला तू रामायणि
उपेक्षाच परि तुझ्या कपाळी न्याय जगी आगळा !”


३८.राजा बढे

महाराष्ट्रगीत लिहिणारे राजा बढे यांचे आज पुण्यस्मरण. (जन्म : नागपूर, १ फेब्रुवारी १९१२; – ७ एप्रिल १९७७). त्यांच्या महाराष्ट्र गीताला कै श्रीनिवास खळे यांनी संगीत दिले व कै शाहीर साबळे यांनी ते गायले , त्यांच्या या गीताला राज्यगीत म्हणून मान्यता मिळाली हा एक प्रकारे राजा बढे आणि शाहीर साबळे यांचा मोठा सन्मान आहे.
तसेच हसलें मनिं चांदणें — जपुनी टाक पाउलं साजणी नादतील पैंजणें -सारखी अनेक गीते रचली अशी सुंदर गीते रचणारे , संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक, कवी आणि गीतकार अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे राजा बढे यांचे आज पुण्यस्मरण .
राजा बढे यांचा जन्म नागपुरात, प्राथमिक शिक्षण छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात झाले. १९३५मध्ये त्यांनी पंजाबची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली.
सुरुवातीला राजा बढे यांनी दैनिक सकाळच्या संपादकीय विभागात नोकरी केली. नंतर ते वर्षभर नागपूरच्या दैनिक महाराष्ट्रमध्ये सहसंपादक आणि त्याच वेळी वागीश्वरी मासिकाच्या संपादक मंडळात होते; आणि पुढे सावधान साप्ताहिकात लागले. १९५६ ते १९६२ या कालखंडात ते आकाशवाणीवर ‘निर्माता’ म्हणून काम करीत होते. या नोकऱ्यांच्या धरसोडीत त्यांचे कॉलेजशिक्षण राहून गेले. मुंबई आकाशवाणीवरच्या नोकरीनंतर बढे यांनी आकाशवाणीला छोटे छोटे माहितीपट करून दिले.
राजा बढे यांनी १९४० च्या आसपास चित्रपट व्यवसायात प्रवेश केला. ‘सिरको फिल्म्स’ मध्ये दोन वर्षे त्यांनी कामे केली. १९४२ मध्ये ते ’प्रकाश स्टुडिओ’त रुजू झाले. बंधू बबनराव यांच्या मदतीनं त्यांनी “स्वानंद चित्र’ ही संस्था उभी केली आणि ’रायगडचा राजबंदी’ हा संभाजीमहाराजांच्या जीवनावरील चित्रपट काढला.
राजा बढे यांचा संस्कृत काव्याचा आणि उर्दू शायरीचा चांगला अभ्यास होता. तरीही त्याच्या कवितेतेला भाषा बोजड नव्हती. गीत, गझल याप्रमाणेच ‘चारोळी’ हा रचनाप्रकार बढे यांनी हाताळला. ‘कोंडिबा’ हे टोपण नाव वापरून काही राजकीय वात्रटिका त्यांनी लिहिल्या. मुंबईच्या विविधवृत्तात त्या प्रकाशित होत असत.

स्वा. सावरकर हे राजा बढे यांचे दैवत होते. त्यांचे राष्ट्रप्रेम त्यांच्या ‘क्रांतिमाला’ (१९५२) या संग्रहातून वेळोवेळी दिसून येते. त्यात २१ कविता आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील देशभक्तिपर गीते आहेत. प्रत्यक्ष सावरकरांनी ‘प्रस्तावनेत’ ‘‘आपण स्वत:च नामवंत, सुप्रतिष्ठित प्रतिभासंपन्न साहित्यिक असल्याने, माझ्या प्रस्तावनेची गरज नाही असे गौरवोद्गार काढले आहेत.

त्यांची गीत संपदा :
अभिरामा सुखधामा —- अवमानिता मी झाले—–आनंद मनीं माईना ——कधीं भेटेन वनवासी —– कशी रे तुला भेटू —-कशी ही लाज गडे —– कळीदार कपूरी पान —-कुणी ग बाई चोरुनि ——कोणा कशी कळावी —– गड्या रे प्रपंच हा —- घाई नको बाई अशी —–चांदणे शिंपीत जाशी —–जनलोकां विस्मय हा —–जय जय महाराष्ट्र माझा —- जा घेउनि संदेश —–जाग बन्सिधरा जाग —– झाली पहाट झाली पहाट —– डोळे मोडित गौळण राधा —–तुझ्या मनात कुणितरी लपलं —- त्या चित्तचोरट्याला का —–थांब रे पथिका जरा —-दे मला गे चंद्रिके —- नका मारु खडा—-पोवाडा (१) प्रेम केलें काय हा — माझिया माहेरा जा—-मी जाया धर्ममया —-मी बोलु कुणा प्रभु —–मोहुनिया तुजसंगे नयन —मंद मंद ये समीर —-या लता शिकविती —- ये पिकवूं अपुलं शेत —लागती गे काळजाला तीर —- लेऊ कशी वल्कला —-शांत दांत कांते—- श्याम हे काय असे —हसतेस अशी का मनी — हसलें मनिं चांदणें

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
भीति न आम्हां तुझी मुळीहि गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा


*********************************

३९. दिपाली ठाकूर ?

बहावा

नकळत येती ओठावरती
तुला पाहता शब्द वाहवा,
सोनवर्खिले झुंबर लेउन
दिमाखात हा उभा बहावा ।

लोलक इवले धम्मक पिवळे
दवबिंदूतुन बघ लुकलुकती,
हिरवी पर्णे जणू कोंदणे
साज पाचुचा तया चढवती ॥

कधी दिसे नववधू बावरी
हळद माखली तनु सावरते
झुळुकीसंगे दल थरथरता
डूल कानिचे जणू हालते ।

युवतीच्या कमनीय कटीवर
झोके घेई रम्य मेखला,
की धरणीवर नक्षत्रांचा
गंधर्वांनी झुला बांधला ॥

पीतांबर नेसुनी युगंधर
जणू झळकला या भूलोकी,
पुन्हा एकदा पार्थासाठी
गीताई तो सांगे श्लोकी ।

ज्या ज्या वेळी अवघड होई
ग्रीष्माचा तुज दाह सहाया,
त्या त्या वेळी अवतरेन मी
बहावा रुपे तुज सुखवाया ॥

कवियत्री – दिपाली ठाकूर ? यांच्या पानावर ही कविता मिळाली.

४०. एकच चाल, एकच मुखडा पण दोन कविता

खेड्यामधले घर कौलारू
हे गाणे आपण कायमच ऐकत आलो आहोत. प्रत्यक्षात ही दोन वेगळी गाणी आहेत दोन गीतकारांनी वेगवेगळ्या शब्दात गाणे लिहिले आहे, मात्र संगीतकारांनी एकच चाल लावली तसेच गायिकांनी देखील एकाच चालीमध्ये गायले होते.
**
आठवणींच्या आधी जाते
तिथे मनाचे निळे पाखरू
खेड्यामधले घर कौलारू

हिरवी श्यामल भवती शेती
पाऊलवाटा अंगणी मिळती
लव फुलवंती जुई शेवंती
शेंदरी अंबा सजे मोहरू
खेड्यामधले घर कौलारू

चौकट तीवर बाल गणपती
चौसोपी खण स्वागत करती
झोपाळ्यावर अभंग कातर
सवे लागती कड्या करकरू
खेड्यामधले घर कौलारू

माजघरातील उजेड मिणमिण
वृद्ध काकणे करिती किणकिण
किणकिण ती हळू ये कुरवाळू
दूर देशिचे प्रौढ लेकरू
खेड्यामधले घर कौलारू

गीत : ग दि माडगूळकर
स्वर:आशा भोसले
संगीत :सुधीर फडके
चित्रपट: ऊनपाऊस


आज अचानक एकाएकी
मानस लागे तेथे विहरू
खेड्यामधले घर कौलारू

पूर्व दिशेला नदी वाहते
त्यात बालपण वहात येते
उंबरठ्याशी येउन मिळते
यौवन लागे उगा बावरू
खेड्यामधले घर कौलारू

माहेराची प्रेमळ माती
त्या मातीतुन पिकते प्रिती
कणसावरती माणिकमोती
तिथे भिरभिरे स्मृती पाखरू
खेड्यामधले घर कौलारू

आयुष्याच्या पाउलवाटा
किती तुडविल्या येता जाता
परि आईची अठवण येता
मनी वादळे होती सुरू
खेड्यामधले घर कौलारू

गीत : अनिल भारती (शान्ताराम पाटील )
स्वर : मालती पांडे
संगीत : मधुकर पाठक
गीत प्रकार :भावगीत
— प्रसाद जोग . . . . वॉट्सॅपवरून साभार दि.२९-०५-२०२२ कवी अनिल भारती यांची काही माहिती मिळाली नाही.

*****************************

४१. कृष्णाजी नारायण आठल्ये

कधी कधी हे श्लोक संत रामदास यांच्या नावाने खपवले जातात.

प्रत्येकाने जरूर वाचा….कवितेचे नाव आहे : प्रमाण
कवी आहेत : कृष्णाजी नारायण आठल्ये.. Shared, From Ajit Pimpalkhare..


अतीकोपता कार्य जाते लयाला, अती नम्रता पात्र होते भयाला ।
अती काम ते कोणतेही नसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।
अती लोभ आणी जना नित्य लाज, अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।
सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।।
अती मोह हा दु:ख शोकास मूळ, अती काळजी टाकणे हेही खूळ ।
सदा चित्त हे सद्विचारे कसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।।
अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया, अती खेळणे हा भिकेचाच पाया ।
न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।
अती दान तेही प्रपंचात छिद्र, अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।
बरे कोणते ते मनाला पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।
अती भोजने रोग येतो घराला, उपासे अती कष्ट होती नराला ।
फुका सांग देवावरी का स्र्सावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।।
अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड, अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।
अती मत्सरे त्वां कशाला कुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।
अती आळशी वाचुनी प्रेतस्र्प, अती झोप घे तोही त्याचाच भूप ।
सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।
अती द्रव्यही जोडते पापरास, अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।
धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ९ ।।
अती भाषणे वीटती बुद्धिवंत, अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।
खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।
अती वाद घेता दुरावेल सत्य, अती `होस हो’ बोलणे नीचकृत्य ।
विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।
अती औषधे वाढवितात रोग, उपेक्षा अती आणते सर्व भोग ।
हिताच्या उपायास कां आळसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।
अती दाट वस्तीत नाना उपाधी, अती शून्य रानात औदास्य बाधी ।
लघुग्राम पाहून तेथे वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।
अती शोक तो देतसे दु:खवृद्धी, अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।
ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।
अती भूषणे मार्ग तो संकटाचा, अती थाट तो वेष होतो नटाचा ।
रहावे असे की न कोणी हसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।
स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती, अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।
न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।।१६ ।।
अती भांडणे नाश तो यादवांचा, हठाने अती वंश ना कौरवांचा ।
कराया अती हे न कोणी वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।।
अती गोड खाणे नसे रोज इष्ट, कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।
असोनी गहू व्यर्थ खावे न सावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।
जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी, नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।
खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।।१९ ।।
सदा पद्य घोकोनियां शीण येतो, सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।
कधी ते कधी हेही वाचीत जावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।।

. . . . . वॉट्सॅपवरून साभार दि.२९-०५-२०२२

कृष्णाजी नारायण आठल्ये (३ जानेवारी, इ.स. १८५३:टेंभू, सातारा जिल्हा, महाराष्ट्र – २९ नोव्हेंबर, इ.स. १९२६:पुणे, महाराष्ट्र) हे एक मराठी कवी, टीकाकार, भाषांतरकार, चरित्रकार व संपादक होते. कृष्णाजी आठल्ये यांचे शालेय शिक्षण पाचव्या इयत्तेपर्यंत झाले. त्यांचे वडील एक व्युत्पन्‍न वैदिक पंडित असल्याने त्यांनी कृष्णाजींनी वैदिक वाङ्मयाच्या शास्त्रांचे सखोल ज्ञान दिले.
कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी सातारा जिल्ह्यात पाच वर्षे शिक्षकाची नोकरी केली आणि नंतर चित्रक्ला शिकण्यासाठी ते मुंबईत आले. ते शिक्षण पूर्ण झाल्यावर कृष्णाजी बडोद्याला गेले. तेथे त्यांची भेट बडोद्याचे दिवाण टी. माधवराव यांच्याशी झाली. त्यांच्या आग्रहामुळे ते मद्रासला गेले. माधवरावांचे बंधू कोचीनला रहात म्हणून कृष्णाजींनी कोचीनला त्यांच्याकडे वास्तव्य करायचे ठरवले. तेथेच एका कंपनीत भाषाशिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली.
कोचीनमध्ये कृष्णाजींनी १८८६ साली केरळ-कोकिळ नावाचे मासिक सुरू केले.[१] सामान्य मराठी वाचकांना विविध विषयांची गोडी लावणे हा त्या मासिकाचा उद्देश होता. निष्ठुर व सडेतोड टीका हे ’केरळ-कोकिळ’चे वैशिष्‍ट्य होते. पहिली चार वर्षे कोचीनहून आणि नंतरची एकोणीस वर्षे मुंबईतून हे मासिक प्रकाशित होऊन, शेवटी इ.स. १९०९ मध्ये बंद पडले. मासिकातल्या ’कलमबहादुरांस शेलापागोटे’ नावाच्या सदरातून कृष्णाजी आठल्ये नवशिक्या लेखकांवर परखड टीका करीत. ’लोकोत्तर चमत्कार’ नावाचे सदरही ते लिहीत.
मुंबईला आल्यावर १८८० साली कृष्णाजींनी पुष्पगुच्छ नावाचे मासिक काढले. त्या मासिकातूनही त्यांचे विविध विषयांवरील संकीर्ण लेखन प्रसिद्ध झाले आहे.
कोचीनला भाषा शिक्षकाची नोकरी चालू असतानाच कृष्णाजींनी ’गीतापद्यमुक्ताहार’ नावाचे पुस्तक लिहून आपल्या ग्रंथलेखनाचा प्रारंभ केला. काव्य, नाटके, कादंबऱ्या, तत्त्वज्ञान यांव्यतिरिक्त कृष्णाजींनी आपल्या पुस्तकांतून फोटोग्राफी, मोहिनीविद्या, विज्ञानकथा, नजरबंदी, आरोग्य हेही विषय हाताळले आहेत.
‘केरळ कोकीळ’च्या जून १९०० च्या अंकात कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी केलेल्या ज्यूल्स व्हर्नच्या ‘टू द मून ॲंड बॅक’च्या अनुवादाला सुरुवात झाली. हा अनुवाद १९०६ पर्यंत अधूनमधून प्रसिद्ध होत होता. हा अनुवाद म्हणजे मराठीतली पहिली विज्ञान कथा होय.
कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी सुमारे ४० पुस्तके लिहिली. त्यांतली बरीचशी आधारित किंवा स्वैर अनुवादित आहेत.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून साभार दि.२९-०५-२०२२


४२. कविवर्य वसंत बापट

कवि वसंत बापट यांचे नाव मी शाळेत असतांनापासून ऐकले आहे. मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्याबरोबरच वसंत बापट यांनीही काव्यवाचनाचे कार्यक्रम करून मराठी कवितेला खूप लोकप्रिय केले. पण वसंत बापटांचा कुठलाच उल्लेख मला गेल्या दोन वर्षात पहायला मिळाला नाही आणि त्यांचे ओळखीचे नाव या यादीत इतक्या उशीरा का आले याचेच मला आश्चर्य वाटते. मी शाळेत शिकलेली त्यांची सुप्रसिद्ध कविता आणि एक अप्रसिद्ध कविता खाली देत आहे.

बापट, वसंत : (२५जुलै १९२२- ). सुप्रसिद्ध मराठी कवी. जन्म सातारा जिल्ह्यातील कराडचा. पुण्याच्या स.प. महाविद्यालयातून एम्. ए.(१९४८).त्यानंतर मुंबईतील ‘नॅशनल कॉलेज’ आणि ‘रामनारायण रुईया कॉलेज’ ह्या महाविद्यालयांतून मराठी आणि संस्कृत ह्या विषयांचे प्राध्यापक. १९७४ पासून मुंबई विद्यापीठातील गुरुदेव टागोर अध्यासनाचे प्राध्यापक. साहित्य अकादेमीचे ते सदस्य आहेत.

लहानपणापासून बापटांवर राष्ट्र सेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या सहावासाचे संस्कार झाले. बिजली (१९५२) ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर ह्या संस्कारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. सेतु (१९५७), अकरावी दिशा (१९६२), सकीना (१९७२) आणि मानसी (१९७७) हे त्यांचे बिजलीनंतरचे काव्यसंग्रह. बिजली ते मानसीपर्यंत त्यांच्या कवितेचा झालेला प्रवास कवी म्हणून झालेल्या त्यांच्या विकासाचा द्योतक आहे. बिजलीनंतरच्या काव्यसंग्रहांतून त्यांच्या अनुभवांचे क्षेत्रही उत्तरोत्तर अधिकाधिक विस्तारत गेल्याचे दिसते. संस्कृत आणि इंग्रजी कवितेचा प्रभावही ह्या कवितेवर दिसून येतो. सामाजिक विषमता आणि अन्याय ह्यांच्या तीव्र जाणिवेबरोबरच यौवनाचा अभिजात डौल, निसर्गाच्या विभ्रम-विलासांतून खट्याळ शृंगार व्यक्तविण्याची प्रवृत्ती, लावणीसारख्या जुन्या काव्यप्रकाराचे पुररुज्जीवन करण्याचा रसिक प्रयत्न ह्यांचा प्रत्यय त्यांच्या बिजलीनंतरच्या कवितेत येतो. त्यांच्या कवितेचे परिपक्व रूप मानसीमध्ये विशेषत्वाने जाणवते. ह्या काव्यसंग्रहातील त्यांची कविता मितभाषी परंतु आशयदृष्ट्या अधिक गहन अशी आहे.

जनजागृती करणे हेही कवितेचे एक महत्त्वाचे कार्य आहे, असे बापट मानत असल्यामुळे राष्ट्रीय संकटाच्या, दु:खाच्या वा देशातील विविध जन-आंदोलनांच्या प्रसंगी त्यांनी आपली संवेदनशील प्रतिक्रिया आपल्या कवितेतून व्यक्तविली आहे. ‘उत्तुंग आमुची उत्तरसीमा इंच इंच लढवू’ ही त्यांची गाजलेली कविता किंवा त्यांनी रचिलेला ‘संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा’ ही त्याची काही उल्लेखनीय उदाहरणे हात. ‘गांधींची जीवनयात्रा’ (१९४८), ‘नव्या युगाचे पोवाडे’(भाग १ ते ३), ‘सैन्य चालले पुढे’ (१९६५) ह्या त्यांच्या रचनाही ह्या संदर्भात निर्देशनीय आहेत.

संस्कृतातील अभिजातता आणि नादवती शब्दकळा बंगालीतील-विशेषत: गुरुदेव टागोरांच्या कवितेतील-मानवतावाद आणि इंग्रजी कवितेतील स्वच्छंदतावादी प्रवृत्ती ह्यांचे ठळक संस्कार बापटांच्या कवितेवर झालेले दिसतात. बापटांची अस्सल रसिकता आणि अतींद्रिय अनुभवांना रूपरसगंधाचे लावण्य प्राप्त करून देणारी त्यांची बहुरंगी प्रतिमासृष्टी हेही त्यांच्या कवितेचे विशेष लक्षणीय पैलू होत.

बारा गावचे पाणी (१९६७) हा बापटांचा प्रवासवर्णनपर ग्रंथ. बापटांच्या रसिक मनाने भारताचा निसर्ग, चालीरीती, लोककला, वैज्ञानिक प्रगतीच्या दिशेने होत असलेली त्याची वाटचाल ह्यांचे जे दर्शन घेतले, त्याचे प्रत्ययकारी चित्रण ह्या ग्रंथात त्यांनी केले आहे.

सेतु ह्या काव्यसंग्रहास व लहान मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या बालगोविंद (१९६५) ह्या नाटकास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला. तौलनिक साहित्याभ्यास (१९८१) हा त्यांचा अगदी अलीकडील ग्रंथ.

संगीत, अभिनय, लोककला, ह्यांची उत्तम जाण बापटांच्या ठायी आहे. राष्ट्रसेवा दलातर्फे त्यांनी सादर केलेल्या ‘महाराष्ट्र दर्शन’, ‘भारत दर्शन’ ह्यांसारख्या यशस्वी कार्यक्रमांतून तिचा प्रत्यय येतो.

घाग, एकनाथ.
मराठी विश्वकोशावरून साभार . . दि.०२-०६-२०२२

१. शतकानंतर आज पाहिली
पहिली रम्य पहाट
मेघ वितळले गगन निवळले
क्षितिजावर नव रंग उसळले
प्रतिबिंबित ते होउनि उठले ..
भारतभूमिललाट
फकिरांनी शत यज्ञ मांडिले
वेदिवरती रक्त सांडले
त्या रक्ताची क्षितिजावर ये….
अरूण मंगल लाट
दीप पेटवुनि घरदारांचे
पूजन केले स्वातंत्र्याचे
त्या ज्योतींचे तेज मिसळुनी…
झाले आज विराट
पुरेत अश्रु, दुबळे क्रंदन
भावपुर्ण करू विनम्र वंदन
नव अरूणाचे होऊ आम्ही…
प्रतिभाशाली भाट

  • कवि वसंत बापट

२. दख्खन राणीच्या बसून कुशीत——-शेकडो पिले ही चालली खुशीत
सुंदर मानव तुंदिल अंगाचे———-गालिचे गुलाब शराबी रंगाचे
ठेविल्या बाहुल्या बांधून बासनी——–गोजिरवाणी लाजिरवाणी
पोरटी घेऊन पोटाशी कुशीत——… दख्खन रानी ही चालली खुशीत
निसर्ग नटला बाहेर थाटात——पर्वत गर्वात ठाकले थाटात
चालले गिरीश मस्तकांवरून—–आकाशगंगांचे नर्तन गायन
झेलून त्यांचे नुपूर घुंगुर——-डोलती डौलात दुर्वांचे अंकुर
मोत्यांची जाळी घालून भली—–रानाची चवेणी जाहली प्रफुल्ल
… दख्खन राणीला नव्हती दखल
ड्यूकचे नाकड सरळ अजस्त्र——-राहिले उभे हे शतके सहस्त्र
त्याच्याही पाषाण हृदया कळाली—–सृष्टीची शोभा ही वृष्टीत वेगळी
नीला तो तलाव तांबूस खाडी ती—–पांढरा प्रपात हिरवी झाडी ती
डोंगरकडे _
अवतीभवती इंद्राची धनुष्ये
… दख्खन राणीत मुर्दाड मनुष्ये
दख्खन राणीच्या कुशीत पोटात—-बुडाली जाणीव चहाच्या घोटात
किलवर चौकट इसपिक बदाम—–फेकीत फेकीत जिंकित छदाम
नीरस पोकळ वादांचे मृदंग—–वाजती उगाच खमंग सवंग
खोलून चंची पोपटपंची———करीत बसले बुद्धीचे सागर
… दख्खन रानी ही ओलांडे डोंगर
धावत्या बाजारी एकच बालक——गवाक्षी घालून बसले मस्तक
म्हणाले “आई गं, धबधबा केवढा—–पहा ना चवेणी, पहा हा केवडा
ढगांच्या वाफेच्या धूसर फेसात—–डोंगर नहाती पहाना टेसात”
म्हणाली आई “पूरे गं बाई,——काय या बेबीची चालली कटकट”
… दख्खन राणीचा चालला फुंफाट
दख्खन राणीच्या पोटात कुशीत—–शेकडो पिले ही चालली खुशीत
मनाने खुरटी दिसाया मोठाली—–विसाव्या तिसाव्या वर्षी ही आंधळी
बाहेर असू दे उन वा चांदणे—–संततधार वा धुक्चे वेढणे
ऐल ते पैल शंभर मैल———एकच बोगदा मुंबई पुण्यात
… दख्खन राणी ही चालली वेगात

… कवि वसंत बापट

जा सांग लक्ष्मणा

जा सांग लक्ष्मणा, सांग रामराजाला
“समजला” म्हणावे, “न्याय तुझा सीतेला

अग्‍नीत घेतली उडी उजळली कुडी
पटविले तेव्हा, होतास तिथे तू देवा
केलास न्याय परि उलटा, ठरले कुलटा
केलीस सफळ मम सेवा
शोभले तुझ्या वंशास, दिगंत यशास चढेल तजेला”

जा सांग “जानकी अजुनी राहि जिवंत
जो रघुवंशाचा अंश तिच्या उदरात
तोवरी प्राण कोंडील देहकोषात
राणीची भिकारीण आज होय, रघुराज तिला सांभाळा”

गीत :वसंत बापट
संगीत : जी. एन्‌. जोशी
स्वर : गीता दत्त

. . . नवी भर दि.१२-०४-२०२३

“मधुबाला”

मदीरा साकीसंगे जेथे
एकच होतो मधु प्याला
ती स्वर्गाहुन सुखकर म्हणती
कुणी बच्चंजी मधुशाला
नकोत असल्या व्यर्थ जल्पना
सर्व असंभव काव्यकल्पना
तुम्हास तुमची मधुशाला
अम्हास प्यारी मधुबाला

नार अनारकलीसम नाजुक
पडदा दुर जरा झाला
महाल स्वप्नांचा झगमगता
लखलखली चंद्रज्वाला
डोळे दिपता चोरी झाली
दिलदारांची ह्रदये गेली
कठोर काळा दाद न देता
फरार झाली मधुबाला

कुठे हरपली शोधीत बसला
जगात जो तो दिलवाला
स्वप्नामध्ये खळी चाचपुन
स्पर्शुन पाही कुणी गाला
अजुन तिला मन शोधीत राही
धुंडुन झाल्या दाही दिशाही
रजतपटावर कितीक झाल्या
मधुबाला ती मधुबाला.
🙏🏼

. . . . .

४३. वीर वामनराव जोशी

परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला ।
लोकप्रिय नाट्यगीत लिहीणारे वीर वामनराव जोशी पुण्यस्मरण
शिक्षण अर्धवट सोडून ज्यांनी देशसेवेचा विडा उचलला व स्वदेशी आणि बहिष्काराची शपथ घेतली त्या विदर्भवीर थोर देशभक्त, झुंजार पुढारी, कुशल संघटक, महाराष्ट्राचे नामांकित वक्ते, नामवंत नाटककार “वीर वामनराव’’ जोशी यांचे आज पुण्यस्मरण . वामनरावांच्या पंधराव्या वर्षी त्यांचे वडील वारले आणि पुढील आयुष्यात त्यांना विविध संकटांशी झगडावे लागले. तरीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आकर्षक अशी बहुविधता होती. म्हणूनच नाना क्षेत्रातील नाना प्रकारचे लोक त्यांच्या भोवती असायचे. राजकारणाच्या रणधुमाळीत ते अहर्निश उभे होते. त्यामुळे ललित लेखनासाठी फारशी फुरसत त्यांना मिळत नव्हती. तरीही वृत्तपत्रलेखन आणि नाट्यलेखन या दोन्हीमध्ये त्यांचा नावलौकिक मोठा होता. यामध्ये पैसा तो कितीसा मिळणार? पण स्वत:च्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही हाती आलेला पैसा ते गरजूंना देत असत. १९१२ साली त्यांनी केशवराव भोसलेंच्या ललितकलादर्शसाठी ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ हे नाटक लिहिले. त्या नाटकाने काही काळ मराठी रंगभूमी दणाणून सोडली. ‘मी नवबाल जोगीण बनले’ हे त्यातील गाणे फार लोकप्रिय झाले होते. त्यानंतर १२ वर्षांनी १९२५ साली त्यांनी ‘रणदुंदुभी’ हे नाटक लिहिले. मास्टर दीनानाथांच्या बलवंत संगीत नाटक मंडळीने ते रंगभूमीवर आणले. हे नाटक खूपच गाजले. या नाटकातील ‘परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला’ हे गाणे तर १९३०च्या चळवळीने खेड्यापाड्यांपर्यंत पोचविले होते. वीररसप्रधानता हे वामनरावांच्या नाटकाचे वैशिष्ट्य आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रासादीक पदरचना. वीर वामनरावांच्या त्यागी वृत्तीची आठवण म्हणजे ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ या नाटकाने ललितकलादर्शला अपेक्षेबाहेर मिळवून दिलेल्या यशाची जाणीव ठेवून केशवराव भोसल्यांनी वामनरावांकडे ४०० रु. अधिक पाठविले. पण दारिद्य्रातही कर्णाचा दिलदारपणा बाळगणार्‍या वामनरावांनी त्यातील काही रुपये केशवरावांना परत केले तर काही पुण्याच्या अनाथ बालिकाश्रमाला दिले. ‘रणदुंदुभी’ नाटकाचे कानडीमध्ये रूपांतर केलेल्या दाक्षिणात्य नाटककंपनीने कृतज्ञतेने १००० रु.चा चेक पाठविला तोही गोव्याच्या राष्ट्रीय शाळेच्या मदतीसाठी त्याच दिवशी दिला. इतकेच काय पण केंद्र सरकारने कृतज्ञतेने देऊ केलेली चार हजार रुपयांची देणगीही त्यांनी स्वीकारली नाही. रणदुंदुभीनंतर ‘धर्मसिंहासन’, ‘शीलसंन्यास’ आणि ‘झोटिंग पातशाही’ अशी तीन नाटके ही लिहीली.
लेखन शुभदा दादरकर (कै. विद्याधर गोखले यांच्या कन्या ) यांचा लेख


परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला ।
सजिवपणी घडती सारे । मरण-भोग त्याला ॥
असुनि खास मालक घरचा । म्हणति चोर त्याला ॥
सौख्य-भोग इतरा सारे । कष्ट मात्र त्याला ॥
मातृभूमि त्याची त्याला । होत बंदिशाला ॥

४४.दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त

·
रवि गेला रे सोडुनि आकाशाला – — धन जैसें दुर्भाग्याला.
बा नीज गडे नीज गडे लडिवाळा!!!!
अशी सुंदर कविता करणारे
दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त’ यांची आज जयंती (जन्म २७ जून १८७५)
त्यांचे शालेय शिक्षण अहमदनगर येथील मिशन हायस्कूलमध्ये झाले, महाविद्यालयीन शिक्षण विल्सन कॉलेज, मुंबई आणि ख्रिश्चन कॉलेज, इंदूर येथे झाले. कलकत्ता विद्यापीठातून बी. ए. ही पदवी मिळाल्यावर पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीला लागले. कवी दत्त यांच्या बहुसंख्य कविता इ.स. १८९७ व इ.स. १८९८ या काळातील आहेत. त्या काव्यरत्नावली, मनोरंजन, सुविचार समागम, बालबोध मेवा, करमणूक इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. एकूण एक्कावन्न कविता आज उपलब्ध आहेत. त्यांपैकी ४८ कवितांचा संग्रह त्याचे शिक्षणतज्ज्ञ चिरंजीव कवी वि.द. घाटे यांनी इ.स. १९२२ साली दत्तांची कविता या नावाने प्रसिद्ध केला. ’नवे पान’ या डॉ. मा.गो. देशमुख संपादित संग्रहात मात्र त्यांच्या सर्व कविता आहेत.
१३ मार्च, इ.स. १८९९ रोजी बडोद्यात, म्हणजे वयाच्या २४व्या वर्षी त्यांचे प्लेगने निधन झाले. त्यांनी वयाच्या २३व्या वर्षी लिहिलेली ही कविता :-
जन्मापासून पाहिली वरवरी तेवीस पानें पुरीं
कोणा माहित आणखी कितितरी पाहिन या भूवरीं
दत्तात्रेय कोंडो घाटे यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव विठ्ठल दत्तात्रेय घाटे, नात डॉ. अनुराधा पोतदार, पणतू डॉ. प्रियदर्शन पोतदार आणि आणि पणती यशोधरा पोतदार-साठे हे सर्वच कवी झाले. डॉ. अनुराधा पोतदार यांचे दत्त कवींचे चरित्र लिहिले आहे.

त्यांच्या सुप्रसिद्ध कविता
बा नीज गडे नीज गडे लडिवाळा
बोलत कां नाहीं झालें काय तुला बाई
प्रात:काली कुणी कोकिळा तरु-शिखरीं बैसुनी । उंच स्वराने सांगुं लागली जगतालागोनी;
प्रभात झाला रवी उदेला ऊठ उशिर झाला
या बाई या, बघा बघा कशि माझि बसलि बया
अमर्याद हा व्योमसिंधू गभीर । मधें चालली घार ही नाव धीर
मोत्या शीक रे अ आ ई! सांगुं कितितरी बाई !


४५. वा गो मायदेव ऊर्फ कवी वनमाळी

स्मरणाआडचे कवी
गाइ घरा आल्या । घणघण घंटानाद ……. कुणीकडे घालू साद । गोविंदा रे ।। १ ।। अशी सुंदर काव्य रचना करणारे कविवर्य वासुदेव गोविंद ऊर्फ वा.गो.मायदेव यांची आज जयंती. (जन्म २६ जुलै १८९४ निधन ३० मार्च १९६९) गंभीर विचारवृत्तीच्या; तसेच बालांसाठीच्या विपुल कविता मायदेव यांनी लिहिल्या. त्या काळी लहान मुलांमध्ये मायदेव यांच्या बालकविता विशेष आवडीच्या असत.
कवी वनमाळी या टोपणनावानेही ते साहित्यक्षेत्रात परिचित होते.
‘काव्यमकरंद’, ‘भावतरंग’, ‘भावनिर्झर’, ‘सुधा’, ‘भावविहार’ हे त्यांचे काव्यसंग्रह; तर ‘बालविहार’, ‘किलबिल’, ‘शिशुगीत’, ‘क्रीडागीत’ हे बालगीतसंग्रह प्रसिद्ध आहेत. सकाळी चरायला गेलेल्या गाई संध्याकाळी घरी आल्या तरी गाई राखायला गेलेला ‘वनमाळी’ मात्र काही घरी आलेला नसतो. कातरवेळ उलटते, रात्रही होते, तरी वनमाळी न आल्यामुळे आईच्या जिवाची जी उलघाल होते, तिचे वर्णन मायदेव यांनी या कवितेत अतिशय साध्या-सोप्या शब्दांत केले आहे. ही कविता हीच मायदेव यांची ओळख होती. १९२९ साली त्यांनी ती लिहिली. १९१५ ते १९२९ या कालखंडात त्यांच्या हातून ज्या कविता लिहून झाल्या, त्या सर्व कविता ‘भावतरंग’ या संग्रहात वाचायला मिळतात. ‘गाइ घरा आल्या’ ही कविता याच संग्रहात आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भा. रा. तांबे यांच्या कवितांचेही संपादन मायदेव यांनी केले होते.
आयु्ष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांना पुण्याहून मुंबईला स्थलांतर करावे लागले. गिरगावातील चाळीत एका छोट्याशा खोलीत ते राहत, खानावळीत जेवत व महिन्याचा खर्च ४०-५० रुपयांत भागवत असत ! अशा विपन्नावस्थेतच ३० मार्च १९६९ रोजी त्यांची अखेर झाली.
अभिवादन–मायदेव यांचा फोटो कोणाकडे असल्यास पाठवावा
गाइ घरा आल्या । घणघण घंटानाद
कुणीकडे घालू साद । गोविंदा रे? ।। १ ।।
गाइ घरा आल्या । धूळ झाली चहूंकडे
घनश्याम कोणीकडे । माझा गेला? ।। २।।
गाइ घरा आल्या । वासरे हंबरती ।।
कुणीकडे बालमूर्ती । कृष्ण माझा? ।।३।।
गाइ घरा आल्या । ब्रह्मानंद वासरांना
काय करू माझा कान्हा । चुकला का? ।।४।।
गाइ घरा आल्या । घोटाळती पाडसांशी
हाय! नाही हृषीकेशी । माझ्यापाशी ।।५।।
गाइ घरा आल्या । पाडसास हुंगीतात
माझा मात्र यदुनाथ । दुरावला! ।।६।।
गाइ घरा आल्या । आंवरेना मुळी पान्हा
राहणार भुका तान्हा । वासुदेव ।।७।।
गाइ घरा आल्या । दूध वाहे झुरूझुरू
माझ्या जीवा हुरूहूरू । मुकुंदाची ।।८।।
गाइ घरा आल्या । दूधवाट राहियेली
कुणी माझा वनमाळी । गुंतवीला ।।९।।
गाइ घरा आल्या । झाली बाई कातरवेळ
आजुनी का घननीळ । ये ना घरा? ।।१०।।
गाइ घरा आल्या । लावियेली सांजवात
बाळा दामोदरा रात । झाली न का? ।।११।।
गाइ घरा आल्या । पाल चूकचूक करी ।
राख अंबे माझा हरी । असे तेथे ।।१२।।

. . . श्री.माधव विद्वांस . . फेसबुकवरून साभार दि.२६-०७-२०२२

४६. जगदीश खेबुडकर

मराठी चित्रपटगीतकारांमध्ये गदिमांच्या पाठोपाठ जगदीश खेबुडकरांचेच नाव घेतले जाते. खरे म्हणजे त्यांची कविता यापूर्वीच यायला हवी होती. त्यांनी लिहिलेल्या असंख्य गीतांपैकी एक आज देत आहे. यात हळूहळू भर पडत जाईल.

🌹🪔🔆🌸🛕🌸🔆🪔🌹

दिवा पाहुनी लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना
शुभंकरोती म्हणा मुलांनो, शुभंकरोती म्हणा
शुभंकरोती कल्याणम्‌, शुभंकरोती कल्याणम्‌ ॥धृ.॥

जेथे ज्योती तेथे लक्ष्मी, उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशांदिशांतुन या लक्ष्मीच्या, दिसती पाउलखुणा ॥१॥

या ज्योतीने सरे आपदा, आरोग्यासह मिळे संपदा
शत्रुबुद्धिचा विनाश होता, सौख्य मिळे जीवना ॥२॥

दिव्या-दिव्या रे दिपत्कार, कानी कुंडल मोतीहार
दिव्यास पाहुन नमस्कार हा, रिवाज आहे जुना ॥३॥

🌷🪔🌸🎶🙏🎶🌸🪔🌷

गीत : जगदीश खेबुडकर ✍
संगीत : प्रभाकर जोग
स्वर : लता मंगेशकर
चित्रपट : थांब लक्ष्मी कुंकू लाविते (१९६७)

🌷🪔🌸🎶🙏🎶🌸🪔🌷🌷🪔🌸🎶🙏🎶🌸🪔🌷

४७. शास्त्रज्ञांनी केलेल्या कविता

मला अणुशक्तीखात्यात काम करतांना माझ्या अनेक शास्त्रज्ञांशी ओळखी झाल्या. दिवसभर विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गढून गेलेल्या या शास्त्रज्ञांनी केलेल्या काही कविता इथे संग्रहित केल्या आहेत.

१. श्री.भालचंद्र भावे

अग्निपंख आदरांजली
श्रीरामाने दिधला आम्हां , विज्ञानाचा दूत
रामेश्वरक्षेत्रात जन्मला, कलाम नामे ज्ञात
शिकला सहजी विमानविद्या, पारंगत तो झाला
स्वस्थ न बसता पुढे जाउनी, इंधनविद्या शिकला
अग्निबाण हा हेतू धरुनी, संशोधन जे केले
त्यात यशस्वी होउनि देशा, अग्निपंख ते दिधले
अवकाशाच्या विज्ञानातही, दावे विशेष प्रगती
पृथ्वीभवती उपग्रहांची, करोनिया निर्मिती
पुढचे पाउल त्याचे ठरले, संरक्षणविज्ञान
सहयोग्याना दिशा दावुनी, करि देशा बलवान
राष्ट्राने या कृतज्ञ राहुनि, केले राष्ट्रपती
कार्यमग्न तेथेहि असुनी, सर्वप्रिय हा शुध्दमती
देशविदेशी झाली कीर्ती, त्याच्यासंगे राष्ट्राची
तरिही राही निरहंकारी, निर्लोभी ख्याती याची
सहकाऱ्यांना बंधु मानुनी, धावुन जाई मदतीला
बालकातही बाल होउनी, परमानंद मिळे त्याला
धर्माच्याही परे जाउनी, सर्वधर्मप्रिय हा झाला
भारतीयता अंगिकारुनी, धर्मात्मा तोची ठरला
देइल स्फुर्ति चिरंतन आम्हा, जरी नसे हा जगती
अवकाशी तो दिसेल सर्वा, कायम पृथ्वीभवती
नभांगणातच दिसेल तारा, अब्दुल नाम कलाम
विनम्र भावे हात जोडुनी, करुया त्यासि प्रणाम
– भालचन्द्र भावे

२. डॉ. शरद काळे

कृष्णकमळ
जास्वंदी
विज्ञानदीप उजळती

३. श्री.नरेंद्र गोळे

संस्कृत श्लोक आणि हिंदी चित्रपटगीतांची त्याच वृत्तांमध्ये, त्याच चालींवर मराठी रूपांतर करणे यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी केलेली संस्कृत सुभाषितांची अनेक समश्लोकी भाषांतरे मी संस्कृत सुभाषितांच्या पानेंवर दिली आहेत. त्यांनी काही स्वतंत्र रचनाही केल्या आहेत. त्यांनी लिहिलेले मेरी क्यूरी स्तोत्र या पानावर आहे. https://anandghare.wordpress.com/2020/11/07/%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0/

४८. नारायण सुर्वे

कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कविता प्रत्येकाने वाचल्याचं पाहिजेत. प्रतिभा हि जन्माबरोबरच त्या व्यक्तीला मिळते आणि अनुभवातून समृध्द होते.
कविवर्य नारायण सुर्वे यांचा आज स्मृतीदिन .(जन्म १५ ऑक्टोबर १९२६?–निधन १६ ऑगस्ट २०१०)

जन्म झाल्यावर जन्मदात्रीने त्यावेळी नवजात अर्भक असलेल्या आपल्या पोटच्या गोळ्यास सोडून दिले व तेच बालक म्हणजे नारायण सुर्वे.
गिरणी कामगार गंगाराम सुर्वे ह्यांनी त्यांच्या जन्मापासून त्यांचा सांभाळ केला म्हणून नारायण गंगाराम सुर्वे असे नाव त्यांनी लावले. सुर्वे ह्यांचे बालपण अत्यंत प्रतिकूल अवस्थेत गेले.
हॉटेलमध्ये पोऱ्या, कापड गिरणीत बिगारी, अक्षरओळख झाल्यानंतर प्राथमिक शाळेत शिपाई अशा नोकऱ्या त्यांनी केल्या. गुजराण करण्यासाठी नारायण छोटेमोठे व्यवसाय करत असे. या काळात स्वतःच्या हिकमतीने तो लिहिण्या-वाचण्यास शिकला. इ.स. १९६२ साली त्यांनी लिहिलेल्या कवितांचा पहिला संग्रह – “”ऐसा गा मी ब्रह्म”” – प्रकाशित झाला.इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण ते घेऊ शकले. पुढे प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून त्यांना नोकरी मिळाली. त्यांचे वाचन चौफेर आणि चौकस होते. हिंदी आणि उर्दू ह्या भाषा त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत करुन घेतल्या होत्या. कृष्णा साळुंके यांच्याशी १९४८ मध्ये त्यांनी विवाह केला.

विपन्नावस्था आणि दारिद्र्याचे चटके ह्यांमुळे सखोल अनुभवसंपन्न असे लेखन त्यांच्याकडून सहजस्फूर्तीने घडले. ऐसा गा मी ब्रह्‌म (१९६२) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर माझे विद्यापीठ (१९६६), जाहीरनामा (१९७५) आणि नव्या माणसाचे आगमन (१९९५) हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. सनद (१९८२) आणि निवडक नारायण सुर्वे (१९९४) ह्या त्यांच्या निवडक कवितांचे संपादित संग्रह. उर्दू साहित्यिक ⇨ कृष्ण चंदर ह्यांच्या उर्दू कथांचा सुर्वे ह्यांनी केलेला अनुवाद तीन गुंड आणि सात कथा (१९६६) ह्या नावाने प्रसिद्ध झाला. दादर पुलाकडील मुले (१९७५) ही त्यांची अनुवादित कादंबरी. त्यांच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद ऑन द पेव्ह्‌मेंट्‌स ऑफ लाइफ (१९७३) ह्या शीर्षकाने प्रसिद्ध झाला आहे.(मराठी विश्वकोष )
नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई सुर्वे यांनी नारायण सुर्व्यांच्या आठवणी ’मास्तरांची सावली’ या आत्मकथनात्मक पुस्तकात लिहिल्या आहेत.

नारायण सुर्वे यांची कविता


ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती,
दुकानांचे आडोसे होते; मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती.
अशा देण्यात आलेल्या उठवळ आयुष्याची उठबस करता करता..
टोपलाखाली माझ्यासह जग झाकीत दररोज अंधार येत जात होता.
मोजलेत सर्व खांब ह्या रस्त्यांचे, वाचली पाठ्यांवरची बाराखडी
व्यवहाराच्या वजाबाकीत पाहिलेतच हातचे राखून कित्येक मारलेले गडी.
हे जातीजातींचे बाटलेले वाडे, वस्त्या, दारावरचे तांबडे नंबरी दिवे
सायंकाळी मध्यभागी असलेल्या चिडियाघराभोवती घोटाळणारे गोंगाटांचे थवे.
अशा तांबलेल्या, भाकरीसाठी करपलेल्या, उदास वांदेवाडीच्या वस्तीत
टांगे येत होते, घोडे लोळण घेत होते, उभा होतो नालीचा खोका सांभाळीत.
”ले, पकड रस्सी- हां- खेच, डरता है? क्‍या बम्मनका बेटा है रे तू साले
मजदूर है अपन; पकड घोडे कोच हांच यह, वाह रे मेरे छोटे नालवाले.”
याकुब नालबंदवाला हसे, गडगडे. पत्रीवाला घोडा धूळ झटकीत उभा होई
”अपनेको कालाकांडी, तेरेको जलेबी खा.टट म्हणत दुसरा अश्‍व लोळवला जाई.
याकुब मेला दंग्यात, नव्हते नाते; तरीही माझ्या डोळ्याचे पाणी खळले नाही
उचलले प्रेत तेव्हा, टमिलाद- कलमाटच्या गजरात मिसळल्याशिवाय राहिलो नाही.
त्याच दिवशी मनाच्या एका कोऱ्या पानावर लिहिले, टटहे नारायणा
अशा नंग्यांच्या दुनियेत चालायची वाट; लक्षात ठेव सगळ्या खाणाखुणा.”
भेटला हरेक रंगात माणूस, पिता, मित्र, कधी नागवणारा होऊन
रटरटत्या उन्हाच्या डांबरी तव्यावर घेतलेत, पायाचे तळवे होरपळून.
करी का होण जाणे! माणसाइतका समर्थ सृजनात्मा मला भेटलांच नाही
आयुष्य पोथीची उलटली सदतीस पाने; वाटते अजून काही पाहिलेच नाही.
नाही सापडला खरा माणूस , मीही तरी मला अजून कुठे पुरता सापडलो?
सदतीस जिने चढून उतरताना, मीही नाही का कैकदा गोंधळून झापडलो?
आयुष्य दिसायलां पुस्तकाच्या कव्हरासारखे गोंडस, गुटगुटीत बाळसेदार.
आत: खाटकाने हारीने मांडवीत सोललेली धडे, असे ओळीवर टांगलेले उच्चार
जीवनाचा अर्थ दरेक सांगीत मिटवीत जातो स्वत:ला स्वत:च्याच कोशात
पेन्शनरासारखा स्मृती उजाळीत उगीचच हिंडतो कधी वाळूत कधी रामबागेत
हे सगळे पाहून आजही वाटते, ”हे नारायणा, आपण कसे हेलकावतच राहिलो.’
चुकचुकतो कधी जीव; वाटते, ह्या युगाच्या हातून नाहकच मारलो गेलो.
थोडासा रैक्ताला हुकुम करायचा होता, का आवरला म्यानावरचा हात,
का नाही घेतले झोकवून स्वत:ला, जसे झोकतो फायरमन फावडे इंजिनात.
विचार करतो गतगोष्टींचा, काजळी कुरतडीत जणू जळत राहावा दिवा एक
उद्‌ध्वस्त नगरात काहीसे हरवलेले शोधीत हिंडावा परतलेला सैनिक.
किती वाचलेत चेहरे, किती अक्षरांचा अर्थ उतरलां मनात
इथे सत्य एक अनुभव, बाकी हजार ग्रंथराज कोलमडून कोसळतात.
खूप सोयरीक करतो आता ग्रंथांची, वाटते तेही आपणासारखेच बाटगे निघाले
हवे होते थोडे परिचारिकेसम, कांगारासन निर्मितिक्षम. पण दुबळेच निघाले.
जगताना फक्त थोड्याशाच शब्दांवर निभावते; मरताना तेही बापडे दडतील
स्ट्रेचर धरून पोशाखी शब्द रुख्या मनाने आमची तिरडी उचलतील.
वाढले म्हणतात पृथ्वीचे वय, संस्कृतीचेही; परत वयेच वाढत गेली सर्वांची
छान झाले; आम्हीही वाढतो आहोत नकाशावर. गफलत खपवीत जुळाऱ्यांची.
ह्या कथाः कढ आलेल्या भाताने अलगत झाकण उचलावे तसा उचलतात
रात्रभर उबळणाऱ्या अस्थम्यासारख्या अख्खा जीव हल्लक करून सोडतात.
कळले नाहीः तेंव्हा याकूब का मेला? का मणामणाच्या खोड्यात आफ्रीकन कोंडला?
का चंद्राच्या पुढ्यातला एकुलता पोर युद्धाच्या गिधाडाने अल्लद उचलला?
चंद्रा नायकीण; शेजारीण? केसांत कापसाचे पुंजके माळून घराकडे परतणारी
पंखे काढलेल्या केसांवरून कापसाखळीची सोनसरी झुलपावरून झुलणारी
अनपढ. रोजचं विकत घेई पेपर? रोजचं कंदिलाच्या उजेडात वाचायची सक्ती होई
”खडे आसा रे माझो झील, ह्या मेरेर का त्या रे,” भक्तिभावाने विचारीत जाई.
कितीतरी नकाशांचे कपटे कापून ठेवले होते तिने, जगाचा भूगोल होता जवळ
भिरभिरायची स्टेशनांच्या फलाटावरून, बराकीवरून, मलाच कुशीत ओढी जवळ.
मेली ती; अश्रूंचे दगड झालेत. चटके शांतवून कोडगे झाले आहे मन
बसतो त्यांच्या पायरीवर जाऊन, जसे ऊन. उठताना उठवत नाहीत नाती तोडून.
निळ्या छताखाली नांगरून ठेवल्या होत्या साह्येबांच्या बोटी
दुखत होत्या खलाशांच्या माल चढवून उतरून पाठी.
वरून शिव्यांच्या कचकोल उडे, ”सुव्वर, इंडियन, काले कुत्ते.टट
हसताहसता रुंद होत गोऱ्या मडमांच्या तोंडाचे खलबत्ते
आफ्रिकी चाचा चिडे, थुंके, म्हणे, ”काम नही करेगा.
चिलमीवर काडी पेटवीत मी विचारी, ”चाचा, पेट कैसा भरेगा?”
धुसफुसे तो, पोटऱ्या ताठ होत, भराभरा भरी रेलच्या वाघिणी
एक दिवस काय झाले; त्याच्या डोळ्यांत पेटले विद्रोहाचे पाणी
टरकावले घामेजले खमीस, त्याचा क्रेनवर बावटा फडफडला
अडकवून तिथेच ध्येय माझा गुरू पहिले वाक्‍य बोलला,
”हमारा खून झिंदाबाद!” वाटले, चाचाने उलथलाच पृथ्वीगोल
खळाळल्या नसानसांत लाटा, कानांनी झेलले उत्थानाचे बोल
अडकवून साखळदंडात सिंह सोजिरांनी बोटीवर चढवला
”बेटा!” गदगदला कंठ. एक अश्रू खमीसावर तुटून पडला.
कुठे असेल माझा गुरू, कोणत्या खंदकात, का? बंडवाला बंदीशाळेत
अजून आठवतो आफ्रिकन चाचाचा पाठीवरून फिरलेला हात
आता आलोच आहे जगात, वावरतो आहे ह्या उघड्यानागड्या वास्तवात
जगायलाच हवे, आपलेसे करायलाच हवे, कधी दोन घेत, कधी दोन देत.

४९. कवयित्री पद्मा गोळे

चाफ्याच्या झाडा का बरे आलास आज स्वप्नात
कवयित्री, लेखिका, नाटककार पद्मा गोळे यांचे आज पुण्यस्मरण (जुलै १०, इ.स. १९१३; तासगाव – फेब्रुवारी १२, इ.स. १९९८)
पद्मा गोळ्यांचा जन्म १० जुलै, इ.स. १९१३ रोजी तासगाव येथील पटवर्धन राजघराण्यात जन्म झाला. पुण्याच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयातून एम.ए. पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत त्यांचे शिक्षण झाले.
त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रीतिपथावर हा इ.स. १९४७ साली प्रकाशित झाला. कवितासंग्रहांशिवाय त्यांनी रायगडावरील एक रात्र, स्वप्न (इ.स. १९५५), नवी जाणीव या नाटिकाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेली वाळवंटातील वाट नावाची कादंबरीही प्रकाशित झाली.
पद्मा गोळे यांचे निहार (१९५४), स्वप्नजा (१९६२), आकाशवेडी (१९६८), श्रावणमेघ (१९८८) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘माझ्या पाठच्या बहिणी’, ‘आईपणाची भीती’, ‘चाफ्याच्या झाडा’, ‘मी माणूस’, ‘लक्ष्मणरेषा’ इ. कविता लक्षणीय आहेत. स्त्रीचं भावविश्व त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी असून बदलत्या सांस्कृतिक, सामाजिक, वातावरणात होणारी स्त्री मनाची कासाविशी, त्यांचे ताणतणाव त्या कवितेतून व्यक्त करतात. त्यामुळे निसर्गसौंदर्याबरोबरच अपार्थ‌िव तत्त्वांचं आकर्षण, जीवनाबरोबर येत असलेलं भावगांभीर्य यांनी त्यांची कविता प्रगल्भ होत गेली. त्यांनी काव्यलेखनाबरोबर मुलांसाठी लेख, ‘नवी जाणीव’, ‘रायगडावरील एक रात्र’, ‘स्वप्न’ या नाटिका, ‘वाळवंटातील वाट’ ही कादंबरी, तसंच अनेक वैचारिक लेख लिहून मराठी साहित्यात आपलं स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ केलं आहे. त्यांच्या ‘निहार’ व ‘स्वप्नजा’ या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले असून महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांनी त्यांचा सत्कारही केला. साहित्याप्रमाणेच त्यांचं सामाजिक कार्यही उल्लेखनीय आहे. गोवामुक्ती आंदोलनातील शुश्रुषा पथकात त्या सहभागी झाल्या होत्या. (विकिपीडिया व महाराष्ट्र टाइम्स )


चाफ्याच्या झाडा ….
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु:ख नाही उरलं आता मनात
फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात
चाफ्याच्या झाडा ….
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू
तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसे काही घोड्यावर
तुझ्याच फांद्यांवर बसून
आभाळात हिंडलोय ना
चाफ्याच्या झाडा …. चाफ्याच्या झाडा ….
पानात, मनात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय …. कळतंय ना ….
चाफ्याच्या झाडा…. चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना
– पद्मा गोळे.

५०. गजलकार आप्पा ठाकूर

मला यांची काहीच माहिती मिळाली नाही, पण त्यांनी सादर केलेली गजल आवडली म्हणून खाली देत आहे.

आयुष्याशी अजून माझा
करार बाकी आहे
मावळतांना लखलखण्याचा
विचार बाकी आहे…

आयुष्याची सकाळ माझ्या
खरेच सुंदर गेली
संध्येची मज फिकीर नाही
दुपार बाकी आहे…

आधाराने कसेबसे मज
जगावयाचे नाही
जगण्यासाठी मनांत ऊर्जा
चिकार बाकी आहे…

स्वार्थासाठी उगाच खोटा
सलाम केला नाही
फाटत आलो जरी भरजरी
किनार बाकी आहे…

सर्व स्तरांवर खरेच माझे
जगून आता झाले
माणूसकीने जगावयाचा
प्रकार बाकी आहे…

सरणावरती आता खरोखर
निघेन आनंदाने
पण मृत्युचा अजून थोडा
नकार बाकी आहे…
— गझलकार आप्पा ठाकूर

५१.सूर्यकांत खांडेकर

सहज सख्या एकटाच येई सांजवेळी——–
वाट तुझी पाहीन त्या आम्रतरूखाली–
अशी काव्य रचना करणारे आज कवी मा.सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांची आज जयंती (जन्म.२ एप्रिल १९२६ )
कवि मा.सूर्यकांत खांडेकर हे या मागील पिढीतील तसे नावारूपाला आलेले कवी. कवि मा.सूर्यकांत खांडेकर हे मितभाषी. म्हणजे वर्गात शिकविण्यापुरते बोलणारे असे शिक्षक. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे कसदार कविता लिहिणारे कवी. त्या काळातील बहुतेक साऱ्या वाङ्मयीन नियतकालिकातून त्यांच्या कविता प्रकाशित होत असत. कालांतराने ते रयत शिक्षण संस्थेच्या कीर्ती महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक झाले. कवी मा.सूर्यकांत खांडेकर हे शाहीर पिराजीराव सरनाईक यांचे भाचे. त्यातूनच त्यांनी मराठी पोवाडा वाङ्मयाचा इतिहास लिहिला आणि बराच खडतर काळ गेल्यावर तो शिवाजी विद्यापीठाकडून प्रकाशित करण्यात आला. ‘सावली’ आणि ‘पानफुल’ ‘छुमछुम’ (बालकविता) हे त्यांचे रसिकांच्या पसंतीस उतरलेले काव्यसंग्रह. त्याच्या कविता बालभारतीच्या पुस्तकात पण आहेत. मा.सूर्यकांत खांडेकर यांनी पाच एक मराठी चित्रपटांना गाणीही लिहिली.
‘या फुलाच्या गंधकोषी…’ या एकाच गाण्याने ते सर्वत्र प्रसिद्ध झाले.
‘सावली सूर्याची’ हे आत्मकथन कवि मा.सूर्यकांत खांडेकर यांच्या पत्नी मा.अनुराधा खांडेकर यांनी लिहिले आहे. हे आत्मकथन आपणास एका काळातील एका नगरीची जशी सांस्कृतिक ओळख करून देते, तसेच ते आपणास एका सकस सहभावाची सात्विक ओळख करून देते. मा.सूर्यकांत खांडेकर यांचे १५ जून १९७९ रोजी निधन झाले. मा.सूर्यकांत खांडेकर यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
सहज सख्या, एकटाच येइ सांजवेळी
वाट तुझी पाहिन त्या आम्रतरूखाली
हिरवळीत गीत गात, सांजरंगि न्हात न्हात
स्वप्नांना रंगवुया लेवुनिया लाली
अधरी जे अडत असे, सांगिन तुज गूज ‘असे’
प्रीती ही प्रीतीविण अजुनही अबोली
तृणपुष्पे मोहक ती उमलतील एकांती
चांदण्यात उमलवुया प्रीत भावभोळी

मा.सूर्यकांत खांडेकर यांची काही गाणी
उतरली सांज ही धरेवरी
गोड तुझी बासरी श्रीहरी
त्या फुलांच्या गंधकोषी
सहज सख्या एकटाच येई सांज वेळी


५२. इलाही जमादार

February 1, 2021: मानवी जीवनातील वेदना शब्दबद्ध करणारे ज्येष्ठ गझलकार इलाही जमादार (वय ७४) यांचे वृद्धापकाळाने रविवारी निधन झाले. कविवर्य सुरेश भट यांच्यानंतर मराठी गझलेला शिखरावर नेणारे प्रसिद्ध गझलकार अशी त्यांची ख्याती होती.

पत्नी आणि मुलाच्या निधनानंतर इलाही जमादार पुण्यात एका छोटय़ा खोलीमध्ये एकटेच राहत होते. टाळेबंदीच्या काळात जुलैमध्ये ते तोल जाऊन पडले, त्या वेळी त्यांना जबर मार लागला होता. त्यातच वाढत्या वयामुळे त्यांना स्मृतिभ्रंशाचा त्रासही सुरू झाला होता. रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. जमादार यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

जमादार हे पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे आवडते गझलकार होते. तीन वर्षांपूर्वी त्यांनी इलाही यांचा पत्ता शोधून त्यांची भेट घेतली होती. प्रकृती ठीक नाही हे जाणवल्यानंतर त्यांनी इलाही यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. डॉ. धनंजय केळकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी इलाही यांची सेवा केली. डॉ. केळकर यांच्या हस्ते इलाही यांच्या ‘दोहे इलाहींचे खंड १ व २’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले होते. पंडितजींनी इलाही यांना दरमहा ‘कृतज्ञता निधी’ गेले कित्येक महिने सुरू ठेवला होता.

  • जमादार यांचा जन्म १ मार्च १९४६ रोजी सांगलीतील दुधगाव येथे झाला. वयाच्या १८ व्या वर्षीपासून त्यांनी काव्यलेखन सुरू केले. आकाशवाणी, दूरदर्शनवर कार्यक्रम करणाऱ्या इलाही यांनी मराठी, हिंदी, उर्दू भाषेमध्ये कविता व गझललेखन केले. नवोदित कवींसाठी ‘इलाही गझल क्लिनिक’ या नावाने ते कार्यशाळा घेत असत.
  • त्यांच्या मराठी काव्यरचना ‘मराठी सुगम संगीत’आणि ‘स्वरचित्र’ या कार्यक्रमांतून सादर झाल्या होत्या. ‘जखमा अशा सुगंधी’, ‘भावनांची वादळे’, ‘दोहे इलाहीचे’, ‘मुक्तक’, ‘अनुराग’, ‘अनुष्का’, ‘अभिसारिका’ आणि ‘गुंफण’ हे त्यांचे कविता आणि गझलसंग्रह प्रसिद्ध आहेत.

१९८३ ला झालेली आमची मैत्री कौटुंबिक नात्यात कधी बदलली हे कळले नाही. गझलकार संगीता जोशी यांच्या घरी इलाही आणि माझी भेट झाली. त्यावेळी इलाही यांनी माझ्या हाती सोपवलेल्या ओळी होत्या, ‘अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा.’ पुढे या गझलेने मला आणि इलाही आम्हा दोघांनाही ओळख दिली. इलाही यांनी मला आणखी एक गझल दिली होती. ती मी स्वरबद्ध केली, पण अद्याप कुठेही गायली नाही, कदाचित पुढेही गाणार नाही. त्या गझलेच्या ओळी होत्या, ‘या क्षितिजाच्या पल्याड निघूनी जावे म्हणतो..’ आज ते गेल्याचे कळले आणि या ओळी डोळ्यांपुढे येऊ लागल्या.
भीमराव पांचाळे, गझलकार

एक ओळ ऊर्दू आणि दुसरी ओळ मराठी असे नावीन्यपूर्ण प्रयोग त्यांनी केले. ‘ए सनम तू आज मुझको खुबसूरत साज दे, येऊनी स्वप्नात माझ्या तू मला आवाज दे’ ही गझल त्याचे उदाहरण. ‘सांजवेळी सोबतीला सावली देऊन जा..’ आणि ‘जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला, केलेत वार ज्याने तो मोगरा असावा’ या त्यांच्या गझल लोकप्रिय आहेत.
रमण रणदिवे, गझलकार

इलाही जमादार यांच्या काही गजला

रोज अत्याचार होतो आरशावरती आता
आरशाला भावलेली माणसे गेली कुठे

अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा

काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली
डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा

जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा

माथ्यावरी नभाचे ओझे सदा ईलाही
दाही दिशा कशाच्या हा पिंजरा असावा

– इलाही जमादार

घर वाळूचे बांधायाचे
स्वप्न नसे हे दिवाण्याचे…

सहज बोलली, निघून गेली
झाले, गेले, विसरायाचे……

आरशात मी, आरशा-पुढे
कोण तोतया, समजायाचे….

ठरविल्याविना, ठरले आहे
स्वप्नामध्ये भेटायाचे….

– इलाही जमादार

अनाथ होईल जगी वेदना माझ्यानंतर
छळेल तुजला तुझी वंचना माझ्यानंतर

सारे काही असून जवळी भणंग होशील
कळेल तुजला प्रीत-भावना माझ्यानंतर

अहंपणाचा फुशारकीचा नाद सोड तू
कोण तुझ्या ऐकेल वल्गना माझ्यानंतर

आजीवन तर तुझीच स्वप्ने रंगविली मी
येईल तुजला खरी कल्पना माझ्यानंतर

जिवापाड मी केली प्रीती अन तू छळले
असेल कोणी असा सांग ना! माझ्यानंतर

फुल ‘इलाहीच्या’ कबरीवर ये चढवाया
करावीस इतुकीच साधना माझ्यानंतर

– इलाही जमादार

व्याकुळ माझ्या, नजरेला दे, नजर प्राशिण्यासाठी
तृषार्त माझ्या, अधराना दे, अधर प्राशिण्यासाठी
वसंतात तू, वसंतात मी, वसंत अवती भवती
मोहरलेल्या, वृक्षाला दे, बहर प्राशिण्यासाठी
नसेल जर का, तुला भरवसा,
नसेल जर का, तुला भरवसा, श्र्वासांची तू, झडती घे
रूप तुझेही, भरून उरले, डोळ्यांची तू, झडती घे
दुसरा तिसरा, विचार नाही, अविरत चिंतन, तुझेच गे
कधी अचानक, धाड टाकुनी, स्वप्नांची तू, झडती घे
तेल, वात अन्‌, ज्योत दिव्याची, तुझी आठवण, आणी मी
कसे तुला, समजावू वेडे, प्राणांची तू, झडती घे
क्षणाक्षणावर, तुझाच ताबा, तुझीच सत्ता, सभोवती
वाटल्यास मम, रोजनिशीच्या, पानांची तू, झडती घे
कळेल तुजला, कळेल मजला, भाकित अपुल्या, प्रीतीचे
तुझ्या नि माझ्या, तळहातांच्या, रेषांची तू, झडती घे
या ह्रदयाचा, अथांग सागर, नभी चंद्रमा, रूप तुझे
काठाची तू, झडती घे अन्‌, लाटांची तू, झडती घे
अजुन कोणता, हवा पुरावा सांग ‘इलाही’ सांग तुला
तुझ्याच रंगामध्ये रंगलो, ग़ज़लांची तू, झडती घे

– इलाही जमादार

वरून दिसते आम्रतरूसम मोहरली मुंबई
हाय! परंतू ऋतू जाणतो पोखरली मुंबई

पोटासाठी अनाथ अगतिक आला आश्रयाला
निवार्‍यास अंथरली त्याने पांघरली मुंबई

लहान होती अल्लड होती एके काळी तीहि
अशी बहकली कुणीच नाही सावरली मुंबई

जशी केतकी बनात चाले सत्ता भुजंगांची
तशी अवस्था बघून इथली घाबरली मुंबई

तिच्या दुधावर उदंड झाली पहा तिची लेकुरे
बॉम्बस्फोट जाहले तेधवा हादरली मुंबई

काय आणखी असे वेगळे मुंग्यांचे वारूळ
अफाट गर्दी मधे बिचारी चेंगरली मुंबई

हात धुराचे सरकत सरकत कंठाशी पोचले
प्रदूषणाने फास अवळला गुदमरली मुंबई

कधी जिवाची होती आता जिवावरीहि उठली
विषकन्येसम मला ‘इलाही‘ जाणवली मुंबई

– इलाही जमादार

सांजवेळी सोबतीला, सावली देऊन जा…
भैरवी गाईन मी, तू मारवा गाऊन जा…

मी जपोनी ठेविल्या, संवेदना स्पर्शातल्या,
त्या खुणांचे ताटवे, तू एकदा फुलवून जा…

पेरला श्वासातुनी मी गंध ओल्या प्रीतिचा,
धुंद मी माझ्यात आहे, धुंद तू होऊन जा…

घेतला झोळीत माझ्या, मी व्यथेचा जोगवा,
एकदा हातात माझ्या, हात तू देऊन जा…

या पुढे जमणार ना तुज, ओळखीचे, पाहणे,
त्या तुझ्या नजरेत मजला, तू जरा भिजवून जा…

नववधू होऊन तू, जाशील जेव्हा, त्या घरी,
त्या घराच्या वळचणीला, आठवण, ठेवून जा…

– इलाही जमादार

५३. रेव्ह.ना.वा. टिळक

ना.वा.टिळक हे जुन्या काळातले प्रसिद्ध कवी होते. त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केल्यानंतर ते रेव्हरंड टिळक या नावाने ओळखले जात होते. केवढे हे क्रौर्य ही त्यांची कविता सुप्रसिद्ध आहे. त्यांची माझ्या मायभूमीचे नाव ही एक दुर्मिळ कविता खाली दिली आहे.

केवढे हे क्रौर्य
क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.

म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!

अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना,
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी
क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरीं

निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!

म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना खरा.

असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!

— रेव्ह. ना.वा.टिळक

विकीपीडियावरील माहिती :

नारायण वामन टिळक (जन्म – ६ डिसेंबरइ.स. १८६१ – ९ मेइ.स. १९१९) हे मराठी लेखक होते.

बालपण

नारायण वामन टिळक उर्फ रेव्हरंड टिळक यांचा जन्म रत्‍नागिरी जिल्ह्यातील करजगाव येथे दि. ६ डिसेंबरइ.स. १८६१ रोजी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या जन्माची वेळ, तिथी वगैरे पाहून वडील वामनराव यांना हा मुलगा अपशकुनी वाटला आणि त्यांनी तसे बोलूनही दाखविले. त्यामुळे वडिलांनी कायमच तुच्छतेची वागणूक दिल्याने ना. वा. टिळकांना या प्रकारास हिंदू विचारच कारणीभूत असल्याची समजूत झाली. मुळात ना. वा. टिळक अतिशय हुशार, एकपाठी व तीक्ष्ण बुद्धीचे होते. ते मराठीसंस्कृतहिंदी आणि इंग्लिश या भाषांचे जाणकार होते. त्यांचा फलज्योतिष, आयुर्वेद या विषयांचाही अभ्यास होता. ते शीघ्रकवी होते.

जीवन

वयाच्या १५ व्या वर्षी टिळकांचा विवाह मनकर्णिका नारायण गोखले यांच्याशी झाला. (लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई नारायण टिळक असे झाले. लक्ष्मीबाई आपल्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्रासाठी प्रसिद्ध आहेत). टिळकांनी आयुष्यभरात अनेक ठिकाणी वास्तव्य केले, ठिकठिकाणी शाळा काढल्या. पण एका गावी कायमचा मुक्काम केला नाही. नागपूर येथे श्रीमंत अप्पासाहेब बुटी यांच्या आश्रयाने राहत असतांना त्यांच्या मासिकासाठी संपादक म्हणूनही टिळकांनी काम केले. एकदा रेल्वेने प्रवास करीत असतांना एका ख्रिस्ती माणसाने टिळकांना बायबल वाचायला दिले. गाडीत वेळ जावा या उद्देशाने टिळकांनी तो ग्रंथ वाचला. बायबल वाचून टिळक फारच प्रभावित झाले. दि. १० फेब्रुवारी इ.स. १८९५ या दिवशी टिळकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला.

इ.स. १८९५ पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत २४ वर्षे टिळकांनी ख्रिश्चन धर्मप्रसारक म्हणून काम केले. या काळात त्यांनी १००हून अधिक भक्तिगीते, ओव्या व अभंगांची रचना केली. त्यांनी एकूण २,१००हून अधिक कविता रचल्या आणि ख्रिस्तायन नावाचे महाकाव्यही लिहिले. ते उत्तम वक्ता होते ते ख्रिश्चन धर्मावर कीर्तने करीत.

दि. ९ मे इ.स. १९१९ रोजी टिळकांचे निधन झाले.

रेव्ह. ना.वा. टिळकांचे लेखन

  • दशावतारी नाटकांसाठी काही आख्याने आणि पदे
  • सं. गोदुःख विमोचन (हे मराठीतले आद्य पथनाट्य)
  • शीलं परं भूषणम्‌ (विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले नाटक)
  • स्व-राज्य हे खरे स्वराज्य
  • स्वराज्य आणि स्त्रिया (ख्रिस्ती मुलींसाठी लिहिलेली नाटुकली)
  • ख्रिस्तायन (महाकाव्य)

सन्मान

रेव्ह. टिळक हे मुंबईत १९१५ भरलेल्या ११व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

५४.वामन तबाजी कर्डक

अहोसांगा या_वेड्याला,

त्यांनीसुमारे४०००गाणी_लिहिली.***

तेडाव्या हाताने पेटी वाजवायचे

यांच्यागीताने खरच वेडे केले होते …***

अहोसांगाया_वेड्याला, माझ्या घरधन्याला

कशी जाऊ सांगा मी सासुरवाडीला (चित्रपट सांगते ऐका)
चल ग हरिणी तुरु तुरु —-चिमण्या उडती भुरू भुरू
ह्यो ह्यो ह्यो पाहुणा, शकुचा मेहुणा—–तुझ्याकडे बघुन हसतोय ग
काही तरी घोटाळा दिसतोय ग
ही सर्व गाणी लोकांच्या ओठावर आहेत. चला ओळखकरून घेऊ कोणी केली ही गिते.


अशीसुंदरलोकगीतरचणारे वामन तबाजी कर्डक यांचीआज_जयंती

त्यांच्याजन्मशताब्दीवर्षांचीआजसांगताहोतआहे. (१५ ऑगस्ट, इ.स. १९२२ – १५ मे, इ.स. २००४,) त्यांचा जन्म देशवंडी, ता. सिन्नर, जि. नाशिक येथे झाला. ते एक मराठी लोकशाहीर, लोककवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते.


मराठी चित्रपटसृष्टीतला विक्रमी चित्रपट #सांगत्ये_ऐका’ या चित्रपटाचा रौप्यमहोत्सव झाल्यावर दिग्दर्शक अनंत माने यांच्या डोक्‍यात एक कल्पना आली, की या चित्रपटात एक नवे गाणे टाकावे. त्यांनी ही कल्पना संगीतकार वसंत पवार यांना बोलून दाखवली. माने यांचा वसंत पवार यांच्या संगीतावर विश्‍वास होता. तशीच त्यांची साहित्यिक जाणही माहीत होती. त्यामुळे त्यांनी वसंत पवार यांनाच नवं गाणं निवडायचं स्वातंत्र्य दिलं. वसंत पवारांनी शाहीर वामनदादा कर्डक यांचं गीत निवडलं.
त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांचे वडील मोळया विकणे, टेंभुर्णीच्या पानाचे विडे करुन विकणे हे आणि हेडीचा व्यवसाय करीत.
लोककवी वामनदादा कर्डक हे वसंत पवारांचे (संगीतकार )मित्र होते. शाळा शिकण्याचे भाग्य नशिबी नसल्यामुळे ते अनेक वर्षे निरक्षर होते. समता दलात वामनदादा लेझीम व लाठीकाठी शिकवत.
मुंबईला बी.डी. चाळीत एक माणूस त्याला आलेले पत्र घेऊन दादांकडे आला व म्हणाला, “मास्तर एवढं पत्र वाचून दाखवा.’ वामनदादांनाच काय पण आजूबाजूच्या कुणालाच पत्र वाचता आलं नाही. त्यामुळे त्या माणसाच्या मनाची झालेली तगमग पाहून दादांच्या डोळ्यांत पाणी आलं. त्यांनी साक्षर व्हायचं ठरवून त्यांचे अधिकारी देहलवीसाहेब यांच्याकडून जिद्दीने अक्षरओळख करून घेतली. पुढे दादांनी डॉ. आंबेडकरांचे विचार गाण्यांमधून सर्वांपर्यंत पोचवायचा विडा उचलून संपूर्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात येथे जाऊन आपल्या आवाजाचा करिष्मा दाखवला.
त्यांनी सुमारे चार हजारांवर गाणी लिहिली.
कर्डकांनी लहानपणी गुरे चारणे, जत्रेत कुस्त्या खेळणे, शिवडी येथे गिरणी कामगाराची नोकरी करणे, मातीकाम, सिमेंट काँक्रीटचे काम, चिक्की विकणे, आईसफ्रूट विकणे, खडी फोडणे, टाटा ऑईल मिल मध्ये नोकरी, इत्यादी व्यवसाय केले. त्यांना वाचनाचा छंद असून त्यांनी लल्लाट लेख या नाटकात घुमा या पात्राची भूमिका केली होती.
वामनदादा कर्डक यांनी ३ मे १९४३ रोजी पहिले विडंबन गीत लिहिले व त्यानंतर २००४ पर्यंत गीतलेखन व गायनाचा कार्यक्रम चालू ठेवला..
त्यांच्या प्रकाशित आणि अप्रकाशित मिळून साधारणतः दहा हजाराच्या आसपास गीतरचना असल्याचा अंदाज आहे.
कर्डकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९४० साली नायगांव येथे पाहिले व त्यानंतर चाळीसगांव, मनमाड, टिळकनगर येथे त्यांनी आंबेडकरांच्या भाषणांत गायन केले. त्यांनी अनेक आंबेडकरी चळवळीशी निगडीत काव्य रचना केल्या .
(विकिपीडिया व मधू पोतदार यांचे सकाळ मधील लेखातून ) त्यांचा फोटो श्री रमेश इंजे (निवृत्त अधीक्षक अभियंता )यांचे विवाहाचे वेळचा आहे . त्यावेळी वामंरावानी विवाह समारंभात प्रथमच गायनातून आशीर्वाद दिले


त्यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान
दिल्लीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप.
महाराष्ट्र राज्य शासनाचा दलित मित्र पुरस्कार.
महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे तीन वर्ष सदस्यत्व.
महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्यत्व.
औरंगाबाद येथे पहिला भव्य नागरी सत्कार (१९८७).
प्रा. ऋषिकेश कांबळे संपादित पहिल्या लोकशाहीर वामन कर्डक गौरव अंकाचे प्रकाशन (१९८७).
मधुकर भोळे संपादित वामन दादा कर्डक गौरव ग्रंथाचे प्रकाशन (२००१)
प्रा. डॉ. परशुराम गिमेकर संपादित ‘वामनदादा कर्डक यांची गीत रचना’ लेख संग्रहाचे प्रकाशन.
नाशिक, बुलढाणा येथे नाणेतुला
परभणी येथे प्रख्यात उर्दू शायर बशर नवाज यांचे सोबत वहीतुला. नंतर या वह्यांचे गरीब मुलांना वाटप करण्यात आले.
साहित्य, संस्कृती मंडळाची ‘उत्कृष्ट कविरत्‍न’ ही गौरववृत्ती.
’युगांतर प्रतिष्ठान’तर्फे ‘युगांतर पुरस्कार’ (१९९७).
जामखेडच्या भाई फुटाणे प्रतिष्ठानचा ‘संत नामदेव पुरस्कार’
मुंबईच्या बौद्ध कलावंत संगीत अकादमीचा ‘भीमस्मृती पुरस्कार’
भोपाळ येथे ताम्रपट मिळाला..
भुसावळ येथे चांदीचे मानपत्र मिळाले.
हिंगोली जिल्ह्यातील बसमत येथे संजय मोहड यांनी आयोजित केलेल्या ‘स्वरार्हत संगीत संगीती’ या कार्यक्रमात नागरी सत्कार आणि गायन
मराठवाडा ‘अस्मितादर्श पुरस्कार’
सन १९९३ला वर्धा येथे भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
औरंगाबादच्या वामनदादा कर्डक प्रतिष्ठान या संस्थेने भरविलेले पहिले अखिल भारतीय महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन, १५ मे २००८ रोजी औरंगाबाद येथे झाले. डॉ. यशवंत मनोहर संमेलनाध्यक्ष होते.


त्यांची काव्य संपदा
‘वाटचाल’ (गीतसंग्रह) १९७३
‘मोहळ’ (गीतसंग्रह) १९७६
‘हे गीत वामनाचे’ (गीतसंग्रह) १९७७
‘माझ्या जीवनाचं गाणं’ (आत्मकथन) १९९६
ध्वनिफिती व चित्रपट गीते
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट
भीमज्योत
जय भीम गीते
सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला (चिय्त्रपत – सांगत्ये ऐका)
चल गं हरणे तुरू तुरू (चित्रपट – पंचारती)
चरित्र
एका कवीचे जीवनगाणे – वामन कर्डक यांची चरित्रकथा (लेखक -बबन लोंढे)


ह्यो ह्यो ह्यो पाहुणा, शकुचा मेहुणा
तुझ्याकडे बघुन हसतोय ग
काही तरी घोटाळा दिसतोय ग
काही तरी बाई घडलंय खरं
फंदात पाखरू पडलंय खरं
मधावर माशी बसावी जशी
तसाच बिलगून बसतोय ग
प्रेमाचा फासा टाकून असा
आपलासा हा केलास कसा?
नवतीच्या नूरा भुललाय पुरा
जाळ्यात मासा हा फसतोय ग
गुळाला मुंगळा चिटकुन बसं
मेतकुट तुमचं दिसतंय तसं
“होशील का राणी” लागुनी कानी
असंच काही तरी पुसतोय ग
तुझी नि त्याची तुटावी जोडी
अमृताची विटावी गोडी
म्हणून हा मेला, वामनचा चेला
मोठं मोठं डोळं वासतोय ग


वसंत शिंदे व लीला गांधी यांचेवर चित्रित झालेला सांगत्ये ऐका मधील झगडा
सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला
हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला
तुला न्यावयाला ग घेऊन गाडी
आलो सर्व सोडून मी शेतवाडी
तू असताना जोडीला
या बुरख्याच्या गाडीला
नवा रंग येईल गुलाबी साडीला
सांगा या वेडीला !
अहो सांगा या वेड्याला, माझ्या घरधन्याला
कशी जाऊ सांगा मी सासुरवाडीला
ही गाडी कुणाची, शेतवाडी कुणाची
बढाई नका ठोकू मोठेपणाची
सांगा या खोपडीला, नाही काणा झोपडीला
कशी जाऊ सांगा मी सासुरवाडीला
सांगा या वेड्याला !
बरे नाही तुझे माहेरी रहाणे
तू गावात बदनाम होशील याने
तुझ्या वाडवडिलां अन्‌ धर्मरुढिला
हे घातक होईल पुढच्या पिढीला
सांगा या वेडीला !
आहे थोरवी थोर माझ्या पिढीची
भली आज गावात इज्जत पित्याची
आहे मान त्याला अन्‌ त्याच्या पगडीला
अरे हसतील सारे तुझ्या रे परवडीला
सांगा या वेड्याला !
नको भांडू, भांडण विकोपास जाईल
तुझा-माझा तंटा मी पंचात नेईल
बसेन चावडीला, त्या पंचांच्या जोडीला
तुला मात्र नेईन मी याच घडीला
सांगा या वेडीला !

५५. प्रा.ग.ह.पाटील

माझ्या शालेय जीवनात मी पहिली कविता पाठ केली होती ती होती देवा तुझे किती सुंदर आकाश.

देवा तुझे किती सुंदर आकाश हे गीत लिहिणारे कवी , लेखक , बालगीतकार शिक्षणतज्ञ, प्राचार्य ग.ह.पाटील यांचा आज जन्मदिन (जन्म : १९ ऑगस्ट १९०६; मृत्यू : १ जुलै, १९८९) ’माझ्या मामाची रंगीत गाडी हो’, ’देवा तुझे किती, सुंदर आकाश’, ’डराव डराव, डराव डराव, का ओरडता उगाच राव’ अशी त्यांची अनेक बालगीते लोकप्रिय आहेत.
त्यांच्या अनेक कविता मराठी शालेय पाठ्यपुस्तकांत असत.
ग.ह. पाटील हे बालसाहित्यिक होते. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी ’बालशारदा’ या ग्रंथाचे संपादन केले. त्या ग्रंथाला त्यांनी अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावनाही लिहिली होती. पुण्याच्या ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य असलेले पाटील, त्या कॉलेजमध्ये अध्यापन करताना सतत प्रयत्‍नशील आणि प्रयोगशील असत. लेखकांनी मुलांना सकस आणि आणि परिपूर्ण साहित्य द्यावे यासाठी ग.ह. पाटील यांनी महिनाभराचे शिबिर त्यांनी १९६० मध्ये आयोजित केले होते. या शिबिरासाठी महाराष्ट्रभरातून होतकरू लेखक निवडले होते. शिबिराचा लाभ घेतलेले लेखक मुलांच्या क्षेत्रांत पुढे नावारूपाला आले. .
ग.ह. पाटील यांच्या कवितांचा संग्रह ’गस्तवाल्यांची गीते आणि निवडक कविता’ या पुस्तकाद्वारा प्रकाशित झाला आहे. पुस्तकाचे संपादन त्यांच्या कन्या डॉ. मंदा खांडगे यांनी केले आहे. पुस्तकाला शांता शेळके यांची प्रस्तावना आहे. ग.ह. पाटलांचा ’लिंबोळ्या’ या नावाचा एक कवितासंग्रह आहे, त्यात त्यांच्या बालकवितांशिवायच्या अनेक कविता आहेत.
ग.ह. पाटील यांच्या प्रसिद्ध आणि मुलांच्या आवडत्या कविता
अबलख वारूवरी बैसुनी येती हे पाटिल । भरजरी । शिरीं खुले मंदिल
डरांव डरांव, डरांव डरांव… का ओरडता उगाच राव?”
देवा तुझे किती सुंदर आकाश
पाखरांची शाळा भरे पिंपळावरती, चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती
फुलपाखरू छान किती दिसते
माझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिलार्‍या बैलाची जोडी हो
ग.ह.पाटील यांची पुस्तके
गस्तवाल्यांची गीते आणि निवडक कविता (संकलन, संपादिका मंदा खांडगे)
पाखरांची शाळा (बाल कवितासंग्रह)
बालशारदा (गद्य)
लिंबोळ्या (काव्यसंग्रह)
पुरस्कार
पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने बालसाहित्यासाठी ग.ह. पाटील यांच्या नावाचा पुरस्कार ठेवला आहे.
कै. ग.ह. पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त .’प्रतिमा प्रकाशना’ने बालशिक्षण : बालसाहित्य : विविध आयाम या नावाचा ग.ह. पाटील गौरवग्रंथ प्रकाशित केला आहे. डॉ.लीला दीक्षित आणि ग.ह.पाटील यांच्या कन्या डॉ.मंदा खांडगे यांनी त्या ग्रंथाचे संपादन केले आहे. या ग्रंथात अठरा नामवंत लेखक, अभ्यासक व बालशिक्षण-तज्‍ज्ञांचे विविध अंगांनी लिहिलेले अभ्यासपूर्ण लेख आहेत. या ग्रंथाला महाराष्ट्र सरकारचा आणि बालकुमार साहित्य संमेलनाचा पुरस्कार मिळाला आहे.


देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पडे त्याचे
सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे
किती गोड बरे गाणे गाती
सुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी
इतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर असशील


फुलपाखरू !
छान किती दिसते ! फुलपाखरू
या वेलींवर ! फुलांबरोबर
गोड किती हसते ! फुलपाखरू
पंख चिमुकले ! निळेजांभळे
हलवूनी झुलते ! फुलपाखरू
डोळे बारीक ! करिती लुकलुक
गोल मणी जणु ते ! फुलपाखरू
मी धरू जाता ! येई न हाता
दूरच ते उडते ! फुलपाखरू
कवी- ग.ह. पाटील

५६. कवी गिरीश

रविकिरण मंडळाचे संस्थापक शंकर केशव कानेटकर उर्फ गिरीश यांचा आज जन्म दिन.
त्या निमित्त माझा दैनिक प्रभात पुणे मधील लेख
त्यांचा जन्म २८ ऑक्टोबर १८९३ रोजी सातारा जिल्ह्यातील राहिमतपूर जवळील फत्यापूर येथे झाला. त्यांचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल सातारा व पुण्यातील नानावाड्यातील न्यू इंग्लिश स्कूल, येथे झाले.१९११मध्ये ते मॅट्रिक झाले. घरात आर्थिक अडचणी आल्यामुळे थोरला मुलगा या नात्याने कुटुंबाचा सर्व भार त्यांनी सांभाळला. त्यामुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. चरितार्थासाठी त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे शिक्षक म्हणून नोकरी धरली तसेच खाजगी शिकविण्याही घेतल्या. फुरसतीच्या वेळात इंग्रजी, संस्कृत, मराठी भाषांतील नव्या-जुन्या वाङ्मयाचा अभ्यास केला.
११वर्षानंतर वर्ष १९२२ साली इंग्लिश व मराठी हे विषय घेऊन ते बी.ए.व वर्ष १९३० मधे एम.ए.झाले.डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी मुधोजी हायस्कूल, फलटण येथे १९३४ पर्यंत मुख्याध्यापक या नात्याने काम पाहिले आणि शाळा नावारूपाला आणली.वर्ष १९४०मध्ये ते विलिंग्डन महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक झाले,आणि वर्ष १९५४ मधे निवृत्त झाले.तेथे ते काम असताना विलिंग्डन महाविद्यालय मराठीचे एक संस्कारकेंद्रच झाले होते.निवृत्तीनंतर फलटणच्या अधिपतींनी त्यांना मुधोजी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून निमंत्रित केले व वर्ष १९५९ पर्यंत तेथे कार्यरत होते.
गिरीश यांची “एक रहिमतपूरवासीय” या टोपणनावाने त्यांची पहिली कविता “नदीतटाकचा सायंकाळचा देखावा” ‘करमणूक’ साप्ताहिकात, ‘दिल्ली दरबार’ खास अंकात प्रसिद्ध झाली. सुरुवातीला एकदोन वर्षे त्यांच्या कविता निरनिराळ्या नावांनी प्रसिद्ध झाल्या परंतु वर्ष १९१३ नंतर ‘गिरीश’ हे टोपणनाव घेऊन त्यांनी काव्यनिर्मिती सुरु केली. त्यांनी अनेक कविता लिहिल्या, त्यांपैकी काही ‘चित्रमय जगत’, ‘काव्यरत्नावली’, ‘करमणूक’, ‘उद्यान’, ‘मनोरंजन’ या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेले व आशालता वाबगावकर यांनी गायलेले “तव भास हा अंतरा” हे मत्स्यगंधा नाटकातील गीत त्यांनीच लिहिले आहे. त्यांना सुरवातीच्या लेखन काळात गोविंदाग्रज व बालकवी यांचाही सहवास मिळाला. त्यांच्या मदतीने पुण्यात ‘श्री महाराष्ट्र शारदामंदिर’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या साप्ताहिक बैठकीत चर्चा, निबंधवाचन, काव्यगायन, काव्यवाचन यांचा समावेश असे. यातूनच पुढे १९२३ साली ‘रविकिरण मंडळ’ स्थापन झाले.
कवी यशवंतांच्या सहकार्याने गिरीशांचा पहिला कवितासंग्रह ‘वीणा झंकार’ प्रकाशित झाला. तथापि यातील सर्व कविता त्यांच्या पुढील काव्यसंग्रहात समाविष्ट झाल्या आहेत. वर्ष १९२३ मधे ‘अभागी कमल’ हे खंडकाव्य त्यांनी पुरे केले व ‘मनोरंजन’ मासिकातून ते प्रसिद्ध केले. त्यानंतर त्यांची‘कला’ , ‘आम्बराई’, ‘अनिकेत’ ही खंडकाव्ये प्रकाशित झाली. तसेच ‘कांचनगंगा’ , ‘फलभार’ , ‘मानसमेघ’, ‘चंद्रलेखा’ हे त्यांचे स्फुट कवितांचे संग्रह आहेत. याशिवाय त्यांनी ‘काव्यकला’ हा टीकालेखसंग्रह, ‘मराठी नाट्यछटा’, माधव जूलियन यांचे चरित्र “‘स्वप्नभूमी” अशी इतरही ग्रंथरचना त्यांनी केली.त्यांनी ‘अरुण वाचनमाला’ या लोकप्रिय शालेय पाठ्यपुस्तकाचे आचार्य.अत्रे यांच्या सहकार्याने संपादन केले. त्या वाचनमालेला महाराष्ट्रातील शालेय जगतात उत्तम प्रतिसाद मिळाला. १९५९ साली उत्तम माध्यमिक शिक्षक म्हणून मिळालेल्या पहिल्या राष्ट्रपती पारितोषिकाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा सन्मान झाला. ४ डिसेंबर १९७३ त्यांचे निधन झाले.
श्री.माधव विद्वांस

Madhav Vidwans

·
पोर खाटेवर मृत्युच्याच दारा—- कुणा गरीबाचा तळमळे बिचारा
अश्या कविता करणारे रविकिरण मंडळातील एक प्रमुख कवी. बालकवी कवी गिरीश यांचे आज पुण्यस्मरण ४ डिसेंबर १९७३ (मुळ नाव शंकर केशव कानेटकर ) जन्म सातारा जिल्ह्यातील फत्यापूर येथे. शिक्षण सातारा आणि पुणे येथे. फलटण, पुणे, सांगली येथे शिक्षक व प्राध्यापक म्हणून काम केले. शिक्षण क्षेत्रातील सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पारितोषिक मिळाले (१९५९). निवृत्तीनंतर सांगलीस स्थायिक झाले.
कानेटकरांनी फर्ग्युसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत.
कवी गिरीश हे रविकिरण मंडळाचे एक प्रमुख सदस्य होते.
कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत. त्याशिवाय त्यांनी चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या ’इनॉक आर्डेन’चा ’अनिकेत’ हा काव्यानुवाद केला.
माधव ज्युलियन यांचे चरित्र त्यांनी लिहिले, तर रेव्हरंड ना.वा. टिळक यांच्या ख्रिस्तायनची प्रत संपादित केली.
अभागी कमल (१९२३) ह्या सामाजिक खंडकाव्याने त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. अर्वाचीन मराठीमधील सामाजिक खंडकाव्याचे ते आरंभस्थान म्हणता येईल. त्यानंतर कला (१९२६) हे एकखंडात्मक दीर्घकाव्य, आंबराई (१९२८) हे ग्रामीण जीवनावरील खंडकाव्य, अनिकेत (१९५४) हे टेनिसनच्या ‘ईनक आर्डन’ ह्या काव्याचे भाषांतर ही दीर्घकाव्ये त्यांनी लिहिली. त्यांची स्फुट कविता कांचनगंगा (१९३०), फलभार (१९३४), मानसमेघ (१९४३) इ. काव्यसंग्रहातून प्रकाशित झालेली आहे. विविध वृत्तांचा वापर, घोटीव शब्दकळा आणि रेखीव रचना ही त्यांच्या कवितेची लक्षणीय वैशिष्ट्ये. काही टीकात्मक लेखनही त्यांनी केले आहे (काव्यकला, १९३६; मराठी नाट्यछटा, १९३७). माधव जूलियन्‌ यांचे स्वप्नभूमि (१९६५) हे चरित्र त्यांनी लिहिले आहे. पुणे येथे ते निधन पावले.”
पोर खाटेवर मृत्युच्याच दारा
कुणा गरीबाचा तळमळे बिचारा
दूर आई राहिली कोकणात,
सेविकेचा आधार एक हात !
ताप त्याने भरताच तडफडावे.
पाखराने एकले फडफडावे.
हळू गोंजारी सेविका दयाळू
डॉक्टराचे वच शांतवे कृपाळू.
कधी त्याने घ्यावे न मुळी अन्न
कुठे डोळे लाऊन बसे खीन्न
आणि डाक्टर येताच गोंजाराया
हाय! लागे तो घळघळा रडाया !
एक दिन तो व्याकुळ फार झाला
आणि पुसिलेच त्याने डाक्टराला
”आता दादा, मरणार काय मी हो?”
तोच लागे अश्रुची धार वाहो!
हृदय हलुनी डोळ्यात उभे पाणी
तरी डाक्टरची वदे करूण वाणी
दोन गोष्टी सांगून धीर देई
पुन्हा गोंजरून शांतवुन जाई.
रात्र अंधारी माजली भयाण
सोसवेना जीवास आता ताण
हळूच बोलावी बाळ डाक्टराला
तोही धर्मात्मा धाऊनीच आला.
आता बाळाला टोचणार तोच
वेड वासून पाखरू दीन चोच
“”नको आता ! उपकार फार झाले!
तुम्ही मजला किती..गोड..वागविले!
भीत..दादा..मरणास मुळी..नाही!
तू..म्ही..आई..!!”” बोलला पुढे नाही!
क्षणी डोळे फिरविले बालकाने
. . फेसबुकवरून साभार दि. ०५-१२-२०२३

५७. मुन्शी प्रेमचंद

Premchand ki kavitayen
ख्वाहिशे
ख्वाहिश नहीं मुझे,
मशहूर होने की,
आप मुझे पहचानते हो,
बस इतना ही काफी है,
अच्छे ने अच्छा,
और बुरे ने बुरा जाना मुझे,
क्योंकि जिसको जितनी जरूरत थी,
उसने उतना ही पहचाना मुझे,
जिंदगी की फलसफा भी,
कितनी अजीब है,
श्यामे कटती नहीं,
और साल गुजरते चले जा रहे हैं,
एक अजीब सी,
दौड़ है ये ज़िंदगी,
जीत जाओ तो कई,
अपने पीछे छूट जाते हैं,
और हार जाओ तो,
अपने ही पीछे छोड़ जाते हैं,
बैठ जाता हूं,
मिट्टी पर अक्सर, क्योंकि मुझे अपनी,
औकात अच्छी लगती है||

Nandkishore Jagannathrao Muley
. आमचे मित्र सुधीर मोघे आणि सीमा मोघे, दोघेही हरहुन्नरी कलाकार. पण मधेच सीमाताईंची साथ सुटली. त्याने मुन्शी प्रेमचंद यांच्या एका छानशा कवितेचा मराठी अनुवाद ‘ती’च्या आठवणी जाग्या करताना करून टाकला. जीवनाचं वास्तव मराठीत असो वा हिंदीत . . . ते वास्तवच असतं!

पहा कसा वाटतोय त्याचा अनुवाद तुम्हाला…

माझी इच्छा नाही प्रसिद्ध होण्याची
तुम्ही मला ओळखता, बस तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी
भल्याने भला आणि वाईटाने वाईट म्हणून ओळखलं मला
ज्याला जेवढी गरज होती तेवढंच त्यांनी ओळखलं मला
जीवनाचं “तत्वज्ञान” देखील कसं विचित्र,
“संध्याकाळ” सरत नाही कधी आणि “वर्षानुवर्षे” निघून जातात!
हे जीवन एक विचित्र शर्यत आहे
“जिंकलो” तर अनेक “आपले” मागे सुटून जातात
आणि हरलो तर, “आपले”च अनेक आपल्याला “मागे” सोडून जातात!
अनेकदा मी बसतो “मातीवरच”
मला माझी “लायकी” आवडते
समुद्राकडून शिकलोय मी जगण्याची रीत
शांतपणे वाहणे आणि लाटांसारखं मजेत राहणे
असं नाही की माझ्यात कुठला “आब” नाही
पण खरं सांगतो, माझ्यात कुठला “लबाड” नाही
माझ्या वागण्याचा हेवा करतात माझे शत्रू
काळ बदलला, पण ना तर माझं प्रेम बदललं ना माझे मित्र
एक घड्याळ खरेदी करून मी हातात बांधलं काय
अन वेळ माझ्या पाठीच लागली
विचार केला की घर बांधून मी “निवांत” बसेन
पण घराच्या गरजांनी मला “प्रवासी” करुन टाकलं
निवांतपणाबद्दल बोलूच नका
बालपणीचा रविवार आता येतच नाही
आयुष्याच्या धावपळीत काळाबरोबर “रंगतही” हरवत चाललीय
अन् हसत खेळत जाणारं आयुष्य, आता “सामान्य” होत चाललंय
एक “सकाळ” व्हायची, मी हसत उठायचो
आणि आज कितीदा तरी न हसता “संध्याकाळ” होते
किती दूर आलोय, नाती जपता जपता
स्वत:ला हरवून बसलोय, “आपले” जमवता जमवता
लोक म्हणतात मी खूप हसतो,
आणि मी थकलोय वेदना लपवता लपवता
आनंदी आहे आणि सर्वांना आनंदी ठेवतो
स्वत:साठी “बेपर्वा” झालो तरी सर्वांची “पर्वा” करतो
माहीत आहे माझं “मोल” मला, तरी पण

काही “मौल्यवान” लोकांशी नाती जपली आहेत मी

श्री.नंदकुमार मुळे यांच्या फेसबुकावरून साभार दि.०५-१२-२०२३

५८. शाहीर पठ्ठे बापूराव

ज्यांच्या साहित्यावर अनेकांनी पी एच डी. केली असे तमाशा क्षेत्रातील भूषण पठ्ठे बापूराव यांचे आज पुण्यस्मरण
पठ्ठेबापूराव यांचे मूळ नाव श्रीधर कृष्ण कुलकर्णी (११ नोव्हेंबर १८६६-२२ डिसेंबर १९४५). जन्म हरणाक्ष रेठरे (तालुका वाळवे, जिल्हा सागंली) ह्या गावी. शिक्षण इंग्रजी चार-पाच इयत्तांपर्यंत. बापूरावांकडे कुलकर्णीपणाची वृत्ती होती. बडवे घराण्यातील सरस्वती नावाच्या स्त्रीशी त्यांचा विवाह झालेला होता; परंतु तमाशाच्या आवडीमुळे त्यांचा व्यवसाय आणि संसार त्यांनी सोडून दिला.
पठ्ठे बापूराव तहसील कचेरीत कारकून होते त्यांचेकडे एक बाई दस्त लिहीणेसाठी आली .
तिचा दस्त राहिला बाजूला तिच्याकडे बघून त्याना कविता सुचली.
तीळ शोभे गोरा लाल –तुझी नथनी झुबकेदार !!
आणि त्यांनी त्या ओळी दस्तावर लिहिल्या आणि कागद साहेबा पुढे तसेच गेले पुढे काय झाले याची कल्पना तुम्हास आली असेलच .
गायक संगीतकार कवी शाहीर अश्या सर्वच भूमिका ते पार पडत होते. मुंबईच्या कामाठीपुऱ्यात त्यांचे वास्तव्य असलेल्या भागतील रस्त्यास त्यांचे नाव देणेत आले आहे
ग्रामीण भागात गायल्या जाणाऱ्या जात्यावरच्या ओव्या ऐकून ऐकून त्यांनी त्यांतही बदल केले. त्यांनाही श्रीधरची गाणी अशी लोकप्रियता मिळाली. श्रीधरच्या शिक्षकांनी शिफारस करून त्याचे नाव औंध सरकारांना कळविले. त्याची दखल घेऊन औंधच्या राजांनी श्रीधरला आपल्याकडे बोलावून घेतले. श्रीधरचे पुढील शिक्षण औंध येथे झाले. पुढे त्याच्या १६व्या वर्षी राणीसाहेबांनी श्रीधरला बडोद्यास नेले. तेथे ते संस्कृत भाषा शिकले. त्याबरोबरच त्याने कलाभुवन या संस्थेत यंत्र दुरुस्तीचे शिक्षणही घेतले व नोकरीही केली. दुर्दैवाने श्रीधर अवघ्या सतरा वर्षे वयाचे असताना त्याचे आई-वडील निवर्तले. शेवटी बडोद्याची नोकरी सोडून श्रीधर परत आले .
स्वतःचा फड उभारून त्यात स्वरचित लावण्या व कवने पठ्ठे बापूराव ह्या नावाने म्हणू लागले. त्यांच्या फडात पवळा नावाची, महार जातीची एक सुंदर स्त्री होती. तिच्यावर त्यांचे अतोनात प्रेम होते. पठ्ठे बापूरावांनी गण, गौळण, भेदिक, झगड्याच्या, रंगबाजीच्या, वगाच्या इ. विपुल लावण्या रचिल्या. त्यांतील काही तीन भागांत प्रसिद्ध झाल्या आहेत (१९५८) तथापि त्यांची बरीचशी रचना आजही अनुपलब्ध आहे. बहुतेक तमाशांत पठ्ठे बापूरावांच्या लावण्या गायिल्या जातात आणि सगळे तमासगीर त्यांना पूज्य मानतात. बापूरावांच्या आयुष्यातून पवळा निघून गेल्यानंतर त्यांचा तमाशाचा व्यवसाय हळूहळू ढासळत गेला.
एकेकाळी मुंबईच्या एल्फिन्‍स्टन थिएटरवर पवळा – पठ्ठे बापूराव यांना पाहण्यासाठी तिकीट लावण्यात आल्याचा उल्लेख तमाशा इतिहासामध्ये सांगितला जातो. त्याकाळी दोन आण्याच्या तिकिटावर दररोज चारशे रुपयांचा गल्ला जमत असे. असे नामदेव व्हटकरांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.शेवटी शेवटी तर ते खूपच विपन्न अवस्थेमध्ये होते.’कली युगाचा ऐका दाखला ! पठ्ठे बापूराव भुलला पवळिला असे ठामपणे सांगणारा हा शाहीर हलाखीत दिवस काढू लागला. त्यांच्याच तमाशात काम करणाऱ्याताई परिंचेकर’ ह्या बाईने त्यांना शेवटपर्यंत सांभाळले. या श्रेष्ठ कवीने २२ डिसेंबर १९४५ रोजी आपली इहलोकीची यात्रा संपविली. हे शाहीर सांगली जिल्ह्याचे भूषण होते.
गावी घरासमोर असलेल्या वाड्यातच तमाशाचा फड चालायचा. श्रीधरांच्या कानावर त्या वाड्यातल्या तमाशाचे सूर येत. पण ब्राह्मण आणि कुलकर्णीपद, त्यामुळे रात्री पटकन उठून तमाशाला जाऊन बसायचे धाडस त्यांना होईना. मनातली तळमळही त्यांना गप्प बसू देईना. बापू चोरून तमाशाला जाऊ लागले. तमासगीरांना त्यांनी अनेक लावण्या लिहून दिल्या. तमाशात बापूरावाच्या लावण्या आणि कवने गायली जाऊ लागली. श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असूनी ! सोवळे ठेवले घालूनि घडी !! मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी !!’ ह्या जिद्दीने कुबेराला लाजवील असे वैभव तमाशाच्या जोरावर पायाशी लोळवीन हा संकल्प करूनच बापूराव घराबाहेर पडले. गावोगावी तमाशाचा फड उभे राहू लागले. बापूरावांचे स्वतःचे काव्य, योग्य साथ, पहाडी आवाज आणि लावणीतील शृंगाराने तमाशा बदलला. त्यातून श्रीधरची वाहवा होता होतापठ्ठेबापूराव म्हणून ते प्रसिद्धीला आले. दोन लक्ष आम्ही केली लावणी केवढी म्हणावी मात बडी असा स्वतःच्या काव्य लेखनाचा निर्देश करणारा हा शाहीर, मुंबईत आला, बटाट्याच्या चाळीत राहू लागले. तिथेही तमाशाच्या फडात जाऊन त्यांना लावण्या रचून देण्याचे काम त्यांनी काही दिवस केले. याच काळात त्यांना नामा धुलवडकरांच्या फडात पवळा भेटली. तिला काहीजणमस्तानी ची उपमा द्यायचे. ती आधीच ’नामचंद पवळा’ म्हणून प्रसिद्ध होती. बापूरावांची काव्यप्रतिभा पवळाच्या सान्निध्यात बहरली. बापूरावांचे काव्य अन्‌ पवळाबाईच्या गोड गळ्याने व ठसकेबाज नृत्याने ती रसिकांच्यासमोर सादर केली. बापूराव आणि पवळा यांची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पसरली. १९०८-०९ साली छत्रपती शाहू महाराजांसमोर’मिठाराणी’चा वग पठ्ठे बापूरावांनी सादर केला.(विकिपीडिया )
“आधी गणाला रणी आणला
नाहीतर रंग पुन्हा सुनासुना
धन्य शारदा ब्रह्म नायका, घेऊन येईल रूद्रविणा
साही शास्‍त्रांचा मंत्र अस्‍त्रांचा, दाविल यंत्र खुणाखुणा
नाहीतर रंग पुन्हा सुनासुना
सद्‌गुरू माझा स्वामी जगद्‌गुरू, मेरूवरचा धुरू आणाआणा
ब्रम्हांडा भवता तो एक सवता, दिवाच लाविल म्हणाम्हणा
नाहीतर रंग पुन्हा सुनासुना
माझ्या मनाचा मी तू पणाचा, जाळून केला चुनाचुना
पठ्ठेबापूराव कवि कवनाचा, हा एक तुकडा जुनाजुना
नाहीतर रंग पुन्हा सुनासुना”

श्री.माधव विद्वांस आणि फेसबुक यांचे आभार दि.२८-१२-२०२३